श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
सप्तविंशोऽध्यायः


रक्तबीजद्वारा देवीसमीपे शुम्भनिशुम्भसंवादवर्णनम्

व्यास उवाच
हतौ तौ दानवौ दृष्ट्वा हतशेषाश्च सैनिकाः ।
पलायनं ततः कृत्वा जग्मुः सर्वे नृपं प्रति ॥ १ ॥
भिन्नाङ्गा विशिखैः केचित्केचिच्छिन्नकरास्तथा ।
रुधिरस्रावदेहाश्च रुदन्तोऽभिययुः पुरे ॥ २ ॥
गत्वा दैत्यपतिं सर्वे चक्रुर्बुम्बारवं मुहुः ।
रक्ष रक्ष महाराज भक्षयत्यद्य कालिका ॥ ३ ॥
तया हतौ महावीरौ चण्डमुण्डौ सुरार्दनौ ।
भक्षिताः सैनिकाः सर्वे वयं भग्ना भयातुराः ॥ ४ ॥
भीतिदञ्च रणस्थानं कृतं कालिकया प्रभो ।
पातितैर्गजवीराश्वैर्दासेरकपदातिभिः ॥ ५ ॥
शोणितौघवहा कुल्या कृता मांसातिकर्दमा ।
केशशैवलिनी भग्नरथचक्रविराजिता ॥ ६ ॥
छिन्नबाह्वादिमत्स्याढ्या शीर्षतुम्बीफलान्विता ।
भयदा कातराणां वै सुराणां मोदवर्धिनी ॥ ७ ॥
कुलं रक्ष महाराज पातालं गच्छ सत्वरम् ।
क्रुद्धा देवी क्षयं सद्यः करिष्यति न संशयः ॥ ८ ॥
सिंहोऽपि भक्षयत्याजौ दानवान्दनुजेश्वर ।
तथैव कालिका देवी हन्ति बाणैरनेकधा ॥ ९ ॥
तस्मात्त्वमपि राजेन्द्र मरणाय मृषा मतिम् ।
करोषि सहितो भ्रात्रा शुम्भेन कुपिताशयः ॥ १० ॥
किं करिष्यति नार्येषा क्रूरा कुलविनाशिनी ।
यस्या हेतोर्महाराज हन्तुमिच्छसि बान्धवान् ॥ ११ ॥
दैवाधीनौ महाराज लोके जयपराजयौ ।
अल्पार्थाय महद्दुःखं बुद्धिमान्न प्रकल्पयेत् ॥ १२ ॥
चित्रं पश्य विधेः कर्म यदधीनं जगत् प्रभो ।
निहता राक्षसाः सर्वे स्त्रिया पश्यैकयानया ॥ १३ ॥
जेता त्वं लोकपालानां सैन्ययुक्तो हि साम्प्रतम् ।
एका प्रार्थयते बाला युद्धायेति सुसम्भ्रमः ॥ १४ ॥
पुरा त्वया तपस्तप्तं पुष्करे देवतायने ।
वरदानाय सम्प्राप्तो ब्रह्मा लोकपितामहः ॥ १५ ॥
धात्रोक्तस्त्वं महाराज वरं वरय सुव्रत ।
तदा त्वयामरत्वं च प्रार्थितं ब्रह्मणः किल ॥ १६ ॥
देवदैत्यमनुष्येभ्यो न भवेन्मरणं मम ।
सर्पकिन्नरयक्षेभ्यः पुंल्लिङ्गवाचकादपि ॥ १७ ॥
तस्मात्त्वां हन्तुकामैषा प्राप्ता योषिद्वरा प्रभो ।
युद्धं मा कुरु राजेन्द्र विचार्यैवं धियाधुना ॥ १८ ॥
देवी ह्येषा महामाया प्रकृतिः परमा मता ।
कल्पान्तकाले राजेन्द्र सर्वसंहारकारिणी ॥ १९ ॥
उत्पादयित्री लोकानां देवानामीश्वरी शुभा ।
त्रिगुणा तामसी देवी सर्वशक्तिसमन्विता ॥ २० ॥
अजय्या चाक्षया नित्या सर्वज्ञा च सदोदिता ।
वेदमाता च गायत्री सन्ध्या सर्वसुरालया ॥ २१ ॥
निर्गुणा सगुणा सिद्धा सर्वसिद्धिप्रदाव्यया ।
आनन्दानन्ददा गौरी देवानामभयप्रदा ॥ २२ ॥
एवं ज्ञात्वा महाराज वैरभावं त्यजानया ।
शरणं व्रज राजेन्द्र देवी त्वां पालयिष्यति ॥ २३ ॥
आज्ञाकरो भवैतस्याः सञ्जीवय निजं कुलम् ।
हतशेषाश्च ये दैत्यास्ते भवन्तु चिरायुषः ॥ २४ ॥
व्यास उवाच
इति तेषां वचः श्रुत्वा शुम्भः सुरबलार्दनः ।
उवाच वचनं तथ्यं वीरवर्यगुणान्वितम् ॥ २५ ॥
शुम्भ उवाच
मौनं कुर्वन्तु भो मन्दा यूयं भग्ना रणाजिरात् ।
शीघ्रं गच्छत पातालं जीविताशा बलीयसी ॥ २६ ॥
दैवाधीनं जगत्सर्वं का चिन्तात्र जये मम ।
देवास्तथैव ब्रह्माद्या दैवाधीना वयं यथा ॥ २७ ॥
ब्रह्मा विष्णुश्च रुद्रोऽयं यमोऽग्निर्वरुणस्तथा ।
सूर्यश्चन्द्रस्तथा शक्रः सर्वे दैववशाः किल ॥ २८ ॥
का चिन्ता तर्हि मे मन्दा यद्‌भावि तद्‌भविष्यति ।
उद्यमस्तादृशो भूयाद्यादृशी भवितव्यता ॥ २९ ॥
सर्वथैव विचार्यैव न शोचन्ति बुधाः क्वचित् ।
स्वधर्मं न त्यजन्तीह ज्ञानिनो मरणाद्‌भयात् ॥ ३० ॥
सुखं दुःखं तथैवायुर्जीवितं मरणं नृणाम् ।
काले भवति सम्प्राप्ते सर्वथा दैवनिर्मितम् ॥ ३१ ॥
ब्रह्मा पतति काले स्वे विष्णुश्च पार्वतीपतिः ।
नाशं गच्छन्त्यायुषोऽन्ते सर्वे देवाः सवासवाः ॥ ३२ ॥
तथाहमपि कालस्य वशगः सर्वथाधुना ।
नाशं जयं वा गन्तास्मि स्वधर्मपरिपालनात् ॥ ३३ ॥
आहूतोऽप्यनया कामं युद्धायाबलया किल ।
कथं पलायनपरो जीवेयं शरदां शतम् ॥ ३४ ॥
करिष्याम्यद्य संग्रामं यद्‌भावि तद्‌भवत्विह ।
जयो वा मरणं वापि स्वीकरोमि यथा तथा ॥ ३५ ॥
दैवं मिथ्येति विद्वांसो वदन्त्युद्यमवादिनः ।
युक्तियुक्तं वचस्तेषां ये जानन्त्यभिभाषितम् ॥ ३६ ॥
उद्यमेन विना कामं न सिध्यन्ति मनोरथाः ।
कातरा एव जल्पन्ति यद्‌भाव्यं तद्‌भविष्यति ॥ ३७ ॥
अदृष्टं बलवन्मूढाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
प्रमाणं तस्य सत्त्वे किमदृश्यं दृश्यते कथम् ॥ ३८ ॥
अदृष्टं क्त्वापि दृष्टं स्यादेषा मूर्खविभीषिका ।
अवलम्बं विनैवैषा दुःखे चित्तस्य धारणा ॥ ३९ ॥
चक्रीसमीपे संविष्टा संस्थिता पिष्टकारिणी ।
उद्यमेन विना पिष्टं न भवत्येव सर्वथा ॥ ४० ॥
उद्यमे च कृते कार्यं सिद्धिं यात्येव सर्वथा ।
कदाचित्तस्य न्यूनत्वे कार्यं नैव भवेदपि ॥ ४१ ॥
देशं कालञ्च विज्ञाय स्वबलं शत्रुजं बलम् ।
कृतं कार्यं भवत्येव बृहस्पतिवचो यथा ॥ ४२ ॥
व्यास उवाच
इति निश्चित्य दैत्येन्द्रो रक्तबीजं महासुरम् ।
प्रेषयामास संग्रामे सैन्येन महताऽऽवृतम् ॥ ४३ ॥
शुम्भ उवाच
रक्तबीज महाबाहो गच्छ त्वं समराङ्गणे ।
कुरु युद्धं महाभाग यथा ते बलमाहितम् ॥ ४४ ॥
रक्तबीज उवाच
महाराज न ते कार्या चिन्ता स्वल्पतरापि वा ।
अहमेनां हनिष्यामि करिष्यामि वशे तव ॥ ४५ ॥
पश्य मे युद्धचातुर्यं क्वेयं बाला सुरप्रिया ।
दासीं तेऽहं करिष्यामि जित्वेमां समरे बलात् ॥ ४६ ॥
व्यास उवाच
इत्याभाष्य कुरुश्रेष्ठ रक्तबीजो महासुरः ।
जगाम रथमारुह्य स्वसैन्यपरिवारितः ॥ ४७ ॥
हस्त्यश्वरथपादातवृन्दैश्च परिवेष्टितः ।
निर्जगाम रथारूढो देवीं शैलोपरिस्थिताम् ॥ ४८ ॥
तमागतं समालोक्य देवी शङ्खमवादयत् ।
भयदं सर्वदैत्यानां देवानां मोदवर्धनम् ॥ ४९ ॥
श्रुत्वा शङ्खस्वनं चोग्रं रक्तबीजोऽतिवेगवान् ।
गत्वा समीपे चामुण्डां बभाषे वचनं मृदु ॥ ५० ॥
रक्तबीज उवाच
बाले किं मां भीषयसि मत्वा त्वं कातरं किल ।
शङ्खनादेन तन्वङ्‌गि वेत्सि किं धूम्रलोचनम् ॥ ५१ ॥
रक्तबीजोऽस्मि नाम्नाहं त्वत्सकाशमिहागतः ।
युद्धेच्छा चेत्पिकालापे सज्जा भव भयं न मे ॥ ५२ ॥
पश्याद्य मे बलं कान्ते दृष्टा ये कातरास्त्वया ।
नाहं पङ्क्तिगतस्तेषां कुरु युद्धं यथेच्छसि ॥ ५३ ॥
वृद्धाश्च सेविताः पूर्वं नीतिशास्त्रं श्रुतं त्वया ।
पतितं चार्थविज्ञानं विद्वद्‌गोष्ठी कृताथ वा ॥ ५४ ॥
साहित्यतन्त्रविज्ञानं चेदस्ति तव सुन्दरि ।
शृणु मे वचनं पथ्यं तथ्यं प्रमितिबृंहितम् ॥ ५५ ॥
रसानाञ्च नवानां वै द्वावेव मुख्यतां गतौ ।
शृङ्गारकः शान्तिरसो विद्वज्जनसभासु च ॥ ५६ ॥
तयोः शृङ्गार एवादौ नृपभावे प्रतिष्ठितः ।
विष्णुर्लक्ष्म्या सहास्ते वै सावित्र्या चतुराननः ॥ ५७ ॥
शच्येन्द्रः शैलसुतया शङ्करः सह शेरते ।
वल्ल्या वृक्षो मृगो मृग्या कपोत्या च कपोतकः ॥ ५८ ॥
एवं सर्वे प्राणभृतः संयोगरसिका भृशम् ।
अप्राप्तभोगविभवा ये चान्ये कातरा नराः ॥ ५९ ॥
भवन्ति यतयस्ते वै मूढा दैवेन वञ्चिताः ।
असंसाररसज्ञास्ते वञ्चिता वञ्चनापरैः ॥ ६० ॥
मधुरालापनिपुणै रताः शान्तिरसे हि ते ।
क्व ज्ञानं क्व च वैराग्यं वर्तमाने मनोभवे ॥ ६१ ॥
लोभे क्रोधे च दुर्धर्षे मोहे मतिविनाशके ।
तस्मात्त्वमपि कल्याणि कुरु कान्तं मनोहरम् ॥ ६२ ॥
शुम्भं सुराणां जेतारं निशुम्भं वा महाबलम् ।
व्यास उवाच
इत्युक्त्वा रक्तबीजोऽसौ विरराम पुरःस्थितः ।
श्रुत्वा जहास चामुण्डा कालिका चाम्बिका तथा ॥ ६३ ॥
इति श्रमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां पञ्चमस्कन्धे
रक्तबीजद्वारा देवीसमीपे शुम्भनिशुम्भसंवादवर्णनं नाम सस्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥


रक्तबीज युद्धास सिद्ध -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

चंडमुंडाचा वध झाल्यावर उरलेले राक्षस राजाकडे गेले. ते सर्वजण अतिशय जखमी झाले होते. ते रडतच असुरराजाकडे गेले. ते म्हणाले, "हे राजाधिराज, आमचे रक्षण कर. कालिकेने राक्षसांना भक्षण केले. चंडमुंडाचा वध केला. आम्ही घाबरून आपणाकडे आलो आहोत. हे राजा, दानव व अश्वगजादि प्राणी यांच्या रक्ताच्या नद्या वहात आहेत. मांसाचा खच पडला आहे. केसरूपी शेवाळे जिकडे तिकडे पसरले आहे. मस्तके भोपळ्याप्रमाणे इतस्ततः विखुरली आहेत. देवांना सांप्रत आनंद होत आहे.

हे राजाधिराज, आता आमच्या ज्ञातीचे रक्षण करा. ती क्रुद्ध देवी क्षणातच सगळ्यांचा नाश करील. तिचे वाहन सिंह आहे. तोही रणात राक्षसांचे भक्षण करीत आहे. हे राजा, तू भावासह मरणाचा विचार करीत आहेस. आमच्या कुलाचा नाश करीत असलेल्या त्या स्त्रीच्या प्राप्तीसाठी तू आपल्या ज्ञातीचा नाश करू इच्छित आहेस. हे राजेश्वरा, जयापजय दैवाधीन असल्याने फलाची आशा धरून कोणतेही दु:ख देणारे कार्य अंगावर घेऊ नये. हे जग देवाधीन आहे. त्या स्त्रीने सर्व राक्षस वधले. तू आजवर सर्व लोकपालांना जिंकलेस, पण आज ती एकटी स्त्री तुझ्याबरोबर युद्ध करण्यास सिद्ध आहे.

पूर्वी पुष्करतीर्थावर तू तपश्चर्या केल्यावर ब्रह्मदेवाने वर देतांना तुला अमरत्वाविषयी सांगितले. तू तेव्हा म्हणालास, "देव, दैत्य, मानव, सर्प, किन्नर, यक्ष अथवा इतरही पुरुष प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये."

हे राजा, या तुझ्या वरामुळे सांप्रत तुझा नाश करण्यासाठी ही स्त्री प्रकट झाली आहे. म्हणून हे राजेंद्रा, तू युद्ध करण्याचा विचार सोडून दे. हे राजा, सर्वांचा प्रलयकाली सत्वर नाश करणारी ती प्रत्यक्ष मायादेवी आहे. तीच सर्व लोक उत्पन्न करते. ती सुरेश्वरी, शुभ, तामसी व त्रिगुणात्मक आहे. ती सर्व शक्तींनी संपन्न आहे. हे राजा, हे नीट लक्षात घे.

हे राजेंद्रा, ती देवीच नित्य, सर्वज्ञ, अजिंक्य, अक्षय, नेहमी उदित असलेली, गायत्री, वेदमाता, संध्या व देवांचेही अधिष्ठान आहे. ती गौरी निर्गुण व सगुण असून देवांना अभय व सिद्धी देत असते. ती अव्यय, आनंदरूपिनी व आनंददात्री आहे.

असे असल्यामुळे, हे राजा, तू तिच्याशी वैर करू नकोस. तिला शरण जा. ती देवीच तुझे कल्याण करील. तू तिच्या आज्ञेचे पालन केल्यास, आपल्या ज्ञातीला जिवंत करील. आता जे शिल्लक राहिलेले राक्षस आहेत त्यांना तरी तू मृत्यूपासून वाचव."

दैत्यांचे हे भाषण ऐकून शुंभाने वीरांस उचित भाषण केले. तो म्हणाला, "हे मूर्खांनो, तुम्ही पराजित आहात. त्यामुळे तुमच्याजवळ धैर्य नाही. आता तुम्ही स्वस्थ बसा अथवा पातालात जा. सर्व दैवाधीन असल्याने जयपजयाचा विचार का करावा ? ब्रह्मा, विष्णू, महेश हे देवही दैवाधीनच आहेत. म्हणून भवितव्याची काळजी न करता उद्योग करावा.

हे दैत्यांनो, सुख, दु:ख, जन्म, मरण हे सर्व दैवशात घडत असते. म्हणून प्राज्ञजन विचारपूर्वक उद्योग करतात. भित्रे लोक शोक करतात. वेळ आल्यावर ब्रह्मा, विष्णु, महेश देखील नष्ट होतात. इंद्रादि देवांनाही मृत्यु आहे. असे असताना दैवाच्या आधीन असलेल्या माझा जय अथवा नाश झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. क्षुद्र अबलेच्या युद्धाच्या आव्हानामुळे पळून जाणे इष्ट नाही. पलायनामुळे शेकडो वर्षांचे जीवन प्राप्त झाले तरी त्यात काय अर्थ आहे ? तेव्हा संग्राम करून जय अथवा पराजय यांपैकी काहीही स्वीकारण्यास मी सिद्ध आहे. उद्योगी पुरुष तर दैवाला मिथ्या म्हणतात. भित्रे लोक दैवावर अवलंबून रहातात.

तस्मात् उद्योग करणे हेच योग्य आहे. कारण दळणारी बाई जर केवळ जात्यापाशी बराच काळ बसून राहिली, तरी उद्योगाशिवाय पीठ तयार होणार नाही. आता उद्योगात वैगुण्य असल्यास मात्र अपयश निश्चित असते, देश, काल, शत्रूचे बल या सर्वांचा विचार करून कार्य केल्यास सिद्धीस जाते."

अशाप्रकारे त्या दानवश्रेष्ठाने युद्धाचा निश्चय केला. शुंभाने रक्तबीजाबरोबर प्रचंड सैन्य देऊन त्याला युद्धास पाठविले. शुंभ म्हणाला, हे महाभगयवान, तू आपल्या सामर्थ्याप्रमाणे युद्ध कर

हे ऐकून रक्तबीज म्हणाला, "हे राजा, तू निश्चिंत रहा. मी कालीचा वध करून अंबिकेला धरून आणतो व आपले दास्य करायला लावतो."

असे सांगून तो रक्तबीज सैन्यासह रणांगणात गेला. त्याला पाहून देवीने शंखनाद केला. तेव्हा रक्तबीज सत्वर चामुंडेजवळ जाऊन म्हणाला, "हे बालिके, शंखनादाने मला भीती दाखवण्याचा प्रयत्‍न करतेस काय ? माझे नाव रक्तबीज असून मी युद्धास सज्ज आहे. हे मयूरकंठी आता संग्रामातच मी माझे बल दाखवतो. पण हे सुंदरी, तू थोडेसे ऐक.

शृंगाररस व शांतरस हे नवरसांत श्रेष्ठ असून शृंगार रसराज आहे. विष्णु व लक्ष्मी, ब्रह्मदेव व सावित्री, इंद्र व शची, शंकर आणि पार्वती हे नित्य शृंगारात मग्न असतात. ते सर्वदा समागम तत्पर रहातात. तसेच प्राणीही रसिकतेने संभोग करतात. पण मूढमती जन मात्र शांतरसात एकाग्र झालेले असतात.

काम, क्रोध., लोभ, असहिष्णुता, मोह यांनी युक्त झाल्यावर ज्ञान व वैराग्य कसे संभवणार ? देवावर विजय मिळवणारा शुंभ व महाबलाढ्य निशुंभ यांपैकी एकाला तू पती म्हणून स्वीकार.

असे म्हणून रक्तबीज देवीसमोर येऊन उभा राहिला. रक्तबीजाचे भाषण ऐकून अंबिका, चामुंडा व कालिका या मात्र एकमेकीकडे पाहून हेतुपूर्वक हसू लागल्या.



अध्याय सत्ताविसावा समाप्त

GO TOP