श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
द्वितीयः स्कन्धः
चतुर्थोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


देवव्रतोत्पतिवर्णनम्

सूत उवाच
प्रतीपेऽथ दिवं याते शन्तनुः सत्यविक्रमः ।
बभूव मृगयाशीलो निघ्नन्व्याघ्रान्मृगान्नृपः ॥ १ ॥
स कदाचिद्वने घोरे गङ्गातीरे चरन्नृपः ।
ददर्श मृगशावाक्षीं सुन्दरीं चारुभूषणाम् ॥ २ ॥
दृष्ट्वा तां नृपतिर्मग्नः पित्रोक्तेयं वरानना ।
रूपयौवनसम्पन्ना साक्षाल्लक्ष्मीरिवापरा ॥ ३ ॥
पिबन्मुखाम्बुजं तस्या न तृप्तिमगमन्नृपः ।
हृष्टरोमाभवत्तत्र व्याप्तचित्त इवानघ ॥ ४ ॥
महाभिषं सापि मत्वा प्रेमयुक्ता बभूव ह ।
किञ्चिन्मन्दस्मितं कृत्वा तस्थावग्रे नृपस्य च ॥ ५ ॥
वीक्ष्य तामसितापाङ्गीं राजा प्रीतमना भृशम् ।
उवाच मधुरं वाक्यं सान्त्वयन् श्लक्ष्णया गिरा ॥ ६ ॥
देवी वा त्वं च वामोरु मानुषी वा वरानने ।
गन्धर्वी वाथ यक्षी वा नागकन्याप्सरापि वा ॥ ७ ॥
यासि कासि वरारोहे भार्या मे भव सुन्दरि ।
प्रेमयुक्तस्मितैव त्वं धर्मपत्‍नी भवाद्य मे ॥ ८ ॥
सूत उवाच
राजा तां नाभिजानाति गङ्गेयमिति निश्चितम् ।
महाभिषं समुत्पन्नं नृपं जानाति जाह्नवी ॥ ९ ॥
पूर्वप्रेमसमायोगाच्छ्रुत्वा वाचं नृपस्य ताम् ।
उवाच नारी राजानं स्मितपूर्वमिदं वचः ॥ १० ॥

स्त्र्युवाच
जानामि त्वां नृपश्रेष्ठ प्रतीपतनयं शुभम् ।
का न वाञ्छति चार्वङ्गी भावित्वात्सदृशं पतिम् ॥ ११ ॥
वाग्बन्धेन नृपश्रेष्ठ वरिष्यामि पतिं किल ।
शृणु मे समयं राजन् वृणोमि त्वां नृपोत्तम ॥ १२ ॥
यच्च कुर्यामहं कार्यं शुभं वा यदि वाशुभम् ।
न निषेध्या त्वया राजन्न वक्तव्यं तथाप्रियम् ॥ १३ ॥
यदा च त्वं नृपश्रेष्ठ न करिष्यसि मे वचः ।
तदा मुक्त्या गमिष्यामि यथेष्टदेशं मारिष ॥ १४ ॥
स्मृत्वा जन्म वसूनां सा प्रार्थनापूर्वकं हृदि ।
महाभिषस्य प्रेमाथ विचिन्त्यैव च जाह्नवी ॥ १५ ॥
तथेत्युक्ताथ सा देवी चकार नृपतिं पतिम् ।
एवं वृता नृपेणाथ गङ्गा मानुषरूपिणी ॥ १६ ॥
नृपस्य मन्दिरं प्राप्ता सुभगा वरवर्णिनी ।
नृपतिस्तां समासाद्य चिक्रीडोपवने शुभे ॥ १७ ॥
सापि तं रमयामास भावज्ञा वै वराङ्गना ।
न बुबोध नृपः क्रीडन्गतान्वर्षगणानथ ॥ १८ ॥
स तया मृगशावाक्ष्या शच्या शतक्रतुर्यथा ।
सा सर्वगुणसम्पन्ना सोऽपि कामविचक्षणः ॥ १९ ॥
रेमाते मन्दिरे दिव्ये रमानारायणाविव ।
एवं गच्छति काले सा दधार नृपतेस्तदा ॥ २० ॥
गर्भं गङ्गा वसुं पुत्रं सुषुवे चारुलोचना ।
जातमात्रं सुतं वारि चिक्षेपैवं द्वितीयके ॥ २१ ॥
तृतीयेऽथ चतुर्थेऽथ पञ्चमे षष्ठ एव च ।
सप्तमे वा हते पुत्रे राजा चिन्तापरोऽभवत् ॥ २२ ॥
किं करोम्यद्य वंशो मे कथं स्यात्सुस्थिरो भुवि ।
सप्त पुत्रा हता नूनमनया पापरूपया ॥ २३ ॥
निवारयामि यदि मां त्यक्त्वा यास्यति सर्वथा ।
अष्टमोऽयं सुसम्प्राप्तो गर्भो मे मनसीप्सितः ॥ २४ ॥
न वारयामि चेदद्य सर्वथेयं जले क्षिपेत् ।
भविता वा न वा चाग्रे संशयोऽयं ममाद्‌भुतः ॥ २५ ॥
सम्भवेऽपि च दृष्टेयं रक्षयेद्वा न रक्षयेत् ।
एवं संशयिते कार्ये किं कर्तव्यं मयाधुना ॥ २६ ॥
वंशस्य रक्षणार्थं हि यत्‍नः कार्यः परो मया ।
ततः काले यदा जातः पुत्रोऽयमष्टमो वसुः ॥ २७ ॥
मुनेर्येन हृता धेनुर्नन्दिनी स्त्रीजितेन हि ।
तं दृष्ट्वा नृपतिः पुत्रं तामुवाच पतन्पदे ॥ २८ ॥
दासोऽस्मि तव तन्वङ्‌गि प्रार्थयामि शुचिस्मिते ।
पुत्रमेकं पुषाम्येनं देहि जीवितमद्य मे ॥ २९ ॥
हिंसिताः सप्त पुत्रा मे करभोरु त्वया शुभाः ।
अष्टमं रक्ष सुश्रोणि पतामि तव पादयोः ॥ ३० ॥
अन्यद्वै प्रार्थितं तेऽद्य ददाम्यथ च दुर्लभम् ।
वंशो मे रक्षणीयोऽद्य त्वया परमशोभने ॥ ३१ ॥
अपुत्रस्य गतिर्नास्ति स्वर्गे वेदविदो विदुः ।
तस्मादद्य वरारोहे प्रार्थयाम्यष्टमं सुतम् ॥ ३२ ॥
इत्युक्तापि गृहीत्वा तं यदा गन्तुं समुत्सुका ।
तदातिकुपितो राजा तामुवाचातिदुःखितः ॥ ३३ ॥
पापिष्ठे किं करोम्यद्य निरयान्न बिभेषि किम् ।
कासि पापकराणां त्वं पुत्री पापरता सदा ॥ ३४ ॥
यथेच्छं गच्छ वा तिष्ठ पुत्रो मे स्थीयतामिह ।
किं करोमि त्वया पापे वंशान्तकरयानया ॥ ३५ ॥
एवं वदति भूपाले सा गृहीत्वा सुतं शिशुम् ।
गच्छन्ती वचनं कोपसंयुता तमुवाच ह ॥ ३६ ॥
पुत्रकामा सुतं त्वेनं पालयामि वने गता ।
समयो मे गमिष्यामि वचनं ह्यन्यथाकृतम् ॥ ३७ ॥
गङ्गां मां वै विजानीहि देवकार्यार्थमागताम् ।
वसवस्तु पुरा शप्ता वसिष्ठेन महात्मना ॥ ३८ ॥
व्रजन्तु मानुषीं योनिं स्थितां चिन्तातुरास्तु माम् ।
दृष्ट्वेदं प्रार्थयामासुर्जननी नो भवानघे ॥ ३९ ॥
तेभ्यो दत्त्वा वरं जाता पत्‍नी ते नृपसत्तम ।
देवकार्यार्थसिद्ध्यर्थं जानीहि सम्भवो मम ॥ ४० ॥
सप्त ते वसवः पुत्रा मुक्ताः शापादृषेस्तु ते ।
कियन्तं कालमेकोऽयं तव पुत्रो भविष्यति ॥ ४१ ॥
गङ्गादत्तमिमं पुत्रं गृहाण शन्तनो स्वयम् ।
वसुं देवं विदित्वैनं सुखं भुंक्ष्व सुतोद्‌भवम् ॥ ४२ ॥
गाङ्गेयोऽयं महाभाग भविष्यति बलाधिकः ।
अद्य तत्र नयाम्येनं यत्र त्वं वै मया वृतः ॥ ४३ ॥
दास्यामि यौवनप्राप्तं पालयित्वा महीपते ।
न मातृरहितः पुत्रो जीवेन्न च सुखी भवेत् ॥ ४४ ॥
इत्युक्त्वान्तर्दधे गङ्गा तं गृहीत्वा च बालकम् ।
राजा चातीव दुःखार्तः संस्थितो निजमन्दिरे ॥ ४५ ॥
भार्याविरहजं दुःखं तथा पुत्रस्य चाद्‌भुतम् ।
सर्वदा चिन्तयन्नास्ते राज्यं कुर्वन्महीपतिः ॥ ४६ ॥
एवं गच्छति कालेऽथ नृपतिर्मृगयां गतः ।
निघ्नन्मृगगणान्बाणैर्महिषान्सूकरानपि ॥ ४७ ॥
गङ्गातीरमनुप्राप्तः स राजा शन्तनुस्तदा ।
नदीं स्तोकजलां दृष्ट्वा विस्मितः स महीपतिः ॥ ४८ ॥
तत्रापश्यत्कुमारं तं मुञ्चन्तं विशिखान्बहून् ।
आकृष्य च महाचापं क्रीडन्तं सरितस्तटे ॥ ४९ ॥
तं वीक्ष्य विस्मितो राजा न स्म जानाति किञ्चन ।
नोपलेभे स्मृतिं भूपः पुत्रोऽयं मम वा न वा ॥ ५० ॥
दृष्ट्वाप्यमानुषं कर्म बाणेषु लघुहस्तताम् ।
विद्यां वाप्रतिमां रूपं तस्य वै स्मरसन्निभम् ॥ ५१ ॥
पप्रच्छ विस्मितो राजा कस्य पुत्रोऽसि चानघ ।
नोवाच किञ्चिद्वीरोऽसौ मुञ्चञ्छिलीमुखानथ ॥ ५२ ॥
अन्तर्धानं गतः सोऽथ राजा चिन्तातुरोऽभवत् ।
कोऽयं मम सुतो बालः किं करोमि व्रजामि कम् ॥ ५३ ॥
गङ्गां तुष्टाव भूपालः स्थितस्तत्र समाहितः ।
दर्शनं सा ददौ चाथ चारुरूपा यथा पुरा ॥ ५४ ॥
दृष्ट्वा तां चारुसर्वाङ्गीं बभाषे नृपतिः स्वयम् ।
कोऽयं गङ्गे गतो बालो मम त्वं दर्शयाधुना ॥ ५५ ॥
गङ्गोवाच
पुत्रोऽयं तव राजेन्द्र रक्षितश्चाष्टमो वसुः ।
ददामि तव हस्ते तु गाङ्गेयोऽयं महातपाः ॥ ५६ ॥
कीर्तिकर्ता कुलस्यास्य भविता तव सुव्रत ।
पाठितस्त्वखिलान्वेदान्धनुर्वेदं च शाश्वतम् ॥ ५७ ॥
वसिष्ठस्याश्रमे दिव्ये संस्थितोऽयं सुतस्तव ।
सर्वविद्याविधानज्ञः सर्वार्थकुशलः शुचिः ॥ ५८ ॥
यद्वेद जामदग्न्योऽसौ तद्वेदायं सुतस्तव ।
गृहाण गच्छ राजेन्द्र सुखी भव नराधिप ॥ ५९ ॥
इत्युक्त्वान्तर्दधे गङ्गा दत्त्वा पुत्रं नृपाय वै ।
नृपतिस्तु मुदा युक्तो बभूवातिसुखान्वितः ॥ ६० ॥
समालिङ्ग्य सुतं राजा समाघ्राय च मस्तकम् ।
समारोप्य रथे पुत्रं स्वपुरं स प्रचक्रमे ॥ ६१ ॥
गत्वा गजाह्वयं राजा चकारोत्सवमुत्तमम् ।
दैवज्ञं च समाहूय पप्रच्छ च शुभं दिनम् ॥ ६२ ॥
समाहृत्य प्रजाः सर्वाः सचिवान्सर्वशः शुभान् ।
यौवराज्येऽथ गाङ्गेयं स्थापयामास पार्थिवः ॥ ६३ ॥
कृत्वा तं युवराजानं पुत्रं सर्वगुणान्वितम् ।
सुखमास स धर्मात्मा न सस्मार च जाह्नवीम् ॥ ६४ ॥
सूत उवाच
एतद्वः कथितं सर्वं कारणं वसुशापजम् ।
गाङ्गेयस्य तथोत्पत्तिं जाह्नव्याः सम्भवं तथा ॥ ६५ ॥
गङ्गावतरणं पुण्यं वसूनां सम्भवं तथा ।
यः शृणोति नरः पापान्मुच्यते नात्र संशयः ॥ ६६ ॥
पुण्यं पवित्रमाख्यानं कथितं मुनिसत्तमाः ।
यथा मया श्रुतं व्यासात्पुराणं वेदसम्मितम् ॥ ६७ ॥
श्रीमद्‌भागवतं पुण्यं नानाख्यानकथान्वितम् ।
द्वैपायनमुखोद्‌भूतं पञ्चलक्षणसंयुतम् ॥ ६८ ॥
शृण्वतां सर्वपापघ्नं शुभदं सुखदं तथा ।
इतिहासमिमं पुण्यं कीर्तितं मुनिसत्तमाः ॥ ६९ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
द्वितीयस्कन्धे देवव्रतोत्पत्तिवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥


गंगावतरण व वसूंचा मानव जन्म

"अशा तर्‍हेने हे राजा, शंतनूने राज्य ग्रहण केल्यावर, तो नित्य मृगयेस जाऊ लागला. व्याघ्र हरिण यांची शिकार करीत तो संचार करु लागला. असाच एकदा गंगेच्या काठावरुन हिंडत असता एक हरिणाप्रमाणे डोळा असलेली रुपसंपन्न तरुणी त्याच्या दृष्टीस पडली राजचे मन मोहित झाले. पित्याने सांगितलेली यौवना हीच असावी असे त्याला वाटले तो अतृप्त नेत्रांनी तिच्याकडे पाहात राहिला. ती स्त्री त्याच्याकड अनिमिष नजरेने पाहू लागली. हाच पूर्वीचा महाभिषराजा आहे, हे ओळखून ती स्त्री शंतनूच्या पुढे येऊन उभी राहिली.

कृष्णवर्ण नैत्रप्रदेश असलेल्या त्या स्त्रीकडे पहाताच राजा प्रसन्न चित्त झाला आणि मधुर भाषणाने व हेतु गर्भ शब्दांनी तो म्हणाला, "हे सुमुखी, देव, मनुष्य, गंधर्व, यक्ष, नग, अप्सरा, ह्यांपैकी तू कोणाचीही कन्या असलीस तरी काही चिंता नाही. हे सर्व लक्षण संपन्न स्त्रिये, तू माझी भार्या हो. कारण प्रीती असल्यामुळेच तू मिस्किल हास्य करीत आहेस. तू माझी धर्मपत्नी हो."

राजाने ही गंगाच आहे हे ओळखले. असा पूर्वप्रेमाचा संबंध असल्याने ती सुवदना मधुर शब्दात म्हणाली, "हे राजेश्वरा, आपण प्रतीप राजाचे पुत्र आहात. स्त्रीला मनोहर अवयवांनी युक्त असा पति लाभला तरी तो का बरे स्वीकारणार नाही ? मी काही अटीवर तुझा स्वीकर करीन. हे राजा, विवाहानंतर मी जी काही शुभ अथवा अशुभ कृत्य करीन त्याबद्दल तू माझा निषेध करु नयेस. तसेच माझ्याशी कधीही अप्रिय भाषण करु नये. जेव्हा तू माझ्या या म्हणण्याप्रमाणे वागणार नाहीस, तेव्हा त्याचक्षणी मी तुला सोडून देईन आणि स्वेच्छेने कुठेही जाईन." वसूंची विनंती मान्य करण्याकरता तिने या अटी राजाला सांगितल्या. शंतुनीराजाने त्याला संमति दिली. नंतर गंगादेवीने त्याला पति म्हणून वरले. ती सुंदरी राजाच्या मंदिरात आली. राजाने तिच्यासह सुंदर उपवनात क्रीडा केली. त्या स्त्रीनेही पतीच्या मनाप्रमाणे त्याला सुखविले. शचीसह रममाण होणार्‍या इंद्राप्रमाणे हा राजाही त्या हरिणाक्षीसह कित्येक कालपर्यंत क्रीडा करीत राहिला. त्यांना काळाचे भान राहिलेच नाही. ते या सुरत क्रीडेत निपुण होते. म्हणून अत्यंत अनुरुप असलेल्या त्या दोघांनी, लक्ष्मी नारायणाप्रमाणे क्रीडा केली. योग्य वेळी तीला गर्भ राहिला. तिने दिवस पूर्ण होताच, पुत्ररुप वसुला जन्म दिला. पण पुत्र होताच तिने तो उदकात टाकून दिला. अशाप्रकारे तिने सातही वेळा आपल्या पुत्रांना जन्मत:च उदकात टाकले त्यामुळे राजा चिंताक्रांत झाला. तो मनात म्हणाला,

"आता अशाप्रकारे माझा अंश कसा वाढेल ? काय करावे ? पण सातही पुत्र नाहीसे केले तरी मी जर हिला अडविले, तर ती त्याग करुन निघून जाईल. बरे तसेच हे चालू ठेवले तर होणार्‍या पुत्रालाही ही तशीच सोडून देणार. असे सुंदर पुत्र पुन: होतील की नाही ? आणि झाला तरी, ही दृष्टा त्याचे रक्षण करील कशावरुन ? तेव्हा आता योग्य विचार करुन वंश रक्षण केलाच पाहिजे. ज्या वसूने स्त्रीसाठी कामधेनुचे हरण केले, तो आठवा वसू यावेळी गंगेच्या पोटी जन्माला आला. त्या सुलक्षणी पुत्राला पाहून शंतनूने पत्नीच्या पायावर डोके ठेवले व म्हणाला, "हे सुंदरी, मी तुझा दास आहे. हा पुत्र जिवंत स्थितीत माझ्या स्वाधीन कर. एका तरी पुत्राचे पोषण माझ्या हातून व्हावे. तू आजवर सात पुत्र नाहीसे केलेस. पण आठव्याचे रक्षण कर. तू दुसरी कोणतीही दुर्लभ गोष्ट माग, मी तुला देईन. पण पाया पडून सांगतो. या पुत्राचे रक्षण कर."

राजा अशी विनंती करीत असताही ती आपल्या पुत्राला घेऊन निघाली. तेव्हा मात्र राजा क्रुद्ध झाला व दु:खाने म्हणाला, "महापापिणि, तुझे आता काय करु ? तुला नरकाचेही भय नाही. तू पातक्याची कन्या असावीस. म्हणून पापतत्पर राहतेस. तू इच्छेला येईल तिकडे जा किंवा रहा. पण माझा पुत्र मला दे. तुझ्यासारख्या कुलनाशिनीशी मला कर्तव्य नाही."

तान्ह्या मुलाला घेऊन जात असताना ती स्त्री अडवणुकीमुळे संतप्त झाली. "हे राजा मला पुत्र हवा आहे. तू माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध वागल्यामुळे मी कोठेही निघून जाईन. केवळ देव कार्यासाठी मी गंगा आपल्या घरी आले. वसूना वसिष्ठांनी मनुष्य योनीत जन्म पावाल म्हणून शाप दिला होता. त्या चिंताक्रांत वसूंनी विनंता केल्यावर मी त्यांची माता झाले. त्यांना वर देऊन मी तुझी पत्नी झाले. देवकार्यासाठी मी उत्पन्न झाल्यामुळे तुझे पुत्र म्हणजे सात वसू शापमुक्त झाले आहेत. आता हा पुत्र मात्र दीर्घकाल राहील. मी त्याला घेऊन जाईन. त्याचे पालन करीन. हा आठवा वसू आहे. हा बलाने तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ होईल. हे भाग्यशाली राजा, मी जेथे तुला प्रथम वरले तेथे याला घेऊन जाते. त्याचा सांभाळ करुन हा यौवनात आला की तुझ्या स्वाधीन करीन. मातेवाचून पुत्र जिवंत राहणार नाही." असे सांगून पुत्रासह गंगा तेथेच गुप्त झाली. राजा दु:खी अंत:करणाने स्वगृही परतला. राज्य करीत असतानाही भार्या व पुत्र यांच्या वियोगामुळे तो नेहमी दु:खी असे.

असाच बराच काळ लोटल्यावर तो एकदा मृगयेसाठी बाहेर पडला. मृग, महिष, सूकर यांचा बाणांनी वध करीत शंतनुराजा गंगातीरावर आला. नदीत पाणी अत्यंतच कमी असलेले पाहून त्याला आश्चर्य वाटले. तो जरा पुढे जाताच, त्याला एक बालक धनुष्यातून नदीच्या पात्रात बाण सोडीत असल्याचे दिसले. त्यामुळे नदीचे पाणी अडविले गेले होते. ते पाहून तो जास्तच चकित झाला. या बालकाचा प्राक्रम स्तिमित करणारा होता. त्याची शीर्घगति व मदनासारखे रुप पाहून राजाने विचारले.

"तू कोणाचे पुत्र ?" पण बाण सोडण्यात मग्न झालेल्या वीराने उत्तर दिले नाही आणि तो अकस्मात दिसेनासा झाला. तेव्हा चिंतातूर राजा विचार करु लागला. त्याने स्वस्थचित्त होऊन गंगेची स्तुति केली. पूर्वीसारखे आकर्षक रुप घेऊन गंगा राजापुढे उभी राहिली. सुंदर गंगेला राजा म्हणाला, "हे गंगे हा माझाच पुत्र काय ? तो मला दाखव."

गंगा म्हणाली, " राजा तुझा पुत्र आठवा वसू जिवंत आहे. त्याला मी तुझे हाती देते. तो सर्व वेद व धनुर्वेद यात निष्णात आहे व वसिष्ठ मुनींच्या आश्रमात याचे शिक्षण झाल्याने हा व्युत्पन्न आहे. सर्व व्यवहारात हा तरबेज आहे. प्रत्यक्ष परशुरामइतका याचा अभ्यास आहे. हा घे तुझा पुत्र."

असे म्हणून त्या बालकाला राजाच्या स्वाधीन करुन गंगा गुप्त झाली.

राजाने आनंदित होऊन बालकाच्या मस्तकाचे अवघ्राण केले व त्याला रथावर बसवून राजवाड्यात आणले. हस्तिनापुरात गेल्यावर राजाने पुत्रप्राप्तीमुळे संतुष्ट होऊन मोठा उत्सव केला. दैवज्ञ बोलावून शुभदिन विचारला व सर्व मंत्री, प्रतिष्ठित पौरजनांना जमवून त्या गंगानंदनाला राजाने युवराज्याभिषेक केला. नंतर तो सुखाने राहू लागला. त्याला गंगेचे स्मरणही नाहीसे झाले."

अशाप्रकारे गंगावतरण व अष्ट वसूंची उत्पत्ती ह्याबद्दल सविस्तर कथा सूताने ऋषींना सांगितली.



अध्याय चवथा समाप्त

GO TOP