श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
प्रथमः स्कन्धः
विंशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


धृतराष्ट्रादीनामुत्पत्तिवर्णनम्

ऋषय ऊचुः
शुकस्तु परमां सिद्धिमाप्तवान्देवसत्तमः ।
किं चकार ततो व्यासस्तन्नो ब्रूहि सविस्तरम् ॥ १ ॥
सूत उवाच
शिष्या व्यासस्य येऽप्यासन्वेदाभ्यासपरायणाः ।
आज्ञामादाय ते सर्वे गताः पूर्वं महीतले ॥ २ ॥
असितो देवलश्चैव वैशम्पायन एव च ।
जैमिनिश्च सुमन्तुश्च गताः सर्वे तपोधनाः ॥ ३ ॥
तानेतान्वीक्ष्य पुत्रं च लोकान्तरितमप्युत ।
व्यासः शोकसमाक्रान्तो गमनायाकरोन्मतिम् ॥ ४ ॥
सस्मार मनसा व्यासस्तां निषादसुतां शुभाम् ।
मातरं जाह्नवीतीरे मुक्तां शोकसमन्विताम् ॥ ५ ॥
स्मृत्वा सत्यवतीं व्यासस्त्यक्त्वा तं पर्वतोत्तमम् ।
आजगाम महातेजा जन्मस्थानं स्वकं मुनिः ॥ ६ ॥
द्वीपं प्राप्याथ पप्रच्छ क्व गता सा वरानना ।
निषादास्तं समाचख्युर्दत्ता राज्ञे तु कन्यका ॥ ७ ॥
दाशराजोऽपि सम्पूज्य व्यासं प्रीतिपुरःसरम् ।
स्वागतेनाभिसत्कृत्य प्रोवाच विहिताञ्जलिः ॥ ८ ॥
दाशराज उवाच
अद्य मे सफलं जन्म पावितं नः कुलं मुने ।
देवानामपि दुर्दर्शं यज्जातं तव दर्शनम् ॥ ९ ॥
यदर्थमागतोऽसि त्वं तद्‌ब्रूहि द्विजसत्तम ।
अपि दारा धनं पुत्रास्त्वदायत्तमिदं विभो ॥ १० ॥
सरस्वत्यास्तटे रम्ये चकाराश्रममण्डलम् ।
व्यासस्तपःसमायुक्तस्तत्रैवास समाहितः ॥ ११ ॥
सत्यवत्याः सुतौ जातौ शन्तनोरमितद्युतेः ।
मत्वा तौ भ्रातरौ व्यासः सुखमाप वने स्थितः ॥ १२ ॥
चित्राङ्गदः प्रथमजो रूपवाञ्छत्रुतापनः ।
बभूव नृपतेः पुत्रः सर्वलक्षणसंयुतः ॥ १३ ॥
विचित्रवीर्यनामासौ द्वितीयः समजायत ।
सोऽपि सर्वगुणोपेतः शन्तनोः सुखवर्धनः ॥ १४ ॥
गाङ्गेयः प्रथमस्तस्य महावीरो बलाधिकः ।
तथैव तौ सुतौ जातौ सत्यवत्यां महाबलौ ॥ १५ ॥
शन्तनुस्तान्सुतान्वीक्ष्य सर्वलक्षणसंयुतान् ।
अमंस्ताजय्यमात्मानं देवादीनां महामनाः ॥ १६ ॥
अथ कालेन कियता शन्तनुः कालपर्ययात् ।
तत्याज देहं धर्मात्मा देही जीर्णमिवाम्बरम् ॥ १७ ॥
कालधर्मगते राज्ञि भीष्मश्चक्रे विधानतः ।
प्रेतकार्याणि सर्वाणि दानानि विविधानि च ॥ १८ ॥
चित्राङ्गदं ततो राज्ये स्थापयामास वीर्यवान् ।
स्वयं न कृतवान् राज्यं तस्माद्देवव्रतोऽभवत् ॥ १९ ॥
चित्राङ्गदस्तु वीर्येण प्रमत्तः परदुःखदः ।
बभूव बलवान्वीरः सत्यवत्यात्मजः शुचिः ॥ २० ॥
अथैकदा महाबाहुः सैन्येन महतावृतः ।
प्रचचार वनोद्देशात्पश्यन्वध्यान्मृगान् रुरून् ॥ २१ ॥
चित्राङ्गदस्तु गन्धर्वो दृष्ट्वा तं मार्गगं नृपम् ।
उत्ततारान्तिकं भूमेर्विमानवरमास्थितः ॥ २२ ॥
तत्राभूच्च महद्युद्धं तयोः सदृशवीर्ययोः ।
कुरुक्षेत्रे महास्थाने त्रीणि वर्षाणि तापसाः ॥ २३ ॥
इन्द्रलोकमवापाशु गन्धर्वेण हतो रणे ।
भीष्मः श्रुत्वा चकाराशु तस्यौर्ध्वदैहिकं तदा ॥ २४ ॥
गाङ्गेयः कृतशोकस्तु मन्त्रिभिः परिवारितः ।
विचित्रवीर्यनामानं राज्येशं च चकार ह ॥ २५ ॥
मन्त्रिभिर्बोधिता पश्चाद्‌गुरुभिश्च महात्मभिः ।
स्वपुत्रं राज्यगं दृष्ट्वा पुत्रशोकहतापि च ॥ २६ ॥
सत्यवत्यतिसन्तुष्टा बभूव वरवर्णिनी ।
व्यासोऽपि भ्रातरं श्रुत्वा राजानं मुदितोऽभवत् ॥ २७ ॥
यौवनं परमं प्राप्तः सत्यवत्याः सुतः शुभः ।
चकार चिन्तां भीष्मोऽपि विवाहार्थं कनीयसः ॥ २८ ॥
काशिराजसुतास्तिस्रः सर्वलक्षणसंयुताः ।
तेन राज्ञा विवाहार्थं स्थापिताश्च स्वयंवरे ॥ २९ ॥
राजानो राजपुत्राश्च समाहूताः सहस्रशः ।
इच्छास्वयंवरार्थं वै पूज्यमानाः समागताः ॥ ३० ॥
तत्र भीष्मो महातेजास्ता जहार बलेन वै ।
निर्मथ्य राजकं सर्वं रथेनैकेन वीर्यवान् ॥ ३१ ॥
स जित्वा पार्थिवान्सर्वांस्ताश्चादाय महारथः ।
बाहुवीर्येण तेजस्वी ह्याससाद गजाह्वयम् ॥ ३२ ॥
मातृवद्‌भगिनीवच्च पुत्रीवच्चिन्तयन्किल ।
तिस्रः समानयामास कन्यका वामलोचनाः ॥ ३३ ॥
सत्यवत्यै निवेद्याशु द्विजानाहूय सत्वरः ।
दैवज्ञान्वेदविदुषः पर्यपृच्छच्छुभं दिनम् ॥ ३४ ॥
कृत्वा विवाहसम्भारं यदा वै भ्रातरं निजम् ।
विचित्रवीर्यं धर्मिष्ठं विवाहयति ता यदा ॥ ३५ ॥
तदा ज्येष्ठाप्युवाचेदं कन्यका जाह्नवीसुतम् ।
लज्जमानासितापाङ्गी तिसॄणां चारुलोचना ॥ ३६ ॥
गङ्गापुत्र कुरुश्रेष्ठ धर्मज्ञ कुलदीपक ।
मया स्वयंवरे शाल्वो वृतोऽस्ति मनसा नृपः ॥ ३७ ॥
वृताहं तेन राज्ञा वै चित्ते प्रेमसमाकुले ।
यथायोग्यं कुरुष्वाद्य कुलस्यास्य परन्तप ॥ ३८ ॥
तेनाहं वृतपूर्वाऽस्मि त्वं च धर्मभृतां वरः ।
बलवानसि गाङ्गेय यथेच्छसि तथा कुरु ॥ ३९ ॥
सूत उवाच
एवमुक्तस्तया तत्र कन्यया कुरुनन्दनः ।
अपृच्छत् ब्राह्मणान्वृद्धान्मातरं सचिवांस्तथा ॥ ४० ॥
सर्वेषां मतमाज्ञाय गाङ्गेयो धर्मवित्तमः ।
गच्छेति कन्यकां प्राह यथारुचि वरानने ॥ ४१ ॥
विसर्जिताथ सा तेन गता शाल्वनिकेतनम् ।
उवाच तं वरारोहा राजानं मनसेप्सितम् ॥ ४२ ॥
विनिर्मुक्तास्मि भीष्मेण त्वन्मनस्केति धर्मतः ।
आगतास्मि महाराज गृहाणाद्य करं मम ॥ ४३ ॥
धर्मपत्‍नी तवात्यन्तं भवामि नृपसत्तम ।
चिन्तितोऽसि मया पूर्वं त्वयाहं नात्र संशयः ॥ ४४ ॥
शाल्व उवाच
गृहीता त्वं वरारोहे भीष्मेण पश्यतो मम ।
रथे संस्थापिता तेन न ग्रहीष्ये करं तव ॥ ४५ ॥
परोच्छिष्टां च कः कन्यां गृह्णाति मतिमान्नरः ।
अतोऽहं न ग्रहीष्यामि त्यक्तां भीष्मेण मातृवत् ॥ ४६ ॥
रुदती विलपन्ती सा त्यक्ता तेन महात्मना ।
पुनर्भीष्मं समागत्य रुदती चेदमब्रवीत् ॥ ४७ ॥
शाल्वो मुक्तां त्वया वीर न गृह्णाति गृहाण माम् ।
धर्मज्ञोऽसि महाभाग मरिष्याम्यन्यथा ह्यहम् ॥ ४८ ॥
भीष्म उवाच
अन्यचित्तां कथं त्वां वै गृह्णामि वरवर्णिनि ।
पितरं स्वं वरारोहे व्रज शीघ्नं निराकुला ॥ ४९ ॥
तथोक्ता सा तु भीष्मेण जगाम वनमेव हि ।
तपश्चकार विजने तीर्थे परमपावने ॥ ५० ॥
द्वे भार्ये चातिरूपाढ्ये तस्य राज्ञो बभूवतुः ।
अम्बालिका चाम्बिका च काशिराजसुते शुभे ॥ ५१ ॥
राजा विचित्रवीर्योऽसौ ताभ्यां सह महाबलः ।
रेमे नानाविहारैश्च गृहे चोपवने तथा ॥ ५२ ॥
वर्षाणि नव राजेन्द्रः कुर्वन् क्रीडा मनोरमाम् ।
प्रापासौ मरणं भूयो गृहीतो राजयक्ष्मणा ॥ ५३ ॥
मृते पुत्रेऽतिदुःखार्ता जाता सत्यवती तदा ।
कारयामास पुत्रस्य प्रेतकार्याणि मन्त्रिभिः ॥ ५४ ॥
भीष्ममाह तदैकान्ते वचनं चातिदुःखिता ।
राज्यं कुरु महाभाग पितुस्ते शन्तनोः सुत ॥ ५५ ॥
भ्रातुर्भार्यां गृहाण त्वं वंशञ्च परिरक्षय ।
यथा न नाशमायाति ययातेर्वंश इत्युत ॥ ५६ ॥
भीष्म उवाच
प्रतिज्ञा मे श्रुता मातः पित्रर्थे या मया कृता ।
नाहं राज्यं करिष्यामि न चाहं दारसंग्रहम् ॥ ५७ ॥
सूत उवाच
तदा चिन्तातुरा जाता कथं वंशो भवेदिति ।
नालसाद्धि सुखं मह्यं समुत्पन्ने ह्यराजके ॥ ५८ ॥
गाङ्गेयस्तामुवाचेदं मा चिन्तां कुरु भामिनि ।
पुत्रं विचित्रवीर्यस्य क्षेत्रजं चोपपादय ॥ ५९ ॥
कुलीनं द्विजमाहूय वध्वा सह नियोजय ।
नात्र दोषोऽस्ति वेदेऽपि कुलरक्षाविधौ किल ॥ ६० ॥
पौत्रं चैवं समुत्पाद्य राज्यं देहि शुचिस्मिते ।
अहं च पालयिष्यामि तस्य शासनमेव हि ॥ ६१ ॥
तच्छ्रुत्वा वचनं तस्य कानीनं स्वसुतं मुनिम् ।
जगाम मनसा व्यासं द्वैपायनमकल्मषम् ॥ ६२ ॥
स्मृतमात्रस्ततो व्यास आजगाम स तापसः ।
कृत्वा प्रणामं मात्रेऽथ संस्थितो दीप्तिमान्मुनिः ॥ ६३ ॥
भीष्मेण पूजितः कामं सत्यवत्या च मानितः ।
तस्थौ तत्र महातेजा विधूमोऽग्निरिवापरः ॥ ६४ ॥
तमुवाच मुनिं माता पुत्रमुत्पादयाधुना ।
क्षेत्रे विचित्रवीर्यस्य सुन्दरं तव वीर्यजम् ॥ ६५ ॥
व्यासः श्रुत्वा वचो मातुराप्तवाक्यममन्यत ।
ओमित्युक्त्वा स्थितस्तत्र ऋतुकालमचिन्तयत् ॥ ६६ ॥
अम्बिका च यदा स्नाता नारी ऋतुमती तदा ।
सङ्गं प्राप्य मुनेः पुत्रमसूतान्धं महाबलम् ॥ ६७ ॥
जन्मान्धं च सुतं वीक्ष्य दुःखिता सत्यवत्यपि ।
द्वितीयां च वधूमाह पुत्रमुत्पादयाशु वै ॥ ६८ ॥
ऋतुकालेऽथ सम्प्राप्ते व्यासेन सह सङ्गता ।
तथा चाम्बालिका रात्रौ गर्भं नारी दधार सा ॥ ६९ ॥
सोऽपि पाण्डुः सुतो जातो राज्ययोग्यो न सम्मतः ।
पुत्रार्थे प्रेरयामास वर्षान्ते च पुनर्वधूम् ॥ ७० ॥
आहूय च ततो व्यासं सम्प्रार्थ्य मुनिसत्तमम् ।
प्रेषयामास रात्रौ सा शयनागारमुत्तमम् ॥ ७१ ॥
न गता च वधूस्तत्र प्रेष्या सम्प्रेषिता तया ।
तस्यां च विदुरो जातो दास्यां धर्मांशतः शुभः ॥ ७२ ॥
एवं व्यासेन ते पुत्रा धृतराष्ट्रादयस्त्रयः ।
उत्पादिता महावीरा वंशरक्षणहेतवे ॥ ७३ ॥
एतद्वः सर्वमाख्यातं तस्य वंशसमुद्‌भवम् ।
व्यासेन रक्षितो वंशो भ्रातृधर्मविदानघाः ॥ ७४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां ॥
प्रथमस्कन्धे धृतराष्ट्रादीनामुत्पत्तिवर्णनं नाम विंशोऽध्यायः ॥ २० ॥


व्यासांकडून कौरव वंशाचे रक्षण

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यासांचे वेदाभ्यासाविषयी तत्पर असलेले असित, देवल, वैशंपायन, जेमिनी, सुमंतु इत्यादी शिष्य व्यासांची आज्ञा घेऊन भूतलावर गेले, शुकालाही उत्तम गती प्राप्त झाल्यामुळे शोक विव्हल होऊन न्यासांनी आपले ठिकाण सोडण्याचे ठरविले. पूर्वी व्यासांनी जान्हवीच्या तीरावर मातेला शोकाकल अवस्थेत सोडले होते. तिची त्यांना आठवण झाली. निषाद कन्या सत्यवतीची स्मृति येताच ते पुनः आपल्या जन्मभूमीकडे जाण्यास निघाले. तेथे गेल्यावर माता सत्यवती कोठे गेली, याची त्यांनी चौकशी केली. तेव्हा निषादाने त्यांना सांगितले की ती राजाला दिली. नंतर निषाद राजानेही व्यासांची पूजा केली व सत्कार करून, तो हात जोडून म्हणाला, “ हे मुने, आज मी धन्य झालो. देवदुर्लभ असे आपले दर्शन मला माझे कुलही पावन झाले. तेव्हा हे द्विजश्रेष्ठा, आपण का येणे केले ते सांगा. हे प्रभो, भार्या, धन, पुत्र हे सर्व आपल्याच हातात आहे.

राजाचे समाधान केल्यावर, मन स्वस्थ करून व्यासांनी सरस्वतीच्या तीरावर एक आश्रम स्थापन केला व तेथेच ते राहू लागले. अत्यंत तेजस्वी सत्यवतीला शंतनुराजापासून दोन पुत्र झाले. ते आपले भाऊ आहेत, हे समजल्यावर व्यासाना आनंद झाला. चित्रांगद हा राजाचा मोठा मुलगा व विचित्रवीर्य हा धाकटा. हे दोन्ही पुत्र सर्वगुणसंपन्न होते. त्यामुळे शंतनू सुखी झाला. महापराक्रमी व गंगानंदन भीष्म हा राजाचा सर्वात ज्येष्ठ पुत्र. तसेच सत्यवतीपासून झालेले पुत्रही महापराक्रमीच होते. ही शूर मुले पाहून राजाला वाटले आपण देवांनाही हार जाणार नाही. काही कालानंतर शंतनूने देहाचा त्याग केला.

राजा मृत्यू पावल्यावर भीष्माने सर्व विधी धर्माप्रमाणे पार पाडले. नाना तर्‍हेची दाने दिली. नंतर चित्रांगदाची गादीवर स्थापना केली. पण स्वतः राज्याधिकारी झाला नाही. म्हणून त्याला देवव्रत हे नाव मिळाले. आपला बलाचा गर्व झाल्याने चित्रांगद राजा इतरांना त्रास देऊ लागला. एकदा तो प्रचंड सैन्य घेऊन ररू, मृगांचा वध करीत अरण्यात संचार करीत होता. त्याचवेळी चित्रांगद गंधर्व, श्रेष्ठ अशा विमानांतून चालला होता. पण राजाला अवलोकन, करताच तेथेच जवळ उतरला. तेव्हा कुरुक्षेत्रावर त्या तुल्यबल असलेल्या उभयतांमध्ये दारुण युद्ध तीन वर्षेपर्यंत झाले. शेवटी गंधर्वाने चित्रांगद राजाचा वध केला व तो इंद्रलोकी निघून गेला. हे भीव्याला समजताच त्याला अतीव दुःख झाले. भावाचे क्रियाकर्म करून भीष्माने धाकटा भाऊ विचित्रवीर्य याला राज्याभिषेक केला. सत्यवती दुःखी होती. पण सर्व मुनी व इतर श्रेष्ठ जनांनी तिचे सांत्वन केले व दुसर्‍या पुत्राला गादीवर बसवलेला पाहून ती काहीशी शांत झाली. भाऊच राजा झाला म्हणून व्यासांनाही समाधान वाटले.

विचित्रवीर्य यौवनावस्थेत आल्यावर त्याच्या विवाहाची चिंता भीष्मांना वाटू लागली. काशी राजाला तीन सुंदर कन्या होत्या त्यांचा विवाह स्वयंवर पद्धतीने करावा, असे राजाने प्रसिद्ध केले होते. त्यासाठी सर्व राजे व राजपुत्रांना निमंत्रणे दिली होती. तेथे गेल्यावर त्यांचा सत्कार करण्यात येत होता. तेथे जाऊन महापराक्रमी भीष्माने स्वतःचा एक रथ बरोबर घेऊनही, तेथील सर्व उपस्थित राजांचा पराभव केला व त्या कन्यांचे हरण केले. ते हस्तिनापूरला परत आले. त्या तिन्हीही मुली आपल्या माता, भगिनी, कन्याच आहेत याच भावनेने भीष्मांनी त्यांना आणले होते. त्यांना सत्यवतीचे स्वाधीन करून विवाहाचा शुभ मुहूर्त पाहून भीष्माने आपल्या विचित्रवीर्य नावाच्या भावाबरोबर त्यांचा विवाह ठरविला. तेव्हा सर्वात थोरली व सुंदर मुलगी पुढे येऊन लाजत लाजत भीष्माला म्हणाली, “हे गंगानंदना, हे श्रेष्ठा, मी मनाने शाल्व राजाला वरले आहे, आणि त्यानेही मला अंतःकरण पूर्वक वरले आहे. तेव्हा आपण योग्य दिसेल तसे करा. तू धर्मनिष्ठ आहेस. तेव्हा इच्छेला येईल तसे कर.

धर्मवेत्या भीष्माने आपल्या सचिवांशी विचारविनिमय केला व त्या मुलीला सांगितले, “हे सुंदरी तू आपल्या इच्छेप्रमाणे जा.” हे ऐकताच ती सुंदरवदना शाल्व राजाकडे गेली व म्हणाली, "महाराज, मी आपल्याला मनापासून वरले आहे; असे समजल्यावर भीष्माने धर्मबुद्धीने वागून मला मुक्त केले. आपण माझे पाणीग्रहण करावे. मी आपली धर्मपत्नी होईन. मी पूर्वीपासून आपल्याच विषयी मनात चिंतन करीत होते व आपणही तसेच केले आहेत. हे सत्य आहे."

शाल्व म्हणाला, “ हे सुंदरी, भीष्माने माझ्या समक्ष तुला आपल्या रथावर घेतले म्हणून मी तुझा स्वीकार करू शकत नाही. दुसर्‍याच्या उच्छिष्टाचा कोण स्वीकार करील ? तुला भीष्माने टाकून दिले आहे. दुसर्‍याचे धन म्हणून तू माता आहेस. असे मी समजतो.”

अशा प्रकारे शाल्वराजाने त्याग केल्यावर ती पुनः रडत आक्रोश करीत भीष्माकडे आली व म्हणाली, "शाल्व माझा स्वीकार करीत नाही, तेव्हा आपणच माझा स्वीकार करावा. आपण धर्मज्ञ आहात. आपण स्वीकार न कराल तर मला काही भलतेच करावे लागेल.” भीष्म म्हणाले, “हे सुंदरी, जिचे मन दुसर्‍याचे ठिकाणी स्थिर आहे. तिचा मी भावाकरता का होईना पण कसा स्वीकार करू ? तेव्हा तू पित्याकडे जा.”

हे ऐकताच ती सी वनात जाऊन अतिपवित्र अशा तीर्थावर तपश्चर्या करू लागली.

काशी राजाच्या शुभ कन्या अंबालिका आणि अंबिका या दोघी विचित्रवीर्याबरोबर विवाहबद्ध झाल्या. तो राजा आपल्या स्त्रियांसह क्रीडा, उद्योग यामध्ये मग्न झाला. अशा तर्‍हेने सुख भोगत असलेला राजा विचित्रवीर्य, एक वर्षांनी क्षय रोगाने मरण पावला. सत्यवती अत्यंत दुःखी झाली. पुत्राची उत्तरक्रिया व सर्व संस्कार तिने करून घेतले व दुःखित होऊन ती भीष्माकडे आली. ती त्याला म्हणाली, “हे भाग्यवान शंतनुपुत्रा, तू आता राज्यावर बैस किंवा नियोगविधीने भ्रात्यांच्या भार्येचा स्वीकार करून, तू त्यांच्या वंशाचे रक्षण कर. म्हणजे ययातीचा वंश नष्ट होणार नाही."

भीष्म म्हणाले, “माते, मी राज्य अथवा विवाह करणार नाही, अशी प्रतिज्ञा पित्याकरता केली आहे, हे तुला माहीतच आहे.” हे ऐकताच आता मला सुख प्राप्त होणार नाही असा विचार करून सत्यवती चिंताक्रांत झाली. तेव्हा भीष्म म्हणाले, “है माते, काळजी करू नको. विचित्रवीर्याला क्षेत्रज पुत्र होईल अशी व्यवस्था कर. म्हागजे कुलीन द्विजाकडून आपल्या सुनांशी त्यांचा संबंध कर. अशाप्रकारे कुलरक्षणासाठी वेदात दोष सांगितला नाही. असे नातू उत्पन्न करून तू त्याला राज्य दे. मी त्याचीच आज्ञा पाळून राहीन."

सत्यवतीने कुमारी अवस्थेत झालेला आपला पुत्र द्वैपायन व्यास, याचे मनात स्मरण केले. तेव्हा व्यास तेथे आले व मातेला त्यांनी प्रणाम केला. भीष्माने त्यांची यथासांग पूजा केली. सत्यवतीनेही त्यांना योग्य तो मान दिला. त्यानंतर प्रति अग्नी असलेले व्यास, नम्रतेने उभे राहिले. तेव्हा व्यासमाता म्हणाली, “तू विचित्रवीर्याच्या स्त्रियांच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न कर."

मातेची इच्छा शिरसावंद्य मारुन, व्यास ऋतुकालाची वाट पाहात थांबले. नंतर विचित्रवीर्याची पत्‍नी अंबिका हिचे ऋतुरनान, झाल्यावर व्यासांशी तिचा समागम झाला. पराक्रमी पण अंध असा पुत्र तिचे ठिकाणी उत्पन्न झाल्याने सत्यवतीला दुःख आले. ती व्यासांना म्हणाली, “दुसर्‍या सुनेला पुत्र होईल असे कर.” नंतर ऋतुकालानंतर अंबालिकेशी समागम केला. तिला पांढुरवर्णाचा पुत्र झाला. तो राज्याला योग्य म्हणून मान्य होईना. अखेर सत्यवतीने वर्षानंतर व्यासांना पुनः बोलावले व सुशोभित शयन मंदिरात त्यांना पाठविले, व आपल्या सुनेला पुनः पुत्रप्राप्तीसाठी जाण्यास सांगितले. पण तेथे सत्यवतीच्या सुनेने स्वतः न जाता आपली दासी पाठविली. तिच्या ठिकाणी विदुर उत्पन्न झाला. हा शुभ व यमधर्माचा अंश होता. अशाप्रकारे व्यासमुनींनी वंशकुल रक्षणार्थ तीन महाबलाढ्य पुत्रांना उत्पन्न केले. भ्रातृधर्म जाणून व्यासमुनींनी कुलाचे रक्षण केले.



॥ प्रथमः स्कन्धः समाप्तः ॥
अध्याय विसावा समाप्त
स्कन्ध पहिला समाप्त

GO TOP