श्रीमद् रामायणं सम्पूर्णम्
श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकादशाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामायण काव्यस्य उपसंहारः तस्य महिमा च -
रामायण काव्याचा उपसंहार आणि त्याचा महिमा -
एतावदेतद् आख्यानं सोत्तरं ब्रह्मपूजितम् ।
रामायणमिति ख्यातं मुख्यं वाल्मीकीना कृतम् ॥ १ ॥
(कुश आणि लव म्हणतात -) महर्षि वाल्मीकि द्वारा निर्मित हे रामायण नामक श्रेष्ठ आख्यान उत्तरकांडासहित इतकेच आहे. ब्रह्मदेवांनीही याचा आदर केला आहे. ॥१॥
ततः प्रतिष्ठितो विष्णुः स्वर्गलोके यथा पुरम् ।
येन व्याप्तमिदं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ॥ २ ॥
याप्रकारे श्रीराम पूर्वीप्रमाणेच आपल्या विष्णुरूपाने परमधामात प्रतिष्ठित झाले. त्याच्या द्वारा चराचर प्राण्यांसहित हे समस्त त्रैलोक्य व्याप्त आहे. ॥२॥
ततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः ।
नित्यं शृण्वन्ति संहृष्टाः दिव्यं रामायणं दिवि ॥ ३ ॥
त्या भगवंताच्या पावन चरित्राने युक्त असल्याने देवता, गंधर्व, सिद्ध आणि महर्षि सदा प्रसन्नतापूर्वक देवलोकात या रामायण काव्याचे श्रवण करतात. ॥३॥
इदं आख्यानमायुष्यं सौभाग्यं पापनाशनम् ।
रामायणं वेदसमं श्राद्धेषु श्रावयेद् बुधः ॥ ४ ॥
हे प्रबंधकाव्य आयुष्य तसेच सौभाग्याला वाढवते आणि पापांचा नाश करत असते. रामायण वेदांसमान आहे. विद्वान्‌ पुरूषांनी श्राद्धात हे वाचून ऐकविले पाहिजे. ॥४॥
अपुत्रो लभते पुत्रं अधनो लभते धनम् ।
सर्वपापैः प्रमुच्येत पादमप्यस्य यः पठेत् ॥ ५ ॥
याच्या पाठाने पुत्रहीनाला पुत्र आणि धनहीनाला धन मिळते. जो प्रतिदिन याच्या श्लोकाच्या एका चरणाचाही पाठ करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. ॥५॥
पापान्यपि च यः कुर्याद् अहन्यहनि मानवः ।
पठति एकमपि श्लोकं पापात् स परिमुच्यते ॥ ६ ॥
जो मनुष्य प्रतिदिन पाप करतो तोही जर याच्या एका श्लोकाचाही नित्य पाठ करील तर तो सार्‍या पापराशीपासून मुक्त होऊन जातो. ॥६॥
वाचकाय च दातव्यं वस्त्रं धेनु हिरण्यकम् ।
वाचके परितुष्टे तु तुष्टाः स्युः सर्वदेवताः ॥ ७ ॥
याची कथा ऐकविण्यार्‍या वाचकाला वस्त्र, गाय आणि सुवर्णाची दक्षिणा दिली पाहिजे. वाचक संतुष्ट झाल्यावर सर्व देवता संतुष्ट होतात. ॥७॥
एतद् आख्यानमायुष्यं पठन् रामायणं नरः ।
सपुत्रपौत्रो लोकेऽस्मिन् प्रेत्य चेह महीयते ॥ ८ ॥
हे रामायण नामक प्रबंध काव्य आयुष्याची वृद्धि करणारे आहे. जो मनुष्य प्रतिदिन याचा पाठ करतो त्याला या लोकात पुत्र-पौत्रांची प्राप्ती होते आणि मृत्युनंतर परलोकातही त्याचा मोठा सन्मान होतो. ॥८॥
रामायणं गोविसर्गे मध्याह्ने वा समाहितः ।
सायाह्ने वापराह्णे च वाचयन् नावसीदति ॥ ९ ॥
जो प्रतिदिन एकाग्रचित्त होऊन प्रातःकाळ, मध्याह्न, अपराह्न अथवा सायंकाळी रामायणाचा पाठ करतो, त्याला कधी काही दुःख होत नाही. ॥९॥
अयोध्याऽपि पुरी रम्या शून्या वर्षगणान् बहून् ।
ऋषभं प्राप्य राजानं निवासं उपयास्यति ॥ १० ॥
(श्री रघुनाथ परमधामास गेल्यानंतर) रमणीय अयोध्या पुरी बरीच वर्षेपर्यंत ओसाड पडून राहील. नंतर राजा ऋषभाच्या समयी ती वसविली जाईल. ॥१०॥
एतद् आख्यानमायुष्यं सभविष्यं सहोत्तरम् ।
कृतवान् प्रचेतसः पुत्रः तद् ह्माप्यन्वमन्यत ॥ ११ ॥
प्रचेतांचे पुत्र वाल्मीकिनी अश्वमेध यज्ञाच्या समाप्तिनंतरची कथा एवं उत्तरकांडासहित रामायण नामक हा ऐतिहासिक काव्याची निर्मिती केली आहे. ब्रह्मदेवांनीही हिचे अनुमोदन केले आहे. ॥११॥
अश्वमेधसहस्रस्य वाजपेयायुतस्य च ।
लभते श्रावणादेव सर्गस्यैकस्य मानवः ॥ १२ ॥
या काव्याच्या एका सर्गाच्या श्रवणमात्रे करुनही मनुष्य एक हजार अश्वमेध आणि दहा हजार वाजपेय यज्ञाचे फळ प्राप्त करू शकतो. ॥१२॥
प्रयागादीनि तीर्थानि गङ्‌गाद्याः सरितस्तथा ।
नैमिशादीनि अरण्यानि कुरुक्षेत्रादिकान्यपि ॥ १३ ॥

गतानि तेन लोकेऽस्मिन् येन रामायणं श्रुतम् ।
ज्याने या लोकात रामायणाची कथा ऐकली त्याने जणु प्रयाग आदि तीर्थे, गंगा आदि पवित्र नद्या, नैमिषारण्य आदि वने आणि कुरूक्षेत्र आदि पुण्यक्षेत्रांची यात्राच पूर्ण केली. ॥१३ १/२॥
हेमभारं कुरुक्षेत्रे ग्रस्ते भानौ प्रयच्छति ॥ १४ ॥

यश्च रामायणं लोके शृणोति सदृशावुभौ ।
जो सूर्यग्रहणाच्या समयी कुरूक्षेत्रात एक भार सुवर्णाचे दान करतो आणि जो लोकांत प्रतिदिन रामायण ऐकतो, ते दोघेही समान पुण्याचे भागी होतात. ॥१४ १/२॥
सम्यक् श्रद्धासमायुक्तः शृणुते राघवीं कथाम् ॥ १५ ॥

सर्वपापात् प्रमुच्येत विष्णुलोकं स गच्छति ।
जो उत्तम श्रद्धेने संपन्न होऊन राघवांची कथा ऐकतो तो सर्व पापांतून मुक्त होतो आणि विष्णुलोकात जातो. ॥१५ १/२॥
आदिकाव्यं इदं त्वार्षं पुरा वाल्मीकिना कृतम् ॥ १६ ॥

यः शृणोति सदा भक्त्या स गच्छेद् वैष्णवीं तनुम् ।
जो पूर्वकाळी वाल्मीकिद्वारा निर्मित या आर्षरामायण आदिकाव्याचे सदा भक्तिभावाने श्रवण करतो, तो भगवान्‌ विष्णूंचे सारूण्य प्राप्त करतो. ॥१६ १/२॥
पुत्रदाराश्च वर्धन्ते सम्पदः सन्ततिस्तथा ॥ १७ ॥

सत्यमेतद् विदित्वा तु श्रोतव्यं नियतात्मभिः ।
गायत्र्याश्च स्वरूपं तद् रामायणं अनुत्तमम् ॥ १८ ॥
याच्या श्रवणाने स्त्री पुत्रांची प्राप्ति होते, धन आणि संतति वाढते. हे पूर्णतः सत्य समजून मनाला अधीन ठेवून याचे श्रवण केले पाहिजे. हे परम उत्तम रामायण काव्य गायत्रीचे स्वरूप आहे. ॥१७-१८॥
यः पठेत् शृणुयान्नित्यं चरितं राघवस्य ह ।
भक्त्या निष्कल्मषो भूत्वा दीर्घमायुरवाप्नुयात् ॥ १९ ॥
जो पुरूष प्रतिदिन भक्तिभावाने राघवाचे हे चरित्र ऐकतो अथवा वाचतो, तो निष्पाप होऊन दीर्घायुष्य प्राप्त करतो. ॥१९॥
चिन्तयेद् राघवं नित्यं श्रेयः प्राप्तुं य इच्छति ।
श्रावयेद् इदमाख्यानं ब्राह्मणेभ्यो दिने दिने ॥ २० ॥
जो कल्याण प्राप्तिची इच्छा ठेवतो त्याने नित्य निरंतर राघवांचे चिंतन केले पाहिजे. ब्राह्मणांना प्रतिदिन हे प्रबंधकाव्य ऐकविले पाहिजे. ॥२०॥
यस्त्विदं रघुनाथस्य चरितं सकलं पठेत् ।
सोऽसुक्षये विष्णुलोकं गच्छत्येव न संशयः ॥ २१ ॥
जो या रघुनाथ चरित्राचा पाठ पूर्ण करतो, तो प्राणांत झाल्यावर भगवान्‌ विष्णुंच्याच धामात जातो, यात संशय नाही. ॥२१॥
पिता पितामहस्तस्य तथैव प्रपितामहः ।
तत्पिता तत्पिता चैव विष्णुं यान्ति न संशयः ॥ २२ ॥
इतकेच नव्हे तर त्याचे पिता, पितामह, प्रपितामह, वृद्ध प्रपितामह तसेच त्यांचेही पिता भगवान्‌ विष्णुंना प्राप्त करतात यात संशय नाही. ॥२२॥
चतुर्वर्गप्रदं नित्यं चरितं राघवस्य तु ।
तस्माद् यत्‍नणवता नित्यं श्रोतव्यं परमं सदा ॥ २३ ॥
श्रीराघवेन्द्रांचे हे चरित्र सदा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारी पुरूषार्थांना देणारे आहे, म्हणून प्रतिदिन यत्‍नपूर्वक निरंतर या उत्तम काव्याचे श्रवण केले पाहिजे. ॥२३॥
शृण्वन् रामायणं भक्त्या यः पादं पदमेव वा ।
स याति ब्रह्मणः स्थानं ब्रह्मणा पूज्यते सदा ॥ २४ ॥
जो रामायण काव्याच्या श्लोकाचा एक चरण अथवा एका पदाचे भक्तिभावाने श्रवण करतो, तो ब्रह्मदेवांच्या धामी जातो आणि सदा त्यांच्या द्वारा पूजित होत असतो. ॥२४॥
एवमेतत् पुरावृत्तं आख्यानं भद्रमस्तु वः ।
प्रव्याहरत विस्रब्धं बलं विष्णोः प्रवर्धताम् ॥ २५ ॥
याप्रकारे या पुरातन आख्यानाचा आपण विश्वासपूर्वक पाठ करावा. आपले कल्याण होवो आणि भगवान्‌ विष्णुंच्या बळाचा जय होवो. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे श्रीमद् वाल्मीकीये आदिकाव्ये चतुर्विंशत्सहस्रिकायां संहितायां श्रीमद् उत्तरकाण्डे एकादशोत्तरशततमः सर्गः ॥ १११ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकशे अकरावा सर्ग पूरा झाला. ॥१११॥
॥ इत्युत्तरकाण्डः समाप्तः ॥
॥ इत्यार्षे श्रीमद् वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् रामायणं सम्पूर्णम् ॥
॥ उत्तरकांडं संपूर्णम्‌ ॥
***** महर्षि वाद्वाल्मीकीकृत श्रीरामायण महाकाव्य समाप्त *****
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP