श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
त्रयोविंशोऽध्यायः


देव्या सुग्रीवदूताय स्वव्रतकथनम्

व्यास उवाच
एवं स्तुता तदा देवी दैवतैः शत्रुतापितैः ।
स्वशरीरात्परं रूपं प्रादुर्भूतं चकार ह ॥ १ ॥
पार्वत्यास्तु शरीराद्वै निःसृता चाम्बिका यदा ।
कौशिकीति समस्तेषु ततो लोकेषु पठ्यते ॥ २ ॥
निःसृतायां तु तस्यां सा पार्वती तनुव्यत्ययात् ।
कृष्णरूपाथ सञ्जाता कालिका सा प्रकीर्तिता ॥ ३ ॥
मषीवर्णा महाघोरा दैत्यानां भयवर्धिनी ।
कालरात्रीति सा प्रोक्ता सर्वकामफलप्रदा ॥ ४ ॥
अम्बिकायाः परं रूपं विरराज मनोहरम् ।
सर्वभूषणसंयुक्तं लावण्यगुणसंयुतम् ॥ ५ ॥
ततोऽम्बिका तदा देवानित्युवाच ह सस्मिता ।
तिष्ठन्तु निर्भया यूयं हनिष्यामि रिपूनिह ॥ ६ ॥
कार्यं वः सर्वथा कार्यं विहरिष्याम्यहं रणे ।
निशुम्भादीन्वधिष्यामि युष्माकं सुखहेतवे ॥ ७ ॥
इत्युक्त्वा सा तदा देवी सिंहारूढा मदोत्कटा ।
कालिकां पार्श्वतः कृत्वा जगाम नगरे रिपोः ॥ ८ ॥
सा गत्वोपवने तस्थावम्बिका कालिकान्विता ।
जगावथ कलं तत्र जगन्मोहनमोहनम् ॥ ९ ॥
श्रुत्वा तन्मधुरं गानं मोहमीयुः खगा मृगाः ।
मुदञ्च परमां प्रापुरमरा गगने स्थिताः ॥ १० ॥
तस्मिन्नवसरे तत्र दानवौ शुम्भसेवकौ ।
चण्डमुण्डाभिधौ घोरौ रममाणौ यदृच्छया ॥ ११ ॥
आगतौ ददृशाते तु तां तदा दिव्यरूपिणीम् ।
अम्बिकां गानसंयुक्तां कालिकां पुरतः स्थिताम् ॥ १२ ॥
दृष्ट्वा तां दिव्यरूपाञ्च दानवौ विस्मयान्वितौ ।
जग्मतुस्तरसा पार्श्वं शुम्भस्य नृपसत्तम ॥ १३ ॥
तौ गत्वा तं समासीनं दैत्यानामधिपं गृहे ।
ऊचतुर्मधुरां वाणीं प्रणम्य शिरसा नृपम् ॥ १४ ॥
राजन् हिमालयात्कामं कामिनी काममोहिनी ।
सम्प्राप्ता सिंहमारूढा सर्वलक्षणसंयुता ॥ १५ ॥
नेदृशी देवलोकेऽस्ति न गन्धर्वपुरे तथा ।
न दृष्टा न श्रुता क्वापि पृथिव्यां प्रमदोत्तमा ॥ १६ ॥
गानञ्च तादृशं राजन् करोति जनरञ्जनम् ।
मृगास्तिष्ठन्ति तत्पार्श्वे मथुरस्वरमोहिताः ॥ १७ ॥
ज्ञायतां कस्य पुत्रीयं किमर्थमिह चागता ।
गृह्यतां राजशार्दूल तव योग्यास्ति कामिनी ॥ १८ ॥
ज्ञात्वाऽऽनय गृहे भार्यां कुरु कल्याणलोचनाम् ।
निश्चितं नास्ति संसारे नारी त्वेवंविधा किल ॥ १९ ॥
देवानां सर्वरत्‍नानि गृहीतानि त्वया नृप ।
कस्मान्नेमां वरारोहां प्रगह्णासि नृपोत्तम ॥ २० ॥
इन्द्रस्यैरावतः श्रीमान्पारिजाततरुस्तथा ।
गृहीतोऽश्वः सप्तमुखस्त्वया नृप बलात्किल ॥ २१ ॥
विमानं वैधसं दिव्यं मरालध्वजसंयुतम् ।
त्वयात्तं रत्‍नभूतं तद्‌बलेन नृप चाद्‌भुतम् ॥ २२ ॥
कुबेरस्य निधिः पद्मस्त्वया राजन् समाहृतः ।
छत्रं जलपतेः शुभ्रं गृहीतं तत्त्वया बलात् ॥ २३ ॥
पाशश्चापि निशुम्भेन भ्रात्रा तव नृपोत्तम ।
गृहीतोऽस्ति हठात्कामं वरुणस्य जितस्य च ॥ २४ ॥
अम्लानपङ्कजां तुभ्यं मालां जलनिधिर्ददौ ।
भयात्तव महाराज रत्‍नानि विविधानि च ॥ २५ ॥
मृत्योः शक्तिर्यमस्यापि दण्डः परमदारुणः ।
त्वया जित्वा हृतः कामं किमन्यद्वर्ण्यते नृप ॥ २६ ॥
कामधेनुर्गहीताद्य वर्तते सागरोद्‌भवा ।
मेनकाद्या वशे राजंस्तव तिष्ठन्ति चाप्सराः ॥ २७ ॥
एवं सर्वाणि रत्‍नानि त्वयात्तानि बलादपि ।
कस्मान्न गृह्यते कान्तारत्‍नमेषा वराङ्गना ॥ २८ ॥
सर्वाणि ते गृहस्थानि रत्‍नानि विशदान्यथ ।
अनया सम्भविष्यन्ति रत्‍नभूतानि भूपते ॥ २९ ॥
त्रिषु लोकेषु दैत्येन्द्र नेदृशी वर्तते प्रिया ।
तस्मात्तामानयाशु त्वं कुरु भार्यां मनोहराम् ॥ ३० ॥
व्यास उवाच
इति श्रुत्वा तयोर्वाक्यं मधुरं मधुराक्षरम् ।
प्रसन्नवदनः प्राह सुग्रीवं सनिधौ स्थितम् ॥ ३१ ॥
गच्छ सुग्रीव दूतत्वं कुरु कार्यं विचक्षण ।
वक्तव्यञ्च तथा तत्र यथाभ्येति कृशोदरी ॥ ३२ ॥
उपायौ द्वौ प्रयोक्तव्यौ कान्तासु सुविचक्षणैः ।
सामदाने इति प्राहुः शृङ्गाररसकोविदाः ॥ ३३ ॥
भेदे प्रयुज्यमानेऽपि रसाभासस्तु जायते ।
निग्रहे रसभङ्गः स्यात्तस्मात्तौ दूषितौ बुधैः ॥ ३४ ॥
सामदानमुखैर्वाक्यैः श्लक्ष्णैर्नर्मयुतैस्तथा ।
का न याति वशे दूत कामिनी कामपीडिता ॥ ३५ ॥
व्यास उवाच
सुग्रीवस्तु वचः श्रुत्वा शुम्भोक्तं सुप्रियं पटु ।
जगाम तरसा तत्र यत्रास्ते जगदम्बिका ॥ ३६ ॥
सोऽपश्यत्सुमुखीं कान्तां सिंहस्योपरिसंस्थिताम् ।
प्रणम्य मधुरं वाक्यमुवाच जगदम्बिकाम् ॥ ३७ ॥
दूत उवाच
वरोरु त्रिदशारातिः शुम्भः सर्वाङ्गसुन्दरः ।
त्रैलोक्याधिपतिः शूरः सर्वजिद्‌राजते नृपः ॥ ३८ ॥
तेनाहं प्रेषितः कामं त्वत्सकाशं महात्मना ।
त्वद्‌रूपश्रवणासक्तचित्तेनातिविदूयता ॥ ३९ ॥
वचनं तस्य तन्वङ्‌गि शृणु प्रेमपुरःसरम् ।
प्रणिपत्य यथा प्राह दैत्यानामधिपस्त्वयि ॥ ४० ॥
देवा मया जिताः सर्वे त्रैलोक्याधिपतिस्त्वहम् ।
यज्ञभागानहं कान्ते गह्णामीह स्थितः सदा ॥ ४१ ॥
हृतसारा कृता नूनं द्यौर्मया रत्‍नवर्जिता ।
यानि रत्‍नानि देवानां तानि चाहृतवानहम् ॥ ४२ ॥
भोक्ताहं सर्वरत्‍नानां त्रिषु लोकेषु भामिनि ।
वशानुगाः सुराः सर्वे मम दैत्याश्च मानवाः ॥ ४३ ॥
त्वद्‌गुणैः कर्णमागत्य प्रविश्य हृदयान्तरम् ।
त्वदधीनः कृतः कामं किङ्करोऽस्मि करोमि किम् ॥ ४४ ॥
त्वमाज्ञापय रम्भोरु तत्करोमि वशानुगः ।
दासोऽहं तव चार्वङ्‌गि रक्ष मां कामबाणतः ॥ ४५ ॥
भज मां त्वं मरालाक्षि तवाधीनं स्मराकुलम् ।
त्रैलोक्यस्वामिनी भूत्वा भुंक्ष्व भोगाननुत्तमान् ॥ ४६ ॥
तव चाज्ञाकरः कान्ते भवामि मरणावधि ।
अवध्योऽस्मि वरारोहे सदेवासुरमानुषैः ॥ ४७ ॥
सदा सौभाग्यसंयुक्ता भविष्यसि वरानने ।
यत्र ते रमते चित्तं तत्र क्रीडस्व सुन्दरि ॥ ४८ ॥
इति तस्य वचश्चित्ते विमृश्य मदमन्थरे ।
वक्तव्यं यद्‌भवेत्प्रेम्णा तद्‌ ब्रूहि मधुरं वचः ॥ ४९ ॥
शुम्भाय चञ्चलापाङ्‌गि तद्‌ब्रवीम्यहमाशु वै ।
व्यास उवाच
तद्दूतवचनं श्रुत्वा स्मितं कृत्वा सुपेशलम् ॥ ५० ॥
तं प्राह मधुरां वाचं देवी देवार्थसाधिका ।

