च्यवनेन शत्रुघ्नं लवणासुरशूलशक्तिं परिचाययता पूर्वघटितस्य राज्ञो मान्धातुर्वधस्य श्रावणम् -   
 |                    
 
च्यवन मुनिंनी शत्रुघ्नांना लवणासुराच्या शूलाच्या शक्तिचा परिचय देत असता राजा मान्धात्याच्या वधाचा प्रसंग ऐकविणे - 
 | 
अथ रात्र्यां प्रवृत्तायां शत्रुघ्नो भृगुनन्दनम् ।   पप्रच्छ च्यवनं विप्रं लवणस्य यथाबलम् ॥ १ ॥ 
  शूलस्य च बलं ब्रह्मन् के च पूर्वं विनाशिताः ।   अनेन शूलमुख्येन द्वन्द्वयुद्धमुपागताः ॥ २ ॥   
 |                    
 
एके दिवशी रात्रीच्या वेळी शत्रुघ्नांनी भृगुनंदन ब्रह्मर्षि च्यवनांना विचारले - ब्रह्मन् ! लवणासुराच्या ठिकाणी किती बळ आहे ? त्याच्या शूलामध्ये किती शक्ति आहे ? त्या उत्तम शूलाच्या द्वारे त्याने द्वंद युद्धासाठी आलेल्या कोणा कोणा योद्ध्यांचा वध केला आहे ? ॥१-२॥
 | 
तस्य तद् वचनं श्रुत्वा शत्रुघ्नस्य महात्मनः ।   प्रत्युवाच महातेजाः च्यवनो रघुनन्दनम् ॥ ३ ॥   
 |                    
 
महात्मा शत्रुघ्नांचे ते वचन ऐकून महातेजस्वी च्यवनांनी त्या रघुनंदन राजकुमारांना म्हटले - ॥३॥
 | 
असंख्येयानि कर्माणि यान्यस्य रघुनन्दन ।   इक्ष्वाकुवंशप्रभवे यद् वृत्तं तच्छृणष्व मे ॥ ४ ॥   
 |                    
 
रघुनंदन ! या लवणासुराची कर्मे असंख्य आहेत. त्यापैकी एका अश्या कर्माचे वर्णन केले जाते, जे इक्ष्वाकुवंशी राजा मांधाता याच्या संबंधात घडलेले आहे. तू माझ्या मुखाने ऐक. ॥४॥
 | 
अयोध्यायां पुरा राजा युवनाश्वसुतो बली ।   मान्धातेति स विख्यातः त्रिषु लोकेषु वीर्यवान् ॥ ५ ॥   
 |                    
 
पूर्वकाळातील गोष्ट आहे. अयोध्यापुरीमध्ये युवनाश्वांचे पुत्र राजा मान्धाता राज्य करीत होते. ते फार बलवान्, पराक्रमी तसेच तीन्ही लोकात विख्यात होते. ॥५॥
 | 
स कृत्वा पृथिवीं कृत्स्नां शासने पृथिवीपतिः ।   सुरलोकमितो जेतुं उद्योगमकरोन्नृपः ॥ ६ ॥   
 |                    
 
त्या पृथ्वीपति नरेशांनी सार्या पृथ्वीला आपल्या अधिकारात घेऊन येथून स्वर्गलोकावर विजय मिळविण्याचा उद्योग आरंभला होता. ॥६॥
 | 
इन्द्रस्य च भयं तीव्रं सुराणां च महात्मनाम् ।   मान्धातरि कृतोद्योगे देवलोकजिगीषया ॥ ७ ॥   
 |                    
 
राजा मान्धात्याने जेव्हा देवलोकावर विजय प्राप्त करण्याच्या इच्छेने उद्योगास प्रारंभ केला तेव्हा इंद्र तसेच महामनस्वी देवतांना फार भय वाटले. ॥७॥
 | 
अर्धासनेन शक्रस्य राज्यार्धेन च पार्थिवः ।   वन्द्यमानः सुरगणैः प्रतिज्ञामध्यरोहत ॥ ८ ॥   
 |                    
 
मी इंद्राचे अर्धे सिंहासन तसेच त्यांचे अर्धे राज्य घेऊन भूमण्डलाचा राजा होऊन देवतांच्या कडून वंदित होऊन राहीन अशी प्रतिज्ञा करून ते स्वर्गलोकावर चाल करून गेले. ॥८॥
 | 
तस्य पापमभिप्रायं विदित्वा पाकशासनः ।   सान्त्वपूर्वमिदं वाक्यं उवाच युवनाश्वजम् ॥ ९ ॥   
 |                    
 
त्यांचा खोटा अभिप्राय जाणून पाकशासन इंद्र त्या युवनाश्व पुत्र मान्धात्याच्या जवळ गेले आणि शान्तिपूर्वक समजावून याप्रकारे बोलले - ॥९॥
 | 
राजा त्वं मानुषे लोके न तावत् पुरुषर्षभ ।   अकृत्वा पृथिवीं वश्यां देवराज्यमिहेच्छसि ॥ १० ॥   
 |                    
 
पुरुषप्रवर ! अद्याप तू सार्या मर्त्यलोकाचाही राजा नाहीस. संपूर्ण पृथ्वी वश केल्याशिवायच देवतांचे राज्य घेऊ इच्छित आहेस ? ॥१०॥
 | 
यदि वीर समग्रा ते मेदिनी निखिला वशे ।   देवराज्यं कुरुष्वेह सभृत्यबलवाहनः ॥ ११ ॥   
 |                    
 
वीरा ! जर सारी पृथ्वी तुझ्या ताब्यात आली तर तू सेवक, सेना, आणि वाहनांसहित येथे देवलोकाचे राज्य कर. ॥११॥
 | 
इन्द्रमेवं ब्रुवाणं तं मान्धाता वाक्यमब्रवीत् ।   क्व मे शक्र प्रतिहतं शासनं पृथिवीतले ॥ १२ ॥   
 |                    
 
असे सांगण्यार्या इंद्रांना मान्धात्याने विचारले - देवराज ! सांगा तर खरे, या पृथ्वीवर कोठे माझ्या आदेशाची अवहेलना होत आहे ? ॥१२॥
 | 
तमुवाच सहस्राक्षो लवणो नाम राक्षसः ।   मधुपुत्रो मधुवने न तेऽऽज्ञां कुरुतेऽनघ ॥ १३ ॥   
 |                    
 
तेव्हा इंद्रांनी म्हटले - निष्पाप नरेशा ! मधुवनात मधुचा पुत्र लवणासुर रहात आहे. तो तुमची आज्ञा मानत नाही. ॥१३॥
 | 
तच्छ्रुत्वा विप्रियं घोरं सहस्राक्षेण भाषितम् ।   व्रीडितोऽवाङ्मुखो राजा व्याहर्तुं न शशाक ह ॥ १४ ॥   
 |                    
 
इंद्रांनी सांगितलेली ही घोर अप्रिय गोष्ट ऐकून राजा मान्धात्यांचे मुख लज्जेने नमले. ते काही बोलू शकले नाहीत. ॥१४॥
 | 
आमन्त्र्य तु सहस्राक्षं ह्रिया किञ्चिदवाङ्मुखः ।   पुनरेवागमच्छ्रीमान् इमं लोकं नरेश्वरः ॥ १५ ॥   
 |                    
 
ते नरेश इंद्रांचा निरोप घेऊन मान खाली घालून तेथून निघाले आणि पुन्हा या मर्त्यलोकात येऊन पोहोंचले. ॥१५॥
 | 
स कृत्वा हृदयेऽमर्षं सभृत्यबलवाहनः ।   आजगाम मधोः पुत्रं वशे कर्तुमरिन्दमः ॥ १६ ॥   
 |                    
 
त्यांनी आपल्या हृदयात अमर्ष भरून घेतला. नंतर ते शत्रुदमन मान्धाता मधुच्या पुत्राला वश करण्यासाठी सेवक, सेना आणि वाहनांसहित त्याच्या राजधानीच्या समीप आले. ॥१६॥
 | 
स काङ्क्षमाणो लवणं युद्धाय पुरुषर्षभः ।   दूतं सम्प्रेषयामास सकाशं लवणस्य सः ॥ १७ ॥   
 |                    
 
त्या पुरुषप्रवर नरेशांनी युद्धाच्या इच्छेने लवणाजवळ आपला दूत धाडला. ॥१७॥
 | 
स गत्वा विप्रियाण्याह बहूनि मधुनः सुतम् ।   वदन्तमेवं तं दूतं भक्षयामास राक्षसः ॥ १८ ॥   
 |                    
 
