श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
प्रथमः स्कन्धः
चतुर्थोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


देवीसर्वोत्तमेतिकथनम् -

ऋषय ऊचुः
सौम्य व्यासस्य भार्यायां कस्यां जातः सुतः शुकः ।
कथं वा कीदृशो येन पठितेयं सुसंहिता ॥ १ ॥
अयोनिजस्त्वया प्रोक्तस्तथा चारणिजः शुकः ।
सन्देहोऽस्ति महांस्तत्र कथयाद्य महामते ॥ २ ॥
गर्भयोगी श्रुतः पूर्वं शुको नाम महातपाः ।
कथं च पठितं तेन पुराणं बहुविस्तरम् ॥ ३ ॥
सूत उवाच
पुरा सरस्वतीतीरे व्यासः सत्यवतीसुतः ।
आश्रमे कलविंकौ तु दृष्ट्वा विस्मयमागतः ॥ ४ ॥
जातमात्रं शिशुं नीडे मुक्तमण्डान्मनोहरम् ।
ताम्रास्यं शुभसर्वाङ्गं पिच्छांकुरविवर्जितम् ॥ ५ ॥
तौ तु भक्ष्यार्थमत्यन्तं रतौ श्रमपरायणौ ।
शिशोश्चंचुपुटे भक्ष्यं क्षिपन्तौ च पुनः पुनः ॥ ६ ॥
अङ्गेनाङ्गानि बालस्य घर्षयन्तौ मुदान्वितौ ।
चुम्बन्तौ च मुखं प्रेम्णा कलविंकौ शिशोः शुभम् ॥ ७ ॥
वीक्ष्य प्रेमाद्‌भुतं तत्र बाले चटकयोस्तदा ।
व्यासश्चिन्तातुरः कामं मनसा समचिन्तयत् ॥ ८ ॥
तिरश्चामपि यत्प्रेम पुत्रे समभिलक्ष्यते ।
किं चित्रं यन्मनुष्याणां सेवाफलमभीप्सताम् ॥ ९ ॥
किमेतौ चटकौ चास्य विवाहं सुखसाधनम् ।
विरच्य सुखिनौ स्यातां दृष्ट्वा वध्वा मुखं शुभम् ॥ १० ॥
अथवा वार्धके प्राप्ते परिचर्यां करिष्यति ।
पुत्रः परमधर्मिष्ठः पुण्यार्थं कलविंकयोः ॥ ११ ॥
अर्जयित्वाथवा द्रव्यं पितरौ तर्पयिष्यति ।
अथवा प्रेतकार्याणि करिष्यति यथाविधि ॥ १२ ॥
अथवा किं गयाश्राद्धं गत्वा संवितरिष्यति ।
नीलोत्सर्गं च विधिवत्प्रकरिष्यति बालकः ॥ १३ ॥
संसारेऽत्र समाख्यातं सुखानामुत्तमं सुखम् ।
पुत्रगात्रपरिष्वंगो लालनञ्च विशेषतः ॥ १४ ॥
अपुत्रस्य गतिर्नास्ति स्वर्गो नैव च नैव च ।
पुत्रादन्यतरन्नास्ति परलोकस्य साधनम् ॥ १५ ॥
मन्वादिभिश्च मुनिभिर्धर्मशास्त्रेषु भाषितम् ।
पुत्रवान्स्वर्गमाप्नोति नापुत्रस्तु कथञ्चन ॥ १६ ॥
दृश्यतेऽत्र समक्षं तन्नानुमानेन साध्यते ।
पुत्रवान्मुच्यते पापादाप्तवाक्यं च शाश्वतम् ॥ १७ ॥
आतुरे मृत्युकालेऽपि भूमिशय्यागतो नरः ।
करोति मनसा चिन्तां दुःखितः पुत्रवर्जितः ॥ १८ ॥
धनं मे विपुलं गेहे पात्राणि विविधानि च ।
मन्दिरं सुन्दरं चैतत्कोऽस्य स्वामी भविष्यति ॥ १९ ॥
मृत्युकाले मनस्तस्य दुःखेन भ्रमते यतः ।
अतोऽस्य दुर्गतिर्नूनं भ्रान्तचित्तस्य सर्वथा ॥ २० ॥
एवं बहुविधां चिन्तां कृत्वा सत्यवतीसुतः ।
निःश्वस्य बहुधा चोष्णं विमनाः सम्बभूव ह ॥ २१ ॥
विचार्य मनसात्यर्थं कृत्वा मनसि निश्चयम् ।
जगाम च तपस्तप्तुं मेरुपर्वतसनिधौ ॥ २२ ॥
मनसा चिन्तयामास कं देवं समुपास्महे ।
वरप्रदाननिपुणं वाञ्छितार्थप्रदं तथा ॥ २३ ॥
विष्णुं रुद्रं सुरेन्द्रं वा ब्रह्माणं वा दिवाकरम् ।
गणेशं कार्तिकेयं च पावकं वरुणं तथा ॥ २४ ॥
एवं चिन्तयतस्तस्य नारदो मुनिसत्तमः ।
यदृच्छया समायातो वीणापाणिः समाहितः ॥ २५ ॥
तं दृष्ट्वा परमप्रीतो व्यासः सत्यवतीसुतः ।
कृत्वार्घ्यमासनं दत्त्वा पप्रच्छ कुशलं मुनिम् ॥ २६ ॥
श्रुत्वाथ कुशलप्रश्नं पप्रच्छ मुनिसत्तमः ।
चिन्तातुरोऽसि कस्मात्त्वं द्वैपायन वदस्व मे ॥ २७ ॥
व्यास उवाच
अपुत्रस्य गतिर्नास्ति न सुखं मानसे यतः ।
तदर्थं दुःखितश्चाहं चिन्तयामि पुन पुनः ॥ २८ ॥
तपसा तोषयाम्यद्य कं देवं वाच्छितार्थदम् ।
इति चिन्तातुरोऽस्म्यद्य त्वामहं शरणं गतः ॥ २९ ॥
सर्वज्ञोऽसि महर्षे त्वं कथयाशु कृपानिधे ।
कं देवं शरणं यामि यो मे पुत्रं प्रदास्यति ॥ ३० ॥
सूत उवाच
इति व्यासेन पृष्टस्तु नारदो वेदविन्मुनिः ।
उवाच परया प्रीत्या कृष्णं प्रति महामनाः ॥ ३१ ॥
नारद उवाच
पाराशर्य महाभाग यत्त्वं पृच्छसि मामिह ।
तमेवार्थं पुरा पृष्टः पित्रा मे मधुसूदनः ॥ ३२ ॥
ध्यानस्थं च हरिं दृष्ट्वा पिता मे विस्मयं गतः ।
पर्यपृच्छत देवेशं श्रीनाथं जगतः पतिम् ॥ ३३ ॥
कौस्तुभोद्भासितं दिव्यं शङ्खचक्रगदाधरम् ।
पीताम्बरं चतुर्बाहुं श्रीवत्साङ्‌कितवक्षसम् ॥ ३४ ॥
कारणं सर्वलोकानां देवदेवं जगद्गुरुम् ।
वासुदेवं जगन्नाथं तप्यमानं महत्तपः ॥ ३५ ॥
ब्रह्मोवाच
देवदेव जगन्नाथ भूतभव्यभवत्प्रभो ।
तपश्चरसि कस्मात्त्वं किं ध्यायसि जनार्दन ॥ ३६ ॥
विस्मयोऽयं ममात्यर्थं त्वं सर्वजगतां प्रभुः ।
ध्यानयुक्तोऽसि देवेश किं च चित्रमतः परम् ॥ ३७ ॥
त्वन्नाभिकमलाज्जातः कर्ताहमखिलस्य ह ।
त्वत्तः कोऽप्यधिकोऽस्त्यत्र तं देवं ब्रूहि मापते ॥ ३८ ॥
जानाम्यहं जगन्नाथ त्वमादिः सर्वकारणम् ।
कर्ता पालयिता हर्ता समर्थः सर्वकार्यकृत् ॥ ३९ ॥
इच्छया ते महाराज सृजाम्यहमिदं जगत् ।
हरः संहरते काले सोऽपि ते वचने सदा ॥ ४० ॥
सूर्यो भ्रमति चाकाशे वायुर्वाति शुभाशुभः ।
अग्निस्तपति पर्जन्यो वर्षतीश त्वदाज्ञया ॥ ४१ ॥
त्वं तु ध्यायसि कं देवं संशयोऽयं महान्मम ।
त्वत्तः परं न पश्यामि देवं वै भुवनत्रये ॥ ४२ ॥
कृपां कृत्वा वदस्वाद्य भक्तोऽस्मि तव सुव्रत ।
महतां नैव गोप्यं हि प्रायः किञ्चिदिति स्मृतिः ॥ ४३ ॥
तच्छ्रुत्वा वचनं तस्य हरिराह प्रजापतिम् ।
शृणुष्वैकमना ब्रह्मंस्त्वां ब्रवीमि मनोगतम् ॥ ४४ ॥
यद्यपि त्वां शिवं मां च स्थितिसृष्ट्यन्तकारणम् ।
ते जानन्ति जनाः सर्वे सदेवासुरमानुषाः ॥ ४५ ॥
स्रष्टा त्वं पालकश्चाहं हरः संहारकारकः ।
कृताः शक्त्येति संतर्कः क्रियते वेदपारगैः ॥ ४६ ॥
जगत्संजनने शक्तिस्त्वयि तिष्ठति राजसी ।
सात्त्विकी मयि रुद्रे च तामसी परिकीर्तिता ॥ ४७ ॥
तया विरहितस्त्वं न तत्कर्मकरणे प्रभुः ।
नाहं पालयितुं शक्तः संहर्तुं नापि शङ्करः ॥ ४८ ॥
तदधीना वयं सर्वे वर्तामः सततं विभो ।
प्रत्यक्षे च परोक्षे च दृष्टान्तं शृणु सुव्रत ॥ ४९ ॥
शेषे स्वपिमि पर्यङ्के परतन्त्रो न संशयः ।
तदधीनः सदोत्तिष्ठे काले कालवशं गतः ॥ ५० ॥
तपश्चरामि सततं तदधीनोऽस्म्यहं सदा ।
कदाचित्सह लक्ष्या च विहरामि यथासुखम् ॥ ५१ ॥
कदाचिद्दानवैः सार्धं संग्रामं प्रकरोम्यहम् ।
दारुणं देहदमनं सर्वलोकभयङ्करम् ॥ ५२ ॥
प्रत्यक्षं तव धर्मज्ञ तस्मिन्नेकार्णवे पुरा ।
पञ्चवर्षसहस्राणि बाहुयुद्धं मया कृतम् ॥ ५३ ॥
तौ कर्णमलजौ दुष्टौ दानवौ मदगर्वितौ ।
देव देव्याः प्रसादेन निहतौ मधुकैटभौ ॥ ५४ ॥
तदा त्वया न किं ज्ञातं कारणं तु परात्परम् ।
शक्तिरूपं महाभाग किं पृच्छसि पुनः पुनः ॥ ५५ ॥
यदिच्छः पुरुषो भूत्वा विचरामि महार्णवे ।
कच्छपः कोलसिंहश्च वामनश्च युगे युगे ॥ ५६ ॥
न कस्यापि प्रियो लोके तिर्यग्योनिषु सम्भवः ।
नाभवं स्वेच्छया वामवराहादिषु योनिषु ॥ ५७ ॥
विहाय लक्ष्या सह संविहारं
     को याति मत्स्यादिषु हीनयोनिषु ।
शय्यां च मुक्त्वा गरुडासनस्थः
     करोमि युद्धं विपुलं स्वतन्त्रः ॥ ५८ ॥
पुरा पुरस्तेऽज शिरो मदीयं
     गतं धनुर्ज्यास्खलनात्क्व चापि ।
त्वया तदा वाजिशिरो गृहीत्वा
     संयोजितं शिल्पिवरेण भूयः ॥ ५९ ॥
हयाननोऽहं परिकीर्तितश्च
     प्रत्यक्षमेतत्तव लोककर्तः ।
विडम्बनेयं किल लोकमध्ये
     कथं भवेदात्मपरो यदि स्याम् ॥ ६० ॥
तस्मान्नाहं स्वतन्त्रोऽस्मि शक्त्यधीनोऽस्मि सर्वथा ।
तामेव शक्तिं सततं ध्यायामि च निरन्तरम् ॥ ६१ ॥
नातः परतरं किञ्चिज्जानामि कमलोद्भव ।
नारद उवाच
इत्युक्तं विष्णुना तेन पद्मयोनेस्तु सन्निधौ ॥ ६२ ॥
तेन चाप्यहमुक्तोऽस्मि तथैव मुनिपुङ्गव ।
तस्मात्त्वमपि कल्याण पुरुषार्थाप्तिहेतवे ॥ ६३ ॥
असंशयं हृदम्भोजे भज देवीपदाम्बुजम् ।
सर्वं दास्यति सा देवी यद्यदिष्टं भवेत्तव ॥ ६४ ॥
सूत उवाच
नारदेनैवमुक्तस्तु व्यासः सत्यवतीसुतः ।
देवीपादाब्जनिष्णातस्तपसे प्रययौ गिरौ ॥ ६५ ॥

इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां
प्रथमस्कन्धे देवीसर्वोत्तमेतिकथनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥


व्यास पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्येस जातात -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ऋषी म्हणाले - हे विनयसंपन्न सूता, व्यास मुनीच्या कोणत्या भार्येपासून शुक उत्पन्न झाला ? तो कसा झाला ? तो उत्कृष्ट संहिता पठण करणारा असून अरणीपासून उत्पन्न झाला असे तुम्ही सांगितलेत. परंतु याविषयी आमच्या मनात शंका आहे, ती तू निवारण कर. शुक नावाचा महान तपस्वी गर्भावासापासून योगी असल्याचे आम्ही श्रवण केले आहे. त्याने हे पुराण कशासाठी पठण केले ?

सूत म्हणाले - पूर्वी सरस्वतीचे तीरी आपल्या आश्रामामध्ये सत्यवतीपुत्र व्यास असताना एक चिमण्यांचे जोडपे पाहून चकित झाले; कारण अंड्यातून नुकत्याच बाहेर आलेल्या मनोहर, सुंदर आरक्तवर्णी, पिसांचे अंकुरही न फुटलेल्या पिलाला ते जोडपे आनंदाने घर्षण करीत होते. त्याच्या भक्ष्यासाठी तत्पर राहत होते. त्या पिलाच्या चोचीमध्ये वारंवार अन्न घालीत होते. त्या बालकाच्या शुभमुखाचे चुंबन घेत होते. त्या जोडप्याचे बालकावरील अदभुत प्रेम पाहून व्यास चिंतातूर होऊन विचार करु लागले.

ज्या अर्थी तिर्मग्योनीत उत्पन्न झालेल्या प्राण्यामधेही पुत्रप्रेम दृष्टीस पडते, तर मग‘ पुत्र आपली सेवा करील ’ असे इच्छिणार्‍या मानवाचे पुत्रप्रेम पाहून आश्चर्य का वाटावे ? सुखाचे साशन असलेल्या बालकाचा विवाह करुन सुनेचे शुभमुख अवलोकन करुन ह्या चिमण्यांना सुख होणार आहे का ? अथवा वृद्धापकाळात पुत्र धर्मनिष्ठ निघून त्यांची सेवा करणार आहे का ? अथवा द्रव्यार्जन करुन पितरांना संतुष्ट करणार आहे का ? ह्यांचा और्ध्वदेहिक संस्कार तरी ह्याच्या हातून होणार आहे का ? गयेस जाऊन श्राद्ध किंवा नीलवृक्षाचा उत्सर्ग हा बालक यथाविधी करणार आहे का ? ह्यातील काही संभवनीय नसताही ज्या अर्थी पक्षी अपल्या पुत्रावर प्रेम करतात त्या अर्थी संसारात पुत्राचे अलिंगन व लालन हेच सर्व सुखातील उत्कृष्ट सुख होय.निपुत्रिकाला उत्तम लोक प्राप्त होत नाही. पुत्र परलोकप्राप्तीचे साधन आहे.

मन्वादी मुनींनी धर्मशास्त्रात, ‘पुत्रवानाला स्वर्गप्राप्ती होत असून निपुत्रिकाला कधीही होत नाही असे सांगितले आहे. सर्व पापक्लेशांपासून पुत्रवान मुक्त होतो, ही गोष्ट अनुमानाने सिद्ध करण्याचे प्रयोजन नाही.शिवाय पुरातन आप्तवाक्यही ह्याला प्रमाण आहे. मृत्युसमयी भूमीवर पडलेला पुरुष पुत्ररहित असल्यास दु:खीत होऊन मनामध्ये माझ्या घरात विपुल द्रव्य व उत्तमोत्तम भांडी आहेत. हे मंदिर सुंदर आहे, परंतु आता ह्याचा मालक कोण होईल, असे तो चिंतन करीत असतो.

ज्याअर्थी मृत्युसमयी त्याचे मन दु:खव्याप्त असते, त्याअर्थी पुरुषाला दुर्गतीच होत असते. ह्यात शंका नाही.

अशाप्रकारे विचार करुन व्यास वारंवार दिर्घसुस्कारे सोडीत खिन्न मनाने बसले. खूप विचारपूर्वक त्यांनी निश्चय केला व मेरुपर्वताजवळ तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. ते मनात म्हणाले, ‘ आम्ही कोणत्या देवाची उपासना करावी ? पाच वर देण्यास समर्थ असा विष्णू, रुद्र, इंद्र, ब्रम्हा, सूर्य, गणेश कार्तिकेय, अग्नि, वरुण ह्यापैकी कोण आहे ?

अशी चिंता करीत असतानाच हातात विणा घेतलेले स्वस्थचित्त नारद तेथे आले ते पाहून सत्यवतीपुत्र व्यास संतुष्ट झाले व त्यांना अर्ध्य व आसन देऊन कुशल प्रश्न केला तो कुशल प्रश्न श्रवण करुन मुनिश्रेष्ठ नारद म्हणाले, " हे द्वैपायन तू का बरे चिंता करीत आहेस ? ते सांग"

व्यास म्हणतात - निपुत्रिकाला उत्तम गती व सुख प्राप्त होत नसते म्हणून मी दु:ख करीत आहे. तेव्हा इष्ट मनोरथ सिद्धीस नेणार्‍या कोणत्या देवाची तपश्चर्या करावी ? ही चिंता असल्याने सांप्रत मी आपणाला शरण आलो आहे हे दयासागर महर्षे, मी पुत्र देणार्‍या कोणत्या देवाला शरण जाऊ ? हे आपण सत्वर सांगा आपण सर्वज्ञ आहात.

ह्याप्रमाणे व्यासांनी विचारले असता वेदवेत्ते नारदमुनी प्रेमाने म्हणाले हे भाग्यशाली पराशरपुत्रा माझ्या पित्याने हाच प्रश्न श्रीहरीला विचारला होता. पण श्रीहरी ध्यानस्थ असल्याचे पाहून माझ्या पित्याने विष्णूला प्रश्न केला. कारण कौस्तुभ रत्नाने उज्ज्वल, दिव्य,
शंख,चक्र, गदा, ही आयुधे धारण करणारा पीत वस्त्र परिधान करणारा, चार बाहू व श्रीवत्सलांच्छन चिन्ह युक्त झालेले वक्षस्थल ह्यांनी संपन्न, सर्व लोकांचा उत्पादक देवाधिदेव जगदगुरु, जगन्नाथ असा जो वासुदेव तो मोठे तप करीत होता.

ब्रह्मदेव म्हणतो, " हे देवाधिदेव, हे जगन्नाथ, कालत्रयप्रभो , जनार्दन, आपण कशास्तव तप करीत आहात ? कोणाचे ध्यान करीत आहात ? हे सुरेश्वर आपणच सर्व जगाचे प्रभु असून ध्यानस्थ व्हावे याहून आश्चर्य कोणते ? त्यामुळे मला विस्मय झाला आहे. आपल्या नाभीकमलापासून उत्पन्न झालेला मी सर्व जगताचा कर्ता आहे. ह्या विश्वामध्ये आपणाहून जो कोणी आधिक आहे तो देव, हे रमापते मला कथन करा. हे जगन्नाथ,आपणच आद्य सर्वांचे कारण सर्वकार्यास समर्थ असून उत्पादक, पालक, संहारक, आपणच आहात आपल्या इच्छेमुळेच मी हे सर्वजगत उत्पन्न करीत असतो. प्रलयकारी रुद्र त्यांचा संहार करीत असतो. परंतु तोही आपल्या आज्ञेने वागणारा आहे.

आकाशात सूर्याचे भ्रमण अथवा वायूचे शुभ वा अशुभ वाहणे अग्नीचा ताप व पर्ज्न्याची वृष्टी ही सर्व आपल्याच आज्ञेने होतात, म्हणून आपण कोणत्या देवाचे ध्यान करीत आहात याबद्दल विस्मय वाटतो. त्रैलोक्यात आपणाहून कोणी श्रेष्ठ नाही. हे सुव्रत सांप्रत आपण मला कथन करा. महात्म्यांना योग्य असे प्राय: काही एक नाही अशी स्मृति आहे.

ब्रह्मदेवाचे हे भाषण ऐकून श्रीहरी म्हणाला - हे ब्रह्मन एकचित्ताने श्रवण कर जरी तू मी व शिव जगताचे उत्पादक, पालक,संहारक आहो, असे सर्व देव, असुर, मानव समजत आहेत. तरी वेदांगपारंगत लोक शक्तीच्याच योगाने तू उत्पादक मी पालक व शिव संहारक झाल्याचे अनुमान करीत असतात. तुझ्याठिकाणी जगतउत्पत्तीसाठी राजसी शक्ती रहात असून माझ्या ठिकाणी सात्विकी व रुद्राचे ठिकाणी तामसी शक्ती रहात आहे, ह्या शक्तीचा वियोग झाल्यास आपण कुणीही ही कार्ये करण्यास समर्थ राहणार नाही. आपण सर्व त्या शक्तीचे आधीन असतो . हे प्रथक्ष व परोक्ष व्यवहारात स्पष्ट आहे.

हे सुव्रता, ह्याविषयी मी तुला दृष्टांत सांगतो. मी परतंत्र असून शेषरुप मंचकावर शयन करतो. त्या शक्तीच्या आधीन असतानाच सर्वदा उठतो आणि प्रलयकाली मी कालाचे आधीन होतो. मी तिच्या आधीन राहूनच तपश्चर्या करीत असतो.कधी कधी लक्ष्मीसह यथेष्ट क्रीडा करतो. पूर्वी सर्व जगत समुद्ररुप होऊन गेले असता पाच हजार वर्षेपर्यंत मी तुझ्यासमक्ष बाहुयुद्ध केले आणि कानाच्या मळापासून उत्पन्न झालेले दुष्ट व मदमत्त दानव जे मधुकैटभ याचा वध सुराधिष्ठात्री देवीच्या प्रसादाने केला. तेव्हाच सर्व जगताचे शक्तिरुप परात्पर कारण आहे हे तुला समजले नाही का? त्या भगवतीच्याच इच्छेने मी प्रथम स्त्रीरुपाने मणि द्विपात होतो नंतर पुरुष होऊन महासागरात वास्तव्य करु लागलो. त्याचप्रमाणे तिच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक युगात मला कूर्म,वराह, नरसिंह,वामन,इत्यादी अवतार धारण करावे लागतात. तिर्यग्योनीत जन्मास येणे कुणालाही प्रिय नाही व मीही स्वत:च्या इच्छेने वराहादी निंद्य योनीमध्ये जन्मास आलो नाही.

अरे, कोणता स्वतंत्र पुरुष लक्ष्मीसह क्रीडा करण्याचे सोडून मत्स्यादी हीन योनीत जन्म घेईल ? त्याचप्रमाणे कोणता पुरुष शय्येचा त्याग करुन गरुडाचे वाहनावर आरुढ होऊन मोठे युद्ध करील,हे ब्रह्मदेवां धनुष्याची प्रत्यंचा तुटल्यामुळे माझे मस्तकच तुटून कुणीकडे जाऊन पडले हे तू पाहिलेसच व तुझ्याच आज्ञेने महाशिल्पी त्वष्ट्याने अश्वाचे मस्तक पुनरपी माझ्या धडावर चिकटविले व त्यामुळे मला लोक हयग्रीव म्हणू लागले. अरे, ही विटंबना मी स्वतंत्र असतो तर झाली असती का? तेव्हा मी स्वतंत्र नसून सर्वस्वी शक्तीचे आधीन आहे, आणि त्या शक्तीचेच मी निरंतर ध्यान करीत असतो. ह्या देवीपेक्षा श्रेष्ठ असे मला काही एक ठाऊक नाही."

नारद म्हणतात- ह्याप्रमाणे विष्णूने ब्रह्म्याजवळ सांगितले व मला कथन केले. तू तिचे तुझ्या कल्याणार्थ ध्यान कर, म्हणजे तुला जे जे काही ईप्सित असेल तर ते सर्व ती देवी तुला नि:संशय देईल.

नारदमुनींनी ह्याप्रमाणे महर्षीव्यासांना सांगितले असता ते व्यास देवीच्या चरणकमलाविषयी तप्तर राहून तपश्चर्या करण्याकरिता मेरु पर्वतावर गेले.



अध्याय चवथा समाप्त

GO TOP