श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
षड्‌विंशोऽध्यायः


दमयन्तीविवाहप्रस्ताववर्णनम्

व्यास उवाच
इति मे वचनं श्रुत्वा नारदः परमार्थवित् ।
मामाह च स्मितं कृत्वा पृच्छन्तं मोहकारणम् ॥ १ ॥
नारद उवाच
पाराशर्य पुराणज्ञ किं पृच्छसि सुनिश्चयम् ।
संसारेऽस्मिन्विना मोहं कोऽपि नास्ति शरीरवान् ॥ २ ॥
ब्रह्माविष्णुस्तथा रुद्रः सनकः कपिलस्तथा ।
मायया वेष्टिताः सर्वे भ्रमन्ति भववर्त्मनि ॥ ३ ॥
ज्ञानिनं मां जनो वेत्ति भ्रान्तोऽहं सर्वलोकवत् ।
शृणु मे पूर्ववृत्तान्तं प्रब्रवीमि सुनिश्चितम् ॥ ४ ॥
दुःखं मया यथा पूर्वमनुभूतं महत्तरम् ।
स्वकृतेन च मोहेन भार्यार्थे वासवीसुत ॥ ५ ॥
एकदा पर्वतश्चाहं देवलोकान्महीतलम् ।
प्राप्तो विलोकनार्थाय भारतं खण्डमुत्तमम् ॥ ६ ॥
भ्रमन्तौ सहितावुर्व्यां पश्यन्तौ तीर्थमण्डलम् ।
पावनानि च स्थानानि मुनीनामाश्रमाञ्छुभान् ॥ ७ ॥
शपथं देवलोकात्तु कृत्वा पूर्वं परस्परम् ।
चलितौ समयं चेमं सम्मन्त्र्य निश्चयेन वै ॥ ८ ॥
चित्तवृत्तिस्तु वक्तव्या यादृशी यस्य जायते ।
शुभा वाप्यशुभा वापि न गोप्तव्या कदाचन ॥ ९ ॥
भोजनेच्छा धनेच्छापि रतीच्छा वा भवेदपि ।
यादृशी यस्य चित्ते तु कथनीया परस्परम् ॥ १० ॥
इत्यावां समयं कृत्वा स्वर्गाद्‌भूलोकमागतौ ।
एकचित्तौ मुनीभूतौ विचरन्तौ यथेच्छया ॥ ११ ॥
एवं भ्रमन्तौ लोकेऽस्मिन्ग्रीष्मान्ते समुपागते ।
सञ्जयस्य पुरं रम्यं सम्प्राप्तौ नृपते पुनः ॥ १२ ॥
तेन सम्पूजितौ भक्त्या राज्ञा सम्मानितौ भृशम् ।
स्थितौ तत्र गृहे तस्य चातुर्मास्यं महात्मनः ॥ १३ ॥
वार्षिकाश्चतुरो मासा दुर्गमाः पथि सर्वदा ।
तस्मादेकत्र विबुधैः स्थातव्यमिति निश्चयः ॥ १४ ॥
अष्टौ मासांस्तु प्रवसेत्सदा कार्यवशाद्‌द्विजः ।
वर्षाकाले न गन्तव्यं प्रवासे सुखमिच्छता ॥ १५ ॥
इति सञ्चिन्त्य मनसा सञ्जयस्य गृहे तदा ।
संस्थितौ मानितौ राज्ञा कृतातिथ्यौ महात्मना ॥ १६ ॥
दमयन्तीति विख्याता तस्य पुत्री महीपतेः ।
आज्ञप्ता परिचर्यार्थं सुदती सुन्दरी भृशम् ॥ १७ ॥
विवेकज्ञा विशालाक्षी राजपुत्री कृतोद्यमा ।
सेवनं सर्वकाले च व्यदधादुभयोरपि ॥ १८ ॥
स्नानार्थमुदकं काले भोजनं मृष्टमायतम् ।
मुखवासं तथा चान्यं यदिष्टं तद्ददाति सा ॥ १९ ॥
मनोऽभिलषितान्कामानुभयोरपि कन्यका ।
व्यजनासनशय्यादीन्वाञ्छितानप्यकल्पयत् ॥ २० ॥
एवं संसेव्यमानौ तु स्थितौ राज्ञो गृहे किल ।
वेदाध्ययनसंशीलावावां वेदव्रते रतौ ॥ २१ ॥
अहं वीणां करे कृत्वा साधयित्वा स्वरोत्तमम् ।
गायत्रं साम सुस्वादमगां कर्णरसायनम् ॥ २२ ॥
राजपुत्री तु तच्छ्रुत्वा सामगानं मनोहरम् ।
बभूव मयि रागाढ्या प्रीतियुक्ता विशारदा ॥ २३ ॥
दिने दिनेऽनुरागोऽस्या मयि वृद्धिं गतः परः ।
ममापि प्रीतियुक्तायां मनो जातं स्पृहापरम् ॥ २४ ॥
मम तस्य च सा कन्या भोजनादिषु कर्हिचित् ।
अकरोदन्तरं किञ्चित्सेवाभेदं रसान्विता ॥ २५ ॥
स्नानायोष्णजलं मह्यं पर्वताय च शीतलम् ।
दधि मह्यं तथा तक्रं पर्वतायाप्यकल्पयत् ॥ २६ ॥
शयनास्तरणं शुभ्रं मदर्थे पर्यकल्पयत् ।
प्रीत्या परमया यद्वत्पर्वताय न तादृशम् ॥ २७ ॥
विलोकयति मां प्रेम्णा सुन्दरी न च पर्वतम् ।
ततोऽस्यास्तादृशं दृष्ट्वा पर्वतः प्रेमकारणम् ॥ २८ ॥
मनसा चिन्तयामास किमेतदिति विस्मितः ।
पप्रच्छ मां रहः सम्यग्ब्रूहि नारद सर्वथा ॥ २९ ॥
राजपुत्री त्वयि प्रेम करोति मुदिता भृशम् ।
ददाति भक्ष्यभोज्यानि स्नेहयुक्ता समन्ततः ॥ ३० ॥
न तथा मयि भेदोऽत्र सन्देहं जनयत्यसौ ।
मन्यते त्वां पतिं कर्तुं सर्वथा सञ्जयात्मजा ॥ ३१ ॥
तवापि तादृशं भावं जानामि लक्षणैरहम् ।
नेत्रवक्त्रविकारैश्च ज्ञायते प्रीतिकारणम् ॥ ३२ ॥
सत्यं वद न ते मिथ्या वक्तव्यं वचनं मुने ।
स्वर्गतः समयं कृत्वा चलितौ संस्मराधुना ॥ ३३ ॥
नारद उवाच
पृष्टोऽहं पर्वतेनेदं कारणं तु हठाद्यदा ।
तदाहं ह्रीसमाक्रान्तः सञ्जातश्चाब्रुवं पुनः ॥ ३४ ॥
पर्वतैषा विशालाक्षी पतिं मां कर्तुमुद्यता ।
ममापि मानसो भावो वर्ततेऽस्यां विशेषतः ॥ ३५ ॥
तच्छ्रुत्वा वचनं सत्यं पर्वतः कोपसंयुतः ।
मामुवाच मुनिर्वाक्यं धिग्धिगिति पुनः पुनः ॥ ३६ ॥
प्रथमं शपथान्कृत्वा वञ्चितोऽहं त्वया यतः ।
भव वानरवक्त्रस्त्वं शापाच्च मम मित्रधुक् ॥ ३७ ॥
इति शप्तस्तु तेनाहं कुपितेन महात्मना ।
सहसा ह्यभवं क्रूरः शाखामृगमुखस्तदा ॥ ३८ ॥
मयापि न कृता तस्मिन्क्षमा तु भगिनीसुते ।
सोऽपि शप्तोऽतिकोपाद्वै मा स्वर्गे ते गतिः किल ॥ ३९ ॥
स्वल्पेऽपराधे यस्मान्मां शप्तवानसि पर्वत ।
तस्मात्तवापि मन्दात्मन् मृत्युलोके स्थितिः किल ॥ ४० ॥
पर्वतस्तु गतस्तस्मान्नगराद्विमना भृशम् ।
अहं वानरवक्त्रस्तु सञ्जातस्तत्क्षणादपि ॥ ४१ ॥
दृष्ट्वा मां वानरं क्रूरं राजपुत्री विलक्षणा ।
विमनातीव सञ्जाता वीणाश्रवणलालसा ॥ ४२ ॥
व्यास उवाच
ततः किमभवद्‌ब्रह्मन् कथं शापान्निवर्तितः ।
मानुषास्यः पुनर्जातो भवान्ब्रूहि यथाविधि ॥ ४३ ॥
पर्वतः क्व गतो भूयः सङ्गमो युवयोरभूत् ।
कदा कुत्र कथं सर्वं विस्तरेण वदस्व ह ॥ ४४ ॥

नारद उवाच
किं ब्रवीमि महाभाग मायायाश्चरितं महत् ।
दुःखितोऽहं भृशं तत्र पर्वते रुषिते गते ॥ ४५ ॥
पुनः सेवापरात्यर्थं राजपुत्री ममाभवत् ।
गतेऽथ पर्वते कामं स्थितस्तत्रैव सद्मनि ॥ ४६ ॥
अहं दुःखान्वितो दीनस्तथा वानरवन्मुखः ।
विशेषेण तु चिन्तार्तः किं मे स्यादिति चिन्तयन् ॥ ४७ ॥
सञ्जयोऽथ सुतां दृष्ट्वा किञ्चित्प्रकटयौवनाम् ।
विवाहार्थे राजसुतामपृच्छत्सचिवं तदा ॥ ४८ ॥
विवाहकालः सम्प्राप्तः सुताया मम साम्प्रतम् ।
योग्यं वरं मम ब्रूहि राजपुत्रं सुसम्मतम् ॥ ४९ ॥
रूपौदार्यगुणैर्युक्तं शूरं सुकुलसम्भवम् ।
विवाहं विधिवत्पुत्र्याः करोमि किल साम्प्रतम् ॥ ५० ॥
प्रधानस्त्वब्रवीद्‌राजन् राजपुत्रा ह्यनेकशः ।
वर्तन्ते भुवि पुत्र्यास्ते योग्याः सर्वगुणान्विताः ॥ ५१ ॥
यस्मिन् रुचिस्ते राजेन्द्र तमाहूय नृपात्मजम् ।
देहि कन्यां धनं भूरि हस्त्यश्वरथसंयुतम् ॥ ५२ ॥
नारद उवाच
पितुश्चिकीर्षितं ज्ञात्वा दमयन्ती तदा नृपम् ।
धात्र्या मुखेन वाक्यज्ञा तमुवाच रहः स्थितम् ॥ ५३ ॥
धात्र्युवाच
दमयन्ती महाराज पुत्री ते मामथाब्रवीत् ।
पितरं ब्रूहि धात्रेयि वचनान्मे सुखान्वितम् ॥ ५४ ॥
मया वृतोऽथ मेधावी नारदो महतीयुतः ।
नादमोहितया कामं नान्यः कोऽपि प्रियो मम ॥ ५५ ॥
कुरु मे वाञ्छितं तात विवाहं मुनिना सह ।
नान्यं वरिष्ये धर्मज्ञ नारदं तु पतिं विना ॥ ५६ ॥
मग्नाहं नादसिन्धौ वै नक्रहीने रसात्मके ।
अक्षारे सुखसम्पूर्णे तिमिङ्‌गिलविवर्जिते ॥ ५७ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
षष्ठस्कन्धे दमयन्तीविवाहप्रस्ताववर्णनं नाम षड्‌विंशोऽध्यायः ॥ २६ ॥


दमयंतीची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास म्हणाले, ''हे राजा, माझे भाषण ऐकल्यावर नारदमुनी हसून म्हणाला, ''हे पुराणपुरुषा, तू मला काय विचारतो आहेस ? सर्व जग मायेने वेष्टित असून मोहाशिवाय या संसारात दुसरे काही नाही. लोक मला ज्ञानी समजतात, पण मीही शंकेने व्यग्र आहे. म्हणून मी तुला आता सत्य घटनाच निवेदन करतो. पूर्वी मला भार्येकरता फारच दुःख भोगावे लागले.

एकदा मी व पर्वतमुनी भूतलावर आलो. तीर्थक्षेत्रे, मुनींचे आश्रम, पवित्र स्थले वगैरे पाहात पाहात आम्ही पृथ्वीवर फिरू लागलो. स्वर्गात निघण्यापूर्वी आम्हा दोघांत पण ठरला होता. "आपल्या मनातील शुभ अथवा अशुभ विचार कथन करायचे."

अशा निश्चयाच्या शपथा घेऊन आम्ही हिंडत असता संजय नावाच्या राजाच्या सुंदर नगराजवळ आलो. तो ग्रीष्मकाल संपण्याचा सुमार होता. राजाने भक्तीने आमची पूजा केली. आम्ही त्याच्याकडे राहिलो. पावसाळ्यात मार्गाने चालणे कठीण असते म्हणून ब्राह्मणाने आठच महिने प्रवास करावा.

राजाने आपल्या दमयंती नावाच्या सुंदर कन्येला आमची सेवा करण्यास सांगितले. ती सतत उद्योगी राहून आमची सेवा करीत होती. आम्हाला सर्व वस्तु वेळच्या वेळी देत होती. आम्हीही वेदव्रततत्पर होऊन राजगृही राहिलो. तेव्हा मी वीणेच्या सुराबरोबर गायत्र नावाचा साम गात असे. माझ्या गाण्यामुळे ती कन्या मजवर प्रेम करू लागली. मला तिच्याविषयी मोह उत्पन्न झाला.

तेव्हापासून ती कन्या माझ्या व पर्वतमुनीच्या सेवेमध्ये वेगळेपणा ठेवू लागली. त्याच्या कारणाबद्दल पर्वतमुनी विचार करू लागला. तो एकदा मला म्हणाला, ''हे नारदा, राजकन्या तुझ्यावर प्रेम करीत आहे हे खरे ना ? कारण ती माझ्याशी वागताना वेगळेपणाने वागते. तुलाही तिच्याबद्दल प्रेम वाटू लागल्याचे मला दिसत आहे. कारण नेत्र, मुख यांच्या हावभावावरून तसे वाटते. तेव्हा तू खरे सांग. आपल्या शपथेचे स्मरण ठेव.''

ते ऐकून मी म्हणालो, ''आम्ही एकमेकावर प्रेम करू लागलो आहोत हे खरे."

ते ऐकताच पर्वतमुनी क्रुद्ध झाला. माझा धिक्कार करून तो म्हणाला, ''हे मित्रद्रोही नारदा, शपथ घेऊनही तू फसवलेस, म्हणून माझ्या शापामुळे वानरमुख होशील.''

त्याच क्षणी मी वानरमुखी झालो. त्यामुळे मीही क्रुद्ध होऊन म्हणालो, ''तुझे स्वर्गात गमन होणार नाही. तू मृत्यूलोकीच राहशील.''

असे आम्ही शाप दिल्यावर पर्वतमुनी खिन्न होऊन निघून गेला. मी वानरमुख झाल्याचे पाहून राजकन्या निराश झाली.

व्यास म्हणाले, ''मी नारदमुनींना म्हणालो, "आपली शापमुक्ती कशी झाली ? तसेच तुमची पुन: भेट घडली की नाही याविषयी मला विस्ताराने सांगा."

नारद म्हणाले, ''हे मुने, मायेचे चरित्र मी काय सांगू ? ते अतर्क्य आहे. पर्वतमुनी गेल्यावर ती कन्या पूर्ववत माझी सेवा करीत राहिली. पण वानर मुख झाल्यामुळे मी फार दुःखी झालो.

पुढे राजकन्येचा विवाहकाल प्राप्त झाल्यावर राजा सचिवाला म्हणला, ''हे सचिवा, माझ्या कन्येसाठी योग्य वर शोधून आण. तो शूर गुणवान कुलवान असावा.''

प्रधान म्हणाला, ''अनेक राजपुत्र गुण व कुलसंपन्न आहेत. आपणाला इष्ट वाटेल त्याला आपण कन्या द्यावी.''

तेव्हा दमयंतीने दाईकडून आपल्या मनातला भाव पित्याला कळविला. दाई राजाला म्हणाली, "महाराज, कन्या म्हणते, महाबुद्धिमान नारदाला मी वरले आहे. तेव्हा त्याच्याशी माझा विवाह होणे योग्य होय. मी नारदाशिवाय कुणालाही पती वरणार नाही. कारण मी त्याच्या नादसागरामध्ये तल्लीन झाले आहे.''



अध्याय सव्विसावा समाप्त


GO TOP