श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
अष्टादशोऽध्यायः


शङ्‌खचूडेन सह तुलस्याः सङ्‌गतिवर्णनम्

नारायण उवाच
तुलसी परितुष्टा च सुष्वाप हृष्टमानसा ।
नवयौवनसम्पन्ना वृषध्वजवराङ्‌गना ॥ १ ॥
चिक्षेप पञ्चबाणश्च पञ्चबाणांश्च तां प्रति ।
पुष्पायुधेन सा दग्धा पुष्पचन्दनचर्चिता ॥ २ ॥
पुलकाङ्‌कितसर्वाङ्‌गी कम्पितारक्तलोचना ।
क्षणं सा शुष्कतां प्राप क्षणं मूर्च्छामवाप ह ॥ ३ ॥
क्षणमुद्विग्नतां प्राप क्षणं तन्द्रां सुखावहाम् ।
क्षणं च दहनं प्राप क्षणं प्राप प्रसन्नताम् ॥ ४ ॥
क्षणं सा चेतनां प्राप क्षणं प्राप विषण्णताम् ।
उत्तिष्ठन्ती क्षणं तल्पाद्‌ गच्छन्ती निकटे क्षणम् ॥ ५ ॥
भ्रमन्ती क्षणमुद्वेगान्निवसन्ती क्षणं पुनः ।
क्षणमेव समुद्वेगात्सुष्वाप पुनरेव सा ॥ ६ ॥
पुष्पचन्दनतल्पं च तद्‌ बभूवातिकण्टकम् ।
विषहारि सुखं दिव्यं सुन्दरं च फलं जलम् ॥ ७ ॥
निलयं च बिलाकारं सूक्ष्मवस्त्रं हुताशनः ।
सिन्दूरपत्रकं चैव व्रणतुल्यं च दुःखदम् ॥ ८ ॥
क्षणं ददर्श तन्द्रायां सुवेषं पुरुषं सती ।
सुन्दरं च युवानं च सस्मितं रसिकेश्वरम् ॥ ९ ॥
चन्दनोक्षितसर्वाङ्‌गं रत्‍नभूषणभूषितम् ।
आगच्छन्तं माल्यवन्तं पिबन्तं तन्मुखाम्बुजम् ॥ १० ॥
कथयन्तं रतिकथां ब्रुवन्तं मधुरं मुहुः ।
सम्भुक्तवन्तं तल्पे च समाश्लिष्यन्तमीप्सितम् ॥ ११ ॥
पुनरेव तु गच्छन्तमागच्छन्तं च सन्निधौ ।
यान्तं क्व यासि प्राणेश तिष्ठत्येवमुवाच सा ॥ १२ ॥
पुनश्च चेतनां प्राप्य विललाप पुनः पुनः ।
एवं सा यौवनं प्राप्य तस्थौ तत्रैव नारद ॥ १३ ॥
शङ्‌खचूडो महायोगी जैगीषव्यान्मनोहरम् ।
कृष्णमन्त्रं च सम्प्राप्य कृत्वा सिद्धं तु पुष्करे ॥ १४ ॥
कवचं च गले बद्ध्वा सर्वमङ्‌गलमङ्‌गलम् ।
ब्रह्मणश्च वरं प्राप्य यत्ते मनसि वाञ्छितम् ॥ १५ ॥
आज्ञया ब्रह्मणः सोऽपि बदरीं च समाययौ ।
आगच्छन्तं शङ्‌खचूडं ददर्श तुलसी मुने ॥ १६ ॥
नवयौवनसम्पन्नं कामदेवसमप्रभम् ।
श्वेतचम्पकवर्णाभं रत्‍नभूषणभूषितम् ॥ १७ ॥
शरत्पार्वणचन्द्रास्यं शरत्पङ्‌कजलोचनम् ।
रत्‍नसारविनिर्माणविमानस्थं मनोहरम् ॥ १८ ॥
रत्‍नकुण्डलयुग्मेन गण्डस्थलविराजितम् ।
पारिजातप्रसूनानां मालावन्तं च सुस्मितम् ॥ १९ ॥
कस्तूरीकुङ्‌कुमायुक्तं सुगन्धिचन्दनान्वितम् ।
सा दृष्ट्वा सन्निधावेनं मुखमाच्छाद्य वाससा ॥ २० ॥
सस्मिता तं निरीक्षन्ती सकटाक्षं पुनः पुनः ।
बभूवातिनम्रमुखी नवसङ्‌गमलज्जिता ॥ २१ ॥
शरदिन्दुविनिन्द्यैकस्वमुखेन्दुविराजिता ।
अमूल्यरत्‍ननिर्माणयावकावलिसंयुता ॥ २२ ॥
मणीन्द्रसारनिर्माणक्वणन्मञ्जीररञ्जिता ।
दधती कबरीभारं मालतीमाल्यसंयुतम् ॥ २३ ॥
अमूल्यरत्‍ननिर्माणमकराकृतिकुण्डला ।
चित्रकुण्डलयुग्मेन गण्डस्थलविराजिता ॥ २४ ॥
रत्‍नेन्द्रसारहारेण स्तनमध्यस्थलोज्ज्वला ।
रत्‍नकङ्‌कणकेयूरशङ्‌खभूषणभूषिता ॥ २५ ॥
रत्‍नाङ्‌गुलीयकैर्दिव्यैरङ्‌गुल्यावलिराजिता ।
दृष्ट्वा तां ललितां रम्यां सुशीलां सुन्दरीं सतीम् ॥ २६ ॥
उवास तत्समीपे तु मधुरं तामुवाच सः ।
शङ्खचूड उवाच
का त्वं कस्य च कन्या च धन्या मान्या च योषिताम् ॥ २७ ॥
का त्वं मानिनि कल्याणि सर्वकल्याणदायिनि ।
मौनीभूते किङ्‌करे मां सम्भाषां कुरु सुन्दरि ॥ २८ ॥
इत्येवं वचनं श्रुत्वा सकामा वामलोचना ।
सस्मिता नम्रवदना सकामं तमुवाच सा ॥ २९ ॥
तुलस्युवाच
धर्मध्वजसुताहं च तपस्यायां तपोवने ।
तपस्विन्यहं तिष्ठामि कस्त्वं गच्छ यथासुखम् ॥ ३० ॥
कामिनीं कुलजातां च रहस्येकाकिनीं सतीम् ।
न पृच्छति कुले जात इत्येवं मे श्रुतौ श्रुतम् ॥ ३१ ॥
लम्पटोऽसत्कुले जातो धर्मशास्त्रार्थवर्जितः ।
येनाश्रुतः श्रुतेरर्थः स कामीच्छति कामिनीम् ॥ ३२ ॥
आपातमधुरां मत्तामन्तकां पुरुषस्य ताम् ।
विषकुम्भाकाररूपाममृतास्यां च सन्ततम् ॥ ३३ ॥
हृदये क्षुरधाराभां शश्वन्मधुरभाषिणीम् ।
स्वकार्यपरिनिष्पत्त्यै तत्परा सततं च ताम् ॥ ३४ ॥
कार्यार्थे स्वामिवशगामन्यथैवावशां सदा ।
स्वान्तर्मलिनरूपां च प्रसन्नवदनेक्षणाम् ॥ ३५ ॥
श्रुतौ पुराणे यासां च चरित्रमतिदूषितम् ।
तासु को विश्वसेत्प्राज्ञः प्रज्ञावांश्च दुराशयः ॥ ३६ ॥
तासां को वा रिपुर्मित्रं प्रार्थयन्ति नवं नवम् ।
दृष्ट्वा सुवेषं पुरुषमिच्छन्ति हृदये सदा ॥ ३७ ॥
बाह्ये स्वार्थं सतीत्वं च ज्ञापयन्ती प्रयत्‍नतः ।
शश्वत्कामा च रामा च कामाधारा मनोहरा ॥ ३८ ॥
बाह्ये छलात्खेदयन्ती स्वान्तर्मैथुनमानसा ।
कान्तं हसन्ती रहसि बाह्येऽतीव सुलज्जिता ॥ ३९ ॥
मानिनी मैथुनाभावे कोपना कलहाङ्‌कुरा ।
सुप्रीता भूरिसम्भोगात्स्वल्पमैथुनदुःखिता ॥ ४० ॥
सुमिष्टान्नाच्छीततोयादाकाङ्‌क्षन्ती च मानसे ।
सुन्दरं रसिकं कान्तं युवानं गुणिनं सदा ॥ ४१ ॥
सुतात्परमभिस्नेहं कुर्वती रसिकोपरि ।
प्राणाधिकं प्रियतमं सम्भोगकुशलं प्रियम् ॥ ४२ ॥
पश्यन्ती रिपुतुल्यं च वृद्धं वा मैथुनाक्षमम् ।
कलहं कुर्वती शश्वत्तेन सार्धं सुकोपना ॥ ४३ ॥
वाचया भक्षयन्ती तं सर्प आखुमिवोल्बणम् ।
दुःसाहसस्वरूपा च सर्वदोषाश्रया सदा ॥ ४४ ॥
ब्रह्मविष्णुशिवादीनां दुःसाध्या मोहरूपिणी ।
तपोमार्गार्गला शश्वन्मोक्षद्वारकपाटिका ॥ ४५ ॥
हरेर्भक्तिव्यवहिता सर्वमायाकरण्डिका ।
संसारकारागारे च शश्वन्निगडरूपिणी ॥ ४६ ॥
इन्द्रजालस्वरूपा च मिथ्या च स्वप्नरूपिणी ।
बिभ्रती बाह्यसौन्दर्यमधोऽङ्‌गमतिकुत्सितम् ॥ ४७ ॥
नानाविण्मूत्रपूयानामाधारं मलसंयुतम् ।
दुर्गन्धिदोषसंयुक्तं रक्तारक्तमसंस्कृतम् ॥ ४८ ॥
मायारूपा मायिनां च विधिना निर्मिता पुरा ।
विषरूपा मुमुक्षूणामदृश्याप्यभिवाञ्छताम् ॥ ४९ ॥
इत्युक्त्वा तुलसी तं तु विरराम च नारद ।
सस्मितः शङ्‌खचूडश्च प्रवक्तुमुपचक्रमे ॥ ५० ॥
शङ्खचूड उवाच
त्वया यत्कथितं देवि न च सर्वमलीककम् ।
किञ्चित्सत्यमलीकं च किञ्चिन्मत्तो निशामय ॥ ५१ ॥
निर्मितं द्विविधं धात्रा स्त्रीरूपं सर्वमोहनम् ।
कृत्वा रूपं वास्तवं च प्रशस्यं चाप्रशंसितम् ॥ ५२ ॥
लक्ष्मीः सरस्वती दुर्गा सावित्री राधिकादिका ।
सृष्टिसूत्रस्वरूपा च आद्या सृष्टिर्विनिर्मिता ॥ ५३ ॥
एतासामंशरूपं च स्त्रीरूपं वास्तवं स्मृतम् ।
तत्प्रशस्यं यशोरूपं सर्वमङ्‌गलकारकम् ॥ ५४ ॥
शतरूपा देवहूती स्वधा स्वाहा च दक्षिणा ।
छायावती रोहिणी च वरुणानी शची तथा ॥ ५५ ॥
कुबेरस्य च पत्‍नी याप्यदितिश्च दितिस्तथा ।
लोपामुद्रानसूया च कोटभी तुलसी तथा ॥ ५६ ॥
अहल्यारुन्धती मेना तारा मन्दोदरी तथा ।
दमयन्ती वेदवती गङ्‌गा च मनसा तथा ॥ ५७ ॥
पुष्टिस्तुष्टिः स्मृतिर्मेधा कालिका च वसुन्धरा ।
षष्ठी मङ्‌गलचण्डी च मूर्तिश्च धर्मकामिनी ॥ ५८ ॥
स्वस्तिः श्रद्धा च शान्तिश्च कान्तिः क्षान्तिस्तथा परा ।
निद्रा तन्द्रा क्षुत्पिपासा सन्ध्या रात्रिदिनानि च ॥ ५९ ॥
सम्पत्तिर्धृतिकीर्ती च क्रिया शोभा प्रभा शिवा ।
यत्स्त्रीरूपं च सम्भूतमुत्तमं तु युगे युगे ॥ ६० ॥
कलाकलांशरूपं च स्वर्वेश्यादिकमेव च ।
तदप्रशस्यं विश्वेषु पुंश्चलीरूपमेव च ॥ ६१ ॥
सत्त्वप्रधानं यद्‌रूपं तद्युक्तं च प्रभावतः ।
तदुत्तमं च विश्वेषु साध्वीरूपं प्रशंसितम् ॥ ६२ ॥
तद्वास्तवं च विज्ञेयं प्रवदन्ति मनीषिणः ।
रजोरूपं तमोरूपं कलासु विविधं स्मृतम् ॥ ६३ ॥
मध्यमा रजसश्चांशास्तास्तु भोगेषु लोलुपाः ।
सुखसम्भोगवश्याश्च स्वकार्ये निरताः सदा ॥ ६४ ॥
कपटा मोहकारिण्यो धर्मार्थविमुखाः सदा ।
रजोरूपस्य साध्वीत्वमतो नैवोपजायते ॥ ६५ ॥
इदं मध्यमरूपं च प्रवदन्ति मनीषिणः ।
तमोरूपं दुर्निवार्यमधमं तद्विदुर्बुधाः ॥ ६६ ॥
न पृच्छति कुले जातः पण्डितश्च परस्त्रियम् ।
निर्जने निर्जले वापि रहस्यपि परस्त्रियम् ॥ ६७ ॥
आगच्छामि त्वत्समीपमाज्ञया ब्रह्मणोऽधुना ।
गान्धर्वेण विवाहेन त्वां ग्रहीष्यामि शोभने ॥ ६८ ॥
अहमेव शङ्‌खचूडो देवविद्रावकारकः ।
दनुवंश्यो विशेषेण सुदामाहं हरेः पुरा ॥ ६९ ॥
अहमष्टसु गोपेषु गोपोऽपि पार्षदेषु च ।
अधुना दानवेन्द्रोऽहं राधिकायाश्च शापतः ॥ ७० ॥
जातिस्मरोऽहं जानामि कृष्णमन्त्रप्रभावतः ।
जातिस्मरा त्वं तुलसी सम्भुक्ता हरिणा पुरा ॥ ७१ ॥
त्वमेव राधिकाकोपाज्जातासि भारते भुवि ।
त्वां सम्भोक्तुमुत्सुकोऽहं नालं राधाभयात्ततः ॥ ७२ ॥
इत्येवमुक्त्वा स पुमान्विरराम महामुने ।
सस्मितं तुलसी तुष्टा प्रवक्तुमुपचक्रमे ॥ ७३ ॥
तुलस्युवाच
एवंविधो बुधो नित्यं विश्वेषु च प्रशंसितः ।
कान्तमेवंविधं कान्ता शश्वदिच्छति कामतः ॥ ७४ ॥
त्वयाहमधुना सत्यं विचारेण पराजिता ।
स निन्दितश्चाप्यशुचिर्यः पुमांश्च स्त्रिया जितः ॥ ७५ ॥
निन्दन्ति पितरो देवा बान्धवाः स्त्रीजितं नरम् ।
स्त्रीजितं मनसा माता पिता भ्राता च निन्दति ॥ ७६ ॥
शुद्धो विप्रो दशाहेन जातके मृतके यथा ।
भूमिपो द्वादशाहेन वैश्यः पञ्चदशाहतः ॥ ७७ ॥
शूद्रो मासेन वेदेषु मातृवद्धीनसङ्‌करः ।
अशुचिः स्त्रीजितः शुद्ध्येच्चितादहनकालतः ॥ ७८ ॥
न गह्णन्तीच्छया तस्य पितरः पिण्डतर्पणम् ।
न गह्णन्त्येव देवाश्च तस्य पुष्पजलादिकम् ॥ ७९ ॥
किं वा ज्ञानेन तपसा जपहोमप्रपूजनैः ।
किं विद्यया च यशसा स्त्रीभिर्यस्य मनो हृतम् ॥ ८० ॥
विद्याप्रभावज्ञानार्थं मया त्वं च परीक्षितः ।
कृत्वा परीक्षां कान्तस्य वृणोति कामिनी वरम् ॥ ८१ ॥
