॥ पञ्चदशी ॥
चतुर्दशः परिच्छेदः - ब्रह्मानन्दे विद्यानन्दः

योगेनात्मविवेकेन द्वैतमिथ्यात्वचिन्तया ।
ब्रह्मानन्दं पश्यतोऽथ विद्यानन्दो निरूप्यते ॥ १ ॥
विषयानन्दवद्विद्यानन्दोधीवृत्तिरूपकः ।
दुःखाभावादिरूपेण प्रोक्त एष चतुर्विधः ॥ २ ॥
दुःखाभावश्च कामाप्तिः कृतकृत्योऽहमित्यसौ ।
प्राप्तप्राप्योऽहमित्येव चातुर्विध्यमुदाहृतम् ॥ ३ ॥
ऐहिकं च आमुष्मिकं चेत्येवं दुःखं द्विधेरितम् ।
निवृत्तिमैहिकस्याह बृहदारण्यकं वचः ॥ ४ ॥
आत्मानं चेद्विजानीयादयमस्मीति पूरुषः ।
किमिच्छन्कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत् ॥ ५ ॥
जीवात्मा परमात्मा चेत्यात्मा द्विविध ईरितः ।
चित्तादात्म्यात्त्रिभिर्देहैर्जीवः सन् भोक्तृतां व्रजेत् ॥ ६ ॥
परमात्मा सच्चिदानन्दस्तादात्म्यं नामरूपयोः ।
गत्वा भोग्यत्वमापन्नस्तद्विवेके तु नोभयम् ॥ ७ ॥
भोग्यमिच्छन् भोक्तुरर्थे शरीरमनुसंज्वरेत् ।
ज्वरास्त्रिषु शरीरेषु स्थिता न त्वात्मनो ज्वराः ॥ ८ ॥
व्याधयो धातुवैषम्ये स्थूलदेहे स्थिता ज्वराः ।
कामक्रोधादयः सूक्ष्मे द्वयोर्बीजं तु कारणे ॥ ९ ॥
अद्वैतानन्दमार्गेण परात्मनि विवेचिते ।
अपश्यन्वास्तवं भोग्यं किं नामेच्छेत्परात्मवित् ॥ १० ॥

मागील तीन आनंद प्रकरणांत योगाभ्यास, आत्मविवेक आणि द्वैतमिथ्यात्व यांच्या योगाने क्रमेंकरून ब्रह्मानंद अनुभवणाऱ्या पुरुषास जो एक प्रकारचा विद्यानंद होतो तो आधी या प्रकरणांत संवादरूपानें सांगतो. ॥ १ ॥
ग०-आतां तुला विद्यानंदाचे स्वरूप सांगतो. विषयानंदाप्रमाणें हा विद्यानंदही बुद्धिवृत्तीपासून होणारा आहे. त्याचे दुःखाभाव आदिकरून चार प्रकार आहेत. ॥ २ ॥
शि०-ते चार प्रकार कोणते ? गु०-दुःखभाव, सर्व इच्छेची तृप्ति, कृतकृत्यता आणि प्राप्तप्राप्यता. ॥ ३ ॥

दुःखाचेही दोन प्रकार आहेत. एक ऐहिक आणि दुसरें आमुष्मिक. ऐहिक दुःखाची निवृत्ति बृहदारण्यक श्रुतीत सांगितली आहे. ॥ ४ ॥

शि०-ती श्रुति कोणती ? गु०-''आत्मनं चेत्'' याचा अभिप्राय असा कीं, आत्मा मी आहे असें जाणणाऱ्या पुरुषांस भोक्तृत्वच मुळीं खोटे ठरल्याने शरीराची दुःखे कशी होतील ? कारण इच्छा करणारा व इच्छिला विषय हे दोन्ही मिथ्या ठरतात. ॥ ५
शि०-आपल्याला शोकसंबंध कसा आला ? गु-आत्मे दोन प्रकारचे, जीवात्मा व परमात्मा तीन देहांच्या तादात्म्याने तो जीव होऊन भोक्ता झाला. ॥ ६ ॥
शि०-परमात्म्याचें स्वरूप सांगा. गु० परमात्मा मूळचा सच्चिदानंदरूप आहे. तो नामरूपाशीं तादात्म्य पावल्यामुळे भोग्य झाला. त्या नामरूपांचा विवेक केला असतां त्याचा भोक्तेपणा आणि भोग्यपणा ही दोन्हीही नाहीशी होतात. ॥ ७ ॥
शरीरास ज्वर म्हणजे संताप झाला असतां तो आपणावर घेण्याचे कारण हे कीं, भोक्त्याकरितां भोग्य विषयाची इच्छा होते. हे ज्वर तीन शरीरांस मात्र आहेत आत्म्याला मुळीच नाहींत. ॥ ८ ॥
शि०-कोणच्या शरीराला कोणचा ज्वर आहे. गु०-धातुवैषम्याने ज्या व्याधी होतात ते स्थूल शरीरातील ज्वर होत. कामक्रोधादिक सूक्ष्म शरीरातील ज्वर आणि त्या दोहींस कारण जें अज्ञान तें कारण शरीरातील ज्वर. ॥ ९ ॥
अद्वैतानंद प्रकरणांत जो आम्ही विवेचनाचा मार्ग सांगितला, तेणेंकरून आत्म्याचे विवेचन केलें असता वास्तविक भोग्य पदार्थ कोठेंच दिसत नाहीं. मग आत्मवेत्त्यास इच्छा कशाची व्हावी ? ॥ १० ॥


आत्मानन्दोक्तरीत्यास्मिन् जीवात्मन्यवधारिते ।
भोक्ता नैवास्ति कोऽप्यत्र शरीरे तु ज्वरः कुतः ॥ ११ ॥
पुण्यपापद्वये चिन्ता दुःखमामुष्मिकं भवेत् ।
प्रथमाध्याय एवोक्तं चिन्ता नैनं तपेदिति ॥ १२ ॥
यथा पुष्करपर्णेऽस्मिन्नपामश्लेषणं तथा ।
वेदनादूर्ध्वमागामिकर्मणोऽश्लेषणं बुधे ॥ १३ ॥
इषीकातृणतूलस्य वह्निदाहः क्षणाद्यथा ।
तथा सञ्चितकर्मास्य दग्धं भवति वेदनात् ॥ १४ ॥
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ १५ ॥
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते ।
हत्वापि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥ १६ ॥
मातापित्रोर्वधः स्तेयं भ्रूणहत्यान्यदीदृशम् ।
न मुक्तिं नाशयेत्पापं मुखकान्तिर्न नश्यति ॥ १७ ॥

दुःखाभाववदेवास्य सर्वकामाप्तिरीरिता ।
सर्वान् कामानसावाप्त्वा ह्यमृतो भवदित्यतः ॥ १८ ॥
जक्षन्क्रीडन् रतिं प्राप्तः स्त्रीभिर्यानैस्तथेतरैः ।
शरीरं न स्मरेत्प्राणं कर्मणा जीवयेदमुम् ॥ १९ ॥
सर्वान्कामान्सहाप्नोति नान्यवज्जन्मकर्मभिः ।
वर्तन्ते श्रोत्रिये भोगा युगपत् क्रमवर्जिताः ॥ २० ॥

