श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
तृतीयोऽध्यायः


ब्रह्मणः समाराधनाय त्वष्ट्रा वृत्रोपदेशवर्णनम्

व्यास उवाच
कृतस्वस्त्ययनो वृत्रो ब्राह्मणैर्वेदपारगैः ।
निर्जगाम रथारूढो हन्तुं शक्रं महाबलः ॥ १ ॥
तदैव राक्षसाः क्रूराः पुरा देवपराजिताः ।
समाजग्मुश्च सेवार्थं वृत्रं ज्ञात्वा महाबलम् ॥ २ ॥
इन्द्रदूतास्तु तं दृष्ट्वा युद्धाय तु समागतम् ।
वेगादागत्य वृत्तान्तं शशंसुस्तस्य चेष्टितम् ॥ ३ ॥
दूता ऊचुः
स्वामिञ्छीघ्रमिहायाति वृत्रो नाम रिपुस्तव ।
बलवान्स्यन्दने रूढस्त्वष्ट्रा चोत्पादितः किल ॥ ४ ॥
अविचारेण नाशार्थं तव क्रोधान्वितेन वै ।
पुत्रघाताभितप्तेन दुःसहो राक्षसैर्युतः ॥ ५ ॥
यत्‍नं कुरु महाभाग शीघ्रमायाति साम्प्रतम् ।
मेरुमन्दरसंकाशो घोरशब्दोऽतिदारुणः ॥ ६ ॥
एतस्मिन्नन्तरे तत्र भीता देवगणा भृशम् ।
आगत्योचुः सुरपतिं शृण्वन्तं दूतभाषितम् ॥ ७ ॥
गणाः ऊचुः
मघवन् दुर्निमित्तानि भवन्ति त्रिदशालये ।
बहूनि भयशंसीनि पक्षिणां विरुतानि च ॥ ८ ॥
काकगृध्रास्तथा श्येनाः कङ्काद्या दारुणाः खगाः ।
रुदन्ति विकृतैः शब्दैरुत्कारैर्भवनोपरि ॥ ९ ॥
चीचीकूचीति निनदान् कुर्वन्ति विहगा भृशम् ।
वाहनानां च नेत्रेभ्यो जलधाराः पतन्त्यधः ॥ १० ॥
श्रूयतेऽतिमहाञ्छब्दो रुदतीनां निशासु च ।
राक्षसीनां महाभाग भवनोपरि दारुणः ॥ ११ ॥
प्रपतन्ति ध्वजास्तूर्णं विना वातेन मानद ।
प्रभवन्ति महोत्पाता दिवि भूम्यन्तरिक्षजाः ॥ १२ ॥
कृष्णाम्बरधरा नार्यो भ्रमन्ति च गृहे गृहे ।
यान्तु यान्तु गृहात्तूर्णं कुर्वन्त्यो विकृताननाः ॥ १३ ॥
रात्रौ स्वप्नेषु कान्तानां सुप्तानां निजमन्दिरे ।
केशाँल्लुनन्ति राक्षस्यो भीषयन्त्यो भृशातुराः ॥ १४ ॥
एवंविधानि देवेश भूकम्पोल्कादयस्तथा ।
गोमायवो रुदन्ति स्म निशायां भवनाङ्गणे ॥ १५ ॥
सरटानां च जालानि प्रभवन्ति गृहे गृहे ।
अङ्गप्रस्फुरणादीनि दुर्निमित्तानि सर्वशः ॥ १६ ॥
व्यास उवाच
इति तेषां वचः श्रुत्वा चिन्तामाप सुरेश्वरः ।
बृहस्पतिं समाहूय पप्रच्छ च मनोगतम् ॥ १७ ॥
इन्द्र उवाच
ब्रह्मन् किमुत घोराणि निमित्तानि भवन्ति वै ।
वाताश्च दारुणा वान्ति प्रपतन्त्युलकाः खतः ॥ १८ ॥
सर्वज्ञोऽसि महाभाग समर्थो विघ्ननाशने ।
बुद्धिमाञ्छास्त्रतत्त्वज्ञो देवतानां गुरुस्तथा ॥ १९ ॥
कुरु शान्तिं विधानज्ञ शत्रुक्षयविधायिनीम् ।
यथा मे न भवेद्दुःखं तथा कार्यं विधीयताम् ॥ २० ॥
बृहस्पतिरुवाच
किं करोमि सहस्राक्ष त्वयाद्य दुष्कृतं कृतम् ।
अनागसं मुनिं हत्वा किं फलं समुपार्जितम् ॥ २१ ॥
अत्युग्रं पुण्यपापानां फलं भवति सत्वरम् ।
विचार्य खलु कर्तव्यं कार्यं तद्‌भूतिमिच्छता ॥ २२ ॥
परोपतापनं कर्म न कर्तव्यं कदाचन ।
न सुखं विन्दते प्राणी परपीडापरायणः ॥ २३ ॥
मोहाल्लोभाद्‌ब्रह्महत्या कृता शक्र त्वयाधुना ।
तस्य पापस्य सहसा फलमेतदुपागतम् ॥ २४ ॥
अवध्यः सर्वदेवानां जातोऽसौ वृत्रसंज्ञकः ।
हन्तुं त्वां स समायाति दानवैर्बहुभिर्वृतः ॥ २५ ॥
आयुधानि च सर्वाणि वज्रतुल्यानि वासव ।
त्वष्ट्रा दत्तानि दिव्यानि गृहीत्वा समुपस्थितः ॥ २६ ॥
समागच्छति दुर्धर्षो रथारूढः प्रतापवान् ।
देवेन्द्र प्रलयं कुर्वन्नास्य मृत्युर्भविष्यति ॥ २७ ॥
कोलाहलस्तदा जातस्तथा ब्रुवति वाक्पतौ ।
गन्धर्वाः किन्नरा यक्षा मुनयश्च तपोधनाः ॥ २८ ॥
सदनानि विहायैवामराः सर्वे पलायिताः ।
तद्‌दृष्ट्वा महदाश्चर्यं शक्रश्चिन्तापरायणः ॥ २९ ॥
आज्ञापयामास तदा सेनोद्योगाय सेवकान् ।
आनयध्वं वसून् रुद्रानश्विनौ च दिवाकरान् ॥ ३० ॥
पूषणं च भगं वायुं कुबेरं वरुणं यमम् ।
विमानेषु समारुह्य सायुधाः सुरसत्तमाः ॥ ३१ ॥
समागच्छन्तु तरसा शत्रुरायाति साम्प्रतम् ।
इत्याज्ञाप्य सुरपतिः समारुह्य गजोत्तमम् ॥ ३२ ॥
बृहस्पतिं पुरोधाय निर्गतो निजमन्दिरात् ।
तथैव त्रिदशाः सर्वे स्वं स्वं वाहनमास्थिताः ॥ ३३ ॥
युद्धाय कृतसंकल्पा निर्ययुः शस्त्रपाणयः ।
वृत्रोऽथ दानवैर्युक्तः सम्प्राप्तो मानसोत्तरम् ॥ ३४ ॥
पर्वतं देवतावासं रम्यं पादपशोभितम् ।
इन्द्रोऽप्यागत्य संग्रामं चकार मानसोत्तरे ॥ ३५ ॥
पर्वते देवतायुक्तो वाचस्पतिपुरःसरः ।
तत्राभूद्दारुणं युद्धं वृत्रवासवयोस्तदा ॥ ३६ ॥
गदासिपरिघैः पाशैर्बाणैः शक्तिपरश्वधैः ।
मानुषेण प्रमाणेन संग्रामः शरदां शतम् ॥ ३७ ॥
बभूव भयदो नॄणामृषीणां भावितात्मनाम् ।
वरुणः प्रथमं भग्नस्ततो वायुगणः किल ॥ ३८ ॥
यमो विभावसुः शक्रः सर्वे ते निर्गता रणात् ।
पलायनपरान् दृष्ट्वा देवानिन्द्रपुरोगमान् ॥ ३९ ॥
वृत्रोऽपि पितरं प्रागादाश्रमस्थं मुदान्वितम् ।
प्रणम्य प्राह त्वष्टारं पितः कार्यं मया कृतम् ॥ ४० ॥
देवा विनिर्जिताः सर्वे सेन्द्राः समरसंस्थिताः ।
विद्रुतास्ते गताः स्थानं यथा सिंहान्मृगा गजाः ॥ ४१ ॥
इन्द्रः पदातिरगमन्मयानीतो गजोत्तमः ।
ऐरावतोऽयं भगवन् गृहाण द्विरदोत्तमम् ॥ ४२ ॥
न हतास्ते मया यस्मादयुक्तं भीतमारणम् ।
आज्ञापय पुनस्तात किं करोमि तवेप्सितम् ॥ ४३ ॥
निर्जरा निर्गताः सर्वे भयभीता श्रमातुराः ।
इन्द्रोऽप्यैरावतं त्यक्त्वा भयभीतः पलायितः ॥ ४४ ॥
व्यास उवाच
इति पुत्रवचः श्रुत्वा त्वष्टा प्राह मुदान्वितः ।
पुत्रवानद्य जातोऽस्मि सफलं मम जीवितम् ॥ ४५ ॥
त्वयाहं पावितः पुत्र गतो मे मानसो ज्वरः ।
निश्चलं मे मनो जातं दृष्ट्वा वीर्यं तवाद्‌भुतम् ॥ ४६ ॥
शृणु वक्ष्याम्यहं पुत्र हितं तेऽद्य निशामय ।
तपः कुरु महाभाग सावधानः स्थिरासनः ॥ ४७ ॥
विश्वासो नैव कर्तव्यः केषाञ्चित्पाकशासनः ।
शत्रुस्ते छलकर्तास्ति नानाभेदविशारदः ॥ ४८ ॥
तपसा प्राप्यते लक्ष्मीस्तपसा राज्यमुत्तमम् ।
तपसा बलवृद्धिः स्यात्संग्रामे विजयस्तथा ॥ ४९ ॥
आराध्य द्रुहिणं देवं लब्ध्वा वरमनुत्तमम् ।
जहि शक्रं दुराचारं ब्रह्महत्यासमावृतम् ॥ ५० ॥
सावधानः स्थिरो भूत्वा दातारं भज शङ्करम् ।
वाञ्छितं स वरं दद्यात्सन्तुष्टश्चतुराननः ॥ ५१ ॥
तोषयित्वा विश्वयोनिं ब्रह्माणममितौजसम् ।
अविनाशित्वमासाद्य जहि शक्रं कृतागसम् ॥ ५२ ॥
वैरं मनसि मे पुत्र वर्तते सुतघातजम् ।
न शान्तिमनुगच्छामि न स्वपामि सुखेन ह ॥ ५३ ॥
तापसो मे हतः पुत्रो निरागाः पाप्मना यतः ।
न विन्दामि सुखं वृत्र त्वं मामुद्धर दुःखितम् ॥ ५४ ॥
व्यास उवाच
तदाकर्ण्य पितुर्वाक्यं वृत्रः क्रोधयुतस्तदा ।
आज्ञामादाय च पितुर्जगाम तपसे मुदा ॥ ५५ ॥
गन्धमादनमासाद्य पुण्यां देवधुनीं शुभाम् ।
स्नात्वा कुशासनं कृत्वा संस्थितश्च स्थिरासनः ॥ ५६ ॥
त्यक्त्वान्नं वारिपानं च योगाभ्यासपरायणः ।
ध्यायन्विश्वसृजं चित्ते सोपविष्टः स्थिरासने ॥ ५७ ॥
मघवा तं तपस्यन्तं ज्ञात्वा चिन्तातुरो ह्यभूत् ।
गन्धर्वान्प्रेषयामास विघ्नार्थं पाकशासनः ॥ ५८ ॥
यक्षांश्च पन्नगान्सर्पान्किन्नरानमितौजसः ।
विद्याधरानप्सरसो देवदूताननेकशः ॥ ५९ ॥
उपायास्तैः कृताः सम्यक् तपोविघ्नाय मायिभिः ।
न चचाल ततो ध्यानात्त्वाष्ट्रः परमतापसः ॥ ६० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्या
संहितायां षष्ठस्कन्धे ब्रह्मणः समाराधनाय
त्वष्ट्रा वृत्रोपदेशवर्णनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥


वृत्रासुराचा देवांवर विजय -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांनी वृत्राचे स्वस्तिवाचन केले. नंतर तो महाबलाढय वृत्र रथारूढ होऊन इंद्राच्या वधासाठी निघाला. तेव्हा कित्येक राक्षस देवांच्या द्वेषाने त्याला येऊन मिळाले. ते पाहून इंद्राच्या दूताने इंद्राला हा वृत्तांत निवेदन केला.

दूत इंद्राला सविस्तर घटना सांगत असता देवगण भयभीत होऊन इंद्राकडे आले. ते म्हणाले, "हे इंद्रा, अशुभ पक्ष्यांचे ध्वनी व दुश्चिन्हे स्वर्गात होत आहेत. काक, गृध्र, श्येन, कंक वगैरे पक्षी विकृत सुरात ओरडत आहेत.

रात्री प्रचंड राक्षसी गृहावर बसून भयंकर शब्द करीत असतात. स्वर्ग, पृथ्वी, अंतरिक्ष यांत उत्पात होत आहेत. अक्राळविक्राळ कृष्णवर्णी स्त्रिया "घरातून निघून जा" असे सांगत असतात. राक्षस स्वप्नात येऊन केश उपटीत असतात.

हे सुरेश्वरा, भूकंप, उल्कापात, कोल्ह्यांचे ओरडणे सारखे चालू आहे. घरोघर सर्प निघत आहेत. अशाप्रकारे दुश्चिन्हे होत आहेत.''

असे देवगणांचे भाषण ऐकल्यावर इंद्र भयग्रस्त झाला. त्याने बृहस्पतीला विचारले, "ब्रह्मन्, काय भयंकर दुश्चिन्हांचे कारण तसेच यावर उपाय काय ? आपण हे सत्वर सांगा.''

बृहस्पती म्हणाला, ''सहस्राक्षा तुझ्या घोर पापाचे हे फल आहे. म्हणून विचारपूर्वक कर्म करावे. दुसर्‍याला ताप होईल असे कर्म करू नये. दुसर्‍याला पीडा देणार्‍याचे कधीही भले होत नाही. हे इंद्रा, तू केलेल्या ब्रह्महत्येमुळे तुला हे फल प्राप्त झाले आहे. हा वृत्रासुर देवांना अवध्य आहे.

त्याच्याबरोबर अनेक दानव येत आहेत. त्याला जिंकण्यास अथवा वधण्यास कोणीही समर्थ नाही.''

बृहस्पतीच्या भाषणाने स्वर्गात एकच गोंधळ उडाला. गंधर्व, यक्ष, किन्नर, मुनी, तपस्वी, देव आपापली स्थाने सोडून पळून गेले. तेव्हा इंद्राने सैन्याला सज्ज रहाण्याची आज्ञा दिली. इंद्र म्हणाला, "हे सेवकांनो, वसू, रुद्र, अश्विनीकुमार, वरुण, आदित्य, पूषा, भग, वायू, कुबेर, यम या सर्वांनी युद्धसाहित्य घेऊन विमानांतून रणांगणावरून जावे.''

स्वत: इंद्र गजारुढ झाला. इकडे वृत्रही मानसोत्तर पर्वतावर आला. इंद्रही समोर येऊन संग्रामास सिद्ध झाला.

दोघांचे शंभर वर्षे युद्ध झाले. त्या भयंकर युद्धात वरुण, वायुगण, यम, सूर्य यांचा क्रमाक्रमाने पराभव झाला. इंद्रही पराभूत होऊन तेथून निघून गेला. तेव्हा सर्व देव पळून गेल्याचे अवलोकन करून वृत्रासुर आनंदाने पित्याकडे आला. तो पित्याला म्हणाला, "तात, मी इंद्रादी देवांना युद्धात जिंकून आपले कार्य केले आहे. सिंहाला पाहून भिऊन पळणार्‍या मृगाप्रमाणे इंद्र पळाला. मी इंद्राचा सुंदर गज आणला आहे. हा पाहा ऐरावत. भ्यालेल्याला मारू नये म्हणून मी त्याचा वध केला नाही. आता आपली दुसरी काय आज्ञा आहे हे सांगा.''

ते ऐकून त्वष्टा आनंदाने म्हणाला, "आज माझे जीवन सफल झाले. तू माझा उद्धार केलास. हे पुत्रा, आता हितावह गोष्ट ऐक. तू आता स्थिर होऊन तप कर. कोणावरही विश्वास ठेवू नकोस. कारण इंद्र कपटी असून तुझा शत्रू आहे.

तपश्चर्येमुळे लक्ष्मी, राज्य, बल हे सर्व प्राप्त होते. तू ब्रह्मदेवाची आराधना करून वर प्राप्त करून घे. ब्रह्महत्येचे पातक केलेल्या इंद्राचा वध कर. इंद्राने तुझ्या भावाचा वध केल्यामुळे तो माझा शत्रु आहे. माझ्या निरपराधी व तपस्वी पुत्रांचा वध इंद्राने केल्यामुळे मी दुःखी आहे. म्हणून तू माझे दुःख नष्ट कर.''

पित्याच्या या भाषणाने क्रुद्ध झालेला वृत्र तपासाठी अरण्यात निघून गेला. गंधमादन पर्वतावर जाऊन त्याने गंगेत स्नान केले. अन्न व उदक वर्ज्य करून तो दारुण तप करू लागला, व वृत्राचे तप पाहून इंद्र घाबरला. त्यात विघ्न आणावे म्हणून त्याने मायावी गंधर्वांकडे जाऊन उपाय योजले. पण वृत्रासूर तपापासून ढळला नाही.



अध्याय तिसरा समाप्त


GO TOP