श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
एकोनत्रिंशोऽध्यायः


देव्यासह युद्धकरणाय निशुम्भप्रयाणम्

व्यास उवाच
वरदानमिदं तस्य दानवस्य शिवार्पितम् ।
अत्यद्‌भुततरं राजञ्छ्रुणु तत्प्रब्रवीम्यहम् ॥ १ ॥
तस्य देहाद्‌रक्तबिन्दुर्यदा पतति भूतले ।
समुत्पतन्ति दैतेयास्तद्‌रूपास्तत्पराक्रमाः ॥ २ ॥
असंख्याता महावीर्या दानवा रक्तसम्भवाः ।
प्रभवन्त्विति रुद्रेण दत्तोऽस्त्यत्यद्‌भुतो वरः ॥ ३ ॥
स तेन वरदानेन दर्पितः क्रोधसंयुतः ।
अभ्यगात्तरसा संख्ये हन्तुं देवीं सकालिकाम् ॥ ४ ॥
स दृष्ट्वा वैष्णवीं शक्तिं गरुडोपरिसंस्थिताम् ।
शक्त्या जघान दैत्येन्द्रस्तां वै कमललोचनाम् ॥ ५ ॥
गदया वारयामास शक्तिः सा शक्तिसंयुता ।
अताडयच्च चक्रेण रक्तबीजं महासुरम् ॥ ६ ॥
रथाङ्गहतदेहात्तु बहु सुस्राव शोणितम् ।
वज्राहतगिरेः शृङ्गान्निर्झरा इव गैरिका ॥ ७ ॥
यत्र यत्र यदा भूमौ पतन्ति रक्तबिन्दवः ।
समुत्तस्थुस्तदाकाराः पुरुषाश्च सहस्रशः ॥ ८ ॥
ऐन्द्री तमसुरं घोरं वज्रेणाभिजघान च ।
रक्तबीजं क्रुधाऽऽविष्टा निःससार च शोणितम् ॥ ९ ॥
ततस्तत्क्षतजाज्जाता रक्तबीजा ह्यनेकशः ।
तद्वीर्याश्च तदाकारा सायुधा युद्धदुर्मदाः ॥ १० ॥
ब्रह्माणी ब्रह्मदण्डेन कुपिता ह्यहनद्‌ भृशम् ।
माहेश्वरी त्रिशूलेन दारयामास दानवम् ॥ ११ ॥
नारसिंही नखाघातैस्तं विव्याध महासुरम् ।
अहनत्तुण्डघातेन क्रुद्धा तं राक्षसाधमम् ॥ १२ ॥
कौमारी च तथा शक्त्या वक्षस्येनमताडयत् ।
सोऽपि क्रुद्धः शरासारैर्बिभेद निशितैश्च ताः ॥ १३ ॥
गदाशक्तिप्रहारैस्तु मातॄः सर्वाः पृथक्पृथक् ।
शक्तयस्तं शराघातैर्विव्यधुस्तत्प्रकोपिताः ॥ १४ ॥
तस्य शस्त्राणि चिच्छेद चण्डिका स्वशरैः शितैः ।
जघानान्यैश्च विशिखैस्तं देवी कुपिता भृशम् ॥ १५ ॥
तस्य देहाच्च सुस्राव रुधिरं बहुधा तु यत् ।
तस्मात्तत्सदृशाः शूराः प्रादुरासन्सहस्रशः ॥ १६ ॥
रक्तबीजैर्जगद्व्याप्तं रुधिरौघसमुद्‌भवैः ।
सन्नद्धैः सायुधैः कामं कुर्वद्‌भिर्युद्धमद्‌भुतम् ॥ १७ ॥
प्रहरन्तश्च तान्दृष्ट्वा रक्तबीजाननेकशः ।
भयभीताः सुरास्त्रेसुर्विषण्णाः शोककर्षिताः ॥ १८ ॥
कथमद्य क्षयं दैत्या गमिष्यन्ति सहस्रशः ।
महाकाया महावीर्या दानवा रक्तसम्भवाः ॥ १९ ॥
एकैव चण्डिकात्रास्ति तथा काली च मातरः ।
एताभिर्दानवाः सर्वे जेतव्याः कष्टमेव तत् ॥ २० ॥
निशुम्भो वाथ शुम्भो वा सहसा बलसंवृतः ।
आगमिष्यति संग्रामे ततोऽनर्थो महान्भवेत् ॥ २१ ॥
व्यास उवाच
एवं देवा भयोद्विग्नाश्चिन्तामापुर्महत्तराम् ।
यदा तदाम्बिका प्राह कालीं कमललोचनाम् ॥ २२ ॥
चामुण्डे कुरु विस्तीर्णं वदनं त्वरिता भृशम् ।
मच्छस्त्रपातसम्भूतं रुधिरं पिब सत्वरा ॥ २३ ॥
भक्षयन्ती चर रणे दानवानद्य कामतः ।
हनिष्यामि शरैस्तीक्ष्णैर्गदासिमुसलैस्तथा ॥ २४ ॥
तथा कुरु विशालाक्षि पानं तद्‌रुधिरस्य च ।
बिन्दुमात्रं यथा भूम्यां न पतेदपि साम्प्रतम् ॥ २५ ॥
भक्ष्यमाणास्तदा दैत्या न चोत्पत्स्यन्ति चापरे ।
एवमेषां क्षयो नूनं भविष्यति न चान्यथा ॥ २६ ॥
घातयिष्याम्यहं दैत्यं त्वं भक्षय च सत्वरा ।
पिबन्ती क्षतजं सर्वं यतमानारिसंक्षये ॥ २७ ॥
इत्थं दैत्यक्षयं कृत्वा दत्त्वा राज्यं सुरालयम् ।
इन्द्राय सुस्थिरं सर्वं गमिष्यामो यथासुखम् ॥ २८ ॥
व्यास उवाच
इत्युक्ताम्बिकया देवी चामुण्डा चण्डविक्रमा ।
पपौ च क्षतजं सर्वं रक्तबीजशरीरजम् ॥ २९ ॥
अम्बिका तं जघानाशु खड्गेन मुसलेन च ।
चखाद देहशकलांश्चामुण्डा तान्कृशोदरी ॥ ३० ॥
सोऽपि क्रुद्धो गदाघातैश्चामुण्डां समघातयत् ।
तथापि सा पपावाशु क्षतजं तमभक्षयत् ॥ ३१ ॥
येऽन्ये रुधिरजाः क्रूरा रक्तबीजा महाबलाः ।
तेऽपि निष्पातिताः सर्वे भक्षिता गतशोणिताः ॥ ३२ ॥
कृत्रिमा भक्षिताः सर्वे यस्तु स्वाभाविकोऽसुरः ।
सोऽपि प्रपातितो हत्वा खड्गेनातिविखण्डितः ॥ ३३ ॥
रक्तबीजे हते रौद्रे ये चान्ये दानवा रणे ।
पलायनं ततः कृत्वा गतास्ते भयकम्पिताः ॥ ३४ ॥
हाहेति विब्रुवन्तस्ते शुम्भं प्रोचुः सविह्वलाः ।
रुथिरारक्तदेहाश्च विगतास्त्रा विचेतसः ॥ ३५ ॥
राजन्नम्बिकया रक्तबीजोऽसौ विनिपातितः ।
चामुण्डा तस्य देहात्तु पपौ सर्वं च शोणितम् ॥ ३६ ॥
ये चान्ये दानवाः शूरा वाहनेनातिरंहसा ।
सिंहेन निहताः सर्वे काल्या च भक्षिताः परे ॥ ३७ ॥
वयं त्वां कथितुं राजन्नागता युद्धचेष्टितम् ।
चरितञ्च तथा देव्याः संग्रामे परमाद्‌भुतम् ॥ ३८ ॥
अजेयेयं महाराज सर्वथा दैत्यदानवैः ।
गन्धर्वासुरयक्षैश्च पन्नगोरगराक्षसैः ॥ ३९ ॥
अन्यास्तत्रागता देव्य इन्द्राणीप्रमुखा भृशम् ।
युध्यमाना महाराज वाहनैरायुधैर्युताः ॥ ४० ॥
ताभिः सर्वं हतं सैन्यं दानवानां वरायुधैः ।
रक्तबीजोऽपि राजेन्द्र तरसा विनिपातितः ॥ ४१ ॥
एकापि दुःसहा देवी किं पुनस्ताभिरन्विता ।
सिंहोऽपि हन्ति संग्रामे राक्षसानमितप्रभः ॥ ४२ ॥
अतो विचार्य सचिवैर्यद्युक्तं तद्विधीयताम् ।
न वैरमनया युक्तं सन्धिरेव सुखप्रदः ॥ ४३ ॥
आश्चर्यमेतदखिलं यन्नारी हन्ति राक्षसान् ।
रक्तबीजोऽपि निहतः पीतं तस्यापि शोणितम् ॥ ४४ ॥
अन्ये निपातिता दैत्याः संग्रामेऽम्बिकया नृप ।
चामुण्डया च मांसं वै भक्षितं सकलं रणे ॥ ४५ ॥
वरं पातालगमनं तस्याः सेवाथवा वरा ।
न तु युद्धं महाराज कार्यमम्बिकया सह ॥ ४६ ॥
न नारी प्राकृता ह्येषा देवकार्यार्थसाधिनी ।
मायेयं प्रबला देवी क्षपयन्तीयमुत्थिता ॥ ४७ ॥
व्यास उवाच
इति तेषां वचस्तथ्यं श्रुत्वा कालविमोहितः ।
मुमूर्षुः प्रत्युवाचेदं शुम्भः प्रस्फुरिताधरः ॥ ४८ ॥

शुम्भ उवाच
यूयं गच्छत पातालं शरणं वा भयातुराः ।
हनिष्याम्यहमद्यैव ताञ्च ताश्च समुद्यतः ॥ ४९ ॥
जित्वा सर्वान्सुरानाजौ कृत्वा राज्यं सुपुष्कलम् ।
कथं नारीभयोद्विग्नः पातालं प्रविशाम्यहम् ॥ ५० ॥
निहत्य पार्षदान्सर्वान् रक्तबीजमुखान् रणे ।
प्राणत्राणाय गच्छामि हित्वा किं विपुलं यशः ॥ ५१ ॥
मरणं त्वनिवार्यं वै प्राणिनां कालकल्पितम् ।
तद्‌भयं जन्मनोपात्तं त्यजेत्को दुर्लभं यशः ॥ ५२ ॥
निशुम्भाहं गमिष्यामि रथारूढो रणाजिरे ।
हत्वा तामागमिष्यामि नागमिष्यामि चान्यथा ॥ ५३ ॥
त्वं तु सेनायुतो वीर पार्ष्णिग्राहो भवस्व मे ।
तरसा तां शरैस्तीक्ष्णैर्नारीं नय यमालये ॥ ५४ ॥
निशुम्भ उवाच
अहमद्य हनिष्यामि गत्वा दुष्टाञ्च कालिकाम् ।
आगमिष्याम्यहं शीघ्रं गृहीत्वा तामथाम्बिकाम् ॥ ५५ ॥
मा चिन्तां कुरु राजेन्द्र वराकायास्तु कारणे ।
क्वैषा बाला क्व मे बाहुवीर्यं विश्ववशङ्करम् ॥ ५६ ॥
त्यक्त्वाऽऽर्तिं विपुलां भ्रातर्भुंक्ष भोगाननुत्तमान् ।
आनयिष्याम्यहं कामं मानिनीं मानसंयुताम् ॥ ५७ ॥
मयि तिष्ठति ते राजन्न युक्तं गमनं रणे ।
गत्वाहमानयिष्यामि तवार्थे वै जयश्रियम् ॥ ५८ ॥
व्यास उवाच
इत्युक्त्वा भ्रातरं ज्येष्ठं कनीयान्बलगर्वितः ।
रथमास्थाय विपुलं सन्नद्धः स्वबलावृतः ॥ ५९ ॥
जगाम तरसा तूर्णं सङ्गरे कृतमङ्गलः ।
संस्तुतो बन्दिसूतैश्च सायुधः सपरिष्करः ॥ ६० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे देव्यासह युद्धकरणाय
निशुम्भप्रयाणं नामकोनत्रिंशोऽध्यायः ॥ २९ ॥


रक्तबीजाचा वध -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

त्या दानवश्रेष्ठाला पूर्वी शिवाने वर दिला होता. तो असा की, तुझ्या प्रत्येक रक्तबिंदूतून राक्षस निर्माण होतील, तसेच त्यांच्या रक्तबिंदुपासून पुनः अनेक दानव उत्पन्न होतील. या वरामुळे रक्तबीज मदोन्मत्त होऊन वेगाने रणात उतरला.

गरुडावर आरूढ झालेल्या कमलनयन वैष्णवी शक्तीवर रक्तबीजाने प्रहार केला. पण वैष्णवीने आपल्या गदेने त्या शक्तीचे चूर्ण केले. तिने रक्तबीजावर चक्राचा प्रहार केला. त्यामुळे रक्तबीजाच्या रक्ताचा प्रवाह वाहू लागला. पण त्यामुळे त्याच्या प्रत्येक बिंदूतून राक्षस उत्पन्न होऊ लागले तेव्हा इंद्रायणीने क्रुद्ध होऊन त्या दानवश्रेष्ठावर वज्रप्रहार केला. पण त्यामुळे त्याच्या देहातून पुनः जास्त रक्त वाहू लागले. त्यातून आणखी राक्षस निर्माण होऊ लागले. ते सर्व राक्षस रक्तबीजाप्रमाणेच बलाढ्य होते. तेव्हा ब्राह्मणी क्रुद्ध झाली. तिने ब्रह्मदंडाने त्याच्यावर प्रहार केला. माहेश्वरीने त्रिशूलाचे वार करून त्या राक्षसाला विदीर्ण केले. नारसिंहाने नखांनी त्याला ओरबडले. वाराहीने मुखाने लयाच्यावर प्रहार केले. कौमारीने त्याच्या वक्षस्थलावर असंख्य प्रहार केले.

त्यामुळे रक्तबीज अधिक क्रुद्ध झाला. त्याने त्या देवतांवर वेगवेगळ्या आयुधांनी प्रहार केले. पण चंडिकेने तीक्ष्ण बाणांनी त्याची आयुधे तोडली. पण त्याच्या देहातून जो जो अधिक रक्त वाहू लागे तो तो त्यातून अधिक राक्षस निर्माण होत. रक्तबीजाच्या रक्तबिंदूतून उत्पन्न होणार्‍या राक्षसांनी सर्व जग व्यापले.

ते अनेक रक्तबीज अवलोकन करताच देव भयचकित झाले. ते अत्यंत निराश व शोकमग्न होऊन गेले. ते आपापसात म्हणाले, "अहो, हे हजारो रक्तबीज उत्पन्न होत आहेत. पण येथे ही काली, ही चंडी, इतर देवता या एकट्याच आहेत. आता ह्या सर्व रक्तबीजांच्या सहाय्यासाठी शुभनिशुंभ जर रणात आले तर निभाव लागणे कठीण. खरोखर महाभयंकर संकट उत्पन्न झाले आहे."

अशाप्रकारे देव चिंता करू लागले. तेव्हा कमलनेत्रा अंबिका म्हणाली, "हे चामुंडे, तू सत्वर आपले मुख विस्तृत कर. माझ्या शस्त्रप्रहाराने बाहेर पडणारे रक्त पिऊन टाक." आता यांच्या रक्ताचा एकही बिंदू भूमीवर न पडेल असे कर. म्हणजे हे दैत्य निर्माण होणार नाहीत. आता मी या दैत्यांचा वध करते. आपण दैत्यांचा नाश करू व या त्रैलोक्याचे राज्य आपण इंद्राला अर्पण करू.

नंतर रणांगणात अंबिका रक्तबीजांवर प्रहार करू लागली. त्यांच्या जखमातून निघणारे रक्त काली घटाघट पिऊ लागली. अंबिका खड्ग व मुसल यांचे प्रहार करून कृत्रिम राक्षसांचा वध करू लागली. वधलेल्या राक्षसांना चामुंडाने भक्षण केले. यामुळे राक्षस उत्पन्न होण्याचे थांबले. आता शेवटी फक्त तो श्रेष्ठ रक्तबीजच रणात शिल्लक राहिला. देवीने रक्तबीजाच्या शरीराचे सत्वर तुकडे केले.

कालीने त्याचे रक्त सत्वर प्राशन केले. अशाप्रकारे रक्तबीजाचा वध झाला. त्यामुळे उरलेले दानव पळून गेले. ते थेट शुंभाकडे जाऊन म्हणाले, "हे राजा, रक्तबीजाचा वध झाला. त्याच्या रक्तातून उत्पन्न झालेल्या दानवांना चामुंडाने भक्षण केले. सिंहानेही अनेक दानव ठार केले. आता आम्ही थोडेच शिल्लक आहोत.

हे राजाधिराज, दैत्य, दानव, गंधर्व, असुर, पक्ष, पक्षग, उगा, राक्षस ह्या सर्वांना ती अंबिका अवध्य आहे. रणामध्ये सर्व देवांच्या शक्ती तिला सहाय्य करीत आहेत. तेव्हा अजूनही तू योग्य विचार कर. आता त्या देवीबरोबर वैर न करता सत्वर संधी कर. कारण ती आदिशक्ती असून देवकार्य सिद्धीस नेणारी आहे.

राक्षसांच्या या भाषणामुळे शुंभाचे ओठ क्रोधाने स्फुरण पावले. कालाने मोहित होऊन तो म्हणाला, "हे भेकडांनो, तुम्ही पाताळात जा. स्वपराक्रमाने मी ह्या राज्याचा उपभोग घेतला. एखाद्या क्षुद्र स्त्रीला भिऊन मी पलायन करणार नाही. या रणात केवळ माझ्याचसाठी रक्तबीज वगैरे माझे अनुयायी मृत्युमुखी पडले. आता युद्धात कीर्ती मिळवण्याकरता मरणालाही भिणार नाही. कारण यश दुर्लभ असते.

हे निशुंभ, आता मी रणात जातो. त्या स्त्रीचा वध केल्यावाचून मी परत येणार नाही.

निशुंभ म्हणाला, "आता मीच त्या दुष्ट कालीचा वध करतो. त्या अंबिकेला घेऊन येतो. हे राजेंद्र, तू निश्चिंत अस. अरे, कोणीकडे ती पोरगी आणि कुठे वीर्यवान बाहू ? म्हणून हे बंधो, त्या स्त्रीला आणल्यावर तू तिचा उपभोग घे. तुझ्यासाठी मी त्या जगदात्रीला घेऊन येतो. असे म्हणून तो मदोन्मत्त निशुंभ एका विस्तीर्ण रथावर आरूढ होऊन आपली आयुधे सरसावून वायुवेगाने रणात येऊन उभा राहिला.



अध्याय एकोणतिसावा समाप्त

GO TOP