श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
षड्‌विंशोऽध्यायः


चण्डमुण्डवधेन देव्याश्चामुण्डेतिनामवर्णनम्

व्यास उवाच
इत्याज्ञप्तौ तदा वीरौ चण्डमुण्डौ महाबलौ ।
जग्मतुस्तरसैवाजौ सैन्येन महतान्वितौ ॥ १ ॥
दृष्ट्वा तत्र स्थितां देवीं देवानां हितकारिणीम् ।
ऊचतुस्तौ महावीर्यौ तदा सामान्वितं वचः ॥ २ ॥
बाले त्वं किं न जानासि शुम्भं सुरबलार्दनम् ।
निशुम्भञ्च महावीर्यं तुराषाड्‌विजयोद्धतम् ॥ ३ ॥
त्वमेकासि वरारोहे कालिकासिंहसंयुता ।
जेतुमिच्छसि दुर्बुद्धे शुम्भं सर्वबलान्वितम् ॥ ४ ॥
मतिदः कोऽपि ते नास्ति नारी वापि नरोऽपि वा ।
देवास्त्वां प्रेरयन्त्येव विनाशाय तवैव ते ॥ ५ ॥
विमृश्य कुरु तन्वङ्‌गि कार्यं स्वपरयोर्बलम् ।
अष्टादशभुजत्वात्त्वं गर्वञ्च कुरुषे मृषा ॥ ६ ॥
किं भुजैर्बहुभिर्व्यर्थैरायुधैः किं श्रमप्रदैः ।
शुम्भस्याग्रे सुराणां वै जेतुः समरशालिनः ॥ ७ ॥
ऐरावतकरच्छेत्तुर्दन्तिदारणकारिणः ।
जयिनः सुरसङ्घानां कार्यं कुरु मनोगतम् ॥ ८ ॥
वृथा गर्वायसे कान्ते कुरु मे वचनं प्रियम् ।
हितं तव विशालाक्षि सुखदं दुःखनाशनम् ॥ ९ ॥
दुःखदानि च कार्याणि त्याज्यानि दूरतो बुधैः ।
सुखदानि च सेव्यानि शास्त्रतत्त्वविशारदैः ॥ १० ॥
चतुरासि पिकालापे पश्य शुम्भबलं महत् ।
प्रत्यक्षं सुरसङ्घानां मर्दनेन महोदयम् ॥ ११ ॥
प्रत्यक्षञ्च परित्यज्य वृथैवानुमितिः किल ।
सन्देहसहिते कार्ये न विपश्चित्प्रवर्तते ॥ १२ ॥
शत्रुः सुराणां परमः शुम्भः समरदुर्जयः ।
तस्मात्त्वां प्रेरयन्त्यत्र देवा दैत्येशपीडिताः ॥ १३ ॥
तस्मात्तद्वचनैः स्निग्धैर्वञ्चितासि शुचिस्मिते ।
दुःखाय तव देवानां शिक्षा स्वार्थस्य साधिका ॥ १४ ॥
कार्यमित्रं परिक्षिप्य धर्ममित्रं समाश्रयेत् ।
देवाः स्वार्थपराः कामं त्वामहं सत्यमब्रुवम् ॥ १५ ॥
भज शुम्भं सुरेशानं जेतारं भुवनेश्वरम् ।
चतुरं सुन्दरं शूरं कामशास्त्रविशारदम् ॥ १६
ऐश्वर्यं सर्वलोकानां प्राप्स्यसे शुम्भशासनात् ।
निश्चयं परमं कृत्वा भर्तारं भज शोभनम् ॥ १७ ॥
व्यास उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा चण्डस्य जगदम्बिका ।
मेघगम्भीरनिनदं जगर्ज पुनरब्रवीत् ॥ १८ ॥
गच्छ जाल्म मृषा किं त्वं भाषसे वञ्चकं वचः ।
त्यक्त्वा हरिहरादींश्च शुम्भं कस्माद्‌भजे पतिम् ॥ १९ ॥
न मे कश्चित्पतिः कार्यो न कार्यं पतिना सह ।
स्वामिनी सर्वभूतानामहमेव निशामय ॥ २० ॥
शुम्भा मे बहवो दृष्टा निशुम्भाश्च सहस्रशः ।
घातिताश्च मया पूर्वं शतशो दैत्यदानवाः ॥ २१ ॥
ममाग्रे देववृन्दानि विनष्टानि युगे युगे ।
नाशं यास्यन्ति दैत्यानां यूथानि पुनरद्य वै ॥ २२ ॥
काल एवागतोऽस्त्यत्र दैत्यसंहारकारकः ।
वृथा त्वं कुरुषे यत्‍नं रक्षणायात्मसन्ततेः ॥ २३ ॥
कुरु युद्धं वीरधर्मरक्षायै त्वं महामते ।
मरणं भावि दुस्त्याज्यं यशो रक्ष्यं महात्मभिः ॥ २४ ॥
किं ते कार्यं निशुम्भेन शुम्भेन च दुरात्मना ।
वीरधर्मं परं प्राप्य गच्छ स्वर्गं सुरालयम् ॥ २५ ॥
शुम्भो निशुम्भश्चैवान्ये ये चात्र तव बान्धवाः ।
सर्वे तवानुगाः पश्चादागमिष्यन्ति साम्प्रतम् ॥ २६ ॥
क्रमशः सर्वदैत्यानां करिष्याम्यद्य संक्षयम् ।
विषादं त्यज मन्दात्मन् कुरु युद्धं विशांपते ॥ २७ ॥
त्वामहं निहनिष्यामि भ्रातरं तव साम्प्रतम् ।
ततः शुम्भं निशुम्भं च रक्तबीजं मदोत्कटम् ॥ २८ ॥
अन्यांश्च दानवान्सर्वान्हत्वाहं समराङ्गणे ।
गमिष्यामि यथास्थानं तिष्ठ वा गच्छ वा द्रुतम् ॥ २९ ॥
गृहाणास्त्रं वृथापुष्ट कुरु युद्धं मयाधुना ।
किं जल्पसि मृषा वाक्यं सर्वथा कातरप्रियम् ॥ ३० ॥
व्यास उवाच
तयेत्थं प्रेरितौ दैत्यौ चण्डमुण्डौ क्रुधान्वितौ ।
ज्याशब्दं तरसा घोरं चक्रतुर्बलदर्पितौ ॥ ३१ ॥
सापि शङ्खस्वनं चक्रे पूरयन्ती दिशो दश ।
सिंहोऽपि कुपितस्तावन्नादं समकरोद्‌बली ॥ ३२ ॥
तेन नादेन शक्राद्या जहर्षुरमरास्तदा ।
मुनयो यक्षगन्धर्वाः सिद्धाः साध्याश्च किन्नराः ॥ ३३ ॥
युद्धं परस्परं तत्र जातं कातरभीतिदम् ।
चण्डिकाचण्डयोस्तीव्रं बाणखड्‍गगदादिभिः ॥ ३४ ॥
चण्डमुक्ताञ्छरान्देवी चिच्छेद निशितैः शरैः ।
मुमोच पुनरुग्रान्सा बाणांश्च पन्नगानिव ॥ ३५ ॥
गगनं छादितं तत्र संग्रामे विशिखैस्तदा ।
शलभैरिव मेघान्ते कर्षकाणां भयप्रदैः ॥ ३६ ॥
मुण्डोऽपि सैनिकैः सार्धं पपात तरसा रणे ।
मुमोच बाणवृष्टिं वै क्रुद्धः परमदारुणः ॥ ३७ ॥
बाणजालं महद्‌ दृष्ट्वा कुद्धा तत्राम्बिका भृशम् ।
कोपेन वदनं तस्या बभूव घनसन्निभम् ॥ ३८ ॥
कदलीपुष्पनेत्रञ्च भृकुटीकुटिलं तदा ।
निष्क्रान्ता च तदा काली ललाटफलकाद्द्रुतम् ॥ ३९ ॥
व्याघ्रचर्माम्बरा क्रूरा गजचर्मोत्तरीयका ।
मुण्डमालाधरा घोरा शुष्कवापीसमोदरा ॥ ४० ॥
खड्गपाशधरातीव भीषणा भयदायिनी ।
खट्वाङ्गधारिणी रौद्रा कालरात्रिरिवापरा ॥ ४१ ॥
विस्तीर्णवदना जिह्वां चालयन्ती मुहुर्मुहुः ।
विस्तारजघना वेगाज्जघानासुरसैनिकान् ॥ ४२ ॥
करे कृत्वा महावीरांस्तरसा सा रुषान्विता ।
मुखे चिक्षेप दैतेयान्पिपेष दशनैः शनैः ॥ ४३ ॥
गजान्घण्टान्वितान्हस्ते गृहीत्वा निदधौ मुखे ।
सारोहान्भक्षयित्वाजौ साट्टहासं चकार ह ॥ ४४ ॥
तथैव तुरगानुष्ट्रांस्तथा सारथिभिः सह ।
निक्षिप्य वक्त्त्रे दशनैश्चर्वयत्यतिभैरवम् ॥ ४५ ॥
हन्यमानं बलं प्रेक्ष्य चण्डमुण्डौ महासुरौ ।
छादयामासतुर्देवीं बाणासारैरनन्तरैः ॥ ४६ ॥
चण्डश्चण्डकरच्छायं चक्रं चक्रधरायुधम् ।
चिक्षेप तरसा देवीं ननाद च मुहुर्मुहुः ॥ ४७ ॥
नदन्तं वीक्ष्य तं काली रथाङ्गञ्च रविप्रभम् ।
बाणेनैकेन चिच्छेद सुप्रभं तत्सुदर्शनम् ॥ ४८ ॥
तं जघान शरैस्तीक्ष्णैश्चण्डं चण्डी शिलाशितैः ।
मूर्च्छितोऽसौ पपातोर्व्यां देवीबाणार्दितो भृशम् ॥ ४९ ॥
पतितं भ्रातरं वीक्ष्य मुण्डो दुःखार्दितस्तदा ।
चकार शरवृष्टिञ्च कालिकोपरि कोपतः ॥ ५० ॥
चण्डिका मुण्डनिर्मुक्तां शरवृष्टिं सुदारुणाम् ।
ईषिकास्त्रैर्बलान्मुक्तैश्चकार तिलशः क्षणात् ॥ ५१ ॥
अर्धचन्द्रेण बाणेन ताडयामास तं पुनः ।
पतितोऽसौ महावीर्यो मेदिन्यां मदवर्जितः ॥ ५२ ॥
हाहाकारो महानासीद्दानवानां बले तदा ।
जहर्षुरमराः सर्वे गगनस्था गतव्यथाः ॥ ५३ ॥
विहाय मूर्च्छां चण्डस्तु संगृह्य महतीं गदाम् ।
तरसा ताडयामास कालिकां दक्षिणे भुजे ॥ ५४ ॥
वञ्चयित्वा गदाघातं तं बबन्ध महासुरम् ।
तरसा बाणपाशेन मन्त्रमुक्तेन कालिका ॥ ५५ ॥
उत्थितस्तु तदा मुण्डो बद्धं दृष्ट्वानुजं बलात् ।
आजगाम सुसन्नद्धः शक्तिं कृत्वा करे दृढाम् ॥ ५६ ॥
आगच्छन्तं तदा काली दानवं वीक्ष्य सत्वरम् ।
बबन्ध तरसा तं तु द्वितीयं भ्रातरं भृशम् ॥ ५७ ॥
गृहीत्वा तौ महावीर्यौ चण्डमुण्डौ शशाविव ।
कुर्वती विपुलं हासमाजगामाम्बिकां प्रति ॥ ५८ ॥
आगत्य तामथोवाच गृहाणेमौ पशू प्रिये ।
रणयज्ञार्थमानीतौ दानवौ रणदुर्जयौ ॥ ५९ ॥
तावानीतौ तदा वीक्ष्य चण्डिका तौ वृकाविव ।
अम्बिका कालिकां प्राह माधुरीसंयुतं वचः ॥ ६० ॥
वधं मा कुरु मा मुञ्च चतुरासि रणप्रिये ।
देवानां कार्यसंसिद्धिः कर्तव्या तरसा त्वया ॥ ६१ ॥

व्यास उवाच
इति तस्या वचः श्रुत्वा कालिका प्राह तां पुनः ।
युद्धयज्ञेऽतिविख्याते खड्गयूपे प्रतिष्ठिते ॥ ६२ ॥
आलम्भञ्च करिष्यामि यथा हिंसा न जायते ।
इत्युक्त्वा सा तदा देवी खड्गेन शिरसी तयोः ॥ ६३ ॥
चकर्त तरसा काली पपौ च रुधिरं मुदा ।
एवं दैत्यौ हतौ दृष्ट्वा मुदितोवाच चाम्बिका ॥ ६४ ॥
कृतं कार्यं सुराणां ते ददाम्यद्य वरं शुभम् ।
चण्डमुण्डौ हतौ यस्मात्तस्मात्ते नाम कालिके ।
चामुण्डेति सुविख्यातं भविष्यति धरातले ॥ ६५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे चण्डमुण्डवधेन
देव्याश्चामुण्डेतिनामवर्णनं नाम षड्‌विंशोऽध्यायः ॥ २६ ॥


चंडमुंडांचा नाश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजाची आज्ञा घेऊन ते महाबलाढ्य दानवश्रेष्ठ चंडमुंड प्रचंड सैन्य घेऊन निघाले. तेथे आल्यावर ते देवीला म्हणाले, "हे बाले, देवांचा पराभव करणार्‍या शुंभाचे आणि इंद्राला जिंकणार्‍या निशुंभाचे सामर्थ्य तुला माहीत नाही काय ? तू एकटी असून कालिका व सिंह एवढेच तुझे सहाय्यकर्ते आहेत. तेव्हा तू शुंभ- निशुंभाचा पराभव कसा करणार ?

हे दुर्बुद्धे, तुला कोणीही सल्ला देणारे दिसत नाही. तुझा नाश व्हावा म्हणून देव तुला प्रेरणा करीत आहेत. तेव्हा बलाबलाचा विचार कर. तुला अठरा हात असल्यामुळे गर्व झाला आहे.

हे सुंदरी, पण शुंभापुढे तुझ्या या हातांचे सामर्थ्य व्यर्थ आहे. म्हणून ऐरावताची शुंडा तोडणारा, गण विदीर्ण करणारा व देवांचा पराभव करणारा जो शुंभ, त्याची इच्छा तू पूर्ण कर. वृथा गर्व करून तू स्वत:चा नाश ओढावून घेऊ नकोस.

हे सुंदरी, हितावह भाषण ऐकून आपण सुख देणार्‍या गोष्टीचा स्वीकार करावा. बलवान शुंभाने देवांचे पूर्णपणे मर्दन केले आहे त्यावरून त्याच्या सामर्थ्याचा विचार कर. त्या दैत्यराजाने देवांना त्रस्त केल्यामुळे ते तुला युद्धाची प्रेरणा देत आहेत. खरोखर ते परिणामी तुझ्या नाशालाच कारणीभूत होतील.

देव स्वार्थी आहेत, तर हा दैत्यराज विजयी, सुंदर, चतुर, शूर व कामशास्त्रनिपुण आहे. म्हणून तू त्यालाच वर. शुंभाची आज्ञा होताच तुला त्रैलोक्याचे ऐश्वर्य मिळेल. म्हणून तू त्या शुंभाचाच पती म्हणून स्वीकार कर."

चंडमुंडाचे भाषण ऐकल्यावर मेघवाणीने जगदंबिका म्हणाली, "हे दुष्टा, येथून सत्वर निघून जा. हरी व हर यांना सोडून मी दुसरा पती का स्वीकारू ? पण हे मूर्खा, मला तर पतीच करायचा नाही. कारण मीच सर्व भूतांची स्वामिनी आहे. मी शुंभनिशुंभासारखे हजारो पाहिले आहेत.

मी प्रत्येक युगात देवगणांचाही नाश झाल्याचे पहात असते. पण सांप्रत मात्र तुम्हा सर्व दैत्यांचा नाश होणार आहे. तेव्हा स्वज्ञातीच्या रक्षणार्थ तू व्यर्थ प्रयत्‍न करू नकोस. युद्ध करून वीर्यधर्माचे रक्षण कर. मरण न चुकवता तू युद्ध करून स्वर्गाला जा म्हणजे तुझी कीर्ती होईल. तुझ्या मागोमाग तुझे अनुयायी व बांधव सर्वजण स्वर्गात येतील.

हे मूढा, सत्वर युद्धास प्रवृत्त हो. मी आता तुम्हा दोघा भावांचा नाश करते. तसेच रक्तबीज व शुंभनिशुंभ यांचा वध करूनच मी स्वस्थानी जाईन. तू असले भित्रे भाषण आता न करता युद्ध कर.

ते ऐकून बलगर्विष्ठ चंडमुंड युद्ध करू लागले. भगवतीच्या शंखनादाने दशदिशा दणाणून गेल्या. एकमेकांच्या खड्गांचे प्रचंड ध्वनी होऊ लागले. प्रथम चंड चंडिकेबरोबर युद्ध करू लागला. चंडाचे बाण देवीने तोडले. भुजंगतुल्य बाणांचा देवीने चंडावर वर्षाव केला. त्या वृष्टीमुळे आकाश व्यापून गेले. ते पाहून मुंड रणात उतरला. त्यानेही अतिशय प्रचंड बाणवृष्टी केली.

तो बाणवर्षाव पाहून अंबिका क्रुद्ध झाली. तिचा चेहरा पश्चिम क्षितिजाकडील मेघाप्रमाणे उज्वल व तांबूस दिसू लागला. नेत्र कर्दलीच्या फुलाप्रमाणे दिसू लागले. तिच्या ललाटस्थानापासून महाभयंकर काली त्याच वेळी बाहेर पडली.

त्यावेळी कालीने व्याघ्रचर्म ल्याले हेते. गजचर्म तिने परिधान केले होते. तिने मुंडमाळ धारण केल्या होत्या. तिच्या हातात खड्‌ग, पाश, खट्‌वांग ही आयुधे होती. कालरात्रीप्रमाणेच ती भयंकर होती. विस्तीर्ण मुखात जीभ वळवळत होती. तिचा श्रोणीप्रदेश विस्तृत होता.

उत्पन्न झाल्याबरोबर कालीने दानवांचा वध करण्यास सुरुवात केली. सापडेल त्या दैत्याला ती तोंडात टाकीत होती. कराल दाढांनी ती त्यांची चूर्ण करीत होती. तिने रक्षकासह हत्तीला भक्षण केले. अश्व, उंट, सारखी दिसेल ते मुखात घालण्याचा तिने सपाटा सुरू केला व त्यांना चावून खाल्ले.

ते सर्व अवलोकन करून चंडमुंडांनी प्रचंड बाणवर्षावाने देवीचे शरीर आच्छादून टाकले. सूर्यासारखे तेजस्वी व सुदर्शन चक्राप्रमाणे असलेले चक्र त्यांनी देवीवर सोडले. पण प्रचंड गर्जना करून देवीने बाणांनी ते चक्र सत्वर मोडून टाकले.

देवीने सोडलेल्या तीक्ष्ण बाणांच्या आघाताने चंड मूर्च्छित पडला. तेव्हा दु:खी व क्रुद्ध झालेल्या मुंडाने देवीवर असंख्य बाण सोडले. पण त्या चंडिकेने आपल्याकडे येणार्‍या बाणांचे प्रतिवर्षाव करून तिळाएवढे तुकडे केले. तिने मुंडावर भयंकर प्रहार करताच तोही भूमीवर कोसळला.

दानवसैन्यात हाहाकार उडाला. देव आनंदित झाले. थोड्याच वेळात शुद्धीवर आल्यावर चंडाने कालिकेच्या उजव्या हातावर प्रचंड गदेचा भयंकर प्रहार केला. पण तो चुकवून त्या कालिकेने त्याला बाण पाशाने बद्ध केले. त्याच वेळी शुद्धीवर आलेल्या मुंडाने तो प्रकार अवलोकन केला. तो त्वरेने प्रचंड शक्ती घेऊन धावला. तेव्हा त्यालाही कालिकेने बद्ध केले.

त्या दोघांनाही बद्ध केल्यावर कालिकेने प्रचंड हास्य केले. कालिका अंबेला म्हणाली, "हे प्रिये, प्रस्तुत रणयज्ञासाठी मी हे दानवरूपी पशू आणले आहेत."

लांडग्याप्रमाणे त्या दानवपशूंना आणलेले पाहून अंबा मधुर स्वरात कालिकेला म्हणाली,

"हे रणप्रिये, तू चतुर आहेस. तू यांना सोडूही नकोस, तसेच यांचा वधही करू नकोस. पण आता मात्र आपल्याला देवांचे कार्य सत्वर सिद्धीला नेले पाहिजे." अंबेचे हेतुपूर्ण भाषण ऐकून कालिका म्हणाली, "आता मी सांगितल्याप्रमाणे कार्य करते. तुझे म्हणणे मला समजले आहे. रणयज्ञात खड्गरूपी यूपाचे उपयोजन केले म्हणजे हिंसा घडणार नाही. मी तसेच करीन." असे म्हणून कालीने खड्गाच्या सहाय्याने दोघांचाही शिरच्छेद केला, त्यांचे रक्त प्राशन केले. ते पाहून अंबेला आनंद झाला. ती कालीला म्हणाली, "हे काली, तू आज देवांचे कार्य केल्यामुळे मी तुला वर देते. तू चुंडमुंडांना वधलेस म्हणून या भूतलावर तू चामुंडा या नावाने प्रसिद्ध होशील."



अध्याय सव्विसावा समाप्त

GO TOP