श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
अष्टमोऽध्यायः


इक्ष्वाकुवंशवर्णनम्

जनमेजय उवाच -
संशयोऽयं महान् ब्रह्मन् वर्तते मम मानसे ।
ब्रह्मलोकं गतो राजा रेवतीसंयुतः स्वयम् ॥ १ ॥
मया पूर्वं श्रुतं कृत्स्नं ब्राह्मणेभ्यः कथान्तरे ।
ब्राह्मणो ब्रह्मविच्छान्तो ब्रह्मलोकमवाप्नुयात् ॥ २ ॥
राजा कथं गतस्तत्र रेवतीसंयुतः स्वयम् ।
सत्यलोकेऽतिदुष्प्रापे भूर्लोकादिति संशयः ॥ ३ ॥
मृतः स्वर्गमवाप्नोति सर्वशास्त्रेषु निर्णयः ।
(मानुषेण तु देहेन ब्रह्मलोके गतिः कथम् । )
स्वर्गात्पुनः कथं लोके मानुषे जायते गतिः ॥ ४ ॥
एतन्मे संस्ययं विद्वंश्छेत्तुमर्हसि साम्प्रतम् ।
यथा राजा गतस्तत्र प्रष्टुकामः प्रजापतिम् ॥ ५ ॥
व्यास उवाच -
मेरोस्तु शिखरे राजन् सर्वे लोकाः प्रतिष्ठिताः ।
इन्द्रलोको वह्निलोको या च संयमिनी पुरी ॥ ६ ॥
तथैव सत्यलोकश्च कैलासश्च तथा पुनः ।
वैकुण्ठश्च पुनस्तत्र वैष्णवं पदमुच्यते ॥ ७ ॥
यथार्जुनः शक्रलोके गतः पार्थो धनुर्धरः ।
पञ्चवर्षाणि कौन्तेयः स्थितस्तत्र सुरालये ॥ ८ ॥
मानुषेणैव देहेन वासवस्य च सन्निधौ ।
तथैवान्येऽपि भूपालाः ककुत्स्थप्रमुखाः किल ॥ ९ ॥
स्वर्लोकगतयः पश्चाद्दैत्याश्चापि महाबलाः ।
जित्वेन्द्रसदनं प्राप्य संस्थितास्तत्र कामतः ॥ १० ॥
महाभिषः पुरा राजा ब्रह्मलोकं गतः स्वराट् ।
आगच्छन्तीं नृपो गङ्गामपश्यच्चातिसुन्दरीम् ॥ ११ ॥
वायुनाम्बरमस्यास्तु दैवादपहृतं नृप ।
किञ्चिन्नग्ना नृपेणाथ दृष्टा सा सुन्दरी तथा ॥ १२ ॥
स्मितं चकार कामार्तः सा च किञ्चिज्जहास वै ।
ब्रह्मणा तौ तदा दृष्टौ शप्तौ जातौ वसुन्धराम् ॥ १३ ॥
वैकुण्ठेऽपि सुराः सर्वे पीडिता दैत्यदानवैः ।
गत्वा हरिं जगन्नाथमस्तुवन्कमलापतिम् ॥ १४ ॥
सन्देहो नात्र कर्तव्यः सर्वथा नृपसत्तम ।
गम्याः सर्वेऽपि लोकाः स्युर्मानवानां नराधिप ॥ १५ ॥
अवश्यं कृतपुण्यानां तापसानां नराधिप ।
पुण्यसद्‌भाव एवात्र गमने कारणं नृप ॥ १६ ॥
तथैव यजमानानां यज्ञेन भावितात्मनाम् ।
जनमेजय उवाच -
रेवतो रेवतीं कन्यां गृहीत्वा चारुलोचनाम् ॥ १७ ॥
ब्रह्मलोकं गतः पश्चात्किं कृतं तेने भूभुजा ।
ब्रह्मणा किं समादिष्टं कस्मै दत्ता सुता पुनः ॥ १८ ॥
तत्सर्वं विस्तराद्‌बह्मन् कथय त्वं ममाधुना ।
व्यास उवाच -
निशामय महीपाल राजा रेवतकः किल ॥ १९ ॥
पुत्र्या वरं परिप्रष्टुं ब्रह्मलोकं गतो यदा ।
आवर्तमाने गान्धर्वे स्थितो लब्धक्षणः क्षणम् ॥ २० ॥
शृण्वन्नतृप्यद्‌धृष्टात्मा सभायां तु सकन्यकः ।
समाप्ते तत्र गान्धर्वे प्रणम्य परमेश्वरम् ॥ २१ ॥
दर्शयित्वा सुतां तस्मै स्वाभिप्रायं न्यवेदयत् ।
राजोवाच -
वरं कथय देवेश कन्येयं मम पुत्रिका ॥ २२ ॥
देया कस्मै मया ब्रह्मन् प्रष्टुं त्वां समुपागतः ।
बहवो राजपुत्रा मे वीक्षिताः कुलसम्भवाः ॥ २३ ॥
कस्मिंश्चिन्मे मनः कामं नोपतिष्ठति चञ्चलम् ।
तस्मात्त्वां देवदेवेश प्रष्टुमत्रागतोऽस्म्यहम् ॥ २३ ॥
तदाज्ञापय सर्वज्ञ योग्यं राजसुतं वरम् ।
कुलीनं बलवन्तं च सर्वलक्षणसंयुतम् ॥ २५ ॥
दातारं धर्मशीलं च राजपुत्रं समादिश ।
व्यास उवाच -
तदाकर्ण्य जगत्कर्ता वचनं नृपतेस्तदा ॥ २६ ॥
तमुवाच हसन्वाक्यं दृष्ट्वा कालस्य पर्ययम् ।
ब्रह्मोवाच -
राजपुत्रास्त्वया राजन् वरा ये हृदये कृताः ॥ २७ ॥
ग्रस्ताः कालेन ते सर्वे सपितृपौत्रबान्धवाः ।
सप्तविंशतिमोऽद्यैव द्वापरस्तु प्रवर्तते ॥ २८ ॥
वंशजास्ते मृताः सर्वे पुरी दैत्यैर्विलुण्ठिता ।
सोमवंशोद्‌भवस्तत्र राजा राज्यं प्रशास्ति हि ॥ २९ ॥
उग्रसेन इति ख्यातो मथुराधिपतिः किल ।
ययातिवंशसम्भूतो राजा माथुरमण्डले ॥ ३० ॥
उग्रसेनात्मजः कंसः सुरद्वेषी महाबलः ।
दैत्यांशः पितरं सोऽपि कारागारं न्यवेशयत् ॥ ३१ ॥
स्वयं राज्यं चकारासौ नृपाणां मदगर्वितः ।
मेदिनी चातिभारार्ता ब्रह्माणं शरणं गता ॥ ३२ ॥
दुष्टराजन्यसैन्यायां भारेणातिसमाकुला ।
अंशावतरणं तत्र गदितं सुरसत्तमैः ॥ ३३ ॥
वासुदेवः समुत्पन्नः कृष्णः कमललोचनः ।
देवक्यां देवरूपिण्यां योऽसौ नारायणो मुनिः ॥ ३४ ॥
तपश्चचार दुःसाध्यं धर्मपुत्रः सनातनः ।
गङ्गातीरे नरसखः पुण्ये बदरिकाश्रमे ॥ ३५ ॥
सोऽवतीर्णो यदुकुले वासुदेवोऽपि विश्रुतः ।
तेनासौ निहतः पापः कंसः कृष्णेन सत्तम ॥ ३६ ॥
उग्रसेनाय राज्यं वै दत्तं हत्वा खलं सुतम् ।
कंसस्य श्वशुरः पापो जरासन्धो महाबलः ॥ ३७ ॥
आगत्य मथुरां क्रोधाच्चकार सङ्गरं मुदा ।
कृष्णेनासौ जितः संख्ये जरासन्धो महाबलः ॥ ३८ ॥
