श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ नवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अश्वमेधानुष्ठानेन इलायाः पुरुषत्वस्य प्राप्तिः -
अश्वमेधाच्या अनुष्ठानाने इलेला पुरुषत्वाची प्राप्ति -
तथोक्तवति रामे तु तस्य जन्म तदद्‌भुतम् ।
उवाच लक्ष्मणो भूयो भरतश्च महायशाः ॥ १ ॥
श्रीरामांनी जेव्हा पुरूख्याच्या जन्माची अद्‍भुत कथा सांगितली, तेव्हा लक्ष्मण तसेच महायशस्वी भरतांनी पुन्हा विचारले - ॥१॥
इला सा सोमपुत्रस्य संवत्सरमथोषिता ।
अकरोत्किं नरश्रेष्ठ तत्त्वं शंसितुमर्हसि ॥ २ ॥
नरश्रेष्ठ ! सोमपुत्र बुधाजवळ एक वर्षपर्यंत निवास केल्यानंतर इलाने काय केले हे ठीक ठीक सांगण्याची कृपा करावी. ॥२॥
तयोस्तद्वाक्यमाधुर्यं निशम्य परिपृच्छतोः ।
रामः पुनरुवाचेमां प्रजापतिसुते कथाम् ॥ ३ ॥
प्रश्न करते समयी त्या दोघां भावांच्या वाणीत फार माधुर्य होते. ते ऐकून श्रीरामांनी प्रजापति पुत्र इलाच्या विषयात पुन्हा याप्रकारे कथा सांगण्यास आरंभ केला - ॥३॥
पुरुषत्वं गते शूरे बुधः परमबुद्धिमान् ।
संवर्तं परमोदारं आजुहाव महायशाः ॥ ४ ॥
शूरवीर ! इल ज्यावेळी एक महिन्याकरिता पुरुषभावात स्थित झाले तेव्हा परम बुद्धिमान्‌ महायशस्वी बुधांनी परम उदार महात्मा संवर्तांना बोलावून घेतले. ॥४॥
च्यवनं भृगुपुत्रं च मुनिं चारिष्टनेमिनम् ।
प्रमोदनं मोदकरं ततो दुर्वाससं मुनिम् ॥ ५ ॥
भृगुपुत्र च्यवनमुनि, अरिष्टनेमि, प्रमोदन, मोदकर आणि दुर्वासा मुनिंनाही आमंत्रित केले. ॥५॥
एतान् सर्वान् समानीय वाक्यज्ञस्तत्त्वदर्शनः ।
उवाच सर्वान् सुहृदो धैर्येण सुसमाहितान् ॥ ६ ॥
या सर्वांना बोलावून वाक्यज्ञ तत्वदर्शी बुधांनी धैर्याने एकाग्रचित्त राहाणार्‍या त्या सर्व सुहृदांना सांगितले - ॥६॥
अयं राजा महाबाहुः कर्दमस्य इलः सुतः ।
जानीतैनं यथाभूतं श्रेयो ह्यत्र विधीयताम् ॥ ७ ॥
हे महाबाहु राजे इल प्रजापति कर्दमांचे पुत्र आहेत. यांची जी काही स्थिति आहे ती आपण सर्व लोक जाणतच आहात, म्हणून या विषयी असा काही उपाय करावा ज्यायोगे यांचे कल्याण होईल. ॥७॥
तेषां संवदतामेव द्विजैः सह महात्मभिः ।
कर्दमस्तु महातेजा तदाश्रममुपागमत् ॥ ८ ॥
ते सर्व प्रकारे संवाद करतच होते की महात्मा द्विजांसहित महातेजस्वी प्रजापति कर्दम ही त्या आश्रमावर येऊन पोहोंचले. ॥८॥
पुलस्त्यश्च क्रतुश्चैव वषट्कारस्तथैव च ।
ओङ्‌कारश्च महातेजाः स्तमाश्रममुपागमन् ॥ ९ ॥
त्याचबरोबर पुलस्त्य, क्रतु, वषट्‌कार तसेच महातेजस्वी ओंकारही त्या आश्रमावर आले. ॥९॥
ते सर्वे हृष्टमनसः परस्परसमागमे ।
हितैषिणो बाल्हिपतेः पृथग्वाक्यान्यथाब्रुवन् ॥ १० ॥
परस्परांना भेटल्यावर ते सर्व महर्षि प्रसन्नचित्त होवून बाह्लिक देशाचे स्वामी राजा इलाचे हिताची इच्छा करत भिन्न-भिन्न मते देऊ लागले. ॥१०॥
कर्दमस्त्वब्रवीद् वाक्यं सुतार्थं परमं हितम् ।
द्विजाः शृणुत मद्वाक्यं यच्छ्रेयः पार्थिवस्य हि ॥ ११ ॥
तेव्हा कर्दमांनी पुत्रासाठी अत्यंत हितकर गोष्ट सांगितली - ब्राह्मणांनो ! आपण लोक माझे हे वाक्य ऐका. जे या राजासाठी कल्याणकारीच होईल. ॥११॥
नान्यं पश्यामि भैषज्यं अन्तरा वृषभध्वजम् ।
नाश्वमेधात्परो यज्ञः प्रियश्चैव महात्मनः ॥ १२ ॥
मी भगवान्‌ शंकरांशिवाय दुसर्‍या कोणालाही असे बघत नाही की जे या रोगावर औषध देऊ शकतील. तसेच अश्वमेध यज्ञाहून दुसरा कुठलाही असा यज्ञ नाही जो महात्मा महादेवांना प्रिय आहे. ॥१२॥
तस्माद्यजामहे सर्वे पार्थिवार्थे दुरासदम् ।
कर्दमेनैवमुक्तास्तु सर्व एव द्विजर्षभाः ॥ १३ ॥

रोचयन्ति स्म तं यज्ञं रुद्रस्याराधनं प्रति ।
म्हणून आपण सर्वजण राजा इलच्या हितासाठी त्या दुष्कर यज्ञाचे अनुष्ठान करू या. कर्दमांनी असे सांगितल्यावर त्या सर्व श्रेष्ठ ब्राह्मणांनी भगवान्‌ रूद्राच्या आराधनेसाठी त्या यज्ञाचे अनुष्ठानच चांगले असे जाणले. ॥१३ १/२॥
संवर्तस्य तु राजर्षेः शिष्यः पुरपुरञ्जयः ॥ १४ ॥

मरुत्त इति विख्यातः तं यज्ञं समुपाहरत् ।
संवर्तांचे शिष्य तसेच शत्रुनगरीवर विजय प्राप्त करणार्‍या सुप्रसिद्ध राजर्षि मरूत्तांनी या यज्ञाचे आयोजन केले. ॥१४ १/२॥
ततो यज्ञो महानासीद् बुधाश्रमसमीपतः ॥ १५ ॥

रुद्रश्च परमं तोषं आजगाम महायशाः ।
नंतर तर बुधांच्या आश्रमाच्या निकटच हा महान्‌ यज्ञ संपन्न झाला तसेच यामुळे महायशस्वी रूद्रदेवांना फार संतोष प्राप्त झाला. ॥१५ १/२॥
अथ यज्ञे समाप्ते तु प्रीतः परमया मुदा ॥ १६ ॥

उमापतिर्द्विजान् सर्वान् उवाच इलसन्निधौ ।
यज्ञ समाप्त झाल्यावर परमानंदाने परिपूर्णचित्त झालेल्या भगवान्‌ उमापतिनी इलाच्या समक्षच त्या सर्व ब्राह्मणांना म्हटले - ॥१६ १/२॥
प्रीतोऽस्मि हयमेधेन भक्त्या च द्विजसत्तमाः ॥ १७ ॥

अस्य बाह्लिपतेश्चैव किं करोमि प्रियं शुभम् ।
द्विजश्रेष्ठगण ! मी तुमची भक्ती तसेच या अश्वमेघ यज्ञाच्या अनुष्ठानाने फार प्रसन्न झालो आहे. सांगा मी बाह्लिक नरेश इलाचे कोणते शुभ आणि प्रिय कार्य करू ? ॥१७ १/२॥
तथा वदति देवेशे द्विजास्ते सुसमाहिताः ॥ १८ ॥

प्रसादयन्ति देवेशं यथा स्यात् पुरुषस्त्विला ।
देवेश्वर शिवांनी असे म्हटल्यावर ते सर्व ब्राह्मण एकाग्रचित्त होऊन त्या देवाधिदेवांना याप्रकारे प्रसन्न करण्याचा प्रयत्‍न करू लागले की ज्यायोगे नारी इला कायमची पुरुष इल होऊन जावी. ॥१८ १/२॥
ततः प्रीतो महादेवः पुरुषत्वं ददौ पुनः ॥ १९ ॥

इलायै सुमहातेजा दत्त्वा चान्तरधीयत ।
तेव्हा प्रसन्न झालेल्या महातेजस्वी महादेवांनी इलेला कायमचे पुरुषत्व प्रदान करून टाकले आणि असे करून ते तेथेच अंतर्धान झाले. ॥१९ १/२॥
निवृत्ते हयमेधे च गतश्चादर्शनं हरे ॥ २० ॥

यथागतं द्विजाः सर्वे ह्यगच्छन्दीर्घदर्शिनः ।
अश्वमेध यज्ञ समाप्त झाल्यावर जेव्हा महादेव दर्शन देऊन अदृश्य झाले तेव्हा ते सर्व दीर्घदर्शी ब्राह्मण जसे आले होते तसेच परत गेले. ॥२० १/२॥
राजा तु बाह्लिमुत्सृज्य मध्यदेशे ह्यनुत्तमम् ॥ २१ ॥

निवेशयामास पुरं प्रतिष्ठानं यशस्करम् ।
राजा इलने बाह्लिक देश सोडून मध्यदेशात (गंगा-यमुनेच्या संगमाजवळ) एक परम उत्तम आणि यशस्वी नगर वसविले, ज्याचे नाव होते प्रतिष्ठानपुर(**). ॥२१ १/२॥
(** - प्रयागापासून पूर्व गंगेच्या तटावर वसलेले वर्तमान झांसी नावाचे स्थानच प्राचीनकाळचे प्रतिष्ठानपुर आहे.)
शशबिन्दुश्च राजर्षिः बाह्लिं पुरपुरञ्जयः ॥ २२ ॥

प्रतिष्ठाने इलो राजा प्रजापतिसुतो बली ।
शत्रुनगरीवर विजय प्राप्त करणार्‍या राजर्षि शराबिंदुने बाह्लिक देशाचे राज्य ग्रहण केले आणि प्रजापति कर्दमांचे पुत्र बलवान्‌ राजा इल प्रतिष्ठानपुरचे शासक झाले. ॥२२ १/२॥
स काले प्राप्तवाँल्लोकं इलो ब्राह्ममनुत्तमम् ॥ २३ ॥

ऐलः पुरूरवा राजा प्रतिष्ठानं अवाप्तवान् ।
योग्य समय आल्यावर राजा इल शरीर सोडून परम उत्तम ब्रह्मलोकास प्राप्त झाले आणि इलाचे पुत्र राजा पुरूख्यांनी प्रतिष्ठानपुराचे राज्य प्राप्त केले. ॥२३ १/२॥
ईदृशो ह्यश्वमेधस्य प्रभावः पुरुषर्षभौ ।
स्त्रीभूतः पौरुषं लेभे यच्चान्यदपि दुर्लभम् ॥ २४ ॥
पुरुषश्रेष्ठ भरत आणि लक्ष्मणा ! अश्वमेध यज्ञाचा असाही प्रभाव आहे. जे स्त्रीरूप झाले होते त्या राजा इलने या यज्ञाच्या प्रभावाने पुरुषत्व प्राप्त केले तसेच आणखी दुर्लभ वस्तु हस्तगत केल्या होत्या. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे नवतितमः सर्गः ॥ ९० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा नव्वदावा सर्ग पूरा झाला. ॥९०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP