श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
नवमोऽध्यायः


महिषमन्त्रिणा देवीवार्तावर्णनम्

व्यास उवाच
देवा विष्णुवचः श्रुत्वा सर्वे प्रमुदितास्तदा ।
ददुश्च भूषणान्याशु वस्त्राणि स्वायुधानि च ॥ १ ॥
क्षीरोदश्चाम्बरे दिव्ये रक्ते सूक्ष्मे तथाजरे ।
निर्मलञ्च तथा हारं प्रीतस्तस्मै सुमण्डितम् ॥ २ ॥
ददौ चूडामणिं दिव्यं सूर्यकोटिसमप्रभम् ।
कुण्डले च तथा शुभ्रे कटकानि भुजेषु वै ॥ ३ ॥
केयूरान्कङ्कणान्दिव्यान्नानारत्‍नविराजितान् ।
ददौ तस्यै विश्वकर्मा प्रसन्नेन्द्रियमानसः ॥ ४ ॥
नूपुरौ सुस्वरौ कान्तौ निर्मलौ रत्‍नभूषितौ ।
ददौ सूर्यप्रतीकाशौ त्वष्टा तस्यै सुपादयोः ॥ ५ ॥
तथा ग्रैवेयकं रम्यं ददौ तस्यै महार्णवः ।
अङ्गुलीयकरत्‍नानि तेजोवन्ति च सर्वशः ॥ ६ ॥
अम्लानपङ्कजां मालां गन्धाढ्यां भ्रमरानुगाम् ।
तथैव वैजयन्तीञ्च वरुणः सम्प्रयच्छत ॥ ७ ॥
हिमवानथ सन्तुष्टो रत्‍नानि विविधानि च ।
ददौ च वाहनं सिंहं कनकाभं मनोहरम् ॥ ८ ॥
भूषणैर्भूषिता दिव्यैः सा रराज वरा शुभा ।
सिंहारूढा वरारोहा सर्वलक्षणसंयुता ॥ ९ ॥
विष्णुश्चक्रात्समुत्पाद्य ददावस्यै रथाङ्गकम् ।
सहस्रारं सुदीप्तञ्च देवारिशिरसां हरम् ॥ १० ॥
स्वत्रिशूलात्समुत्पाद्य शङ्करः शूलमुत्तमम् ।
ददौ देव्यै सुरारीणां कृन्तनं भयनाशनम् ॥ ११ ॥
वरुणश्च प्रसन्नात्मा ददौ शङ्खं समुज्वलम् ।
घोषवन्तं स्वशङ्खात्तु समुत्पाद्य सुमङ्गलम् ॥ १२ ॥
हुताशनस्तथा शक्तिं शतघ्नीं सुमनोजवाम् ।
प्रायच्छत्तु प्रसन्नात्मा तस्यै दैत्यविनाशिनीम् ॥ १३ ॥
इषुधिं बाणपूर्णञ्च चापं चाद्‌भुतदर्शनम् ।
मारुतो दत्तवांस्तस्यै दुराकर्षं खरस्वरम् ॥ १४ ॥
स्ववज्राद्वज्रमुत्पाद्य ददाविन्द्रोऽतिदारुणम् ।
घण्टामैरावतात्तूर्णं सुशब्दां चातिसुन्दराम् ॥ १५ ॥
ददौ दण्डं यमः कामं कालदण्डसमुद्‌भवम् ।
येनान्तं सर्वभूतानामकरोत्काल आगते ॥ १६ ॥
ब्रह्मा कमण्डलुं दिव्यं गङ्गावारिप्रपूरितम् ।
ददावस्यै मुदा युक्तो वरुणः पाशमेव च ॥ १७ ॥
कालः खड्गं तथा चर्म प्रायच्छत्तु नराधिप ।
परशुं विश्वकर्मा च तीक्ष्णमस्यै ददावथ ॥ १८ ॥
धनदस्तु सुरापूर्णं पानपात्रं सुवर्णजम् ।
पङ्कजं वरुणश्चादाद्देव्यै दिव्यं मनोहरम् ॥ १९ ॥
गदां कौमोदकीं त्वष्टा घण्टाशतनिनादिनीम् ।
अदात्तस्यै प्रसन्नात्मा सुरशत्रुविनाशिनीम् ॥ २० ॥
अस्त्राण्यनेकरूपाणि तथाभेद्यञ्च दंशनम् ।
ददौ त्वष्टा जगन्मात्रे निजरश्मीन्दिवाकरः ॥ २१ ॥
सायुधां भूषणैर्युक्तां दृष्ट्वा ते विस्मयं गताः ।
तुष्टुवुस्तां सुरा देवीं त्रैलोक्यमोहिनीं शिवाम् ॥ २२ ॥
देवा ऊचुः
नमः शिवायै कल्याण्यै शान्त्यै पुष्ट्यै नमो नमः ।
भगवत्यै नमो देव्यै रुद्राण्यै सततं नमः ॥ २३ ॥
कालरात्र्यै तथाम्बायै इन्द्राण्यै ते नमो नमः ।
सिद्ध्यै बुद्ध्यै तथा वृद्ध्यै वैष्णव्यै ते नमो नमः ॥ २४ ॥
पृथिव्यां या स्थिता पृथ्व्या न ज्ञाता पृथिवीञ्च या ।
अन्तःस्थिता यमयति वन्दे तामीश्वरीं पराम् ॥ २५ ॥
मायायां या स्थिता ज्ञाता मायया न च तामजाम् ।
अन्तःस्थिता प्रेरयति प्रेरयित्रीं नुमः शिवाम् ॥ २६ ॥
कल्याणं कुरु भो मातस्त्राहि नः शत्रुतापितान् ।
जहि पापं हयारिं त्वं तेजसा स्वेन मोहितम् ॥ २७ ॥
खलं मायाविनं घोरं स्त्रीवध्यं वरदर्पितम् ।
दुःखदं सर्वदेवानां नानारूपधरं शतम् ॥ २८ ॥
त्वमेका सर्वदेवानां शरणं भक्तवत्सले ।
पीडितान्दानवेनाद्य त्राहि देवि नमोऽस्तु ते ॥ २९ ॥
व्यास उवाच
एवं स्तुता तदा देवी सुरैः सर्वसुखप्रदा ।
तानुवाच महादेवी स्मितपूर्वं शुभं वचः ॥ ३० ॥
देव्युवाच
भयं त्यजन्तु गीर्वाणा महिषान्मन्दचेतसः ।
हनिष्यामि रणेऽद्यैव वरदृप्तं विमोहितम् ॥ ३१ ॥
व्यास उवाच
इत्युक्त्वा सा सुरान्देवी जहासातीव सुस्वरम् ।
चित्रमेतच्च संसारे भ्रममोहयुतं जगत् ॥ ३२ ॥
ब्रह्मविष्णुमहेशाद्याः सेन्द्राश्चान्ये सुरास्तथा ।
कम्पयुक्ता भयत्रस्ता वर्तन्ते महिषात्किल ॥ ३३ ॥
अहो दैवबलं घोरं दुर्जयं सुरसत्तमाः ।
कालः कर्तास्ति दुःखानां सुखानां प्रभुरीश्वरः ॥ ३४ ॥
सृष्टिपालनसंहारे समर्था अपि ते यदा ।
मुह्यन्ति क्लेशसन्तप्ता महिषेण प्रपीडिताः ॥ ३५ ॥
इति कृत्वा स्मितं देवी साट्टहासं चकार ह ।
उच्चैः शब्दं महाघोरं दानवानां भयप्रदम् ॥ ३६ ॥
चकम्पे वसुधा तत्र श्रुत्वा तच्छब्दमद्‌भुतम् ।
चेलुश्च पर्वताः सर्वे चुक्षोभाब्धिश्च वीर्यवान् ॥ ३७ ॥
मेरुश्चचाल शब्देन दिशः सर्वाः प्रपूरिताः ।
भयं जग्मुस्तदा श्रुत्वा दानवास्तत्स्वनं महत् ॥ ३८ ॥
जय पाहीति देवास्तामूचुः परमहर्षिताः ।
महिषोऽपि स्वनं श्रुत्वा चुकोप मदगर्वितः ॥ ३९ ॥
किमेतदिति तान्दैत्यान्पप्रच्छ स्वनशङ्‌कितः ।
गच्छन्तु त्वरिता दूता ज्ञातुं शब्दसमुद्‌भवम् ॥ ४० ॥
कृतः केनायमत्युग्रः शब्दः कर्णव्यथाकरः ।
देवो वा दानवो वापि यो भवेत्स्वनकारकः ॥ ४१ ॥
गृहीत्वा तं दुरात्मानं मत्समीपं नयन्त्विह ।
हनिष्यामि दुराचारं गर्जन्तं स्मयदुर्मदम् ॥ ४२ ॥
क्षीणायुष्यं मन्दमतिं नयामि यमसादनम् ।
पराजिताः सुराः कामं न गर्जन्ति भयातुराः ॥ ४३ ॥
नासुरा मम वश्यास्ते कस्येदं मूढचेष्टितम् ।
त्वरिता मामुपायान्तु ज्ञात्वा शब्दस्य कारणम् ॥ ४४ ॥
अहं गत्वा हनिष्यामि तं पापं वितथश्रमम् ।
व्यास उवाच
इत्युक्तास्तेन ते दूता देवीं सर्वाङ्गसुन्दरीम् ॥ ४५ ॥
अष्टादशभुजां दिव्यां सर्वाभरणभूषिताम् ।
सर्वलक्षणसम्पन्नां वरायुधधरां शुभाम् ॥ ४६ ॥
दधतीं चषकं हस्ते पिबन्तीं च मुहुर्मधु ।
संवीक्ष्य भयभीतास्ते जग्मुस्त्रस्ताः सुशङ्‌किताः ॥ ४७ ॥
सकाशे महिषस्याशु तमूचुः स्वनकारणम् ।

दूता ऊचुः
देवी दैत्येश्वर प्रौढा दृश्यते काचिदङ्गना ॥ ४८ ॥
सर्वाङ्गभूषणा नारी सर्वरत्‍नोपशोभिता ।
न मानुषी नासुरी सा दिव्यरूपा मनोहरा ॥ ४९ ॥
सिंहारूढायुधधरा चाष्टादशकरा वरा ।
सा नादं कुरुते नारी लक्ष्यते मदगर्विता ॥ ५० ॥
सुरापानरता कामं जानीमो न सभर्तृका ।
अन्तरिक्षस्थिता देवास्तां स्तुवन्ति मुदान्विताः ॥ ५१ ॥
जयेति पाहि नश्चेति जहि शत्रुमिति प्रभो ।
न जाने का वरारोहा कस्य वा सा परिग्रहः ॥ ५२ ॥
किमर्थमागता चात्र किं चिकीर्षति सुन्दरी ।
द्रष्टुं नैव समर्थाः स्मस्तत्तेजःपरिधर्षिताः ॥ ५३ ॥
शृङ्गारवीरहासाढ्या रौद्राद्‌भुतरसान्विता ।
दृष्ट्वैवैवंविधां नारीमसम्भाष्य समागताः ॥ ५४ ॥
वयं त्वदाज्ञया राजन् किं कर्तव्यमतःपरम् ।
महिष उवाच
गच्छ वीर मयादिष्टो मन्त्रिश्रेष्ठ बलान्वितः ॥ ५५ ॥
सामादिभिरुपायैस्त्वं समानय शुभाननाम् ।
नायाति यदि सा नारी त्रिभिः सामादिभिस्त्विह ॥ ५६ ॥
अहत्वा तां वरारोहां त्वमानय ममान्तिकम् ।
करोमि पट्टमहिषीं तां मरालभ्रुवं मुदा ॥ ५७ ॥
प्रीतियुक्ता समायाति यदि सा मृगलोचना ।
रसभङ्गो यथा न स्यात्तथा कुरु ममेप्सितम् ॥ ५८ ॥
श्रवणान्मोहितोऽस्म्यद्य तस्या रूपस्य सम्पदा ।
व्यास उवाच
महिषस्य वचः श्रुत्वा पेशलं मन्त्रिसत्तमः ॥ ५९ ॥
जगाम तरसा कामं गजाश्वरथसंयुतः ।
गत्वा दूरतरं स्थित्वा तामुवाच मनस्विनीम् ॥ ६० ॥
विनयावनतः श्लक्ष्णं मन्त्री मधुरया गिरा ।
प्रधान उवाच
कासि त्वं मधुरालापे किमत्रागमनं कृतम् ॥ ६१ ॥
पृच्छति त्वां महाभागे मन्मुखेन मम प्रभुः ।
स जेता सर्वदेवानामवध्यस्तु नरैः किल ॥ ६२ ॥
ब्रह्मणो वरदानेन गर्वितश्चारुलोचने ।
दैत्येश्वरोऽसौ बलवान्कामरूपधरः सदा ॥ ६३ ॥
श्रुत्वा त्वां समुपायातां चारुवेषां मनोहराम् ।
द्रष्टुमिच्छति राजा मे महिषो नाम पार्थिवः ॥ ६४ ॥
मानुषं रूपमादाय त्वत्समीपं समेष्यति ।
यथा रुच्येत चार्वङ्‌गि तथा मन्यामहे वयम् ॥ ६५ ॥
तर्ह्येहि मृगशावाक्षि समीपं तस्य धीमतः ।
नो चेदिहानयाम्येनं राजानं भक्तितत्परम् ॥ ६६ ॥
तथा करोमि देवेशि यथा ते मनसेप्सितम् ।
वशगोऽसौ तवात्यर्थं रूपसंश्रवणात्तव ॥ ६७ ॥
करभोरु वदाशु त्वं संविधेयं मया तथा ॥ ६८ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे महिषमन्त्रिणा
देवीवार्तावर्णनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥


महिषासुर देवीकडे दूत पाठवतो -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विष्णूचे भाषण ऐकून सर्व देव प्रमुदित झाले. त्यांनी आपली सर्व भूषणे व शस्त्रास्त्रे देवीला अर्पण केली. क्षीरसागराने प्रसन्न चित्ताने आरक्तवर्णी, दिव्य, सूक्ष्म, कधीही जुनी न होणारी अशी वस्त्रे व एक उत्तम प्रकारे शृंगारलेला हार दिला. कोट्यावधी सूर्याप्रमाणे असलेला दिव्य चूडामणी, शुभ्र कुंडले, हातातील गोट, बाजूबंद व नानाप्रकारच्या रत्‍नांनी सुशोभीत अशी दिव्य कंकणे विश्वकर्म्याने दिली. सूर्यापासून तेजस्वी उत्तम नादयुक्त मनोहर व निर्मल, रत्‍नजडित तोरड्या त्वष्ट्याने दिल्या. रम्य कंठभूषणे व तेजस्वी अंगठ्या महासागराने दिल्या. सुवर्णाच्या पुष्पांनी गुंफलेली सुगंधी व भ्रमरांनी युक्त अशी वैजयंतीमाला वरुणाने दिली. हिमालयाने सर्व रत्‍नासहित भूषवलेला एक सुंदर पण तेजस्वी सिंह तिला वाहानाकरता दिला.

अशाप्रकारे सर्व रत्‍नगुणांनी आलंकृत होऊन ती भगवतीदेवी सिंहावर स्वार झाली. विष्णूने आपल्या सुदर्शनचक्रापासून एक दिव्य चक्र निर्माण करून देवीला अर्पण केले. त्याला सहस्र आरा होत्या. शंकराने त्रिशूलापासून दुसरा एक उत्तम असा त्रिशूल निर्माण करून भगवतीला दिला.

वरुणानेही प्रसन्न होऊन आपल्या शंखापासून मधुर नादयुक्त व मंगलकारक शंख निर्माण करून दिला. सूर्याने दैत्यविनाशक अशी वेगवान शतघ्नी नावाची महाशक्ती तिला अर्पण केली. वायूने अद्‌भुत व उग्र शब्द करणारे धनुष्य बाणांनी युक्त असलेल्या भात्यासह दिले. इंद्राने आपल्या वज्रापासून अतिभयंकर वज्र उत्पन्न करून दिले व ऐरावताच्या घंटेपासून उत्तम नाद करणारी घंटा दिली.

प्रलयकारी ज्याच्या योगाने यम सर्वनाश करतो त्या कालदंडापासून दुसरा एक तेजस्वी दंड यमाने दिला. ब्रह्मदेवाने गंगाजलाने भरलेला कमंडलू दिला. वरुणाने पाश दिला. कालाने ढाल तलवार आणि विश्वकर्म्याने परशू दिला. कुबेराने सुरेने भरलेले एक सुवर्णाचे पानपात्र दिले. वरुणाने दिव्य मनोहर कमल अर्पण केले. दैत्यांचा नाश करणारी व अनेक घंटांचा नाद करणारी एक कौमुदकी नावाची गदा त्वष्ट्याने तिला दिली. त्याशिवाय अभेद्य कवचासह अनेक प्रकारची अस्त्रेही दिली. सूर्याने आपली किरणे त्याजगन्मातेला बहाल केली.

अशाप्रकारे सर्व भूषणांनी मंडित व आयुधांनी संपन्न झालेल्या अशा त्या त्रैलोक्यमोहिनी व मंगलमय देवतेला पाहून सर्व देव विस्मयचकित झाले व तिची स्तुती करू लागले, देव म्हणाले, "शिवा, कल्याणी, शांती, पुष्टी, भगवती, देवी रुद्राणी, तुला सतत नमस्कार असो. जी पृथ्वीला व्यापून आहे, पण पृथ्वीला जिचे ज्ञान नाही, तिच्या अंतर्यामी राहून जी पृथ्वीला प्रेरणा करीत आहे, त्या उत्कृष्ट परमेश्वरीला आम्ही वंदन करतो. हे कालरात्री, अंबा, इंद्राणी, सिद्धी बुद्धी, वृद्धी आणि वैष्णवी तुला नमस्कार असो. मायेचे ठिकाणी जी स्थित आहे परंतु मायेला जिचे ज्ञान नाही आणि अंतर्यामी स्थित असल्यामुळे जी ती मायेला प्रेरणा करीत आहे, त्या प्रेरक व कल्याणी देवीला आमचा नमस्कार असो.

हे माते, आम्हाला शत्रूने अत्यंत पीडित केले आहे. तरी तू आम्हा सर्वांचे रक्षण कर. त्या पापी महिषाचा तू आपल्या तेजाने नाश कर. तो वरामुळे माजला आहे. तो पुष्ट असून मायावी असल्यामुळे अनेक रूपे धारण करतो. त्याला फक्त स्त्रीच्याच हातून मृत्यु आहे. म्हणून हे भक्तवत्सले या पापात्म्यापासून आमचे रक्षण कर. तुला नमस्कार असो.

अशा तर्‍हेने सर्वसुखदायी देवीचे सर्व देवांनी स्तवन केले. तेव्हा ती महादेवी हसत म्हणाली, "देवांनो, आता दैत्यांचे भय बाळगू नका. त्या वरोन्मत्त महिषाचा आज मी रणात नाश करीन."

अशाप्रकारे देवांना अभय देऊन ती म्हणाली, "या संसाराचे हेच आश्चर्य आहे. हे जग भ्रमाने व मोहाने व्यापले आहे. प्रत्यक्ष विष्णु, महेश्वर, ब्रह्मदेव, इंद्र व इतर देव महिषासुरापासून भयभीत झाले आहेत. दैवाचे सामर्थ्य हेच श्रेष्ठ असून देवही त्याचा प्रतिकार करू शकत नाहीत. तेव्हा सर्व सुखदुःखाचा कर्ता हा कालच आहे. कारण जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करण्यास समर्थ असलेले हे ब्रह्मा, विष्णु, महेशही महिषासुरामुळे जर्जर झाले आहेत, ते मोह पावले आहेत."

अशाप्रकारे हसत मुखाने देवीने असुरांना भयप्रद, महाघोर व उच्च स्वराने युक्त असा महानाद केला. त्या अद्‌भुत नादाने धरणीकंप होऊ लागले. सागर क्षुब्ध झाले. मेरुपर्वतादि सर्व पर्वत हलू लागले. सर्व दिशा दणाणून गेल्या. त्या प्रचंड स्वराने देवांनाही भीती निर्माण झाली. सर्व देवांनी देवीचा अत्यंत जयजयकार केला आणि ’आमचे रक्षण कर’ असे ते म्हणू लागले.

उन्मत्त झालेला महिषासुर तो भयंकर आवाज ऐकून क्रोधायमान झाला. पण साशंक होऊन तो दैत्यांना म्हणाला, "हे काय आहे ? हा शब्द कोठून उत्पन्न झाला ? याची चौकशी करण्याकरता दूताने सत्वर जावे. हा अतिशय कर्कश ध्वनी कुणी उत्पन्न केला ? तो देव असो वा दानव असो, त्या पापात्म्याला सत्वर मजसमोर उभा करा म्हणजे मत्त झालेल्या त्याचा मी वध करीन. देव पराजित व भयभीत झाल्यामुळे ते गर्जना करणार नाहीत. असुर माझ्या अधीन असल्याने गर्जना करणार नाहीत. तेव्हा हे मूर्खपणाचे वर्तन करणार्‍या व्यक्तीने मजकडे यावे म्हणजे दुरात्म्याचा मी वध करीन."

ह्याप्रमाणे महिषासुराने दूताला सांगितल्यावर दूत ध्वनीच्या रोखाने निघाला. तो सर्वांग सुंदर देवी त्याच्या दृष्टीस पडली. ती सर्वालंकारमंडित अष्टादश हात असलेली होती. सर्वश्रेष्ठ आयुधे तिने धारण केली होती. ती शुभलक्षणांनी संपन्न असलेली देवी वारंवार सुरा पान करीत होती. तिला पहाताच तो दूत शंकित झाला. घाबरून त्रस्त होऊन तो पुन: महिषाकडे आला व त्याने ध्वनीचे कारण त्याला सांगितले.

दूत म्हणाला, "हे दैत्यराज, मी आपल्या आज्ञेप्रमाणे शोध करीत असता एके ठिकाणी एक दिव्य व प्रौढ स्त्री दृष्टीस पडली. ती सर्वांगविभूषित व सर्व रत्‍नांलंकृत अशी होती. ती दिव्य व नयनमनोहर स्त्री मनुष्ययोनीतील नाही. ती सिंहारूढ झालेली असून तिने सर्व शस्त्रास्त्रे धारण केलेली आहेत. तिला अठरा हात आहेत. ती सुरापानाविषयी तत्पर आहे व उन्मत्त होऊन गर्जना करीत आहे, ती अविवाहीत असावी असे वाटते. सर्व देव तिच्याभोवती जमले असून, ते तिचे स्तवन करीत आहेत. सर्व देव तिचा जयजयकार करताना ' हे देवी आमचे रक्षण कर. शत्रूचा वध कर. ' असे शब्द सारखे उच्चारीत आहेत.

ती सुंदरी कोण, कुठली, कुणाची भार्या व येथे येण्याचा तिचा उद्देश काय हे मात्र आम्हाला समजू शकले नाही. आम्ही तिच्या तेजाने दिपून गेल्यामुळे तिच्याकडे पाहूच शकलो नाही. शृंगार, वीर, हास्य अद्‌भुत या रसांनी ती युक्त आहे, अशा प्रकारची ती स्त्री पाहिल्याबरोबर आम्हाला तिच्याशी भाषण न करताच परत यावे लागले. तेव्हा पुढे काय निर्णय घ्यायचा तो आपण घ्यावा."

दूताचे भाषण ऐकल्यावर महिषाने आपल्या प्रमुखाला पाचारण करून सांगितले, "तू सैन्य बरोबर घेऊन जा आणि कोणताही उपाय करून त्या सुंदर स्त्रीला इकडे घेऊन ये. ती तशी न येईल तर तिला पकडून आण म्हणजे तिला वश करून घेऊन मी तिला पट्टराणी करीन. ती सुंदरी आनंदाने येईल तर बरेच. तेव्हा तू माझी इच्छा पूर्ण कर. कारण तिचे वर्णन ऐकल्यावर मी अगदी मोहित झालो आहे.

महिषासुराचे हे नाजूक भाषण ऐकून तो प्रधानमंत्री बरोबर सर्व प्रकारचे सैन्य घेऊन तेथे गेला. सैन्य दूर उभे करून अत्यंत विनयाने तो त्या देवीला म्हणाला, "हे महाभाग्यवती, तू कोण आहेस ? येथे येण्याचे प्रयोजन काय ? असे माझा स्वामी तुला विचारीत आहे. त्याने सर्व देवांना जिंकले आहे व तो सर्व पुरुषांना अवध्य आहे. हे चारुलोचने, ब्रह्मदेवापासून वरप्राप्ती झाल्यामुळे त्याला फार अभिमान वाटतो.

हा दानवश्रेष्ठ महापराक्रमी असून इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा आहे. तुझ्या रूपाचे वर्णन ऐकल्यापासून तो तुझ्या दर्शनाची इच्छा करीत आहे. तुझी इच्छा असल्यास तो स्वतः मनुष्यरूप धारण करूनही येथे येईल. तुझ्यासाठी आम्ही सर्व काही करण्याचे योजिले आहे. तेव्हा हे मृगाक्षी, तू त्या महान महिषासमीप चल किंवा तुझ्या प्रीतीसाठी आतुर झालेल्या राजाला आम्ही इकडे आणतो. सारांश हे देवी तुझ्या इच्छेप्रमाणे कर. कारण तुझे सौंदर्य ऐकून राजा वेडा होऊन गेला आहे. तेव्हा हे सुंदरी, तू लवकर निर्णय सांग म्हणजे मी तसे करीन.


अध्याय नववा समाप्त

GO TOP