श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
एकचत्वारिंशोऽध्यायः


श्रीलक्ष्म्युपाख्यानवर्णनम्

श्रीनारायण उवाच
हरिं ध्यात्वा हरिर्ब्रह्मन् जगाम ब्रह्मणः सभाम् ।
बृहस्पतिं पुरस्कृत्य सर्वैः सुरगणैः सह ॥ १ ॥
शीघ्रं गत्वा ब्रह्मलोकं दृष्ट्वा च कमलोद्‍भवम् ।
प्रणेमुर्देवताः सर्वाः सहेन्द्रा गुरुणा सह ॥ २ ॥
वृत्तान्तं कथयामास सुराचार्यो विधिं प्रति ।
प्रहस्योवाच तच्छ्रुत्वा महेन्द्रं कमलासनः ॥ ३ ॥
ब्रह्मोवाच
वत्स मद्वंशजातोऽसि प्रपौत्रो मे विचक्षणः ।
बृहस्पतेश्च शिष्यस्त्वं सुराणामधिपः स्वयम् ॥ ४ ॥
मातामहश्च दक्षस्ते विष्णुभक्तः प्रतापवान् ।
कुलत्रयं यस्य शुद्धं कथं सोऽहङ्कृतो भवेत् ॥ ५ ॥
माता पतिव्रता यस्य पिता शुद्धो जितेन्द्रियः ।
मातामहो मातुलश्च कथं सोऽहङ्‌कृतो भवेत् ॥ ६ ॥
जनः पैतृकदोषेण दोषान्मातामहस्य च ।
गुरुदोषात्त्रिभिर्दोषैर्हरिदोषी भवेद्‌ ध्रुवम् ॥ ७ ॥
सर्वान्तरात्मा भगवान् सर्वदेहेष्ववस्थितः ।
यस्य देहात्स प्रयाति स शवस्तत्क्षणं भवेत् ॥ ८ ॥
मनोऽहमिन्द्रियेशं च ज्ञानरूपो हि शङ्‌करः ।
विष्णुप्राणा च प्रकृतिर्बुद्धिर्भगवती सती ॥ ९ ॥
निद्रादयः शक्तयश्च ताः सर्वाः प्रकृतेः कलाः ।
आत्मनः प्रतिबिम्बश्च जीवो भोगशरीरभृत् ॥ १० ॥
आत्मनीशे गते देहात्सर्वे यान्ति ससम्भ्रमाः ।
यथा वर्त्मनि गच्छन्तं नरदेवमिवानुगाः ॥ ११ ॥
अहं शिवश्च शेषश्च विष्णुर्धर्मो महाविराट् ।
यूयं यदंशा भक्ताश्च तत्पुष्पं न्यक्कृतं त्वया ॥ १२ ॥
शिवेन पूजितं पादपद्मं पुष्पेण येन च ।
तत्र दुर्वाससा दत्तं दैवेन न्यक्कृतं त्वया ॥ १३ ॥
तत्पुण्यं मस्तके यस्य कृष्णपादाब्जप्रच्युतम् ।
सर्वेषां च सुराणां च तत्पूजापुरतो भवेत् ॥ १४ ॥
दैवेन वञ्चितस्त्वं हि दैवं च बलवत्तरम् ।
भाग्यहीनं जनं मूढं को वा रक्षितुमीश्वरः ॥ १५ ॥
सा श्रीर्गताधुना कोपात्कृष्णनिर्माल्यवर्जनात् ।
अधुना गच्छ वैकुण्ठं मया च गुरुणा सह ॥ १६ ॥
निषेव्य तत्र श्रीनाथं श्रियं प्राप्स्यति मद्वरात् ।
एवमुक्त्वा च स ब्रह्मा सर्वैः सुरगणैः सह ॥ १७ ॥
तत्र गत्वा परब्रह्म भगवन्तं सनातनम् ।
दृष्ट्वा तेजःस्वरूपं तं प्रज्वलन्तं स्वतेजसा ॥ १८ ॥
ग्रीष्ममध्याह्नमार्तण्डशतकोटिसमप्रभम् ।
शान्तमनादिमध्यान्तं लक्ष्यीकान्तमनन्तकम् ॥ १९ ॥
चतुर्भुजैः पार्षदैश्च सरस्वत्या युतं प्रभुम् ।
भक्त्या चतुर्भिर्वेदैश्च गङ्‌गया परिवेष्टितम् ॥ २० ॥
तं प्रणेमुः सुराः सर्वे मूर्ध्ना ब्रह्मपुरोगमाः ।
भक्तिनम्राः साश्रुनेत्रास्तुष्टुवुः परमेश्वरम् ॥ २१ ॥
वृत्तान्तं कथयामास स्वयं ब्रह्मा कृताञ्जलिः ।
रुरुदुर्देवताः सर्वाः स्वाधिकाराच्चुताश्च ताः ॥ २२ ॥
स ददर्श सुरगणं विपद्‌ग्रस्तं भयाकुलम् ।
रत्‍नभूषणशून्यं च वाहनादिविवर्जितम् ॥ २३ ॥
शोभाशून्यं हतश्रीकं निष्प्रभं सभयं परम् ।
उवाच कातरं दृष्ट्वा भयभीतिविभञ्जनः ॥ २४ ॥
श्रीभगवानुवाच
मा भैर्ब्रह्मन् हे सुराश्च भयं किं वो मयि स्थिते ।
दास्यामि लक्ष्मीमचलां परमैश्वर्यवर्धिनीम् ॥ २५ ॥
किञ्च मद्वचनं किञ्चिच्छ्रूयतां समयोचितम् ।
हितं सत्यं सारभूतं परिणामसुखावहम् ॥ २६ ॥
जनाश्चासंख्यविश्वस्था मदधीनाश्च सन्ततम् ।
यथा तथाहं मद्‍भक्तपराधीनोऽस्वतन्त्रकः ॥ २७ ॥
यं यं रुष्टो हि मद्‍भक्तो मत्परो हि निरङ्‌कुशः ।
तद्‌गृहेऽहं न तिष्ठामि पद्मया सह निश्चितम् ॥ २८ ॥
दुर्वासाः शङ्‌करांशश्च वैष्णवो मत्परायणः ।
तच्छापादागतोऽहं च सलक्ष्मीको हि वो गृहात् ॥ २९ ॥
यत्र शङ्‌खध्वनिर्नास्ति तुलसी न शिवार्चनम् ।
न भोजनं च विप्राणां न पद्मा तत्र तिष्ठति ॥ ३० ॥
मद्‍भक्तानां च मे निन्दा यत्र ब्रह्मन् भवेत्सुराः ।
महारुष्टा महालक्ष्मीस्ततो याति पराभवम् ॥ ३१ ॥
मद्‍भक्तिहीनो यो मूढो भुङ्क्ते यो हरिवासरे ।
मम जन्मदिने वापि याति श्रीस्तद्‌गृहादपि ॥ ३२ ॥
मन्नामविक्रयी यश्च विक्रीणाति स्वकन्यकाम् ।
यत्रातिथिर्न भुङ्‌क्ते च मत्प्रिया याति तद्‌गृहात् ॥ ३३ ॥
यो विप्रः पुंश्चलीपुत्रो महापापी च तत्पतिः ।
पापिनो यो गृहं याति शूद्रश्राद्धान्नभोजकः ॥ ३४ ॥
महारुष्टा ततो याति मन्दिरात्कमलालया ।
शूद्राणां शवदाही च भाग्यहीनो द्विजाधमः ॥ ३५ ॥
याति रुष्टा तद्‌गृहाच्च देवाः कमलवासिनी ।
शूद्राणां सूपकारी यो ब्राह्मणो वृषवाहकः ॥ ३६ ॥
तत्तोयपानभीता च कमला याति तद्‌गृहात् ।
अशुद्धहृदयः क्रूरो हिंसको निन्दको द्विजः ॥ ३७ ॥
ब्राह्मणः शूद्रयाजी च याति देवी च तद्‌गृहात् ।
अवीरान्नं च यो भुङ्‌क्ते तस्माद्याति जगत्प्रसूः ॥ ३८ ॥
तृणं छिनत्ति नखरैस्तैर्वा यो विलिखेन्महीम् ।
निराशो ब्राह्मणो यत्र तद्‌गृहाद्याति मत्प्रिया ॥ ३९ ॥
सूर्योदये द्विजो भुङ्‌क्ते दिवास्वापी च ब्राह्मणः ।
दिवा मैथुनकारी च यस्तस्माद्याति मत्प्रिया ॥ ४० ॥
आचारहीनो विप्रो यो यश्च शूद्रप्रतिग्रही ।
अदीक्षितो हि यो मूढस्तस्माद्वै याति मत्प्रिया ॥ ४१ ॥
स्निग्धपादश्च नग्नो हि यः शेते ज्ञानदुर्बलः ।
शश्वद्वदति वाचालो याति सा तद्‌गृहात्सती ॥ ४२ ॥
शिरस्नातस्तु तैलेन योऽन्याङ्‌गं समुपस्पृशेत् ।
स्वाङ्‌गं च वादयेद्वाद्यं रुष्टा सा याति तद्‌गृहात् ॥ ४३ ॥
व्रतोपवासहीनो यः सन्ध्याहीनोऽशुचिर्द्विजः ।
विष्णुभक्तिविहीनस्तु तस्माद्याति च मत्प्रिया ॥ ४४ ॥
ब्राह्मणं निन्दयेद्यो हि तं च यो द्वेष्टि सन्ततम् ।
जीवहिंस्रो दयाहीनो याति सर्वप्रसूस्ततः ॥ ४५ ॥
यत्र यत्र हरेरर्चा हरेरुत्कीर्तनं तथा ।
तत्र तिष्ठति सा देवी सर्वमङ्‌गलमङ्‌गला ॥ ४६ ॥
यत्र प्रशंसा कृष्णस्य तद्‍भक्तस्य पितामह ।
सा च कृष्णप्रिया देवी तत्र तिष्ठति सन्ततम् ॥ ४७ ॥
यत्र शङ्‌खध्वनिः शङ्‌खः शिला च तुलसीदलम् ।
तत्सेवा वन्दनं ध्यानं तत्र सा परितिष्ठति ॥ ४८ ॥
शिवलिङ्‌गार्चनं यत्र तस्य चोत्कीर्तनं शुभम् ।
दुर्गार्चनं तद्‌गुणाश्च तत्र पद्मनिवासिनी ॥ ४९ ॥
विप्राणां सेवनं यत्र तेषां च भोजनं शुभम् ।
अर्चनं सर्वदेवानां तत्र पद्ममुखी सती ॥ ५० ॥
इत्युक्त्वा च सुरान्सर्वान् रमामाह रमापतिः ।
क्षीरोदसागरे जन्म कलयाकलयेति च ॥ ५१ ॥
इत्युक्त्वा तां जगन्नाथो ब्रह्माणं पुनराह च ।
मथित्वा सागरं लक्ष्मीं देवेभ्यो देहि पद्मज ॥ ५२ ॥
इत्युक्त्वा कमलाकान्तो जगामान्तःपुरं मुने ।
देवाश्चिरेण कालेन ययुः क्षीरोदसागरम् ॥ ५३ ॥
मन्थानं मन्दरं कृत्वा कूर्मं कृत्वा च भाजनम् ।
कृत्वा शेषं मन्थपाशं ममन्थुरसुराः सुराः ॥ ५४ ॥
धन्वन्तरिं च पीयूषमुच्चैःश्रवसमीप्सितम् ।
नानारत्‍नं हस्तिरत्‍नं प्रापुर्लक्ष्मीं सुदर्शनम् ॥ ५५ ॥
वनमालां ददौ सा च क्षीरोदशायिने मुने ।
सर्वेश्वराय रम्याय विष्णवे वैष्णवी सती ॥ ५६ ॥
देवैः स्तुता पूजिता च ब्रह्मणा शङ्‌करेण च ।
ददौ दृष्टिं सुरगृहे ब्रह्मशापविमोचनात् ॥ ५७ ॥
प्रापुर्देवाः स्वविषयं दैत्यग्रस्तं भयङ्‌करम् ।
महालक्ष्मीप्रसादेन वरदानेन नारद ॥ ५८ ॥
इत्येवं कथितं सर्वं लक्ष्म्युपाख्यानमुत्तमम् ।
सुखदं सारभूतं च किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ ५९ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे
श्रीलक्ष्म्युपाख्यानवर्णनं नामैकचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४१ ॥


इंद्राचे सत्यलोकी गमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायण म्हणाले, "हे ब्राह्मणा, नंतर इंद्र बृहस्पतीसह ब्रह्मदेवाकडे गेला. त्यांनी ब्रह्मदेवाला नमस्कार केला. ब्रह्मदेव म्हणाला, "हे बालका, तू माझ्या वंशात जन्मास आलास. तू बृहस्पतीचा शिष्य व देवांचा अधिपती आहेस. विष्णुभक्त दक्ष हा तुझा मातामह आहे. तेव्हा जो अशा पवित्र कुलात जन्मला आहे तो अहंकारयुक्त कसा असणार ? माता, पिता व गुरु यांचा दोष प्राण्यास लागतो. तो सर्वात्मा भगवानच सर्व देहात आहे. तो देहातून निघाल्यास देह तत्काल शव होतो. मी स्वतःच मन आहे. शंकर ज्ञान आहे. विष्णूस प्राणप्रिय असलेली राधा प्रकृती व बुद्धी भगवती दुर्गा आहे.

निद्रा, तंद्रा वगैरे शक्ती प्रकृतीच्या कला आहेत. शरीर हे जीवात्म्याचे प्रतिबिंब आहे. आत्मा देहातून निघून गेल्यास ही सर्व त्याच्या मागोमाग निघून जातात.

आम्ही सर्व देव ज्याचे अंश आहोत त्याच्या पुष्पाचा तू त्याग केलास. शिवाने पूजलेले पुष्प दुर्वासांनी तुला दिले. म्हणून ज्याच्या मस्तकावर ते पडले त्याची अगोदर पूजा होईल. दैवापुढे भाग्यहीन व मूढ प्राण्याचे रक्षण करण्यास कोणीही समर्थ नाहीत. आता तू गुरूसह वैकुंठास चल. श्रीपतीची सेवा कर."

असे सांगून ब्रह्मदेव त्यांना घेऊन देवगणांसह वैकुंठास आले. त्यांनी त्या अनंतकोटी ब्रह्मांडनायकाला प्रणाम केला व भक्तीने अश्रुपूर्ण नेत्रांनी त्याची स्तुती केली. ब्रह्मदेवाने सर्व वृत्तांत श्रीहरीला निवेदन केला. तेव्हा त्या अधिकार भ्रष्ट देवता रडू लागल्या. तो निस्तेज व त्रस्त देव समुदाय अवलोकन करून श्रीभगवान म्हणाला, "हे ब्रह्मदेवा, भिऊ नकोस. तुमच्या वैभवाची वृद्धी करणारी अचल लक्ष्मी मी तुम्हाला देईन. पण माझे थोडेसे ऐक. हे सर्व त्रैलोक्यातील जन जसे माझ्या आधीन आहेत, तसाच मीही भक्ताच्या आधीन आहे. ज्याच्यावर माझा भक्त रागावेल त्याच्या घरी मी लक्ष्मीसह रहात नाही. दुर्वास शंकराचा अंश व माझा भक्त असल्यामुळे मी लक्ष्मीसह तुमच्या घरातून निघून आलो. जेथे शिवार्चन, तुलसीपूजन, ब्राह्मणभोजन ह्या गोष्टी होत नाहीत तेथे मी रहात नाही.

माझ्या जन्मदिवशी भोजन करणार्‍याकडे लक्ष्मी रहात नाही. माझ्या नावाचा विक्रय
करणारा, कन्याविक्रय करणारा, अतिथीला विन्मुख पाठवणारा इत्यादींकडे आम्ही वास्तव्य करीत नाही. थोडक्यात, जे जे म्हणून पाप सांगितले आहे त्या पापाचे आचरण करणार्‍याच्या घरात मी व लक्ष्मी रहात नाही. सूर्योदयसमयी भोजन करणारा, दिवसा झोपणारा व दिवसा मैथुन करणारा द्विज असेल तर त्याच्या घरातून लक्ष्मी निघून जाते.

शुद्र प्रतिग्रह करणारा, नग्नावस्थेत निजणारा, वाचाल, तैलस्नानानंतर दुसर्‍यास स्पर्श करणारा, संध्या न करणारा, विष्णुभक्तीशून्य, ब्राह्मणांची निंदा करणारा, पाषाणहृदयी, द्वेष करणारा या सर्वांच्या घरातून लक्ष्मी निघून जाते.

जेथे हरीपूजन व हरिकथा असतात तेथे लक्ष्मी रहाते. कृष्ण व देवीची भक्ती, शंख, शालग्रामशील, तुलसीदल यांची पूजा करणार्‍याच्या घरी लक्ष्मी वास करते. थोडक्यात पुण्यशील पुरुषाकडे लक्ष्मी रहाते." असे सांगून रमापती रमेस म्हणाले, "तू क्षीरसागरामध्ये कलेने जन्म घे."

नंतर विष्णु ब्रह्मदेवाला म्हणाले, "हे पद्मज, सागराचे मंथन करून लक्ष्मी देवांना अर्पण कर."

त्यानंतर काही काल लोटल्यावर देव क्षीरोदसागरापाशी आले. कूर्मास खालचे भांडे केले. मंदार पर्वताची रवी केली. शेषाची दोरी करून देव-दानवांनी मंथन केले. तेव्हा त्यातून धन्वंतरी, अमृत, उचैःश्रवा, विविध रत्ने, गज, लक्ष्मी, सुदर्शन इत्यादि प्राप्त झाले. लक्ष्मी नारायणास अर्पण केली. नंतर ब्रह्मदेव व शंकर यांनी तिची पूजा केली. देव शापमुक्त झाल्यामुळे लक्ष्मीने आपली दृष्टी देवमंदिरावरून फिरवली.

नंतर सर्व देव दैत्यांनी ग्रासलेले स्थानी गेले. महालक्ष्मीच्या प्रसादाने व वरदानामुळे त्यांना पूर्ववत् स्थान प्राप्त झाले.

हे नारदा, याप्रमाणे लक्ष्मीचे उपाख्यान मी तुला सांगितले. हे सर्वांना सुखदायी व सारभूत आहे.


अध्याय एकेचाळिसावा समाप्त

GO TOP