श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
द्वितीयः स्कन्धः
द्वादशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


श्रोतृप्रवक्तृप्रसङ्गः

सूत उवाच
तच्छ्रुत्वा वचनं तस्य व्यासः सत्यवतीसुतः ।
उवाच वचनं तत्र सभायां नृपतिं च तम् ॥ १ ॥
व्यास उवाच
शृणु राजन् प्रवक्ष्यामि पुराणं गुह्यमद्‌भुतम् ।
पुण्यं भागवतं नाम नानाख्यानयुतं शिवम् ॥ २ ॥
अध्यापितं मया पूर्वं शुकायात्मसुताय वै ।
श्रावयामि नृप त्वां हि रहस्यं परमं मम ॥ ३ ॥
धर्मार्थकाममोक्षाणां कारणं श्रवणात्किल ।
शुभद सुखदं नित्यं सर्वागमसमुद्धृतम् ॥ ४ ॥
जनमेजय उवाच
आस्तीकोऽयं सुतः कस्य विघ्नार्थं कथमागतः ।
प्रयोजनं किमत्रास्य सर्पाणां रक्षणे प्रभो ॥ ५ ॥
कथयैतन्महाभाग विस्तरेण कथानकम् ।
पुराणं च तथा सर्वं विस्तराद्वद सुव्रत ॥ ६ ॥
व्यास उवाच
जरत्कारुर्मुनिः शान्तो न चकार गृहाश्रमम् ।
तेन दृष्टा वने गर्ते लम्बमाना स्वपूर्वजाः ॥ ७ ॥
ततस्तमाहुः कुरु पुत्र दारा-
     न्यथा च नः स्यात्परमा हि तृप्तिः ।
स्वर्गे व्रजामः खलु दुःखमुक्ता
     वयं सदाचारयुते सुते वै ॥ ८ ॥
स तानुवाचाथ लभे समाना-
     मयाचितां चातिवशानुगां च ।
तदा गृहारम्भमहं करोमि
     ब्रवीमि तथ्यं मम पूर्वजा वै ॥ ९ ॥
इत्युक्त्वा ताञ्जरत्कारुर्गतस्तीर्थान्प्रति द्विजः ।
तदैव पन्नगाः शप्ता मात्राग्नौ निपतन्त्विति ॥ १० ॥
कश्यपस्य मुनेः पत्‍न्यौ कद्रूश्च विनता तथा ।
दृष्ट्वादित्यरथे चाश्वमूचतुश्च परस्परम् ॥ ११ ॥
तं दृष्ट्वा च तदा कद्रूर्विनतामिदमब्रवीत् ।
किंवर्णोऽयं हयो भद्रे सत्यं प्रब्रूहि माचिरम् ॥ १२ ॥
विनतोवाच
श्वेत एवाश्वराजोऽयं किं वा त्वं मन्यसे शुभे ।
ब्रूहि वर्णं त्वमप्यस्य ततस्तु विपणावहे ॥ १३ ॥
कद्रुरुवाच
कृष्णवर्णमहं मन्ये हयमेनं शुचिस्मिते ।
एहि सार्धं मया दिव्यं दासीभावाय भामिनि ॥ १४ ॥
सूत उवाच
कद्रूश्च स्वसुतानाह सर्वान्सर्पान्वशे स्थितान् ।
बालाञ्छ्यामान्प्रकुर्वन्तु यावतोऽश्वशरीरके ॥ १५ ॥
नेति केचन तत्राहुस्तानथासौ शशाप ह ।
जनमेजयस्य यज्ञे वै गमिष्यथ हुताशनम् ॥ १६ ॥
अन्ये चक्रुर्हयं सर्पाः कर्बुरं वर्णभोगकैः ।
वेष्टयित्वास्य पुच्छं तु मातुः प्रियचिकीर्षया ॥ १७ ॥
भगिन्यौ च सुसंयुक्ते गत्वा ददृशतुर्हयम् ।
कर्बुरं तं हयं दृष्ट्वा विनता चातिदुःखिता ॥ १८ ॥
तदाजगाम गरुडः सुतस्तस्या महाबलः ।
स दृष्ट्वा मातरं दीनामपृच्छत्पन्नगाशनः ॥ १९ ॥
मातः कथं सुदीनासि रुदितेव विभासि मे ।
जीवमाने मयि सुते तथान्ये रविसारथौ ॥ २० ॥
दुःखितासि ततो वां धिग्जीवितं चारुलोचने ।
किं जातेन सुतेनाथ यदि माता सुदुःखिता ॥ २१ ॥
शंस मे कारणं मातः करोमि विगतज्वराम् ।
विनतोवाच
सपत्‍न्या दास्यहं पुत्र किं ब्रवीमि वृथा क्षता ॥ २२ ॥
वह मां सा ब्रवीत्यद्य तेनास्मि दुःखिता सुत ।
गरुड उवाच
वहिष्येऽहं तत्र किल यत्र सा गन्तुमुत्सुका ॥ २३ ॥
मा शोकं कुरु कल्याणि निश्चिन्तां त्वां करोम्यहम् ।
व्यास उवाच
इत्युक्ता सा गता पार्श्वं कद्रोश्च विनता तदा ॥ २४ ॥
दासीभावमपाकर्तुं गरुडोऽपि महाबलः ।
उवाह तां सपुत्रां वै सिन्धोः पारं जगाम ह ॥ २५ ॥
गत्वा तां गरुडः प्राह ब्रूहि मातर्नमोऽस्तु ते ।
कथं मुच्येत मे माता दासीभावादसंशयम् ॥ २६ ॥
कद्रूरुवाच
अमृतं देवलोकात्त्वं बलादानीय मे सुतान् ।
समर्पय सुताद्याशु मातरं मोचयाबलाम् ॥ २७ ॥
व्यास उवाच
इत्युक्तः प्रययौ शीघ्रमिन्द्रलोकं महाबलः ।
कृत्वा युद्धं जहाराशु सुधाकुम्भं खगोत्तमः ॥ २८ ॥
समानीयामृतं मात्रे वैनतेयः समर्पयत् ।
मोचिता विनता तेन दासीभावादसंशयम् ॥ २९ ॥
अमृतं सञ्जहारेन्द्रः स्नातुं सर्पा यदा गताः ।
दासीभावाद्विनिर्मुक्ता विनता विपतेर्बलात् ॥ ३० ॥
तत्रास्तीर्णाः कुशास्तैस्तु लीढाः पन्नगनामकैः ।
द्विजिह्वास्ते सुसम्पन्नाः कुशाग्रस्पर्शमात्रतः ॥ ३१ ॥
मात्रा शप्ताश्च ये नागा वासुकिप्रमुखाः शुचा ।
ब्रह्माणं शरणं गत्वा ते होचुः शापजं भयम् ॥ ३२ ॥
तानाह भगवान्ब्रह्मा जरत्कारुर्महामुनिः ।
वासुकेर्भगिनीं तस्मै अर्पयध्वं सनामिकाम् ॥ ३३ ॥
तस्यां यो जायते पुत्रः स वस्त्राता भविष्यति ।
आस्तीक इति नामासौ भविता नात्र संशयः ॥ ३४ ॥
वासुकिस्तु तदाकर्ण्य वचनं ब्रह्मणः शिवम् ।
वनं गत्वा सुतां तस्मै ददौ विनयपूर्वकम् ॥ ३५ ॥
सनामां तां मुनिर्ज्ञात्वा जरत्कारुरुवाच तम् ।
अप्रियं मे यदा कुर्यात्तदा तां सन्त्यजाम्यहम् ॥ ३६ ॥
वाग्बन्धं तादृशं कृत्वा मुनिर्जग्राह तां स्वयम् ।
दत्त्वा च वासुकिः कामं भवनं स्वं जगाम ह ॥ ३७ ॥
कृत्वा पर्णकुटीं शुभ्रां जरत्कारुर्महावने ।
तया सह सुखं प्राप रममाणः परन्तप ॥ ३८ ॥
एकदा भोजनं कृत्वा सुप्तोऽसौ मुनिसत्तमः ।
भगिनी वासुकेस्तत्र संस्थिता वरवर्णिनी ॥ ३९ ॥
न सम्बोधयितव्योऽहं त्वया कान्ते कथञ्चन ।
इत्युक्त्वा तु गतो निद्रां मुनिस्तां सुदतीं तदा ॥ ४० ॥
रविरस्तगिरिं प्राप्तः सन्ध्याकाल उपस्थिते ।
किं करोमि न मे शान्तिस्त्यजेन्मां बोधितः पुनः ॥ ४१ ॥
धर्मलोपभयाद्‌भीता जरत्कारुरचिन्तयत् ।
नोचेत्प्रबोथयाम्येनं सन्ध्याकालो वृथा व्रजेत् ॥ ४२ ॥
धर्मनाशाद्वरं त्यागस्तथापि मरणं ध्रुवम् ।
धर्महानिर्नराणां हि नरकाय भवेत्पुनः ॥ ४३ ॥
इति सञ्चिन्त्य सा बाला तं मुनिं प्रत्यबोधयत् ।
सन्ध्याकालोऽपि सञ्जात उत्तिष्ठोत्तिष्ठसुव्रत ॥ ४४ ॥
उत्थितोऽसौ मुनिः कोपात्तामुवाच व्रजाम्यहम् ।
त्वं तु भ्रातृगृहं याहि निद्राविच्छेदकारिणी ॥ ४५ ॥
वेपमानाब्रवीद्वाक्यमित्युक्ता मुनिना तदा ।
भ्रात्रा दत्ता यदर्थं तत्कथं स्यादमितप्रभ ॥ ४६ ॥
मुनिः प्राह जरत्कारुं तदस्तीति निराकुलः ।
गता सा मुनिना त्यक्ता वासुकेः सदनं तदा ॥ ४७ ॥
पृष्टा भ्रात्राब्रवीद्वाक्यं यथोक्तं पतिना तदा ।
अस्तीत्युक्त्वा च हित्वा मां गतोऽसौ मुनिसत्तमः ॥ ४८ ॥
वासुकिस्तु तदाकर्ण्य सत्यावाङ्‌मुनिरित्युत ।
विश्वासं च परं कृत्वा भगिनीं तां समाश्रयत् ॥ ४९ ॥
ततः कालेन कियता जातोऽसौ मुनिबालकः ।
आस्तीक इति नामासौ विख्यातः कुरुसत्तम ॥ ५० ॥
तेनायं रक्षितो यज्ञस्तव पार्थिवसत्तम ।
मातृपक्षस्य रक्षार्थं मुनिना भावितात्मना ॥ ५१ ॥
भव्यं कृतं महाराज मानितोऽयं त्वया मुनिः ।
यायावरकुलोत्पनो वासुकेर्भगिनीसुतः ॥ ५२ ॥
स्वस्ति तेऽस्तु महाबाहो भारतं सकलं श्रुतम् ।
दानानि बहु दत्तानि पूजिता मुनयस्तथा ॥ ५३ ॥
कृतेन सुकृतेनापि न पिता स्वर्गतिं गतः ।
पावितं न कुलं कृत्स्नं त्वया भूपतिसत्तम ॥ ५४ ॥
देव्याश्चायतनं भूप विस्तीर्णं कुरु भक्तितः ।
येन वै सकला सिद्धिस्तव स्याज्जनमेजय ॥ ५५ ॥
पूजिता परया भक्त्या शिवा सकलदा सदा ।
कुलवृद्धिं करोत्येव राज्यं च सुस्थिरं सदा ॥ ५६ ॥
देवीमखं विधानेन कृत्वा पार्थिवसत्तम ।
श्रीमद्‌भागवतं नाम पुराणं परमं शृणु ॥ ५७ ॥
त्वामहं श्रावयिष्यामि कथां परमपावनीम् ।
संसारतारिणीं दिव्यां नानारससमाहृताम् ॥ ५८ ॥
न श्रोतव्यं परं चास्मात्पुराणाद्विद्यते भुवि ।
नाराध्यं विद्यते राजन्देवीपादाम्बुजादृते ॥ ५९ ॥
ते सभाग्याः कृतप्रज्ञा धन्यास्ते नृपसत्तम ।
येषां चित्ते सदा देवी वसति प्रेमसंकुले ॥ ६० ॥
सुदुःखितास्ते दृश्यन्ते भुवि भारत भारते ।
नाराधिता महामाया यैर्जनैश्च सदाम्बिका ॥ ६१ ॥
ब्रह्मादयः सुराः सर्वे यदाराधनतत्पराः ।
वर्तन्ते सर्वदा राजंस्तां न सेवेत को जनः ॥ ६२ ॥
य इदं शृणुयान्नित्यं सर्वान्कामानवाप्नुयात् ।
भगवत्या समाख्यातं विष्णवे यदनुत्तमम् ॥ ६३ ॥
तेन श्रुतेन ते राजंश्चित्ते शान्तिर्भविष्यति ।
पितॄणां चाक्षयः स्वर्गः पुराणश्रवणाद्‌भवेत् ॥ ६४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
द्वितीयस्कन्धे श्रोतृप्रवक्तृप्रसङ्गो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥


अस्तिक मुनींची जन्मकथा -

राजाचे भाषण ऐकून व्यास म्हणाले, "हे राजा, गुह्य, अदभूत, पवित्र, कल्याणकारक आणि अनेक आख्यानांनी युक्त असे भागवत पुराण मी तुला कथन करतो. तू ऐक. हे मी पूर्वी माझा पुत्र शुक याला पढविले. ते परम रहस्य, मी तुला सांगतो सर्व वेदांचे सार काढून तयार केलेले हे भागवत, सुखावह व शुभफल देणारे आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ त्यामुळे साध्य होतात.

जनमेजय म्हणाला," हे प्रभो, अस्तिक कोणाचा पुत्र ? यज्ञात विघ्न आणायला कसा आला ? हे आपण विस्ताराने सांगा व सर्व पुराणेही सविस्तर कथन करा."

व्यास सांगू लागले, "नित्य शांतचित्त असलेला जगतकारु मुनी अविवाहितच राहिला असता. पण एकदा वनात एका खड्ड्यात लोंबत असलेले त्यांचे पूर्वज त्याला म्हणाले," हे पुत्रा, तू विवाह केला नाहीस तर वंश वाढणार नाही. त्याशिवाय आम्हाला स्वर्ग मिळणार नाही. यास्तव तू विवाह कर."

माझ्याच नावाची कन्या, याचना न करता मला मिळाली तरच मी विवाह करीन." असे म्हणून जरतकारु तीर्थयात्रा करु लागला. इकडे त्याचवेळी मातेने भुजंगांना ‘तुम्ही अग्नीत पडाल’ असा शाप दिला तो इतिहास असा.

कश्यप मुनीला कदू व विनता नावाच्या भार्या होत्या. एक दिवस सूर्याच्या रथाचा अश्व पाहू कद्रू विनतेला म्हणाली,"हा अश्व कोणत्या रंगाचा आहे ते सांग.

विनता म्हणाली "हा अश्व श्वेतवर्णी आहे. तुझे काय मत आहे? यावर आपण पण लावू."

कद्रू म्हणाली, "हे सुहास्यवदने, हा अश्व कृष्णवर्णाचा आहे. ज्याचे म्हणणे खोटे होईल त्याने दासी व्हावे. असा पण लावू."

इतके सांगून कद्रू आपल्या सर्परुपी पुत्रांना म्हणाली, "हे पुत्रांनो, त्या अश्वाच्या शरीरावरील सर्व केस तुम्ही कृष्णवर्णाचे करा." तिच्या या म्हणण्याला ज्यांनी नकार दिला, त्यांना मातेने शाप दिला,"तुम्ही जनमेजयाच्या सर्पयज्ञात अग्नीत पडाल." तेव्हा इतर सर्व अनेकवर्णी पुत्रांनी अश्वाचे पुच्छ वेढून टाकले व त्याचा वर्ण काळा केला. नंतर दोघी बहिणी पुन: अश्व पाहण्यास गेल्या, पण अश्वाचा वर्ण बराचसा कृष्ण असल्याचे पाहताच विनितेला दु:ख झाले. तेव्हा भुजंग भक्षण करणारा गरुड तेथे आला व तिची दयनीय अवस्था पाहून म्हणाला, "हे माते, तू का रोदन करीत आहेस? मी आणि तुझा दुसरा सूर्याचा सारथी असलेला पुत्र अरुण जिवंत असताना, ज्याअर्थी माते तुला दु:ख होत आहे त्या अर्थी आमचा धिक्कार असो. मातेला दु:ख असेल तर आमच्या जन्माचा काय उपयोग? म्हणून तू चिंतेचे कारण सत्वर सांग. मी तुझी काळजी दूर करतो."

विनता म्हणाली, "मी पराजित झाल्याने सक्तीची दासी झाले आहे. त्यामुळे मला दु:ख होत आहे. ती मला म्हणती आहे, "मला घेऊन जा." गरुड म्हणाला, "तर मग तिला जिकडे जाण्याची इच्छा असेल, तिकडे मी घेऊन जाईन. तू शोक करु नकोस." असे सांगताच विनिता कद्रूकडे गेली. गरुडाने कद्रूच्या इच्छेप्रमाणे तिच्या सर्व पुत्रांसह उड्डाण करुन समुद्रापलीकडे नेले व तो कद्रूला म्हणाला, "हे माते, तुला नमस्कार असो. माझी माता दास्यमुक्त कशी होईल ते सत्वर सांग." कद्रू म्हणाली, "हे पुत्रा, तू देवलोकातून अमृत आणून माझ्या पुत्रांना दे म्हणजे आजच तुझी माता दास्यमुक्त होईल.

कद्रूचे बोलणे ऐकून महाप्रतापी गरुड इंद्रलोकी गेला व युद्ध करुन तेथून अमृतकुंभ घेऊन आला. आपल्या सावत्र आईला ते अर्पण केले व विनता मातेला दास्यमुक्त केले. इकडे सर्व सर्प स्नानाला गेले असता इंद्राने ते हरण केले. पण गरुडाच्या सामर्थ्यामुळे विनता दास्यातून मुक्त झाली. अमृत कुंभातील दर्भावर सांडलेले काही थेंब सर्पानी चाटले. त्यामुळे त्यांच्या जिव्हा फाटून ते द्विजिव्ह झाले. इकडे वासुकी प्रभृति नागांना मातेने शाप दिल्यामुळे ते ब्रह्मदेवाला शरण गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले, "जरत्कारु नावाच्या ऋषीला त्याच नावाची असलेली वासुकीची बहिण अर्पण करा. तिच्या पोटी अस्तिक मुनी जन्माला येईल व तुमचे संरक्षण करील."

हे ऐकून सर्व नाग स्वस्थानी गेले. वासुकीने आपली बहिण जरत्कारुला दिली. पण दोघांचीही एकच नावे असल्याने मुनी म्हणाला,"जेव्हा हिच्या हातून मला अप्रिय असलेले कृत्य घडेल तेव्हा मी हिचा त्याग करीन." असे स्पष्ट सांगितल्यावर, दोघांचा विवाह झाला. वासुकी निघून गेला. तो नंतर एका विशाल वनात जरत्कारुने आपली पर्णकुटी बांधली आणि पत्‍नीसह तो क्रीडा करीत सुखाने राहू लागला. एकदा मुनीश्रेष्ठ आपल्या पत्‍नीस म्हणाला, "कुठल्याही परिस्थितीत मला तू जागृत करु नकोस." असे सांगून तो निद्राधीन झाला.

त्याच वेळी संध्यासमय झाला. जरत्कारुने विचार केला, "आता यांना उठवावे तर ते आपला त्याग करणार, न उठवावे तर धर्मकृत्ये केल्याविना संध्याकाळ व्यर्थ जाणार ! पण धर्मलोप होण्यापेक्षा त्यागच काय, पण मरणही चालेल. कारण धर्महानिमुळे नरक प्राप्त होणार. असा त्या साध्वीने विचार करुन ती म्हणाली, "हे सुव्रत उठा, संध्याकाळ झाली." त्याबरोबर मुनी क्रोधायमान होऊन उठला व त्वेषाने म्हणाला, "तू माझ्या निद्रेचा भंग केलास. मी निघून जातो. तू भावाच्या घरी जा." ती म्हणाली की, "महाराज ज्या शुभकार्यासाठी भावाने मला आपणास अर्पण केली ते कार्य कसे होणार ? तेव्हा मुनीश्वर विचारपूर्वक म्हणाला, "ते कार्य घडले आहे."

तो तिचा त्याग करुन निघून गेला. ती वासुकीच्या घरी परत गेली. कार्याविषयी भावाने विचारले, तेव्हा मुनीने, "आहे" म्हणून सांगितले आहे, असे तिने उत्तर दिले. तेव्हा मुनी सत्यवचनी आहे म्हणून वासुकीने विश्वास ठेवून भगिनीला आधार दिला.

पुढे योग्य समय प्राप्त होताच तिच्यापोटी एक सुंदर मुनिपुत्र जन्माला आला. तोच प्रसिद्ध अस्तिक होय.

"जनमेजया, त्या जितेंद्रिय मुनीनेच मातृवंशाच्या रक्षणासाठी तुझा यज्ञ थांबविला आहे. त्या यथावार कुलातील मुनीला तू मान दिलास, हे फार उत्तम झाले. मूनींचे पूजन केलेस, पण तरीही तुझ्या पित्याला स्वर्गप्राप्ती झाली व तुझ्या हातून सर्व कुल पवित्र झाले नाही. म्हणून भूपेंद्रा, श्रद्धापूर्वक देवीचे मोठे मंदिर बांध म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सदासर्वदा त्या कल्याणीचे स्तवन केले की कुलवृद्धी होईल. राज्यही स्थिर होईल. म्हणून तू विधीपूर्वक देवीयज्ञ कर. तू श्रीमदभागवत नावाचे सर्वोत्तम पुराण श्रवण कर. ते अत्यंत पवित्र, भवसागर तरुन नेणारे, सर्व रस युक्त, अशा कथा मी तुला सांगतो.

ह्या कथेपेक्षा दुसरे श्रवणास योग्य असे काही नाही. देवीशिवाय काहीही श्रेष्ठ नाही. ज्याच्या चित्तात सदा देवीचे वास्तव्य असते तेच खरे भाग्यवान, ज्ञानी व धन्य होत. जे महामाया अंबिकेचे पूजन करीत नाहीत, ते सदा दु:खी असतात. भगवती देवीने विष्णूला कथन केलेले भागवत जो श्रवण करतो, त्याची इच्छा पूर्ण होते. म्हणून त्याच्या श्रवणाने तुझ्या पूर्वजांना चिरंतन स्वर्गप्राप्ती होईल.



अध्याय बारावा समाप्त

GO TOP