श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
द्वाविंशोऽध्यायः


हैहयैकवीराय यशोवत्यैकावलीमोचनाय देवीस्वप्नवर्णनम्

यशोवत्युवाच
प्रातरुत्थाय तन्वङ्गी चलिता च सखीयुता ।
चामरैर्वीज्यमाना सा रक्षिता बहुरक्षिभिः ॥ १ ॥
सायुधैश्चातिसन्नद्धैः सहिता वरवर्णिनी ।
क्रीडार्थमत्र राजेन्द्र सम्प्राप्ता नलिनीं शुभाम् ॥ २ ॥
अहमप्यनया सार्धं गङ्गातीरे समागता ।
अप्सरोभिः समेता च कमलैः क्रीडमानया ॥ ३ ॥
एकावली तथा चाहं जाते क्रीडापरे यदा ।
सहसैव तदायातो दानवो बलसंयुतः ॥ ४ ॥
कालकेतुरिति ख्यातो राक्षसैर्बहुभिर्युतः ।
परिघासिगदाचापबाणतोमरपाणिभिः ॥ ५ ॥
दृष्टा चैकावली तेन रूपयौवनशालिनी ।
द्वितीया कामपत्‍नीव क्रीडमाना सुपङ्कजैः ॥ ६ ॥
मयोक्तैकावली राजन् कोऽयं दैत्यः समागतः ।
गच्छावो रक्षपालानां मध्ये पङ्कजलोचने ॥ ७ ॥
विमृश्यैव सखी चाहं त्वरयैव गते भयात् ।
मध्ये वै सैनिकानां तु सायुधानां नृपात्मज ॥ ८ ॥
कालकेतुस्तु तां दृष्ट्वा मोहिनीं मदनातुरः ।
गदां गुर्वी गृहीत्वा तु धावमानः समागतः ॥ ९ ॥
रक्षकान्दूरतः कृत्वा जग्राहाम्बुजलोचनाम् ।
त्रस्तां वेपथुसंयुक्तां क्रन्दमानां कृशोदरीम् ॥ १० ॥
त्यजैनां मां गृहाणेति मया चोक्तोऽपि दानवः ।
न मां जग्राह कामार्तस्तां गृहीत्वा विनिःसृतः ॥ ११ ॥
तिष्ठ तिष्ठेति भाषन्तो रक्षकास्तं महाबलम् ।
प्रतिषिध्य तु संग्रामं चक्रुर्विस्मयकारकम् ॥ १२ ॥
तस्यापि राक्षसाः क्रूराः सर्वतः शस्त्रपाणयः ।
युयुधू रक्षकैः सार्धं स्वामिकार्ये कृतोद्यमाः ॥ १३ ॥
संग्रामस्तु तदा जातः कालकेतोस्तथा रणे ।
निहत्य रक्षकान्सर्वान्गृहीत्वैनां महाबलः ॥ १४ ॥
युक्तो राक्षससैन्येन निर्जगाम पुरं प्रति ।
वीक्ष्य तां रुदतीं बालां गृहीता दानवेन तु ॥ १५ ॥
पृष्ठतोऽहं गता तत्र यत्र नीता सखी मम ।
विक्रोशन्ती यथा सा मां पश्येदिति पदानुगा ॥ १६ ॥
सापि मामागतां वीक्ष्य किञ्चित्स्वस्थाभवत्तदा ।
गताहं तत्समीपे तु तामाभाष्य पुनः पुनः ॥ १७ ॥
सा मां प्राप्यातिदुःखार्ता स्तम्भस्वेदसमाकुला ।
कण्ठे गृहीत्वा मां भूप रुरोद भृशदुःखिता ॥ १८ ॥
स मामाह कालकेतुः प्रीतिपूर्वमिदं वचः ।
समाश्वासय भीतां त्वं सखीं चञ्चललोचनाम् ॥ १९ ॥
प्राप्तं ममाद्य नगरं देवलोकसमं प्रिये ।
दासोऽस्मि तव रत्या हि कस्मात्क्रन्दसि कातरा ॥ २० ॥
कथयैनां सखीं तेऽद्य स्वस्था भव सुलोचने ।
इत्युक्त्वा मां सखीपार्श्वे समारोप्य रथोत्तमे ॥ २१ ॥
जगाम तरसा दुष्टः पुरे स्वस्य मनोहरे ।
सैन्येन महता युक्तः प्रफुल्लवदनाम्बुजः ॥ २२ ॥
एकावली तथा मां च संस्थाप्य धवले गृहे ।
राक्षसान् गृहरक्षार्थं कल्पयामास कोटिशः ॥ २३ ॥
द्वितीये दिवसे सोऽथ मामुवाच रहो नृप ।
प्रबोधय सखीं बालां शोचन्तीं विरहातुराम् ॥ २४ ॥
पत्‍नी मे भव सुश्रोणि सुखं भुङ्क्षव यथेप्सितम् ।
राज्यं त्वदीयं चन्द्रास्ये सेवकोऽहं सदा तव ॥ २५ ॥
पुनरुक्तं मया वाक्यं श्रुत्वा तद्‌भाषितं खरम् ।
नाहं क्षमाप्रियं वक्तुं त्वमेनां कथय प्रभो ॥ २६ ॥
इत्युक्ते वचने दुष्टो मदनक्षतमानसः ।
उवाच विनयादेनां सखीं क्षामोदरीं प्रियाम् ॥ २७ ॥
कृशोदरि त्वया मन्त्रो निक्षिप्तोऽस्ति ममोपरि ।
तेन मे हृदयं कान्ते हृतं ते वशतां गतम् ॥ २८ ॥
तेनाहं तव दासोऽद्य कृतोऽस्मीति विनिश्चयः ।
भज मां कामबाणेन पीडितं विवशं भृशम् ॥ २९ ॥
यौवनं याति रम्भोरु चञ्चलं दुर्लभं तदा ।
सफलं कुरु कल्याणि पतिं मां परिरभ्य च ॥ ३० ॥
एकावल्युवाच
पित्राहं कल्पिता पूर्वं दातुं राजसुताय वै ।
हैहयस्तु महाभाग स मया मनसा वृतः ॥ ३१ ॥
कथमन्यं भजे कान्तं त्यक्त्वा धर्मं सनातनम् ।
कन्याधर्मं विहायाद्य वेत्सि शास्त्रविनिश्चयम् ॥ ३२ ॥
यस्मै दद्यात्पिता कामं कन्या तं पतिमाप्नुयात् ।
परतन्त्रा सदा कन्या न स्वातन्त्र्यं कदाचन ॥ ३३ ॥
इत्युक्तोऽपि तया पापी विरराम न मोहितः ।
न मुमोच विशालाक्षीं मां च पार्श्वस्थितां तथा ॥ ३४ ॥
पातालविवरे तस्य पुरं परमसङ्कटे ।
राक्षसै रक्षितं दुर्गं मण्डितं परिखावृतम् ॥ ३५ ॥
तत्र तिष्ठति दुःखार्ता सखी मे प्राणवल्लभा ।
तेनाहं विरहेणात्र रारटीमि सुदुःखिता ॥ ३६ ॥
एकवीर उवाच
कथं त्वमत्र सम्प्राप्ता पुरात्तस्य दुरात्मनः ।
विस्मयो मे महानत्र तत्त्वं ब्रूहि वरानने ॥ ३७ ॥
त्वया च कथितं वाक्यं सन्दिग्धं भाति भामिनि ।
हैहयार्थे कल्पिता सा पित्रेति मम साम्प्रतम् ॥ ३८ ॥
हैहयो नाम राजाहं नान्योऽस्ति पृथिवीपतिः ।
मदर्थे कथिता सा किं सखी तव सुलोचना ॥ ३९ ॥
एतन्मे संशयं सुभ्रु छेत्तुमर्हसि भामिनि ।
अहं तामानयिष्यामि तं हत्वा राक्षसाधमम् ॥ ४० ॥
स्थानं दर्शय मे तस्य यदि जानासि सुव्रते ।
राज्ञे निवेदितं किं वा तत्पित्रे चातिदुःखिता ॥ ४१ ॥
यस्यैषा वल्लभा पुत्री न किं जानाति तां हृताम् ।
नोद्यमः किं कृतस्तेन ततो मोचनहेतवे ॥ ४२ ॥
बन्दीकृतां सुतां ज्ञात्वा कथं तिष्ठति सुस्थिरः ।
असमर्थो नृपः किं वा कारणं ब्रूहि सत्वरम् ॥ ४३ ॥
त्वया मेऽपहृतं चेतो गुणानुक्त्वा ह्यमानुषान् ।
सख्याः पङ्कजपत्राक्षि कृतः कामवशो भृशम् ॥ ४४ ॥
कदा पश्यामि तां कान्तां मोचयित्वातिसङ्कटात् ।
इति मे हृदयं चाद्य करोत्यतिमनोरथम् ॥ ४५ ॥
ब्रूहि मे गमनोपायं पुरे तस्यातिदुर्गमे ।
कथं त्वमागता तस्मात्सङ्कटादत्र तद्वद ॥ ४६ ॥
यशोवत्युवाच
बालभावान्मया मन्त्रो भगवत्या विशांपते ।
प्राप्तोऽस्ति ब्राह्मणात्सिद्धात्सबीजध्यानपूर्वकः ॥ ४७ ॥
तत्रावस्थितया राजन् मया चित्ते विचारितम् ।
आराधयामि सततं चण्डिकां चण्डविक्रमाम् ॥ ४८ ॥
सा देवी सेविता कामं बन्धमोक्षं करिष्यति ।
भक्तानुकम्पिनी शक्तिः समर्था सर्वसाधने ॥ ४९ ॥
या विश्वं सृजते शक्त्या पालयत्येव सा पुनः ।
कल्पान्ते संहरत्येव निराकारा निराश्रया ॥ ५० ॥
इति सञ्चिन्त्य मनसा देवीं विश्वेश्वरीं शिवाम् ।
ध्यात्वा रक्ताम्बरां सौम्यां सुरक्तनयनां हृदि ॥ ५१ ॥
संस्मृत्य मनसा रूपं मन्त्रजाप्यपराभवम् ।
उपासिता मया देवी मासमेकं समाधिना ॥ ५२ ॥
स्वप्ने मम समायाता भक्तिभावेन तोषिता ।
मामाहामृतया वाचा किं सुप्तासीति चण्डिका ॥ ५३ ॥
उत्तिष्ठ याहि तरसा गङ्गातीरं मनोहरम् ।
आगमिष्यति तत्रासौ हैहयो नृपपुङ्गवः ॥ ५४ ॥
एकवीरो महाबाहुः सर्वशत्रुविमर्दनः ।
दत्तात्रेयेण मन्मन्त्रो महाविद्याभिधः परः ॥ ५५ ॥
दत्तोऽस्मै सोऽपि सततं मामुपास्तेऽतिभक्तितः ।
मय्यासक्तमतिर्नित्यं मम पूजापरायणः ॥ ५६ ॥
मामेव सर्वभूतेषु ध्यायन्नास्ते च मत्परः ।
स ते दुःखविनाशं वै करिष्यति महामतिः ॥ ५७ ॥
मासुतो विहरंस्तत्र तव त्राता भविष्यति ।
हत्वा तं राक्षसं घोरं मोचयिष्यति मानिनीम् ॥ ५८ ॥
एकावलीमेकवीरः सर्वशास्त्रविशारदः ।
पश्चात्सैव पतिः कार्यस्त्वया राजसुतः शुभः ॥ ५९ ॥
इत्युक्त्वान्तर्दधे देवी प्रबुद्धाहं तदैव हि ।
कथितं स्वप्नवृत्तान्तं देव्याश्चाराधनं तथा ॥ ६० ॥
प्रसन्नवदना जाता श्रुत्वा सा कमलेक्षणा ।
विशेषेण च सन्तुष्टा मामुवाच शुचिस्मिता ॥ ६१ ॥
गच्छ तत्र त्वरायुक्ता कुरु कार्यं मम प्रिये ।
सत्यवाक्या भगवती सावां मोक्षं विधास्यति ॥ ६२ ॥
इत्याज्ञप्ता तया चाहं सख्या वै प्रेमयुक्तया ।
मत्वोपसरणं युक्तं तस्मात्स्थानात्तदा नृप ॥ ६३ ॥
चालिताहं ततः शीघ्रं महादेवीप्रसादतः ।
मार्गज्ञानं शीघ्रगतिर्मया प्राप्ता नृपात्मज ॥ ६४ ॥
इत्येतत्कथितं सर्वं कारणं मम दुःखजम् ।
कस्त्वं कस्य सुतश्चेति वद वीर यथा तथा ॥ ६५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां षष्ठस्कन्धे
हैहयैकवीराय यशोवत्यैकावलीमोचनाय देवीस्वप्नवर्णनं नाम द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥


राजकन्या एकावली -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

एके दिवशी सकाळी उठून ती सुंदरी सखींसह वनात निघाली. राजसेवक तिचे रक्षण करीत चालले होते. मीही त्यावेळी तिच्याबरोबर गेले होते. आम्ही दोघीही आनंदाने क्रीडा करीत होतो. त्याचवेळी कालकेतू नावाचा बलाढय दानव त्याठिकाणी आयुधांसह आणि अनेक राक्षसांसह प्राप्त झाला. त्याने क्रीडामग्न अशा एकावलीला पाहिले. तेव्हा मी एकावलीला म्हणाले, ''हा सांप्रत कोणीतरी राक्षस उपस्थित झाला आहे. म्हणून आपण आपल्या रक्षकांच्यामध्ये जाऊ.''

आम्ही भीतीने आमच्या रक्षकांकडे गेलो. पण कन्येला पाहून कालकेतु व्याकुल झाला. प्रचंड गदा घेऊन तो तेथे आला. त्याने आक्रोश करणार्‍या त्या राजकन्येला पकडले. तेव्हा मी पुढे होऊन म्हणाले, "हे दानवा, मला धर व हिला सोड.'' पण तो दानव तिला घेऊन गेला.

आमच्या रक्षकांचे व त्याचे तुमुल युद्ध झाले. अखेर आमच्या रक्षकांचा वध करून त्या कालकेतूने राजकन्येला पळविले. तेव्हा मीही माझ्या सखीच्या पाठोपाठ धावू लागले. मला येत असलेली पाहून तिला धीर आला व ती वारंवार आक्रोश करून मला हाक मारू लागली. शेवटी मी तिच्या जवळ गेले तेव्हा माझ्या गळ्यात मिठी घालून ती रडू लागली. त्यावेळी कालकेतू मला म्हणाला, ''ह्या तुझ्या सुंदर सखीला तू धीराच्या गोष्टी सांग. तसेच तिला सांग, आज आपण सुंदर नगरात जाणार आहोत. तुझ्यावर मोहित झाल्याने मी तुझा दास झालो आहे.''

असे म्हणून त्याने आम्हाला रथात बसविले व तो वेगाने स्वस्थानाकडे गेला. तेथे मला व एकावलीला एका शुभ्र गृहामध्ये ठेवून त्याने आमच्या भोवती कोटयावधी राक्षसांचा पहारा बसविला. नंतर दुसर्‍या दिवशी तो दानव मला एकांतात म्हणाला, "तू तुझ्या सखीला सांग की, हे सुंदरी, तू माझी पत्नी होऊन यथेष्ट सुख भोग. हे सर्व राज्य तुझेच असून मी तर तुझा दास आहे.''

तेव्हा मी म्हणाले, ''हे प्रभो, हे शब्द उच्चारण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही.''

हे ऐकून तो दुःखी झाला व माझ्या सखीला म्हणाला, ''हे कृशोदरी, तूच माझ्यावर कामाची मोहिनी टाकली आहेस. मी तुझ्या आधीन झालो असल्याने तू माझा स्वीकार कर. कारण तुझे यौवन व्यर्थ जात आहे. म्हणून पती या नात्याने तू माझा स्वीकार कर.''

एकावली म्हणाली, ''हैहय नावाच्या राजपुत्राला मी मनाने वरले आहे. माझ्या पित्यानेही तसेच ठरविले आहे. तेव्हा मी दुसरा पती वरणार नाही. माझा पिता मला ज्याला अर्पण करील तोच माझा पती.''

असे एकावलीने सांगितले असतानाही कामविव्हल झालेला पापी काही एक ऐकेना. त्याचे नगर पाताळात असून सांप्रत माझी सखी तेथेच आहे. मी मात्र दुःखव्याकुल होऊन संचार करीत आहे.''

तिचे बोलणे ऐकून एकवीर म्हणाला, ''तू त्या नगरातून कशी आलीस ? तिच्या पित्याने तिला हैहयालाच अर्पण करण्याचे कसे ठरविले ? मीच तो हैहय नावाचा राजा असून तुझी सखी जर माझ्याचसाठी ठरलेली असेल तर त्या राक्षसाचा वध करून मी तिला घेऊन येईन. मला तू ते स्थळ दाखव. तिच्या पित्याने तिला सोडवून आणण्याचा प्रयत्न का केला नाही ? तेव्हा तू मला विस्तारपूर्वक सर्व वृत्तांत सांग.''

यशोवती म्हणाली, "मला बालपणीच बीज वा ध्यान असा भगवतीचा मंत्र प्राप्त झाला आहे. तेव्हा त्या सर्वश्रेष्ठ आदिशक्तीचे मी चिंतन केले व तिच्या मंत्राचा जप केला, तेव्हा ती देवी माझ्या स्वप्नात येऊन म्हणाली, "हे कन्ये, तू सत्वर संगातीरावर जा. तेथेच तो नृपश्रेष्ठ हैहय येईल. त्या महाबलाढय एकवीराला दत्तात्रेय मुनींनी महाविद्या नावाचा माझा मंत्र दिला आहे. तो माझी उपासना करतो. तो राजा नित्य माझे चिंतन करतो. तोच या राक्षसाचा वध करून तुझे दुःख नष्ट करील. तो एकवीर सर्वशास्त्रनिपुण असल्यामुळे तो राजकन्येची सुटका करील. तोच पती तिला योग्य आहे."

नंतर मी जागृत झाले. एकावलीला सर्व वृत्तांत सांगताच ती प्रसन्न झाली. ती म्हणाली, "हे प्रिये, ती भगवती सत्यवचनी आहे."

हे राजा, त्यामुळे मी सांप्रत या स्थानी येऊन बसले आहे. महादेवीच्या प्रसादाने मला मार्गाचे ज्ञान झाले. हे राजा, माझ्या दुःखाचे कारण मी कथन केले. आता मला त्या राजपुत्राविषयी सांग.



अध्याय बाविसावा समाप्त


GO TOP