श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
एकादशः स्कन्धः
प्रथमोऽध्यायः


मनुकृतं देवीस्तवनम्

नारद उवाच
भगवन् भूतभव्येश नारायण सनातन ।
आख्यातं परमाश्चर्यं देवीचारित्रमुत्तमम् ॥ १ ॥
प्रादुर्भावः परो मातुः कार्यार्थमसुरद्रुहाम् ।
अधिकाराप्तिरुक्तात्र देवीपूर्णकृपावशात् ॥ २ ॥
अधुना श्रोतुमिच्छामि येन प्रीणाति सर्वदा ।
स्वभक्तान्परिपुष्णाति तमाचारं वद प्रभो ॥ ३ ॥
श्रीनारायण उवाच
शृणु नारद तत्त्वज्ञ सदाचारविधिक्रमम् ।
यदनुष्ठानमात्रेण देवी प्रीणाति सर्वदा ॥ ४ ॥
प्रातरुत्थाय कर्तव्यं यद्‌ द्विजेन दिने दिने ।
तदहं सम्प्रवक्ष्यामि द्विजानामुपकारकम् ॥ ५ ॥
उदयास्तमयं यावद्‌ द्विजः सत्कर्मकृद्‍भवेत् ।
नित्यनैमित्तिकैर्युक्तः काम्यैश्चान्यैरगर्हितैः ॥ ६ ॥
आत्मनश्च सहायार्थं पिता माता न तिष्ठति ।
न पुत्रदारा न ज्ञातिर्धर्मस्तिष्ठति केवलम् ॥ ७ ॥
तस्माद्धर्मं सहायार्थं नित्यं सञ्चिनु साधनैः ।
धर्मेणैव सहायात्तु तमस्तरति दुस्तरम् ॥ ८ ॥
आचारः प्रथमो धर्मः श्रुत्युक्तः स्मार्त एव च ।
तस्मादस्मिन्समायुक्तो नित्यं स्यादात्मनो द्विजः ॥ ९ ॥
आचाराल्लभते चायुराचाराल्लभते प्रजाः ।
आचारादन्नमक्षय्यमाचारो हन्ति पातकम् ॥ १० ॥
आचारः परमो धर्मो नृणां कल्याणकारकः ।
इह लोके सुखी भूत्वा परत्र लभते सुखम् ॥ ११ ॥
अज्ञानान्धजनानां तु मोहितैर्भ्रामितात्मनाम् ।
धर्मरूपो महादीपो मुक्तिमार्गप्रदर्शकः ॥ १२ ॥
आचारात्प्राप्यते श्रैष्ठ्यमाचारात्कर्म लभ्यते ।
कर्मणो जायते ज्ञानमिति वाक्यं मनोः स्मृतम् ॥ १३ ॥
सर्वधर्मवरिष्ठोऽयमाचारः परमं तपः ।
तदेव ज्ञानमुद्दिष्टं तेन सर्वं प्रसाध्यते ॥ १४ ॥
यस्त्वाचारविहीनोऽत्र वर्तते द्विजसत्तमः ।
स शूद्रवद्‌ बहिष्कार्यो यथा शूद्रस्तथैव सः ॥ १५ ॥
आचारो द्विविधः प्रोक्तः शास्त्रीयो लौकिकस्तथा ।
उभावपि प्रकर्तव्यौ न त्याज्यौ शुभमिच्छता ॥ १६ ॥
ग्रामधर्मा जातिधर्मा देशधर्माः कुलोद्‍भवाः ।
परिग्राह्या नृभिः सर्वैर्नैव ताँल्लङ्‌घयेन्मुने ॥ १७ ॥
दुराचारो हि पुरुषो लोके भवति निन्दितः ।
दुःखभागी च सततं व्याधिना व्याप्त एव च ॥ १८ ॥
परित्यजेदर्थकामौ यौ स्यातां धर्मवर्जितौ ।
धर्ममप्यसुखोदर्कं लोकविद्विष्टमेव च ॥ १९ ॥
नारद उवाच
बहुत्वादिह शास्त्राणां निश्चयः स्यात्कथं मुने ।
कियत्प्रमाणं तद्‌ ब्रूहि धर्ममार्गविनिर्णये ॥ २० ॥
श्रीनारायण उवाच
श्रुतिस्मृती उभे नेत्रे पुराणं हृदयं स्मृतम् ।
एतत्त्रयोक्त एव स्याद्धर्मो नान्यत्र कुत्रचित् ॥ २१ ॥
विरोधो यत्र तु भवेत्त्रयाणां च परस्परम् ।
श्रुतिस्तत्र प्रमाणं स्याद्‌ द्वयोर्द्वैधे स्मृतिर्वरा ॥ २२ ॥
श्रुतिद्वैधं भवेद्यत्र तत्र धर्मावुभौ स्मृतौ ।
स्मृतिद्वैधं तु यत्र स्याद्विषयः कल्प्यतां पृथक् ॥ २३ ॥
पुराणेषु क्वचिच्चैव तन्त्रदृष्टं यथातथम् ।
धर्मं वदन्ति तं धर्मं गृह्णीयान्न कथञ्चन ॥ २४ ॥
वेदाविरोधि चेत्तन्त्रं तत्प्रमाणं न संशयः ।
प्रत्यक्षश्रुतिरुद्धं यत्तत्प्रमाणं भवेन्न च ॥ २५ ॥
सर्वथा वेद एवासौ धर्ममार्गप्रमाणकः ।
तेनाविरुद्धं यत्किञ्चित्तत्प्रमाणं न चान्यथा ॥ २६ ॥
यो वेदधर्ममुज्झित्य वर्ततेऽन्यप्रमाणतः ।
कुण्डानि तस्य शिक्षार्थं यमलोके वसन्ति हि ॥ २७ ॥
तस्मात्सर्वप्रयत्‍नेन वेदोक्तं धर्ममाश्रयेत् ।
स्मृतिः पुराणमन्यद्वा तन्त्रं वा शास्त्रमेव च ॥ २८ ॥
तन्मूलत्वे प्रमाणं स्यान्नान्यथा तु कदाचन ।
ये कुशास्त्राभियोगेन वर्तयन्तीह मानवान् ॥ २९ ॥
अधोमुखोर्ध्वपादास्ते यास्यन्ति नरकार्णवम् ।
कामाचाराः पाशुपतास्तथा वै लिङ्‌गधारिणः ॥ ३० ॥
तप्तमुद्राङ्‌किता ये च वैखानसमतानुगाः ।
ते सर्वे निरयं यान्ति वेदमार्गबहिष्कृताः ॥ ३१ ॥
वेदोक्तमेव सद्धर्मं तस्मात्कुर्यान्नरः सदा ।
उत्थायोत्थाय बोद्धव्यं किं मयाद्य कृतं कृतम् ॥ ३२ ॥
दत्तं वा दापितं वापि वाक्येनापि च भाषितम् ।
उपपापेषु सर्वेषु पातकेषु महत्स्वपि ॥ ३३ ॥
अवाप्य रजनीयामं ब्रह्मध्यानं समाचरेत् ।
ऊरुस्थोत्तानचरणः सव्ये चोरौ तथोत्तरम् ॥ ३४ ॥
उत्तानं किञ्चिदुत्तानं मुखमवष्टभ्य चोरसा ।
निमीलिताक्षः सत्त्वस्थो दन्तैर्दन्तान्न संस्पृशेत् ॥ ३५ ॥
तालुस्थाचलजिह्वश्च संवृतास्यः सुनिश्चलः ।
सन्निरुद्धेन्द्रियग्रामो नातिनिम्नस्थितासनः ॥ ३६ ॥
द्विगुणं त्रिगुणं वापि प्राणायाममुपक्रमेत् ।
ततो ध्येयः स्थितो योऽसौ हृदये दीपवत्प्रभुः ॥ ३७ ॥
धारयेत्तत्र चात्मानं धारणां धारयेद्‌बुधः ।
सधूमश्च विधूमश्च सगर्भश्चाप्यगर्भकः ॥ ३८ ॥
सलक्ष्यश्चाप्यलक्ष्यश्च प्राणायामस्तु षड्‌विधः ।
प्राणायामसमो योगः प्राणायाम इतीरितः ॥ ३९ ॥
प्राणायाम इति प्रोक्तो रेचपूरककुम्भकैः ।
वर्णत्रयात्मका ह्येते रेचपूरककुम्भकाः ॥ ४० ॥
स एव प्रणवः प्रोक्तः प्राणायामश्च तन्मयः ।
इडया वायुमारोप्य पूरयित्वोदरे स्थितम् ॥ ४१ ॥
शनैः षोडशमात्राभिरन्यया तं विरेचयेत् ।
एवं सधूमः प्राणानामायामः कथितो मुने ॥ ४२ ॥
आधारेलिङ्‌गनाभिप्रकटितहृदये तालुमूले ललाटे
     द्वे पत्रे षोडशारे द्विदशदशदलद्वादशार्धे चतुष्के ।
वासान्ते बालमध्ये डफकतसहिते कण्ठदेशे स्वराणां
     हंक्षंतत्त्वार्थयुक्तं सकलदलगतं वर्णरूपं नमामि ॥ ४३ ॥
अरुणकमलसंस्था तद्‌रजःपुञ्जवर्णा
     हरनियमितचिह्ना पद्मतन्तुस्वरूपा ।
रविहुतवहराकानायकास्यस्तनाढ्या
     सकृदपि यदि चित्ते संवसेत्स्यात्स भुक्तः ॥ ४४ ॥
स्थितिः सैव गतिर्यात्रा मतिश्चिन्ता स्तुतिर्वचः ।
अहं सर्वात्मको देवः स्तुतिः सर्वं त्वदर्चनम् ॥ ४५ ॥
अहं देवी न चान्योऽस्मि ब्रह्मैवाहं न शोकभाक् ।
सच्चिदानन्दरूपोऽहं स्वात्मानमिति चिन्तयेत् ॥ ४६ ॥
प्रकाशमानां प्रथमे प्रयाणे
     प्रतिप्रयाणेऽप्यमृतायमानाम् ।
अन्तःपदव्यामनुसञ्चरन्ती-
     मानन्दरूपामबलां प्रपद्ये ॥ ४७ ॥
ततो निजब्रह्मरन्ध्रे ध्यायेत्तं गुरुमीश्वरम् ।
उपचारैर्मानसैश्च पूजयेत्तु यथाविधि ॥ ४८ ॥
स्तुवीतानेन मन्त्रेण साधको नियतात्मवान् ।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ४९ ॥


सदाचार विधी

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारद म्हणाले, ''हे भगवान, देवीचे चरित्र, त्या मातेचे आख्यान मी ऐकले. तिची उत्पत्ती हे सर्व मी श्रवण केले. आता कोणत्या आचारांमुळे देवी संतुष्ट होते ते मला सांगा.''

नारायण मुनी म्हणाले, सदाचाराच्या अनुष्ठानानेही देवी प्रसन्न होते. ब्राह्मणाने नित्य प्रातःकाली उठून हे अनुष्ठान करावे. आता त्याचा क्रम सांगतो. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ब्राह्मणाने सत्‌कर्मे करावीत. नित्य नैमित्तिक व अनिंद्य कर्मे करावीत. पुरुष स्वतःचा आपणच हितकर्ता असतो. कारण इतर कुणीही संकटाचे वेळी उभे रहात नाहीत. धर्मच उभा रहातो. म्हणून तू धर्माप्रमाणे आचरण कर. धर्मामुळे मनुष्य ज्ञानी होतो, आयुष्यमान होतो, पुत्रापौत्रादि सुखे भोगतो, त्याच्या पातकांचा नाश होतो. आचार हा श्रेष्ठ धर्म होय. आचारवान मनुष्य इहलोकी परलोकीही सुख भोगतो. अज्ञान अंधारात बुडालेल्यांना धर्मरूपी महादीप मुक्तीचा मार्ग दाखवतो. आचारामुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते. पुण्य लाभते. कर्माधिकार प्राप्त होतो. हे नारदा, आचार हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. जो द्विज उत्तम आचाररहित रहातो तो शूद्राप्रमाणे भ्रष्ट होय. आचार दोन प्रकारचा आहे. शास्त्रीय आचार व लौकिक आचार. कल्याणाची इच्छा करणार्‍याने दोन्ही आचार बाळगावेत.

ग्रामधर्म, जातीधर्म, देशधर्म, कुलधर्म हे सर्व धर्म पाळावेत. कारण दुराचार करणारा माणूस लौकिक जीवनात निंद्य ठरतो. तो दुःखी व व्याधीग्रस्त होतो. धर्मरहित अर्थ व काम यांचा त्याग करावा. दुःखदायक, लोक द्वेष करतात, असा धर्म सोडावा.

नारद म्हणाले, ''हे मुने, व्यवहारात अनेक शास्त्रे आहेत. तेव्हा धर्मनिर्णय कसा करावा ? धर्मनिर्णयास शास्त्रप्रमाण सांगा.''

नारायण म्हणतात, ''श्रुती, स्मृती हे दोन नेत्र असून पुराण हे हृदय आहे. या तिन्हीत सांगितलेला धर्म होय. या तिन्हीत कुठे विरोध असल्यास स्मृती हे प्रमाण आहे. भिन्न विषयानुरूप भिन्न स्मृतीवचने आढळतात. पुराणात तंत्राप्रमाणे बसणारी वचने आहेत. तोसुद्धा धर्मच आहे. पण चिरधर्म नव्हे. वेदाशी विरोध नसेल तर ते प्रमाण होय. वेद हेच धर्ममार्गात प्रमाण होय. त्याशी विरोध करणारे अप्रमाण होत. पापी लोकांसाठी यमलोकात कुंडे आहेत. म्हणून वेदोक्त धर्म आचरावा.

कोणतेही शास्त्र वेदमूलक असेल तर प्रमाण मानावे. असत् शास्त्राविषयी अभिमान बाळगणार्‍यांना खाली डोके वर पाय करून नरकात उभे रहावे लागते. यथेच्छ आचरण करणारे, पाशुपत नावाचे लिंग धारण करणारे, तप्तमुद्राधारक, वैखानस मताचे अनुयायी, हे सर्व वेदमार्ग सोडतात म्हणून नरकात पडतात म्हणून वेदोक्त धर्माचे आचरण करावे. मी आज दिलेले, देवविलेले किंवा वचन बोलल्याप्रमाणे कोणते सत्‌कार्य केले आहे ? असा विचार करावा. आपण केलेल्या पातकांचे स्मरण करावे. रात्रीच्या चवथ्या प्रहरी ब्राह्मणाने ध्यान करावे.

डाव्या मांडीवर उजवा पाय उताणा ठेवून तसाच उजव्या मांडीवर डावा पाय ठेवावा. मुख मागे घेऊन हनुवटीने उरास स्पर्श करावा. डोळे मिटून वृत्ती सात्त्विक कराव्यात. दातात दात लावू नये. जिव्हा टाळूस भिडवावी. तोंड बंद करून निश्चल बसावे. इंद्रियांचा निरोध करावा. अशाप्रकारे दोन-तीन वेळा प्राणायाम करावा. हृदयात ध्येयरूपाने स्थित असलेल्या प्रभूची धारणा धरावी. धारणा सिद्ध व्हावी म्हणून अभ्यास करावा.

सधूम, विधूम, समर्थ, अनर्थ, सलक्ष्य, अलक्ष्य असा सहा प्रकारचा प्राणायाम आहे. प्राणायामच सर्वश्रेष्ठ योग आहे. रेचक, पूरक, कुंभक, यामुळे प्राणायाम होतो. अ, ऊ व म या तीन वर्णांना प्रणव म्हणतात. इडा नावाच्या डाव्या नाकपुडीतल्या नाडीने वायू घेऊन उदरात साठवावा. मकारात्मक सोळा मात्रा उच्चारून उजव्या नाकपुडीतल्या पिंगला नाडीने श्वास सोडावा. ह्याला सधूम प्राणायाम म्हणतात.

मूलाधार, लिंग, नाभी, हृदय, कंठ, भूमध्य ही सहा चक्रे आहेत. भूचक्रात द्विदल कमल आहे. त्यावर हं व क्ष ही अक्षरे आहेत. कंठात सोळा दलांचे कमळ आहे. त्यावर सोळा स्वररूपाने तत्वार्थ रहातो. स्थानभयात्मक मूलधारात चतुर्दल कमल आहे. त्यावर व, श, ष व स ही अक्षरे आहेत. ड, फ, क, ढ या अक्षरांनी ते युक्त आहे.

लिंगात सहा दलाचे कमल आहे. त्यावर ब पासून ल पर्यंत अक्षरे आहेत. नाभीत दहा दलांचे कमल असून त्यावर ड पासून फ पर्यंत अष्टाक्षरे आहेत. हृदयात फ पासून ठ पर्यंत बारा अक्षरी कमळ आहे.

या अक्षरांनी ज्ञात होणार्‍या तत्त्वास नमस्कार असो, असे म्हणावे.

मूलाधाराचे ठिकाणी असलेल्या चतुर्दल कमलात स्थित रजोगुणवती, ह आणि रेफ यांच्यापुढे जिचे चिन्ह निश्चित झाले आहे, जिचे स्वरूप पद्म तंतूप्रमाणे आहे. रवी, अग्नी, चंद्र यांच्याप्रमाणे तेजस्वी मुख व स्तनयुग्म यांनी संपन्न अशा देवीचा एकदा जरी मनात उदय झाला तरी तो पुरुष मुक्त होतो.

अशारीतीने कुंडलिनीचे स्मरण करून सर्व कर्मे तिला अर्पण करावीत. ''हे देवा, मीच सर्वात्म असल्याने स्तुती व पूजा ही तुझीच आहेत. मीच देवी आहे. मी ब्रह्म आहे. मी दुःखी जीव नव्हे. मीच सच्चिदानंदरूप आहे.'' अशाप्रकारे स्वतःविषयी चिंतन करावे.

प्रत्येक प्राणायामसमयी प्रकाशमान, अमृतमय अशी अंतःकरणात संचार करणारी, आनंदरूप जी देवी तिला मी शरण आहे. आपल्या ब्रह्मरंधातील श्रेष्ठ गुरू ईश्वर याचे ध्यान करावे. त्याची मानसोपचारांनी विधियुक्त पूजा करावी. गुरू, ब्रह्मा, विष्णु, महेश्वरी देव असून गुरू परब्रह्मच आहे. म्हणून अशा गुरूस मी नमस्कार करतो. या मंत्राने ईश्वराचे स्तवन करावे.



अध्याय पहिला समाप्त

GO TOP