श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
द्वादशः स्कन्धः
नवमोऽध्यायः


ब्राह्मणादीनां गायत्रीभिन्नान्यदेवोपासनाश्रद्धाहेतुनिरूपणम्

व्यास उवाच
कदाचिदथ काले तु दशपञ्चसमा विभो ।
प्राणिनां कर्मवशतो न ववर्ष शतक्रतुः ॥ १ ॥
अनावृष्ट्यातिदुर्भिक्षमभवत्क्षयकारकम् ।
गहे गृहे शवानां तु संख्या कर्तुं न शक्यते ॥ २ ॥
केचिदश्वान्वराहान्वा भक्षयन्ति क्षुधार्दिताः ।
शवानि च मनुष्याणां भक्षयन्त्यपरे जनाः ॥ ३ ॥
बालकं बालजननी स्त्रियं पुरुष एव च ।
भक्षितुं चलिताः सर्वे क्षुधया पीडिता नराः ॥ ४ ॥
ब्राह्मणा बहवस्तत्र विचारं चक्रुरुत्तमम् ।
तपोधनो गौतमोऽस्ति स नः खेदं हरिष्यति ॥ ५ ॥
सर्वैर्मिलित्वा गन्तव्यं गौतमस्याश्रमेऽधुना ।
गायत्रीजपसंसक्तगौतमस्याश्रमेऽधुना ॥ ६ ॥
सुभिक्षं श्रूयते तत्र प्राणिनो बहवो गताः ।
एवं विमृश्य भूदेवाः साग्निहोत्राः कुटुम्बिनः ॥ ७ ॥
सगोधनाः सदासाश्च गौतमस्याश्रमं ययुः ।
पूर्वदेशाद्ययुः केचित्केचिद्दक्षिणदेशतः ॥ ८ ॥
पाश्चात्या औत्तराहाश्च नानादिग्भ्यः समाययुः ।
दृष्ट्वा समाजं विप्राणां प्रणनाम स गौतमः ॥ ९ ॥
आसनाद्युपचारैश्च पूजयामास वाडवान् ।
चकार कुशलप्रश्नं ततश्चागमकारणम् ॥ १० ॥
ते सर्वे स्वस्ववृत्तान्तं कथयामासुरुत्स्मयाः ।
दृष्ट्वा तान्दुःखितान्विप्रानभयं दत्तवान्मुनिः ॥ ११ ॥
युष्माकमेतत्सदनं भवद्दासोऽस्मि सर्वथा ।
का चिन्ता भवतां विप्रा मयि दासे विराजति ॥ १२ ॥
धन्योऽहमस्मिन्समये यूयं सर्वे तपोधनाः ।
येषां दर्शनमात्रेण दुष्कृतं सुकृतायते ॥ १३ ॥
ते सर्वे पादरजसा पावयन्ति गृहं मम ।
को मदन्यो भवेद्‌धन्यो भवतां समनुग्रहात् ॥ १४ ॥
स्थेयं सर्वैः सुखेनैव सन्ध्याजपपरायणैः ।
व्यास उवाच
इति सर्वान्ममाश्वास्य गौतमो मुनिराट् ततः ॥ १५ ॥
गायत्रीं प्रार्थयामास भक्तिसन्नतकन्धरः ।
नमो देवि महाविद्ये वेदमातः परात्परे ॥ १६ ॥
व्याहृत्यादिमहामन्त्ररूपे प्रणवरूपिणि ।
साम्यावस्थात्मिके मातर्नमो ह्रींकाररूपिणि ॥ १७ ॥
स्वाहास्वधास्वरूपे त्वां नमामि सकलार्थदाम् ।
भक्तकल्पलतां देवीमवस्थात्रयसाक्षिणीम् ॥ १८ ॥
तुर्यातीतस्वरूपां च सच्चिदानन्दरूपिणीम् ।
सर्ववेदान्तसंवेद्यां सूर्यमण्डलवासिनीम् ॥ १९ ॥
प्रातर्बालां रक्तवर्णां मध्याह्ने युवतीं पराम् ।