देव्युवाच
जानाम्यहं निशुम्भं च शुम्भं चातिबलं नृपम् ॥ ५१ ॥
जेतारं सर्वदेवानां हन्तारञ्चैव विद्विषाम् ।
राशिं सर्वगुणानाञ्च भोक्तारं सर्वसम्पदाम् ॥ ५२ ॥
दातारं चातिशूरं च सुन्दरं मन्मथाकृतिम् ।
द्वात्रिंशल्लक्षणैर्युक्तमवध्यं सुरमानुषैः ॥ ५३ ॥
ज्ञात्वा समागतास्स्म्यत्र द्रष्टुकामा महासुरम् ।
रत्‍नं कनकमायाति स्वशोभाधिकवृद्धये ॥ ५४ ॥
तत्राहं स्वपतिं द्रष्टुं दूरादेवागतास्मि वै ।
दृष्टा मया सुराः सर्वे मानवा भुवि मानदाः ॥ ५५ ॥
गन्धर्वा राक्षसाश्चान्ये ये चातिप्रियदर्शनाः ।
सर्वे शुम्भभयाद्‌भीता वेपमाना विचेतसः ॥ ५६ ॥
श्रुत्वा शुम्भगुणानत्र प्राप्तास्म्यद्य दिदृक्षया ।
गच्छ दूत महाभाग ब्रूहि शुम्भं महाबलम् ॥ ५७ ॥
निर्जने श्लक्ष्णया वाचा वचनं वचनान्मम ।
त्वां ज्ञात्वा बलिनां श्रेष्ठं सुन्दराणां च सुन्दरम् ॥ ५८ ॥
दातारं गुणिनं शूरं सर्वविद्याविशारदम् ।
जेतारं सर्वदेवानां दक्षं चोग्रं कुलोत्तरम् ॥ ५९ ॥
भोक्तारं सर्वरत्‍नानां स्वाधीनं स्वबलोन्नतम् ।
पतिकामास्म्यहं सत्यं तव योग्या नराधिप ॥ ६० ॥
स्वेच्छया नगरे तेऽत्र समायाता महामते ।
ममास्ति कारणं किञ्चिद्विवाहे राक्षसोत्तम ॥ ६१ ॥
बालभावाद्व्रतं किञ्चित्कृतं राजन्मया पुरा ।
क्रीडन्त्या च वयस्याभिः सहैकान्ते यदृच्छया ॥ ६२ ॥
स्वदेहबलदर्पेण सखीनां पुरतो रहः ।
मत्समानबलः शूरो रणे मां जेष्यति स्फुटम् ॥ ६३ ॥
तं वरिष्याम्यहं कामं ज्ञात्वा तस्य बलाबलम् ।
जहसुर्वचनं श्रुत्वा सख्यो विस्मितमानसाः ॥ ६४ ॥
किमेतया कृतं क्रूरं व्रतमद्‌भुतमाशु वै ।
तस्मात्त्वमपि राजेन्द्र ज्ञात्वा मे हीदृशं बलम् । ६५ ॥
जित्वा मां स्वबलेनात्र वाञ्छितं कुरु चात्मनः ।
त्वं वा तवानुजो भ्राता समेत्य समराङ्गणे ।
जित्वा मां समरेणात्र विवाहं कुरु सुन्दर ॥ ६६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे देव्या सुग्रीवदूताय
स्वव्रतकथनं नाम त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥


शुंभाच्या दूताबरोबर देवीचे भाषण -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अशाप्रकारे देवांनी देवीची स्तुती केल्यावर देवांच्या रक्षणासाठी तत्पर असलेल्या देवीच्या शरीरापासून दुसरे उत्कृष्ट रूप प्रकट झाले. पार्वतीच्या शरीरकोशापासून ती अंबा निघाल्यामुळे सर्वजण तिला कौशिकी असे म्हणतात.

कौशिकीचा अवतार झाल्याबरोबर पार्वती कृष्णरूप झाली. म्हणून ती कालिका या नावाने प्रसिद्ध झाली. दैत्यांचा नाश व देवांचे संरक्षण करणार्‍या त्या महाघोर कृष्णवर्ण देवीला कालरात्री असेही म्हणतात. लावण्याने व भूषणांनी ती झळकू लागली. ती देवी अंबिका हसत म्हणाली, "सुरांनो, तुम्ही निर्भय असा. मी लवकरच तुमच्या शत्रूचा वध करीन. देवकार्य करण्यासाठी मी रणामध्ये सहज क्रीडा करीन आणि शुभनिशुंभादिकांचा नाश करीन. असे म्हणून ती सिंहारूढ देवी कालिकेसह शत्रूच्या नगराकडे गेली.

ती प्रथम उपवनात राहून सर्वांना मोहक असे सुस्वर गायन करू लागली. त्या गायनाने पशुपक्षी मोहित झाले व देव आनंदित झाले. इतक्यात चंड-मुंड हे दोन दैत्य सहजगत्या तेथे आले. तेव्हा या दोन्ही देवी त्यांच्या दृष्टीस पडल्या.

ते सौंदर्यसंपन्न रूप पाहून दोघेही मंत्रमुग्ध झाले आणि ते त्वरित शुंभाकडे जाऊन राजाला म्हणाले, "हे राजा, मदनालाही मोह पडेल अशी सर्वलक्षणसंपत्र स्त्री सिंहारूढ होऊन येथे आली आहे. तिचे सुस्वर गायन गंधर्वच काय पण पृथ्वीवरही कुठे ऐकिवात नाही असे आहे.

हे राजा, सर्वांना तल्लीन करील असे ते गायन ऐकून पशुपक्षीही तिच्या सन्निध उभे राहिले आहेत. हे नृपश्रेष्ठा, ही कोणाची कन्या ? याचा शोध करून तिचा आपण स्वीकार करा. ती आपणासच योग्य आहे. अशा प्रकारची शुभनेत्रा स्त्री जगतात कोठेही नाही.

हे भूपते, आपण देवांचे सर्वस्व हरण केले आहे. तर मग सुंदरींचा स्वीकार का करीत नाही ? आपण इंद्राचा ऐरावत, पारिजात वृक्ष, सप्तमुखी अश्व ही रत्‍ने बलात्काराने हरण केली आहेत. हंसध्वजाने युक्त, दिव्य, अद्‌भुत असे ब्रह्मदेवाचे विमान, कुबेराचा पद्यसंज्ञक निधी, वरुणाचे शुभ्र छत्र, वरुणाचा पाश वगैरे सर्व आपण व आपल्या भ्रात्याने बलात्काराने हरण केले. आपल्या भीतीने सागराने कमलाच्या मालेसह नानाप्रकारची रत्‍ने आपणाला दिली. मृत्यूची शक्ती, यमाचा दंड आपण जिंकलात. कामधेनूही आपण घेतलीत, मेनकादि अप्सराही आपणाला वश झाल्या.

तेव्हा हे दानवश्रेष्ठा, ही रत्‍नरूप स्त्री स्वीकार करण्यास काय हरकत आहे ? हिच्यामुळे आपल्या रत्‍नांकित सुंदर महालाला शोभाच प्राप्त होईल. अशी स्त्री त्रैलोक्यातही नाही. तरी आपण सत्वर त्या स्त्रीला आणून आपली भार्या करा."

याप्रमाणे भाषण ऐकताच शुंभासूर जवळ उभा असलेल्या सुग्रीवाला म्हणाला, "हे सुग्रीवा, तू त्वरित जाऊन हे कार्य कर आणि ती सुंदरी आनंदात येथे येईल असे भाषण कर. पुरुषांनी साम व दाम या दोनच उपायांनी स्त्रियांना आकृष्ट करावे असे शृंगाररस वेत्त्यांचे मत आहे. भेदाने रसभंग होतो व निग्रहाने रसभंग होतो. म्हणून ज्ञानी जनांनी ते दोन्ही मार्ग सदोष मानले आहेत. साम व दाम असलेल्या नर्मयुक्त मधुर भाषणाने कोणती मदनविव्हल स्त्री वश होणार नाही ?"

शुंभाचे हे प्रिय व मनोहर भाषण ऐकून सुग्रीव सत्वर जगदंबिकेकडे गेला. तेव्हा येथे सिंहारूढ झालेली ती सुंदरवंदना स्त्री त्याला दिसली. तिला प्रणाम करून तो मधुर वाणीने म्हणाला, "हे सुंदरी, सौंदर्यसंपन्न व देवांचा शत्रू जो शुंभ राजा हा सांप्रत त्रैलोक्याधिपती आहे. तो शूर असून सर्वांना अजिंक्य आहे. तुझ्या स्वरूपाचे वर्णन ऐकून तो मोहित झाला आहे. त्याने मला तुझ्याकडे पाठविले आहे.

हे सुंदरी, त्या दैत्याने नम्रतापूर्वक तुला उद्देशून केलेले भाषण तू श्रवण कर. तो म्हणाला, 'हे कांते, मी सर्व देवांनाही जिंकले आहे व त्रैलोक्याचे राज्य करीत आहे. मी सांप्रत देवांचे यज्ञभागसुद्धा ग्रहण करीत असतो. स्वर्गलोक निःसत्व व रत्‍नरहित केला आहे. कारण मी सर्वच हरण केले आहे.

हे भामिनी, मी त्रैलोक्यातील सर्व रत्‍नांचा भोक्ता असून सर्व देव, दैत्य, मानव माझ्या आधीन आहेत. तुझे गुण कानी आल्यामुळे मी तुझा दास झालो आहे. तुला हृदयात मी प्रविष्ट केले आहे. ह्यास्तव मी उत्तम काय करावे याची तू आज्ञा कर. तू सांगशील ते मी करीन. हे चारुगात्री, मी तुजपुढे दीन झालो असून कामबाणांपासून तू माझे रक्षण कर.

हे हंसनयने, मदनविव्हल झाल्यामुळे मी तुझा दास झालो आहे. म्हणून माझा स्वीकार करून त्रैलोक्याची स्वामिनी होऊन सर्व विषयोपभोगांचा उपभोग घे. मी आमरणांत तुझ्या आज्ञेत राहीन. मी सर्वांनाच अवध्य असल्याने तू चिरकाल सौभाग्ययुक्त होशील. हे चारुगात्री, तुझे मन जेथे रमेल तेथे तू क्रीडा कर.'

मदमत्त देवी, ह्याप्रमाणे त्याच्या भाषणाचा विचार करून तू प्रेमाने जे सांगायचे असेल ते सांग म्हणजे तू दिलेले उत्तर मी शुंभाला निवेदन करीन."

हे दूताचे भाषण ऐकून देवीने हास्य केले व ती देवकार्यतत्पर देवी मधुर वाणीने म्हणाली, "हे दूता, शुंभ-निशुंभ ह्या भावांचा पराक्रम मला ठाऊक आहे. देवांचा पराजय करणारा तो शत्रूचा घात करणारा आहे. तो सर्वगुणयुक्त असून संपत्तिप्रिय व दातृत्वशील आहे. अतिशय शूर व मदनाप्रमाणे सुंदर आहे. तो बत्तीस लक्षणी असून सर्व पुरुषांना अवध्य आहे. हे समजल्याने मी त्या महादैत्याला अवलोकन करण्यासाठी आले आहे.

अरे, आपली शोभा वाढवावी म्हणून रत्‍न हे नेहमी सुवर्णाकडेच येत असते. म्हणूनच मी आपला पती अवलोकन करण्यासाठी फार लांबून आले आहे. मी भूतलावर असलेले मानव, गंधर्व, राक्षस व इतरही प्रियदर्शनी जन अवलोकन केले, पण ते सर्व शुंभाच्या भीतीने थरथर कापत आहेत. त्यांना काही एक सुचेनासे झाले आहे. शुंभाचे गुण श्रवण करून मी आज त्याला पहाण्याकरता इथवर आले आहे.

म्हणून हे महाभाग्यशाली दूता, तू जाऊन त्या बलाढ्य शुंभाला एकांतात सांगण्यासारखे माझे भाषण कथन कर, "हे भूपते तू बलवानामध्ये श्रेष्ठ, सुंदरांमध्येही सुंदर, दाता, गुणी, शूर, सर्वविद्याविशारद, अजेय, दक्ष, उग्र, कुलीन, सर्व रत्‍नांचा उपभोक्ता, स्वतंत्र व स्वात्वलंबनाने योग्यतेस चढला आहेस. म्हणून तुला पती करण्याची मला खरोखरच इच्छा झाली आहे. मी तुला योग्य आहे.

हे महामते, मी स्वत: होऊन तुजकडे प्राप्त झाले आहे. पण हे राक्षसराज, विवाहसंबंधासाठी मला काही तुला सुचवायचे आहे. पूर्वी मी माझ्या सखीसह क्रीडा करीत असता स्वत:च्या शरीरबलाच्या गर्वामुळे मी पण केला होता. तो असा की, 'जो मजसारखा बलवान व मजबरोबर युद्ध करून मला जिंकेन त्यालाच मी वरीन.' हा माझा पण ऐकून माझ्या सख्या विस्मित झाल्या. कारण मी एकाएकी क्रूर व अद्‌भुत पण केला. म्हणून हे राजा, माझा पण स्वत:च्या बलाने शेवटास ने. तू अथवा निशुंभाने कोणीही मला रणात जिंकावे. नंतरच मी तुझ्याशी विवाह करीन."


अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP