श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ पञ्चसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पुष्पकमारूढेन श्रीरामेण स्वराज्यस्य सर्वदिक्षु भ्रान्त्वा दुष्कर्मणोऽनुसंधानं सर्वत्र सत्कर्मैव दृष्ट्‍वा दक्षिणस्यां दिशि तपस्विनः शूद्रस्य पार्श्वे गमनम् -
श्रीरामांचे पुष्पक विमानद्वारा आपल्या राज्याच्या सर्व दिशांमध्ये फिरून दुष्कर्माचा पत्ता लावणे, परंतु सर्वत्र सत्कर्मच पाहून दक्षिण दिशेमध्ये एका शूद्र तपस्याजवळ पोहोचणे -
नारदस्य तु तद्वाक्यं श्रुत्वाऽमृतमयं तदा ।
प्रहर्षमतुलं लेभे लक्ष्मणं चेदमब्रवीत् ॥ १ ॥
नारदांचे ते अमृतमय वचन ऐकून श्रीरामांना अपार आनंद झाला आणि त्यांनी लक्ष्मणांना या प्रकारे म्हटले - ॥१॥
गच्छ सौम्य द्विजश्रेष्ठं समाश्वासय सुव्रत ।
बालस्य तु शरीरं तत् तैलद्रोण्यां निधापय ॥ २ ॥

गन्धैश्च परमोदारैः तैलैश्चापि सुगन्धिभिः ।
यथा न क्षीयते बालः तथा सौम्य विधीयताम् ॥ ३ ॥
सौम्य ! जा ! सुव्रता ! या द्विजश्रेष्ठाला सान्त्वना दे आणि याच्या बालकाचे शरीर उत्तम गंध तसेच सुगंधाने युक्त तेलाने भरलेल्या लाकडाच्या मोठ्‍या डोणीत बुडवून ठेवून दे आणि अशी व्यवस्था करा की ज्यायोगे बालकाचे शरीर विकृत अथवा नष्ट होणार नाही. ॥२-३॥
यथा शरीरो बालस्य गुप्तः सन् क्लिष्टकर्मणः ।
विपत्तिः परिभेदो वा न भवेच्च तथा कुरु ॥ ४ ॥
शुभ कर्म करणार्‍या या बालकाचे शरीर ज्याप्रकारे सुरक्षित राहील, नष्ट अथवा खण्डित होणार नाही अशी व्यवस्था करा. ॥४॥
एवमादिश्य काकुत्स्थो लक्ष्मणं शुभलक्षणम् ।
मनसा पुष्पकं दध्यौ आगच्छेति महायशाः ॥ ५ ॥
शुभलक्षण लक्ष्मणाला असा संदेश देऊन महायशस्वी काकुत्स्थांनी मनातल्या मनात पुष्पकाचे चिंतन केले आणि म्हटले - येथे ये. ॥५॥
इंगितं स तु विज्ञाय पुष्पको हेमभूषितः ।
आजगाम मुहूर्तेन समीपे राघवस्य वै ॥ ६ ॥
राघवांचा अभिप्राय जाणून सुवर्णभूषित पुष्पक विमान एकाच मुहूर्तात त्यांच्या जवळ येऊन पोहोचले. ॥६॥
सोऽब्रवीत् प्रणतो भूत्वा अयमस्मि नराधिप ।
वश्यस्तव महाबाहो किङ्‌करः समुपस्थितः ॥ ७ ॥
येऊन नतमस्तक होऊन ते म्हणाले - नरेश्वर ! हा मी आलो ! महाबाहो ! मी सदा आपल्या अधीन राहाणारा किंकर आहे आणि सेवेसाठी उपस्थित झालो आहे. ॥७॥
भाषितं रुचिरं श्रुत्वा पुष्पकस्य नराधिपः ।
अभिवाद्य महर्षींन् सन् विमानं सोऽध्यरोहत ॥ ८ ॥
पुष्पक विमानाचे असे मनोहर वचन ऐकून ते महाराज श्रीराम महर्षिंना प्रणाम करून विमानावर आरूढ झाले. ॥८॥
धनुर्गृहीत्वा तूणी च खड्गं च रुचिरप्रभम् ।
निक्षिप्य नगरे चेतौ सौमित्रिभरतावुभौ ॥ ९ ॥
त्यांनी धनुष्य, बाणांनी भरलेले दोन तरकस आणि एक चमकणारी तलवार हातात घेतली होती आणि लक्ष्मण तसेच भरत - या दोन्ही भावांना नगराच्या रक्षणासाठी नियुक्त करून तेथून प्रस्थान केले. ॥९॥
प्रायात् प्रतीचीं हरितं विचिन्वंश्च ततस्ततः ।
उत्तरां अगमत् श्रीमान् दिशं हिमवता वृताम् ॥ १० ॥
श्रीमान्‌ राम प्रथम तर इकडे तिकडे शोध घेत पश्चिम दिशेकडे गेले. नंतर हिमालयाने घेरलेल्या उत्तर दिशेमध्ये जाऊन पोहोंचले. ॥१०॥
अपश्यमानस्तत्रापि स्वल्पमप्यथ दुष्कृतम् ।
पूर्वामपि दिशं सर्वां अथाऽपश्यन् नराधिपः ॥ ११ ॥
जेव्हा त्या दोन्ही दिशांमध्ये कोठेही जरा सुद्धा दुष्कर्म आढळून आले नाही तेव्हा नरेश्वर श्रीरामांनी संपूर्ण पूर्व दिशेचेही निरीक्षण केले. ॥११॥
प्रविशुद्धसमाचारां आदर्शतलनिर्मलाम् ।
पुष्पकस्थो महाबाहुः तदापश्यन् नराधिपः ॥ १२ ॥
पुष्पकावर बसलेल्या महाबाहु राजा श्रीरामांनी तेथेही शुद्ध सदाचाराचे पालन होत असलेले पाहिले. ती दिशाही दर्पणासमान निर्मल दिसत होती. ॥१२॥
दक्षिणां दिशमाक्रामत् ततो राजर्षिनन्दनः ।
शैवलस्योत्तरे पार्श्वे ददर्श सुमहत्सरः ॥ १३ ॥
तेव्हा राजर्षिनंदन रघुनाथ दक्षिण दिशेकडे गेले तेथे शैवल पर्वताच्या उत्तर भागात त्यांना एक महान्‌ सरोवर दिसून आले. ॥१३॥
तस्मिन्सरसि तप्यन्तं तापसं सुमहत्तपः ।
ददर्श राघवः श्रीमान् लम्बमानमधोमुखम् ॥ १४ ॥
त्या सरोवराच्या तटावर एक तपस्वी फार मोठी तपस्या करत होता. तो खाली तोंड करून लटकत राहिला होता. राघवांनी त्याला पाहिले. ॥१४॥
राघवस्तमुपागम्य तप्यन्तं तप उत्तमम् ।
उवाच स तदा वाक्यं धन्यस्त्वमसि सुव्रत ॥ १५ ॥

कस्यां योन्यां तपोवृद्ध वर्तसे दृढविक्रम ।
कौतूहलात् त्वां पृच्छामि रामो दाशरथिर्ह्यहम् ॥ १६ ॥
पाहून राघव उग्र तपस्या करणार्‍या त्या तपस्व्या जवळ आले आणि बोलले - उत्तम व्रताचे पालन करणार्‍या तापसा ! तू धन्य आहेस. तपस्येत वरचढ सुदृढ पराक्रमी पुरुषा ! तू कुठल्या जातिमध्ये उत्पन्न झाला आहेस. मी दशरथकुमार राम तुमचा परिचय जाणणाच्या कुतुहलाने ह्या गोष्टी विचारत आहे. ॥१५-१६॥
कोऽर्थो मनीषितस्तुभ्यं स्वर्गलाभः परोऽथवा ।
वराश्रयो यदर्थं त्वं तपस्यसि सुदुष्चरम् ॥ १७ ॥
तुम्हांला कुठली वस्तु मिळविण्याची इच्छा आहे ? तपस्याद्वारा संतुष्ट झालेल्या इष्ट देवतेकडून वराच्या रूपात तू काय प्राप्त करू इच्छितोस - स्वर्ण अथवा दुसरी कुठली वस्तु ! असा कोणता पदार्थ आहे की ज्याच्यासाठी तू अशी कठोर तपस्या करीत आहेस, जे दुसर्‍यांसाठी दुष्कर आहे. ॥१७॥
यमाश्रित्य तपस्तप्तं श्रोतुमिच्छामि तापस ।
ब्राह्मणो वाऽसि भद्रं ते क्षत्रियो वाऽसि दुर्जयः ।
वैश्यस्तृतीयवर्णो वा शूद्रो वा सत्यवाग् भव ॥ १८ ॥
तापसा ! ज्या वस्तुसाठी तू तपस्या करत राहिला आहेस, त्याबद्दल मी ऐकू इच्छितो. याशिवाय हेही सांग की तू ब्राह्मण आहेस अथवा दुर्जय क्षत्रिय ? तिसर्‍या वर्णाचा वैश्य आहेस अथवा शूद्र ! तुझे भले होवो. ठीक ठीक सांग. ॥१८॥
इत्येवमुक्तः स नराधिपेन
अवाक्शिरा दाशरथाय तस्मै ।
उवाच जातिं नृपपुङ्‌गवाय
यत्कारणे चैव तपःप्रयत्‍नः ॥ १९ ॥
महाराज श्रीरामांच्या द्वारा असे विचारले गेल्यावर खाली डोके घालून लटकत असणार्‍या त्या तपस्व्याने त्या नृपश्रेष्ठ दाशरथि रामांना आपल्या जातिचा परिचय दिला आणि ज्या उद्देश्याने त्याने तपस्येसाठी प्रयास केला होता, तो ही सांगितला. ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चसप्ततितमः सर्गः ॥ ७५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा पंचाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP