श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
षष्ठोऽध्यायः


महिषासुरस्येन्द्रादिदेवैः सह युद्धवर्णनम्

व्यास उवाच
ताम्रेऽथ मूर्च्छिते दैत्ये महिषः क्रोधसंयुतः ।
समुद्यम्य गदां गुर्वीं देवानुपजगाम ह ॥ १ ॥
तिष्ठन्त्वद्य सुराः सर्वे हन्म्यहं गदया किल ।
सर्वे बलिभुजः कामं बलहीनाः सदैव हि ॥ २ ॥
इत्युक्त्वासौ गजारूढं सम्प्राप्य मदगर्वितः ।
जघान गदया तूर्णं बाहुमूले महाभुजः ॥ ३ ॥
सोऽपि वज्रेण घोरेण चिच्छेदाशु गदाञ्च ताम् ।
प्रहर्तुकामस्त्वरितो जगाम महिषं प्रति ॥ ४ ॥
हयारिरपि कोपेन खड्गमादाय सुप्रभम् ।
ययाविन्द्रं महावीर्यं प्रहरिष्यन्निवान्तिकम् ॥ ५ ॥
बभूव च तयोर्युद्धं सर्वलोकभयावहम् ।
आयुधैर्विविधैस्तत्र मुनिविस्मयकारकम् ॥ ६ ॥
चकाराशु तदा दैत्यो मायां मोहकरीं किल ।
शाम्बरीं सर्वलोकघ्नीं मुनीनामपि मोहिनीम् ॥ ७ ॥
कोटिशो महिषास्तत्र तद्‌रूपास्तत्पराक्रमाः ।
ददृशुः सायुधाः सर्वे निघ्नन्तो देववाहिनीम् ॥ ८ ॥
मघवा विस्मितस्तत्र दृष्ट्वा तां दैत्यनिर्मिताम् ।
बभूवातिभयोद्विग्नो मायां मोहकरीं किल ॥ ९ ॥
वरुणोऽपि सुसन्त्रस्तस्तथैव धननायकः ।
यमो हुताशनः सूर्यः शीतरश्मिर्भयातुरः ॥ १० ॥
पलायनपरा सर्वे बभूवुर्मोहिताः सुराः ।
ब्रह्मविष्णमहेशानां स्मरणं चक्रुरुद्यताः ॥ ११ ॥
तत्राजग्मुश्च काजेशाः स्मृतमात्राः सुरोत्तमाः ।
हंसतार्क्ष्यवृषारूढास्त्रातुकामा वरायुधाः ॥ १२ ॥
शौरिस्तां मोहिनीं दृष्ट्वा सुदर्शनमथोज्ज्वलम् ।
मुमोच तत्तेजसैव माया सा विलयं गता ॥ १३ ॥
वीक्ष्य तान्महिषस्तत्र सृष्टिस्थित्यन्तकारिणः ।
योद्धुकामः समादाय परिघं समुपाद्रवत् ॥ १४ ॥
महिषाख्यो महावीरः सेनानीश्चिक्षुरस्तथा ।
उग्रास्यश्चोग्रवीर्यश्च दुद्रुवुर्युद्धकामुकाः ॥ १५ ॥
असिलोमात्रिनेत्रश्च बाष्कलोऽन्धक एव च ।
एते चान्ये च बहवो युद्धकामा विनिर्ययुः ॥ १६ ॥
सन्नद्धा धृतचापास्ते रथारूढा मदोद्धताः ।
परिवव्रुः सुरान्सर्वान्वृका इव सुवत्सकान् ॥ १७ ॥
बाणवृष्टिं ततश्चक्रुर्दानवा मदगर्विताः ।
सुराश्चापि तथा चक्रुः परस्परजिघांसवः ॥ १८ ॥
अन्धको हरिमासाद्य पञ्चबाणाञ्छिलाशितान् ।
मुमोच विषसन्दिग्धान्कर्णाकृष्टान्महाबलान् ॥ १९ ॥
वासुदेवोऽप्यसंप्राप्तान्विशिखानाशुगैस्तदा ।
चिच्छेद तान्पुनः पञ्च मुमोच रिपुनाशनः ॥ २० ॥
तयोः परस्परं युद्धं बभूव हरिदैत्ययोः ।
बाणासिचक्रमुसलैर्गदाशक्तिपरश्वधैः ॥ २१ ॥
महेशान्धकयोर्युद्धं तुमुलं लोमहर्षणम् ।
पञ्चाशद्दिनपर्यन्तं बभूव च परस्परम् ॥ २२ ॥
इन्द्रबाष्कलयोस्तद्वन्महिषासुररुद्रयोः ।
यमत्रिनेत्रयोस्तद्वन्महाहनुधनेशयोः ॥ २३ ॥
असिलोमवरुणयोर्युद्धं परमदारुणम् ।
गरुडं गदया दैत्यो जघान हरिवाहनम् ॥ २४ ॥
स गदापातखिन्नाङ्गो निःश्वसन्नवतिष्ठत ।
शौरिस्तं दक्षिणेनाशु हस्तेन परिसान्त्वयन् ॥ २५ ॥
स्थिरं चकार देवेशो वैनतेयं महाबलम् ।
समाकृष्य धनुः शार्ङ्गं मुमोच विशिखान्बहून् ॥ २६ ॥
अन्धकोपरि कोपेन हन्तुकामो जनार्दनः ।
दानवोऽपि च तान्वाणांश्चिच्छेद स्वशरैः शितैः ॥ २७ ॥
पञ्चाशद्‌भिर्हरिं कोपाज्जघान च शिलाशितैः ।
वासुदेवोऽपि तांस्तूर्णं वञ्चयित्वा शरोत्तमान् ॥ २८ ॥
चक्रं मुमोच वेगेन सहस्रारं सुदर्शनम् ।
त्यक्तं सुदर्शनं दूरात्स्वचक्रेण न्यवारयत् ॥ २९ ॥
ननाद च महाराज देवान्सम्मोहयन्निव ।
दृष्ट्वा तु विफलं जातं चक्रं देवस्य शार्ङ्‌गिणः ॥ ३० ॥
जग्मुः शोकं सुराः सर्वे जहर्षुर्दानवास्तथा ।
वासुदेवोऽपि तरसा दृष्ट्वा देवाञ्छुचावृतान् ॥ ३१ ॥
गदां कौमोदकीं धृत्वा दानवं समुपाद्रवत् ।
तं जघानातिवेगेन मूर्ध्नि मायाविनं हरिः ॥ ३२ ॥
स गदाभिहतो भूमौ निपपातातिमूर्च्छितः ।
तं तथा पतितं वीक्ष्य हयारिरतिकोपनः ॥ ३३ ॥
आजगाम रमानाथं त्रासयन्नतिगर्जितैः ।
वासुदेवोऽपि तं दृष्ट्वा समायान्तं क्रुधान्वितम् ॥ ३४ ॥
चापज्यानिनदं चोग्रं चकार नन्दयन्सुरान् ।
शरवृष्टिं चकाराशु भगवान्महिषोपरि ॥ ३५ ॥
सोऽपि चिच्छेद बाणौघैस्ताञ्छरान्गगनेरितान् ।
तयोर्युद्धमभूद्राजन् परस्परभयावहम् ॥ ३६ ॥
गदया ताडयामास केशवो मस्तकोपरि ।
स गदाभिहतो मूर्ध्नि पपातोर्व्यां सुमूर्च्छितः ॥ ३७ ॥
हाहाकारो महानासीत्सैन्ये तस्य सुदारुणः ।
स विहाय व्यथां दैत्यो मुहूर्तादुत्थितः पुनः ॥ ३८ ॥
गृहीत्वा परिघं शीर्षे जघान मधुसूदनम् ।
परिघेणाहतस्तेन मूर्च्छामाप जनार्दनः ॥ ३९ ॥
मूर्च्छितं तमुवाहाशु जगाम गरुडो रणात् ।
परावृत्ते जगन्नाथे देवा इन्द्रपुरोगमाः ॥ ४० ॥
भयं प्रापुः सुदुःखार्ताश्चुक्रुशुश्च रणाजिरे ।
क्रन्दमानान्सुरान्वीक्ष्य शङ्करः शूलभृत्तदा ॥ ४१ ॥
महिषं तरसाभ्येत्य प्राहरद्‌रोषसंयुतः ।
सोऽपि शक्तिं मुमोचाथ शङ्करस्योरसि स्फुटम् ॥ ४२ ॥
जगर्ज स च दुष्टात्मा वञ्चयित्वा त्रिशूलकम् ।
शङ्करोऽपि तदा पीडां न प्रापोरसि ताडितः ॥ ४३ ॥
तं जघान त्रिशूलेन कोपादरुणलोचनः ।
संलग्नं शङ्करं दृष्ट्वा महिषेण दुरात्मना ॥ ४४ ॥
आजगाम हरिस्तावत्त्यक्त्वा मूर्च्छां प्रहारजाम् ।
महिषस्तु तदा वीक्ष्य सम्प्राप्तौ हरिशङ्करौ ॥ ४५ ॥
युद्धकामौ महावीर्यो चक्रशूलधरौ वरौ ।
कोपयुक्तो बभूवासौ दृष्ट्वा तौ समुपागतौ ॥ ४६ ॥
जगाम सम्मुखस्तावत्संग्रामार्थं महाभुजः ।
माहिषं वपुरास्थाय धुन्वन्पुच्छं समुत्कटम् ॥ ४७ ॥
चकार भैरवं नादं त्रासयन्नमरानपि ।
धुन्वञ्छृङ्गे महाकायो दारुणो जलदो यथा ॥ ४८ ॥
शृङ्गाभ्यां पर्वताज्छृङ्गांश्चिक्षेप भृशमुत्कटान् ।
दृष्ट्वा तौ तु महावीर्यौ दानवं देवसत्तमौ ॥ ४९ ॥
चक्रतुर्बाणवृष्टिं च दानवोपरि दारुणाम् ।
कुर्वाणौ बाणवृष्टिं तौ दृष्ट्वा हरिहरौ हरिः ॥ ५० ॥
चिक्षेप गिरिशृङ्गं तु पुच्छेनावृत्य दारुणम् ।
आपतन्तं गिरिं वीक्ष्य भगवान्सात्वतां पतिः ॥ ५१ ॥
विशिखैः शतधा चक्रे चक्रेणाशु जघान तम् ।
हरिचक्राहतः संख्ये मूर्च्छामाप स दैत्यराट् ॥ ५२ ॥
उत्तस्थौ च क्षणान्नूनं मानुषं वपुरास्थितः ।
गदापाणिर्महाघोरो दानवः पर्वतोपमः ॥ ५३ ॥
मेघनादं ननादोच्चैर्भीषयन्नमरानपि ।
तच्छ्रुत्वा भगवान्विष्णुः पाञ्चजन्यं समुज्ज्वलम् ॥ ५४ ॥
पूरयामास तरसा शब्दं कर्तुं खरस्वरम् ।
तेन शब्देन शङ्खस्य भयत्रस्ताश्च दानवाः ।
बभूवुर्मुदिता देवा ऋषयश्च तपोधनाः ॥ ५५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
पञ्चमस्कन्धे महिषासुरस्येन्द्रादिदेवैः सह युद्धवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥


घोर संग्राम -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अखेरीस ताम्रदैत्यासारखा महापराक्रमी सेनापती मूर्च्छित झाल्याने महिषासुर अत्यंत चवताळला. तो स्वतःच मोठी गदा घेऊन देवांवर चालून गेला व गर्जना करीत म्हणाला, "आता सर्व देवांनी माझ्या समोर युद्धाला उभे रहावे. मी आता या एकच गदेने तुम्हा सर्वांचा वध करतो. तुम्ही सर्व देव केवळ यज्ञातील यथेष्ट बलिभक्षक असून सर्वदा निर्बल आहा."

असे म्हणून तो रागाने इंद्रावर चाल करून गेला, त्याने इंद्राच्या बाहूंवर गदेचा भयंकर प्रहार केला. पण इंद्राने आपल्या वज्राचा प्रतिप्रहार केला. त्या कठिण प्रहाराने महिषासुराची गदा इंद्राने सत्वर तोडून टाकली आणि पुन: प्रहार करण्याचा ईर्षेने तो महिषासुरावर धावून गेला. तेव्हा महिषासुरही एक प्रचंड तेजस्वी खङ्ग घेऊन इंद्रावर प्रहार करण्यासाठी धावून इंद्राजवळ गेला.

तेव्हा त्या दोघांमध्ये अत्यंत भयानक असे युद्ध झाले. सर्व लोकांचा नाश करणारी व मुनींनाही भूल पडेल अशी शंभरसुराची मोहक माया त्या दैत्याने प्रकट केली. त्या मायाबलाने व पराक्रमाने महिषासुरासारखे कोट्यावधी महिष आयुधासहवर्तमान चोहोकडे दृष्टीस पडू लागले आणि ते सर्व महिष त्या देवसेनेवर प्रहार करू लागले. त्यामुळे इंद्रसुद्धा विस्मयचकित होऊन भीतीमुळे उद्वीग्न झाला. वरुण, कुबेर हेही सर्वजण अगदी घाबरून गेले. यम, अग्नी, सूर्य व चंद्र हे सर्व भीतीने गांगरले. मोहित झालेले ते देव एकसारखे पळत सुटले आणि दक्ष राहून ब्रह्मा-विष्णु-महेशाचे स्मरण करू लागले. त्याचे स्मरण करताच ते हंस, गरुड, वृषभ यांवर आरूढ होऊन देवांचे रक्षण करण्याकरता धावून आले. महिषाची ती मोहिनी माया पाहून विष्णूने आपले सुदर्शनचक्र सोडले. त्याच्या तेजाने ती सर्व माया लयास गेली. जगताची उत्पत्ती, स्थिती, लय करणारे देव दृष्टीस पडताच महिषासुर प्रचंड परिघ घेऊन त्यांच्यावर चालून गेला. त्याचे सेनापती चिक्षुर, उग्राक्ष व उग्रवीर हेही युद्धासाठी धावून आले. त्यांच्याबरोबर असिलोमा, त्रिनेत्र, बाष्कल, अंधक वगैरे सर्व दैत्याधिराज रणांगणात युद्धासाठी उतरले. सर्व दैत्यांनी देवांना सर्व बाजूने वेढून टाकले. त्यानंतर उन्मत्त झालेल्या दैत्यांनी देवांवर प्रचंड बाणवृष्टी केली. दोन्ही पक्ष एकमेकांचा कायमचा नाश करण्यासाठी युद्ध करीत होते. अंधकाने विष्णूजवळ येऊन विषदायक शिळेवर घासलेले आणि कानापर्यंत ओढलेले पाच बाण त्याच्यावर सोडले. परंतु शत्रुनाशक विष्णूनेही ते बाण पोहोचण्यापूर्वीच आपल्या शक्त बाणांनी ते तोडून टाकले आणि उलट त्याच्यावर पाच बाण सोडले. विष्णु व अंधक यांच्यामध्ये अंगावर काटा येण्यासारखे युद्ध झाले. ते एकसारखे पन्नास दिवस चालू होते.

त्याचप्रमाणे इंद्र व बाष्कल, महिषासुर व' शंकर, यम व त्रिनेत्रासुर, कुबेर व महाहनू आणि वरुण व असिलोमा यांच्यामध्येही महायुद्ध झाले, अंधकाने आपल्या गदेचा जबरदस्त प्रहार गरुडावर करताच गरुड घामाघूम होऊन धापा टाकू लागला. परंतु त्याचे धैर्य खचू नये म्हणून आपल्या उजव्या हाताने विष्णूने गरुडाची पाठ थोपटली. अशा प्रकारे महाबलाढ्य गरुडाला स्थिर करून भगवान विष्णूने शार्ङ्ग धनुष्य खेचले आणि अंधकाचा वध करण्याच्या इराद्याने अनेक तीक्ष्ण बाण अंधकावर टाकले. परंतु अंधकाने ते सर्व बाण तोडले व पुन: शिळेवर घासलेले पन्नास बाण विष्णूवर सोडले. ते विष्णूने चुकवले व आपले सहस्र आरांनी युक्त असलेले सुदर्शन अंधकावर सोडले. पण अंधकाने लांबूनच ते सुदर्शन थोपवून धरले व आपल्या चक्राने त्याचे निवारण केले आणि तो प्रचंड गर्जना करू लागला. तेव्हा सर्व देव भयभीत झाले. विष्णूचे सुदर्शनचक्रसुद्धा निष्फल झाले हे पहाताच सर्व देव शोकमग्न झाले. सर्व दानव मात्र हे पाहून हर्षित झाले व खदखदा हसू लागले.

देव दुःखित झाल्यामुळे वासुदेवालाही वाईट वाटले. कौमोदकी नावाची गदा धारण करून तो त्वरेने दानवांवर धावून गेला. आपल्या गदेचा भयंकर प्रहार त्याने मायावी राक्षसावर केला. त्याबरोबर तो दैत्य मूर्च्छा येऊन पडला. ते पाहून महिषासुर अत्यंत क्रुध्द झाला. तो मोठमोठ्याने गर्जना करून विष्णूवर चाल करून गेला. ते पाहताच विष्णूने प्रत्यंचेचा टणत्कार केला तो ऐकून सर्व देव आनंदित झाले. विष्णूने महिषासुरावर एकामागून एक बाण सोडले. पण महिषासुराने ते सर्व आपल्या बाणांनी मोडून टाकले. अखेर विष्णूने आपल्या गदेचा प्रचंड प्रहार महिषासुराच्या मस्तकावर केला. त्याबरोबर तो दैत्यराज मूर्च्छित होऊन धरणीवर कोसळला. सर्व दानवसैन्यात एकच हाहाकार उडाला.

परंतु एका मुहूर्ताने महिषासुर सावध झाला व त्याने परिघाचा एकच प्रहार विष्णूच्या मस्तकावर केला. त्याच क्षणी विष्णु मूर्च्छित झाला. मूर्च्छित विष्णूला घेऊन गरुड रणातून निघून गेला. प्रत्यक्ष विष्णुवर ही आपत्ती आली, तेव्हा सर्व देव भयाकुल होऊन गेले. देव आक्रोश करू लागले हे अवलोकन करताच शूलपाणी शंकर कुद्ध झाला. त्याने शुलाचा प्रहार महिषासुरावर केला तेव्हा महिषासुराने शंकराच्या वक्षावर शक्ती टाकली व शंकराच्या त्रिशूलाचा प्रहार चुकवून तो प्रचंड गर्जना करू लागला. वक्षस्थलावर प्रहार झाल्याने शंकराला पीडा तर झाली नाहीच, पण तो अत्यंत कुद्ध झाल्याने पुनः महिषावर शूलाचा प्रहार करू लागला. इकडे भगवान विष्णु सावध झाले. त्यांनी शंकर व महिषासुराचे युद्ध चालू असलेले पाहून पुनः रणांगणात प्रवेश केला.

महाबलवान शंकर व विष्णु यांना युद्ध प्रवृत्त झालेले पाहताच महिषासूर त्यांना सामोरा गेला. महिषरूप धारण करून आपले मागचे शेपूट हालवीत तो पुनः गर्जना करू लागला. त्यामुळे देव त्रस्त झाले. तो आपली प्रचंड शिंगे हालवू लागला व त्या योगे प्रचंड पर्वतशिखरे उपटून देवांवर फेकू लागला.

त्याच्या प्रतिकारार्थ सर्व देवांनी त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला, त्याच वेळी महिषासुराने आपल्या शेपटीने एक प्रचंड पर्वतशिखर उपटून शंकर व विष्णु यांच्यावर फेकले, विष्णूने आपल्या बाणांनी त्या प्रचंड पर्वतशिखराचे शेकडो तुकडे करून टाकले व चक्राचा जबरदस्त प्रहार महिषासुरावर केला. त्याबरोबर महिषासुर मुर्च्छित पडला. परंतु दुसर्‍याच क्षणी सावध होऊन उठून त्याने मनुष्यशरीर धारण केले.

महाभयंकर व पर्वताप्रमाणे दिसणार्‍या त्या दैत्याने हातात गदा धारण केली व प्रचंड मेघाप्रमाणे गर्जना करून त्याने देवांना भयभीत करून सोडले. त्या आवाजाने निर्माण झालेले भय दूर करण्याकरता भगवान विष्णूने आपला उज्वल पांचजन्य शंख जोराने फुंकला. त्या शंखनादाने सर्व दानव घाबरून गेले व सर्व देव आणि ऋषी आनंदित झाले.


अध्याय सहावा समाप्त

GO TOP