
| 
 | 
		 
		  
		 
  ॥ श्रीरामचरितमानस ॥  (मराठी अनुवाद) ॥ सुंदरकाण्ड ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ अध्याय २ रा Download mp3 
 दो :- मग हनुमान् सब सांगती रामकथा निजनाम ॥  लंका तर निशाचर समूहांचेच स्थान ! येथे साधू-सज्जनांचा निवास कोठून असणार ॥ १ ॥ 
याप्रमाणे कपि तर्क करू लागला, आणि त्याचवेळी बिभीषण जागा झाला. ॥ २ ॥ 
त्याने ’राम राम’ उच्चारण्यास प्रारंभ केला (ते ऐकून) कपिच्या हृदयात हर्ष झाला व तो सज्जन आहे हे कपीने ओळखले. ॥ ३ ॥ 
साधू कधीही कार्यहानी करीत नाहीत. म्हणून याच्याशी मुद्दाम परिचय करूं (असे हनुमान मनात म्हणाला). ॥ ४ ॥ 
विप्ररूप घेऊन राम राम म्हणत (त्यांच्या दरवज्यात) गेले. हे ऐकताच बिभीषण उठून आले ॥ ५ ॥ 
प्रणाम करून त्यांनी कुशल विचारले (व म्हणाले), हे विप्र आपला परिचय द्यावा. ॥ ६ ॥ 
आपण कोणी हरिभक्त आहांत काय ? कारण माझ्या हृदयात तुमच्याविषयी अतिशय प्रेम वाटत आहे. ॥७ ॥ 
की दीनांवर अनुराग करणारे तुम्ही श्रीरामच आहांत काय ? आणि मला महाभाग्यवान बनविण्यासाठी आपण आला आहांत काय ? ॥ ८ ॥  
पहा पवनसुत अमचि राहणी । जेवीं जीभ बिचारी दशनीं ॥  
दो :- असा अधम मी श्रुणु सखे ! मजवर ही रघुवीर ॥  हे पवनसुत ! जशी बिचारी जीभ ३२ दातांच्या पहार्यात राहते तशी आमची राहणी आहे. ॥ १ ॥ 
तात ! मला अनाथ समजून भानुकुलनाथ माझ्यावर कधी कृपा करतील का ? ॥ २ ॥ 
तामसी देह असल्याने अणुमात्र साधन घडत नाही, राम चरणकमलांच्या ठायी काहीच प्रीति नाही, व त्यांचे ते पदसरोज ना मनांत ना हृदयात ! ॥ ३ ॥ 
हनुमंता ! आता मला भरंवसा वाटतो की राम मला सनाथ करतील, कारण हरि कृपेवाचून संतभेट होतच नाही. ॥ ४ ॥ 
हनुमान म्हणाला - बिभीषणा ऐका ! प्रभूची अशी रीत आहे की ते सदा सेवकांवर प्रीती करतात. मी अशा कोणत्या परम कुलीन कुळातला आहे. मी तर केवळ कपी, स्वभावतःच चंचल आणि सर्व प्रकारे इतका हीन की, ॥ ७ ॥ 
प्रातःकाळी जे कोणी आमचे नाव घेतील, त्यांच्यावर त्या दिवशी उपाशीच राहायचे पाळी यायची ! (तुम्ही तर परमश्रेष्ठ पुलस्त्य कुळातले आहात !) ॥ ८ ॥ 
मित्रा ऐक ! मी असा अधम असूनही माझ्यावर रघुवीरांनी कृपा केली. याप्रमाणे रघुनाथ-गुण स्मरण करतांच नेत्र अश्रूंनी भरले. ॥ दो. ७ ॥  
असे स्वामि समजुनिहि विसरती । फिरति कां न ते दुःखी बनती ॥ 
दो :- निजपदिं नयनां लाउनी राम चरणिं मन लीन ॥  स्वामी असे आहेत हे समजून (जाणून) सुद्धां जे त्यांना विसरतात, विषयातच रमून फिरतात, ते दुःखी का नाही होणार ? ॥ १ ॥ 
याप्रमाणे रामगुणवर्णन करीत असतां उभयतांना अनिर्वाच्य विश्राम प्राप्त झाला. ॥ २ ॥ 
तेथे जनकसुता कशी कोठे आहे ती सर्व कथा बिभीषणाने सांगितली. ॥ ३ ॥ 
तेव्हा हनुमान म्हणाला, हे बंधो ! मी जानकी मातेला पाहू इच्छ्तो. ॥ ४ ॥ 
तेव्हा बिभीषणाने सगळी युक्ती (कोठून केव्हा कसे जाणे इ.) सांगितली व पवनसुत निरोप घेऊन निघाला. ॥ ५ ॥ 
मग त्या लघुरूपाने हनुमान अशोक वनात जेथे सीता होती तेथे गेला. ॥ ६ ॥ 
सीतेला पाहून मनातच त्याने प्रणाम केला, सीता बसलेली आहे व रात्रीचा प्रहर पुढे सरकत आहे. ॥ ७ ॥ 
डोक्यावर केसांची एक जटारूप वेणी आहे, देह कृश आहे, व हृदयात रघुपतीच्या गुणगणांचा अखंड जप व चिंतन चालू आहे. ॥ ८ ॥ 
नेत्र (नजर) स्वतःच्या पायांकडे लावलेले आहेत, (पण) मन रामचरणांत लीन आहे, अशी जानकी दीन दशेत पाहिली तेव्हा पवनसुताला परम (अपार) दुःख झाले. ॥ दो ८ ॥  
तरु पल्लविं बसलेला लपुनी । करि विचार ’करुं काय तरि’ मनीं ॥ 
दो :- खद्योता सम आपणां राम भानु ऐकून ॥  कसा धीर दिधला सीतेला -  
सीते त्वां कृत मम अपमाना । कापिन तव शिर कठिण कृपाणां ॥  
दो :- गत भवनीं दशकंधर इथें पिशाचिनि-वृंद ॥  सीते ! तू माझा अपमान केलास म्हणून या कठीण कृपाणाने तुझे शीर कापीन. ॥ १ ॥ 
नाहीतर माझे म्हणणे (विनंती) ताबडतोब मान्य कर; नाहीतर हे सुमुखी ! जीवननाश होईल बघ ! ॥ २ ॥ 
दशकंधरा ! कृष्ण (नील) कमलांच्या हारासारखा सुंदर पण हत्तीच्या सोंडेसारखा प्रभूचा बाहू आहे, समजलास. ॥ ३ ॥ 
शठा ऐक ! तो बाहू या माझ्या गळ्यात पडेल की तुझी घोर तलवार पडेल ? चोरा ! माझी पण ही प्रतिज्ञा आहे. ॥ ४ ॥ 
(सीता म्हणाली) हे चंद्रहास (तलवारी) ! रघुपती विरहाग्नीने उत्पन्न झालेला माझा सर्व प्रकारचा ताप हरण कर. ॥ ५ ॥ 
तू शीतल व तीक्ष्ण अशी उत्तम धार वहन करतेस (तरी) माझा सर्व दुःखभार हरण कर. (दुसरा अर्थ - तुझ्या हृदयातील चंद्र किरणांची धार-प्रवाह अगदी शीतल आहे, त्या प्रवाहाने माझा विरहानल विझव व ती धार फार तीक्ष्ण आहे तिला मला दुःखभार देणार्याला वाहून न्यावे.) ॥ ६ ॥ 
सीतेचे बोल ऐकून रावण तिला मारण्यास धावला पण मंदोदरीने नीति सांगून त्याची समजून घातली. ॥ ७ ॥ 
तेव्हा तो सर्व निशाचरींना जवळ बोलावून म्हणाला - सीतेला भिती घाला व छळ करा. ॥ ८ ॥ 
जर एक महिन्यात तिने माझे म्हणणे मानले नाही तर मी कृपाण काढून मारीन. ॥ ९ ॥ 
दशकंठ घरी गेला व इथे पिशाचिणींचे समूह विविध मंद विद्रूपे धारण करून सीतेला भय दाखवूं लागल्या. ॥ दो. १० ॥  
त्रिजटा नाम राक्षसी एका । राम-चरण-रत निपुण विवेका ॥ 
 दो:- जिथें तिथें त्या गत, तदा चिंता सिता-मनास ॥  त्रिजटा नावाची एक राक्षसी रामचरण रत असून ज्ञानी होती. ॥ १ ॥ 
तिने त्या सर्व राक्षसींना (स्वतःला उत्तररात्री पडलेले) स्वप्न सांगितले व म्हणाली की, तुम्ही आपल्या भावी राणीची सीतेची सेवा करून स्वतःचे हित साधा कसे ! ॥ २ ॥ 
स्वप्नात एका वानराने लंका जाळली व राक्षसांचे सैन्य ठार केले. ॥ ३ ॥ 
दशानन नग्न होऊन गाढवावर बसून दहाही शिरे मुंडन केलेली व वीस बाहू तोडलेले असा दक्षिण दिशेला गेलेला स्वप्नात दिसला, व जणूं लंकेचे राज्य बिभीषणास मिळाले आहे असेही दिसले. ॥ ५ ॥ 
लंकेत रघुवीराची द्वाही फिरली व मग प्रभूंनी सीतेला बोलावून घेतली सुद्धां ॥ ६ ॥ 
मी तुम्हाला बजावून सांगते की हे स्वप्न दोन-चार दिवसातच खरे ठरणार. ॥ ७ ॥ 
हे वचन ऐकून त्या सर्व पिशाचिनी घाबरल्या व सीतेच्या पाया पडल्या. ॥ ८ ॥ 
त्यानंतर त्या इकडे तिकडे (दूर) निघून गेल्या तेव्हा सीतेच्या मनीं चिंता दाटली की एक महिना निघून जाताच ह्या निशाचराच्या हातून मी मरणार ॥ दो. ११ ॥  
वदली त्रिजटे जुळुनि करांतें । मला विपत्संगिणि तूं माते ॥  
सो :- कपि मनिं करुनि विचार टाकुनि दे मुद्रिका तंव ॥  सीता हात जोडून त्रिजटेला म्हणाली की माते ! तूं मला संकटात साह्य करणार्या मैत्रीणीसारखी आहेस. ॥ १ ॥ 
आता हा विरह मला सहन होत नाही. तरी ह्या देहाचा त्याग करण्यासाठी मला तू शीघ्रतेने प्रयत्न करून साह्य कर. ॥ २ ॥ 
काष्ठे आण आणि सौभाग्य श्रृंगारानी सजवून चिता रच व मग माते त्या चितेस अग्नि लावून दे. ॥ ३ ॥ 
तू सुजाण आहेस, तेव्हा माझे रामप्रेम सत्य कर. कारण (रावण्यासारख्या दुष्टाचे) शूलासारखे शब्द कोण सहन करील ? (ते पुन्हा ऐकणे नकोच) ॥ ४ ॥ 
सीतेचे हे बोल ऐकताचे त्रिजटेने तिचे पाय धरले व सांत्वन केले. प्रभूचा प्रताप, सुयश व बल तिच्या कानांवर घातले. ॥ ५ ॥ 
(व म्हणाली) सुकुमारी ! रात्री अग्नि मिळणे शक्य नाही. असे म्हणून ती आपल्या घरी गेली. ॥ ६ ॥ 
(विपत्तीत साह्य करणारी एकमेव त्रिजटा होती तीही गेली, त्यामुळे व्याकुळ होऊन) सीता म्हणाली, की दैवच माझ्यावर उलटलेले दिसते. (म्हणजे) अग्नि मिळणार नाही व माझा शूल नष्ट होणार नाही. ॥ ७ ॥ 
आकाशात कितीतरी निखारे अगदी प्रकट दिसत आहेत, पण त्यातील एकही तारा अवनीवर येत नाही. ॥ ८ ॥ 
हा चंद्र पावकाचाच (अग्नीचा) बनलेला दिसतो पण मी हतभागी आहे हे जाणूनच जणूं आग ओकीत नाही (मजकडे अग्नि पाठवित नाही). ॥ ९ ॥ 
हे अशोक वृक्षा, माझी विनंती ऐक. तू आपले नांब सत्य कर आणि माझा शोक नाहीसा कर. ॥ १० ॥ 
तुझी नवी नवी पालवी अग्नीसारखी आहे. मला अग्नि दे आणि माझ्या तनूचा अंत कर.  ११ ॥ 
सीतेला परम विरहाकुल पाहून तो क्षण कपीला कल्पासारखा गेला. ॥ १२ ॥ 
हनुमंताने विचार करून (सीतेने अशोकाकडे अग्नि मागताच) राम-मुद्रीका खाली टकली (तेव्हा अशोकाने निखाराच खाली टाकला आहे असे समजून) सीतेने उठून हर्षाने ती हातात घेतली. ॥ १२ ॥  
तंव दिसली मुद्रिका मनोहर । रामनाम-अंकित अति सुंदर ॥  
दो :- प्रेमळ् कपिवच परिसुनी उपजे मनिं विश्वास ॥  हातात घेऊन पाहिली तो (निखारा नसून) मनोहर अशी ती मुद्रिका आहे ! तिच्यावर ’राम’नाम कोरलेले असून ती अति सुंदर आहे. ॥ १ ॥ 
मुद्रिकेकडे तिने निरखून पाहताच तिने ती ओळखली व ती आश्चर्यचकित झाली आणि हर्षाने व विषादाने मनातून व्याकूळ झाली. ॥ २ ॥ 
रघुपति अजिंक्य असल्याने त्यांना कोण बरे जिंकू शकेल ? (अर्थात् कोणीही नाही) बरे मायावी म्हणावे तर माया ’अशी’ अंगठी बनवूच शकणार नाही. ॥ ३ ॥ 
सीता अनेक प्रकारांनी विचारग्रस्त झाली आहे हे जाणून हनुमान ’राम राम’ असे मधुर वाणीने म्हणाला. ॥ ४ ॥ 
आणि मग रामचंद्रांचे गुण वर्णन करू लागला. ते एकताच सीतेचे दुःख नष्ट झाले. ॥५ ॥ 
आणि सीता आपले पंचप्राण कानांत साठवून मन लाऊन ऐकू लागली तेव्हा हनुमंताने प्रारंभापासून सर्व रामकथा (रामविरहकथा) सीतेस वर्णन करून सांगितली. ॥ ६ ॥ 
ते ऐकून सीता म्हणाली, जो कोणी कानांना अमृतासारखी व सुंदर कथा वर्णन करीत आहे तो प्रगट का नाही होत ? ॥ ७ ॥ 
तेव्हा हनुमान आपल्या मूळ रुपाने चालत चालत जवळ गेला. (त्याला पाहून) सीता पाठ फिरवून बसली व तिचे मन भय, विषाद, आश्चर्य असे संमिश्र भावनांनी युक्त झाले. ॥ ८ ॥ 
तेव्हा हनुमान म्हणाला की जननी ! जानकी ! मी रामदूत आहे. मी करुणानिधानाची शपथ घेऊन सांगतो की आई ! ही मुद्रिका मी आणली ती रामचंद्रांनी तुम्हाला ओळख म्हणून दिली आहे. ॥ ९-१० ॥
नर-वानर यांची संगती कशी झाली ते सांग (असे जानकीने विचारताच ती संगती, सुग्रीव-राम सख्य इ. कसे घडले ते सर्व सांगितले. ॥ ११ ॥ 
कपीचे प्रेमयुक्त (प्रेमरसार्द्र) भाषण ऐकून सीतेच्या मनात विश्वास उत्पन्न झाला की हा कपी रामदूतच आहे. आणि तिने त्याच्या चर्ये व वाणीवरून जाणले की हा शरीर मन वाणीने कृपासिंधुचा दास आहे. ॥ दो. १३ ॥  
प्रीति-वाढ अति, जाणुनि हरिजन । वपु पुलकांकित सजल विलोचन ॥  
दो :- रघुपति संदेशा अतां आई ! ऐक सधीर ॥  हनुमान हरिभक्त हरिदास आहे हे जाणल्याने प्रीति अतिशय वाढली, अंगावर रोमांच उभे राहिले व डोळे पाण्याने डबडबले. ॥ १ ॥ 
आणि सीता म्हणाली बाळा हनुमंता ! मी विरह सागरात बुडत असता तू माझ्यासाठी नौका बनून आलास. ॥ २ ॥ 
सर्व इडा पिडा टळो ! बाळ ! धाकट्या भावासह सुखनिधी खरारींचे कुशल आता सांग पाहू. ॥ ३ ॥ 
रघुराज कोमल मनाचे व कृपाळू स्वभावाचे असून हे कपी ! ते निष्ठूर बनले याला कारण तरी काय ? ॥ ४ ॥ 
सेवक सुखदायक हे त्यांचे सहज ब्रीद असून त्यांनी मला दुःखात कां बरे ठेवली आहे ? रघुनायक माझी कधी तरी आठवण काढतात कां ? ॥ ५ ॥ 
सीता विरहाने परम व्याकुळ झाली आहे असे पाहून कपी विनयाने व मृदु वाणीने म्हणाला, ॥ ८ ॥ 
आई प्रभू बंधुंसह कुशल आहेत बरं ! पण कृपासागर राम मात्र तुमच्या दुःखाने दुःखी आहेत. ॥ ३ ॥ 
माते ! तुम्ही मनांत काही बाही आणूं नका. रामांचे तर तुमच्यावर दुप्पट प्रेम आहे. ॥ १० ॥ 
आई ! आता धीर धरून रघुपतीचा संदेश ऐक असे म्हणतां म्हणतां कपीच सद्गदित झाला व त्याचे नेत्र अश्रूंनी भरले. ॥ दो. १४ ॥  
कथिति राम, ’सीते तव विरहें । वळले मज विपरीत सकल हे ! ॥  
दो :- निशिचर निकर पतंग सम रघुपति-बाण कृशान ॥  रामांचा संदेश / निरोप : -  
जर किं शोध रघुवीर पावते । रघुराजा ना वेळ लावते ॥  
दो :- श्रुणु माते ! शाखा मृगा नहि बलबुद्धि विशाल ॥ जर तुझा शोध रघुवीरास लागला असता तर रघुराजांनी मुळीच वेळ लावला नसता. ॥ १ ॥ 
जानकी ! रामबाणरूपी रविचा उदय झाल्यावर राक्षसरूपी तमाचे समूह कोठे राहतील ? ॥ २ ॥ 
आई ! मी तुला आत्ताच घेऊन गेलो असतो, पण रामाची शपथ सांगतो, प्रभूंची तशी आज्ञा नाही. ॥ ३ ॥ 
म्हणून जननी ! काही दिवस धीर धर. कपींच्या सहीत रघुवीराचे येणे होईल. ॥ ४ ॥ 
निशाचरांना मारून प्रभू तुला घेऊन जातील, आणि नारदादी मुनि प्रभूंचे यश त्रैलोक्यात गातील. ॥ ५ ॥ 
हे पुत्रा ! सगळे मर्कट तुझ्याच साररखे आहेत काय ? राक्षस योद्धे तर अती बलवान आहेत. ॥ ६ ॥ 
म्हणून माझ्या हृदयात परम संदेह वाटत आहे. हे ऐकून कपीने आपला देह प्रगट केला. ॥ ७ ॥ 
सुवर्णाच्या पर्वतासारखे (सुमेरूप्रमाणे) शरीर ! आणि रणांगणार भय उत्पन्न करणारा अति बलवंत वीर सीतेला दिसला. ॥ ८ ॥ 
तेव्हा सीतेच्या मनीं भरंवसा उत्पन्न झाला, तेव्हा मग पवनसुताने पुन्हा लघुरूप धारण केले ॥ ९ ॥ 
(व म्हणाला की) माते ! ऐक, शाखामृगांना विशाल बल व विशाल बुद्धी नाही पण प्रभूच्या प्रतापाने अति लहान साप गरुडाला सुद्धा खाऊन टाकेल. ॥ दो. १६ ॥  
मनिं सुतोष परिसुनि कपि-भाषित । भक्ति तेज-बल-प्रताप-मिश्रित ॥  
दो :- बघुनि बुद्धि बल-निपुण कपि म्हणे जानकी जाइ ॥  शक्ति, तेज, बल व प्रताप यांनी युक्त असे कपीचे भाषण ऐकून सीतेला फारच संतोष वाटला. ॥ १ ॥ 
हा रामाला प्रिय व याला राम प्रिय आहेत हे जाणून आशीर्वाद दिला व म्हणाली बाळा ! तू बलनिधी व शीलनिधी हो. ॥ २ ॥ 
हे सुता ! तू अजर, अमर आणि गुणनिधी होशील व रघुनायक तुझ्यावर पुष्कळ कृपा करतील ॥ ३ ॥ 
प्रभू कृपा करतील हे शब्द कानी पडले मात्र हनुमान गाढ प्रेमात मग्न झाले. ॥ ४ ॥ 
वारंवार पायावर मस्तक नमवून कपी हात जोडून म्हणाला की माते ! मी आता कृतकृत्यच झाले, कारण तुझे आशीर्वाद अमोघ असतात हे अगदी विख्यात आहे. ॥ ५-६ ॥  श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु  |