श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
त्रिंशोऽध्यायः


युद्धात्प्रत्यागतानां रक्षसां शुम्भाय वार्तावर्णनम्

व्यास उवाच
निशुम्भो निश्चयं कृत्वा मरणाय जयाय वा ।
सोद्यमः सबलः शूरो रणे देवीमुपाययौ ॥ १ ॥
तमाजगाम शुम्भोऽपि स्वबलेन समावृतः ।
प्रेक्षकोऽभूद्‌रणे राजा संग्रामरसपण्डितः ॥ २ ॥
गगने संस्थिता देवास्तदाभ्रपटलावृताः ।
दिदृक्षवस्तु संग्रामे सेन्द्रा यक्षगणास्तथा ॥ ३ ॥
निशुम्भोऽथ रणे गत्वा धनुरादाय शार्ङ्गकम् ।
चकार शरवृष्टिं स भीषयञ्जगदम्बिकाम् ॥ ४ ॥
मुञ्चन्तं शरजालानि निशुम्भं चण्डिका रणे ।
वीक्ष्यादाय धनुः श्रेष्ठं जहास सुस्वरं मुहुः ॥ ५ ॥
उवाच कालिकां देवी पश्य मूर्खत्वमेतयोः ।
मरणायागतौ कालि मत्समीपमिहाधुना ॥ ६ ॥
दृष्ट्वा दैत्यवधं घोरं रक्तबीजात्ययं तथा ।
जयाशां कुरुतस्त्वेतौ मोहितौ मम मायया ॥ ७ ॥
आशा बलवती ह्येषा न जहाति नरं क्वचित् ।
भग्नं हृतबलं नष्टं गतपक्षं विचेतनम् ॥ ८ ॥
आशापाशनिबद्धौ द्वौ युद्धाय समुपागतौ ।
निहन्तव्यौ मया कालि रणे शुम्भनिशुम्भकौ ॥ ९ ॥
आसन्नमरणावेतौ सम्प्राप्तौ दैवमोहितौ ।
पश्यतां सर्वदेवानां हनिष्याम्यहमद्य तौ ॥ १० ॥
व्यास उवाच
इत्युक्त्वा कालिकां चण्डी कर्णाकृष्टशरोत्करैः ।
छादयामास तरसा निशुम्भं पुरतः स्थितम् ॥ ११ ॥
दानवोऽपि शरांस्तस्याश्चिच्छेद निशितैः शरैः ।
तयोः परस्परं युद्धं बभूवातिभयानकम् ॥ १२ ॥
केसरी केशजालानि धुन्वानः सैन्यसागरम् ।
गाहयामास बलवान्सरसीं वारणो यथा ॥ १३ ॥
नखैर्दन्तप्रहारैस्तु दानवान्पुरतः स्थितान् ।
चखाद च विशीर्णाङ्गान् गजानिव मदोत्कटान् ॥ १४ ॥
एवं विमथ्यमाने तु सैन्ये केसरिणा तदा ।
अभ्यधावन्निशुम्भोऽथ विकृष्टवरकार्मुकः ॥ १५ ॥
अन्येऽपि क्रुद्धा दैत्येन्द्रा देवीं हन्तुमुपाययुः ।
सन्दष्टदन्तरसना रक्तनेत्रा ह्यनेकशः ॥ १६ ॥
तत्राजगाम तरसा शुम्भः सैन्यसमावृतः ।
निहत्य कालिकां कोपाद्‌ग्रहीतुं जगदम्बिकाम् ॥ १७ ॥
तत्रागत्य ददर्शाजावम्बिकाञ्च पुरःस्थिताम् ।
रौद्ररसयुतां कान्तां शृङ्गाररससंयुताम् ॥ १८ ॥
तां वीक्ष्य विपुलापाङ्गीं त्रैलोक्यवरसुन्दरीम् ।
सुरक्तनयनां रम्यां क्रोधरक्तेक्षणां तथा ॥ १९ ॥
विवाहेच्छां परित्यज्य जयाशां दूरतस्तथा ।
मरणे निश्चयं कृत्वा तस्थावाहितकार्मुकः ॥ २० ॥
तं तथा दानवं देवी स्मितपूर्वमिदं वचः ।
बभाषे शृण्वतां तेषां दैत्यानां रणमस्तके ॥ २१ ॥
गच्छध्वं पामरा यूयं पातालं वा जलार्णवम् ।
जीविताशां स्थिरां कृत्वा त्यक्त्वात्रैवायुधानि च ॥ २२ ॥
अथवा मच्छराघातहतप्राणा रणाजिरे ।
प्राप्य स्वर्गसुखं सर्वे क्रीडन्तु विगतज्वराः ॥ २३ ॥
कातरत्वं च शूरत्वं न भवत्येव सर्वथा ।
ददाम्यभयदानं वै यान्तु सर्वे यथासुखम् ॥ २४ ॥

व्यास उवाच
इत्याकर्ण्य वचस्तस्या निशुम्भो मदगर्वितः ।
निशितं खड्गमादाय चर्म चैवाष्टचन्द्रकम् ॥ २५ ॥
धावमानस्तु तरसासिना सिंहं मदोत्कटम् ।
जघानातिबलान्मूर्ध्नि भ्रामयञ्जगदम्बिकाम् ॥ २६ ॥
ततो देवी स्वगदया वञ्चयित्वासिपातनम् ।
ताडयामास तं बाहोर्मूले परशुना तदा ॥ २७ ॥
खड्गेन निहतः सोऽपि बाहुमूले महामदः ।
संस्तभ्य वेदनां भूयो जघान चण्डिकां तदा ॥ २८ ॥
सापि घण्टास्वनं घोरं चकार भयदं नृणाम् ।
पपौ पुनः पुनः पानं निशुम्भं हन्तुमिच्छती ॥ २९ ॥
एवं परस्परं युद्धं बभूवातिभयप्रदम् ।
देवानां दानवानाञ्च परस्परजयैषिणाम् ॥ ३० ॥
पलादाः पक्षिणः क्रूराः सारमेयाश्च जम्बुकाः ।
ननृतुश्चातिसन्तुष्टा गृध्राः कङ्काश्च वायसाः ॥ ३१ ॥
रणभूर्भाति भूयिष्ठपतितासुरवर्ष्मकैः ।
रुधिरस्रावसंयुक्तैर्गजाश्वदेहसंकुला ॥ ३२ ॥
पतितान्दानवान्दृष्ट्वा निशुम्भोऽतिरुषान्वितः ।
प्रययौ चण्डिकां तूर्णं गदामादाय दारुणाम् ॥ ३३ ॥
सिंहं जघान गदया मस्तके मदगर्वितः ।
प्रहृत्य च स्मितं कृत्वा पुनर्देवीमताडयत् ॥ ३४ ॥
सापि तं कुपितातीव निशुम्भं पुरतः स्थितम् ।
प्रहरन्तं समीक्ष्याथ देवी वचनमब्रवीत् ॥ ३५ ॥
देव्युवाच
तिष्ठ मन्दमते तावद्यावत्खड्गमिदं तव ।
ग्रीवायां प्रेरयाम्यस्माद्‌ गन्तासि यमसादनम् ॥ ३६ ॥
व्यास उवाच
इत्युक्त्वा तरसा देवी कृपाणेन समाहिता ।
चिच्छेद मस्तकं तस्य निशुम्भस्याथ चण्डिका ॥ ३७ ॥
सच्छिन्नमस्तको देव्या कबन्धोऽतीव दारुणः ।
बभ्राम च गदापाणिस्त्रासयन्देवतागणान् ॥ ३८ ॥
देवी तस्य शितैर्बाणैश्चिच्छेद चरणौ करौ ।
पपातोर्व्यां ततः पापी गतासुः पर्वतोपमः ॥ ३९ ॥
तस्मिन्निपतिते दैत्ये निशुम्भे भीमविक्रमे ।
हाहाकारो महानासीत्तत्सैन्ये भयकम्पिते ॥ ४० ॥
त्यक्त्वाऽऽयुधानि सर्वाणि सैनिकाः क्षतजाप्लुताः ।
जग्मुर्बुम्बारवं सर्वे कुर्वाणा राजमन्दिरम् ॥ ४१ ॥
तानागतान्सुसम्प्रेक्ष्य शुम्भः शत्रुनिषूदनः ।
पप्रच्छ क्व निशुम्भोऽसौ कथं भग्नाः पलायिताः ॥ ४२
तच्छ्रुत्वा वचनं राज्ञस्ते प्रोचुः प्रणता भृशम् ।
राजंस्ते निहतो भ्राता शेते समरमूर्धनि ॥ ४३ ॥
तया निपातिताः शूरा ये च तेऽप्यनुजानुगाः ।
वयं त्वां कथितुं सर्वं वृत्तान्तं समुपागताः ॥ ४४ ॥
निशुम्भो निहतस्तत्र तया चण्डिकयाधुना ।
न हि युद्धस्य कालोऽद्य तव राजन् रणाङ्गणे ॥ ४५ ॥
देवकार्यं समुद्दिश्य कापीयं परमाङ्गना ।
हन्तुं दैत्यकुलं नूनं प्राप्तेति परिचिन्तय ॥ ४६ ॥
नैषा प्राकृतयोषैव देवी शक्तिरनुत्तमा ।
अचिन्त्यचरिता क्वापि दुर्ज्ञेया दैवतैरपि ॥ ४७ ॥
नानारूपधरातीव मायामूलविशारदा ।
विचित्रभूषणा देवी सर्वायुधधरा शुभा ॥ ४८ ॥
गहना गूढचरिता कालरात्रिरिवापरा ।
अपारपारगा पूर्णा सर्वलक्षणसंयुता ॥ ४९ ॥
अन्तरिक्षस्थिता देवास्तां स्तुवन्त्यकुतोभयाः ।
देवकार्यञ्च कुर्वाणां श्रीदेवीं परमाद्‌भुताम् ॥ ५० ॥
पलायनं परो धर्मः सर्वथा देहरक्षणम् ।
रक्षिते किल देहेस्मिन्कालेऽस्मत्सुखताङ्गते ॥ ५१ ॥
संग्रामे विजयो राजन् भविता ते न संशयः ।
कालः करोति बलिनं समये निर्बलं क्वचित् ॥ ५२ ॥
तं पुनः सबलं कृत्वा जयायोपदधाति हि ।
दातारं याचकं कालः करोति समये क्वचित् ॥ ५३ ॥
भिक्षुकं धनदातारं करोति समयान्तरे ।
विष्णुः कालवशे नूनं ब्रह्मा वा पार्वतीपतिः ॥ ५४ ॥
इन्द्राद्या निर्जराः सर्वे काल एव प्रभुः स्वयम् ।
तस्मात्कालं प्रतीक्षस्व विपरीतं तवाधुना ॥ ५५ ॥
सम्मुखो देवतानाञ्च दैत्यानां नाशहेतुकः ।
एकैव च गतिर्नास्ति कालस्य किल भूपते ॥ ५६ ॥
नानारूपधराप्यस्ति ज्ञातव्यं तस्य चेष्टितम् ।
कदाचित्सम्भवो नॄणां कदाचित्प्रलयस्तथा ॥ ५७ ॥
उत्पत्तिहेतुः कालोऽन्यः क्षयहेतुस्तथापरः ।
प्रत्यक्षं ते महाराज देवाः सर्वे सवासवाः ॥ ५८ ॥
करदास्ते कृताः पूर्वं कालेन सम्मुखेन च ।
तेनैव विमुखेनाद्य बलिनोऽबलयासुराः ॥ ५९ ॥
निहता नितरां कालः करोति च शुभाशुभम् ।
नैवात्र कारणं काली नैव देवाः सनातनाः ॥ ६० ॥
यथा ते रोचते राजंस्तथा कुरु विमृश्य च ।
कालोऽयं नात्र हेतुस्ते दानवानां तथा पुनः ॥ ६१ ॥
त्वदग्रतो गतः शक्रो भग्नः संख्ये निरायुधः ।
तथा विष्णुस्तथा रुद्रो वरुणो धनदो यमः ॥ ६२ ॥
तथा त्वमपि राजेन्द्र वीक्ष्य कालवशं जगत् ।
पातालं गच्छ तरसा जीवन्भद्रमवाप्स्यसि ॥ ६३ ॥
मृते त्वयि महाराज शत्रवस्ते मुदान्विताः ।
मङ्गलानि प्रगायन्तो विचरिष्यन्ति सर्वतः ॥ ६४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे युद्धात्प्रत्यागतानां रक्षसां
शुम्भाय वार्तावर्णनं नाम त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥


निशुंभाचा मृत्यू -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रणामध्ये गेल्यानंतर धनुष्य हातात घेऊन जगदंबिकेला भेडसावण्याकरता निशुंभाने बाणवृष्टी केली. चंडिकेनेही बाण टाकीत असलेल्या निशुंभाला पाहून आपले धनुष्य हाती घेतले.

ती कालिकेला म्हणाली, "हे काली, ह्यांचा मूर्खपणा पहा. हे दोघेही केवळ मरणाकरताच आले आहेत. अनेक दैत्य वध आणि रक्तबीजाचा नाश अवलोकन करूनही माझ्या मायेने मोहित झाल्यामुळे हे जयाची अशा करीत आहेत. आशा ही बलवत्तर आहे. पुरुष जरी पराजित झाला, त्याचे बल नाहीसे झाले, धुळीला मिळून तो निश्चेष्ट झाला तरी आशा त्याला सोडीत नाही.

हे काली, आशापाशाने जखडून गेलामुळे युद्धाकरता आलेल्या ह्या शुभानिशुंभाचा वध केलाच पाहिजे. हे मुमर्षू मोहित झाल्यामुळे येथे आले आहेत. आज सर्व देवांसमक्ष मी ह्याचा वध करीन."

असे सांगून चंडीने कानापर्यंत धनुष्य ओढून विविध बाणांनी उभ्या असलेल्या निशुंभाला आच्छादित केले. तेव्हा त्या दानवानेही तीक्षा बाणांनी तिचे बाण तोडले. त्यावेळी त्यांच्यामध्ये अतिभयंकर युद्ध झाले.

सरोवरात प्रविष्ट होणार्‍या गजाप्रमाणे तो बलाढ्य सिंहही आपले मानेवरील केश हालवीत सैन्यसागरात प्रविष्ट झाला. नखे व दंतप्रवाह ह्यांच्या योगाने मदमत्त गजांप्रमाणे उभ्या असलेल्या दानवांचे लचके तोडून त्यांना खाऊ लागला. ह्याप्रमाणे तो सिंह सैन्याचा नाश करू लागला. तेव्हा आपले धनुष्य खेचून निशुंभासूर तिकडे धावला. इतरही अनेक क्रुद्ध झालेले दैत्य डोळे लाल करून दातओठ खात देवीचा वध करण्यासाठी पुढे धावले. कालिकेचा वध करून जगदंबिकेला पकडण्याकरता सैन्यासह तो शुंभ वेगाने तेथे गेला. ती रौद्र व शृंगाररसांनी युक्त व सौंदर्यसंपन्न अशी अंबिका त्याच्या दृष्टीस पडली. विस्तीर्ण व आरक्तवर्ण नयन आणि क्रुद्ध दृष्टी ह्यांनी युक्त असलेल्या त्या श्रेष्ठ त्रैलोक्यसुंदरीला अवलोकन करून त्याने विवाहाची इच्छा सोडून दिली. त्याने मरणाचा निश्चय केला व धनुष्य सज्ज करून तो तिच्यापुढे येऊन उभा राहिला.

त्या दानवाला देवी म्हणाली, "हे पामरहो, जीविताची आशा असल्यास ही तुमची सर्व आयुधे तेथेच टाकून द्या. तुम्ही पाताळात अथवा सागरामध्ये जा. हे रुचत नसल्यास माझ्या बाणप्रहारांनी संग्रामामध्ये मी तुमचा वध करीन. स्वर्ग प्राप्त झाल्यावर तुम्ही सर्वच निश्चिंत होऊन तेथे सुखाने क्रीडा करा. भित्रेपणा व शौर्य ही एकत्र रहाणे शक्य नाही. मी तुम्हाला अभयदान देते. तुम्ही सर्वही येथून निघून जा."

हे तिचे भाषण श्रवण करून मदमत्त झालेल्या निशुंभाने आठ चंद्रानी युक्त असलेली ढाल व तीक्ष्ण तरवार हातात घेतली. वेगाने धावत जाऊन मदमत्त सिंहावर व जगदंबिकेवर त्याने खड्गाचा प्रहार केला. परंतु देवीने आपल्या गदेने तो खड्नप्रहार चुकवून कुर्‍हाडीने त्याच्यावर प्रहार केला. त्या मदमत्त असुरावर तिने खड्गप्रहार केला. पण त्या वेदना सहन करून त्याने चंडिकेवर प्रहार केला तेव्हा घोर घंटानाद करून त्या निशुंभाचा वध करण्याचा इच्छेने तिने सुरापान केले.

परस्परांच्या पराजयाची इच्छा करणार्‍या देवदानवांच्या वतीने त्या उभयतांमध्ये भयंकर युद्ध झाले. तेव्हा मांसभक्षक क्रूर पक्षी, श्वान, जंबूक, गुहा, कंक व वायस अतिशय संतुष्ट होऊन नृत्य करू लागले. गज व अश्व यांच्या देहांनी व्याप्त झालेल्या रणभूमीवर रक्तस्रावयुक्त असुरशरीरे इकडे तिकडे पडली.

दानव पडल्याचे अवलोकन करून निशुंभाला क्रोध आला. भयंकर गदा घेऊन तो चंडिकेवर धावला. मदमत्त झालेल्या निशुंभाने सिंहाच्या मस्तकावर गदेचा प्रहार केला आणि देवीवर आघात केला.

तेव्हा देवी अत्यंत क्रुद्ध झाली. प्रहार करण्याच्या उद्देशाने उभा असलेल्या निशुंभाला अवलोकन करून ती म्हणाली, "हे मूढमते, उभा रहा. मी हे खड्ग तुझ्या मानेत खुपसते म्हणजे तू सत्वर यमसदनी जाशील." असे सांगून कालिकादेवीने खड्गाच्या योगाने त्या निशुंभाचे मस्तक तोडले. तेव्हा देवीने शिरच्छेद केला असताही, हातामध्ये गदा घेतलेले ते त्याचे भयंकर धडच देवगणांना त्रस्त करीत सर्वत्र भ्रमण करू लागले. परंतु देवीने तीक्ष्ण बाणांनी त्या धडाचे हातापाय तोडले. तेव्हा तो पर्वततुल्य राक्षस गतप्राण झाला.

ते पाहून शुंभासुर फार खिन्न झाला. परंतु निकराने युद्ध करून या देवीचा आता वध केला पाहिजे असा निश्चय करून तो शस्त्रास्त्रांची तयारी करण्याकरता आपल्या मंदिराकडे गेला. तो भयंकर पराक्रमी निशुंभ दैत्य पडला असता त्याल्या सैन्यामध्ये हाहाःकार उडाला. रक्ताने भरलेले त्याचे सर्वही सैनिक आयुधे टाकून राजमंदिराकडे गेले. ते आलेले पाहून तो शत्रुनाशक शुंभ म्हणाला, "निशुंभ कोठे आहे ? तुम्ही कसे परत आला ?"

हा राजाचा प्रश्न ऐकून सैनिक म्हणाले, "हे राजा, तुझा भ्राता रणभूमीवर मरून पडला आहे. त्या देवीने सर्व शूरांचा व तुझ्या भ्रात्याचा वध केला हे तुला सांगण्यासाठी आम्ही आलो आहे. हे राजा, त्या चंडिकेने निशुंभाचा वध केला. देवकार्यासाठी ही कोणीतरी अनिर्वचनीय स्त्री दैत्यकुलाचा वध करण्याकरताच प्राप्त झाली आहे. दैव तुला अनुकूल नाही.

ही साधारण स्त्री नसून अनुपम देवी शक्ती आहे. हिचे चरित्र अचिंत्य आहे. देवतांनाही हिचा थांग लागणे शक्य नाही. अनेक रूपे, विचित्र भूषणे सर्व आयुधे धारण करणारी ती देवी मायेचे रहस्य जाणण्यास निपुण आहे. तिचे चरित्र गूढ आहे. दुसरी कालरात्रीप्रमाणे ती सर्वलक्षणसंपन्न देवी ज्यांचा अंत लागत नाही त्या सर्वेश्वरांचेही उल्लंघन करणारी आहे. अंतरिक्षामध्ये असलेले सर्व देव निर्भय होऊन देवकार्य करणार्‍या त्या अद्‌भुत श्रीदेवीचे स्तवन करीत आहेत. म्हणून पलायन करणे व देहरक्षण करणे हाच योग्य धर्म होय.

हे राजा, आपल्याला सुखाचा व अनुकूल काल प्राप्त झाल्यानंतर संग्रामामध्ये पुनः तुझा विजय होईल हा काल कधी कधी दात्याला याचक करतो व काही प्रसंगी भिकार्‍यालाच धनदाता करून सोडतो. ब्रह्मा, विष्णु, महेश्वर आणि इंद्रादि सर्व देव कालाधीन आहेत. सारांश, कालच स्वतः प्रभू आहे. सांप्रत तुझा विपरीत काल आहे. म्हणून अनुकूल कालाचीच तू वाट पहा. हे राजा, सांप्रतचा काल देवांना अनुकूल आहे. म्हणून कालगती समजल्याशिवाय कार्य योग्य नाही. तेव्हा कालानुरूप वागावे. पूर्वी काल तुला अनुकूल होता. परंतु तोच काल सांप्रत विमुख झाल्यामुळे आज अबलेने तुझ्या बलाढ्य असुरांचा वध केला आहे. हे शुंभा, शुभ किंवा अशुभ सर्वस्वी कालच करीत असतो. ही काली अथवा सनातन देव हे शुभाशुभाचे कारण नव्हेत.

हे राजा, जो तुला रुचेल तो विचार तू कर. जग कालाधीन आहे असा विचार करून सत्वर पाताळामध्ये जा. अरे, जिवंत राहिलास तर तुझे कल्याण होईल. तू मेल्यानंतर तुझे शत्रू आनंदित होऊन देवांना आनंद होईल. ते पुनः प्रबल होतीत."



अध्याय तिसावा समाप्त

GO TOP