वराय गुणहीनाय वृद्धायाज्ञानिने तथा ।
दरिद्राय च मूर्खाय रोगिणे कुत्सिताय च ॥ ८२ ॥
अत्यन्तकोपयुक्ताय वात्यन्तदुर्मुखाय च ।
पङ्‌गवे चाङ्‌गहीनाय चान्धाय बधिराय च ॥ ८३ ॥
जडाय चैव मूकाय क्लीबतुल्याय पापिने ।
ब्रह्महत्यां लभेत्सोऽपि स्वकन्यां प्रददाति यः ॥ ८४ ॥
शान्ताय गुणिने चैव यूने च विदुषेऽपि च ।
साधवे च सुतां दत्त्वा दशयज्ञफलं लभेत् ॥ ८५ ॥
यः कन्यापालनं कृत्वा करोति यदि विक्रयम् ।
विक्रेता धनलोभेन कुम्भीपाकं स गच्छति ॥ ८६ ॥
कन्यामूत्रं पुरीषं च तत्र भक्षति पातकी ।
कृमिभिर्दंशितः काकैर्यावदिन्द्राश्चतुर्दश ॥ ८७ ॥
तदन्ते व्याधिसंयुक्तः स लभेज्जन्म निश्चितम् ।
विक्रीणाति मांसभारं वहत्येव दिवानिशम् ॥ ८८ ॥
इत्येवमुक्त्वा तुलसी विरराम तपोनिधे ।
ब्रह्मोवाच
किं करोषि शङ्‌खचूड संवादमनया सह ॥ ८९ ॥
गान्धर्वेण विवाहेन त्वं चास्या ग्रहणं कुरु ।
पुरुषेष्वसि रत्‍नं त्वं स्त्रीषु रत्‍नं त्वियं सती ॥ ९० ॥
विदग्धाया विदग्धेन सङ्‌गमो गुणवान्भवेत् ।
निर्विरोधसुखं राजन् को वा त्यजति दुर्लभम् ॥ ९१ ॥
योऽविरोधसुखत्यागी स पशुर्नात्र संशयः ।
किं परीक्षसि त्वं कान्तमीदृशं गुणिनं सति ॥ ९२ ॥
देवानामसुराणां च दानवानां विमर्दकम् ।
यथा लक्ष्मीश्च लक्ष्मीशे यथा कृष्णे च राधिका ॥ ९३ ॥
यथा मयि च सावित्री भवानी च भवे यथा ।
यथा धरा वराहे च दक्षिणा च यथाध्वरे ॥ ९४ ॥
द्यथात्रेरनसूया च दमयन्ती यथा नले ।
रोहिणी च यथा चन्द्रे यथा कामे रतिः सती ॥ ९५ ॥
यथादितिः कश्यपे च वसिष्ठेऽरुन्धती सखी ।
यथाहल्या गौतमे च देवहूतिश्च कर्दमे ॥ ९६ ॥
यथा बृहस्पतौ तारा शतरूपा मनौ यथा ।
यथा च दक्षिणा यज्ञे यथा स्वाहा हुताशने ॥ ९७ ॥
यथा शची महेन्द्रे च यथा पुष्टिर्गणेश्वरे ।
देवसेना यथा स्कन्दे धर्मे भूर्तिर्यथा सती ॥ ९८ ॥
सौभाग्या सुप्रिया त्वं च शङ्‌खचूडे तथा भव ।
अनेन सार्धं सुचिरं सुन्दरेण च सुन्दरि ॥ ९९ ॥
स्थाने स्थाने विहारं च यथेच्छं कुरु सन्ततम् ।
पश्चात्प्राप्यसि गोलोके श्रीकृष्णं पुनरेव च ।
चतुर्भुजं च वैकुण्ठे शङ्‌खचूडे मृते सति ॥ १०० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे शङ्‌खचूडेन सह
तुलस्याः सङ्‌गतिवर्णनं नामाष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥


शंखचूड व तुलसी यांची भेट -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायणमुनी म्हणाले, "एके दिवशी ती तुलसी शांत चित्ताने निद्राधीन झाली असता मदनाने तिला पाच बाण सोडून विद्ध केले. त्यामुळे ती थरथर कापू लागली. क्षणातच ती मदनविव्हल होऊन मूर्च्छित होई, तर क्षणात ती शुद्धीवर येत असे. क्षणातच ती उद्विग्न होत असे तर दुसर्‍याच क्षणी ती मदनव्याकुल होऊन तंद्रीत राही.

क्षणात ती प्रसन्न होई तर लगेच ती शय्येवर उठून बसे. फुले व चंदन यांनी युक्त अशी ती शय्या तिला काटयाप्रमाणे खुपत असे. सुंदर फुले, फळे वगैरे तिला विषवत् वाटू लागली. नाजुक वस्त्रानेही तिच्या अंगाची आग होऊ लागली.

तेव्हा तंद्रीतच एक फुलमाळा घातलेला एक सुंदर पुरुष तिला समोरच दिसला. तो क्षणात तिला आलिंगन देई, क्षणात तिच्यापासून दूर होई. तेव्हा ती म्हणाली, "हे प्राणेश्वरा, मला सोडून तू जातोस कुठे ? येथेच थांब."

असे म्हणतच ती सावध झाली आणि विलाप करू लागली. त्याचवेळी ब्रह्मदेवाच्या वरप्राप्तीमुळे शंखचूड कृष्णमंत्र प्राप्त करून घेऊन पुष्करामध्ये त्याने तो सिद्ध केला व इच्छित प्राप्त करून घेण्यासाठी तो तेथे आला. तुलसीने त्याला अवलोकन केले.

तो नवयौवनसंपन्न, प्रति कामदेवच, शुभ्र वर्णाचा, रत्नालंकारांनी विभूषित, शरद्‍ऋतूतील चंद्राप्रमाणे मुख असलेला, कमलनेत्र, उत्कृष्ट विमानात बसलेला असा तो फारच मनोहर दिसत होता.

अशा त्या सुंदराला अवलोकन करताच संयोगाच्या कल्पनेने ती लज्जित झाली. तिने मान खाली घातली. ती संपूर्ण साजशृंगार केलेली अशा त्या विनयाने नटलेल्या सुंदरीला पाहून शंखचूड तिच्याजवळ गेला. तो तिला म्हणाला, "हे धन्ये, तू कुणाची कन्या ? हे कल्याणी, हे मानिनी, तू कोण आहेस ? हे सुंदरी, स्वस्थ न बसता तू माझ्याशी थोडेसे भाषण तरी कर."

तेव्हा कामविव्हल झालेली ती हसतमुखाने कामातुर झालेल्या त्याला म्हणाली, "मी धर्मध्वजाची कन्या आहे. तो सांप्रत तपश्चर्या करीत आहे. मी तपस्विनी असून, हे भाग्यवान, आपण कोण आहात ? आपणाला जिकडे जायचे असेल तिकडे सुखेनैव गमन करा. उत्तम कुलात जन्मलेला पुरुष, कुलवान, एकाकी आणि सच्छिल स्त्रीशी भाषण करीत नाही. जो हलक्या, लंपट कुळात जन्म घेतो तोच धर्मशास्त्र विदीत नसलेला, श्रुतीचा अर्थ न समजलेला असून तो कामातुर स्त्रीची इच्छा करतो.

तसेच ज्या स्त्रिया मलिन अंतःकरणाच्या, नित्य मधुर बोलणार्‍या, विषमय, आपले काम साधण्यासाठी स्वामीच्या आधीन राहाणार्‍या, दोषित आचरण असलेल्या अशा, त्या नित्य नूतन पुरुषाचीच इच्छा करीत असतात. महतप्रयासाने त्याला आपण सती आहोत असे भासवीत असतात. ती सर्वदा कामातुर असते. वरवर कपटाने वागून परिणामी पुरुषाला दुःख देत असते. ती मनानेच ग्राम्य सुखाची अपेक्षा करते.

परंतु हे भाग्यवान, जी पतीशी एकांतातच हसते, लौकिक जीवनात जी लज्जा सांभाळून रहाते ग्राम्यसुखामुळे जी क्रुद्ध होते, जी पतीला प्राणाहून प्रिय असते, अशी स्त्री श्रेष्ठा होय.

तसेच, अल्प मैथुनाने कष्ट होणारी, मिष्टान्नाचे अतिरेकी सेवन करणारी, मनात रसिक सुंदर, तरुण पण सदा इच्छा करणारी, अतिसाहसी, सर्व दोषांचा आश्रय केलेली, संसारात बेडी होऊन रहाणारी, इंद्रजालस्वरूप, मिथ्या, स्वप्नस्वरूपी, बाह्यसौंदर्याचे आकर्षण असणारी, शरीर निंद्य असलेली, नाना विष्ठा, मूत्र, व पू यांचा आधार असलेली, असंस्कृत, मायारूप अशी स्त्री ब्रह्मदेवाने उत्पन्न केली. ही स्त्री मुमुक्षूंना विषरूप असते."

असे सांगून तुलसी एकदम स्तब्ध झाली. तिचे बोलणे संपल्यावर शंखचूड हसत हसत उत्तरला, "हे देवी, तू सांगितलेले हे सर्व खरे आहे. पण त्यात काही सत्य व असत्य आहे. याबद्दल आता मी तुला सांगतो ते ऐक.

ब्रह्मदेवाने दोन प्रकारची स्त्री उत्पन्न केली. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, सावित्री, राधिका
इत्यादी सृष्टीला उपयुक्त अशा आद्य सृष्टीत उत्पन्न झाल्या. त्यांचे स्वरूप प्रशंसनीय, मंगलकारक व यशोरूप आहे. शतरूपा, देवहूती, स्वधा, स्वाहा, दक्षिणा, छायावती, रोहिणी, वारुणी, शची, कुबेर पत्नी, आदिती, दीती, लोपामुद्रा, अनसूया, कोटभी, तुलसी, अहल्या, अरुंधती, मेना, तारा, मंदोदरी, दमयंती, वेदवती, गंगा, मनसा, पुष्टी, तुष्टी ह्या स्त्रियाही ब्रह्मदेवानेच उत्पन्न केल्या.

त्याच्याप्रमाणेच स्मृती, मेघा, कालिका, वसुंधरा, षष्ठी, मंगलचंडी, धर्मस्त्री, मूर्ती, स्वस्ती, श्रद्धा, शांती, कांती, क्षांती, निद्रा, तंद्रा, क्षुधा, पिपासा, संध्या, रात्री, दिनानी, संपत्ती, धृती, कीर्ती, क्रिया, शोभा, प्रभा, शिवा अशा या स्त्रिया विविध युगात कलेच्या अंशरूप अशा निर्माण झाल्या.

स्वर्गात असलेल्या वेश्या विश्वात अप्रशस्त मानल्या जातात. कारण त्या व्यभिचारी आहेत. जे सत्वगुण व प्रभा यांनी संपन्न असते, त्याचीच जगात प्रशंसा होते. रजोगुणांनी युक्त असलेल्या स्त्रिया मध्यम व तमोगुणी अधम. कारण त्या भोगलोलुप असतात. त्या कपटी, मोहमयी, धर्मअधर्म न मानणार्‍या, त्या कधीही साध्वी नसतात.

हे कल्याणी, कुलश्रेष्ठ पुरुष परस्त्रीबरोबर भाषण करीत नाहीत, हे खरेच. पण ब्रह्मदेवाची आज्ञा झाल्यामुळेच मी आज तुझ्याजवळ आलो आहे. हे शोभने, मीच तो देवांनाही पळवून लावणारा शंखचूड असून, मी गांधर्व विधीने तुझे पाणीग्रहण करीन. मीच तो सुदामा नावाचा त्या हरीचा सखा होय.

मीच आठ गोपांपैकी गोप आहे, तसेच मी पार्षदही होतोच. पण राधिकेचा शाप झाल्यामुळे मी दानवेंद्र झालो. कृष्णाच्या मंत्रामुळे मी पूर्वस्मरण जाणतो. तूही पूर्वस्मरण जाणणारी आहेस. तुझे नाव तुलसी असून पूर्वी हरीनेच तुझा उपभोग घेतला. तू राधिकेचा राग झाल्यामुळे भारतात उत्पन्न झालीस. तिच्याच भीतीमुळे मी त्यावेळी तुझा उपभोग घेऊ शकलो नाही."

असे सांगून तो पुरुष स्थिर झाला. तेव्हा तुलसी आनंदाने म्हणाली, "आपली खरोखरच प्रशंसा करावी. कामातुर होऊनच स्त्री पतीची इच्छा करते. हे भाग्यवान, तू मला विचाराने जिंकले आहेस. स्त्रीने जिंकलेले पुरुष निंद्य होय. सर्वजण स्त्रीजातीची निंदा करतात. जरा अथवा मृत्यु झाल्यावर ब्राह्मण दहा दिवसांनी, क्षत्रिय बारा दिवसांनी व वैश्य पंधरा दिवसांनी शुद्ध होतो. शूद्र एक महिन्यानंतर शुद्ध होतो. पण स्त्रीने जिंकलेला पुरुष चितेमधेच शुद्ध होतो.

ज्याचे मन स्त्रियांनी जिंकले आहे, अशा माणसाला ज्ञान, तप, जप, होम, पूजन इत्यादी विधीने काय होणार ? विद्येचे ज्ञान व तुझा प्रभाव जाणण्यासाठी मी तुझी परीक्षा केली. कोणतीही कामिनी परीक्षा करूनच पतीची निवड करते. कारण गुणरहित, वृद्ध, अज्ञानी, दरिद्री, मूर्ख, रोगी, कुष्टी, कोपिष्ट, दुर्मुख, पंगु, अंध, बधिर, जड, मुका, नपुंसक, पापी अशा पतीला वरल्यास ब्रह्महत्येचा दोष लगतो.

शांत, गुणी, तरुण, विद्वान, सज्जन अशा पुरुषाला स्त्रीने वरावे." असे म्हणून तुलसी बोलेनाशी झाली. तोच ब्रह्मदेव तेथे आला. ब्रह्मदेव म्हणाला, "हे शंखचूडा, संवाद करीत काल व्यर्थ न घालवता गांधर्व विधीने तू हिच्याशी विवाह कर. कारण तू पुरुषात श्रेष्ठ व ही स्त्रियांत श्रेष्ठ आहे. तसेच हे स्त्रिये, तू गुणवान पतीची अधिक परीक्षा करू नकोस."

नारायणाची लक्ष्मी, कृष्णाची राधिका, माझी सावित्री, शंकराची भवानी, वराहाची पृथ्वी, यज्ञाची दक्षिणा, अत्रीची अनसूया, नलाची दमयंती, चंद्राची रोहिणी, कामाची रती, कश्यपाची आदिती, वसिष्ठांची अरुंधती, गौतमाची अहल्या, कर्दमाची देवहूती, बृहस्पतीची तारा, मनूची शतरूपा, स्कंदाची देवसेना, धर्माची मूर्ती. या जशा आपल्या योग्य पतीच्या ठिकाणी रत आहेत, तशीच तूही सौभाग्यमंडित होऊन या शंखचूडाचे ठिकाणी रत हो.

हे सुंदरी, या सुंदर पुरुषासह तू पुष्कळ काळपर्यंत तृप्त होईपर्यंत क्रीडा कर. हे सती, शंखचूड मृत झाल्यावर तू गोलोकी श्रीकृष्णाला जाऊन मिळशील."


अध्याय अठरावा समाप्त

GO TOP