सायाह्ने कृष्णवर्णां तां वृद्धां नित्यं नमाम्यहम् ॥ २० ॥
सर्वभूतारणे देवि क्षमस्व परमेश्वरि ।
इति स्तुता जगन्माता प्रत्यक्षं दर्शनं ददौ ॥ २१ ॥
पूर्णपात्रं ददौ तस्मै येन स्यात्सर्वपोषणम् ।
उवाच मुनिमम्बा सा यं यं कामं त्वमिच्छसि ॥ २२ ॥
तस्य पूर्तिकरं पात्रं मया दत्तं भविष्यति ।
इत्युक्त्वान्तर्दधे देवी गायत्री परमा कला ॥ २३ ॥
अन्नानां राशयस्तस्मानिर्गताः पर्वतोपमाः ।
षड्रसा विविधा राजंस्तृणानि विविधानि च ॥ २४ ॥
भूषणानि च दिव्यानि क्षौमानि वसनानि च ।
यज्ञानां च समारम्भाः पात्राणि विविधानि च ॥ २५ ॥
यद्यदिष्टमभूद्‌राजन् मुनेस्तस्य महात्मनः ।
तत्सर्वं निर्गतं तस्माद्‌गायत्रीपूर्णपात्रतः ॥ २६ ॥
अथाहूय मुनीन्सर्वान्मुनिराड् गौतमस्तदा ।
धनं धान्यं भूषणानि वसनानि ददौ मुदा ॥ २७ ॥
गोमहिष्यादिपशवो निर्गताः पूर्णपात्रतः ।
निर्गतान्यज्ञसम्भारान्स्रुक्स्रुवप्रभृतीन्ददौ ॥ २८ ॥
ते सर्वे मिलिता यज्ञांश्चक्रिरे मुनिवाक्यतः ।
स्थानं तदेव भूयिष्ठमभवत्स्वर्गसन्निभम् ॥ २९ ॥
यत्किञ्चित् त्रिषु लोकेषु सुन्दरं वस्तु दृश्यते ।
तत्सर्वं तत्र निष्पन्नं गायत्रीदत्तपात्रतः ॥ ३० ॥
देवाङ्‌गनासमा दाराः शोभन्ते भूषणादिभिः ।
मुनयो देवसदृशा वस्त्रचन्दनभूषणैः ॥ ३१ ॥
नित्योत्सवः प्रववृते मुनेराश्रममण्डले ।
न रोगादिभयं किञ्चिन्न च दैत्यभयं क्वचित् ॥ ३२ ॥
स मुनेराश्रमो जातः समन्ताच्छतयोजनः ।
अन्ये च प्राणिनो येऽपि तेऽपि तत्र समागताः ॥ ३३ ॥
तांश्च सर्वान्पुपोषायं दत्त्वाभयमथात्मवान् ।
नानाविधैर्महायज्ञैर्विधिवत्कल्पितैः सुराः ॥ ३४ ॥
सन्तोषं परमं प्रापुर्मुनेश्चैव जगुर्यशः ।
सभायां वृत्रहा भूयो जगौ श्लोकं महायशाः ॥ ३५ ॥
अहो अयं नः किल कल्पपादपो
मनोरथान्पूरयति प्रतिष्ठितः ।
नोचेदकाण्डे क्व हविर्वपा वा
सुदुर्लभा यत्र तु जीवनाशा ॥ ३६ ॥
इत्थं द्वादशवर्षाणि पुपोष मुनिपुङ्‌गवान् ।
पुत्रवन्मुनिराड् गर्वगन्धेन परिवर्जितः ॥ ३७ ॥
गायत्र्याः परमं स्थानं चकार मुनिसत्तमः ।
यत्र सर्वैर्मुनिवरैः पूज्यते जगदम्बिका ॥ ३८ ॥
त्रिकालं परया भक्त्या पुरश्चरणकर्मभिः ।
अद्यापि यत्र देवी सा प्रातर्बाला तु दृश्यते ॥ ३९ ॥
मध्याह्ने युवती वृद्धा सायंकाले तु दृश्यते ।
तत्रैकदा समायातो नारदो मुनिसत्तमः ॥ ४० ॥
रणयन्महतीं गायन्गायत्र्याः परमान्गुणान् ।
निषसाद सभामध्ये मुनीनां भावितात्मनाम् ॥ ४१ ॥
गौतमादिभिरत्युच्चैः पूजितः शान्तमानसः ।
कथाश्चकार विविधा यशसो गौतमस्य च ॥ ४२ ॥
ब्रह्मर्षे देवसदसि देवराट् तव यद्यशः ।
जगौ बहुविधं स्वच्छं मुनिपोषणजं परम् ॥ ४३ ॥
श्रुत्वा शचीपतेर्वाणीं त्वां द्रष्टुमहमागतः ।
धन्योऽसि त्वं मुनिश्रेष्ठ जगदम्बाप्रसादतः ॥ ४४ ॥
इत्युक्त्वा मुनिवर्यं तं गायत्रीसदनं ययौ ।
ददर्श जगदम्बां तां प्रेमोत्फुल्लविलोचनः ॥ ४५ ॥
तुष्टाव विधिवद्देवीं जगाम त्रिदिवं पुनः ।
अथ तत्र स्थिता ये ते ब्राह्मणा मुनिपोषिताः ॥ ४६ ॥
उत्कर्षं तु मुनेः श्रुत्वासूयया खेदमागताः ।
यथास्य न यशो भूयात्कर्तव्यं सर्वथैव हि ॥ ४७ ॥
काले समागते पश्चादिति सर्वैस्तु निश्चितम् ।
ततः कालेन कियताप्यभूद्‌वृष्टिर्धरातले ॥ ४८ ॥
सुभिक्षमभवत्सर्वदेशेषु नृपसत्तम ।
श्रुत्वा वार्तां सुभिक्षस्य मिलिताः सर्ववाडवाः ॥ ४९ ॥
गौतमं शप्तुमुद्योगं हा हा राजन् प्रचक्रिरे ।
धन्यौ तेषां च पितरौ ययोरुत्पत्तिरीदृशी ॥ ५० ॥
कालस्य महिमा राजन् वक्तुं केन हि शक्यते ।
गौर्निर्मिता माययैका मुमूर्षुर्जरती नृप ॥ ५१ ॥
जगाम सा च शालायां होमकाले मुनेस्तदा ।
हुंहुंशब्दैर्वारिता सा प्राणांस्तत्याज तत्क्षणे ॥ ५२ ॥
गौर्हतानेन दुष्टेनेत्येवं ते चुक्रुशुर्द्विजाः ।
होमं समाप्य मुनिराङ्‌ विस्मयं परमं गतः ॥ ५३ ॥
समाधिमीलिताक्षः संश्चिन्तयामास कारणम् ।
कृतं सर्वं द्विजैरेतदिति ज्ञात्वा तदैव सः ॥ ५४ ॥
दधार कोपं परमं प्रलये रुद्रकोपवत् ।
शशाप च ऋषीन्सर्वान्कोपसंरक्तलोचनः ॥ ५५ ॥
वेदमातरि गायत्र्यां तद्ध्याने तन्मनोर्जपे ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वथा ब्राह्मणाधमाः ॥ ५६ ॥
वेदे वेदोक्तयज्ञेषु तद्वार्तासु तथैव च ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ५७ ॥
शिवे शिवस्य मन्त्रे च शिवशास्त्रे तथैव च ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ५८ ॥
मूलप्रकृत्याः श्रीदेव्यास्तद्ध्याने तत्कथासु च ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ५९ ॥
देवीमन्त्रे तथा देव्याः स्थानेऽनुष्ठानकर्मणि ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ६० ॥
देव्युत्सवदिदृक्षायां देवीनामानुकीर्तने ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ६१ ॥
देवीभक्तस्य सान्निध्ये देवीभक्तार्चने तथा ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ६२ ॥
शिवोत्सवदिदृक्षायां शिवभक्तस्य पूजने ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ६३ ॥
रुद्राक्षं बिल्वपत्रे च तथा शुद्धे च भस्मनि ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ६४ ॥
श्रौतस्मार्तसदाचारे ज्ञानमार्गे तथैव च ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ६५ ॥
अद्वैतज्ञाननिष्ठायां शान्तिदान्त्यादिसाधने ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ६६ ॥
नित्यकर्माद्यनुष्ठानेऽप्यग्निहोत्रादिसाधने ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ६७ ॥
स्वाध्यायाध्ययने चैव तथा प्रवचनेऽपि च ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ६८ ॥
गोदानादिषु दानेषु पितृश्राद्धेषु चैव हि ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ६९ ॥
कृच्छ्रचान्द्रायणे चैव प्रायश्चित्ते तथैव च ।
भवतानुन्मुखा यूयं सर्वदा ब्राह्मणाधमाः ॥ ७० ॥
श्रीदेवीभिन्नदेवेषु श्रद्धाभक्तिसमन्विताः ।
शङ्‌खचक्राद्यङ्‌किताश्च भवत ब्राह्मणाधमाः ॥ ७१ ॥
कापालिकमतासक्ता बौद्धशास्त्ररताः सदा ।
पाखण्डाचारनिरता भवत ब्राह्मणाधमाः ॥ ७२ ॥
पितृमातृसुताभ्रातृकन्याविक्रयिणस्तथा ।
भार्याविकयिणस्तद्वद्‍भवत ब्राह्मणाधमाः ॥ ७३ ॥
वेदविक्रयिणस्तद्वत्तीर्थविक्रयिणस्तथा ।
धर्मविक्रयिणस्तद्वद्‍भवत ब्राह्मणाधमाः ॥ ७४ ॥
पाञ्चरात्रे कामशास्त्रे तथा कापालिके मते ।
बौद्धे श्रद्धायुता यूयं भवत ब्राह्मणाधमाः ॥ ७५ ॥
मातृकन्यागामिनश्च भगिनीगामिनस्तथा ।
परस्त्रीलम्पटाः सर्वे भवत ब्राह्मणाधमाः ॥ ७६ ॥
युष्माकं वंशजाताश्च स्त्रियश्च पुरुषास्तथा ।
मद्दत्तशापदग्धास्ते भविष्यन्ति भवत्समाः ॥ ७७ ॥
किं मया बहुनोक्तेन मूलप्रकृतिरीश्वरी ।
गायत्री परमा भूयाद्युष्मासु खलु कोपिता ॥ ७८ ॥
अन्धकूपादिकुण्डेषु युष्माकं स्यात्सदा स्थितिः ।
व्यास उवाच
वाग्दण्डमीदृशं कृत्वाप्युपस्पृश्य जलं ततः ॥ ७९ ॥
जगाम दर्शनार्थं च गायत्र्याः परमोस्तुकः ।
प्रणनाम महादेवीं सापि देवी परात्परा ॥ ८० ॥
ब्राह्मणानां कृतिं दृष्ट्वा स्मयं चित्ते चकार ह ।
अद्यापि तस्या वदनं स्मययुक्तं च दृश्यते ॥ ८१ ॥
उवाच मुनिवर्यं तं स्मयमानमुखाम्बुजा ।
भुजङ्‌गायार्पितं दुग्धं विषायैवोपजायते ॥ ८२ ॥
शान्तिं कुरु महाभाग कर्मणो गतिरीदृशी ।
इति देवीं प्रणम्याथ ततोऽगात्स्वाश्रमं प्रति ॥ ८३ ॥
ततो विप्रैः शापदग्धैर्विस्मृता वेदराशयः ।
गायत्री विस्मृता सर्वैस्तदद्‌भुतमिवाभवत् ॥ ८४ ॥
ते सर्वेऽथ मिलित्वा तु पश्चात्तापयुतास्तथा ।
प्रणेमुर्मुनिवर्यं तं दण्डवत्पतिता भुवि ॥ ८५ ॥
नोचुः किञ्चन वाक्यं तु लज्जयाधोमुखाः स्थिताः ।
प्रसीदेति प्रसीदेति प्रसीदेति पुनः पुनः ॥ ८६ ॥
प्रार्थयामासुरभितः परिवार्य मुनीश्वरम् ।
करुणापूर्णहृदयो मुनिस्तान्समुवाच ह ॥ ८७ ॥
कृष्णावतारपर्यन्तं कुम्भीपाके भवेत्स्थितिः ।
न मे वाक्यं मृषा भूयादिति जानीथ सर्वथा ॥ ८८ ॥
ततः परं कलियुगे भुवि जन्म भवेद्धि वाम् ।
मदुक्तं सर्वमेतत्तु भवेदेव न चान्यथा ॥ ८९ ॥
मच्छापस्य विमोक्षार्थं युष्माकं स्याद्यदीषणा ।
तर्हि सेव्यं सदा सर्वैर्गायत्रीपदपङ्‌कजम् ॥ ९० ॥
व्यास उवाच
इति सर्वान्विसृज्याथ गौतमो मुनिसत्तमः ।
प्रारब्धामिति मत्वा तु चित्ते शान्तिं जगाम ह ॥ ९१ ॥
एतस्मात्कारणाद्‌राजन् गते कृष्णे तु धीमति ।
कलौ युगे प्रवृत्ते तु कुम्भीपाकात्तु निर्गताः ॥ ९२ ॥
भुवि जाता ब्राह्मणाश्च शापदग्धाः पुरा तु ये ।
सन्ध्यात्रयविहीनाश्च गायत्रीभक्तिवर्जिताः ॥ ९३ ॥
वेदभक्तिविहीनाश्च पाखण्डमतगामिनः ।
अग्निहोत्रादिसत्कर्मस्वधास्वाहाविवर्जिताः ॥ ९४ ॥
मूलप्रकृतिमव्यक्तां नैव जानन्ति कर्हिचित् ।
तप्तमुद्राङ्‌किताः केचित्कामाचाररताः परे ॥ ९५ ॥
कापालिकाः कौलिकाश्च बौद्धा जैनास्तथापरे ।
पण्डिता अपि ते सर्वे दुराचारप्रवर्तकाः ॥ ९६ ॥
लम्पटाः परदारेषु दुराचारपरायणाः ।
कुम्भीपाकं पुनः सर्वे यास्यन्ति निजकर्मभिः ॥ ९७ ॥
तस्मात्सर्वात्मना राजन् संसेव्या परमेश्वरी ।
न विष्णूपासना नित्या न शिवोपासना तथा ॥ ९८ ॥
नित्या चोपासना शक्तेर्यां विना तु पतत्यधः ।
सर्वमुक्तं समासेन यत्पृष्टं तत्त्वयानघ ॥ ९९ ॥
अतः परं मणिद्वीपवर्णनं शृणु सुन्दरम् ।
यत्परं स्थानमाद्याया भुवनेश्या भवारणेः ॥ १०० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां द्वादशस्कन्धे ब्राह्मणादीनां
गायत्रीभिन्नान्यदेवोपासनाश्रद्धाहेतुनिरूपणं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥


गौतमाचा शाप

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास म्हणाले, ''हे प्रभो, काही कालानंतर प्राण्यांच्या कर्मामुळे इंद्राने वृष्टी केली नाही. त्यामुळे अनावर दुष्काळ पडला. घरोघर प्रेते साचू लागली. क्षुधेने व्याकुल झालेले लोक घोडे व डुकरे भक्षण करू लागले. इतकेच नव्हे तर माणसांची प्रेतेही ते खाऊ लागले. बालास माता, स्त्रीला पुरुष असे एकमेकांस भक्षण करू लागले. तेव्हा सर्व ब्राह्मणश्रेष्ठांनी विचार केला.''

'जो अत्यंत तपोनिष्ठ आहे असा गौतम ब्राह्मण आमचे दुःख नाहीसे करील. म्हणून सर्वांनी त्याच्या आश्रमात जावे. तो गायत्रीमंत्रतत्पर असून सांप्रत फक्त तेथेच सुकाळ आहे.'

असा विचार करून ब्राह्मण आपला परिवार घेऊन गौतमाश्रमात गेले. पूर्व, दक्षिण, पाश्चात्य, उदीच्च इत्यादी सर्व देशांतून प्राणी तेथे येऊन राहिले. इतक्या विप्रांना पाहून गौतमाने नमस्कार केला, विविध उपचारांनी त्यांचे पूजन केले व त्यांना आगमनाचे कारण विचारले. तेव्हा ब्राह्मणांनी सर्व वृत्तांत गौतमास सांगितला. ते ऐकून गौतम ऋषी म्हणाले, ''हे आपलेच घर समजा. मी आपला दास आहे. मी जिवंत असताना आपणाला चिंता करण्याचे कारण नाही. खरोखर सर्वांच्या दर्शनाने पुण्य प्राप्त झाल्यामुळे मी आज धन्य आहे. आपला मजवर अनुग्रहच झाला आहे. आपण संध्या-जप-तत्पर होऊन खुशाल येथे राहावे.''

अशारीतीने सर्वांचा आदर करून नतमस्तक होऊन मुनीने गायत्रीची प्रार्थना केली - '' हे देवी, हे महाविद्ये, हे वेदमाते, हे गायत्री, तुला नमस्कार असो. हे व्याहृतीमंत्ररूपिणी, हे ऱ्हींकाररूपिणी, तुला नमस्कार असो. हे स्वहा स्वधारुपे तुला नमस्कार असो, हे तिन्ही अवस्थांच्या साक्षी, हे तुर्यावस्थेहून भिन्नरूप, तू सूर्यमंडलात राहणारी आहेस. तू प्रातःकाली बालरूपी रक्तवर्णा, मध्यान्हसमयी तरुणी, संध्याकाली कृष्णवर्णा वृद्धा होतेस, अशा तुला नमस्कार असो. हे सर्व भूतांच्या अरणीत असणार्‍या देवी, मला क्षमा कर.''

असे म्हणून ऋषीने देवीची स्तुती केली. तेव्हा देवीने प्रत्यक्ष दर्शन दिले व सर्वांचे पोषण होणारे पात्र त्याला अर्पण केले. ती अंबा मुनीला म्हणाली, ''तुझी इच्छा पूर्ण करणारे हे पात्र तू घे.''

असे म्हणून श्रेष्ठ कला देवी गायत्री गुप्त झाली. त्या पात्रातून पर्वतप्राय अन्नराशी उत्पन्न झाल्या. षड्रस, तृणे, भूषणे, वस्त्रे, यज्ञसाहित्य, विविध पात्रे असे सर्व आवश्यक ते त्यातून निर्माण झाले. तेव्हा मुनीने सर्वांना बोलावून ते सर्व दिले. गाई, महिषी हे पशूही त्या पूर्णपात्रातून उत्पन्न झाले. स्रुक व स्रुवा हे यज्ञसंभार त्याने ब्राह्मणांना दिले. मुनीच्या आज्ञेने सर्वांनी यज्ञ केला. तेव्हा ते स्थान स्वर्गाप्रमाणे झाले.

त्रैलोक्यात आढळणारी प्रत्येक सुंदर वस्तु ही त्या गायत्रीच्या पूर्णपात्रातून उत्पन्न झाली आहे. सर्व स्त्रिया भूषणांनी विभूषित झाल्या. मुनी देवांप्रमाणे भासू लागले. त्या मुनीच्या आश्रमात नित्य उत्सवच सुरू झाला. रोग व दैत्य यांचे भय नष्ट झाले. तो आश्रम शंभर योजने विस्तृत होता. पण तो स्वतः मात्र आत्मनिष्ठ होऊन राहिला. तेथे विविध यज्ञ झाल्यामुळे देव तृप्त झाले. प्रसन्न होऊन ते मुनीची स्तुती करू लागले.

अशारीतीने निगर्वी गौतममुनीने सर्वांचे बारा वर्षे पालन केले. तेथे त्याने गायत्रीचे श्रेष्ठ स्थानच निर्माण केले. त्या ठिकाणी सर्वजण भक्तीने जगदंबेची पूजा व पुरश्चरणे करू लागले.

एकदा वीणा वाजवीत व गायत्रीचे गुणगान गात नारद तेथे आला व मुनींच्या समवेत बसला. सर्वांनी अत्यादराने त्याची सेवा केली. तेव्हा गौतमाची तो स्तुती करू लागला. तो म्हणाला, ''हे ब्रह्मर्षे, देवसभेत देवेंद्राने तुझी स्तुती केली. तुझे यश ऐकून तुला पाहण्यासाठी मी येथे आलो आहे. खरोखरच जगदंबेच्या प्रसादामुळे तू धन्य आहेस.''

असे म्हणून नारद गायत्री मंदिरात गेला. त्याने जगदंबेचे दर्शन घेतले व तिची विधियुक्त स्तुती करून तो देवलोकी गेला.

पुढे तेथे मुनींच्या आश्रयाने राहिलेल्या काही ब्राह्मणांस मुनीचा मत्सर वाटू लागला. त्याला अपयश येईल असे काही तरी करावे असा त्यांनी विचार केला. पुढे बर्‍याच कालाने पृथ्वीवर वृष्टी झाली. सर्वत्र सुभिक्ष झाले. पण सर्व ब्राह्मण मात्र गौतम मुनीला शाप देण्याच्या विचारात होते. त्यांनी मरावयास टेकलेली एक गाय मायेनेच उत्पन्न केली. ती मुनीच्या होमाचे वेळी होमशाळेत गेली. गौतमाने हुं हुं म्हणून तिचे निवारण केले. पण त्याच वेळी गायीने प्राण सोडला. ते पाहून द्विज म्हणाले, '' या ब्राह्मणाने गोहत्या केली.''

तेव्हा मुनीही आश्चर्ययुक्त झाला. त्याने डोळे मिटून ध्यानाने सर्व प्रकार जाणला. त्यामुळे प्रलयकाली रुद्राला जसा क्रोध येतो तसा त्या मुनीला क्रोध आला. त्याचे नेत्र लाल झाले. त्याने हे कृत्य करणारांना शाप दिला. तो म्हणाला, ''हे नीच ब्राह्मणांनो, वेदमाता गायत्री, तिचा जप, मंत्र व ध्यान याविषयी तुम्ही विमुख व्हाल. वेद, वेदोक्त यज्ञ, वेदवार्ता यातही तुम्ही विमुख रहाल. शिव, शिवमंत्र, शास्त्रे तुम्हाला पराङ्मुख होतील. मूलप्रकृती श्रीदेवीचे ध्यान, तिची कथा या तुम्हाला वर्ज्य होतील. देवीमंत्र, तिचे स्थान, अनुष्ठान यात तुम्ही मागे रहाल. देवीचा उत्सव, कीर्तन, देवीभक्ताची संगती, देवीपूजा याविषयी तुम्ही निरुत्साही व्हाल. तुम्हाला शंकराचा उत्सव व भक्ती करण्याची इच्छा होणार नाही. रुद्राक्ष, बिल्वपत्र, भस्म याविषयी तुम्ही विमुख व्हाल. श्रौत, स्मार्त आचार, ज्ञान यावर तुमची श्रद्धा राहणार नाही.

अद्वैत ज्ञान, शम-दम इत्यादि साधने, नित्यकर्म, अनुष्ठाने, अग्निहोमाची साधने, शाखेचे अध्ययन, प्रवचन याबद्दल तुमच्या मनात श्रद्धा राहणार नाही. कृच्छ्रचान्द्रायण, प्रायश्चित्त कर्म याविषयी तुम्ही आदरशून्य व्हाल.

देवीला सोडून तुमची अन्य देवांवर श्रद्धा बसेल. तुम्ही शंखचक्रादिकांनी अंकित व्हाल. कापालिक मतात आसक्त होऊन बौद्धशास्त्रात निमग्न व्हाल. तुम्ही पाखंडी होऊन माता, पिता, कन्या, पुत्र इत्यादीचा विक्रय कराल. इतकेच नव्हे तर तुम्ही भार्येलाही विकाल.

वेदांचा विक्रय, तीर्थांचा व्यापार, धर्मांचा विक्रय तुम्ही कराल. कामशास्त्र, कापालिक मत, बौद्ध भगिनी शास्त्र यावर तुमची श्रद्धा बसेल. तुम्ही माता, कन्या, भगिनी यांच्याशी गमन कराल. तुमच्या वंशात जन्मलेल्या स्त्रिया, पुरुष हेही तुमल्याप्रमाणेच होतील.

पण आता अधिक बोलून काय होणार ? मूलप्रकृती, ईश्वरी, परमात्मा अशी गायत्री तुमच्यावर कुद्ध होईल. अंधकूप वगैरे नरकात तुम्ही सतत राहाल.''

अशाप्रकारे शाप देऊन तो महात्मा गायत्रीच्या दर्शनाला गेला. त्याने तिला वंदन केले. या ब्राह्मणांच्या कृत्यामुळे तीही विस्मित झाली. ती मुनींना म्हणाली, ''भुजंगाला दूध पाजले तरी विषवृद्धीच होते. म्हणून कर्मगती तशी असल्यामुळे तू शांती कर.''

ते ऐकल्यावर देवीला नमस्कार करून गौतममुनी आपल्या आश्रमाकडे आला. इकडे शापामुळे दग्ध होऊन ब्राह्मण वेदविद्या विसरले. त्यांना गायत्री आठवेना. तेव्हा लज्जित होऊन ते नतमस्तक होऊन उभे राहिले.

''प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा.'' असे म्हणून त्यांनी मुनीची प्रार्थना केली. तेव्हा तो कृपाळू मुनी म्हणाला, माझे शब्द असत्य होणार नाहीत. यास्तव कृष्णावतार होईपर्यंत तुम्ही कुंभीपाक नरकात जाल. कलियुगात भूलोकी तुमचा जन्म होईल. तेव्हा मी सांगितलेले सर्व प्रकार घडतील. त्यातून तुमची मुक्तता व्हावी अशी इच्छा असेल तर गायत्रीची सेवा करा.''

प्रारब्ध असे म्हणून व असा विचार करून तो गौतमऋषी शांत झाला. हे जनमेजया, म्हणूनच कृष्ण स्वस्थानी गेल्यावर कलियुगास आरंभ झाला. तेव्हा ते शापदग्ध ब्राह्मण कुंभीपाक नरकातून बाहेर पडून भूलोकी जन्मास आले. ते अव्यक्त अशा मूल प्रकृतीस जाणत नाहीत. कोणी कापालिक म्हणजे मानवी मस्तकांच्या हाडाने खानपानादि व्यवहार करणारे झाले, तर कोणी कौलिक म्हणजे शाक्त झाले. कोणी बौद्ध, कोणी जैन झाले. हे सर्व पंडित असूनही दुराचारी झाले.

परखीलंपट, दुराचारी असे ते कर्मानुसार पुन्हा कुंभिपाक नरकात पडतील. म्हणून परमेश्वरीची सेवा करावी. विष्णु अथवा शिवाची उपासना नित्य नसून शक्तीची उपासना नित्य आहे. तिच्या वाचून पुरुषाची अधोगती होते.

हे निष्पाप, तूर विचारलेस म्हणून तुला हे विस्ताराने सांगितले. आता मूलकारण भुवनेश्वरीच्या उत्कुष्ट मणिद्वीपाचे वर्णन ऐक. अनेक वृक्षजाती तेथे आहेत. फणस, बकुल, लोघ्र, कण्हेर, शिंशप, देवीदास, कांचन, आम्र, सुमेरू, औंट, रानवांगी, लवंगा, रिंगणी, साल, मुचकुंद, वेली, कुंदवृक्ष, ताल, तमाल, कंकोल, नागरमोथा, सुरंगी, पिलुवृक्ष, सार्ज, कर्पूर, अश्वकर्ण, हस्तिकर्ण, तालपर्ण, डाळिंब, गणिका, बंधुजीवा, जंवीर, काटेशेवंती, चाफा, सुवर्णवृक्ष, कालगरुवृक्ष, चंदन, खजूरी, जुई, मारवेल, उरू, चिकाल, खैर, चिंच, बिबवा, एरंड, कुडा, बिल्ववृक्ष, तुलसी, मोगरी इत्यादी वृक्ष-वेली तेथे आहेत.''



अध्याय नववा समाप्त

GO TOP