दूताने तेथे जाऊन मधुच्या पुत्राला खूप कटुवचने ऐकविली. याप्रकारे कठोर वचने बोलणार्या त्या दूताला त्या राक्षसाने तात्काळ खाऊन टाकले. ॥१८॥
 | 
चिरायमाणे दूते तु राजा क्रोधसमन्वितः ।   अर्दयामास तद् रक्षः शरवृष्ट्या समन्ततः ॥ १९ ॥   
 |                    
 
जेव्हा दूताला परत येण्यास उशीर झाला, तेव्हा राजा फार क्रुद्ध झाले आणि बाणांची वृष्टि करून त्या राक्षसाला सर्व बाजूनी पीडित करू लागले. ॥१९॥
 | 
ततः प्रहस्य तद् रक्षः शूलं जग्राह पाणिना ।   वधाय सानुबन्धस्य मुमोचायुधमुत्तमम् ॥ २० ॥   
 |                    
 
तेव्हा लवणासुराने हसून हातात तो शूल उचलला आणि सेवकांसहित राजा मान्धात्याचा वध करण्यासाठी त्या उत्तम अस्त्राला त्यांच्यावर सोडून दिले. ॥२०॥
 | 
तच्छूलं दीप्यमानं तु सभृत्यबलवाहनम् ।   भस्मीकृत्वा नृपं भूयो लवणस्यागमत् करम् ॥ २१ ॥   
 |                    
 
तो चमकणारा शूल सेवक, सेना आणि वहाने यांच्यासहित राजा मान्धात्याला भस्म करून पुन्हा परत लवणासुराचा हातामध्ये आला. ॥२१॥
 | 
एवं स राजा सुमहान् हतः सबलवाहनः ।   शूलस्य तु बलं सौम्य अप्रमेयमनुत्तमम् ॥ २२ ॥   
 |                    
 
याप्रकारे सारी सेना आणि वहानांसहित महाराज मान्धाता मारले गेले. सौम्य ! त्या शूलाची शक्ति असीम आणि सर्वापेक्षा वरचढ आहे. ॥२२॥
 | 
श्वः प्रभाते तु लवणं वधिष्यसि न संशयः ।   अगृहीतायुधं क्षिप्रं ध्रुवो हि विजयस्तव ॥ २३ ॥   
 |                    
 
राजन् ! उद्या सकाळी जो पर्यंत तो राक्षस त्या अस्त्राला घेणार नाही तो पर्यंतच शीघ्रता केल्यानंतर तुम्ही निःसंदेह त्याचा वध करू शकाल आणि याप्रकारे निश्चितच तुमचा विजय होईल. ॥२३॥
 | 
लोकानां स्वस्ति चैवं स्यात् कृते कर्मणि च त्वया ।   एतत् ते सर्वमाख्यातं लवणस्य दुरात्मनः ॥ २४ ॥ 
  शूलस्य च बलं घोरमप्रमेयं नरर्षभ ।   विनाशश्चैव मान्धातुः यत्तेनाभूच्च पार्थिव ॥ २५ ॥   
 |                    
 
तुमच्या द्वारा हे कार्य झाल्यावर समस्त लोकांचे कल्याण होईल. नरश्रेष्ठ ! याप्रकारे मी तुम्हांला दुरात्मा लवणाचे सारे बळ सांगितले आहे आणि त्यांच्या शूलाचाही घोर तसेच असीम शक्तिचा परिचय दिला आहे. पृथ्वीनाथ ! इंद्राच्या प्रयत्नामुळे त्याच शूलाद्वारे राजा मान्धात्याचा विनाश झाला होता. ॥२४-२५॥
 | 
त्वं श्वः प्रभाते लवणं महात्मन्   वधिष्यसे नात्र तु संशयो मे ।   शूलं विना निर्गतमामिषार्थे   ध्रुवो जयस्ते भविता नरेन्द्र ॥ २६ ॥   
 |                    
 
महात्मन् ! उद्या सकाळी जेव्हा तो शूल न घेतांच मांसाचा संग्रह करण्यासाठी बाहेर पडेल, तेव्हा तू त्याचा वध करून टाकशील यात संशय नाही. नरेंद्र ! अवश्य तुमचा विजय होईल. ॥२६॥
 | 
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्तषष्टितमः सर्गः ॥ ६७ ॥   
 |                    
 
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा सदुसष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६७॥
 |