[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ अष्टपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पथि विविधामाशङ्‌कां कुर्वतो लक्ष्मणसहितस्य श्रीरामस्य स्वाश्रमे आगमनं तत्र सीतां अदृष्ट्‍वा व्यथायां निमज्जनम् -
मार्गात अनेक प्रकारच्या आशंका करीत लक्ष्मणासहित श्रीरामांचे आश्रमात येणे आणि तेथे सीता न मिळल्याने व्यथित होणे -
स दृष्ट्‍वा लक्ष्मणं दीनं शून्ये दशरथात्मजः ।
पर्यपृच्छत धर्मात्मा वैदेहीमागतं विना ॥ १ ॥
लक्ष्मणाला दीन, संतोषरहित तसेच सीतेला बरोबर न घेतां आलेला पाहून धर्मात्मा दशरथनंदन श्रीरामांनी विचारले- ॥१॥
प्रस्थितं दण्डकारण्यं या मामनुजगाम ह ।
क्व सा लक्ष्मण वैदेही यां हित्वा त्वमिहागतः ॥ २ ॥
लक्ष्मण ! जी दण्डकारण्याकडे प्रस्थित झाल्यावर अयोध्येहून माझ्या मागोमाग निघून आली तसेच जिला तू एकटी सोडून येथे आला आहेस, ती वैदेही सीता यासमयी कोठे आहे ? ॥२॥
राज्यभ्रष्टस्य दीनस्य दण्डकान् परिधावतः ।
क्व सा दुःखसहाया मे वैदेही तनुमध्यमा ॥ ३ ॥
मी राज्यभ्रष्ट आणि दीन होऊन दण्डकारण्यात फिरत राहिलो आहे, या दुःखात जी मला सहाय्यक बनली ती तनुमध्यमा (सूक्ष्मकटिप्रदेश असणारी) वैदेही कोठे आहे ? ॥३॥
यां विना नोत्सहे वीर मुहूर्तमपि जीवितुम् ।
क्व सा प्राणसहाया मे सीता सुरसुतोपमा ॥ ४ ॥
वीर ! जिच्या शिवाय मी दोन घटकाही जिवंत राहू शकत नाही तसेच जी माझ्या प्राणांची सहचरी आहे ती देवकन्यां प्रमाणे सुंदर असलेली सीता या समयी कोठे आहे ? ॥४॥
पतित्वममराणां वा पृथिव्याश्चापि लक्ष्मण ।
विना तां तपनीयाभां नेच्छेयं जनकात्मजाम् ॥ ५ ॥
लक्ष्मणा ! तापविलेल्या सोन्याप्रमाणे कांति असलेल्या जनकनंदिनी सीतेविना मी पृथ्वीचे आणि देवतांचे अधिपत्य याचीही इच्छा करीत नाही. ॥५॥
कच्चिज्जीवति वैदेही प्राणैः प्रियतरा मम ।
कच्चित् प्रव्राजनं वीर न मे मिथ्या भविष्यति ॥ ६ ॥
वीरा ! जी मला प्राणांहून अधिक प्रिय आहे, ती वैदेही सीता काय आता जिवंत असेल ? माझे वनात येणे सीतेला गमावून बसण्यामुळे व्यर्थ तर होऊन जाणार नाही ना ? ॥६॥
सीतानिमित्तं सौमित्रे मृते मयि गते त्ययि ।
कच्चित् सकामा कैकेयी सुखिता सा भविष्यति ॥ ७ ॥
सौमित्र ! सीता नष्ट होण्यामुळे जेव्हा मी मरून जाईन आणि तू एकटाच अयोध्येस परत जाशील, त्या समयी माता कैकेयी सफल मनोरथ तसेच सुखी होईल कां ? ॥७॥
सपुत्रराज्यां सिद्धार्थां मृतपुत्रा तपस्विनी ।
उपस्थास्यति कौसल्या कच्चित् सौम्येन कैकयीम् ॥ ८ ॥
जिचा एकुलता एक पुत्र मी मरून जाईन ती तपस्विनी माता कौसल्या काय पुत्र आणि राज्यानी संपन्न तसेच कृतकृत्य झालेल्या कैकेयीच्या सेवेमध्ये विनीतभावाने उपस्थित होईल ? ॥८॥
यदि जीवति वैदेही गमिष्याम्याश्रमं पुनः ।
संवृत्ता यदि वृत्ता सा प्राणांस्त्यक्ष्यामि लक्ष्मण ॥ ९ ॥
लक्ष्मणा ! जर वैदेही सीता जिवंत असेल तरच मी परत आश्रमात पाय ठेवीन. जर सदाचार- परायणा मैथिली मरून गेलेली असेल तर मीही प्राणांचा परित्याग करीन. ॥९॥
यदि मामाश्रमगतं वैदेही नाभिभाषते ।
पुनः प्रहसिता सीता विनशिष्यामि लक्ष्मण ॥ १० ॥
लक्ष्मणा ! जर आश्रमात गेल्यावर वैदेही सीता हसतमुखाने समोर येऊन माझ्याशी बोलली नाही तर मी जिवंत राहाणार नाही. ॥१०॥
ब्रूहि लक्ष्मण वैदेही यदि जीवति वा न वा ।
त्वयि प्रमत्ते रक्षोभिर्भक्षिता वा तपस्विनी ॥ ११ ॥
लक्ष्मणा ! बोल तर खरे ! वैदेही जिवंत आहे की नाही ? तुझ्या असावधान राहाण्यामुळे राक्षसांनी त्या तपस्विनीला खाऊन तर टाकले नाही ना ? ॥११॥
सुकुमारी च बाला च नित्यं चादुःखभागिनी ।
मद्वियोगेन वैदेही व्यक्तं शोचति दुर्मनाः ॥ १२ ॥
जी सुकुमार आहे भोळी भाबडी आहे, तसेच जिला वनवासाच्या दुःखाचा पूर्वी अनुभव आलेला नाही ती वैदेही आज माझ्या वियोगाने व्यथित-चित्त होऊन निश्चितच शोक करीत राहिली असेल. ॥१२॥
सर्वथा रक्षसा तेन जिह्मेन सुदुरात्मना ।
वदता लक्ष्मणेत्युच्चैस्तवापि जनितं भयम् ॥ १३ ॥
त्या कुटील आणि दुरात्मा राक्षसाने उच्चस्वराने हा लक्ष्मण ! अशी हाक मारून तुझ्या मनात सर्वथा भय उत्पन्न केले होते. ॥१३॥
श्रुतश्च मन्ये वैदेह्या स स्वरः सदृशो मम ।
त्रस्तया प्रेषितस्त्वं च द्रष्टुं मां शीघ्रमागतः ॥ १४ ॥
असे कळून येत आहे की वैदेहीने माझ्या स्वराशी मिळताजुळता त्या राक्षसाचा स्वर ऐकला होता आणि भयभीत होऊन तुला धाडून दिले आणि तूही शीघ्र मला पहाण्यासाठी निघून आलास. ॥१४॥
सर्वथा तु कृतं कष्टं सीतामुत्सृजता वने ।
प्रतिकर्तुं नृशंसानां रक्षसां दत्तमन्तरम् ॥ १५ ॥
काही का असेना, - तू वनात सीतेला एकटी सोडून सर्वथा दुःखद कार्य केले आहेस. क्रूर कर्म करणार्‍या राक्षसांना बदला घेण्याची संधी तू दिलीस. ॥१५॥
दुःखिताः खरघातेन राक्षसाः पिशिताशनाः ।
तैः सीता निहता घोरैर्भविष्यति न संशयः ॥ १६ ॥
मांसभक्षी निशाचर माझ्या हाताने खर मारल्या गेल्याने फार दुःखी झाले होते. त्या घोर राक्षसांनी सीतेला मारून टाकले असेल यात संशय नाही. ॥१६॥
अहोऽस्मि व्यसने मग्नः सर्वथा रिपुनासन ।
किं त्विदानीं करिष्यामि शङ्‌के प्राप्तव्यमीदृशम् ॥ १७ ॥
शत्रुनाशन ! मी सर्वथा संकटाच्या समुद्रात बुडून गेलो आहे. अशा दुःखाचा अवश्यच अनुभव करावा लागेल- अशी शंका येत आहे. म्हणून मी आता काय बरे करूं ? ॥१७॥
इति सीतां वरारोहां चिन्तयन्नेव राघवः ।
आजगाम जनस्थानं त्वरया सहलक्ष्मणः ॥ १८ ॥
याप्रकारे सुंदरी सीतेच्या विषयी चिंता करीतच लक्ष्मणासहित राघव तात्काळ जनस्थानात आले. ॥१८॥
विगर्हमाणोऽनुजमार्तरूपं
     क्षुधाश्रमेणैव पिपासया च ।
विनिःश्वसञ्शुष्कमुखो विषण्णः
     प्रतिश्रयं प्राप्य समीक्ष्य शून्यम् ॥ १९ ॥
आपला दुःखी अनुज लक्ष्मण यांस दोष देत व भूक-तहान तसेच परिश्रमामुळे दीर्घ श्वास घेत कोरड्‍या तोंडाने श्रीराम आश्रमाच्या निकटवर्ती स्थानावर येऊन त्यास सुने पाहून विषादात बुडून गेले. ॥१९॥
स्वमाश्रमं स प्रविगाह्य वीरो
     विहारदेशाननुसृत्य कांश्चित् ।
एतत्तदित्येव निवासभूमौ
     प्रहृष्टरोमा व्यथितो बभूव ॥ २० ॥
वीर श्रीरामांनी आश्रमात प्रवेश करून तो शून्य पाहून काही अशा स्थळामध्ये अनुसंधान केले जी सीतेची विहारस्थाने होती. ती स्थानेही शून्य असल्याचे पाहून ते क्रीडाभूमी मध्ये - हेच ते स्थान आहे जेथे मी अमुक क्रीडा केली होती असे स्मरण होऊन त्यांच्या शरीरावर रोमांच आले आणि ते व्यथेने पीडित झाले. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे अष्टपञ्चाशः सर्गः ॥ ५८ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा अठ्ठावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP