|  | 
| 
श्रीमद् भागवत पुराण  
भगवतः श्रीकृष्णस्य द्वारकागमनम् -  श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
शौनक उवाच ।  (वंशस्थ) हत्वा स्वरिक्थस्पृध आततायिनो युधिष्ठिरो धर्मभृतां वरिष्ठः । सहानुजैः प्रत्यवरुद्धभोजनः कथं प्रवृत्तः किमकारषीत्ततः ॥ १ ॥ 
शौनकांनी विचारिले -  (इंद्रवज्रा) धनास होते हितशत्रु तेंव्हा टपोनि त्यांना वधिले पुन्हा तै वैराग्य वृत्तीत युधिष्ठिराने केले कसे राज्य बंधू सवे ते ॥ १ ॥ 
स्वरिक्थस्पृधः -  आपल्या संपत्तीचा हेवा करणार्या - आततायिनः -  व शस्त्रास्त्रे हातात धरून तयार झालेल्यांना - हत्वा -  मारून - प्रत्यवरुद्ध भोजनः -  राज्योपभोग ज्याने परत मिळविले आहेत असा - धर्मभृतां -  धार्मिकात - वरिष्ठः -  श्रेष्ठ - युधिष्ठिरः -  धर्मराज - अनुजैः -  कनिष्ठ भावांशी - सह -  सहवर्तमान - कथं -  कशा रीतीने - प्रवृत्तः -  आपल्या उदयोगाला लागला - ततः -  नंतर - किं -  काय - अकारषीत् -  करता झाला. ॥१॥ 
 
शौनकांनी विचारले - आपले परंपरागत राज्य बळकावण्याची इच्छा असलेल्या आततायींचा नाश करून धर्मशिरोमणी महाराज युधिष्ठिरांनी आपल्या बंधूंसह कशाप्रकारे राज्य केले आणि कोणकोणती कामे केली. कारण बंधुवधाच्या दुःखाने राज्यभोगाविषयी ते विरक्त होते. (१) 
 
सूत उवाच । वंशं कुरोर्वंशदवाग्निनिर्हृतं संरोहयित्वा भवभावनो हरिः । निवेशयित्वा निजराज्य ईश्वरो युधिष्ठिरं प्रीतमना बभूव ह ॥ २ ॥ 
सूतजी सांगतात - युद्धाग्निमध्ये जळताच वंश त्या पालवोनी हि युधिष्ठिराला । जिवंत सृष्टी हरि तो करी नी सिंहासनी बैसवुनी प्रसन्न ॥ २ ॥ 
वंशदवनाग्निनिर्हृतं -  वंशरूपी अरण्यात पेटलेल्या अग्नीने बहुतेक नष्ट केलेल्या - कुरोः -  कुरूच्या - वंशं -  कुळाला - संरोहयित्वा -  अंकुरित करून - ह -  त्याचप्रमाणे - युधिष्ठिरं -  धर्मराजाला - निजराज्ये -  स्वतःला राज्यासनावर  - निवेशयित्वा -  स्थापून - भवभावनाः -  संसाराला प्रोत्साहन देणारा - ईश्वरः -  सर्वैश्वर्यसंपन्न - हरिः -  श्रीकृष्ण - प्रीतमनाः -  आनंदित - बभूव -  झाला. ॥२॥ 
 
सूत म्हणाले - संपूर्ण सृष्टीला पुनरुज्जीवित करणारे भगवान श्रीहरी परस्परातील कलहाग्नीने दग्ध झालेल्या कुरुवंशाला अंकुरित करून आणि युधिष्ठिराला राज्यसिंहासनावर बसवून प्रसन्न झाले. (२) 
 
निशम्य भीष्मोक्तमथाच्युतोक्तं  प्रवृत्त विज्ञान विधूत विभ्रमः । शशास गामिन्द्र इवाजिताश्रयः परिध्युपान्तां अनुजानुवर्तितः ॥ ३ ॥ 
ऐकोनि श्रीकृष्ण पितामहा चे  ध्यानात विज्ञान भरे तयांच्या । पृथ्वीवरी राज्य सुरेंद्रतुल्य बंधूसवे पूर्ण हितार्थ केले ॥ ३ ॥ 
भीष्मोक्तं -  भीष्माचार्यांनी केलेला उपदेश - अथ -  आणि नंतर - अच्युतोक्तं -  श्रीकृष्णाचे भाषण - निशम्य -  ऐकून - प्रवृत्तविज्ञानविधूतविभ्रमः -  उत्पन्न झालेल्या विशिष्ट ज्ञानाने नाहीसा झाला आहे मोह ज्याचा असा - अजिताश्रयः -  श्रीकृष्ण आहे आश्रय ज्याचा असा - अनुजानुवर्तितः -  कनिष्ठ भावांनी अनुसरलेला - इन्द्रः -  इंद्र - इव -  प्रमाणे - परिध्युपान्तां -  समुद्राच्या मर्यादेने वेढिलेल्या - गां -  पृथ्वीला - शशास -  पालिता झाला.॥३॥ 
 
भीष्म आणि श्रीकृष्ण यांनी केलेल्या उपदेशाच्या श्रवणाने युधिष्ठिराच्या अंतःकरणात विज्ञानाचा उदय झाला आणि त्याचे सर्व संशय फिटले. भगवंतांच्या आश्रयाला राहून समुद्रापर्यंतच्या सार्या पृथ्वीचे ते इंद्राप्रमाणे शासन करू लागले. भीमसेन आदी त्यांचे बंधू त्यांच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन करीत होते. (३) 
 
(अनुष्टुप्)  कामं ववर्ष पर्जन्यः सर्वकामदुघा मही । सिषिचुः स्म व्रजान् गावः पयसोधस्वतीर्मुदा ॥ ४ ॥ 
(अनुष्टुप्) युधिष्ठिरीय राज्यात यथेष्ट वृष्टि होतसे । निर्मिती सर्व वस्तूंची दुभत्या गायि पुष्टल्या ॥ ४ ॥ 
पर्जन्यः -  पाऊस - कामं -  पुष्कळ - ववर्ष -  वृष्टी करिता झाला - मही -  पृथ्वी - सर्वकामदुधा -  सर्व इष्ट वस्तु देणारी - ऊधस्वतीः -  दुधाने भरलेल्या कांसा आहेत ज्यांच्या अशा - गावः -  गाई - मुद्रा -  आनंदाने - पयसा -  दुधाच्या योगे - व्रजान् -  गोठयांना - सिषिचुःस्म -  सिंचन करित्या झाल्या. ॥४॥ 
 
युधिष्ठिराच्या राज्यात आवश्यकतेनुसार भरपूर पाऊस पडत होता, पृथ्वी सर्व आवश्यक वस्तू उत्पन्न करीत होती, दुधाने पुष्ट झालेल्या सडांच्या गायी प्रसन्नतेने गोशालांना दुधाने भिजवीत होत्या. (४) 
 
नद्यः समुद्रा गिरयः सवनस्पतिवीरुधः । फलन्त्योषधयः सर्वाः कामं अन्वृतु तस्य वै ॥ ५ ॥ 
नद्या पर्वते नी वृक्ष वेली तैसा समुद्रही । अन्नौषधी स्वये धर्मराजाते अर्पिती सदा ॥ ५ ॥ 
तस्य -  त्याच्या - नदयः -  नदया - समुद्राः -  समुद्र - गिरयः -  पर्वत - सवनस्पतिवीरुधः -  वनस्पती व वेली ह्यांसह - सर्वां -  सर्व - ओषधयः -  औषधी - वै -  खरोखर - कामं -  पुष्कळ - अन्वृतु -  ऋतुपरत्वे - फलन्ति -  फल देत असत. ॥५॥  
 
नद्या, समुद्र, पर्वत, वनस्पती, वेली आणि औषधी प्रत्येक ऋतूत आपापल्या वस्तू भरपूर प्रमाणात राजाला देत होत्या. (५) 
 
नाधयो व्याधयः क्लेशा दैवभूतात्महेतवः । अजातशत्रौ अवभवन् जन्तूनां राज्ञि कर्हिचित् ॥ ६ ॥ 
युधिष्ठिरीय राज्यात दुःख व्याधी नसेचि ती । त्रिताप नव्हते कोणा अजातशत्रु भूप तो ॥ ६ ॥ 
अजातशत्रौ -  धर्मराज - राज्ञि -  राजा असता - जन्तुनां -  प्राण्यांना - कर्हिचित् -  कधीही - आधयः -  मानसिक काळजी - व्याधयः -  किंवा शारीरिक पीडा - दैवभूतात्महेतवः -  आणि देवता, भूतप्रेतादि व शरीरादि ह्यांपासून उत्पन्न होणारे - क्लेशाः -  त्रास - न अभवन् -  झाले नाहीत. ॥६॥ 
 
अजातशत्रू महाराज युधिष्ठिराच्या राज्यात कोणत्याही प्राण्याला कधीच आधि-व्याधी तसेच दैविक, भौतिक किंवा आत्मिक क्लेश होत नसत. (६) 
 
उषित्वा हास्तिनपुरे मासान् कतिपयान् हरिः । सुहृदां च विशोकाय स्वसुश्च प्रियकाम्यया ॥ ७ ॥ 
बंधूंच्या शोकनाशार्थ सुभद्रेच्याहि आग्रहे । राहिले महिने कांही कृष्ण त्या हस्तिनापुरी ॥ ७ ॥ 
हरिः -  श्रीकृष्ण - सुहृदां -  मित्रांचा - विशोकाय -  शोक दूर करण्याकरिता - च -  आणि - स्वसुः -  बहिणीचे - प्रियकाम्यया -  प्रिय करण्याकरिता - च -  आणि - कतिपयान् -  कित्येक - मासान् -  महिने - हस्तिनपुरे -  हस्तिनापुरात - उषित्वा -  राहून. ॥७॥ 
 
आपल्या बंधूंचा शोक नाहीसा करण्यासाठी आणि बहीण सुभद्रेच्या प्रसन्नतेसाठी श्रीकृष्ण काही महिनेपर्यंत हस्तिनापुरात राहिले. (७) 
 
आमंत्र्य चाभ्यनुज्ञातः परिष्वज्याभिवाद्य तम् । आरुरोह रथं कैश्चित् परिष्वक्तोऽभिवादितः ॥ ८ ॥ 
जाण्यासी द्वारकापूरा राजासी वंदिले तये । आलिंगिले कुणी कृष्णा सानांनी नमिले असे ॥ ८ ॥ 
च -  आणि - आमन्त्र्य -  विचारून - अभ्यनुज्ञातः -  परवानगी दिलेला - तं -  त्याला - परिष्वज्य -  आलिंगन देऊन - अभिवादय - नमस्कार करून - कैश्चित् -  कित्येकांनी - परिष्वक्तः -  आलिंगन दिलेला - अभिवादितः -  नमस्कार केलेला - रथं -  रथावर - आरुरोह -  चढून बसला. ॥८॥ 
 
जेव्हा त्यांनी युधिष्ठिराकडे द्वारकेला जाण्याची परवानगी मागितली, तेव्हा राजाने त्यांना आलिंगन देऊन संमती दिली. त्यांना प्रणाम करून भगवंत रथावर बसले. काही समवयस्क लोकांनी त्यांना आलिंगन दिले, तर कनिष्ठांनी नमस्कार केला. (८) 
 
सुभद्रा द्रौपदी कुन्ती विराटतनया तथा । गान्धारी धृतराष्ट्रश्च युयुत्सुः गौतमो यमौ ॥ ९ ॥ वृकोदरश्च धौम्यश्च स्त्रियो मत्स्यसुतादयः । न सेहिरे विमुह्यन्तो विरहं शार्ङ्गधन्वनः ॥ १० ॥ 
सुभद्रा द्रौपदी कुंती गांधारी उत्तरा तसे । धृतराष्ट्र युयुत्सू नी कृपाचार्य नकूलही ॥ ९ ॥ सहदेव तसा भीम धौम्य सत्यवती सती । मूर्च्छावत् जाहले सर्व निघता कृष्ण द्वारके ॥ १० ॥ 
सुभद्रा -  सुभद्रा - द्रौपदी -  द्रौपदी - कुन्ती -  कुंती - तथा -  त्याप्रमाणे - विराटतनया -  विराटाची मुलगी उत्तरा - गान्धारी -  गांधारी - च -  आणि - धृतराष्ट्रः -  धृतराष्ट्र - युयुत्सुः -  युयुत्सु - गौतमः -  कृपाचार्य - यमौ -  दोघे नकुल व सहदेव ॥९॥  वृकोदरः - भीम - च - आणि - धौम्यः - धौम्य - च - आणि - मत्स्यसुतादयः - मत्स्यराज विराटाची कन्या उत्तरा आणि इतर - स्त्रियः - स्त्रिया - विमुह्यन्तः - व मोहित झालेले इतरही - शार्ङ्गधन्वनः - श्रीकृष्णाच्या - विरहं - वियोगाला - न सेहिरे - सहन करते झाले नाहीत. ॥१०॥ 
त्यावेळी सुभद्रा, द्रौपदी, कुंती, उत्तरा, गांधारी, धृतराष्ट्र, युयुत्सु, कृपाचार्य, नकुल, सहदेव, भीम, धौम्य, सत्यवती आदी स्त्रिया हे सर्व श्रीकृष्णांवरील अतीव प्रेमामुळे त्यांचा विरह सहन करू शकले नाहीत. (९-१०) 
 
सत्सङ्गात् मुक्तदुःसङ्गो हातुं नोत्सहते बुधः । कीर्त्यमानं यशो यस्य सकृत् आकर्ण्य रोचनम् ॥ ११ ॥ तस्मिन् न्यस्तधियः पार्थाः सहेरन् विरहं कथम् । दर्शनस्पर्शसंलाप शयनासन भोजनैः ॥ १२ ॥ 
सत्संग लाभला ज्यांना सत्संग तुटला तयां । मनोहरा मधुयेशा ऐकता कोण सोडि त्यां ॥ ११ ॥ पाहिले स्पर्शिले कृष्णा आलाप साधिला सवे । जेवले झोपले ऐशा पांडवा दुःख ना सहे ॥ १२ ॥ 
यस्य -  ज्याचे - रोचनं -  आवडते - कीर्त्यमानं -  वर्णिलेले - यशः -  यश - सकृत् -  एकदा - आकर्ण्य -  ऐकून - सत्सङ्गात् -  साधूंच्या समागमामुळे - मुक्तदुःसंगः -  सोडिली आहे दुष्टांची संगत ज्याने असा - बुधः -  विव्दान - हातुं -  टाकण्याला - न उत्सहते -  उदयुक्त होत नाही. ॥११॥  तस्मिन् - त्याचे ठिकाणी - दर्शनस्पर्शसंलापशयनासनभोजनैः - अवलोकन, स्पर्श, भाषण, निजणे, बसणे, भोजन वगैरेंनी - न्यस्तधियः - ठेविली आहे बुद्धि ज्यांनी असे - पार्थाः - पांडव - विरहं - वियोग - कथं - कसे - सहेरन् - सहन करितील. ॥१२॥ 
भगवद्भक्त सत्पुरुषांच्या संगतीने ज्यांचा दुःसंग सुटला ते विवेकी पुरुष, भगवंतांचे मधुर-मनोहर यश केवळ एक वेळ ऐकल्यावरही त्यांना सोडू शकत नाहीत. तर मग त्याच भगवंतांचे दर्शन, स्पर्श, त्यांच्याशी संवाद करणे, तसेच त्यांचेबरोबर निद्रा घेणे, उठणे, बसणे आणि भोजन करण्याने ज्यांचे हृदय भगवंतांना संपूर्ण समर्पण झाले होते, असे पांडव त्यांचा विरह कसा सहन करू शकतील ? (११-१२) 
 
सर्वे तेऽनिमिषैः अक्षैः तं अनु द्रुतचेतसः । वीक्षन्तः स्नेहसम्बद्धा विचेलुस्तत्र तत्र ह ॥ १३ ॥ 
द्रवले चित्त सार्यांचे डोळे विवश जाहले । स्नेहाने बांधिले त्यांना पळाले सैरभैर ते ॥ १३ ॥ 
स्नेहसंबंद्धाः -  प्रेमाने बांधले गेलेले - तं -  व त्याकडे - अनुद्रुतुचेतसः -  मागोमाग धावत गेली आहेत अंतःकरणे ज्यांची असे - अनिमिषैः -  न मिटण्यार्या - अक्षैः -  डोळ्यांनी - वीक्षन्तः -  पाहणारे - ते -  ते - सर्वे -  सगळे - तत्रतत्र -  त्या त्या ठिकाणी - ह -  खरोखर - विचेलुः -  फिरू लागले. ॥१३॥ 
 
अंतःकरण द्रवलेले ते पापण्या न मिटणार्या नेत्रांनी भगवंतांकडे पाहात, स्नेहबंधनाने विव्हळ होऊन ते जातील तिकडे जात होते. (१३) 
 
न्यरुन्धन् उद्गलत् बाष्पं औत्कण्ठ्यात् देवकीसुते । निर्यात्यगारात् नोऽभद्रं इति स्यात् बान्धवस्त्रियः ॥ १४ ॥ 
निघता घरुनी कृष्ण बंधूंच्या बायका तदा । अशूभ मानुनी कष्टे नेत्र शुष्कचि ठेविती ॥ १४ ॥ 
देवकीसुते -  श्रीकृष्ण - अगारात् -  घरांतून - निर्याति -  जात असता - बान्धवस्त्रियः -  द्रौपदी वगैरे भाऊबंदांच्या स्त्रिया - अभद्रं -  अकल्याण - नोस्यात् -  होऊ नये - इति -  अशा रीतीने - औत्कंठयात् -  उत्कंठेने - उद्गलव्दाष्पं -  बाहेर पडणार्या अश्रूंना - न्यरुन्धन् -  आतल्या आत दाबून धरित्या झाल्या. ॥१४॥ 
 
श्रीकृष्ण घरून निघतेवेळी, त्यांच्या बंधुपत्न्यांचे नेत्र दुःखित अंतःकरणामुळे अश्रूंनी भरून आले होते, परंतु प्रवासात त्यांना अपशकुन होईल, या भितीने मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी आपले अश्रू आवरून घेतले. (१४) 
 
मृदङ्गशङ्खभेर्यश्च वीणापणव गोमुखाः । धुन्धुर्यानक घण्टाद्या नेदुः दुन्दुभयस्तथा ॥ १५ ॥ 
मृदंग शंख भेरीनी नर्सिंगी ढोल वाजले । वीणा घंटा ध्वनी तैसा निरोप जाहला पहा ॥ १५ ॥ 
मृदङ्गशङ्खभेर्यः -  मृदंग, शंख व नगारे - च -  आणि - वीणापणवगोमुखाः -  वीणा, पणव, गोमुख - धुन्धुर्यानकघण्टादयाः -  धुंधुरी, आनक, घंटा वगैरे - तथा -  तसेच - दुन्दुभयः -  दुंदुभी - नेदुः -  वाजू लागल्या. ॥१५॥ 
 
भगवंतांच्या प्रस्थानाच्या वेळी मृदंग, शंख, भेरी, वीणा, ढोल, तुतार्या, धुंधुरी, नगारे, घंटा, दुंदुभी इत्यादी वाद्ये वाजू लागली. (१५) 
 
प्रासादशिखरारूढाः कुरुनार्यो दिदृक्षया । ववृषुः कुसुमैः कृष्णं प्रेमव्रीडास्मितेक्षणाः ॥ १६ ॥ 
प्रासादशिखरारूढ जाहल्या त्या कुरुस्त्रिया । लाजोनी प्रेमभावाने कृष्णासी वाहती फुले ॥ १६ ॥ 
दिदृक्षया -  पाहण्याच्या इच्छेने - प्रासादशिखरारूढाः -  वाडयांच्या गच्चीवर चढलेल्या - कुरुनार्यः -  कुरुस्त्रिया - प्रेमव्रीडास्मितेक्षणाः -  प्रेमाने व लज्जेने स्मितयुक्त झाले आहेत नेत्र ज्यांचे अशा - कृष्णे -  श्रीकृष्णावर - कुसुमैः -  फुलांनी - ववृषुः -  वृष्टी करत्या झाल्या. ॥१६॥ 
 
भगवंतांच्या दर्शनाच्या लालसेने कुरुवंशातील स्त्रिया प्रासादाच्या गच्चीवर जाऊन तेथूनच प्रेम, लज्जा व मंद हास्ययुक्त नेत्रांनी भगवंतांना पहात पहात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागल्या. (१६) 
 
सितातपत्रं जग्राह मुक्तादामविभूषितम् । रत्नदण्डं गुडाकेशः प्रियः प्रियतमस्य ह ॥ १७ ॥ 
कुरळ्या केशि पार्थाने धरिले श्वेत छत्र ते । रत्नांकित अशी दांडी मोत्यांची झालरी जया ॥ १७ ॥ 
प्रियः -  आवडता - गुडाकेशः -  अर्जुन - रत्नदण्डं -  रत्नांचा दांडा असलेले - मुक्तादामविभूषित -  व मोत्यांच्या हारांनी सुशोभित असे - प्रियतमस्य -  अत्यंत आवडत्या कृष्णावर - सितातपत्रं -  पांढरे छत्र - ह -  सुद्धा - जग्राह -  धरिता झाला. ॥१७॥ 
 
त्यावेळी भगवंतांचा प्रिय सखा अर्जुनाने आपल्या प्रियतम श्रीकृष्णांचे मोत्यांची झालर लावलेले, रत्नजडित दांडा असलेले पांढरे छत्र आपल्या हातात घेतले होते. (१७) 
 
उद्धवः सात्यकिश्चैव व्यजने परमाद्भुते । विकीर्यमाणः कुसुमै रेजे मधुपतिः पथि ॥ १८ ॥ 
सात्यकी उद्धवे हाते चौर्या सुंदर ढाळिल्या । सर्वत्र मधुरावृष्टी कृष्णाच्या मार्गि जाहली ॥ १८ ॥ 
च -  आणि - एव -  सुद्धा - उद्धवः -  उद्धव - सात्यकिः -  सात्यकि - परमाद्भुते -  फारच आश्चर्यजनक - व्यजने -  दोन चवर्या - मधुपतिः -  श्रीकृष्ण - कुसुमैः -  फुलांनी - विकीर्यमाणः -  आच्छादिलेला झाल्यामुळे - पथि -  मार्गात - रेजे -  शोभला.॥१८॥ 
 
उद्धव आणि सात्यकी सुंदर चवर्या ढाळीत होते. भगवान श्रीकृष्णांवर वाटेत चारी बाजूंनी पुष्पवर्षा होत होती. ते दृश्य अत्यंत मनोहर होते. (१८) 
 
अश्रूयन्ताशिषः सत्याः तत्र तत्र द्विजेरिताः । नानुरूपानुरूपाश्च निर्गुणस्य गुणात्मनः ॥ १९ ॥ 
स्वस्तिवाचन ते मंत्र सर्वत्र द्विज वाचिती । सगुणीं गुणि तो वाटे अप्राकृतहि निर्गुण ॥ १९ ॥ 
तत्रतत्र -  त्या त्या ठिकाणी - व्दिजेरिताः -  ब्राह्मणांनी उच्चारिलेले - निर्गुणस्य -  गुणरहित अशा - गुणात्मनः -  सगुणरूप धारण करणार्याच्या - नानुरूपानुरूपाः -  योग्य व अयोग्य असे - च -  आणि - सत्याः -  खरे - आशिषः -  आशीर्वाद - अश्रूयन्त -  ऐकू येत होते. ॥१९॥ 
 
ठिकठिकाणी ब्राह्मणांनी दिलेले सत्य आशीर्वाद कानावर येत होते, ते आशीर्वाद सगुण भगवंतांना अनुरूप होते. कारण त्यांच्यामध्ये सर्व गुण होते. परंतु निर्गुण भगवंतांना अनुरूप नव्हते. (१९) 
 
अन्योन्यमासीत् संजल्प उत्तमश्लोकचेतसाम् । कौरवेन्द्रपुरस्त्रीणां सर्वश्रुतिमनोहरः ॥ २० ॥ 
हस्तिनापुरिच्या स्त्रीया ज्यांचे कृष्णमयी मन । आपसी गुंजल्या गोष्टी सर्वांचे चित्त वेधले ॥ २० ॥ 
उत्तमश्लोकचेतसां -  श्रीकृष्णावर मन ठेवलेल्या - कौरवेन्द्रपुरस्त्रीणां -  कौरवस्त्रियांचे - सर्वश्रुतिमनोहरः -  सर्वांच्या कानांना गोड लागणारे - अन्योन्यं -  एकमेकांत - संजल्पः -  भाषण - आसीत् -  सुरू झाले. ॥२०॥ 
 
ज्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांमध्ये रममाण झाले होते अशा हस्तिनापुरातील कुलीन स्त्रिया आपापसात अशा गोष्टी करीत होत्या की, त्याकडे सर्वांचे कान आणि मन लागून राहिले होते. (२०)  
 
(वंशस्थ)  स वै किलायं पुरुषः पुरातनो य एक आसीदविशेष आत्मनि । अग्रे गुणेभ्यो जगदात्मनीश्वरे निमीलितात्मन्निशि सुप्तशक्तिषु ॥ २१ ॥ 
(इंद्रवज्रा) सखे पहा त्या पुरुषोत्तमाला राही सुखाने प्रलयी अरूप । जेव्हां गुणत्रै नच जीव राही अव्यक्त होती सगळ्याच शक्ती ॥ २१ ॥ 
यः -  जो - एकः -  एकटा - गुणेभ्यः -  गुणांच्या - अग्रे -  पूर्वी - निमीलितात्मन् -  ज्या ठिकाणी सर्व आत्मे लीन झाले आहेत अशा  - निशि -  प्रलयकाळी - सुप्तशक्तिषु -  निजलेल्या शक्तीमध्ये - अविशेषे -  तुल्यरूपाने राहणार्या - जगदात्मानि -  जगात आत्मरूपाने वावरणार्या - ईश्वरे -  ऐश्वर्यसंपन्न अशा - आत्मनि -  आत्म्यामधे - वै -  खरोखर - आसीत् -  असतो - सः -  तो - किल -  च - अयं -  हा - पुरातनः -  अत्यंत प्राचीन - पुरुषः -  पुरुष॥२१॥ 
 
त्या आपसात म्हणत होत्या - ज्यावेळी सत्त्व-रज-तम हे सृष्टीचे मूल तीन गुणसुद्धा राहात नाहीत, जीव आणि जगदात्मा ईश्वरात लीन होऊन जातात आणि महत्तत्त्व आदी समस्त शक्ति आपले मूळ कारणे जे अव्यक्त त्यात निद्रा घेतात. सख्यांनो, अशा प्रलयाच्या वेळी सुद्धा आपल्या अद्वितीय निर्विशेष स्वरूपात स्थित राहणारे हेच ते सनातन परम पुरुष होत. (२१) 
 
स एव भूयो निजवीर्यचोदितां  स्वजीवमायां प्रकृतिं सिसृक्षतीम् । अनामरूपात्मनि रूपनामनी विधित्समानोऽनुससार शास्त्रकृत् ॥ २२ ॥ 
पुन्हा स्वइच्छे नव रूप नाम अंशात्म सृष्टी नवरूप केली । जै अंशभूते वशिभूत केले वेदादि शास्त्रे रचिली व्यव्हारा ॥ २२ ॥ 
शास्त्रकृत् -  शास्त्रे निर्माण करणारा - सः -  तो - एव -  च - अनामरूपात्मनि -  नावे व स्वरूप नाहीत अशा आत्म्यावर - रूपनामनी -  स्वरूपे व नावे - विधित्समानः -  करण्याची इच्छा करणारा - भूयः -  पुनः - निजवीर्यचोदितां -  स्वसामर्थ्याने आज्ञा दिलेल्या - स्वजीवमायां -  आपल्या अंशभूत जीवाला मोहित करणार्या मायेला - सिसृक्षतीं -  उत्पन्न करण्यास इच्छिणार्या - प्रकृतिं -  प्रकृतीला  - अनुससार -  अनुसरला. ॥२२॥ 
 
त्यांनीच पुन्हा आपला नामरूपरहित स्वरूपात, नाम-रूपाच्या निर्माणाची इच्छा केली आणि त्यांच्याच अंशभूत जीवांना जी मोहात पाडते आणि सृष्टीची रचना करण्यास प्रवृत्त होते, त्या आपल्या कालशक्तीने प्रेरित केलेल्या प्रकृतीचे अनुसरण केले. तसेच व्यवहारासाठी म्हणून वेद इत्यादि शास्त्रांची रचना केली. (२२) 
 
स वा अयं यत्पदमत्र सूरयो  जितेन्द्रिया निर्जितमातरिश्वनः । पश्यन्ति भक्ति उत्कलितामलात्मना नन्वेष सत्त्वं परिमार्ष्टुमर्हति ॥ २३ ॥ 
ध्याती जयाचे पद नित्य योगी  नी प्राण रोधे हृदयात घेती । तो ब्रह्म साक्षात् हरि कृष्ण हाची भक्तीत लाभे, नच योगियासी ॥ २३ ॥ 
सः -  तो - वा -  च - अयं -  हा - अत्र -  ह्या ठिकाणी - जितेन्द्रियाः -  इंद्रियनिग्रही - निर्जितमातरिश्वनः -  प्राणवायू ताब्यात ठेवणारे - सूरयः -  ज्ञानी - भक्त्युत्कलितामलात्मना -  भक्तीने प्रफुल्लित अशा शुद्ध अंतःकरणाने - यत्पदं -  ज्याच्या चरणाला - पश्यन्ति -  पाहतात - ननु -  खरोखर - एषः -  हा - सत्त्वं -  सत्त्वाला - परिमार्षुं -  शुद्ध करण्याला - अर्हति -  योग्य आहे. ॥२३॥ 
 
या जगात ज्यांच्या स्वरूपाचा साक्षात्कार, जितेंद्रिय योगी आपल्या प्राणांना वश करून, भक्तीने प्रफुल्लित झालेल्या निर्मल हृदयात करून घेतात, तेच हे श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म आहेत. वास्तविक यांच्याच भक्तीने अंतःकरणाची पूर्ण शुद्धी होऊ शकते. (२३) 
 
स वा अयं सख्यनुगीत सत्कथो  वेदेषु गुह्येषु च गुह्यवादिभिः । य एक ईशो जगदात्मलीलया सृजत्यवत्यत्ति न तत्र सज्जते ॥ २४ ॥ 
सखे असे हाचि लिला जयाच्या  गाती ऋषी वेद तसेचि शास्त्र । तो ईश अद्वीतिय हा परीही निर्मोनि सृष्टी न लिपे तियेसी ॥ २४ ॥ 
सखि -  हे गडे ! - वा -  किंवा - यः -  जो - गुह्यवादिभिः -  रहस्य सांगणार्यांनी - वेदेषु -  वेदांमध्ये - च -  आणि - गुह्येषु -  उपनिषदांमध्ये - अनुगीतसत्कथः -  ज्याच्या रम्य कथा गायन केल्या आहेत असा - एकः -  एकटा - ईशः -  ऐश्वर्यवान - आत्मलीलया -  स्वतःच्या लीलेने - जगत् -  जगाला - सृजति -  उत्पन्न करितो - अवति -  रक्षण करितो - अत्ति -  व संहरतो - तत्र -  परंतु त्या कृत्यात - न सज्जते -  सक्त होत नाही - त्तः -  तो - अयं -  हा ॥२४॥ 
 
हे सखी, ज्यांच्या सुंदर लीलांचे गायन वेदांत आणि अन्य गोपनीय शास्त्रांत व्यासांसारख्या रहस्यवादी ऋषींनी केले आहे, तेच हे आहेत. हेच अद्वितीय परमात्मा आहेत. हे आपल्या लीलेने जगताची निर्मिती, पालन-पोषण तसेच संहार करतात; पण त्यात आसक्त होत नाहीत. (२४) 
 
यदा ह्यधर्मेण तमोधियो नृपा  जीवन्ति तत्रैष हि सत्त्वतः किल । धत्ते भगं सत्यमृतं दयां यशो भवाय रूपाणि दधत् युगे युगे ॥ २५ ॥ 
जेंव्हा अधर्मे तमवृत्ति माजे स्वार्थार्थ सारे करितात कृत्य । तै सत्वरुपेचि जन्मोनि येतो कल्याण येशो जगती कराया ॥ २५ ॥ 
यदा -  जेव्हा - हि -  खरोखर - तमोधियः -  अज्ञानबुद्धीचे - नृपाः -  राजे - अधर्मेण -  अधर्माने - जीवन्ति -  जगतात - तत्र -  तेथे - युगेयुगे -  प्रत्येक युगात - भवाय -  सृष्टीचे कार्य सुरळित चालण्याकरिता - रूपाणि -  रूपे - दधत् -  धारण करणारा - एषः -  हा - हि -  खरोखर - सत्त्वतः -  सत्त्वगुणाने - किल -  निःसंशय - भगं -  ऐश्वर्य - सत्यं -  सत्य - ऋतं -  यथार्थ आचरण - दयां -  दया - यशः -  अद्भुत लीला - धत्ते -  धारण करतो. ॥२५॥ 
 
जेव्हा तामसी वृत्तीचे राजे अधर्माने वागू लागतात, तेव्हा हे सत्त्वगुणाचा स्वीकार करून ऐश्वर्य, सत्य, शाश्वत नियम, दया, आणि यश हे गुण प्रगट करतात आणि जगताच्या कल्याणासाठी युगा-युगांमध्ये अनेक अवतार धारण करतात. (२५) 
 
अहो अलं श्लाघ्यतमं यदोः कुलं  अहो अलं पुण्यतमं मधोर्वनम् । यदेष पुंसां ऋषभः श्रियः पतिः स्वजन्मना चङ्क्रमणेन चाञ्चति ॥ २६ ॥ 
अहो यदूवंश खरेचि श्रेष्ठ लक्ष्मीपती जन्म तयात झाला । तशी मधूबागहि धन्य झाली श्रीकृष्ण जेथे रमला सदाचा ॥ २६ ॥ 
अहो -  काय हो ! - यदोः -  यदूचे - कुलं -  कुळ - अलं -  फारच - श्लाघ्यतमं -  स्तुति करण्यास अत्यंत योग्य आहे - अहो -  किती हो ! ! - मधोः -  मधूचे - वनं -  वन - अलं -  अत्यंत - पुण्यतमं -  सर्वात पुण्यकारक - यत् -  कारण - पुंसां -  पुरुषांत - ऋषभः -  श्रेष्ठ - श्रियः -  लक्ष्मीचा - प्रियः -  पति - एषः -  हा - स्वजन्मना -  स्वतः जन्म घेऊन - च -  आणि - चङ्क्रमणेन -  संचार करून - अञ्चति -  पवित्र करितो. ॥२६॥ 
 
अहो पहा ना ! हा यदुवंश अत्यंत प्रशंसनीय आहे. कारण लक्ष्मीपती पुरुषोत्तम श्रीकृष्णांनी जन्म घेऊन या वंशाचा सन्मान केला आहे. ते पवित्र मधुवनही अत्यंत धन्य होय. जे यांनी आपल्या हिंडण्या-फिरण्याने सुशोभित केले आहे. (२६) 
 
अहो बत स्वर्यशसः तिरस्करी  कुशस्थली पुण्ययशस्करी भुवः । पश्यन्ति नित्यं यदनुग्रहेषितं स्मितावलोकं स्वपतिं स्म यत्प्रजाः ॥ २७ ॥ 
आश्चर्य आहे यश स्वर्गिचे ते त्यजोनि, द्वारापुरि येथ आला । हो ! जेथ कृष्णो हसुनीच पाही तेथे पुरी ही वसुनीहि राही ॥ २७ ॥ 
अहो -  काय हो  - बत -  खरोखर - स्वर्यशसः -  स्वर्गाच्या कीर्तीचा - तिरस्करी -  तिरस्कार करणारी - भुवः -  पृथ्वीच्या - पुण्ययशस्करी -  पुण्यकारक कीर्तीला वाढविणारी - कुशस्थली - द्वारका - यत् -  ज्या कारणास्तव - प्रजाः -  लोक - यदनुग्रहेषितं -  ज्याच्या अनुग्रहाला इच्छिणार्या - स्मितावलोकं -  स्मितपूर्वक अवलोकन करणार्या - स्वपतिं -  स्वतःच्या स्वामीला - नित्यं -  नेहमी - पश्यन्ति स्म -  पाहतात. ॥२७॥ 
 
केवढी आनंदाची गोष्ट आहे की, द्वारकापुरीने स्वर्गाच्या यशाचा तिरस्कार करून पृथ्वीचे पवित्र यश वृद्धिंगत केले आहे. म्हणूनच येथील प्रजा मोठ्या प्रेमाने आणि मंद हास्ययुक्त कृपादृष्टीने पाहणार्या आपल्या स्वामी भगवान श्रीकृष्णांचे सदैव दर्शन घेत असते. (२७) 
 
नूनं व्रतस्नानहुतादिनेश्वरः  समर्चितो ह्यस्य गृहीतपाणिभिः । पिबंति याः सख्यधरामृतं मुहुः व्रजस्त्रियः सम्मुमुहुः यदाशयाः ॥ २८ ॥ 
ज्या ज्या स्त्रियांनी वरिला सखे हा  नक्कीच त्यांनी तप आचरीले । पिती सदा त्या अधरामृताला बेशुद्ध गोपी स्मरताच होती ॥ २८ ॥ 
सखि -  गडे ! - नूनं -  खरोखर - अस्य -  ह्याच्या - गृहीतपाणिभिः -  पाणिग्रहण केलेल्यांनी - व्रतस्नानहुतादिना -  व्रते, तीर्थस्थाने व हवने इत्यादिकांनी - ईश्वरः -  परमेश्वर - समर्चितः -  पूजिला आहे - याः -  ज्या - व्रजस्त्रियः -  गोपी - हि -  खरोखर - यदाशयाः -  ज्यावर मन बसल्यामुळे - संमुमुहुः -  मोहित झाल्या - मुहुः -  वारंवार - अधरामृतं -  अधरोष्ठाच्या अमृतप्राय मधुर रसाला - पिबन्ति -  पितात. ॥२८॥ 
 
अग सखी ! ज्यांचे यांनी पाणिग्रहण केले आहे, त्या स्त्रियांनी निश्चितच व्रत, स्नान, होम-हवन इत्यादींनी परमात्म्याची आराधना केली असली पाहिजे. कारण ज्यांच्या केवळ स्मरणाने व्रजगोपी आनंदविभोर होऊन मूर्छित होत, त्यांच्या अधरामृताचे या वारंवार सेवन करतात. (२८) 
 
या वीर्यशुल्केन हृताः स्वयंवरे  प्रमथ्य चैद्यः प्रमुखान्हि शुष्मिणः । प्रद्युम्न साम्बाम्ब सुतादयोऽपरा याः चाहृता भौमवधे सहस्रशः ॥ २९ ॥ एताः परं स्त्रीत्वमपास्तपेशलं निरस्तशौचं बत साधु कुर्वते । यासां गृहात् पुष्करलोचनः पतिः न जातु अपैत्याहृतिभिः हृदि स्पृशन् ॥ ३० ॥ 
बाहूबलाने वधिताच शत्रू श्री रुक्मिणीला वरिले तयाने । प्रद्युम्न आंबादिनि सांब पुत्र आठीहि ज्यां पट्ट तशाचि धन्य ॥ २९ ॥ भौमासुरा मारुनि ज्या हजारो राण्याजयांचाहि स्विकार केला । माहात्म्य त्यांचे नच वर्णिता ये पती तयांचा भगवान कृष्ण । बोले विनोदे तयि हास्यपूर्ण नी पारिजाताहि भेटि देई ॥ ३० ॥ 
हि -  खरोखर - शुष्मिणः -  बलिष्ठ - चैदयप्रमुखान् -  शिशुपाल वगैरेंना - प्रमथ्य -  जिंकून - याः -  ज्या - प्रदयुम्नसाम्बाम्बसुतादयः -  प्रद्युम्न, साम्ब व अंब हे आहेत पुत्र ज्यांचे अशा - वीर्यशुल्केन -  पराक्रमरूपी मोल देऊन - स्वयंवरे -  स्वयंवरांत - हृताः -  हरण केल्या - च -  आणि - अपराः -  दुसर्या - याः -  ज्या - भौमवधे -  भौमासुराला मारून - सहस्त्रशः -  हजारो - आहृताः -  आणिल्या. ॥२९॥  पुष्करलोचनः - कमळाप्रमाणे नेत्र असणारा - आहृतिभिः - क्रीडांनी - हृदि - हृदयात - स्पृशन् - स्पर्श करणारा - पतिः - पति श्रीकृष्ण - यासां - ज्यांच्या - गृहात् - घरातून - जातु - कधीही - न अपैति - दूर जात नाही - एताः - ह्या - बत - खरोखर - अपास्तपेशलं - परतंत्र - निरस्तशौचं - व अशुद्ध - स्त्रीत्वं - स्त्रीपणाला - परं - फारच - साधु - चांगले - कुर्वते - करतात. ॥३०॥ 
स्वयंवरात यांनी शिशुपाल आदी उन्मत्त राजांची मानहानी करून आपल्या बाहुबलाने ज्यांना जिंकून आणले होते, तसेच प्रद्युम्न, सांब, अम्ब इत्यादी ज्यांचे पुत्र आहेत, त्या रुक्मिणी आदी आठ पट्टराण्या आणि भौमासुराला मारून आणलेल्या ज्या हजारो पत्न्या आहेत, त्या खरोखरच धन्य होत ! कारण या सगळ्याजणींनी स्वतंत्रता आणि पावित्र्य यांनी रहित असणार्या स्त्रीजीवनास पवित्र आणि उज्ज्वल बनविले आहे. यांच्या महिम्याचे काय वर्णन करावे ? यांचे पती साक्षात कमलनयन श्रीकृष्ण प्रिय भाषणाने आणि प्रिय वस्तू देऊन यांच्या हृदयातील प्रेम वृद्धिंगत करीत यांच्या घरातून कधीही दुसरीकडे जात नाहीत. (२९-३०) 
 
(अनुष्टुप्)  एवंविधा गदन्तीनां स गिरः पुरयोषिताम् । निरीक्षणेन अभिनन्दन् सस्मितेन ययौ हरिः ॥ ३१ ॥ 
 (अनुष्टुप्) हस्तिनापुरिच्या नारी वदती गोष्टि या अशा । निघाला तेधवा कृष्ण सर्वांना अभिवादुनी ॥ ३१ ॥ 
सः -  तो - हरिः -  श्रीकृष्ण - गदन्तीनां -  बोलणार्या - पुरयोषितां -  हस्तिनापुरातील स्त्रियांच्या - एवंविधा -  अशा प्रकारच्या - गिरः -  भाषणांना - सस्मितेन -  मंदहास्यपूर्वक - निरीक्षणेन -  पाहण्याने - अभिनन्दन् -  अभिनंदन करीत - ययौ -  गेला. ॥३१॥ 
 
हस्तिनापुरातील स्त्रिया याप्रमाणे वार्तालाप करीत असता श्रीकृष्ण मंद हास्ययुक्त प्रेमळ दृष्टीने त्यांचे अभिनंतन करीत तेथून निघाले. (३१) 
 
अजातशत्रुः पृतनां गोपीथाय मधुद्विषः । परेभ्यः शङ्कितः स्नेहात् प्रायुङ्क्त चतुरङ्गिणीम् ॥ ३२ ॥ 
कृष्णाच्या रक्षणासाठी चतुरंगदळो दिले । कुणी त्या न करी हल्ली शंका धर्ममनीं असे ॥ ३२ ॥ 
अजातशत्रुः -  धर्मराज - परेभ्यः -  शत्रूंच्या बाबतीत - शंकितः -  शंका घेऊन - मधुव्दिषः -  श्रीकृष्णाच्या - गोपीथाय -  रक्षणाकरिता - स्नेहात् -  प्रेमाने - चतुरङ्गिणीं -  चार प्रकारच्या - पृतनां -  सेनेला - प्रायुङ्क्त -  योजिता झाला. ॥३२॥ 
 
स्नेहभावामुळे अजातशत्रू युधिष्ठिराने रस्त्यात शत्रूने त्यांच्यावर आक्रमण करू नये म्हणून चतुरंग सेना श्रीकृष्णांबरोबर दिली. (३२) 
 
अथ दूरागतान् शौरिः कौरवान् विरहातुरान् । सन्निवर्त्य दृढं स्निग्धान् प्रायात्स्वनगरीं प्रियैः ॥ ३३ ॥ 
बंधू हे प्रेमबंधाने गेले दूर निरोपिण्या । सर्वां त्या थांबवोनीया गेला श्रीकृष्ण तेधवा ॥ ३३ ॥ 
अथ -  नंतर - शौरिः -  श्रीकृष्ण - दुरागतान् -  बरेच दूरपर्यंत मागोमाग आलेल्या - विरहातुरान् -  श्रीकृष्णविरहाने दुःखी झालेल्या - दृढं -  पुष्कळ - स्निग्धान् -  प्रेम करणार्या - कौरवान् -  कौरवांना - संनिवर्त्य -  परतवून - प्रियैः -  मित्रांसह - स्वनगरीं -  आपल्या नगरीला म्हणजे व्दारकेला - प्रायात् -  गेला. ॥३३॥ 
 
सुदृढ प्रेमबंधनामुळे कुरुवंशी पांडव भगवंतांच्या बरोबर बर्याच अंतरापर्यंत आले. ते श्रीकृष्णांच्या विरहामुळे व्याकूळ झाले होते. त्यांना परत पाठवून श्रीकृष्ण, सात्यकी, उद्धव आदी मित्रांबरोबर द्वारकेकडे गेले. (३३) 
 
कुरुजाङ्गलपाञ्चालान् शूरसेनान् सयामुनान् । ब्रह्मावर्तं कुरुक्षेत्रं मत्स्यान् सारस्वतानथ ॥ ३४ ॥ मरुधन्वमतिक्रम्य सौवीराभीरयोः परान् । आनर्तान् भार्गवोपागात् श्रान्तवाहो मनाग्विभुः ॥ ३५ ॥ 
कुरुजांगल पांचाल यमुना शूरसेन नी । ब्रह्मावर्त कुरुक्षेत्र मरुदेश नि मत्स्य ही ॥ ३४ ॥ सारस्वत अभीरादी सौवीर देश चालुनी । थोडेसे थकले अश्व पश्चिमानर्त चालता ॥ ३५ ॥ 
कुरुजाङ्गलपाञ्चालान् -  कुरुदेश, जागल व पांचाल देश ह्यांना - सयामुनान् -  यमुनेच्या काठी असणार्या देशांसह - शूरसेनान् -  शूरसेन देशांना - ब्रह्मावर्तं -  ब्रह्मावर्त देशाला - कुरूक्षेत्रं -  कुरुक्षेत्राला - मत्स्यान् -  मत्स्य देशांना - अथ -  नंतर - सारस्वतान् -  सारस्वत देशांना ॥३४॥  भार्गव - शौनक हो ! - मनाक् - थोडेसे - श्रान्तवाहः - ज्याच्या रथाचे घोडे दमले आहे असा - विभुः - श्रीकृष्ण - मरुधन्वं - मारवाड प्रांताला - अतिक्रम्य - ओलांडून - सौवीराभीरयोः - सौवीर व आभीर ह्या दोन देशांच्या - परान् - पलीकडे असणार्या - आनर्तान् - व्दारका देशाला - उपागात् - प्राप्त झाला. ॥३५॥ 
शौनका ! ते कुरूजाड़्गल, पांचाल, शूरसेन, यमुना तटवर्ती प्रदेश, ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र, मत्स्य, सारस्वत आणि मरुधन्व देह पार करून सौवीर आणि आभीर देशांच्या पश्चिमेकडील आनर्त देशात आले. त्यावेळी बरीच वाटचाल झाल्याकारणाने भगवंतांच्या रथाचे घोडे थोडेसे थकले होते. (३४-३५) 
 
तत्र तत्र ह तत्रत्यैः हरिः प्रत्युद्यतार्हणः । सायं भेजे दिशं पश्चात् गविष्ठो गां गतस्तदा ॥ ३६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे श्रीकृष्णद्वारकागमनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥ 
मार्गात जेथ तेथीच्या लोकांनी पूजिला हरी । सायं जलाशयी स्नान संध्यादी नित्यनेम हा ॥ ३६ ॥ ॥ इति श्रीमद्भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्र्लोकी मराठी रुपांतर ॥ दहावा अध्याय हा ॥ १ ॥ १० ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥ 
ह -  खरोखर - तत्रतत्र -  त्या त्या ठिकाणी - तत्रत्यैः -  तेथील लोकांनी - प्रत्युदयतार्हणः -  नजराणे आणून पूजिलेला - हरिः -  श्रीकृष्ण - सायं -  संध्याकाळी - पश्चात् -  पश्चिमेकडील - दिशं -  दिशेला - भेजे -  प्राप्त झाला - तदा -  त्यावेळी - गविष्ठः -  सूर्य - गां -  उदकाला - गतः -  गेला. ॥३६॥
 
मार्गामध्ये ठिकठिकाणी लोक भेटवस्तू देऊन भगवंतांचा सन्मान करीत होते. भगवंत सायंकाळ झाली की रथातून खाली उतरत आणि जलाशयावर जाऊन संध्यावंदन करीत. (३६) 
 इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां  |