श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ षड्शीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
इन्द्रं विन जगत्यशान्तिः अश्वमेधानुष्ठानेन इन्द्रस्य ब्रह्महत्यातो मुक्तिश्च -
इंद्राविना जगतात्‌ अशान्ति तसेच अश्वमेधाच्या अनुष्ठानाने इंद्राचे ब्रह्महत्येपासून मुक्त होणे -
तदा वृत्रवधं सर्वं अखिलेन स लक्ष्मणः ।
कथयित्वा नरश्रेष्ठः कथाशेषं प्रचक्रमे ॥ १ ॥
त्या समयी वृत्रासुराच्या वधाची पूरी कथा ऐकवून नरश्रेष्ठ लक्ष्मणांनी शेष कथा सांगण्यास याप्रकारे आरंभ केला - ॥१॥
ततो हते महावीर्ये वृत्रे देवभयंकरे ।
ब्रह्महत्यावृतः शक्रः संज्ञां लेभे न वृत्रहा ॥ २ ॥
देवतांना भय देणारा महापराक्रमी वृत्रासुर मारला गेल्यावर ब्रह्महत्येने घेरलेल्या वृत्रनाशक इंद्रांना बराच वेळ शुद्ध राहिली नव्हती. ॥२॥
सोऽन्तमाश्रित्य लोकानां नष्टसंज्ञो विचेतनः ।
कालं तत्रावसत् कञ्चिद् वेष्टमान इवोरगः ॥ ३ ॥
लोकांच्या अंतिम सीमेचा आश्रय घेऊन ते सर्पाप्रमाणे लोळत काही काळ पर्यंत अचेत आणि संज्ञाशून्य होऊन पडून राहिले होते. ॥३॥
अथ नष्टे सहस्राक्षे उद्विग्नं अभवज्जगत् ।
भूमिश्च ध्वस्तसंकाशा निःस्नेहा शुष्ककानना ॥ ४ ॥

निःस्रोतसस्ते सर्वे तु ह्रदाश्च सरितस्तथा ।
संक्षोभश्चैव सत्त्वानां अनावृष्टिकृतोऽभवत् ॥ ५ ॥
इंद्र अदृश्य झाल्याने सारा संसार व्याकुळ झाला. पृथ्वी जणु उजाड झाली. तिची आर्द्रता नष्ट झाली आणि वने वाळून गेली. समस्त सरोवरे आणि सरितांमध्ये जलस्त्रोताचा अभाव झाला आणि वृष्टि न झाल्याने सर्व जीव भयभीत झाले. ॥४-५॥
क्षीयमाणे तु लोकेऽस्मिन् संभ्रान्तमनसः सुराः ।
यदुक्तं विष्णुना पूर्वं तं यज्ञं समुपानयन् ॥ ६ ॥
समस्त लोक क्षीण होऊ लागले. यामुळे देवतांच्या हृदयांत व्याकुळता पसरली आणि त्यांनी पूर्वी भगवान्‌ विष्णुनी जो सांगितला होता त्या यज्ञाचे स्मरण केले. ॥६॥
ततः सर्वे सुरगणाः सोपाध्यायाः सहर्षिभिः ।
तं देशं समुपाजग्मुः यत्रेन्द्रो भयमोहितः ॥ ७ ॥
त्यानंतर बृहस्पतिंना बरोबर घेऊन ऋषिंसहित सर्व देवता, जेथे भयाने मोहित होऊन इंद्र लपून बसले होते त्या स्थानावर गेल्या. ॥७॥
ते तु दृष्ट्‍वा सहस्राक्षं आवृतं ब्रह्महत्यया ।
तं पुरस्कृत्य देवेशं अश्वमेधं प्रचक्रिरे ॥ ८ ॥
त्यांनी इंद्रांना ब्रह्महत्येने आवेष्टित पाहून त्याच देवेश्वरांना पुढे करून अश्वमेघ यज्ञ करण्यास सुरूवात केली. ॥८॥
ततोऽश्वमेधः सुमहान् महेन्द्रस्य महात्मनः ।
ववृधे ब्रह्महत्ययाः पावनार्थं नरेश्वर ॥ ९ ॥
नरेश्वर ! नंतर तर महामनस्वी महेंद्राचा तो महान्‌ अश्वमेध यज्ञ आरंभ झाला त्याचे उद्देश्य होते ब्रह्महत्येची निवृत्ति करून इंद्रांना पवित्र करणे. ॥९॥
ततो यज्ञे समाप्ते तु ब्रह्महत्या महात्मनः ।
अभिगम्याब्रवीद् वाक्यं क्व मे स्थानं विधास्यथ ॥ १० ॥
त्यानंतर जेव्हा हा यज्ञ समाप्त झाला, तेव्हा ब्रह्महत्येने महामनस्वी देवतांच्या जवळ येऊन विचारले - माझ्यासाठी कोठे स्थान बनविणार आहात ? ॥१०॥
ते तामूचुस्ततो देवाः तुष्टाः प्रीतिसमन्विताः ।
चतुर्धा विभजात्मानं आत्मनैव दुरासदे ॥ ११ ॥
हे ऐकून संतुष्ट आणि प्रसन्न झालेल्या देवतांनी तिला म्हटले - दुर्जय शक्तिशाली ब्रह्महत्ये ! तू आपलीच आपणांस चार भागांत विभक्त कर. ॥११॥
देवानां भाषितं श्रुत्वा ब्रह्महत्या महात्मनाम् ।
सन्निधौ स्थानमन्यत्र वरयामास दुर्वसा ॥ १२ ॥
महामनस्वी देवतांचे हे कथन ऐकून महेंद्रांच्या शरीरात दुःखपूर्वक निवास करणार्‍या ब्रह्महत्येने आपले चार भाग केले आणि इंद्रांच्या शरीराहून अन्यत्र राहाण्यासाठी स्थान मागितले. ॥१२॥
एकेनांशेन वत्स्यामि पूर्णोदासु नदीषु वै ।
चतुरो वार्षिकान् मासान् दर्पघ्नी कामचारिणी ॥ १३ ॥
(ती म्हणाली -) मी आपल्या एक अंशाने वर्षा ऋतुचे चार महिने जलाने भरलेल्या नद्यांमध्ये निवास करीन. त्या समयी मी इच्छेनुसार विचरणारी आणि दुसर्‍यांच्या दर्पाचे दलन करणारी होईन. ॥१३॥
भूम्यामहं सर्वकालं एकेनांशेन सर्वदा ।
वसिष्यामि न सन्देहः सत्येनैतद्ब्रवीमि वः ॥ १४ ॥
दुसर्‍या भागाने मी सदा सर्व समयी भूमिवर निवास करीन यात संदेह नाही, ही मी आपल्या समोर सत्य गोष्ट सांगत आहे. ॥१४॥
योऽयमंशस्तृतीयो मे स्त्रीषु यौवनशालिषु ।
त्रिरात्रं दर्पपूर्णासु वशिष्ये दर्पघातिनी ॥ १५ ॥
आणखी जो माझा तिसरा अंश आहे, त्याच्यासह मी युवावस्थेने सुशोभित होणार्‍या गर्विष्ठ स्त्रियांमध्ये प्रतिमास तीन रात्रिपर्यंत निवास करीन आणि त्यांचा दर्प नष्ट करीत राहीन. ॥१५॥
हन्तारो ब्राह्मणान् ये तु मृषापूर्वमदूषकान् ।
तांश्चतुर्थेन भागेन संश्रयिष्ये सुरर्षभाः ॥ १६ ॥
सुरश्रेष्ठगण ! जे खोटे बोलून कुणालाही कलंकित करत नाहीत अशा ब्राह्मणांचा जे वध करतात, त्यांच्यावर मी आपल्या चौथ्या भागाने आक्रमण करीन. ॥१६॥
प्रत्यूचुस्तां ततो देवा यथा वदसि दुर्वसे ।
तथा भवतु तत्सर्वं साधयस्व यदीप्सितम् ॥ १७ ॥
तेव्हा देवतांनी तिला म्हटले - दुर्वसे ! तू जसे बोलत आहेस ते सर्व तसेच होवो. जा आणि आपले अभीष्ट साधन कर. ॥१७॥
ततः प्रीत्याऽन्विता देवाः सहस्राक्षं ववन्दिरे ।
विज्वरः स च पूतात्मा वासवः समपद्यत ॥ १८ ॥
तेव्हा देवतांनी फार प्रसन्नतेने सहस्त्रलोचन इंद्रांची वंदना केली. इंद्र निश्चिंत, निष्पाप आणि विशुद्ध झाले. ॥१८॥
प्रशान्तं च जगत्सर्वं सहस्राक्षे प्रतिष्ठिते ।
यज्ञं चाद्‌भुतसंकाशं तदा शक्रोऽभ्यपूजयत् ॥ १९ ॥
इंद्र आपल्या पदावर प्रतिष्ठित होताच संपूर्ण जगतात शांती पसरली. त्यासमयी इंद्रांनी त्या अद्‍भुत शक्तिशाली यज्ञाची खूप प्रशंसा केली. ॥१९॥
ईदृशो ह्यश्वमेधस्य प्रसादो रघुनन्दन ।
यजस्व सुमहाभाग हयमेधेन पार्थिव ॥ २० ॥
रघुनंदना ! अश्वमेघ यज्ञाचा असाच प्रभाव आहे, म्हणून महाभाग ! पृथ्वीनाथ ! आपण अश्वमेघ यज्ञाद्वारा यजन करावे. ॥२०॥
इति लक्ष्मणवाक्यमुत्तमं
नृपतिरतीव मनोहरं महात्मा ।
परितोषमवाप हृष्टचेताः
निशम्य इन्द्रसमानविक्रमौजाः ॥ २१ ॥
लक्ष्मणांचे हे उत्तम आणि अत्यंत मनोहर वचन ऐकून महात्मा राजा श्रीरामचंद्र जे इंद्रासमान पराक्रमी आणि बलशाली होते, मनातल्या मनात फार प्रसन्न आणि संतुष्ट झाले. ॥२१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षडशीतितमः सर्गः ॥ ८६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा शहाऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP