श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
पञ्चमोऽध्यायः


दैत्यसैन्यपराजयः

व्यास उवाच
इति श्रुत्वा सहस्राक्षः पुनराह बृहस्पतिम् ।
युद्धोद्योगं करिष्यामि हयारेर्नाशनाय वै ॥ १ ॥
नोद्यमेन विना राज्यं न सुखं न च वै यशः ।
निरुद्यमं न शंसन्ति कातरा न च सोद्यमाः ॥ २ ॥
यतीनां भूषणं ज्ञानं सन्तोषो हि द्विजन्मनाम् ।
उद्यमः शत्रुहननं भूषणं भूतिमिच्छताम् ॥ ३ ॥
उद्यमेन हतस्त्वाष्ट्रो नमुचिर्बल एव च ।
तथैनं निहनिष्यामि महिषं मुनिसत्तम ॥ ४ ॥
बलं देवगुरुस्त्वं मे वज्रमायुधमुत्तमम् ।
सहायस्तु हरिर्नूनं तथोमापतिरव्ययः ॥ ५ ॥
रक्षोघ्नान्पठ मे साधो करोम्यद्य समुद्यमम् ।
स्वसैन्याभिनिवेशञ्च महिषं प्रति मानद ॥ ६ ॥
व्यास उवाच
इत्युक्तो देवराजेन वाचस्पतिरुवाच ह ।
सुरेन्द्रं युद्धसंरक्तं स्मितपूर्वं वचस्तदा ॥ ७ ॥
बृहस्पतिरुवाच
प्रेरयामि न चाहं त्वां न च निर्वारयाम्यहम् ।
सन्दिग्धेऽत्र जये कामं युध्यतश्च पराजये ॥ ८ ॥
न तेऽत्र दूषणं किञ्चिद्‌भवितव्ये शचीपते ।
सुखं वा यदि वा दुःखं विहितं च भविष्यति ॥ ९ ॥
न मया तत्परिज्ञातं भावि दुःखं सुखं तथा ।
यद्‌भार्याहरणे प्राप्तं पुरा वासव वेत्सि हि ॥ १० ॥
शशिना मे हृता भार्या मित्रेणामित्रकर्शन ।
स्वाश्रमस्थेन सम्प्राप्तं दुःखं सर्वसुखापहम् ॥ ११ ॥
बुद्धिमान्सर्वलोकेषु विदितोऽहं सुराधिप ।
क्व मे गता तदा वुद्धिर्यदा भार्या हृता बलात् ॥ १२ ॥
तस्मादुपायः कर्तव्यो बुद्धिमद्‌भिः सदा नरैः ।
कार्यसिद्धिः सदा नूनं दैवाधीना सुराधिप ॥ १३ ॥
व्यास उवाच
तच्छ्रुत्वा वचनं सत्यं गुरोः सार्थं शचीपतिः ।
ब्रह्माणं शरणं गत्वा नत्वा वचनमब्रवीत् ॥ १४ ॥
पितामह सुराध्यक्ष दैत्यो महिषसंज्ञकः ।
ग्रहीतुकामः स्वर्गं मे बलोद्योगं करोत्यलम् ॥ १५ ॥
अन्ये च दानवाः सर्वे तत्सैन्यं समुपस्थिताः ।
योद्धुकामा महावीर्याः सर्वे युद्धविशारदाः ॥ १६ ॥
तेनाहं भीतभीतोऽस्मि त्वत्सकाशमिहागतः ।
सर्वज्ञोऽसि महाप्राज्ञ साहाय्यं कर्तुमर्हसि ॥ १७ ॥
ब्रह्मोवाच
गच्छामः सर्व एवाद्य कैलासं त्वरिता वयम् ।
शङ्करं पुरतः कृत्वा विष्णुं च बलिनां वरम् ॥ १८ ॥
ततो युद्धं प्रकर्तव्यं सर्वैः सुरगणैः सह ।
मिलित्वा मन्त्रमाधाय देशं कालं विचिन्त्य च ॥ १९ ॥
बलाबलमविज्ञाय विवेकमपहाय च ।
साहसं तु प्रकुर्वाणो नरः पतनमृच्छति ॥ २० ॥
व्यास उवाच
तन्निशम्य सहस्राक्षः कैलासं निर्जगाम ह ।
ब्रह्माणं पुरतः कृत्वा लोकपालसमन्वितः ॥ २१ ॥
तुष्टाव शङ्करं गत्वा वेदमन्त्रैर्महेश्वरम् ।
प्रसन्नं पुरतः कृत्वा ययौ विष्णुपुरं प्रति ॥ २२ ॥
स्तुत्वा तं देवदेवेशं कार्यं प्रोवाच चात्मनः ।
महिषात्तद्‌भयं चोग्रं वरदानमदोद्धतात् ॥ २३ ॥
तदाकर्ण्य भयं तस्य विष्णुर्देवानुवाच ह ।
करिष्यामो वयं युद्धं हनिष्यामस्तु दुर्जयम् ॥ २४ ॥
व्यास उवाच
इति ते निश्चयं कृत्वा ब्रह्मविष्णुहरीश्वराः ।
स्वानि स्वानि समारुह्य वाहनानि ययुः सुराः ॥ २५ ॥
ब्रह्मा हंससमारूढो विष्णर्गरुडवाहनः ।
शङ्करो वृषभारूढो वृत्रहा गजसंस्थितः ॥ २६ ॥
मयूरवाहनः स्कन्दो यमो महिषवाहनः ।
कृत्वा सैन्यसमायोगं यावत्ते निर्ययुः सुराः ॥ २७ ॥
तावद्दैत्यबलं प्राप्तं दृप्तं महिषपालितम् ।
तत्राभूत्तुमुलं युद्धं देवदानवसैन्ययोः ॥ २८ ॥
बाणैः खड्गैस्तथा प्रासैर्मुसलैश्च परश्वधैः ।
गदाभिः पट्टिशैः शूलैश्चक्रैश्च शक्तितोमरैः ॥ २९ ॥
मुद्‌गरैर्भिन्दिपालैश्च हलैश्चैवातिदारुणैः ।
अन्यैश्च विविधैरस्त्रैर्निजघ्नुस्ते परस्परम् ॥ ३० ॥
सेनानीश्चिक्षुरस्तस्य गजारूढो महाबलः ।
मघवन्तं पञ्चभिस्तैः सायकैः समताडयत् ॥ ३१ ॥
तुराषाडपि तांश्छित्त्वा बाणैर्बाणांस्त्वरान्वितः ।
हृदये चार्धचन्द्रेण ताडयामास तं कृती ॥ ३२ ॥
बाणाहतस्तु सेनानीः प्राप मूर्च्छां गजोपरि ।
करिणं वज्रघातेन स जघान करे ततः ॥ ३३ ॥
तद्वज्राभिहतो नागो भग्नः सैन्यं जगाम ह ।
दृष्ट्वा तं दैत्यराट् कुद्धो बिडालाख्यमथाब्रवीत् ॥ ३४ ॥
गच्छ वीर महाबाहो जहीन्द्रं मदगर्वितम् ।
वरुणादीन्परान्देवान्हत्वाऽऽगच्छ ममान्तिकम् ॥ ३५ ॥
व्यास उवाच
तच्छ्रुत्वा वचनं तस्य बिडालाख्यो महाबलः ।
आरुह्य वारणं मत्तं जगाम त्रिदशाधिपम् ॥ ३६ ॥
वासवस्तं समायान्तं दृष्ट्वा क्रोधसमन्वितः ।
जघान विशिखैस्तीक्षौराशीविषसमप्रभैः ॥ ३७ ॥
स तु छित्त्वा शरांस्तूर्णं स्वशरैश्चापनिःसृतैः ।
पञ्चाशद्‌भिर्जघानाशु वासवञ्च शिलीमुखैः ॥ ३८ ॥
तथेन्द्रोऽपि च तान्बाणांश्छित्त्वा कोपसमन्वितः ।
जघान विशिखैस्तीक्ष्णैराशीविषसमप्रभैः ॥ ३९ ॥
स तु छित्त्वा शरांस्तूर्णं स्वशरैश्चापनिःसृतैः ।
गदया ताडयामास गजं तस्य करोपरि ॥ ४० ॥
स्वकरे निहतो नागश्चकारार्तस्वरं मुहुः ।
परिवृत्य जघानाशु दैत्यसैन्यं भयातुरम् ॥ ४१ ॥
दानवस्तु गजं वीक्ष्य परावृत्य गतं रणात् ।
समाविश्य रथे रम्ये जगामाशु सुरान् रणे ॥ ४२ ॥
तुराषाडपि तं वीक्ष्य रथस्थं पुनरागतम् ।
अहनद्विशिखैस्तीक्ष्णैराशीविषसमप्रभैः ॥ ४३ ॥
सोऽपि क्रुद्धश्चकारोग्रां बाणवृष्टिं महाबलः ।
बभूव तुमुलं युद्धं तयोस्तत्र जयैषिणोः ॥ ४४ ॥
इन्द्रस्तु बलिनं दृष्ट्वा कोपेनाकुलितेन्द्रियः ।
जयन्तमग्रतः कृत्वा युयुधे तेन संयुतः ॥ ४५ ॥
जयन्तस्तु शितैर्बाणैस्तं जघान स्तनान्तरे ।
पञ्चभिः प्रबलाकृष्टैरसुरं मदगर्वितम् ॥ ४६ ॥
स बाणाभिहतस्तावन्निपपात रथोपरि ।
अतिवाह्य रथं सूतो निर्जगाम रणाजिरात् ॥ ४७ ॥
तस्मिन्विनिर्गते दैत्ये बिडालाख्येऽथ मूर्च्छिते ।
जयशब्दो महानासीदुन्दुभीनां च निःस्वनः ॥ ४८ ॥
सुराः प्रमुदिताः सर्वे तुष्टुवुस्तं शचीपतिम् ।
जगुर्गन्धर्वपतयो ननृतुश्चाप्सरोगणाः ॥ ४९ ॥
चुकोप महिषः श्रुत्वा जयशब्दं सुरैः कृतम् ।
प्रेषयामास तत्रैव ताम्रं परमदापहम् ॥ ५० ॥
ताम्रस्तु बहुभिः सार्धं समागम्य रणाजिरे ।
शरवृष्टिं चकाराशु तडित्वानिव सागरे ॥ ५१ ॥
वरुणः पाशमुद्यम्य जगाम त्वरितस्तदा ।
यमश्च महिषारूढो दण्डमादाय निर्ययौ ॥ ५२ ॥
तत्र युद्धमभूद्‌ घोरं देवदानवयोर्मिथः ।
बाणैः खड्गैश्च मुसलैः शक्तिभिश्च परश्वधैः ॥ ५३ ॥
दण्डेन निहतस्ताम्रो यमहस्तोद्यतेन च ।
न चचाल महाबाहुः संग्रामाङ्गणतस्तदा ॥ ५४ ॥
चापमाकृष्य वेगेन मुक्त्वा तीव्राञ्छिलीमुखान्।
इन्द्रादीनहनत्तूर्णं ताम्रस्तस्मिन् रणाजिरे ॥ ५५ ॥
तेऽपि देवाः शरैर्दिव्यैर्निशितैश्च शिलाशितैः ।
निजघ्नुर्दानवान्क्रुद्धास्तिष्ठ तिष्ठेति चुकुशुः ॥ ५६ ॥
निहतस्तैः सुरैर्दैत्यो मूर्च्छामाप रणाङ्गणे ।
हाहाकारो महानासीद्दैत्यसैन्ये भयातुरे ॥ ५७ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
पञ्चमस्कन्धे दैत्यसैन्यपराजयो नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥


बृहस्पतीचा उपदेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

हा सर्व उपदेश ऐकून इंद्र म्हणाला, "महिषासुराचा पराभव करण्यासाठी युद्धाच्या उद्योगाशिवाय राज्य, सुख, यश हे प्राप्त होत नाही. निरुद्योगी पुरुषाची कोणीही प्रशंसा करीत नाही. तत्त्वज्ञान हे यतीचे भूषण असून संतोष हे द्विजांचे भूषण आहे, उद्योग व शत्रुवध हे अभ्यदयाची इच्छा करणार्‍या पुरुषाचे भूषण आहे. तेव्हा उद्योगाच्या योगाने विश्वरूप, नमुची यांचा मी वध केला. त्याचप्रमाणे आताही मी या महिषासुराचा नाश करीन. तू देवगुरूच माझे सैन्य आहेस. वज्र हे माझे उत्कृष्ट आयुध आहे. विष्णु व शंकर हे माझे सहाय्यकर्ते आहेत. हे गुरुदेवा, तू राक्षसांचा नाश करणारे मंत्र पठण कर. मी आज उद्योग करतो. महिषासुराकडे माझे सैन्य पाठवतो."

इन्द्राने असे सांगितल्यावर बृहस्पती म्हणाला, हे देवराज, तुला युद्धापासून मी परावृत्तही करीत नाही व प्रवृत्तही करीत नाही. कारण युद्ध करणार्‍या पुरुषाच्या जयाची अथवा पराजयाची निश्चिती नसते.

भवितव्य जसे असेल तसेच घडेल. त्यात तुझा काही दोष नाही. ठरल्याप्रमाणेच सुख अथवा दुःख प्राप्त होत असते. भवितव्यात काय घडेल याचे मला ज्ञान नसल्याने मला निश्चित असे काहीच सांगता येत नाही. हे इन्द्रा, पूर्वी भार्याहरणासंबंधाने मला प्राप्त झालेले दुःख तू जाणतोच आहेस. हे शत्रुनाशका शशी हा माझा मित्र आहे, पण तरीही त्याने माझी भार्या हरण केली त्यामुळे सर्वसुखाचा नाश करणारे दुःख प्रत्यक्ष माझ्या घरातच मला प्राप्त झाले.

हे देवराजा, सर्वात बुद्धिमान म्हणून माझी प्रसिद्धी आहे. परंतु बलात्काराने जेव्हा चंद्राने माझी भार्या हरण केली तेव्हा माझी बुद्धी कोठे गेली होती ? तेव्हा विचारी पुरुषांनी दैवावर श्रद्धा ठेवून उद्योगाचे सहाय्य घेऊन उपाय योजले पाहिजेत. पण कार्यसिद्धी ही दैवावर अवलंबून असते."

अशा प्रकारचे श्रीगुरूचे बोधप्रद भाषण ऐकून इंद्र ब्रह्मदेवाला शरण गेला आणि नम्रतापूर्वक म्हणाला, "हे सुरेश्वर, महिषासुर नावाचा दैत्य स्वर्गहरण करण्यासाठी ससैन्य स्वर्गावर स्वारी करून येत आहे. सर्व दानव त्याला जाऊन मिळाले आहेत. ते सर्वजण युद्धनिपुण आहेत. त्यामुळे माझ्या मनात भीती उत्पन्न झाली आहे. मी तुला शरण आहे. तू सर्वज्ञ आहेस. तेव्हा तू मला सहाय्य कर."

त्यावर ब्रह्मदेव म्हणाला, "आपण सर्व देव त्वरित कैलासावर जाऊ आणि भगवान शंकराला पुढे करून महापराक्रमी विष्णुकडे जाऊ. तेथे गेल्यावर सर्व देवगण एकत्र जमवू. देव व काल यांचा विचार करून युद्धाचा विचार निश्चित करू. कारण बलाबलाचा विचार न करता व विवेकाची पर्वा न करता साहस करणारा पुरुष पराजित होत असतो."

ब्रह्मदेवाचे हे वचन ऐकून इंद्र व ब्रह्मदेव हे कैलासाकडे जाण्यास निघाले. तेथे गेल्यावर त्यांनी महेश्वराची स्तुती केली. प्रसन्न झालेल्या शंकराला घेऊन सर्वजण वैकुंठास गेले. तेथे पोहोचताच त्यांनी भगवान विष्णूंची स्तुती गाईली, आणि वरप्राप्तीमुळे उन्मत्त झालेल्या महिषासुरापासून निर्माण झालेल्या संकटाची भगवंताला जाणीव दिली. ती हकीगत श्रवण केल्यावर भगवान विष्णु म्हणाले, "आपण युद्ध करू आणि त्या दुष्ट महिषासुराचा वध करू. "

अशाप्रकारे युद्ध निश्चित करून ब्रह्मा, विष्णु व महेश यांना घेऊन सर्व देव आपापल्या वाहानावर आरुढ झाले. भगवान विष्णु गरुडावर, ब्रह्मा हंसावर, शंकर वृषभावर, इंद्र गजावर, स्कंद मोरावर व यम महिषावर आरुढ झाले. सर्व देवसैन्य जमा होऊन महिषासुराच्या सैन्याला सामोरे गेले. त्यांची गाठ पडल्यावर तुमुल युद्ध झाले.

त्या महायुद्धात बाण, खङ्ग, भाले, मुसळ, कुर्‍हाडी, गदा, पट्टे, शूल, चक्र, शक्ती, तोमर, मुद्‌गल, अतिभयंकर नांगर आणि अशाप्रकारची अनेक आयुधे वापरून दोन शत्रुपक्ष एकमेकावर तुटून पडले. महाबलाढ्य यवन सेनापती चिक्षुर ह्याने गजावर आरुढ होऊन इन्द्रावर पाच बाण टाकले. पण इन्द्राने आपले युद्धनैपुण्य दाखवून त्याचे पाचही बाण आपल्या बाणांनी छेदून टाकले व एक अर्धचन्द्र बाण त्याच्या वक्षावर टाकला. त्याबरोबर सेनापती चिक्षुर बेशुद्ध होऊन पडला. इंद्राने याचवेळी त्याच्या गजाच्या सोंडेवर जोराचा प्रहार केला. त्यामुळे सोंड छिन्नविछिन्न झाली व तो गज सैरावैरा आपल्या सैन्याकडे पळत सुटला. ते दृश्य पाहून महिष क्रोधायमान झाला.

तो म्हणाला, "बिडाला, उन्मत्त झालेल्या इंद्राचा व वरुणाचा वध करून तू त्वरेने परत येऊन मला भेट."

हे ऐकून महापराक्रमी बिडाल मत्त गजावर आरुढ होऊन इंद्राकडे निघाला. त्याला पाहून इंद्राने रागाने सर्पतुल्य तीक्ष्ण बाण त्याच्यावर सोडले. परंतु त्या बाणांचा आपल्या बाणांनी नाश करून बिडालाने शिलीमुख नावाचे बाण इंद्रावर टाकले.

तेव्हा इंद्राने अतिसंतप्त होऊन बिडालाचे बाण भुजंगतुल्य तीक्ष्ण बाणांनी बिडालावर प्रहार केला. परंतु बिडालाने तेही बाण सत्वर तोडले व आपल्या गदेने त्याने इंद्राच्या गजावर प्रहार केला. त्याबरोबर इंद्रानेही आपले वज्र जोराने बिडालाच्या गजाच्या सोंडेवर फेकले. त्यामुळे बिडालाचा गज भयभीत होऊन पुनः आपल्याच सैन्याचा वध करीत किंचाळत सैरावैरा पळत सुटला. आपला गज रणांगणातून परत फिरल्याचे पाहून बिडाल एका सुंदर रथावर आरूढ होऊन इंद्रावर चालून आला.

त्याला पाहून इंद्राने महाभयंकर भुजंगतुल्य व तेजस्वी बाण बिडालावर सोडले. तेव्हा बिडालानेही इंद्रावर भयंकर बाणवृष्टी केली. दोघेही विजयासाठी दारुण युद्ध करीत होते. आपल्यापेक्षा दैत्य महाबलाढ्य आहे हे पाहून इंद्राने जयंताला पुढे केले. जयंताने निकराचा प्रयत्‍न करून सोडलेल्या पाच तीक्ष्ण बाणांनी बिडालाच्या वक्षस्थलाचा वेध घेतला. त्या बाणाच्या प्रहाराने बिडाल मूर्च्छित पडला, बिडालाच्या सारथ्याने रथ रणांगणातून माघारी परत नेला.

अशा तर्‍हेने बिडाल मूर्च्छित झाल्यावर देवांनी प्रचंड जयजयकार करून रणदुंदुभीचा नाद केला. सर्व देवांनी इंद्राची स्तुती केली. गंधर्व गायन करू लागले. अप्सरा सांघिक नृत्य करू लागल्या. हा जयघोष कानावर पडताच महिषासुर संतप्त झाला. त्याने ताम्र नावाच्या देत्याला देवांशी युद्ध करण्यास पाठवले. ताम्र देवांवर प्रचंड बाणवृष्टी करू लागला. तेव्हा वरुण व यम हे त्याच्यावर चालून गेले.

निरनिराळ्या आयुधांनी देव व दानव निकराने लढत होते. अखेरीस यमाच्या हातातील दंडाचा ताम्राला प्रहार झाला. पण त्यामुळे ताम्र रणांगणापासून किंचितही ढळला नाही. उलट त्याने अत्यंत वेगाने देवांवर शरांचा वर्षाव केला. अनेक देवांना त्याच्या बाणांचे प्रहार झाले. त्यामुळे सर्व देव अधिकच क्रुद्ध झाले. त्यांनी शिळेवर घासलेल्या अती तीक्ष्ण बाणांचा ताम्रावर पाऊस पाडला. त्यामुळे शरीरावर सर्वत्र प्रहार झाल्यामुळे ताम्राला मूर्च्छा आली व तो धाडकन पडला. त्यामुळे सर्व दैत्यसैन्यात हाहाःकार उडाला.


अध्याय पाचवा समाप्त

GO TOP