श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
दशमोऽध्यायः


मन्त्रीद्वारा महिषासुरेण देव्या सह विवाहप्रस्तावः

व्यास उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा प्रहस्य प्रमदोत्तमा ।
तमुवाच महाराज मेघगम्भीरया गिरा ॥ १ ॥
देव्युवाच
मन्त्रिवर्य सुराणां वै जननीं विद्धि मां किल ।
महालक्ष्मीमिति ख्यातां सर्वदैत्यनिषूदिनीम् ॥ २ ॥
प्रार्थिताहं सुरैः सर्वैर्महिषस्य वधाय च ।
पीडितैर्दानवेन्द्रेण यज्ञभागबहिष्कृतैः ॥ ३ ॥
तस्मादिहागतास्म्यद्य तद्वधार्थं कृतोद्यमा ।
एकाकिनी न सैन्येन संयुता मन्त्रिसत्तम ॥ ४ ॥
यत्त्वयाहं सामपूर्वं कृत्वा स्वागतमादरात् ।
उक्ता मधुरया वाचा तेन तुष्टास्मि तेऽनघ ॥ ५ ॥
नोचेद्धन्मि दृशा त्वां वै कालाग्निसमया किल ।
कस्य प्रीतिकरं न स्यान्माधुर्यवचनं खलु ॥ ६ ॥
गच्छ तं महिषं पापं वद मद्वचनादिदम् ।
गच्छ पातालमधुना जीवितेच्छा यदस्ति ते ॥ ७ ॥
नोचेत्कृतागसं दुष्टं हनिष्यामि रणाङ्गणे ।
मद्‌बाणक्षुण्णदेहस्त्वं गन्तासि यमसादनम् ॥ ८ ॥
दयालुत्वं ममेदं त्वं विदित्वा गच्छ सत्वरम् ।
हते त्वयि सुरा मूढ स्वर्गं प्राप्स्यन्ति सत्वरम् ॥ ९ ॥
तस्माद्‌ गच्छस्व त्यक्त्वैको मेदिनीञ्च ससागराम् ।
पातालं तरसा मन्द यावद्‌ बाणा न मेऽपतन् ॥ १० ॥
युद्धेच्छा चेन्मनसि ते तर्ह्येहि त्वरितोऽसुर ।
वीरैर्महाबलैः सर्वैर्नयामि यमसादनम् ॥ ११ ॥
युगे युगे महामूढ हतास्त्वत्सदृशाः किल ।
असंख्यातास्तथा त्वां वै हनिष्यामि रणाङ्गणे ॥ १२ ॥
साफल्यं कुरु शस्त्राणां धारणे तु श्रमोऽन्यथा ।
तद्युध्यस्व मया सार्धं समरे स्मरपीडितः ॥ १३ ॥
मा गर्वं कुरु दुष्टात्मन् यन्मेऽस्ति ब्रह्मणो वरः ।
स्त्रीवध्यत्वे त्वया मूढ पीडिताः सुरसत्तमाः ॥ १४ ॥
कर्तव्यं वचनं धातुस्तेनाहं त्वामुपागता ।
स्त्रीरूपमतुलं कृत्वा सत्यं हन्तुं कृतागसम् ॥ १५ ॥
यथेच्छं गच्छ वा मूढ पातालं पन्नगावृतम् ।
हित्वा भूसुरसद्माद्य जीवितेच्छा यदस्ति ते ॥ १६ ॥
व्यास उवाच
इत्युक्तः स ततो देव्या मन्त्रिश्रेष्ठो बलान्वितः ।
प्रत्युवाच निशम्यासौ वचनं हेतुगर्भितम् ॥ १७ ॥
देवि स्त्रीसदृशं वाक्यं ब्रूषे त्वं मदगर्विता ।
क्वासौ क्व त्वं कथं युद्धमसम्भाव्यमिदं किल ॥ १८ ॥
एकाकिनी पुनर्बाला प्रारब्धयौवना मृदुः ।
महिषोऽसौ महाकायो दुर्विभाव्यं हि सङ्गतम् ॥ १९ ॥
सैन्यं बहुविधं तस्य हस्त्यश्वरथसंकुलम् ।
पदातिगणसंविद्धं नानायुधविराजितम् ॥ २० ॥
कः श्रमः करिराजस्य मालतीपुष्पमर्दने ।
मारणे तव वामोरु महिषस्य तथा रणे ॥ २१ ॥
यदि त्वां परुषं वाक्यं ब्रवीमि स्वल्पमप्यहम् ।
शृङ्गारे तद्विरुद्धं हि रसभङ्गाद्‌बिभेम्यहम् ॥ २२ ॥
राजास्माकं सुररिपुर्वर्तते त्वयि भक्तिमान् ।
साममेव मया वाच्यं दानयुक्तं तथा वचः ॥ २३ ॥
नोचेद्धन्म्यहमद्यैव बाणेन त्वां मृषावदाम् ।
मिथ्याभिमानचतुरां रूपयौवनगर्विताम् ॥ २४ ॥
स्वामी मे मोहितः श्रुत्वा रूपं ते भुवनातिगम् ।
तत्प्रियार्थं प्रियं कामं वक्तव्यं त्वयि यन्मया ॥ २५ ॥
राज्यं तव धनं सर्वं दासस्ते महिषः किल ।
कुरु भावं विशालाक्षि त्यक्त्वा रोषं मृतिप्रदम् ॥ २६ ॥
पतामि पादयोस्तेऽहं भक्तिभावेन भामिनि ।
पट्टराज्ञी महाराज्ञो भव शीघ्रं शुचिस्मिते ॥ २७ ॥
त्रैलोक्यविभवं सर्वं प्राप्स्यसि त्वमनाविलम् ।
सुखं संसारजं सर्वं महिषस्य परिग्रहात् ॥ २८ ॥
देव्युवाच
शृणु साचिव वक्ष्यामि वाक्यानां सारमुत्तमम् ।
शास्त्रदृष्टेन मार्गेण चातुर्यमनुचिन्त्य च ॥ २९ ॥
महिषस्य प्रधानस्त्वं मया ज्ञातं धिया किल ।
पशुबुद्धिस्वभावोऽसि वचनात्तव साम्प्रतम् ॥ ३० ॥
मन्त्रिणस्त्वादृशा यस्य स कथं बुद्धिमान्भवेत् ।
उभयोः सदृशो योगः कृतोऽयं विधिना किल ॥ ३१ ॥
यदुक्तं स्त्रीस्वभावासि तद्विचारस्य मूढ किम् ।
पुमान्नाहं तत्स्वभावाभवंस्त्रीवेषधारिणी ॥ ३२ ॥
याचितं मरणं पूर्वं स्त्रिया त्वत्प्रभुणा यथा ।
तस्मान्मन्येऽतिमूर्खोऽसौ न वीररसवित्तमः ॥ ३३ ॥
कामिन्या मरणं क्लीबरतिदं शूरदुःखदम् ।
प्रार्थितं प्रभुणा तेन महिषेणात्मबुद्धिना ॥ ३४ ॥
तस्मात्स्त्रीरूपमाधाय कार्यं कर्तुमुपागता ।
कथं बिभेमि त्वद्वाक्यैर्धर्मशास्त्रविरोधकैः ॥ ३५ ॥
विपरीतं यदा दैवं तृणं वज्रसमं भवेत् ।
विधिश्चेत्सुमुखः कामं कुलिशं तूलवत्तदा ॥ ३६ ॥
किं सैन्यैरायुधैः किं वा प्रपञ्चैर्दुर्गसेवनैः ।
मरणं साम्प्रतं यस्य तस्य सैन्यैस्तु किं फलम् ॥ ३७ ॥
यदायं देहसम्बन्धो जीवस्य कालयोगतः ।
तदैव लिखितं सर्वं सुखं दुःखं तथा मृतिः ॥ ३८ ॥
यस्य येन प्रकारेण मरणं दैवनिर्मितम् ।
तस्य तेनैव जायेत नान्यथेति विनिश्चयः ॥ ३९ ॥
ब्रह्मादीनां यथा काले नाशोत्पत्ती विनिर्मिते ।
तथैव भवतः कामं किमन्येषां विचार्यते ॥ ४० ॥
ये मृत्युधर्मिणस्तेषां वरदानेन दर्पिताः ।
मरिष्यामो न मन्यन्ते ते मूढा मन्दचेतसः ॥ ४१ ॥
तस्माद्‌ गच्छ नृपं ब्रूहि वचनं मम सत्वरम् ।
यदाज्ञापयते भूपस्तत्कर्तव्यं त्वया किल ॥ ४२ ॥
मघवा स्वर्गमाप्नोतु देवाः सन्तु हविर्भुजः ।
यूयं प्रयात पातालं यदि जीवितुमिच्छथ ॥ ४३ ॥
अन्यथा चेन्मतिर्मन्द महिषस्य दुरात्मनः ।
तद्युध्यस्व मया सार्धं मरणाय कृतादरः ॥ ४४ ॥
मन्यसे सङ्गरे भग्ना देवा विष्णुपुरोगमाः ।
दैवं हि कारणं तत्र वरदानं प्रजापतेः ॥ ४५ ॥
व्यास उवाच
इति देव्या वचः श्रुत्वा चिन्तयामास दानवः ।
किं कर्तव्यं मया युद्धं गन्तव्यं वा नृपं प्रति ॥ ४६ ॥
विवाहार्थमिहाज्ञप्तो राज्ञा कामातुरेण वै ।
तत्कथं विरसं कृत्वा गच्छेयं नृपसन्निधौ ॥ ४७ ॥
इयं बुद्धिः समीचीना यद्‌ व्रजामि कलिं विना ।
यथागतं तथा शीघ्रं राज्ञे संवेदयाम्यहम् ॥ ४८ ॥
स प्रमाणं पुनः कार्ये राजा मतिमतां वरः ।
करिष्यति विचार्यैव सचिवैर्निपुणैः सह ॥ ४९ ॥
सहसा न मया युद्धं कर्तव्यमनया सह ।
जये पराजये वापि भूपतेरप्रियं भवेत् ॥ ५० ॥
यदि मां सुन्दरी हन्यादहं वा हन्मि तां पुनः ।
येन केनाप्युपायेन स कुप्येत्पार्थिवः किल ॥ ५१ ॥
तस्मात्तत्रैव गत्वाहं बोधयिष्यामि तं नृपम् ।
यथाद्याभिहितं देव्या यथारुचि करोतु सः ॥ ५२ ॥
व्यास उवाच
इति सञ्चिन्त्य मेधावी जगाम नृपसन्निधौ ।
प्रणम्य तमुवाचेदं कृताञ्जलिरमात्यकः ॥ ५३ ॥

मन्त्र्युवाच
राजन् देवी वरारोहा सिंहस्योपरि संस्थिता ।
अष्टादशभुजा रम्या वरायुधधरा परा ॥ ५४ ॥
सा मयोक्ता महाराज महिषं भज भामिनि ।
महिषी भव राज्ञस्त्वं त्रैलोक्याधिपतेः प्रिया ॥ ५५ ॥
पट्टराज्ञी त्वमेवास्य भविता नात्र संशयः ।
स तवाज्ञाकरो जातो वशवर्ती भविष्यति ॥ ५६ ॥
त्रैलोक्यविभवं भुक्त्वा चिरकालं वरानने ।
महिषं पतिमासाद्य योषितां सुभगा भव ॥ ५७ ॥
इति मद्वचनं श्रुत्वा सा स्मयावेशमोहिता ।
मामुवाच विशालाक्षी स्मितपूर्वमिदं वचः ॥ ५८ ॥
महिषीगर्भसम्भूतं पशूनामधमं किल ।
बलिं दास्याम्यहं देव्यै सुराणां हितकाम्यया ॥ ५९ ॥
का मूढा कामिनी लोके महिषं वै पतिं भजेत् ।
मादृशी मन्दबुद्धे किं पशुभावं भजेदिह ॥ ६० ॥
महिषी महिषं नाथं सशृङ्गा शृङ्गसंयुतम् ।
कुरुते क्रन्दमाना वै नाहं तत्सदृशी शठा ॥ ६१ ॥
करिष्येऽहं मृधे युद्धं हनिष्ये त्वां सुराप्रियम् ।
गच्छ वा दुष्ट पातालं जीवितेच्छा यदस्ति ते ॥ ६२ ॥
परुषं तु तया वाक्यमित्युक्तं नृप मत्तया ।
तच्छ्रुत्वाहं समायातः प्रविचिन्त्य पुनः पुनः ॥ ६३ ॥
रसभङ्गं विचिन्त्यैव न युद्धं तु मया कृतम् ।
आज्ञां विना तवात्यन्तं कथं कुर्यां वृथोद्यमम् ॥ ६४ ॥
सातीव च बलोन्मत्ता वर्तते भूप भामिनी ।
भवितव्यं न जानामि किं वा भावि भविष्यति ॥ ६५ ॥
कार्येऽस्मिंस्त्वं प्रमाणं नो मन्त्रोऽतीव दुरासदः ।
युद्धं पलायनं श्रेयो न जानेऽहं विनिश्चयम् ॥ ६६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे मन्त्रीद्वारा महिषासुरेण
देव्या सह विवाहप्रस्तावो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥


देवीचे महिषासुरास उत्तर -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

महिषासुराच्या मंत्र्याचे भाषण ऐकून देवीने मेघासारखे गंभीर हास्य केले. ती म्हणाली, "हे दानवा, मी सर्व दैत्यांचा नाश करणारी देवांची शक्ती आहे असे तू समज. पापात्म्या महिषाने पीडा करून यज्ञभागापासून बहिष्कृत केलेल्या सर्व देवांनी त्याच्या वधाकरता माझी प्रार्थना केली, तेव्हा सैन्य न घेता मी एकटीच त्याचा वध करण्याकरता आले आहे. हे निष्पाप मंत्र्या, सामपूर्वक आदराने भाषण केलेस म्हणून मी संतुष्ट झाले आहे. नाही तर केवळ दृष्टीनेच तुझा वध केला असता. पण मधुर भाषण कोणाला प्रिय नाही !" आता तू त्या पापी महिषाला माझा निरोप सांग.

" तुला जर जीविताची इच्छा असेल तर त्वरित पाताळात निघून जा, नाहीतर माझ्या बाणांनी तुझ्या शरीराचे तुकडे होऊन तुझा मी वध करीन. माझ्या दयाळुपणामुळे तू सत्वर निघून जा. जर हे मूर्खा, तू गेला नाहीस तर तुझा वध होऊन देवांना पुन: स्वर्गप्राप्ती होईल. माझ्या आज्ञेने समुद्रवलयांकित पृथ्वीचाही तू त्याग कर. माझे बाण तुझ्यावर पडले नाहीत तोवरच तू पाताललोकी जावेस. जर तुला युद्धाची खुमखुमी असेल तर सत्वर माझ्यासमोर ये. तुझ्या वीरांसह मी तुला यमसदनाला पाठविते.

हे मूढमते, आजपर्यंत प्रत्येक युगात तुझ्यासारख्या असंख्य दैत्यांचा मी वध केला आहे. त्याचप्रमाणे आज तुझाही वध करीन. त्यामुळे माझ्या शस्त्रांची सफलता होईल. ही वृथा धारण करण्यात काय फायदा ? म्हणून मदनाने विव्हल झालेला तू समरांगणात येऊन माझ्याशी युद्ध कर.

हे दुष्टा, स्त्रीच्या हातूनच वध होणार म्हणून देवांना फार छळलेस. पण वरप्राप्तीमुळे आता फुगून जाऊ नकोस. ब्रह्मदेवाचे वचन शेवटास न्यावे म्हणूनच मी असामान्य स्त्रीरूप धारण करून तुझा नाश करणार आहे. तरी तुला जीविताची इच्छा असेल तर ब्राह्मणांचे निवासस्थान पृथ्वी व देवांचा स्वर्ग तू त्वरित सोडून देऊन चालता हो व भुजंगांचा वास असलेल्या पाताळात जा."

देवीचे सहेतूक भाषण ऐकून तो महिषमंत्री म्हणाला, " हे देवी, तू मदमत्त झाल्यानेच स्त्रीसुलभ असे अविचाराचे भाषण केलेस. पण महिषासुराची व तुझी बरोबरी होणार नाही. युद्ध असंभवनीय आहे. शिवाय तू एकटीच तरुण स्त्री व नाजूक आहेस. महिषासुर धिप्पाड आहे. तेव्हा तुमचे दोघांचे युद्ध होणे कठीण."

गज, अश्व, रथ, पायदळ ह्यांनी व अनेक प्रकाराच्या आयुधांनी संपन्न असे आमचे सैन्य आहे. तेव्हा हे सुंदरी, मालतीचे पुष्प चुरडण्यास जसे गजेन्द्राला काहीच श्रम नाहीत, त्याचप्रमाणे तुझा वध करण्यासही त्याला श्रम होणार नाहीत.

तुझ्याशी थोडेही कठीण भाषण केले तरी ते शृंगारशास्त्राला धरून होणार नाही. त्यामुळे रसभंगाची मला भीती वाटते. शिवाय आमच्या राजाचे मन तुजवर जडले आहे. म्हणून मला सौम्य भाषणच केले पाहिजे. नाही तर मी आताच तुझ्यासारखा रूपगर्वितेचा व मदोन्मत्त स्त्रीचा वध केला असता. पण जगाला मागे टाकणारे तुझे रूप जाणून माझा धनी मोहित झाला आहे. हे त्रिभुवनसुंदरी, हे सर्व द्रव्य व राज्य तुझे असून महिषासुर हा खरोखरच तुझा दास होणार आहे. म्हणून अशाप्रकारे विनाश होणार्‍या क्रोधाचा त्याग करून तू त्याची प्रणयाराधना कर. माझ्या स्वामीविषयी माझी पूर्ण निष्ठा असल्याने अगदी भक्तीभावाने मी तुला प्रणिपात करीत आहे. तू महिषाची पट्टराणी हो आणि या त्रैलोक्याचा उपभोग घे."

हे त्या महिषमंत्र्याचे भाषण ऐकून देवी म्हणाली, " हे सचिवा, मी तुला शास्त्रविहित मार्गाने कथन करते. तू श्रवण कर. तू महिषासुराचा प्रधान आहेस. हे मी जाणले आहे. तुझी बुद्धी व स्वभाव पशुतुल्य आहे असे तुझ्या भाषणावरून स्पष्ट होत आहे. तेव्हा ज्याचे मंत्री साक्षात् पशू आहेत तो तुझा धनी बुद्धीमान नसणारच. तुमचा उभयतांचा हा संयोग घडून आला आहे. अरे मुर्खा, माझा स्वभाव स्त्रीसुलभ आहे असे तू म्हणालास. मी पुरुष नाही काय ? आणि माझा स्वभावही पुरुषाप्रमाणे नाही काय ? मी जाणूनबुजून स्त्रीवेष केला आहे. कारण तुझ्या राजाने स्त्रीपासून मरण मागितले आहे. म्हणून हा दैत्यराज मूर्ख तर आहेच पण वीररसाविषयी अनभिज्ञ आहे असेच मला वाटते.

अरे दुष्टा, त्या महिषाने स्त्रीकडून मरण सुखदायक होईल म्हणून तसा वर मागितला, पण खरोखरीच तसे मरण शूराला दु:खदायक नाही का ? मी स्त्रीरूप धारण करून देवकार्य करण्यासाठी आले आहे. तर मी भय का धरावे ?

अरे, दैव फिरवल्यावर तृणही वज्राप्रमाणे भासत असते. तेव्हा सैन्ये व आयुधे यांचा आश्रय दैवापुढे टिकाव धरणार नाही. ज्याचे मरण जवळ येऊन ठेपले आहे त्याला सैन्याचा उपयोग नाही. कालयोगानेच सुख, दुःख व मरण ठरून गेलेले असते. दैवात लिहिल्याप्रमाणे मृत्युयोग संभवत असतो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवादिकांचे जन्ममरणही ठरल्यावेळी घडत असते. मग इतरांचा विचारच कशाला ?

जन्ममरण निश्चित आहेत, पण देवांच्या वरदानामुळे जे मृत्यूची भीति बाळगत नाहीत ते मूर्ख होत. तू त्याला सांग की देवांना स्वर्ग प्राप्त होऊन यज्ञातील हविर्भाग मिळावा यासाठी तू त्वरित पाताल लोकी जावेस. आणि जर महिषाचा तसा विचार नसेल तर युद्धाला तयार होऊन तू सत्वर ये. अरे, विष्णु वगैरे सर्व देव पराभूत झाल्याने तू माजला आहेस. पण त्याचे कारण दैव आणि ब्रह्मदेवाचे वरदान हेच आहे."

ते ऐकून तो विचार करू लागला की आता येथून युद्ध न करता जावे की कसे ? कारण विवाहासाठी हिला बरोबर आणण्याची राजाज्ञा आहे. तरी कलह न करता येथून जाऊन राजाला सत्वर कथन करावे. पुढचा निर्णय राजाच घेईल. सर्व मंत्र्यांची मसलत घेऊन तो काय करायचे ते ठरवील.

असा मनात विचार करून तो मंत्री महिषाकडे परत आला व नम्रतापूर्वक हात जोडून म्हणाला, "हे राजा, ती देवी सिंहावर बसली असून तिचे अठरा हात आयुधांनी युक्त आहेत. मी तिला म्हटले हे सुंदरी, तू महिषाची पट्टराणी होऊन या त्रैलोक्याचा चिरकाल उपभोग घे. आज व पुढेही तो तुझ्या आधीन होऊन राहील व तू स्त्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ व भाग्यवती स्त्री होशील; पण हे राजा माझे ऐकून ती मधुरादेवी हास्यकल्लोळात मग्न होऊन म्हणाली, महिषीच्या गर्भापासून उत्पन्न झालेल्या त्या अधम पशूला मी देवकार्यासाठी बळी देणार आहे. अरे मूर्खशिरोपणे, पती म्हणून महिषाचा स्वीकार करणारी एवढी मूर्ख स्त्री जगात असणार नाही. अरे मजसारखी स्त्री पशू होईल का ? कामातुर असलेली एखादी महिषीच त्याचा पती म्हणून स्वीकार करील, मी इतकी नीच नाही. मी संग्रामात युद्ध करून तुझ्यासारख्या देवशत्रूंचा वध करीन. तस्मात् जीवाची आशा असेल तर त्वरित पातालात जा.

हे राजा, ते कठोर भाषण ऐकून मी पूर्ण विचार केला आणि केवळ रसभंग होऊ नये म्हणून तिच्याशी युद्ध न करताच परत आलो. आपल्या आज्ञेशिवाय मी तरी काय ठरविणार ?

हे राजा, ती स्त्री अत्यंत उन्मत्त झाली आहे. भवितव्यात काय आहे हे मी जाणू शकत नाही. जे होणे असेल ते होईल. आपली आज्ञा आम्ही प्रमाण मानू. युद्ध किंवा पलायन यापैकी काय करायचे हे मला सांगता येणार नाही."


अध्याय दहावा समाप्त

GO TOP