[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ पञ्चचत्वारिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
मन्त्रिणः सप्तपुत्राणां वधः -
सात अमात्यपुत्रांचा वध -
ततस्ते राक्षसेन्द्रेण चोदिता मन्त्रिणः सुताः ।
निर्युयुर्भवनात् तस्मात् सप्त सप्तार्चिवर्चसः ॥ १ ॥
त्यानन्तर राक्षसाधिपती रावणाची आज्ञा मिळताच, ते अग्नीसारखे तेजस्वी सात मन्त्रीपुत्र राजमहालातून बाहेर पडले. ॥१॥
महद्‌बलपरीवारा धनुष्मन्तो महाबलाः ।
कृतास्त्रास्त्रविदां श्रेष्ठाः परस्परजयैषिणः ॥ २ ॥
त्यांच्या बरोबर फार मोठी सेना होती. ते अत्यन्त बलाढ्‍य, धनुर्धर, अस्त्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ, तसेच परस्परान्त चढाओढ करून शत्रूवर जय मिळविण्याची इच्छा करणारे होते. ॥२॥
हेमजालपरिक्षिप्तैर्ध्वजवद्‌भिः पताकिभिः ।
तोयदस्वननिर्घोषैर्वाजियुक्तैर्महारथैः ॥ ३ ॥

तप्तकाञ्चनचित्राणि चापान्यमितविक्रमाः ।
विस्फारयन्तः संहृष्टास्तडिद्वन्त इवाम्बुदाः ॥ ४ ॥
त्यांच्या रथास घोडे जोडलेले होते व ते सोन्याने मढविलेले असून ध्वज आणि पताकांनी युक्त होते, त्या रथांच्या चाकांचा मेघगर्जनेप्रमाणे गंभीर आवाज येत होता. अशा विशाल रथांवर आरूढ होऊन ते अतुलपराक्रमी मन्त्रीपुत्र आनन्दीत होऊन सोन्याने मढविलेल्या धनुष्यांचा टणत्कार करू लागले असता विद्युल्लतेने युक्त असलेल्या मेघांप्रमाणे शोभू लागले. ॥३-४॥
जनन्यस्तास्ततस्तेषां विदित्वा किंकरान् हतान् ।
बभूवुः शोकसम्भ्रान्ताः सबान्धवसुहृज्जनाः ॥ ५ ॥
त्यावेळी प्रथम जे किंकर नावाचे राक्षस मारले गेले होते, त्यांच्या मृत्युचा समाचार मिळाल्यामुळे या सर्वांच्या माता अमंगलाच्या आशंकेने, बन्धु-बान्धव आणि सुहृदजनांसह शोकाने व्याकुळ झाल्या. ॥५॥
ते परस्परसङ्‌घर्षात् तप्तकाञ्चनभूषणाः ।
अभिपेतुर्हनूमन्तं तोरणस्थमवस्थितम् ॥ ६ ॥
त्याचवेळी इकडे जय प्राप्त करून घेण्याविषयी एकमेकाशी स्पर्धा करीत असलेले आणि उत्कृष्ट सोन्याची भूषणे धारण केलेले मन्त्रीपुत्र दरवाजावर बसलेल्या हनुमन्तावर चालून गेले. ॥६॥
सृजन्तो बाणवृष्टिं ते रथगर्जितनिःस्वनाः ।
प्रावृट्काल इवाम्भोदा विचेरुर्नैर्ऋताम्बुदाः ॥ ७ ॥
ज्याप्रमाणे वर्षाकाळात मेघ वृष्टी करीत विचरण करीत असतात त्याप्रमाणेच हे राक्षसरूपी मेघ बाणांची वृष्टी करीत तेथे विचरण करू लागले. त्यांच्या रथांचा घडघडाट हीच त्या मेघांची गर्जना होती. ॥७॥
अवकीर्णस्ततस्ताभिर्हनुमाञ्शरवृष्टिभिः ।
अभवत् संवृताकारः शैलराडिव वृष्टिभिः ॥ ८ ॥

त्यानन्तर एखादा शैलराज जलवृष्टीने झाकला जावा त्याप्रमाणे त्या राक्षसांच्या द्वारा झालेल्या बाणांच्या वृष्टीमुळे हनुमान आच्छादित झाले. ॥८॥
स शरान् वञ्चयामास तेषामाशुचरः कपिः ।
रथवेगांश्च वीराणां विचरन् विमलेऽम्बरे ॥ ९ ॥
त्यावेळी निर्मळ आकाशात शीघ्रगतीने संचार करीत कपिवर हनुमान त्या राक्षसवीरांचे बाण आणि त्यांच्या रथांचे वेग यांना निष्फळ करीत आपला स्वतःचा बचाव करू लागले. ॥९॥
स तैः क्रीडन् धनुष्मद्‌भिर्व्योम्नि वीरः प्रकाशते ।
धनुष्मद्‌भिर्यथा मेघैर्मारुतः प्रभुरम्बरे ॥ १० ॥
ज्याप्रमाणे व्योममंडलात शक्तिशाली वायुदेव इन्द्रधनुष्ययुक्त मेघांशी क्रीडा करीत असतो, त्याप्रमाणेच वीर मारूती त्या धनुर्धर वीरांबरोबर जणु खेळच करीत करीत या आकाशात अद्‍भुत शोभा प्राप्त करीत होते. ॥१०॥
स कृत्वा निनदं घोरं त्रासयंस्तां महाचमूम् ।
चकार हनुमान् वेगं तेषु रक्षःसु वीर्यवान् ॥ ११ ॥
पराक्रमी हनुमन्ताने राक्षसांच्या त्या विशाल सेनेला भयभीत करीत अत्यन्त घोर गर्जना केली आणि त्या राक्षसांवर अत्यन्त वेगाने आक्रमण केले. ॥११॥
तलेनाभिहनत् कांश्चित् पादैः कांश्चित् परन्तपः ।
मुष्टिभिश्चाहनत् कांश्चिन्नखैः कांश्चिद् व्यदारयत् ॥ १२ ॥
शत्रूंना सन्ताप देणार्‍या त्या वानरवीराने काहींना थप्पड मारून ठार केले, काहींना पायाने तुडवून टाकले तर काहींना गुद्दे मारून ठार केले तर आणखी कांहीना नखांनी विदारून फाडून टाकले. ॥१२॥
प्रममाथोरसा कांश्चिदूरुभ्यामपरानपिः ।
केचित् तस्यैव नादेन तत्रैव पतिता भुवि ॥ १३ ॥
काहींना वक्षःस्थळाने ताडण करून त्यांचा वध केला तर कुणाला लाथा मारूनच परलोकी धाडले. कित्येक निशाचर तर त्यांच्या गर्जनेनेच प्राणहीन होऊन तेथेच जमिनीवर कोसळले. ॥१३॥
ततस्तेष्ववसन्नेषु भूमौ निपतितेषु च ।
तत्सैन्यमगमत् सर्वं दिशो दश भयार्दितम् ॥ १४ ॥
याप्रकारे ज्यावेळी सर्व मन्त्रीपुत्र मारले जाऊन धराशायी झाले तेव्हा त्यांचे उरले सुरले सर्व सैन्य भयभीत होऊन दशदिशास पळून गेले. ॥१४॥
विनेदुर्विस्वरं नागा निपेतुर्भुवि वाजिनः ।
भग्ननीडध्वजच्छत्त्रैः भूश्च कीर्णाभवद् रथैः ॥ १५ ॥
त्यावेळी हत्ती वेदनांनी अत्यन्त वाईट तर्‍हेने गर्जना करू लागले. घोडे जमिनीवर मरून पडले होते आणि ज्यांची बैठक, ध्वज आणि छत्र आदि मोडून तोडून गेलेली होती अशा भग्न झालेल्या रथांनी रणभूमी व्याप्त झाली होती. ॥१५॥
स्रवता रुधिरेणाथ स्रवन्त्यो दर्शिताः पथि ।
विविधैश्च स्वरैर्लङ्‌का ननाद विकृतं तदा ॥ १६ ॥
राक्षसांच्या शरीरान्तून रक्त वाहू लागल्यामुळे मार्गामध्ये रक्ताच्या नद्याच दृष्टीस पडू लागल्या आणि नाना प्रकारच्या आरोळ्यांनी लङ्‌का भेसूर नाद करू लागली. ॥१६॥
स तान् प्रवृद्धान् विनिहत्य राक्षसान्
महाबलश्चण्डपराक्रमः कपिः ।
युयुत्सुरन्यैः पुनरेव राक्षसै-
स्तमेव वीरोऽभिजगाम तोरणम् ॥ १७ ॥
ते महाबलाढ्‍य आणि अत्यन्त पराक्रमी वानरवीर हनुमान त्या मत्त राक्षसांचा वध करून इतर दुसर्‍या राक्षसांशी युद्ध करण्याच्या इच्छेने पुन्हा त्या दरवाजावरच जाऊन बसले. ॥१७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे पञ्चचत्वारिंशः सर्गः ॥ ४५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा पंचेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४५॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP