श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
प्रथमः स्कन्धः
सप्तमोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


विष्णुप्रबोधः -

सूत उवाच
तौ वीक्ष्य बलिनौ ब्रह्मा तदोपायानचिन्तयत् ।
सामदानभिदादींश्च युद्धान्तान्सर्वतन्त्रवित् ॥ १ ॥
न जानेऽहं बलं नूनमेतयोर्वा यथातथम् ।
अज्ञाते तु बले कामं नैव युद्धं प्रशस्यते ॥ २ ॥
स्तुतिं करोमि चेदद्य दुष्टयोर्मदमत्तयोः ।
प्रकाशितं भवेन्नूनं निर्बलत्वं मया स्वयम् ॥ ३ ॥
वधिष्यति तदैकोऽपि निर्बलत्वे प्रकाशिते ।
दानं नैवाद्य योग्यं वा भेदः कार्यो मया कथम् ॥ ४ ॥
विष्णुं प्रबोधयाम्यद्य शेषे सुप्तं जनार्दनम् ।
चतुर्भुजं महावीर्यं दुःखहा स भविष्यति ॥ ५ ॥
इति सञ्चिन्त्य मनसा पद्मनालगतोऽब्जजः ।
जगाम शरणं विष्णुं मनसा दुःखनाशकम् ॥ ६ ॥
तुष्टाव बोधनार्थं तं शुभैः सम्बोधनैर्हरिम् ।
नारायणं जगन्नाथं निस्पन्दं योगनिद्रया ॥ ७ ॥
ब्रह्मोवाच
दीननाथ हरे विष्णो वामनोत्तिष्ठ माधव ।
भक्तार्तिहृद्धृषीकेश सर्वावास जगत्पते ॥ ८ ॥
अन्तर्यामिन्नमेयात्मन्वासुदेव जगत्पते ।
दुष्टारिनाशनैकाग्रचित्त चक्रगदाधर ॥ ९ ॥
सर्वज्ञ सर्वलोकेश सर्वशक्तिसमन्वित ।
उत्तिष्ठोत्तिष्ठ देवेश दुःखनाशन पाहि माम् ॥ १० ॥
विश्वम्भर विशालाक्ष पुण्यश्रवणकीर्तन ।
जगद्योने निराकार सर्गस्थित्यन्तकारक ॥ ११ ॥
इमौ दैत्यौ महाराज हन्तुकामौ मदोद्धतौ ।
न जानास्यखिलाधार कथं मां सङ्कटे गतम् ॥ १२ ॥
उपेक्षसेऽतिदुःखार्तं यदि मां शरणं गतम् ।
पालकत्वं महाविष्णो निराधारं भवेत्ततः ॥ १३ ॥
एवं स्तुतोऽपि भगवान् न बुबोध यदा हरिः ।
योगनिद्रासमाक्रान्तस्तदा ब्रह्मा ह्यचिन्तयत् ॥ १४ ॥
नूनं शक्तिसमाक्रान्तो विष्णुर्निद्रावशं गतः ।
जजागार न धर्मात्मा किं करोम्यद्य दुःखितः ॥ १५ ॥
हन्तुकामावुभौ प्राप्तौ दानवौ मदगर्वितौ ।
किं करोमि क्व गच्छामि नास्ति मे शरणं क्वचित् ॥ १६ ॥
इति संचिन्त्य मनसा निश्चयं प्रतिपद्य च ।
तुष्टाव योगनिद्रां तामेकाग्रहृदयस्थितः ॥ १७ ॥
विचार्य मनसाप्येवं शक्तिर्मे रक्षणे क्षमा ।
यया ह्यचेतनो विष्णुः कृतोऽस्ति स्पन्दवर्जितः ॥ १८ ॥
व्यसुर्यथा न जानाति गुणाच्छब्दादिकानिह ।
तथा हरिर्न जानाति निद्रामीलितलोचनः ॥ १९ ॥
न जहाति यतो निद्रां बहुधा संस्तुतोऽप्यसौ ।
मन्ये नास्य वशे निद्रा निद्रयायं वशीकृतः ॥ २० ॥
यो यस्य वशमापन्तः स तस्य किङ्करः किल ।
तस्माच्च योगनिद्रेयं स्वामिनी मापतेर्हरेः ॥ २१ ॥
सिन्धुजाया अपि वशे यया स्वामी वशीकृतः ।
नूनं जगदिदं सर्वं भगवत्या वशीकृतम् ॥ २२ ॥
अहं विष्णुस्तथा शम्भुः सावित्री च रमाप्युमा ।
सर्वे वयं वशे यस्या नात्र किञ्चिद्विचारणा ॥ २३ ॥
हरिरप्यवशः शेते यथान्यः प्राकृतो जनः ।
ययाभिभूतः का वार्ता किलान्येषां महात्मनाम् ॥ २४ ॥
स्तौम्यद्य योगनिद्रां वै यया मुक्तो जनार्दनः ।
घटयिष्यति युद्धे च वासुदेवः सनातनः ॥ २५ ॥
इति कृत्वा मतिं ब्रह्मा पद्मनालस्थितस्तदा ।
तुष्टाव योगनिद्रां तां विष्णोरङ्गेषु संस्थिताम् ॥ २६ ॥
ब्रह्मोवाच
देवि त्वमस्य जगतः किल कारणं हि
     ज्ञातं मया सकलवेदवचोभिरम्ब ।
यद्विष्णुरप्यखिललोकविवेककर्ता
     निद्रावशं च गमितः पुरुषोत्तमोऽद्य ॥ २७ ॥
को वेद ते जननि मोहविलासलीलां
     मूढोऽस्म्यहं हरिरयं विवशश्च शेते ।
ईदृक्तया सकलभूतमनोनिवासे
     विद्वत्तमो विबुधकोटिषु निर्गुणायाः ॥ २८ ॥
सांख्या वदन्ति पुरुषं प्रकृतिं च यां तां
     चैतन्यभावरहितां जगतश्च कर्त्रीम् ।
किं तादृशासि कथमत्र जगन्निवास-
     श्चैतन्यताविरहितो विहितस्त्वयाद्य ॥ २९ ॥
नाट्यं तनोषि सगुणा विविधप्रकारं
     नो वेत्ति कोऽपि तव कृत्यविधानयोगम् ।
ध्यायन्ति यां मुनिगणा नियतं त्रिकालं
     सन्ध्येति नाम परिकल्प्य गुणान् भवानि ॥ ३० ॥
बुद्धिर्हि बोधकरणा जगतां सदा त्वं
     श्रीश्चासि देवि सततं सुखदा सुराणाम् ।
कीर्तिस्तथा मतिधृती किल कान्तिरेव
     श्रद्धा रतिश्च सकलेषु जनेषु मातः ॥ ३१ ॥
नातः परं किल वितर्कशतैः प्रमाणं
     प्राप्तं मया यदिह दुःखगतिं गतेन ।
त्वं चात्र सर्वजगतां जननीति सत्यं
     निद्रालुतां वितरता हरिणात्र दृष्टम् ॥ ३२ ॥
त्वं देवि वेदविदुषामपि दुर्विभाव्या
     वेदोऽपि नूनमखिलार्थतया न वेद ।
यस्मात्त्वदुद्‌भवमसौ श्रुतिराप्नुवाना
     प्रत्यक्षमेव सकलं तव कार्यमेतत् ॥ ३३ ॥
कस्ते चरित्रमखिलं भुवि वेद धीमा-
     न्नाहं हरिर्न च भवो न सुरास्तथान्ये ।
ज्ञातुं क्षमाश्च मुनयो न ममात्मजाश्च
     दुर्वाच्य एव महिमा तव सर्वलोके ॥ ३४ ॥
यज्ञेषु देवि यदि नाम न ते वदन्ति
     स्वाहेति वेदविदुषो हवने कृतेऽपि ।
न प्राप्नुवन्ति सततं मखभागधेयं
     देवास्त्वमेव विबुधेष्वपि वृत्तिदासि ॥ ३५ ॥
त्राता वयं भगवति प्रथमं त्वया वै
     देवारिसम्भवभयादधुना तथैव ।
भीतोऽस्मि देवि वरदे शरणं गतोऽस्मि
     घोरं निरीक्ष्य मधुना सह कैटभं च ॥ ३६ ॥
नो वेत्ति विष्णुरधुना मम दुःखमेत-
     ज्जाने त्वयात्मविवशीकृतदेहयष्टिः ।
मुञ्चादिदेवमथवा जहि दानवेन्द्रौ
     यद्‌रोचते तव कुरुष्व महानुभावे ॥ ३७ ॥
जानन्ति ये न तव देवि परं प्रभावं
     ध्यायन्ति ते हरिहरावपि मन्दचित्ताः ।
ज्ञातं मयाद्य जननि प्रकटं प्रमाणं
     यद्विष्णुरप्यतितरां विवशोऽथ शेते ॥ ३८ ॥
सिन्धूद्‌भवापि न हरिं प्रतिबोधितुं वै
     शक्ता पतिं तव वशानुगमद्य शक्त्या ।
मन्ये त्वया भगवति प्रसभं रमापि
     प्रस्वापिता न बुबुधे विवशीकृतेव ॥ ३९ ॥
धन्यास्त एव भुवि भक्तिपरास्तवांघ्रौ
     त्यक्त्वान्यदेवभजनं त्वयि लीनभावाः ।
कुर्वन्ति देवि भजनं सकलं निकामं
     ज्ञात्वा समस्तजननीं किल कामधेनुम् ॥ ४० ॥
धीकान्तिकीर्तिशुभवृत्तिगुणादयस्ते
     विष्णोर्गुणास्तु परिहृत्य गताः क्व चाद्य ।
बन्दीकृतो हरिरसौ ननु निद्रयात्र
     शक्त्या तवैव भगवत्यतिमानवत्याः ॥ ४१ ॥
त्वं शक्तिरेव जगतामखिलप्रभावा
     त्वन्निर्मितं च सकलं खलु भावमात्रम् ।
त्वं क्रीडसे निजविनिर्मितमोहजाले
     नाट्ये यथा विहरते स्वकृते नटो वै ॥ ४२ ॥
विष्णुस्त्वया प्रकटितः प्रथमं युगादौ
     दत्ता च शक्तिरमला खलु पालनाय ।
त्रातं च सर्वमखिलं विवशीकृतोऽद्य
     यद्‌रोचते तव तथाम्ब करोषि नूनम् ॥ ४३ ॥
सृष्ट्वात्र मां भगवति प्रविनाशितुं चे-
     न्नेच्छास्ति ते कुरु दयां परिहृत्य मौनम् ।
कस्मादिमौ प्रकटितौ किल कालरूपौ
     यद्वा भवानि हसितुं नु किमिच्छसे माम् ॥ ४४ ॥
ज्ञातं मया तव विचेष्टितमद्‌भुतं वै
     कृत्वाखिलं जगदिदं रमसे स्वतन्त्रा ।
लीनं करोषि सकलं किल मां तथैव
     हन्तुं त्वमिच्छसि भवानि किमत्र चित्रम् ॥ ४५ ॥
कामं कुरुष्व वधमद्य ममैव मात-
     र्दुःखं न मे मरणजं जगदम्बिकेऽत्र ।
कर्ता त्वयैव विहितः प्रथमं स चायं
     दैत्याहतोऽथ मृत इत्ययशो गरिष्ठम् ॥ ४६ ॥
उत्तिष्ठ देवि कुरु रूपमिहाद्‌भुतं त्वं
     मां वा त्विमौ जहि यथेच्छसि बाललीले ।
नो चेत्प्रबोधय हरिं निहनेदिमौ य-
     स्त्वत्साध्यमेतदखिलं किल कार्यजातम् ॥ ४७ ॥
सूत उवाच
एवं स्तुता तदा देवी तामसी तत्र वेधसा ।
निःसृत्य हरिदेहात्तु संस्थिता पार्श्वतस्तदा ॥ ४८ ॥
त्यक्त्वाङ्गानि च सर्वाणि विष्णोरतुलतेजसः ।
निर्गता योगनिद्रा सा नाशाय च तयोस्तदा ॥ ४९ ॥
विस्पन्दितशरीरोऽसौ यदा जातो जनार्दनः ।
धाता परमिकां प्राप्तो मुदं दृष्ट्वा हरिं ततः ॥ ५० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां
प्रथमस्कन्धे विष्णुप्रबोधो नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥


ब्रह्मदेव देवीची स्तुति करतात -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

हे दानव बलाढ्य आहेत, असे पाहून तंत्रवेत्या ब्रह्मदेवाने साम, दाम, भेद, व युद्ध या सर्व उपायांचा विचार केला. पण ह्या राक्षसांचे बल किती आहे, हे समजल्याशिवाय युद्ध करणे योग्य नव्हे. शिवाय ह्या दुष्टांची स्तुती केली तर आपण निर्बल आहोत असेच प्रकट होईल. तसेच दानरुप उपायही याठिकाणी योग्य नाही, त्याचप्रमाणे या उभयतामध्ये मला भेद करता येणार नाही. तेव्हा शेषावर निद्रासुख भोगीत असलेल्या महावीर्यवान व चतुर्भुज जनार्दनाला उठवतो. तोच माझे दु:ख हरण करील. असा विचार करुन तो मनामध्येच विष्णूला शरण गेला आणि भक्ताचे दु:ख हरण करणारा तो भगवान विष्णू जो योगनिद्रेत निश्चल झाला होता, त्याची ब्रह्मदेवाने मधुर शब्दांनी स्तुती केली. ब्रह्मदेव म्हणाला, ‘हे दीननाथ, हे हरे, हे वामना, हे माधवा, हे भवदु:खनाशका, हे ऋषीकेशा, हे सर्वव्यापी जगदीशा ऊठ. हे अंतर्यामी, हे महात्मा, वासुदेव, हे जगत्पते, हे दुष्टशत्रुनाशका, समाधिनिष्ठ, हे चक्रगदा धारण करणार्‍या, हे सर्वज्ञा, हे सर्वलोकाधिपते हे सर्वशक्तिमान सुरेश्वरा, माझे रक्षण कर. हे विश्वंभरा, विशालनयना, हे जगत्कारण, हे निराकारा, हे उपत्ती स्थिती लय करणार्‍या, तुझ्या चरित्राचे श्रवण व कीर्तन पुण्यकारक आहे. हे महाराज, हे उन्मत्त झालेले दैत्य माझा वध करु इच्छितात. हे माझ्यावरचे संकट तू का जाणत नाहीस ? अत्यंत दु:खी झालेला मी तुला शरण आलेलो आहे, तू मला आधार न देशील तर तुझे पालकत्व खोटे होईल.

अशा प्रकारे स्तुती करुनही तो भगवान विष्णू उठेना. तेव्हा ब्रह्मदेवाला काळजी निर्माण झाली. खरोखरच निद्रेने इतके घेरल्यामुळे भगवान विष्णूंना जाग येत नाही. तेव्हा या ब्रह्मदेवाने आता कोणाकडे जावे ? शरण जाण्यास योग्य असे कोणीही नाही. असा विचार करुन, योगमायेचेच हे कृत्य आहे, असे मनात म्हणून ब्रह्मदेव योगमायेची स्तुती करु लागला. त्याने मनात असा विचार केला की, जिने विष्णूला निद्रिस्त केले आहे तीच शक्ती माझे रक्षण करण्यास समर्थ आहे. मृताला जसे शब्दज्ञान होत नाही, तसेच निद्रिस्त झाल्याने हरीला काही समजत नाही, ज्या अर्थी त्याला निद्रेने वश केले आहे. तस्मात ही योगनिद्रा रमापती हरीची स्वामिनी होय. जिने लक्ष्मीचा स्वामी आपल्या आधीन केला आहे त्या भगवतीने सर्व जग वश करुन घेतले आहे. आम्ही सर्व विष्णू, शंभू, सावित्री, रमा, उमा, या सर्व देवीच्या आधीन आहेत यात संशय नाही. त्यामुळे हरीही आधीन झाला आहे. मग इतरांची काय कथा ? तेव्हा आता त्या देवीचे स्मरण केले तरच हरीची निद्रा जाऊन तो युद्धकार्य करील, असा विचार करुन विष्णूच्या अवयवात असलेल्या योगनिद्रेची त्या ब्रह्मदेवाने स्तुती केली. हे देवी, ज्याअर्थी सर्वविवेकी पुरुषोत्तमाला तू आधीन केलेस त्याअर्थी तू या जगाचे कारण आहेस. हे जननी, मी मूढ झालो असून हरीही पराधीन झाला आहे. तेव्हा सर्वत्र वास्तव्य करणार्‍या हे देवी कोण बरे. पंडीत तुझ्या निर्गुण विलासरुप लीला जाणण्यास समर्थ होणार आहे. जगतकर्ती असूनही पुरुष तुला अचेतन समजतात. पण तू तशी मुळीच नाहीस. कारण जगन्निवासी विष्णूलाही तू अचेतन करतेस. तू सगूण होऊन नाना प्रकारचे नाटक करतेस . पण तुझ्या ह्या कृत्यांशी असलेला संबध कोणीच जाणत नाही.

हे भवानी, संध्या हे तुझे नाव असून तुझ्या अंगचे तशा प्रकारचे गुण पाहून मुनिजन तुजे त्रिकाल ध्यान करीत असतात. जगाची ज्ञानसाधनारुप बुद्धी तूच आहेस. नित सुख देणारी तू स्त्री आहेस.

तसे कीर्ती, मति धृति, कांती, श्रद्धा व रति ह्या रुपाने तूच सर्वांच्या ठिकाणी वास्तव्य करतेस. हरी निद्राधीन झाल्यामुळे तूच सर्व जगताची जननी आहेस हे मला समजले आहे. नाहीतर तुझे रुप जाणण्यासाठी कितीही तर्क केले, तरी काहीच निष्पन्न होत नाही. तुझे रुप वेदवत्तांना व श्रुतींनाही दुर्घट आहे. कारण श्रुतीची उत्पत्ती तुझ्यापासून झाली आहे. सर्व द्वैतभासही तुझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, म्हणून श्रेउतीचीही उत्पत्ती तुझ्यापासूनच झाली आहे, हे निर्विवाद आहे. असे संपूर्ण चरित्र जाणणारा भूतलावर कोण आहे !

मी, विष्णू, महेश्वर, इतर देव, मुनी, माझे पुत्र, हे सर्व तुझे चरित्र जाणण्यास असमर्थ आहेत. कारण तुझे महात्म्य वर्णन करणे दुर्घट आहे. यज्ञात ऋत्विजांनी ‘स्वाहा’ हे तुझे नाव उचारल्याशिवाय हवन झालेला हविर्भाग देवांना कधीच प्राप्त होणार नाही. यावरुन तू देवांचाही चरितार्थ चालवितेस. पूर्वीही असुरांपासून तूच आमचे रक्षण केलेस. आताही मधुकैटभापासून मी पुन: घोर संकटात सापडलो आहे. आता विष्णू तुझ्या आधिन झाल्याने तो माझे दु:ख जाणण्यास असमर्थ आहे. तेव्हा हे देवी, विष्णूला निद्रेतून मुक्त कर अथवा माझ्यावरील संकट दूर कर. ह्या दानश्रेष्ठांचा वध कर. हे देवी, जे तुझा प्रभाव न जाणता हरिहराचे ध्यान करतात ते मंदमती होत. विष्णुही निद्रेमुळे पराधीन झाला आहे. हे तुझ्या प्रभावाचे प्रत्यक्षप्रमाण आहे. ज्याअर्थी तुझ्या शक्तीच्या तावडीत सापडलेल्या विष्णूला प्रत्यक्ष लक्ष्मीही उठविण्यास समर्थ नाही, त्याअर्थी तू तिलाही वश करुन निद्रिस्त केले आहेस. म्हणून तीसुद्धा जागी नाही. हे देवी, इतर देवांचे भजन करण्याचे सोडून जे तुझ्या चरणकमलाच्या सेवेविषयी तत्पर असतात ते पुरुष जगतामध्ये धन्य होत. धी, कांती, कीर्ती, शुभवृत्ती हे विष्णूचे गण आज तुला सोडून कोठे गेले आहेत ? हे मानिनी भगवती, तुझ्याच निद्राशक्तीच्या बलामुळे हा हरी निद्रिस्त होऊन बंदिवान झाला आहे. तूच सर्व जगाची शक्ती असून वस्तुमात्र तूच निर्माण केलेल्या या मोहमय नाटकात स्वत: तू क्रीडा करीत आहेस.

कल्पाच्या आरंभी तू विष्णूला प्रकट केलेस तसेच जगतकल्याणासाठी तूच त्याला निर्मल शक्ती दिलीस व जगताचे रक्षण केलेस. त्यालच आज तू वश करुन टाकले आहेस. हे अंबे, तू तुझ्याप्रमाणे सर्व करीत असतेस, हे देवी मला याजगात उत्पन्न करुन मारण्याची तुझी इच्छा नसेल तर मौन सोडून तू माझ्यावर द्या कर. काळाप्रमाणे भासणारे हे दानव तू निर्माण का केलेस ? हे भवानी माझी उपहास करण्याचे तुझी इच्छा आहे का ? तूच संपूर्ण जग निर्माण करतेस व स्वतम्त्र क्रीडा करतेस. पुन: तूच सर्वांचा लय करतेस. हे तुझे अद्वितीयत्व मला आता समजले आहे . तेव्हा माझाही वध करण्याची तू इच्छा करते आहेस यात आश्चर्य कोनते ? हे माते, आज तू खुशाल माझा वध कर. मला मरणाचे दु:ख वाटत नाही. पण तूच जगतकर्मा प्रथम उत्पन्न केलास आणि दैत्यांकडून तूच त्याचा वध करविलास तर तुझी अपकीर्ती होईल. म्हणून तू उठ आणि आपले अदभूत सामर्थ्य वापरुन माझा अथवा त्या दैत्यांचा कोणाचाही वध कर. नाहीतर विष्णूला उठव. तो ह्यांचा वध करील. ही सर्व कार्ये तूच सिद्धीस नेणार आहेस.

ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यावर ती निद्राभिमानी तामसी देवी विष्णूच्या देहापासून दूर होऊन जवळच उभी राहिली. विष्णूला चेतना आली. हे पाहून ब्रह्मदेवाला आनंद झाला.



अध्याय सातवा समाप्त

GO TOP