स्तोत्राणि

श्रीगणेशस्तोत्रे

श्रीविष्णुस्तोत्रे

श्रीरामस्तोत्रे

श्रीकृष्णस्तोत्रे

श्रीशिवस्तोत्रे

श्रीशक्तिस्तोत्रे

श्रीदेविस्तोत्रे


प्रास्ताविक

स्तोत्र म्हणजे पद्यामध्ये / काव्यातून रचलेली स्तुति. प्रेमानें किंवा माहात्म्य जाणून केलेली स्तुतिपर रचना म्हणजे स्तोत्र. पण राजनिती संबंधी केलेल्या स्तुतिला 'साम' म्हणावयाचे. तिथे देखील साम, दान, दंड, भेद यामध्येंही सामालाच सर्वश्रेष्ठ मानले आहे. महाकवि कालिदासाचे एक वचन आहे - 'स्तोत्रं कस्य न तुष्टये'. या वचनानुसार अशी कोणतीही व्यक्ति नाही, अगदी राक्षससुद्धा, जी स्तुतिनें प्रसन्न होत नाही. आपल्या वेद, उपनिषदें, इतिहास, पुराणें इत्यादि वाङ्‌मयातून तसेच इतर अनेक प्रकारच्या काव्यांतून अनेक प्रकारची स्तोत्रें (आणि सूक्ते) अगणित आहेत, ज्याचा संग्रह म्हणजे महासमुद्राच्या समान म्हणता येईल.

भारतभू देवी समृद्धिनें समृद्ध आहेच, परंतु आसुरी संपत्तीच्या झगझगाटामध्ये तें तेज थिटे वाटू लागले आहे. चार दिवसांची ही आसुरी संपत्ती चिरंतन सुख देणार नाही हे उघड आहे, तरीपण आजच्या मानवाला केवळ बाहेरचा झगझगाट मात्र दिसतो आणि तेच आपले वैभव असे मानून तो या जगांत वावरतो. ज्यावेळी कोणतीही आसुरी संपत्ती मानवाला समाधानाचं पाथेय देत नाही तेव्हा तो तिच्या व्यतिरिक्त वैभवाचा किंचितसा विचार करू लागतो. तेव्हा त्याला कळून येते की आसुरी संपत्ती सुद्धा देवी संपत्तीचे कवच आहे. ते दूर करता आले तर मानवी जीवन दैवी वैभवाने भरून जाईल. हे आसुरी कवच कसे उकलावयाचे आणि दैवी संपत्तीची जवळीक कशी साधावयाची याचा परामर्श घेण्यासाठीच या पुस्ताकाचा उपक्रम आहे. दैवी संपत्तीने एक मनुष्य जरी समृद्ध बनला तरी अत्यल्प काळांत तो संबंध राष्ट्राचे भवितव्य घडवू शकेल. राष्ट्राचे चिरंतन वैभव दैवी संपत्तीच्या गुणीजनांवर अवलंबून आहे. ही देवी संपत्ती ज्या अनेक साधनांतून मिळविता येते त्यांत स्तोत्र हे एक महान साधन आहे. या स्तोत्राच्या परिपाठाने सर्वसत्ताधीश बनता येते असा विख्यात अनुभव पूर्वसूरींनी नमूद केला आहे.

या स्तोत्रांचे खरे सामर्थ्य त्यांच्या विनियोगांत आहे. " देवता प्रीत्यर्थे जपे विनियोगः ।" असा जो संकल्प आहे यांतच या स्तोत्रांचे सर्व रहस्य आहे. या स्तोत्रांच्या जपाने आपली आकर्षण शक्ती वाढत जाते. विष्णूसहस्रनाम, शिवसहस्रनाम, ललिता त्रिपुरसुंदरी सहस्रनाम इ. सहस्रनामांद्वारे उपासना करणार्‍यांना याचा प्रत्यय येतोच असे दिसून येते. आपल्या उपास्य देवतेचे तेज आपण या शरीराने ग्रहण करतो. शरीर आणि त्या बरोबर आपले मन तेजोमय बनते. त्या तेज्यांत पूर्वी प्रत्ययाला न आलेल्या अनेक गोष्टी आपल्या प्रत्ययाला येतात. त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. यालाच आपण आपली देवता आपणास प्रसन्न झाली असे म्हणतो. आपल्या या शरीरात ते देवताचें तेज ग्रहण करण्याची शक्ती आहे हे सांगूनही सामान्य माणसाला पटणार नाही. परंतु अनुभवाची कास धरली तर त्याची सत्यता प्रत्ययाला तेव्हांच येते.

शरीर आणि त्या बरोबर आपले मन तेजोमय बनते. त्या तेज्यांत पूर्वी प्रत्ययाला न आलेल्या अनेक गोष्टी आपल्या प्रत्ययाला येतात. त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. यालाच आपण आपली देवता आपणास प्रसन्न झाली असे म्हणतो. आपल्या या शरीरात ते देवताचें तेज ग्रहण करण्याची शक्ती आहे हे सांगूनही सामान्य माणसाला पटणार नाही. परंतु अनुभवाची कास धरली तर त्याची सत्यता प्रत्ययाला तेव्हाच येते. स्तोत्रांमध्ये दैवीस्तोत्रांबरोबर काही ज्ञानप्रद आध्यात्मिक तसेच अकालमृत्यु / रोगनिवारणासंबंधी स्तोत्रांचा समावेश करण्यात येणार आहे.

GO TOP