श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ त्रयशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतस्य सम्पत्या श्रीरामस्य राजसूय यज्ञकरणविषयक विचारतो विनिवृत्तिः -
भरतांच्या सांगण्यावरून श्रीरामांनी राजसूय यज्ञ करण्याच्या विचारापासून निवृत्त होणे -
तच्छ्रुत्वा भाषितं तस्य रामस्याक्लिष्ट कर्मणः ।
द्वाःस्थः कुमारावाहूय राघवाय न्यवेदयत् ॥ १ ॥
क्लेशरहित कर्मे करणार्‍या श्रीरामांचे हे कथन ऐकून द्वारपालाने कुमार भरत आणि लक्ष्मणांना बोलावून आणून राघवांच्या सेवेमध्ये उपस्थित केले. ॥१॥
दृष्ट्‍वा तु राघवः प्राप्तौ उभौ भरतलक्ष्मणौ ।
परिष्वज्य तदा रामो वाक्यमेतदुवाच ह ॥ २ ॥
भरत आणि लक्ष्मणास आलेले पाहून राघवांनी त्यांना हृदयाशी धरले आणि हे वाक्य बोलले - ॥२॥
कृतं मया यथा तथ्यं द्विजकार्यं अनुत्तमम् ।
धर्मसेतुमथो भूयः कर्तुमिच्छामि राघवौ ॥ ३ ॥
रघुवंशी राजकुमारांनो ! (राघवांनो !) मी ब्राह्मणाचे ते परम उत्तम कार्य यथावत रूपाने सिद्ध केले आहे. आता मी पुन्हा राजधर्माची चरम सीमारूप राजसूय यज्ञाचे अनुष्ठान करू इच्छितो. ॥३॥
अक्षय्यश्चाव्ययश्चैव धर्मसेतुर्मतो मम ।
धर्मप्रवचनं चैव सर्वपापप्रणाशनम् ॥ ४ ॥
माझ्या मते धर्मसेतू (राजसूय) अक्षय आणि अविनाशी फळ देणारा आहे तसेच तो धर्माचा पोषक आणि समस्त पापांचा नाश करणारा आहे. ॥४॥
युवाभ्यां आत्मभूताभ्यां राजसूयं अनुत्तमम् ।
सहितो यष्टुमिच्छामि तत्र धर्मो हि शाश्वतः ॥ ५ ॥
तुम्ही दोघे माझा आत्माच आहात म्हणून माझी इच्छा तुमच्या बरोबरच हे उत्तम राजसूय यज्ञाचे अनुष्ठान करण्याची आहे कारण की त्यात राजाचा शाश्वत धर्म प्रतिष्ठित आहे. ॥५॥
इष्ट्‍वा तु राजसूयेन मित्रः शत्रुनिबर्हणः ।
सुहुतेन सुयज्ञेन वरुणत्वमुपागमत् ॥ ६ ॥
शत्रूंचा संहार करणार्‍या मित्रदेवतेने उत्तम आहुतिने युक्त राजसूय नामक श्रेष्ठ यज्ञद्वारा परमात्म्याचे यजन करून वरुणाचे पद प्राप्त केले होते. ॥६॥
सोमश्च राजसूयेन इष्ट्‍वा धर्मेण धर्मवित् ।
प्राप्तश्च सर्वलोकेषु कीर्तिस्थानं च शाश्वतम् ॥ ७ ॥
धर्मज्ञ सोम देवतेने धर्मपूर्वक राजसूय-यज्ञाचे अनुष्ठान करून संपूर्ण लोकांमध्ये कीर्ति तसेच शाश्वत स्थानाची प्राप्ती केली होती. ॥७॥
अस्मिन्नहनि यच्छ्रेयः चिन्त्यतां तन्मया सह ।
हितं चायतियुक्तं च प्रयतौ वक्तुमर्हथः ॥ ८ ॥
म्हणून आजचा दिवस तुम्ही माझ्या बरोबर बसूनही हा विचार करा की आपल्यासाठी कोणते कर्म लोक आणि परलोकात कल्याणकारी होईल तसेच संयतचित्त होऊन तुम्ही दोघे या विषयात मला सल्ला द्यावा. ॥८॥
श्रुत्वा तु राघवस्यैतद् वाक्यं वाक्यविशारदः ।
भरतः प्राञ्जलिर्भूत्वा वाक्यमेतदुवाच ह ॥ ९ ॥
राघवांचे हे वचन ऐकून वाक्यविशारद भरतांनी हात जोडून म्हटले - ॥९॥
त्वयि धर्मः परः साधो त्वयि सर्वा वसुन्धरा ।
प्रतिष्ठिता महाबाहो यशश्चामितविक्रम ॥ १० ॥
साधो ! अमित पराक्रमी महाबाहो ! आपल्या ठिकाणी उत्तम धर्म प्रतिष्ठित आहे. ही सारी पृथ्वीही आपल्यावरच आधारित आहे तसेच आपल्यामध्येच यशाची प्रतिष्ठा आहे. ॥१०॥
महीपालाश्च सर्वे त्वां प्रजापतिमिवामराः ।
निरीक्षन्ते महात्मानं लोकानाथं यथा वयम् ॥ ११ ॥
देवता ज्याप्रमाणे प्रजापति ब्रह्मदेवानांच महात्मा आणि लोकनाथ समजतात, त्याच प्रकारे आम्ही आणि समस्त भूपाल आपल्यालाच महापुरुष तसेच समस्त लोकांचे स्वामी मानतो - या दृष्टिनेच आपल्याकडे पहातो. ॥११॥
पुत्राश्च पितृवद् राजन् पश्यन्ति त्वां महाबल ।
पृथिव्या गतिभूतोऽसि प्राणिनामपि राघव ॥ १२ ॥
राजन्‌ ! महाबली राघवा ! पुत्र जसे पित्यास पहातो त्याच प्रकारे आपल्या प्रति सर्व राजेलोकांचा भाव आहे. आपणच समस्त पृथ्वी आणि संपूर्ण प्राण्यांचाही आश्रय आहात. ॥१२॥
स त्वमेवंविधं यज्ञं आहर्तासि कथं नृप ।
पृथिव्यां राजवंशानां विनाशो यत्र दृश्यते ॥ १३ ॥
नरेश्वरा ! मग आपण असा यज्ञ कसा करू शकाल, ज्यात भूमण्डलाच्या समस्त राजवंशांचा विनाश दिसून येत आहे. ॥१३॥
पृथिव्यां ये च पुरुषा राजन् पौरुषमागताः ।
सर्वेषां भविता तत्र संक्षयः सर्वकोपजः ॥ १४ ॥
राजन्‌ ! पृथ्वीवर जे पुरुषार्थी पुरुष आहेत, त्या सर्वांचा सर्वांच्या कोपाने त्या यज्ञात संहार होऊन जाईल. ॥१४॥
सर्वं पुरुषशार्दूल गुणैरतुलविक्रम ।
पृथिवीं नार्हसे हन्तुं वशे हि तव वर्तते ॥ १५ ॥
पुरुषसिंह ! अतुल पराक्रमी वीरा ! आपल्या सद्‍गुणांच्या मुळे सारे जगत आपणास वश आहे. आपल्यासाठी या भूतलावरील निवासी लोकांचा विनाश करणे उचित होणार नाही. ॥१५॥
भरतस्य तु तद् वाक्यं श्रुत्वाऽमृतमयं तदा ।
प्रहर्षमतुलं लेभे रामः सत्यपराक्रमः ॥ १६ ॥
भरताचे हे अमृतमय वचन ऐकून सत्यपराक्रमी श्रीरामांना अनुपम हर्ष प्राप्त झाला. ॥१६॥
उवाच च शुभं वाक्यं कैकेय्यानन्दवर्धनम् ।
प्रीतोऽस्मि परितुष्टोऽस्मि तवाद्य वचनेऽनघ ॥ १७ ॥
ते कैकेयीनंदन भरतास हे शुभवचन बोलले - निष्पाप भरता ! आज तुझे वचन ऐकून मी खूप प्रसन्न आणि संतुष्ट झालो आहे. ॥१७॥
इदं वचनमक्लीबं त्वया धर्मसमागतम् ।
व्याहृतं पुरुषव्याघ्र पृथिव्याः परिपालनम् ॥ १८ ॥
पुरुषसिंह ! तुझ्या मुखातून निघालेले हे उदार आणि धर्मसंमत वचन सर्व पृथ्वीचे रक्षण करणारे आहे. ॥१८॥
एष्यदस्मद् अभिप्रायाद् राजसूयात् क्रतूत्तमात् ।
निवर्तयामि धर्मज्ञ तव सुव्याहृतेन च ॥ १९ ॥
धर्मज्ञा ! माझ्या हृदयात राजसूय यज्ञाचा संकल्प उठत होता परंतु आज तुझ्या या सुंदर भाषणाला ऐकून मी त्या उत्तम यज्ञाकडून आपल्या मनाला हटवीत आहे. ॥१९॥
लोकपीडाकरं कर्म न कर्तव्यं विचक्षणैः ।
बालानां तु शुभं वाक्यं ग्राह्य लक्ष्मणपूर्वज ।
तस्मात् शृणोमि ते वाक्यं साधु युक्तं महामते ॥ २० ॥
लक्ष्मणाच्या मोठ्‍या भावा ! बुद्धिमान्‌ पुरुषाने ज्या कर्माने संपूर्ण जगताला पीडा होईल असे कर्म करता कामा नये. बालकांनी सांगितलेली गोष्ट ही जर चांगली असेल तर ती ग्रहण करणेच उचित आहे. म्हणून महाबली वीरा ! मी तुझे उत्तम तसेच युक्तिसंगत वाक्य अत्यंत लक्षपूर्वक ऐकले आहे. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्र्यशीतितमः सर्गः ॥ ८३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा त्र्याऐंशिवा सर्ग पूरा झाला. ॥८३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP