श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
विंशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


स्वपितरं प्रति शशिकलावाक्यम्

व्यास उवाच
इतिवादिनि भूपाले केरलाधिपतौ तदा ।
प्रत्युवाच महाभाग युधाजिदपि पार्थिवः ॥ १ ॥
नीतिरेषा महीपाल यद्‌ब्रवीति भवानिह ।
समाजे पार्थिवानां वै सत्यवाग्विजितेन्द्रियः ॥ २ ॥
योग्येषु वर्तमानेषु कन्यारत्‍नं कुलोद्वह ।
अयोग्योऽर्हति भूपाल न्यायोऽयं तव रोचते ॥ ३ ॥
भागं सिंहस्य गोमायुर्भोक्तुमर्हति वा कथम् ।
तथा सुदर्शनोऽयं वै कन्यारत्‍नं किमर्हति ॥ ४ ॥
बलं वेदो हि विप्राणां भूभुजां चापजं बलम् ।
किमन्याय्यं महाराज ब्रवीम्यहमिहाधुना ॥ ५ ॥
बलं शुल्कं यथा राज्ञां विवाहे परिकीर्तितम् ।
बलवानेव गृह्णातु नाबलस्तु कदाचन ॥ ६ ॥
तस्मात्कन्यापणं कृत्वा नीतिरत्र विधीयताम् ।
अन्यथा कलहः कामं भविष्यति महीभुजाम् ॥ ७ ॥
एवं विवादे संवृत्ते राज्ञां तत्र परस्परम् ।
आहूतस्तु सभामध्ये सुबाहुर्नृपसत्तमः ॥ ८ ॥
समाहूय नृपाः सर्वे तमूचुस्तत्त्वदर्शिनः ।
राजन्नीतिस्त्वया कार्या विवाहेऽत्र समाहिता ॥ ९ ॥
किं ते चिकीर्षितं राजंस्तद्वदस्व समाहितः ।
पुत्र्याः प्रदानं कस्मै ते रोचते नृप चेतसि ॥ १० ॥
सुबाहुरुवाच
पुत्र्या मे मनसा कामं वृतः किल सुदर्शनः ।
मया निवारितोऽत्यर्थं न सा प्रत्येति मे वचः ॥ ११ ॥
किं करोमि सुताया मे न वशे वर्तते मनः ।
सुदर्शनस्तथैकाकी सम्प्राप्तोऽस्ति निराकुलः ॥ १२ ॥
व्यास उवाच
सम्पन्ना भूभुजः सर्वे समाहूय सुदर्शनम् ।
ऊचुः समागतं शान्तमेकाकिनमतन्द्रिताः ॥ १३ ॥
राजपुत्र महाभाग केनाहूतोऽसि सुव्रत ।
एकाकी यः समायातः समाजे भूभृतामिह ॥ १४ ॥
न वै सैन्यं न सचिवा न कोशो न बृहद्‌बलम् ।
किमर्थञ्च समायातस्तत्त्वं ब्रूहि महामते ॥ १५ ॥
युद्धकामा नृपतयो वर्तन्तेऽत्र समागमे ।
कन्यार्थं सैन्यसम्पन्नाः किं त्वं कर्तुमिहेच्छसि ॥ १६ ॥
भ्राता ते सुबलः शूरः सम्प्राप्तोऽस्ति जिघृक्षया ।
युधाजिच्च महाबाहुः साहाय्यं कर्तुमागतः ॥ १७ ॥
गच्छ वा तिष्ठ राजेन्द्र याथातथ्यमुदाहृतम् ।
त्वयि सैन्यविहीने च यथेष्टं कुरु सुव्रत ॥ १८ ॥
सुदर्शन उवाच
न बलं न सहायो मे न कोशो दुर्गसंश्रयः ।
न मित्राणि न सौहार्दी न नृपा रक्षका मम ॥ १९ ॥
अत्र स्वयंवरं श्रुत्वा द्रष्टुकाम इहागतः ।
स्वप्ने देव्या प्रेरितोऽस्मि भगवत्या न संशयः ॥ २० ॥
नान्यच्चिकीर्षितं मेऽद्य मामाह जगदीश्‍वरी ।
तया यद्विहितं तच्च भविताऽद्य न संशयः ॥ २१ ॥
न शत्रुरस्ति संसारे कोऽप्यत्र जगतीश्‍वराः ।
सर्वत्र पश्यतो मेऽद्य भवानीं जगदम्बिकाम् ॥ २२ ॥
यः करिष्यति शत्रुत्वं मया सह नृपात्मजाः ।
शास्ता तस्य महाविद्या नाहं जानामि शत्रुताम् ॥ २३ ॥
यद्‌भावि तद्वै भविता नान्यथा नृपसत्तमाः ।
का चिन्ता ह्यत्र कर्तव्या दैवाधीनोऽस्मि सर्वथा ॥ २४ ॥
देवभूतमनुष्येषु सर्वभूतेषु सर्वदा ।
सर्वेषां तत्कृता भक्तिर्नान्यथा नृपसत्तमाः ॥ २५ ॥
सा यं चिकीर्षते भूपं तं करोति नृपाधिपाः ।
निर्धनं वा नरं कामं का चिन्ता वै तदा मम ॥ २६ ॥
तामृते परमां शक्तिं ब्रह्मविष्णुहरादयः ।
न शक्ताः स्पन्दितुं देवाः का चिन्ता मे तदा नृपाः ॥ २७ ॥
अशक्तो वा सशक्तो वा यादृशस्तादृशस्त्वहम् ।
तदाज्ञया नृपाद्यैव सम्प्राप्तोऽस्मि स्वयंवरे ॥ २८ ॥
सा यदिच्छति तत्कुर्यान्मम किं चिन्तनेन वै ।
नात्र शंका प्रकर्तव्या सत्यमेतद्‌ब्रवीम्यहम् ॥ २९ ॥
जये पराजये लज्जा न मेऽत्राण्वपि पार्थिवाः ।
भगवत्यास्तु लज्जास्ति तदधीनोऽस्मि सर्वथा ॥ ३० ॥
व्यास उवाच
इति तस्य तदाकर्ण्य वचनं राजसत्तमाः ।
ऊचुः परस्परं प्रेक्ष्य निश्‍चयज्ञा नराधिपाः ॥ ३१ ॥
सत्यमुक्तं त्वया साधो न मिथ्या कर्हिचिद्‌भवेत् ।
तथाप्युज्जयनीनाथस्त्वां हन्तुं परिकाङ्क्षति ॥ ३२ ॥
त्वत्कृते न दयादिष्टा त्वां ब्रवीमो महामते ।
यद्युक्तं तत्त्वया कार्यं विचार्य मनसाऽनघ ॥ ३३ ॥
सुदर्शन उवाच
सत्यमुक्तं भवद्‌भिश्‍च कृपावद्‌भिः सुहृज्जनैः ।
किं ब्रवीमि पुनर्वाक्यमुक्त्वा नृपतिसत्तमाः ॥ ३४ ॥
न मृत्युः केनचिद्‌भाव्यः कस्यचिद्वा कदाचन ।
दैवाधीनमिदं सर्वं जगत्स्थावरजङ्गमम् ॥ ३५ ॥
स्ववशोऽयं न जीवो‍ऽस्ति स्वकर्मवशगः सदा ।
तत्कर्म त्रिविधं प्रोक्तं विद्वद्‌भिस्तत्त्वदर्शिभिः ॥ ३६ ॥
सञ्चितं वर्तमानञ्च प्रारब्धञ्च तृतीयकम् ।
कालकर्मस्वभावैश्‍च ततं सर्वमिदं जगत् ॥ ३७ ॥
न देवो मानुषं हन्तुं शक्तः कालागमं विना ।
हतं निमित्तमात्रेण हन्ति कालः सनातनः ॥ ३८ ॥
यथा पिता मे निहतः सिंहेनामित्रकर्षणः ।
तथा मातामहोऽप्येवं युद्धे युधाजिता हतः ॥ ३९ ॥
यत्‍नकोटिं प्रकुर्वाणो हन्यते दैवयोगतः ।
जीवेद्वर्षसहस्राणि रक्षणेन विना नरः ॥ ४० ॥
नाहं बिभेमि धर्मिष्ठाः कदाचिच्च युधाजितः ।
दैवमेव परं मत्वा सुस्थितोऽस्मि सदा नृपाः ॥ ४१ ॥
स्मरणं सततं नित्यं भगवत्याः करोम्यहम् ।
विश्‍वस्य जननी देवी कल्याणं सा करिष्यति ॥ ४२ ॥
पूर्वार्जितं हि भोक्तव्यं शुभं वाप्यशुभं तथा ।
स्वकृतस्य च भोगेन कीदृक्शोको विजानताम् ॥ ४३ ॥
स्वकर्मफलयोगेन प्राप्य दुःखमचेतनः ।
निमित्तकारणे वैरं करोत्यल्पमतिः किल ॥ ४४ ॥
न तथाऽहं विजानामि वैरं शोकं भयं तथा ।
निःशङ्कमिह सम्प्राप्तः समाजे भूभृतामिह ॥ ४५ ॥
एकाकी द्रष्टुकामोऽहं स्वयंवरमनुत्तमम् ।
भविष्यति च यद्‌भाव्यं प्राप्तोऽस्मि चण्डिकाज्ञया ॥ ४६ ॥
भगवत्याः प्रमाणं मे नान्यं जानामि संयतः ।
तत्कृतञ्च सुखं दुःखं भविष्यति च नान्यथा ॥ ४७ ॥
युधाजित्सुखमाप्नोतु न मे वैरं नृपोत्तमाः ।
यः करिष्यति मे वैरं स प्राप्स्यति फलं तथा ॥ ४८ ॥
व्यास उवाच
इत्युक्तास्ते तथा तेन सन्तुष्टा भूभुजः स्थिताः ।
सोऽपि स्वमाश्रमं प्राप्य सुस्थितः सम्बभूव ह ॥ ४९ ॥
अपरेऽह्नि शुभे काले नृपाः सम्मन्त्रिताः किल ।
सुबाहुना नृपेणाथ रुचिरे वै स्वमण्डपे ॥ ५० ॥
दिव्यास्तरणयुक्तेषु मञ्चेषु रचितेषु च ।
उपविष्टाश्‍च राजानः शुभालङ्करणैर्युताः ॥ ५१ ॥
दिव्यवेषधराः कामं विमानेष्वमरा इव ।
दीप्यमानाः स्थितास्तत्र स्वयंवरदिदृक्षया ॥ ५२ ॥
इति चिन्तापराः सर्वे कदा साप्यागमिष्यति ।
भाग्यवन्तं नृपश्रेष्ठं श्रुतपुण्यं वरिष्यति ॥ ५३ ॥
यदा सुदर्शनं दैवात्स्रजा सम्भूषयेदिह ।
विवादो वै नृपाणां च भविता नात्र संशयः ॥ ५४ ॥
इत्येवं चिन्त्यमानास्ते भूपा मञ्चेषु संस्थिताः ।
वादित्रघोषः सुमहानुत्थितो नृपमण्डपे ॥ ५५ ॥
अथ काशीपतिः प्राह सुतां स्नातां स्वलङ्कृताम् ।
मधूकमालासंयुक्तां क्षौमवासोविभूषिताम् ॥ ५६ ॥
विवाहोपस्करैर्युक्तां दिव्यां सिन्धुसुतोपमाम् ।
चिन्तापरां सुवसनां स्मितपूर्वमिदं वचः ॥ ५७ ॥
उत्तिष्ठ पुत्रि सुनसे करे धृत्वा शुभां स्रजम् ।
व्रज मण्डपमध्येऽद्य समाजं पश्य भूभुजाम् ॥ ५८ ॥
गुणवान् रूपसम्पन्नः कुलीनश्‍च नृपोत्तमः ।
तव चित्ते वसेद्यस्तु तं वृणुष्व सुमध्यमे ॥ ५९ ॥
देशदेशाधिपाः सर्वे मञ्चेषु रचितेषु च ।
संविष्टाः पश्य तन्वङ्‌गि वरयस्व यथारुचि ॥ ६० ॥
व्यास उवाच
तं तथा भाषमाणं वै पितरं मितभाषिणी ।
उवाच वचनं बाला ललितं धर्मसंयुतम् ॥ ६१ ॥

शशिकलोवाच
नाहं दृष्टिपथे राज्ञां गमिष्यामि पितः किल ।
कामुकानां नरेशानां गच्छन्त्यन्याश्च योषितः ॥ ६२ ॥
धर्मशास्त्रे श्रुतं तात मयेदं वचनं किल ।
एक एव वरो नार्या निरीक्ष्यः स्यान्न चापरः ॥ ६३ ॥
सतीत्वं निर्गतं तस्या या प्रयाति बहूनथ ।
सङ्कल्पयन्ति ते सर्वे दृष्ट्वा मे भवतात्त्विति ॥ ६४ ॥
स्वयंवरे स्रजं धृत्वा यदागच्छति मण्डपे ।
सामान्या सा तदा जाता कुलटेवापरा वधूः ॥ ६५ ॥
वारस्त्री विपणे गत्वा यथा वीक्ष्य नरांस्थितान् ।
गुणागुणपरिज्ञानं करोति निजमानसे ॥ ६६ ॥
नैकभावा यथा वेश्या वृथा पश्यति कामुकम् ।
तथाऽहं मण्डपे गत्वा कुर्वे वारस्त्रिया कृतम् ॥ ६७ ॥
वृद्धैरेतैः कृतं धर्मं न करिष्यामि साम्प्रतम् ।
पत्‍नीव्रतं तथा कामं चरिष्येऽहं धृतव्रता ॥ ६८ ॥
सामान्या प्रथमं गत्वा कृत्वा सङ्कल्पितं बहु ।
वृणोति चैकं तद्वद्वै वृणोमि कथमद्य वै ॥ ६९ ॥
सुदर्शनो मया पूर्वं वृतः सर्वात्मना पितः ।
तमृते नान्यथा कर्तुमिच्छामि नृपसत्तम ॥ ७० ॥
विवाहविधिना देहि कन्यादानं शुभे दिने ।
सुदर्शनाय नृपते यदीच्छसि शुभं मम ॥ ७१ ॥
इति श्रीदेवीभागवत महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां तृतीयस्कन्धे
स्वपितरं प्रति शशिकलावाक्यं नामविंशोध्यायः ॥ २० ॥


सुदर्शनाचे उचित मनौधैर्य

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

हे महाभगयशाली जनमेजया, ह्याप्रमाणे केरलदेशाधिपति भूपाल बोलू लागला असता, युधाजित राजाही उपरोधिकपणाने उलट त्याला म्हणाला, "हे भूपाला, आपण जे येथे भाषण करीत आहा, हे नीतिचे आहे ! राजसमाजामध्ये सत्यवचनी व जितेंद्रिय असे आपणच आहात. हे कुलधुरंधरा, योग्य वर विद्यमान असताना अयोग्य भूपतीच कन्येला योग्य ठरणे, हा न्याय आपल्यालाच रुचत आहे ! अहो, सिंहाच्या भागाचा उपभोग घेण्यास कोल्हा योग्य आहे काय ? हा सुदर्शन हे कन्यारत्‍न प्राप्त करून घेण्यास योग्य आहे काय ! आपणच सांगा.

हे महाराज, वेद हे विप्रांचे बल असून राजांचे बल चापजन्य होय. सांप्रत ह्या ठिकाणी मी काय बरे अन्यायाचे भाषण करीत आहे ? ज्या अर्थी राजांच्या विवाहामध्ये बल हेच शुल्क सांगितले आहे, त्या अर्थी बलवानानेच कन्या स्वीकारणे योग्य आहे. बलहीन पुरुषाला ती प्राप्त होणे कधीही योग्य नाही. असा पण करून, ह्या विचाराने मला इष्ट असलेल्या न्यायाचेच अवलंबन केले पाहिजे. असे न होईल तर राजांमध्ये कलह उपस्थित होईल.

ह्याप्रमाणे त्या ठिकाणी राजांमध्ये परस्पर विवाद उपस्थित झाला असता, नुपश्रेष्ठ सुबाहूला तेथे आवाहन झाले. त्याला बोलावल्यानंतर तत्त्वाकडे दृष्टी देणारे ते सर्व राजे त्याला म्हणाले, "हे राजा, या विवाहामध्ये निर्दोष नीतीचे तू अवलंबन केले पाहिजेस. हे नृपा, आपण या विवाहाच्या बाबतीत काय मनामध्ये ठरवले आहे ते स्वस्थपणे कथन करावे. हे भूपते, कोणाला कन्यादान करणे आपल्या मनाला बरे वाटत आहे ?"

सुबाहू म्हणाला, "खरोखर माझ्या कन्येने मनापासून यथेष्ट सुदर्शनाला वरले आहे. मी जरी तिचे अतिशय निवारण केले, तरी ती माझे म्हणणे ऐकत नाही. मी काय करू ? माझ्या कन्येचे मन माझ्या स्वाधीन नाही. शिवाय, सुदर्शनही निर्भयपणे एकटाच येथे आला आहे."

नंतर प्राप्त झालेल्या सर्व भूतींनी सुदर्शनाला तेथे आवाहन केले, आणि तो शांत सुदर्शन एकटा तेथे आल्यावर ते कर्तव्य दक्ष राजे त्याला म्हणाले, 'हे महाभाग्यवान राजपुत्रा, सुव्रता, राजसमाजामध्ये, तू न बोलता एकटा आला आहेस, तुला कोणी आवाहन केले आहे ? हे महाविचारी सुदर्शना, सैन्य, कोश व प्रचंड सामर्थ्य यांपैकी काहीच तुझ्यापाशी नसताना तू येथे कशाकरिता आला आहेस.

आम्ही सर्व राजे त्या कन्येकरता या समाजामध्ये युद्ध करण्याच्या इच्छेने, सैन्यासह आलो आहोत. या ठिकाणी तू काय करण्याचे मनामध्ये आणले आहेस. ते सांग. तुझा शूर व बलाढ्य भ्राता कन्या स्वीकारण्याच्या उद्देशाने येथे प्राप्त झाला आहे व महापराक्रमी युधाजित, त्याचे साहाय्य करण्याकरता आला आहे. आता हे राजेंद्रा, तू जा अथवा रहा, हवे ते कर. हे सुव्रता, तू सैन्यहीन आहेस. तुला आम्ही येथील इत्थंभूत वर्तमान कळविले आहे."

सुदर्शन म्हणाला, "हे नृपहो, सैन्य साहाय्य, कोश, किल्याचा आश्रय, मित्र, सुहृदय व रक्षक ह्यांपैकी माझ्यापाशी काही एक नाही, हे खरे, परंतु स्वयंवराची वार्ता ऐकून मी ते पाहण्याकरिता येथे आलो आहे व तसे करण्याविषयी मला भगवतीने स्वानामध्ये सांगितले आहे. त्याशिवाय आज दुसरे काही एक मी मनामध्ये योजलेले नाही. तिने जे ठरवले असेल तेच आज निःसंशय घडून येईल.

भूपालहो, सर्व ठिकाणी आज भवानी जगदंबिका अवलोकन करणार्‍या मला, ह्या जगतामध्ये कोणीही शत्रू नाही. हे राजकुमारहो, जो माझ्याशी शत्रूत्व करील त्याला ती महाविद्या शासन करील.

हे नृपश्रेष्ठहो, जे भवितव्य असेल ते होईल. अन्यथा काही होणार नाही. ह्यासंबंधाने चिंता करण्याचे प्रयोजन काय ? मी सर्वदा दैवाधीन आहे. देव, भूते, मनुष्य व इतरही सर्व प्राणी ह्या सर्वांचे ठिकाणी जी शक्ती आहे, ती तिनेच निर्माण केलेली आहे. तिच्याशिवाय कोठेही शक्ती उपलब्ध होणे शक्य नाही.

हे नृपाधिपिहो, खरोखर भूपतिति, निर्धन अथवा सधन करण्याची ती इच्छा करते, त्याला ती तसा करून सोडते. मला चिंता करण्याचे कारण काय ? त्या परम शक्तीवाचून ब्रह्मा, विष्णू महेश्वर इत्यादी देवही हालचाल करण्यास समर्थ नाहीत. तेव्हा हे नृपहो, असे जर आहे, तर मल्ला काळजी करण्याचे कारण काय ? हे नृपहो, अशक्त असो अथवा सशक्त असो, जसा आहे तसाच, देवीच्या आज्ञेप्रमाणे मी आज स्वयंवराकरता येथे प्राप्त झालो आहे. तिची जे करण्याची इच्छा असेल ते ती करील. माझ्या चिंतनाचा उपयोग काय होणार आहे ? मी सत्य तेच सांगत आहे. ह्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही. हे भूपहो, जयपराजयाविषयी मला यत्किंचितही लज्जा वाटत नाही. लज्जा भगवतीला आहे आणि मी सर्वदा तिच्या स्वाधीन आहे."

सर्व नृपश्रेष्ठांनी त्याचे ते भाषण श्रवण केले आणि पुढील परिणाम जाणणारे ते भूपती होते, ते परस्परांकडे पाहू लागले. ते म्हणाले, "हे साधो, तुझे भाषण सत्य आहे ते कधीही मिथ्या होणार नाही. पण उज्जयिनीनाथ युधाजित तुझा वध करण्याची इच्छा व्यक्त करीत आहे. हे महाविचारी सुदर्शना, तुझ्या वर्तनाने आमचे ठिकाणी दया उत्पन्न झाल्यामुळे आम्ही तुला हे सांगत आहोत. हे निष्पापा, तू मनामध्ये विचार करून जे योग्य असेल ते कर."

सुदर्शन म्हणाला हे नृपश्रेष्ठ हो ! आपण दयाळू सुहृदांनी केलेले भाषण खरे आहे. परंतु

एकदा सांगितल्यानंतर मी तरी आता पुनरपी काय बरे सांगू ? कोणाचाही मृत्यू कोणालासुद्धा कधीहि आणता येत नाही. हे सर्व चराचर जगत देवाधीन आहे. हा जीव स्वतंत्र नसून सर्वदा स्वकर्माधीन असतो. ते कर्म तत्त्ववेत्त्या विद्वानांनी तीन प्रकारचे सांगितले आहे.

संचित, वर्तमान व तिसरे प्रारब्ध, काल, कर्म व मुलभूत प्रकृती ह्मांच्या अधीन हे सर्व जगत आहे. यास्तव काळ प्राप्त झाल्याशिवाय देवही मानवाचा वध करण्यास समर्थ नाही. संचितपूर्व कर्मामध्ये निश्चित असलेल्या निमित्तमात्रांनी मृत्यु आलेल्यालाच हा सनातन काळ वध करीत असतो. ज्याप्रमाणे शत्रूंना जेरीस आणणार्‍या माझ्या पित्याचा सिंहाने वध केला त्याप्रमाणे माझ्या मातामहाचाही संग्रामामध्ये युधाजिताने वध केला आहे.

कोट यत्‍न करणार्‍याही पुरुषाचा दैवयोगाने वध होत असतो व रक्षणावाचून ही एखादा पुरुष हजारो वर्षे जिवंत रहात असतो. तेव्हा हे धर्मनिष्ठ नृपहो ! युधाजिताला मी कधीहि भीत नाही. दैवच श्रेष्ठ समजून मी सर्वदा स्वस्थ असतो. भगवतीचे एकसारखे निरंतर स्मरण करीत असतो. ती विश्वमाता देवी माझे कल्याण करील. शुभ अथवा अशुभ असो, जे पूर्वार्जित असेल ते भोगलेच पाहिजे. स्वतः केलेल्या कर्माचे फल प्राप्त झाले असता ज्ञानी पुरुषांना शोक कोठून होणार ? स्वकर्माचे फल प्राप्त झाल्याच्या योगाने मूढ पुरुषाला दुःख झाले असता दुःखाचे जे निमित्त कारण त्याच्याशीच खरोखर तो अल्पमती वैर धरू लागतो. तशाप्रकारचे वैर, शोक अथवा भय मला ठावूक नाही.

मी येथे राजसमाजामध्ये उत्कृष्ट स्वयंवर अवलोकन करण्याकरता निर्भयपणे एकटा आलो आहे. आता जे व्हायचे असेल ते होईल. मी चंडिकेच्या आशेने येथे आलो आहे, भगवतीचे वाक्यच मला प्रमाण आहे, तिच्याच वाक्यावर निष्ठा ठेवणार्‍या मला दुसरे काही माहीत नाही. सुखदुःख तिने दिले तरच प्राप्त होत असते, नाही तर प्राप्त होत नाही. हे नृपश्रेष्ठहो, युधाजिताला सुख प्राप्त होवो. माझे त्याच्याशी वैर नाही. जो माझ्याशी वैर धरील त्याला त्याचे फल प्राप्त होईल.

ह्याप्रमाणे सुदर्शनाने सांगितले असता ते भूपती संतुष्ट होऊन स्वस्थ बसले, तोही आपल्या निवासस्थानामध्ये जाऊन स्वस्थ राहिला.

नंतर दुसर्‍या दिवशी शुभ काली सुबाहूराजाने आपल्या मनोहर मंडपामध्ये सर्व राजांना आवाहन केले. दिव्य आस्तरणांनी युक्त अशी सिंहासने मांडून ठेवलेली होती, त्यावर अलंकार धारण केलेले ते राजे येऊन बसले. दिव्य वेष धारण करून स्वयंवर अवलोकन करण्याच्या उद्देशाने तेथे यथेष्ट बसलेले ते राजे जणू काय विमानात बसलेले देवांप्रमाणे झळकू लागले.

राजकन्या केव्हा येईल. ज्याचे पुण्य प्रसिद्ध आहे अशा कोणत्या भाग्यवान नुरपप्रत्रेष्ठाला ती वरील ? अशी सर्वानाही चिंता लागली. जेव्हा ह्या ठिकाणी ती सुदर्शनाला दैवयोगाने माळ घालील, तेव्हा राजामध्ये कलह उपस्थित होईल हाता संशय नाही. ह्याप्रमाणे सिंहासनावर बसलेले ते राजे चिंतन करू लागले असता, राजाच्या मंडपामध्ये वाद्यांचा प्रचंड घोष सुरू झाला.

नंतर जिने स्नान करून उत्कुष्ट अलंकार धारण केले आहेत, मधूक-मालेने जी युक्त आहे. पैठणी नेसून विवाहसंबंधी आभूषणे जिने धारण केलेली आहेत व जी दिव्य देहाने युक्त असल्यामुळे लक्ष्मीचीच उपमा जिला योग्य आहे, उत्कृष्ट वस्त्र धारण केलेली व चिंताक्रांत झालेली अशी जी आपली कन्या शशिकला, तिला काशीराज हसतमुखाने म्हणाला, "हे कन्ये हातात शुभमाला घेऊन तू मंडपामध्ये जा, राजसमाजाकडे दृष्टी दे. गुणी, रूपवान व कुलीन असा जो नृपश्रेष्ठ तुझ्या मनामध्ये येईल, त्याला हे सुंदरी तू वर. हे सुंदरी अनेक देशातील राजे सिंहासनावर बसलेले आहेत, ते तू अवलोकन कर आणि आपल्या आवडीप्रमाणे पती वर."

ह्याप्रमाणे तो सांगत असताना, मितभाषण करणारी ती बाला राजाशी मनोहर व धर्मयुक्त भाषण करू लागली. शशिकला म्हणाली, "हे तात, नराधिपति जे कामुक राजे, त्यांच्या दृष्टीचे टप्प्यात जाणार्‍या स्त्रिया दुसर्‍या असतात. मी खरोखर तेथे जाणार नाही. हे तात, स्त्रीने एकच वर अवलोकन करणे योग्य आहे. दुसरा अवलोकन करणे योग्य नाही. हे धर्मशास्त्रातील वचन योग्य आहे. ते मी ऐकले आहे. जी पुष्कळांच्या समोर जाते, तिचे सतीत्व नष्ट झाले म्हणून समजावे. कारण ती दृष्टीस पडताक्षणीच, "ही मला प्राप्त होवो." म्हणून ते सर्वही इच्छा करू लागतात.

स्वयंवरसमयी हातात माळ घेऊन जेव्हा स्त्री मंडपामध्ये जाते, तेव्हा ती एखाद्या जारिणी स्त्रीप्रमाणे सर्वसाधारण स्त्री होते, वेश्या बाजारामध्ये जाते आणि तेथे असलेले पुरुष अवलोकन करून आपल्या मनामध्ये, गुणी कोण व गुणहीन कोण ह्याचा निश्चय करते. एकावरतीच भाव न ठेवता, वेश्या व्यर्थ कामुक पुरुष शोधीत असते. तस्मात वेश्येने केलेले कृत्य मंडपामध्ये जाऊन मी कसे बरे करू ? काही लोकांनी जरी हा धर्म आचरलेला असला, तरी सांप्रत मी तो आचरणार नाही. व्रतस्थ राहिलेली मी, इच्छेप्रमाणे पतिव्रताचेच आचरण करीन. साधारण स्त्री प्रथम सभेमध्ये जाते आणि पुरुषसमुदाय मनामध्ये आणून शेवटी कोणाला तरी एकाला वरते, मी पतिव्रता आज त्याप्रमाणे कसा बरे पती वरू ? हे तात, सुदर्शनाला मी पूर्वी अगदी मनापासून वरले आहे. हे नृपश्रेष्ठा, त्या शिवाय दुसरा पती वरण्याची माझी इच्छा नाही. हे आपणाला विदित आहे. हे भूपते, आपल्याला जर माझ्या कल्याणाची इच्छा असेल तर शुभ दिवशी सुदर्शनाला विवाहविधीने आपण कन्यादान करा."



अध्याय विसावा समाप्त

GO TOP