श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
चतुर्थः स्कन्धः
दशमोऽध्यायः


भृगुशापकारणवर्णनम्

जनमेजय उवाच
सन्देहोऽयं महानत्र पाराशर्य कथानके ।
नरनारायणौ शान्तौ वैष्णवांशौ तपोधनौ ॥ १ ॥
तीर्थाश्रयौ सत्त्वयुक्तौ वन्याशनपरौ सदा ।
धर्मपुत्रौ महात्मानौ तापसौ सत्यसंस्थितौ ॥ २ ॥
कथं रागसमायुक्तौ जातौ युद्धे परस्परम् ।
संग्रामं चक्रतुः कस्मात्त्यक्त्वा तपिमनुत्तमाम् ॥ ३ ॥
प्रह्लादेन समं पूर्णं दिव्यवर्षशतं किल ।
हित्वा शान्तिसुखं युद्धं कृतवन्तौ कथं मुनी ॥ ४ ॥
कथं तौ चक्रतुर्युद्धं प्रह्लादेन समं मुनी ।
कथयस्व महाभाग कारणं विग्रहस्य वै ॥ ५ ॥
(कामिनी कनकं कार्यं कारणं विग्रहस्य वै) ॥
युद्धबुद्धिः कथं जाता तयोश्च तद्विरक्तयोः ।
तथाविधं तपस्तप्तं ताभ्याञ्च केन हेतुना ॥ ६ ॥
मोहार्थं सुखभोगार्थं स्वर्गार्थं वा परन्तप ।
कृतमत्युत्कटं ताभ्यां तपः सर्वफलप्रदम् ॥ ७ ॥
मुनिभ्यां शान्तचित्ताभ्यां प्राप्तं किं फलमद्‌भुतम् ।
तपसा पीडितो देहः संग्रामेण पुनः पुनः ॥ ८ ॥
दिव्यवर्षशतं पूर्णं श्रमेण परिपीडितौ ।
न राज्यार्थे धने वापि न दारेषु गृहेषु च ॥ ९ ॥
किमर्थं तु कृतं युद्धं ताभ्यां तेन महात्मना ।
निरीहः पुरुषः कस्मात्प्रकुर्याद्युद्धमीदृशम् ॥ १० ॥
दुःखदं सर्वथा देहे जानन्धर्मं सनातनम् ।
सुबुद्धिः सुखदानीह कर्माणि कुरुते सदा ॥ ११ ॥
न दुःखदानि धर्मज्ञ स्थितिरेषा सनातनी ।
धर्मपुत्रौ हरेरंशौ सर्वज्ञौ सर्वभूषितौ ॥ १२ ॥
कृतवन्तौ कथं युद्धं दुःखं धर्मविनाशकम् ।
त्यक्त्वा तपः समाधीतं सुखारामं महत्फलम् ॥ १३ ॥
संयुगं दारुणं कृष्ण नैव मूर्खोऽपि वाञ्छति ।
श्रुतो मया ययातिस्तु च्युतः स्वर्गान्महीपतिः ॥ १४ ॥
अहङ्कारभवात्पापात्पातितः पृथिवीतले ।
यज्ञकृद्दानकर्ता च धार्मिकः पृथिवीपतिः ॥ १५ ॥
शब्दोच्चारणमात्रेण पातितो वज्रपाणिना ।
अहङ्कारमृते युद्धं न भवत्येव निश्चयः ॥ १६ ॥
किं फलं तस्य युद्धस्य मुनेः पुण्यविनाशनम् ।

व्यास उवाच
राजन् संसारमूलं हि त्रिविधः परिकीर्तितः ॥ १७ ॥
अहङ्कारस्तु सर्वज्ञैर्मुनिभिर्धर्मनिश्चये ।
स कथं मुनिना त्यक्तुं योग्यो देहभृता किल ॥ १८ ॥
कारणेन विना कार्यं न भवत्येव निश्चयः ।
तपो दानं तथा यज्ञाः सात्त्विकात्प्रभवन्ति ते ॥ १९ ॥
राजसाद्वा महाभाग तामसात्कलहस्तथा ।
क्रिया स्वल्पापि राजेन्द्र नाहङ्कारं विना क्वचित् ॥ २० ॥
शुभा वाप्यशुभा वापि प्रभवत्यपि निश्चयः ।
अहङ्काराद्‌ बन्धकारी नान्योऽस्ति जगतीतले ॥ २१ ॥
येनेदं रचितं विश्वं कथं तद्रहितं भवेत् ।
ब्रह्मा रुद्रस्तथा विष्णुरहङ्कारयुतास्त्वमी ॥ २२ ॥
अन्येषां चैव का वार्ता मुनीनां वसुधाधिप ।
अहङ्कारावृतं विश्वं भ्रमतीदं चराचरम् ॥ २३ ॥
पुनर्जन्म पुनर्मृत्युः सर्वं कर्मवशानुगम् ।
देवतिर्यङ्‌मनुष्याणां संसारेऽस्मिन्महीपते ॥ २४ ॥
रथाङ्गवदसर्वार्थं भ्रमणं सर्वदा स्मृतम् ।
विष्णोरप्यवताराणां संख्यां जानाति कः पुमान् ॥ २५ ॥
विततेऽस्मिंस्तु संसारे उत्तमाधमयोनिषु ।
नारायणो हरिः साक्षान्मात्स्यं वपुरुपाश्रितः ॥ २६ ॥
कामठं सौकरं चैव नारसिंहञ्च वामनम् ।
युगे युगे जगन्नाथो वासुदेवो जनार्दनः ॥ २७ ॥
अवतारानसंख्यातान्करोति विधियन्त्रितः ।
वैवस्वते महाराज सप्तमे भगवान्हरिः ॥ २८ ॥
मन्वन्तरेऽवतारान्वै चक्रे ताञ्छ्रुणु तत्त्वतः ।
भृगुशापान्महाराज विष्णुर्देववरः प्रभुः ॥ २९ ॥
अवताराननेकांस्तु कृतवानखिलेश्वरः ।
राजोवाच
सन्देहोऽयं महाभाग हृदये मम जायते ॥ ३० ॥
भृगुणा भगवान्विष्णुः कथं शप्तः पितामह ।
हरिणा च मुनेस्तस्य विप्रियं किं कृतं मुने ॥ ३१ ॥
यद्रोषाद्‌ भृगुणा शप्तो विष्णुर्देवनमस्कृतः ।
व्यास उवाच
शृणु राजन्प्रवक्ष्यामि भृगोः शापस्य कारणम् ॥ ३२ ॥
पुरा कश्यपदायादो हिरण्यकशिपुर्नृपः ।
यदा तदा सुरैः सार्धं कृतं संख्यं परस्परम् ॥ ३३ ॥
कृते संख्ये जगत्सर्वं व्याकुलं समजायत ।
हते तस्मिन्नृपे राजा प्रह्लादः समजायत ॥ ३४ ॥
देवान्स पीडयामास प्रह्लादः शत्रुकर्षणः ।
संग्रामो ह्यभवद्‌ घोरः शक्रप्रह्लादयोस्तदा ॥ ३५ ॥
पूर्णं वर्षशतं राजँल्लोकविस्मयकारकम् ।
देवैर्युद्धं कृतं चोग्रं प्रह्रादस्तु पराजितः ॥ ३६ ॥
निर्वेदं परमं प्राप्तो ज्ञात्वा धर्मं सनातनम् ।
विरोचनसुतं राज्ये प्रतिष्ठाप्य बलिं नृप ॥ ३७ ॥
जगाम स तपस्तप्तुं पर्वते गन्धमादने ।
प्राप्य राज्यं बलिः श्रीमान्सुरैर्वैरं चकार ह ॥ ३८ ॥
यतः परस्परं युद्धं जातं परमदारुणम् ।
ततः सुरैर्जिता दैत्या इन्द्रेणामिततेजसा ॥ ३९ ॥
विष्णुना च सहायेन राज्यभ्रष्टाः कृता नृप ।
ततः पराजिता दैत्याः काव्यस्य शरणं गताः ॥ ४० ॥
किं त्वं न कुरुषे ब्रह्मन् साहाय्यं नः प्रतापवान् ।
स्थातुं न शक्नुमो ह्यत्र प्रविशामो रसातलम् ॥ ४१ ॥
यदि त्वं न सहायोऽसि त्रातुं मन्त्रविदुत्तम ।
व्यास उवाच
इत्युक्तः सोऽब्रवीद्दैत्यान्काव्यः कारुणिको मुनिः ॥ ४२ ॥
मा भैष्ट धारयिष्यामि तेजसा स्वेन भोऽसुराः ।
मन्त्रैस्तथौषधीभिश्च साहाय्यं वः सदैव हि ॥ ४३ ॥
करिष्यामि कृतोत्साहा भवन्तु विगतज्वराः ।
व्यास उवाच
ततस्ते निर्भया जाता दैत्याः काव्यस्य संश्रयात् ॥ ४४ ॥
देवैः श्रुतस्तु वृत्तान्तः सर्वैश्चारमुखात्किल ।
तत्र संमन्त्र्य ते देवाः शक्रेण च परस्परम् ॥ ४५ ॥
मन्त्रं चक्रुः सुसंविग्नाः काव्यमन्त्रप्रभावतः ।
योद्धुं गच्छामहे तूर्णं यावन्न च्यावयन्ति वै ॥ ४६ ॥
प्रसह्य हत्वा शिष्टांस्तु पातालं प्रापयामहे ।
दैत्याञ्जग्मुस्ततो देवाः संरुष्टाः शस्त्रपाणयः ॥ ४७ ॥
जग्मुस्तान्विष्णुसहिता दानवान् हरिणोदिताः ।
वध्यमानास्तु ते दैत्याः सन्त्रस्ता भयपीडिताः ॥ ४८ ॥
काव्यस्य शरणं जग्मू रक्ष रक्षेति चाब्रुवन् ।
ताञ्छुक्रः पीडितान्दृष्ट्वा देवैर्दैत्यान्महाबलान् ॥ ४९ ॥
मा भैष्टेति वचः प्राह मन्त्रौषधिबलाद्विभुः ।
दृष्ट्वा काव्यं सुराः सर्वे त्यक्त्वा तान्प्रययुः किल ॥ ५० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
चतुर्थस्कन्धे भृगुशापकारणवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥


शुक्राचार्यांचे असुरांना अभय -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जनमेजय व्यासांना म्हणाला, "हे पराशरपुत्रा, ह्या कथेविषयी माझ्या मनात मोठाच संशय निर्माण झाला आहे. वस्तुत: हे नरनारायण विष्णूचे अंश होते. शांत, तपोधन, तीर्थक्षेत्रावर वास्तव्य करणारे, सत्वगुणांनी युक्त, कंदमूलावर आहार घेणारे, धर्मपुत्र, महात्मे, तपस्वी, सत्यनिष्ठ असे ते असतानादेखील ते दोघेजण क्रोधायमान कसे झाले ? खरोखरीच त्या अत्यद्‍भुत तपश्चर्येचा त्याग त्यांनी केला आणि ते रणामध्ये युद्धप्रवृत्त होऊन कसे बरे लढले ? हे मुने, मी अत्यंत शंकित झालो आहे.

देवांची हजार वर्षे संपूर्ण होईपर्यंत त्यांनी समाधी व ध्यानाच्या सुखाचा अव्हेर करून ते मुनी प्रल्हादाशी का लढले ? असे युद्ध करण्याचे कारण काय ? हे महाभाग्यवान व्यासमुने, आपण ह्या विषयी मला विस्ताराने सांगा.

खरोखरच कनक व कांता हेच युद्धाचे कारण असते. पण दोन्हीपासून अलिप्त असलेले ते मुनिश्रेष्ठ असताना दोघांनाही युद्धाची इच्छा का व्हावी ? त्यांनी कोणता उद्देश मनात ठेवून तप केले ? मोह, सुख, स्वर्ग या उद्देशाने त्यांनी तप केले का ?

ते मुनी शांत अंतःकरणाचे होते. त्यांनी इष्ट फले प्राप्त करून देणारे अद्‍भुत तप केले. पण त्यांना असे अनिर्वचनीय बल कसे प्राप्त झाले ? तपश्चर्येमुळे अगोदरच देहाला कष्ट झाले असताना त्यांनी युद्ध करून देहांना पीडा का दिली ? का पीडा हेच फल त्यांना प्राप्त झाले ? कारण हजार दिव्य वर्षे युद्ध केल्याने त्यांना फारच पीडा झाली असणार ?

राज्य, धन, स्त्री, गृह यापैकी कोणतेही कारण नसताना त्यांनी युद्ध केले. तेव्हा युद्धाचे कारण तरी कोणते घडले ? पुराण धर्म ज्याला समजला आहे असा पुरुष विनाकारण युद्ध प्रवृत्त कसा होईल ? तेव्हा हे धर्मज्ञ मुने, ज्याची बुद्धी श्रेष्ठ आहे असा पुरुष दु:खप्रद कर्मे न करता नेहमी सुखप्रद कर्मेच करीत असतो. आजपर्यंतची परंपरा अशीच आहे. पण हे धर्मपुत्र हरीचे अंश सर्वज्ञ, सर्वभूषित नरनारायण यांनी धर्माचा नाश व दुःख उत्पन्न करणारे युद्ध का केले ?

