श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
पञ्चमोऽध्यायः


देवीसमाराधनाय देवकृतस्तुतिवर्णनम्

व्यास उवाच
तथा चिन्तातुरान्वीक्ष्य सर्वान्मर्वार्थतत्त्ववित् ।
प्राह प्रेमभरोद्‌भ्रान्तान्माधवो मेदिनीपते ॥ १ ॥
विष्णुरुवाच
किं मौनमाश्रिता यूयं ब्रुवन्तु कारणं सुराः ।
सदसद्वापि यच्छ्रुत्वा यतिष्ये तन्निवारणे ॥ २ ॥
देवा ऊचुः
किमज्ञातं तव विभो त्रिषु लोकेषु वर्तते ।
सर्वं वेद भवान्कार्यं किं पृच्छसि पुनः पुनः ॥ ३ ॥
त्वया पूर्वं बलिर्बद्धः शक्रो देवाधिपः कृतः ।
वामनं वपुरास्थाय क्रान्तं त्रिभुवनं पदैः ॥ ४ ॥
अमृतं त्वाहृतं विष्णो दैत्याश्च विनिपातिताः ।
त्वं प्रभुः सर्वदेवानां सर्वापद्विनिवारणे ॥ ५ ॥

विष्णुरुवाच
न भेतव्यं सुरवरा वेद्म्युपायं सुसम्मतम् ।
तद्वधाय प्रवक्ष्यामि येन सौख्यं भविष्यति ॥ ६ ॥
अवश्यं करणीयं मे भवतां हितमात्मना ।
बुद्ध्या बलेन चार्थेन येन केनच्छलेन वा ॥ ७ ॥
उपायाः खलु चत्वारः कथितास्तत्त्वदर्शिभिः ।
सामादयः सुहृत्स्वेव दुर्हृदेषु विशेषतः ॥ ८ ॥
ब्रह्मणास्य वरो दत्तस्तपसाऽऽराधितेन च ।
दुर्जयत्वं च सम्प्राप्तं वरदानप्रभावतः ॥ ९ ॥
अजेयः सर्वभूतानां त्वष्ट्रा समुपपादितः ।
ततो बलेन वृद्धिं स प्राप्तः परपुरञ्जयः ॥ १० ॥
दुःसाध्योऽसौ सुराः शत्रुर्विना सामप्रतारणम् ।
प्रलोभ्य वशमानेयो हन्तव्यस्तु ततः परम् ॥ ११ ॥
गच्छध्वं सर्वगन्धर्वा यत्रास्ति बलवत्तरः ।
साम तस्य प्रयुञ्जध्वं तत एनं विजेष्यथ ॥ १२ ॥
सङ्गम्य शपथात्कृत्वा विश्वास्य समयेन हि ।
मित्रत्वं च समाधाय हन्तव्यः प्रबलो रिपुः ॥ १३ ॥
अदृश्यः सम्प्रवेक्ष्यामि वज्रमस्य वरायुधम् ।
साहाय्यं च करिष्यामि शक्रस्याहं सुरोत्तमाः ॥ १४ ॥
समयं च प्रतीक्षध्वं सर्वथैवायुषः क्षये ।
मरणं विबुधास्तस्य नान्यथा सम्भविष्यति ॥ १५ ॥
गच्छध्वमृषिभिः सार्धं गन्धर्वाः कपटावृताः ।
इन्द्रेण सह मित्रत्वं कुरुध्वं वाक्यदानतः ॥ १६ ॥
यथा स याति विश्वासं तथा कार्यं प्रतारणम् ।
गुप्तोऽहं सम्प्रवेक्ष्यामि पविं सञ्छादितं दृढम् ॥ १७ ॥
विश्वस्तं मघवा शत्रुं हनिष्यति न चान्यथा ।
विश्वासस्य कृते पापं कृत्वा शक्रस्तु पृष्ठतः ॥ १८ ॥
मत्सहायोऽथ वज्रेण शातयिष्यति पापिनम् ।
न दोषोऽत्र शठे शत्रौ शाठ्यमेव प्रकुर्वतः ॥ १९ ॥
नान्यथा बलवान्वध्यः शूरधर्मेण जायते ।
वामनं रूपमाधाय मयायं वञ्चितो बलिः ॥ २० ॥
कृत्वा च मोहिनीवेषं दैत्याः सर्वेऽपिवञ्चिताः ।
भवन्तः सहिताः सर्वे देवीं भगवतीं शिवाम् ॥ २१ ॥
गच्छध्वं शरणं भावैः स्तोत्रमन्त्रैः सुरोत्तमाः ।
साहाय्यं सा योगमाया भवतां संविधास्यति ॥ २२ ॥
वन्दामहे सदा देवीं सात्त्विकीं प्रकृतिं पराम् ।
सिद्धिदां कामदां कामां दुरापामकृतात्मभिः ॥ २३ ॥
इन्द्रोऽपि तां समाराध्य हनिष्यति रिपुं रणे ।
मोहिनी सा महामाया मोहयिष्यति दानवम् ॥ २४ ॥
मोहितो मायया वृत्रः सुखसाध्यो भविष्यति ।
प्रसन्नायां पराम्बायां सर्वं साध्यं भविष्यति ॥ २५ ॥
नोचेन्मनोरथावाप्तिर्न कस्यापि भविष्यति ।
अन्तर्यामिस्वरूपा सा सर्वकारणकारणा ॥ २६ ॥
तस्मात्तां विश्वजननीं प्रकृतिं परमादृताः ।
भजध्वं सात्त्विकैर्भावैः शत्रुनाशाय सत्तमाः ॥ २७ ॥
पुरा मयापि संग्रामं कृत्वा परमदारुणम् ।
पञ्चवर्षसहस्राणि निहतौ मधुकैटभौ ॥ २८ ॥
स्तुता मया तदात्यर्थं प्रसन्ना प्रकृतिः परा ।
मोहितौ तौ तदा दैत्यौ छलेन च मया हतौ ॥ २९ ॥
विप्रलब्धौ महाबाहू दानवौ मदगर्वितौ ।
तथा कुरुध्वं प्रकृतेर्भजनं भावसंयुताः ॥ ३० ॥
सर्वथा कार्यसिद्धिं सा करिष्यति सुरोत्तमाः ।
एवं ते दत्तमतयो विष्णुना प्रभविष्णुना ॥ ३१ ॥
जग्मुस्ते मेरुशिखरं मन्दारद्रुममण्डितम् ।
एकान्ते संस्थिता देवाः कृत्वा ध्यानं जपं तपः ॥ ३२ ॥
तुष्टुवुर्जगतां धात्रीं सृष्टिसंहारकारिणीम् ।
भक्तकामदुघामम्बां संसारक्लेशनाशिनीम् ॥ ३३ ॥
देवा ऊचुः
देवि प्रसीद परिपाहि सुरान्प्रतप्तान्
    वृत्रासुरेण समरे परिपीडितांश्च ।
दीनार्तिनाशनपरे परमार्थतत्त्वे
    प्राप्तांस्त्वदङ्‌घ्रिकमलं शरणं सदैव ॥ ३४ ॥
त्वं सर्वविश्वजननी परिपालयास्मान्
    पुत्रानिवातिपतितान् रिपुसङ्कटेऽस्मिन् ।
मातर्न तेऽस्त्यविदितं भुवनत्रयेऽपि
    कस्मादुपेक्षसि सुरानसुरप्रतप्तान् ॥ ३५ ॥
त्रैलोक्यमेतदखिलं विहितं त्वयैव
    ब्रह्मा हरिः पशुपतिस्तव वासनोत्थाः ।
कुर्वन्ति कार्यमखिलं स्ववशा न ते ते
    भ्रूभङ्गचालनवशाद्विहरन्ति कामम् ॥ ३६ ॥
माता सुतान्परिभवात्परिपाति दीनान्
    रीतिस्त्वयैव रचिता प्रकटापराधान् ।
कस्मान्न पालयसि देवि विनापराधा-
    नस्मांस्त्वदङ्‌घ्रिशरणान्करुणारसाब्धे ॥ ३७ ॥
नूनं मदङ्‌घ्रिभजनाप्तपदाः किलैते
    भक्तिं विहाय विभवे सुखभोगलुब्धाः ।
नेमे कटाक्षविषया इति चेन्न चैषा
    रीतिः सुते जननकर्तरि चापि दृष्टा ॥ ३८ ॥
दोषो न नोऽत्र जननि प्रतिभाति चित्ते
    यत्ते विहाय भजनं विभवे निमग्नाः ।
मोहस्त्वया विरचितः प्रभवत्यसौ न-
    स्तस्मात्स्वभावकरुणे दयसे कथं न ॥ ३९ ॥
पूर्वं त्वया जननि दैत्यपतिर्बलिष्ठो
    व्यापादितो महिषरूपधरः किलाजौ ।
अस्मत्कृते सकललोकभयावहोऽसौ
    वृत्रं कथं न भयदं विधुनोषि मातः ॥ ४० ॥
शुम्भस्तथातिबलवाननुजो निशुम्भ-
    स्तौ भ्रातरौ तदनुगा निहता हतौ च ।
वृत्रं तथा जहि खलं प्रबलं दयार्द्रे
    मत्तं विमोहय तथा न भवेद्यथासौ ॥ ४१ ॥
त्वं पालयाद्य विबुधानसुरेण मातः
    सन्तापितानतितरां भयविह्वलांश्च ।
नान्योऽस्ति कोऽपि भुवनेषु सुरार्तिहन्ता
    यः क्लेशजालमखिलं निदहेत्स्वशक्त्या ॥ ४२ ॥
वृत्रे दया तव यदि प्रथिता तथापि
    जह्येनमाशु जनदुःखकरं खलं च ।
पापात्समुद्धर भवानि शरैः पुनाना
    नोचेत्प्रयास्यति तमो ननु दुष्टबुद्धिः ॥ ४३ ॥
ते प्रापिताः सुरवनं विबुधारयो ये
    हत्वा रणेऽपि विशिखैः किल पावितास्ते ।
त्राता न किं निरयपातभयाद्दयार्द्रे
    यच्छत्रवोऽपि न हि किं विनिहंसि वृत्रम् ॥ ४४ ॥
जानीमहे रिपुरसौ तव सेवको न
    प्रायेण पीडयति नः किल पापबुद्धिः ।
यस्तावकस्त्विह भवेदमरानसौ किं
    त्वत्पादपङ्कजरतान्ननु पीडयेद्वा ॥ ४५ ॥
कुर्मः कथं जननि पूजनमद्य तेऽम्ब
    पुष्पादिकं तव विनिर्मितमेव यस्मात् ।
मन्त्रा वयं च सकलं परशक्तिरूपं
    तस्माद्‌भवानि चरणे प्रणताः स्म नूनम् ॥ ४६ ॥
धन्यास्त एव मनुजा हि भजन्ति भक्त्या
    पादाम्बुजं तव भवाब्धिजलेषु पोतम् ।
यं योगिनोऽपि मनसा सततं स्मरन्ति
    मोक्षार्थिनो विगतरागविकारमोहाः ॥ ४७ ॥
ये याज्ञिकाः सकलवेदविदोऽपि नूनं
    त्वां संस्मरन्ति सततं किल होमकाले ।
स्वाहां तु तृप्तिजननीममरेश्वराणां
    भूयः स्वधां पितृगणस्य च तृप्तिहेतुम् ॥ ४८ ॥
मेधासि कान्तिरसि शान्तिरपि प्रसिद्धा
    बुद्धिस्त्वमेव विशदार्थकरी नराणाम् ।
सर्वं त्वमेव विभवं भुवनत्रयेऽस्मि-
    न्कृत्वा ददासि भजतां कृपया सदैव ॥ ४९ ॥
व्यास उवाच
एवं स्तुता सुरैर्देवी प्रत्यक्षा साभवत्तदा ।
चारुरूपधरा तन्वी सर्वाभरणभूषिता ॥ ५० ॥
पाशांकुशवराभीतिलसद्‌बाहुचतुष्टया ।
रणत्किङ्‌किणिकाजालरसनाबद्धसत्कटिः ॥ ५१ ॥
कलकण्ठीरवा कान्ता क्वणत्कङ्कणनूपुरा ।
चन्द्रखण्डसमाबद्धरत्‍नमौलिविराजिता ॥ ५२ ॥
मन्दस्मितारविन्दास्या नेत्रत्रयविभूषिता ।
पारिजातप्रसूनाच्छनालवर्णसमप्रभा ॥ ५३ ॥
रक्ताम्बरपरीधाना रक्तचन्दनचर्चिता ।
प्रसादसुमुखी देवी करुणारससागरा ॥ ५४ ॥
सर्वशृङ्गारवेषाढ्या सर्वद्वैतारणिः परा ।
सर्वज्ञा सर्वकर्त्री च सर्वाधिष्ठानरूपिणी ॥ ५५ ॥
सर्ववेदान्तसंसिद्धा सच्चिदानन्दरूपिणी ।
प्रणेमुस्तां समालोक्य सुरा देवीं पुरःस्थिताम् ॥ ५६ ॥
तानाह प्रणतानम्बा किं वः कार्यं ब्रुवन्तु माम् ।
देवा ऊचुः
मोहयैनं रिपुं वृत्रं देवानामतिदुःखदम् ॥ ५७ ॥
यथा विश्वसते देवांस्तथा कुरु विमोहितम् ।
आयुधे च बलं देहि हतः स्याद्येन वा रिपुः ॥ ५८ ॥
व्यास उवाच
तथेत्युक्त्वा भगवती तत्रैवान्तरधीयत ।
स्वानि स्वानि निकेतानि जग्मुर्देवा मुदान्विताः ॥ ५९ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां षष्ठस्कन्धे
देवीसमाराधनाय देवकृतस्तुतिवर्णनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥


देवीचा देवांना वर -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

त्या चिंताग्रस्त देवांना पाहून तो माधव म्हणाला, "देवहो, जे बरे वाईट कारण असेल ते सत्वर निवेदन करा. मी त्याचे निवारण करीन.''

देव म्हणाले, ''हे प्रभो, तुला अनाकलनीय असे त्रैलोक्यात काय आहे ? तू सर्व जाणतोस. तू आमच्यासाठी बळीला बांधलेस, इंद्राला अधिपती केलेस, वामनरूपाने त्रैलोक्य जिंकलेस, आमच्या संरक्षणासाठी तू दैत्यवध करून अमृत मिळवलेस. तूच देवांची संकटे निवारतोस.''

विष्णू म्हणाले, ''सुरश्रेष्ठहो, तुम्ही भय सोडा. वृत्रासुराच्या वधाचे कारण मला माहीत आहे. बुद्धी, बल वा कपट अशा कोणत्याही मार्गाने मला तुमचे हित करावयाचे आहे. ब्रह्मदेवाच्या वरामुळे तो अजय झाला आहे.

आता हा साम किंवा कपट याशिवाय वधला जाणार नाही. तेव्हा हे देवांनो, गंधर्वानो, तुम्ही सर्वजण वृत्राकडे जा. त्याला सामयोगाने तुम्हाला जिंकता येईल. शपथा करून, विश्वास निर्माण करून, मैत्री संपादन करून दृष्टी बलिष्ठ शत्रूचा नाश करा.

मी इंद्राच्या वज्र नावाच्या आयुधात प्रविष्ट होईन. त्यामुळे कोणालाही दिसणार नाही. पण तुम्ही कालाची वाट पहा. कारणाशिवाय त्याला मृत्यू येणार नाही. तेव्हा तुम्ही कपटाचे अवलंबन करा. विश्वासात आल्यावर इंद्र शत्रूचा नाश करील.

कपटावाचून तो वधला जाणार नाही. तसेच प्रेममय स्तोत्रे गाऊन तुम्ही त्या भगवतीला शरण जा. ती योगमाया देवांना साहाय्य करण्यास तत्पर आहे. म्हणून हे इंद्रा, तू तिची आराधना कर. ती महामाया मोहिनी त्या वृत्राला मोहित करील. नंतर आपले कार्य सिद्ध होईल.''

असे भगवान विष्णूने सांगितल्यावर सर्व देव मेरुपर्वतावर गेले. एकांत स्थल पाहून त्यांनी ध्यान व तप करण्यास प्रारंभ केला. नंतर त्या देवीचे स्तवन केले. देव म्हणाले, ''हे देवी, तू दीनांचे दुःख नाहीसे करतेस. सांप्रत वृत्रासुराच्या त्रासामुळे आम्ही तुला शरण आलो आहोत. हे देवी, तू आमचे रक्षण कर. तू सर्वज्ञ असताना पुत्रतुल्य आमची उपेक्षा का करतेस ?

तू या त्रैलोक्याला, आम्हालाही निर्माण करतेस. सर्व देव तुझ्या केवळ नेत्रकटाक्षानेच विहार करतात. माता आपल्या अपराधी पुत्रांनाही संकटप्रसंगी दूर करीत नाही. हे दयानिधे, आम्ही निरपराधी देव सांप्रत तुला शरण आहोत. मग आमचे रक्षण तू का करीत नाहीस ?

तुझ्या चरणसेवेमुळेच आम्हाला महत्त्व प्राप्त झाले आहे. हे जननी, आम्ही ऐश्वर्यात निमग्न झालो. मोहामुळे आम्हाला तुझे विस्मरण झाले. पण तू आमच्यावर दया कर.

हे जननी, आजपर्यंत कित्येक बलाढय दानवांचा तू आमच्या रक्षणासाठी रणात वध केला, असे असताना त्या वृत्राचा वध तू का करीत नाहीस ?

त्या बलाढय शुंभनिशुंभांना तू पूर्वी वधलेस. सांप्रत या वृत्राचा वध कर. वृत्रामुळे भयाने व्याप्त झालेल्या आम्हा देवांचे रक्षण कर. आमचे दुःख नाश करणारा तुझ्याशिवाय कोणी नाही. हे भवानी, तुला वृत्राबद्दल दया वाटत असेल, पण त्या जगाला दुःख देणार्‍या दुष्टाचा तू वध कर. आपल्या पवित्र बाणांनी तू त्याचा उद्धार कर.

हे दयाळू माते, देवांच्या शत्रूंना तू तुझ्या पवित्र बाणांनी वधून स्वर्गात पाठविलेस. ते नरकाच्या भीतीपासून मुक्त झाले. तो दुष्ट वृत्र तुझा शत्रु असावा. नाहीतर त्याने देवांना त्रस्त केले नसते.

हे जननी, तुला अवश्यक असलेले सर्व पूजासाहित्य तूच निर्मिलेस. तेव्हा तुझी पूजा कशाने करावी ? शिवाय आम्ही तुझेच अंश आहोत म्हणून इतर विधी न करता आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन आहोत. तुझे चरणकमल म्हणजे भवसागर तरून जाण्याची नौकाच होय.

सर्व वेदवेत्ते यज्ञवेळी तुझे स्मरण करतात. तूच देवांना तृप्त करणारी स्वाहा असून पितृगण व असुरेश्वराला तुष्ट करणारी स्वधा आहेस. मेधा, कांती, शांती, बुद्धी सर्व काही तूच आहेस. तूच तुझ्या भक्तांना सर्व वैभव उत्पन्न करून देतेस.''

अशा रीतीने देवांनी स्तवन केल्यावर देवी प्रकट झाली. ती सडसडीत बांध्याची, सर्व अलंकारमंडित, पाश, अंकुश, वरमुद्रा धारण केलेली अशी सौंदर्यसंपन्न देवी होती.

तिच्या कमरपट्ट्यातील घागर्‍यांचा मंजुळ आवाज येत होता. रत्नजडित मुकुटावर चंद्रकला शोभत होती. पारिजातपुष्पाप्रमाणे तिची कांती होती. रक्त वस्त्र तिने परिधान केले होते. तिने चंदनाची उटी लावली होती. ती शृंगारवेषाने पूर्ण असून प्रसाद देण्यास तत्पर दिसत होती. ती सर्वज्ञ, सर्वकर्ती अशी सच्चिदानंदरूपिणी होती.

ती समोर दिसताच देवांनी वंदन केले. ती म्हणाली, ''आता तुमचे कोणते कार्य आहे" ते सांगा.

देव म्हणाले, ''आम्हाला पीडा देत असलेल्या वृत्राला मोहित करून त्याचा देवांवर विश्वास बसेल असे कर. तसेच शत्रूचा वध करण्याची शक्ती तू आमच्या आयुधांत उत्पन्न कर.''

त्यावर देवी म्हणाली, ''ठीक तर.''

असे आश्वासन देऊन देवी तेथेच गुप्त झाली. देवही संतुष्ट मनाने स्वस्थानी निघून गेले.



अध्याय पाचवा समाप्त


GO TOP