शि०-ते ज्वर आल्यास कसे लागत नाहींत ? गु०-आत्मानंद विवेचन करण्याची जी रीत आम्ही सांगितली त्या रीतीनें जीवात्म्याचा निश्चय झाला असतां भोक्ता मुळींच नाहीसा होतो. मग ज्वरांचा संबंध कसा लागेल ? ॥ ११ ॥
शि-हे ऐहिक दुःख झाले, आतां आमुष्मिक तें कोणतें ? गु० - पुण्यपापाची जी चिंता तेंच आमुष्मिक दुःख. ही चिंता ज्ञान्यास ताप देत नाहीं. अशा अर्थाची श्रुति आम्ही प्रथमाध्यायीं सांगितली आहे. ॥ १२ ॥
शि०-प्रारब्धकर्माची चिंता नसो, पण आगामी कर्माची तरी बाधा आहे कीं नाहीं ? गु०-तीही ज्ञान्यास नाहीं. ज्याप्रमाणें कमलपत्र पाण्यांत असून त्यांचा त्यास, स्पर्श होत नाहीं, त्याप्रमाणें ज्ञानोत्तर काळी आगामी कर्माचा संपर्क ज्ञान्यास लागत नाहीं. ॥ १३ ॥
शि० - मग संचित कर्माची व्यवस्था कशी ? ग० - ज्याप्रमाणें इषीका तृणांचा कापूस अग्नि लागतांच जळून जातो, त्याप्रमाणें ज्ञान होतांच संचित कर्म जळून जातें. ॥ १४ ॥
याविषयी गीतेंतही प्रमाण आहे. ज्याप्रमाणें पेटलेला अग्नि लाकडाची राख करून टाकतो, त्याप्रमाणें हा ज्ञानाग्नि सर्व कर्माचे भस्म करून टाकतो. ॥ १५ ॥
देहादिकांविषयीं ज्याचा अहंभाव अगदीं गेला, ज्याची बुद्धि कर्मामध्ये लिप्त होत नाहीं, त्याच्या हातून लोकांचा जरी मोठा घात झाला तरी तें पाप तो करतो असें होत नाहीं, व तो त्या कर्मांत बद्ध होत नाहीं. ॥ १६ ॥
शि ० -काय असें शास्त्रांत आहे काय ? शु ० -शास्त्र तर राहू द्या, अशाविषयीं श्रुतीतही प्रमाण आहे. तें असें कीं, एकदा निश्चयात्मक ज्ञान होऊन मुक्ति मिळाली असतां मातापितरांचे वध, चोरी, भ्रूणहत्या इत्यादि महा पातके जरी घडली तरी त्याच्या मोक्षास हानि येत नाहीं. इतकेंच नव्हे, तर त्याची मुखकांति जशाची तशीच असते. ॥ १७ ॥
शि ० - हा दुःखाभाव झाला, आतां सर्व कामाची प्राप्ति ती कशी ? गु० --तीही श्रुतीतच सांगितली आहे. ब्रह्मवेत्त्यास सर्व कामाची प्राप्ति होऊन तो अमृत होतो अशा अर्थीची श्रुति आहे. ॥ १८ ॥
ब्रह्मवेत्ता खावो, पिवो, खेळो, स्त्रियांबरोबर रममाण होवो, आबालवृद्धांबरोबर क्रीडा करो, त्यानें कांही केलें तरी देहाचे स्मरण नसतें. कुडींत प्राण असेपर्यंत पूर्व कर्माच्या योगाने त्याचें जीवन कसें तरी होतें ॥ १९ ॥
शि ० -कर्मफलाचा भोग आहे असें म्हटल्यावर ज्ञान्यास जन्म आहे असें म्हणावें लागेल. गु० -ज्ञानेंकरून संचितकर्म दग्ध झाल्यामुळे त्याला जन्म नसून सर्व कामाची प्राप्ति होते. श्रोत्रियाचेठायी जे भोग घडतात त्यांस क्रम म्हणून कांहींच नसतो. जसे प्राप्त होतील तसे तो भोगतो. ॥ २० ॥


युवा रूपी च विद्यावान्नीरोगो दृढचित्तवान् ।
सैन्योपेतः सर्वपृथ्वीं वित्तपूर्णां प्रपालयन् ॥ २१ ॥
सर्वैर्मानुष्यकैर्भोगैः सम्पन्नस्तृप्तभूमिपः ।
यमानन्दमवाप्नोति ब्रह्मविच्च तमश्नुते ॥ २२ ॥
मर्त्येभोगे द्वयोर्नास्ति कामस्तृप्तिरतः समा ।
भोगान्निष्कामतैकस्य परस्यापि विवेकतः ॥ २३ ॥

श्रोत्रियत्वाद्वेदशास्त्रैर्भोग्यदोषानवेक्षते ।
राजा बृहद्रथो दोषांस्तान् गाथाभिरुदाहरत् ॥ २४ ॥
देहदोषाश्चित्तदोषा भोग्यदोषा अनेकशः ।
शुना वान्ते पायसे नो कामस्तद्वद्विवेकिनः ॥ २५ ॥
निष्कामत्वे समेऽप्यत्र राज्ञः साधनसञ्चये ।
दुःखमासीद्‌भाविनाशादितिभीरनुवर्तते ॥ २६ ॥
नोभयं श्रोत्रियस्यातस्तदानन्दोऽधिकोऽन्यतः ।
गन्धर्वानन्द आशास्ति राज्ञो नास्ति विवेकिनः ॥ २७ ॥
अस्मिन्कल्पे मनुष्यः सन्पुण्यपापविशेषतः ।
गन्धर्वत्वं समापन्नो मर्त्यो गन्धर्व उच्यते ॥ २८ ॥
पूर्वकल्पे कृतात्पुण्यात्कल्पादावेव चेद्‌भवेत् ।
गन्धर्वत्वं तादृषोऽत्र देवगन्धर्व उच्यते ॥ २९ ॥
अग्निष्वात्तादयो लोके पितरश्चिरवासिनः ।
कल्पादावेव देवत्वं गता आजानदेवताः ॥ ३० ॥

तैत्तिरीय श्रुतींत असें सांगितलें आहे कीं, तरुण रूपवान्, विद्वान् निरोगी दृढमनाचा, ज्याच्या पदरी पुष्कळ सैन्य आहे, व जो संपत्तीने पूर्ण अशा पृथ्वीचे पालन करणारा सार्वभौम राजा, त्यास या सर्वे मानवी भोगांपासून जो आनंद मिळतो तो ब्रह्मवेत्त्यास प्राप्त होतो. ॥ २१-२२ ॥

शि ० -सार्वभौम राजा आणि ज्ञानी यांच्या विषयप्राप्तीमध्यें साम्यता मुळीच नाहीं असें असून दोघांची तृप्ति सारखी कशी म्हणतां ? गु० - मनुष्यभोगाची इच्छा दोघांनाही राहिली नाहीं. याकरितां या उभयतांचीही वृत्ति सारखीच आहे. एकाला भोगाने तृप्ति आणि दुसऱ्याला विवेकाने. ॥ २३ ॥
शि ० -तो विवेक कोणचा ? गु० - वेदशास्त्रांत सांगितले विषयभोगांतील दोष ज्ञानी पाहतो, हाच आम्ही म्हटलेला विवेक. बृहद्रथ राजाने मैत्रायणीय शाखेमध्ये या दोषाचे गाथारूपानें वर्णन केलें आहे ॥ २४ ॥
ते दोष कांहीं देहसंबंधी, व कांहीं चित्तसंबंधी आणि कांहीं विषयसंबंधीं असे वर्णिले आहेत. शि० - दोषदर्शनाने इच्छा कशी जाते ? गु० - कुत्र्याच्या ओकारीवर कोणाची इच्छा होईल काय ? त्याप्रमाणें विवेकी पुरुषास विषय वाटतात. ॥ २५ ॥
शि ० --दोघांचीही तृप्ति सारखी झाल्यावर राजापेक्षा ज्ञान्याची प्रतिष्ठा ती काय ? गु० -उभयतांची इच्छा तृप्ति जरी सारखी झाली तरी त्यामध्यें भेद आहे. राजाला साधने मिळविण्याचे दुःख आणि भावी नाशाचें भय असतें ॥ २६ ॥
परंतु ज्ञान्यास तीं दोन्हीही नाहींत. म्हणून ज्ञान्याची योग्यता राजापेक्षां अधिक समजली पाहिजे. शिवाय राजाला सार्वभौमानंद मिळाल्यावर गंधर्वानंदाची आशा राहिलीच, ती ज्ञान्यास नाही. ॥ २७ ॥
गंधर्वाचे दोन प्रकार आहेत एक मर्त्यगंधर्व आणि एक देवगंधर्व. या कल्पी मनुष्य असून कोण्या एका पुण्यपाकविशेषेंकरून गंधर्वत्व पावला असतां त्यास मर्त्यगंधर्व असें म्हणतात. ॥ २८॥
आणि पूर्व कल्पीं केलेल्या पुण्यपरिपाकेंकरून या कल्पाच्या आरंभीच गंधर्वत्व पावला असतां त्यास देवगंधर्व असें म्हणतात. ॥ २९ ॥

अग्निष्वात्तादिक जे पितर त्यांस चिरलोक पितर म्हणतात. आणि कल्पाच्या आरंभीच देवपद पावलेल्यास आजानदेवता असें म्हणतात. ॥ ३० ॥


अस्मिन्कल्पेऽश्वमेधादि कर्म कृत्वा महत्पदम् ।
अवाप्याजानदेवैर्याः पूज्यास्ताः कर्मदेवताः ॥ ३१ ॥
यमाग्निमुख्याः देवाः स्युर्ज्ञाताविन्द्रबृहस्पती ।
प्रजापतिर्विराट् प्रोक्तो ब्रह्मा सूत्रात्मनामकः ॥ ३२ ॥
सार्वभौमादिसूत्रान्ता उत्तरोत्तरगामिनः ।
अवाङ्मनसगम्योऽयमात्मानन्दस्ततः परः ॥ ३३ ॥
तैस्तैः काम्येषु सर्वेषु सुखेषु श्रोत्रियो यतः ।
निस्पृहस्तेन सर्वेषामानन्दाः सन्ति तस्य ते ॥ ३४ ॥
सर्वकामाप्तिरेषोक्ता यद्वा साक्षि चिदात्मता ।
स्वदेहवत्सर्वदेहेष्वपि भोगानवेक्षते ॥ ३५ ॥
अज्ञस्याप्येतदस्त्येव न तु तृप्तिरबोधतः ।
यो वेद सोऽश्नुते सर्वान्कामानितियब्रवीच्छ्रुतिः ॥ ३६ ॥

यद्वा सर्वात्मता स्वस्य साम्ना गायति सर्वदा ।
अहमन्नं तथान्नादश्चेति सामस्वधीयते ॥ ३७ ॥
दुःखाभावश्च कामाप्तिरुभे ह्येवं निरूपिते ।
कृतकृत्यत्वमन्यच्च प्राप्तप्राप्यत्वमीक्ष्यताम् ॥ ३८ ॥
उभयं तृप्तिदीपे हि सम्यगस्माभिरीरितम् ।
त एवात्रानुसन्धेयाः श्लोका बुद्धिविशुद्धये ॥ ३९ ॥
ऐहिकामुष्मिकव्रातसिद्ध्यै मुक्तेश्च सिद्धये ।
बहु कृत्यं पुरास्याभूत्तत्सर्वमधुना कृतम् ॥ ४० ॥

या कल्पाचेठायी अश्वमेधादि कर्मेंकरून त्यांची आजानदेवाकडून पूजा घेतली त्यांस कर्मदेवता असें म्हणतात ॥ ३१ ॥

यम, अग्नि हे मुख्य देव आहेत. इंद्र, बृहस्पती त हे तर प्रसिद्धच आहेत विराट् पुरुषासच प्रजापति म्हणतात. आणि जो सूत्रात्मा तोच ब्रह्मदेव. ॥ ३२ ॥
याप्रमाणे सार्वभौमापासून सूत्रात्म्यापर्यंत उत्तरोत्तर अधिक अधिक आनंद इच्छिणारे आहेत. या सर्वांहून आत्मानंद श्रेष्ठ आहे. कारण तो वाणीस व मनास अगोचर आहे.॥ ३३ ॥
कोणताही विषय पूर्णपणें प्राप्त झाला असतां मनुष्यास तो नकोसा होतो. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठास सार्वभौमादि आनंदाविषयी अलंबुद्धि असते. त्याअर्थी ते सर्व आनंद त्यास मिळालेच असें समजले पाहिजे. ॥ ३४॥
यालाच सर्वकामाप्ति असें म्हणतात. किंवा ज्याप्रमाणें स्वदेहाचेठायी आनंदाकार बुद्धिसाक्षित्वेंकरून ब्रह्मनिष्ठ आनंदी असतो त्याप्रमाणें इतर देहाचेठायीही ज्या सुखाकारवृत्ति होतात त्याचेही त्यास साक्षित्व असल्यामुळें तो सदा आनंदीच म्हटला पाहिजे. ॥ ३५ ॥
शि० - मग साक्षित्व अज्ञान्यास देखील असतें. म्हणून सर्वानंदात त्याला झाली असे म्हणता येईल कीं काय ? गु० - मी सर्व बुद्धीचा साक्षी आहें असें ज्ञान त्यास नसल्यामुळे त्यास ती प्राप्ति नाहीं. यो वेद सोऽश्नुते ( जो जाणेल त्याला मिळेल) असें श्रुतिप्रमाण आहे. ॥ ३६ ॥
अथवा आणखी एका प्रकारे सामवेदांनी सर्वकामाप्ति गायिली आहे. ती अशी ''अहमन्न तथान्नादः'' ( अन्नही मीच व अन्न खाणाराही मीच) असें सार्वात्म्य वर्णिलें आहे. ॥ ३७ ॥
याप्रमाणे दुःखाभाव आणि सर्वकामाप्ति या दोन्हीचे निरूपण केलें. आतां कृतकृत्यत्व आणि प्राप्तप्राप्यत्व यांचा विचार करावयाचा.॥ ३८॥
या दोहींचा विचार आम्ही पूर्वी तृप्तिदीपांत विस्तारेंकरून केला आहे. तेच श्लोक वाचकांनीं वाचून पहावे म्हणजे समजेल. ॥ ३९ ॥

ज्ञात्याला तत्त्वज्ञान होण्यापूर्वी ऐहिक म्ह० यालोकीं सुखप्राप्ती आणि दुःखनिवृत्तिकरतां कृषि वाणिज्य इत्यादिक, व आमुष्मिक म्ह० स्वर्गलोकप्राप्तीकरतां यज्ञ व उपासनादिक व मोक्षसाधन जे ज्ञान त्याच्या प्राप्तीकरतां श्रवण मनन निदिध्यासनादिक; या प्रकारेंकरून बहुप्रकारचें कर्तव्य कर्म होतें. आणि आता तर त्यास संसारसुखाची इच्छा नाही म्हणून व ब्रह्मानंद साक्षात्काराचीही सिद्धी झाली आहे, म्हणून तें सर्व त्यानें केल्यासारखेंच आहे. आता त्याला काहीं कर्तव्य उरलें नाहीं. ॥ ४० ॥


तदेतत्कृतकृत्यत्वं प्रतियोगिपुरःसरम् ।
अनुसन्दधदेवायमेवं तृप्यति नित्यशः ॥ ४१ ॥
दुःखिनोऽज्ञाः संसरन्तु कामं पुत्राद्यपेक्षया ।
परमानन्दपूर्णोऽहं संसरामि किमिच्छया ॥ ४२ ॥
अनुतिष्ठन्तु कर्माणि परलोकयियासवः ।
सर्वलोकात्मकः कस्मादनुतिष्ठामि किं कथम् ॥ ४३ ॥
व्याचक्षतां ते शास्त्राणि वेदानध्यापयन्तु वा ।
येऽत्राधिकारिणो मे तु नाधिकारोऽक्रियत्वतः ॥ ४४ ॥
निद्राभिक्षे स्नानशौचे नेच्छामि न करोमि च ।
द्रष्टारश्चेत्कल्पयन्ति किं मे स्यादन्यकल्पनात् ॥ ४५ ॥
गुञ्जापुञ्जादि दह्येत नान्यारोपितवह्निना ।
नान्यारोपितसंसारधर्मानेवमहं भजे ॥ ४६ ॥
शृण्वन्त्वज्ञाततत्त्वास्ते जानन् कस्माच्छृणोम्यहम् ।
मन्यन्तां संशयापन्ना न मन्येऽहमसंशयः ॥ ४७ ॥
विपर्यस्तो निदिध्यासेत्किं ध्यानमविपर्यये ।
देहात्मत्वविपर्यासं न कदाचिद्‌भजाम्यहम् ॥ ४८ ॥
अहं मनुष्य इत्यादिव्यवहारो विनाप्यमुम् ।
विपर्यासं चिराभ्यस्तवासनातोऽवकल्पते ॥ ४९ ॥
प्रारब्धकर्मणि क्षीणे व्यवहारो निवर्तते ।
कर्माक्षये त्वसौ नैव शाम्येद्ध्यानसहस्रतः ॥ ५० ॥

याप्रमाणे पूर्वींची स्थिति आठवून आपले कृतकृत्यत्व नित्य मनांत आणून तो नित्य तृप्त राहतो. ॥ ४१ ॥

तो आपली धन्यता याप्रमाणें मानतो. अज्ञानी लोक दुःखी होत्साते पुत्रादिकांची अपेक्षा करून, संसार करणार तर करोत ना बापडे. मी परमानंदानें पूर्ण असल्यामुळे मला कोणतीच इच्छा नाहीं. मग मी संसार कशास करूं ? ॥ ४२ ॥
ज्यांना परलोकची इच्छा असेल ते यज्ञदानादिक कर्में खुशाल करोत. मी सर्वव्यापक असल्यामुळे मी नाहीं असा लोकच नाहीं; मग तीं कर्में घेऊन करावयाची काय? ॥ ४३ ॥
जे अधिकारी असतील त्यांनी वेदशास्त्रें खुशाल पढावी व पढवावींत. मी मुळीच अक्रिय झालों मग मला अधिकार कुठला ? ॥ ४४ ॥

निद्रा, भिक्षा, स्नान, शौच इत्यादिक कमें मी इच्छितही नाहीं व करीतही नाहीं. जवळच्या पाहणारांना मी कर्में करतोसे वाटेल, तर वाटेना बापडें. त्यांस तसें वाटल्यानें मला काय होणार ? ॥ ४५ ॥
ज्याप्रमाणें गुंजांच्या राशीस दुसर्‍यांनी अग्नि म्हटल्यानें ती जाळू शकत नाहीं, त्याप्रमाणें मी संसार करतो असें दुसर्‍यांनी म्हटलें तरी त्याचा स्पर्श मला लागत नाहीं. ॥ ४६ ॥
ज्यांना ब्रह्मतत्त्व समजलें नाहीं ते खुशाल श्रवण करोत. मला तें तत्त्व पक्के समजल्यावर मीं तें कां करावें ? तसेंच आत्मस्वरूपाविषयीं ज्यांचे मनांत वारंवार संशय येतात, त्यांनीं मनन करावे. माझें ज्ञान निःसंशय झाल्यावर मला त्याचें काय प्रयोजन ? ॥ ४७ ॥
ज्याला देहात्मबुद्धि वारंवार होते त्यानें निदिध्यास करावा. मला तसा विपर्यय मुळींच होत नाही, मग निदिध्यासाची खटपट तरी कशाला ? ॥ ४८ ॥
आतां मी मनुष्य असा केव्हां केव्हां व्यवहार घडतो, परंतु तो विपर्यासामुळे नव्हे. त्याचें कारण अनेक जन्माचा संस्कारच होय. ॥ ४९ ॥

प्रारब्धकर्माचा क्षय झाला म्हणजे हा व्यवहार आपोआप नाहींसा होतो परंतु त्या कर्माचा क्षय न होतां आम्ही शेकडो वर्षें ध्यान केलें तरी तें व्यर्थ आहे. ॥ ५० ॥


विरलत्वं व्यवहृतेरिष्टं चेद्ध्यानमस्तु ते ।
अबाधिकां व्यवहृतिं पश्यन्ध्यायाम्यहं कुतः ॥ ५१ ॥
विक्षेपो नास्ति यस्मान्मे न समाधिस्ततो मम ।
विक्षेपो वा समाधिर्वा मनसः स्याद्विकारिणः ॥ ५२ ॥

नित्यानुभवरूपस्य को मेत्रानुभवः पृथक् ।
कृतं कृत्यं प्रापणीयं प्राप्तमित्येव निश्चयः ॥ ५३ ॥
व्यवहारो लौकिको वा शास्त्रीयो वाऽन्यथाऽपि वा ।
ममाकर्तुरलेपस्य यथाऽऽरब्धं प्रवर्तताम् ॥ ५४ ॥
अथवा कृतकृत्योऽपि लोकानुग्रहकामया ।
शास्त्रीयेणैव मार्गेण वर्तेऽहं का मम क्षतिः ॥ ५५ ॥
देवार्चनस्नानशौचभिक्षादौ वर्ततां वपुः ।
तारं जपतु वाक् तद्वत्पठत्वाम्नायमस्तकम् ॥ ५६ ॥
विष्णुं ध्यायतु धीर्यद्वा ब्रह्मानन्दे विलीयताम् ।
साक्ष्यहं किञ्चिदप्यत्र न कुर्वे नापि कारये ॥ ५७ ॥
कृतकृत्यतया तृप्तः प्राप्तप्राप्यतया पुनः ।
तृप्यन्नेवं स्वमनसा मन्यतेऽसौ निरन्तरम् ॥ ५८ ॥
धन्योऽहं धन्योऽहं नित्यं स्वात्मानमञ्जसा वेद्मि ।
धन्योऽहं धन्योऽहं ब्रह्मानन्दो विभाति मे स्पष्टम् ॥ ५९ ॥
धन्योऽहं धन्योऽहं दुःखं सांसारिकं न वीक्षेऽद्य ।
धन्योऽहं धन्योऽहं स्वस्याज्ञानं पलायितं क्वापि ॥ ६० ॥
धन्योऽहं धन्योऽहं कर्तव्यं मे न विद्यते किञ्चित् ।
धन्योऽहं धन्योऽहं प्राप्तव्यं सर्वमद्य सम्पन्नम् ॥ ६१ ॥
धन्योऽहं धन्योऽहं तृप्तेर्मे कोपमा भवेल्लोके ।
धन्योऽहं धन्योऽहं धन्यो धन्यः पुनः पुनर्धन्यः ॥ ६२ ॥
अहो पुण्यमहो पुण्यं फलितं फलितं दृढम् ।
अस्य पुण्यस्य सम्पत्तेरहो वयमहो वयम् ॥ ६३ ॥
अहो शास्त्रमहो शास्त्रमहो गुरुरहो गुरुः ।
अहो ज्ञानमहो ज्ञानमहो सुखमहो सुखम् ॥ ६४ ॥
ब्रह्मानन्दाभिधे ग्रन्थे चतुर्थोऽध्याय ईरितः ।
विद्यानन्दस्तदुत्पत्तिपर्यन्तोभ्यास इष्यताम् ॥ ६५ ॥
इति ब्रह्मानन्दे विद्यानन्दः समाप्तः ॥ १४ ॥

आतां, व्यवहाराचा अडथळा झाल्यामुळे तो कमी व्हावा अशी ज्याला इच्छा असेल त्यानें खुशाल ध्यान करावें. पण मला जर त्याचा मुळीच अडथळा वाटत नाही, तर त्याची मला काय गरज आहे ? ॥ ५१ ॥
मनांत मध्ये मध्ये विक्षेप येतो, तो न यावा म्हणून समाधि लावावयाची. तो विक्षेपच जर माझा गेला तर ती समाधि तरी कशाला पाहिजे. कारण, विक्षेप आणि समाधि हे दोन्ही मनाचेच धर्म आहेत. आणि मला तर तें मन मुळीच नाहीं, मग विक्षेप कोठून असणार ? ॥ ५२ ॥
आतां अनुभव येण्याकरितां समाधि करावा असें जर म्हणावें तर मीच अनुभवरूप आहें. मग मला दुसरा आणखी अनुभव तो कोठून व्हावा ? जें करावयाचें तें मीं केलें. आणि मिळवावयाचें तें मिळविले, असा माझा पक्का निश्चय झाला आहे. ॥ ५३ ॥
माझा व्यवहार प्रारब्धानुरूप कसा तरी चालों, मग तो लौकिकी असो किंवा शास्त्रीय असो, कसाही असो; मी स्वत: अकर्ता असून मला कर्माचा मुळीच लेप नाहीं. ॥ ५४ ॥
किंवा मी जरी कृतकृत्य झालों; तरी लोकांनी मला पाहून चांगल्या रीतीने आचरण करावे या हेतूने शस्त्रांत सांगितल्याप्रमाणे मी वागेन त्यांत तरी माझा काय तोटा होणार ? ॥ ५५ ॥
हे माझ शरीर देवाचा पूजा करो, स्नान करो; शौचभिक्षादि कर्में करो, ही माझी वाणी प्रणवाचा जप करो; किंवा उपनिषदाचे अध्ययन करो ॥ ५६ ॥
तशीच माझी बुद्धि विष्णूचें ध्यान करो; किंवा ब्रह्मानंदी लीन होवो; मी तर सर्वांचा साक्षी आहें. मी कांहीं करीत नाहीं व करवीतही नाहीं. ॥ ५७ ॥
याप्रमाणें आपली कृतकृत्यता व प्राप्यप्राप्यता स्मरून निरंतर मनांत तृप्त असतो. तो असें म्हणतो. ॥ ५८ ॥
आर्या-
मी धन्य धन्य झालों, आत्मा प्रत्यक्ष जाणिला म्यां कीं ॥
ब्रह्मानंद कसा हा भासे मज सम दुजा न या लोकीं ॥ १ ॥ ॥ ५९ ॥
मी धन्य धन्य मोठा, संसारिक दुःख मन दिसत नाहीं ॥
अज्ञान पळुनि गेलें, त्याचा गंधहि न राहिला कांहीं ॥ २ ॥ ॥ ६० ॥
मी धन्य धन्य मोठा, कांहीं कर्तव्य नाहिं मज उरलें ॥
प्राप्तव्य पदरीं आलें सद्‌गुरुचें चरण घट्ट मी धरिले ॥ ३ ॥ ॥ ६१ ॥
मी धन्य धन्य मोठा, माझ्या तृप्तीस नाहि हो उपमा ॥
कोठवरी वर्णावी, आतां मी पावलों स्वसुखधामा ॥ ४ ॥ ॥ ६२ ॥
बहु जन्मिं पुण्य केलें, त्याचें फळ पक्व आजिं मज मिळलें ॥
सद्‌गुरुराजकृपेनें, माझे आनंदरूप मज कळलें ॥ ५ ॥ ॥ ६३ ॥
सच्छास्त्र सद्‌गुरूचा, वर्णूं मी, या मुखें किती महिमा ॥
ज्ञान अमोलिक किति हें, आनंदाब्धीस या नसे सीमा ॥ ६ ॥ ॥ ६४ ॥
याप्रमाणे ब्रह्मानंद प्रकरणाच्या चौथ्या अध्यायांत विद्यानंदाचे निरूपण केलें. तो प्राप्त होईपर्यंत मुमुक्षूने त्याचा अभ्यास करावा. ॥ ६५ ॥
इति विद्यानंद समाप्त.