सुखरूपी महाफल प्राप्त करून देणार्‍या समाधीचा त्यांनी त्याग का केला ? हे कृष्णद्वैपायन मुने, मूर्खसुद्धा असा भयंकर संग्राम करण्याची इच्छा करणार नाही. ययाती राजा स्वर्गच्युत झाला. अहंकार झाल्यामुळेच त्याला इंद्राने खाली पाडले. यज्ञकर्ता, दानशूर आणि धार्मिक अशा त्या ययाती राजाला त्याने स्वतःच्या प्रशंसेचा उद्‌गार काढताच इन्द्राने त्याला भूलोकी ढकलले. तात्यर्य, अहंकार हेच युद्धाचे कारण आहे. म्हणून हे मुने, प्रल्हाद व नरनारायण यांच्या युद्धाचे श्रेष्ठ कारण कोणते ?

जनमेजय संशयसागरात बुडाल्याचे अवलोकन करून व्यासमुनी म्हणाले, "हे राजा, संसाराच्या मुळाशी तीन प्रकारचा अहंकार असतो असे धर्माचा निश्चित बोध झालेल्या मुनींनी सांगितले आहे. देहधारी मुनीच्या हातून त्या अहंकाराचा त्याग होणे संभवनीय नाही. कारणावाचून कार्य संभवत नाही.

तप, दान, यज्ञ वगैरे प्रवृत्ती सात्त्विक किंवा राजस अहंकारामुळे उत्पन्न होतात. पण हे महाभाग्यशाली जनमेजया, तामस अहंकारामुळे कलह निर्माण होत असतो. हे राजराजेश्‍वरा जनमेजया, कोणताही लहान अथवा मोठा, बरा किंवा वाईट परिणाम हा अहंकाराशिवाय संभवत नाही. या भूतलावर बंध उत्पन्न करणारा अहंकार हाच एकमेव कारण आहे. हे विश्‍वच जेथे अहंकारातून उत्पन्न झाले आहे तिथे या विश्‍वातील चराचर प्राणी अहंकारावाचून कसा असेल ?

हे भूपते, ब्रह्मा, विष्णू, महेश्‍वर हे जर स्वत: अहंकारांनी युक्त आहेत, तर मग इतर मुनी वगैरेची गोष्ट हवी कशाला ? हे चराचर विश्‍वब्रह्मांड अहंकाराने परिपूर्ण आहे. म्हणून पुनः जन्म व व पुनः मृत्यू या गोष्टी घडतात व त्यामुळे सर्व प्राणी भ्रमण करीत राहून कर्माच्या आधीन झालेले असतात.

देव, तीर्यग्योनीतील प्राणीमात्र व मानव या सर्वांचे भ्रमण अहंकारामुळेच होत असून वास्तविक ते भ्रमण चक्राप्रमाणे निष्फलच असते. ह्या प्रचंड संसारसागरात उच्च अथवा नीच योनीमध्ये विष्णूने जेवढे अवतार घेतले त्यांची संख्या कोणाला तरी सांगता येईल काय ?

तो श्रीहरी नरनारायण मत्स्य, कूर्म, वराह नारसिंह, वामन अशा रूपाने अवतार घेतो आणि प्रत्येक युगात तो भक्तांचे दुःख नाहीसे करतो. पण असा तो भक्तवत्सल जगन्नाथही दैवाधीनच आहे. म्हणून त्याला स्वतःच्या इच्छेविरुद्ध अनेक अवतार घ्यावे लागतात. हे राजा, सातव्या वैवस्वत मन्वंतरात भगवान श्रीहरीने कोणते अवतार धारण केले ते आता मी तुला सांगतो. तू शांत चित्ताने श्रवण कर.

हे महाराज, सुरश्रेष्ठ, संपूर्ण विश्‍वाचे अधिपत्य करणारा असा जो भगवान विष्णु त्याने भृगूच्या शापामुळे अनेक विविध अवतार धारण केले."

जनमेजय संशयग्रस्त होऊन व्यासांना म्हणाला, "हे महाभाग्यशाली पूर्वज, माझ्या मनात आता अनेक शंका निर्माण होत आहेत. भृगूने विष्णूला का शाप दिला ? हे मुने, हरीने त्या मुनीचे अप्रिय असे काय केले ? अशाप्रकारे शाप देण्यासाठी भृगूला रागाचे कोणते कारण निर्माण झाले ?"

व्यास सांगू लागले, "हे जनमेजया, आता भृगूने शाप का दिला याचे कारण मी तुला सांगतो."

फार वर्षापूर्वी कश्यपाचा पुत्र हिरण्यकशिपू या नावाचा राजा राज्य करीत होता. त्यावेळी दैत्यांनी देवांशी परस्पर युद्ध सुरू केले. त्या युद्धामुळे सर्व जगत् संकटग्रस्त होऊन व्यापून गेले. सर्व चराचर व्याकुळ झाले. अखेर त्या हिरण्यकशिपू राजाचा वध झाला. त्यानंतर त्याचा पुत्र भक्तश्रेष्ठ प्रल्हाद राज्य करू लागला.

पुढे काही काळाने तो शत्रूचा नाश करणारा प्रल्हादही देवांना त्रस्त करू लागला. त्यावेळी इन्द्र आणि प्रल्हाद या दोघातही प्रचंड युद्ध सुरू झाले. तेव्हा ते घोर उत्पन्न करणारे प्रचंड युद्ध प्रल्हाद व देव यामध्ये शंभर वर्षे पूर्ण होईपर्यंत टिकले. शेवटी ह्या युद्धामध्ये त्या प्रल्हादाचा पराभव झाला. त्यामुळे तो अधिकच खिन्न झाला.

त्याने उदार होऊन विरोचनाचा पुत्र बळी यास राज्यावर बसवले आणि तो स्वत: मात्र गंधमादन पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. अशा प्रकारे बलाढय बलीला राज्य मिळाल्यावर तो देवांशी शत्रूत्व करू लागला. त्यामुळे दैत्यराज बली व देव यांमध्ये प्रचंड युद्ध सुरू झाले.

इंद्र, विष्णु यांनी देवांना पूर्णपणे सहाय्य केल्यामुळे दैत्यांचा पराभव झाला. देवांनी बलीला राज्यापासून भ्रष्ट केले. अखेर पराभूत होऊन सर्व दैत्य शुक्राचार्यांना शरण गेले. शुक्राचार्यांकडे जाऊन ते त्यांना म्हणाले, "हे ब्राह्मण, आपण एवढे महापराक्रमी असताना आम्हाला सहाय्य का बरे करीत नाही ? आपण मंत्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात. असे असतानाही आपण जर आम्हाला मदत करणार नसाल तर आम्ही सर्वजण आता रसातलात वस्तीला जातो. कारण सांप्रत या ठिकाणी रहाण्यास आम्ही सामर्थ्यशील नाही."

अशा रीतीने दैत्यांनी शुक्राचार्यांना विनंती केल्यावर तो दयेचा सागर काव्यमुनी शुक्राचार्य त्यांना म्हणाला, "दैत्यहो, तुम्ही कसलीही भीती बाळगू नका. हे असुरहो, मी आपल्या तेजोबलाने तुम्हाला येथेच धारण करीन. मंत्र व औषधे यांचा, प्रयोग करून मी तुमचा सहायकर्ता होईन. म्हणून तुम्ही धैर्य धरून निश्चिंत व्हा."

तेव्हा काव्यमुनींचा आश्रय केल्यामुळे सर्व दैत्य भयरहित झाले. इकडे ही संपूर्ण घटना देवांना कळली. देवांच्या हेरांनी, काव्यमुनींनी, दैत्यांना आधार दिल्याचे देवांना सांगितले. काव्यमुनींच्या मंत्राचे सामर्थ्य देव जाणून होते. त्यामुळे ते अतिशय चिंताक्रांत होऊन विचार विनिमय करू लागले. देवांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याचे ठरवले.

"दानवांनी अद्यापी आपणाला आपल्या या स्थानापासून भ्रष्ट केले नाही. तोपर्यंतच आपण शेष उरतील त्यांना पातालात ढकलून देऊ. एकदम गर्दी करून आपण युद्ध सुरू करू."

अशाप्रकारे त्या क्रोधायमान झालेल्या देवांनी विचार केला. हातात शस्त्रे धारण करून ते सर्वजण दैत्यांकडे निघाले. प्रत्यक्ष हरीचीच आज्ञा झाल्यामुळे ते देव दानवांच्या राज्यापर्यंत येऊन पोहोचले. दैत्य व देव यांच्यात प्रचंड युद्ध सुरू झाले.

त्या युद्धात दानवांचा वध होऊ लागला. तेव्हा भयभीत व त्रस्त होऊन ते सर्वजण काव्यमुनींकडे गेले. ते काव्यांना म्हणाले, "हे भाग्यवान, आमचे रक्षण करा, आमचे रक्षण करा."

देवांनी अत्यंत जर्जर केलेल्या दैत्यांना शुक्राचार्यांनी अभय दिले. मंत्र व औषधे यांचे सामर्थ्य जवळ असल्याने ते म्हणाले, "दैत्यांनो, भिऊ नका. धीर धरा."

काव्यमुनी शुक्राचार्य दृष्टीस पडताच देव विस्मित झाले आणि दानवांना तेथेच सोडून ते आपापल्या स्थानी सत्वर निघून गेले.



अध्याय दहावा समाप्त

GO TOP