श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
एकोनविंशोऽध्यायः


पुत्रजन्मानन्तरं स्वस्वरूपेण वैकुण्ठगमनवर्णनम्

व्यास उवाच
तस्यै दत्त्वा वरं शम्भुः कैलासं त्वरितो ययौ ।
रम्यं देवगणैर्जुष्टमप्सरोभिश्च मण्डितम् ॥ १ ॥
तत्र गत्वा चित्ररूपं गणं कार्यविशारदम् ।
प्रेषयामास वैकुण्ठे लक्ष्मीकार्यार्थसिद्धये ॥ २ ॥
शिव उवाच
चित्ररूप हरिं गत्वा ब्रूहि त्वं वचनान्मम ।
यथासौ दुःखितां पत्‍नीं विशोकां च करिष्यति ॥ ३ ॥
इत्युक्तश्चित्ररूपोऽथ निर्जगाम त्वरान्वितः ।
वैकुण्ठं परमं स्थानं वैष्णवैश्च गणैर्वृतम् ॥ ४ ॥
नानाद्रुमगणाकीर्णं वापीशतविराजितम् ।
संजुष्टं हंसकारण्डमयूरशुककोकिलैः ॥ ५ ॥
उच्चप्रासादसंयुक्तं पताकाभिरलंकृतम् ।
नृत्यगीतकलापूर्णं मन्दारद्रुमसंयुतम् ॥ ६ ॥
बकुलाशोकतिलकचम्पकालिविमण्डितम् ।
कूजितैर्विहगानां तु कर्णाह्लादकरैर्युतम् ॥ ७ ॥
संवीक्ष्य भवनं विष्णोर्द्वास्थौ प्राह प्रणम्य च ।
जयविजयनामानौ वेत्रपाणी स्थितावुभौ ॥ ८ ॥
चित्ररूप उवाच
भो निवेदयत शीघ्रं हरये परमात्मने ।
दूतं प्राप्यं हरस्यात्र प्रेरितं शूलपाणिना ॥ ९ ॥
तच्छ्रुत्वा वचनं तस्य जयः परमबुद्धिमान् ।
गत्वा हरिं प्रणम्याह कृताञ्जलिपुटः पुरः ॥ १० ॥
देवदेव रमाकान्त करुणाकर केशव ।
द्वारि तिष्ठति दूतोऽत्र शङ्करस्य समागतः ॥ ११ ॥
आज्ञापय प्रवेष्टव्यो न वेति गरुडध्वज ।
चित्ररूपधरोऽप्यस्ति न जाने कार्यगौरवम् ॥ १२ ॥
इत्याकर्ण्य हरिः प्राह जयं प्रज्ञातकारणः ।
प्रवेशयात्र रुद्रस्य भृत्यं समयसंस्थितम् ॥ १३ ॥
इत्याकर्ण्य जयस्तूर्णं गत्वा तं परमाद्‌भुतम् ।
एहीत्याकारयामास जयः शङ्करसेवकम् ॥ १४ ॥
प्रवेशितो जयेनाथ चित्ररूपस्तथाकृतिः ।
प्रणम्य दण्डवद्विष्णुं कृताञ्जलिपुटः स्थितः ॥ १५ ॥
दृष्ट्वा तं विस्मयं प्राप भगवान् गरुडध्वजः ।
चित्ररूपधरं शम्भोः सेवकं विनयान्वितम् ॥ १६ ॥
पप्रच्छ तं स्मितं कृत्वा चित्ररूपं रमापतिः ।
कुशलं देवदेवस्य सकुटुम्बस्य चानघ ॥ १७ ॥
कस्मात्त्वं प्रेषितोऽस्यत्र ब्रूहिकार्यं हरस्य किम् ।
अथवा देवतानां च किञ्चित्कार्यं समुत्थितम् ॥ १८ ॥
दूत उवाच
किमज्ञातं तवास्तीह संसारे गरुडध्वज ।
वर्तमानं त्रिकालज्ञ यदहं प्रब्रवीमि वै ॥ १९ ॥
प्रेषितोऽस्मि भवेनात्र विज्ञस्तु त्वां जनार्दन ।
हरस्य वचनाद्वाक्यं प्रब्रवीमि त्वयि प्रभो ॥ २० ॥
तेनोक्तमेतद्देवेश भार्या ते कमलालया ।
तपस्तपति कालिन्दीतमसासङ्गमे विभो ॥ २१ ॥
हयीरूपधरा देवी सर्वार्थसिद्धिदायिनी ।
ध्यातुं योग्यामरगणैर्मानवैर्यक्षकिन्नरैः ॥ २२ ॥
विना तया नरः कोऽपिसुखभागी भवेन्न हि ।
तां त्यक्त्वा पुण्डरीकाक्ष प्राप्नोषि किं सुखं हरे ॥ २३ ॥
दुर्बलोऽपि स्त्रियं पाति निर्धनोऽपि जगत्पते ।
विनापराधं च विभो किं त्यक्ता जगदीश्वरी ॥ २४ ॥
दुःखं प्राप्नोति संसारे यस्य भार्या जगद्‌गुरो ।
धिक्तस्य जीवितं लोके निन्दितं त्वरिमण्डले ॥ २५ ॥
सकामा रिपवस्तेऽद्य दृष्ट्वा तां दुःखिता भृशम् ।
त्वां वियुक्तं च रमया हसिष्यन्ति दिवानिशम् ॥ २६ ॥
रमां रमय देवेश त्वदुत्सङ्गगतां कुरु ।
सर्वलक्षणसम्पन्नां सुशीलां च सुरूपिणीम् ॥ २७ ॥
सुखितो भव तां प्राप्य वल्लभां चारुहासिनीम् ।
कान्ताविरहजं दुःखं स्मराम्यहमनातुरः ॥ २८ ॥
मम भार्या मृता विष्णो दक्षयज्ञे सती यदा ।
तदाहं दुःसहं दुःखं भुक्तवानम्बुजेक्षण ॥ २९ ॥
संसारेऽस्मिन्नरः कोऽपि माभून्मत्सदृशोऽपरः ।
मनसाकरवं शोकं तस्या विरहपीडितः ॥ ३० ॥
कालेन महता प्राप्ता मया गिरिसुता पुनः ।
तपस्तप्त्वातिदुःसाध्यं या दग्धा तु रुषाध्वरे ॥ ३१ ॥
हरे किं सुखमापन्नं त्वया सन्त्यज्य कामिनीम् ।
एकाकी तिष्ठता कालं सहस्रवत्सरात्मकम् ॥ ३२ ॥
गत्वाश्वास्य महाभागां समानय निजालयम् ।
माभूत्कोऽपीह संसारे विमुक्तो रमया तया ॥ ३३ ॥
कृत्वा तुरगरूपं त्वं भज तां कमलालयाम् ।
उत्पाद्य पुत्रमायुष्मंस्तामानय शुचिस्मिताम् ॥ ३४ ॥
व्यास उवाच
हरिराकर्ण्य तद्वाक्यं चित्ररूपस्य भारत ।
तथेत्युक्त्वा तु तं दूतं प्रेषयामास शङ्करम् ॥ ३५ ॥
गते दूतेऽथ भगवान्वैकुण्ठात्कामसंयुतः ।
जगाम धृत्वा तत्राशु वाजिरूपं मनोहरम् ॥ ३६ ॥
यत्र सा वडवारूपं कृत्वा तपति सिन्धुजा ।
विष्णुस्तं देशमासाद्य तामपश्यद्धयीं स्थिताम् ॥ ३७ ॥
सापि तं वीक्ष्य गोविन्दं हयरूपधरं पतिम् ।
ज्ञात्वा वीक्ष्य स्थिता साध्वी विस्मिता साश्रुलोचना ॥ ३८ ॥
तयोस्तु सङ्गमस्तत्र प्रवृत्तो मन्मथार्तयोः ।
कालिन्दीतमसासङ्गे पावने लोकविश्रुते ॥ ३९ ॥
सगर्भा सा तदा जाता वडवा हरिवल्लभा ।
सुषुवे सुन्दरं बालं तत्रैव सुगुणोत्तरम् ॥ ४० ॥
तामाह भगवान्वाक्यं प्रहस्य समयाश्रितम् ।
त्यजाद्य वाडवं देहं पूर्वदेहा भवाधुना ॥ ४१ ॥
गमिष्यावः स्ववैकुण्ठमावां कृत्वा निजं वपुः ।
तिष्ठत्वत्र कुमारोऽयं त्वया जातः सुलोचने ॥ ४२ ॥
लक्ष्मीरुवाच
स्वदेहसम्भवं पुत्रं कथं हित्वा व्रजाम्यहम् ।
स्नेहः सुदुस्त्यजः कामं स्वात्मजस्य सुरर्षभ ॥ ४३ ॥
का गतिः स्यादमेयात्मन् बालस्यास्य नदीतटे ।
अनाथस्यासमर्थस्य विजनेऽल्पतनोरिह ॥ ४४ ॥
अनाश्रयं सुतं त्यक्त्वा कथं गन्तुं मनो मम ।
समर्थं सदयं स्वामिन् भवेदम्बुजलोचन ॥ ४५ ॥
दिव्यदेहौ ततो जातौ लक्ष्मीनारायणावुभौ ।
विमानवरसंविष्टौ स्तूयमानौ सुरैर्दिवि ॥ ४६ ॥
गन्तुकामं पतिं प्राह कमला कमलापतिम् ।
गृहाणेमं सुतं नाथ नाहं शक्तास्मि हापितुम् ॥ ४७ ॥
प्राणप्रियोऽस्ति मे पुत्रः कान्त्या त्वत्सदृशः प्रभो ।
गृहीत्वैनं गमिष्यावो वैकुण्ठं मधुसूदन ॥ ४८ ॥
हरिरुवाच
मा विषादं प्रिये कर्तुं त्वमर्हसि वरानने ।
तिष्ठत्वयं सुखेनात्र रक्षा मे विहिता त्विह ॥ ४९ ॥
कार्यं किमपि वामोरु वर्तते महदद्‌भुतम् ।
निबोध कथयाम्यद्य सुतस्यात्र विमोचने ॥ ५० ॥
तुर्वसुर्नाम विख्यातो ययातितनुजो भुवि ।
हरिवर्मेति पित्रास्य कृतं नाम सुविश्रुतम् ॥ ५१ ॥
स राजा पुत्रकामोऽद्य तपस्तपति पावने ।
तीर्थे वर्षशतं जातं तस्य वै कुर्वतस्तपः ॥ ५२ ॥
तस्यार्थे निर्मितः पुत्रो मयायं कमलालये ।
तत्र गत्वा नृपं सुभ्रु प्रेरयिष्यामि साम्प्रतम् ॥ ५३ ॥
तस्मै दास्याम्यहं पुत्रं पुत्रकामाय कामिनि ।
गृहीत्वा स्वगृहं राजा प्रापयिष्यति बालकम् ॥ ५४ ॥
व्यास उवाच
इत्याश्वास्य प्रियां पद्मां कृत्वा रक्षां च बालके ।
विमानवरमारुह्य प्रययौ प्रियया सह ॥ ५५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां षष्ठस्कन्धे
पुत्रजन्मानन्तरं स्वस्वरूपेण वैकुण्ठगमनवर्णनं नामैकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥


हरीचा अवतार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शंकर कैलासावर निघून गेल्यावर त्यांनी चित्ररूप नावाच्या गणाला वैकुंठाला पाठवले. ते म्हणाले, ''हे चित्ररूपा, तू हरीला लक्ष्मीच्या दुःखाविषयी निवेदन कर. माझा निरोप हरीला सांग.''

चित्ररूप सत्वर वैकुंठाला गेला. तो तेथे हरीच्या दारावर असलेल्या जयविजयांना म्हणाला, "मला शिवांनी काही निरोप देऊन पाठवले आहे असे हरीला जाऊन सांग."

तेव्हा जय हरीकडे गेला. त्याने शिवाकडून दूत आल्याचे हरीला सांगितले. तेव्हा त्याचे कारण अंतर्यामी जाणून हरी म्हणाला, "त्या रुद्रसेवकाला घेऊन ये.''

चित्ररूप आत गेल्यावर विष्णूला प्रणिपात करून त्याच्यासमोर उभा राहिला. तेव्हा हरी हसतच चित्ररूपाला म्हणाले, ''हे निष्पाप, देवाधिदेव शंकर पत्नीसह सुखी आहेत ना ? त्यांनी तुला येथे का पाठवले ? शंकराचे काय काम आहे ते निवेदन कर."

दूत म्हणाला, ''हे गरुडध्वजा, आपणाला अनाकलनीय असे काय आहे ? मी काय आपणाला सांगायला हवे ? तरीही प्रभूच्या आज्ञेने मी आपणाला त्यांचा निरोप निवेदन करतो.

हे प्रभो, देव मानव, यक्ष, किन्नर यांनी तिचे ध्यान करावे, जिच्याशिवाय भूतलावर पुरुष सुखी होणार नाही अशी ती तुझी पत्नी कालिंदीच्या तीरावर तप करीत आहे. ज्याच्या भार्येला दुःख प्राप्त होते त्याच्या जीविताचा धिक्कार असो. त्याचे शत्रूही त्याची निंदा करतात. म्हणून आपण प्रियेचा स्वीकार करून उभयतांनी सुखी रहावे. हे विष्णो, मला देखील स्त्रीविरहजन्य दुःखाचे स्मरण होत आहे.

हे कमलनयना, दक्षयज्ञात माझी भार्या मृत झाल्यावर मी अत्यंत दुःखी झालो. दुष्कर तप केल्यावर ती पर्वतकन्या होऊन मला प्राप्त झाली. हे देवा, आपण लक्ष्मीचा त्याग करून हजार संवत्सर उलटले आहेत. म्हणून तू तिचा स्वीकार कर. अश्वरूपाने तू लक्ष्मीशी संयोग कर आणि तिला पुत्रप्राप्ती झाल्यावर तिच्यासह वैकुंठाला ये.''

शिवाचा निरोप ऐकल्यावर श्रीहरीने दूताला परत पाठवले. सुंदर अश्वाचे रूप घेऊन ते कालिंदी व तमसा यांच्या संगमाकडे गेले. तेथे तपश्चर्या करणार्‍या आपल्या अश्वरूप पत्नीला त्यांनी पाहिले. तिने त्याला अवलोकन केले व हा विष्णुच आहे असे जाणले. तेव्हा त्या ठिकाणी दोघांचाही समागम झाला. त्यामुळे ती हरिप्रिय घोडी गर्भिणी झाली. पुढे तिच्या पोटी सुंदर बालकाचा जन्म झाला. तेव्हा भगवान हसतमुखाने तिला म्हणाले, ''हे सुलोचने, आता तू पूर्वदेह धारण कर. या बालकाला तेथेच ठेवून आता आपण वैकुंठाला जाऊ.''

लक्ष्मी म्हणाली, ''हे नाथ, ह्या बालकाला येथे अनाथासारखे सोडून मी कशी जाऊ ? या एकाकी अरण्यात याची अवस्था कशी होईल ? मातेला आपल्या पुत्राचा त्याग कसा करता येईल ?''

असे त्यांचे बोलणे चालू असतानाच दोघेही दिव्यदेहधारी होऊन स्वर्गातून आलेल्या विमानात आरूढ झाले. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, "हे नाथ, या पुत्राचा स्वीकार करा. हा पुत्र आपल्याप्रमाणेच तेजस्वी असून मला प्राणप्रिय आहे. याला घेऊन आपण स्वर्गात जाऊ.''

हरी म्हणाले, ''हे प्रिये, तू निश्चिंत राहा. या पुत्राला येथे सुखप्राप्ती होईल. तसेच त्याच्या योगाने येथे मला देवकार्य करायचे आहे. ते तुला सांगतो.

ययातीचा पुत्र तुर्वसू हा हरिवर्मा या नावाने प्रसिद्ध आहे. तो पुत्रप्राप्तीसाठी एका पुण्यतीर्थावर तप करीत आहे. त्याच्या तपाची शंभर वर्ष उलटली आहेत. तेव्हा त्याच्यासाठी हा पुत्र मी निर्माण केला आहे. वैकुंठास गेल्यावर मी त्या राजाला प्रेरणा करीन. नंतर या बालकाचा राजा पुत्राप्रमाणे सांभाळ करील.''

असे सांगून बालकाच्या रक्षणाची सिद्धता करून आपल्या प्रियेसह ते वैकुंठास निघून गेले.



अध्याय एकोणिसावा समाप्त


GO TOP