प्रेषयामास युद्धाय सबलं यवनं ततः ।
श्रुत्वाऽऽयान्तं महाशूरं ससैन्यं यवनाधिपम् ॥ ३९ ॥
[कृष्णस्तु मथुरां त्यक्त्वा पुरीं द्वारावतीमगात् ।
प्रभग्नां तां पुरीं कृष्णः शिल्पिभिः सह सङ्गतैः ॥
कारयामास दुर्गाढ्यां हट्टशालाविमण्डिताम् ।
जीर्णोद्धारं पुरः कृत्वा वासुदेवः प्रतापवान् ।
उग्रसेनं च राजानं चकार वशवर्तिनम् ॥]
यादवान्स्थापयामास द्वारवत्यां यदूत्तमः ।
वासुदेवस्तु तत्राद्य वर्तते बान्धवैः सह ॥ ४० ॥
तास्याग्रतः स विख्यातो बलदेवो हलायुधः ।
शेषांशो मुसली वीरो वरोऽस्तु तव सम्मतः ॥ ४१ ॥
सङ्कर्षणाय देह्याशु कन्यां कमललोचनाम् ।
रेवतीं बलभद्राय विवाहविधिना ततः ॥ ४२ ॥
दत्त्वा पुत्रीं नृपश्रेष्ठ गच्छ त्वं बदरिकाश्रमम् ।
तपस्तप्तुं सुरारामं पावनं कामदं नृणाम् ॥ ४३ ॥
व्यास उवाच -
इति राजा समादिष्टो ब्रह्मणा पद्मयोनिना ।
जगाम तरसा राजन् द्वारकां कन्ययान्वितः ॥ ४४ ॥
ददौ तां बलदेवाय कन्यां वै शुभलक्षणाम् ।
ततस्तप्त्वा तपस्तीव्रं नृपतिः कालपर्यये ॥ ४५ ॥
जगाम त्रिदशावासं त्यक्त्वा देहं सरित्तटे ।
राजोवाच -
भगवन्महदाश्चर्यं भवता समुदाहृतम् ॥ ४६ ॥
रेवतस्तु स्थितस्तत्र ब्रह्मलोके सुतार्थतः ।
युगानां तु गतं तत्र शतमष्टोत्तरं किल ॥ ४७ ॥
कन्या वृद्धा न सञ्जाता राजा वातितरां नु किम् ।
एतावन्तं तथा कालमायुः पूर्णं तयोः कथम् ॥ ४८ ॥
व्यास उवाच -
न जरा क्षुपित्पासा वा न मृत्युर्न भयं पुनः ।
न तु ग्लानिः प्रभवति ब्रह्मलोके सदानघ ॥ ४९ ॥
मेरुं गतस्य शर्यातेः सन्तती राक्षसैर्हता ।
गताः कुशस्थलीं त्यक्त्वा भयभीता इतस्ततः ॥ ५० ॥
मनोश्च क्षुवतः पुत्र उत्पन्नो वीर्यवत्तरः ।
इक्ष्वाकुरिति विख्यातः सूर्यवंशकरस्तु सः ॥ ५१ ॥
वंशार्थं तप आतिष्ठद्देवीं ध्यात्वा निरन्तरम् ।
नारदस्योपदेशेन प्राप्य दीक्षामनुत्तमाम् ॥ ५२ ॥
तस्य पुत्रशतं राजन्निक्ष्वाकोरिति विश्रुतम् ।
विकुक्षिः प्रथमस्तेषां बलवीर्यसमन्वितः ॥ ५३ ॥
अयोध्यायां स्थितो राजा इक्ष्वाकुरिति विश्रुतः ।
शकुनिप्रमुखाः पुत्रा पञ्चाशद्‌बलवत्तराः ॥ ५४ ॥
उत्तरापथदेशस्य रक्षितारः कृताः किल ।
दक्षिणस्यां तथा राजन्नादिष्टास्तेन ते सुताः ॥ ५५ ॥
चत्वारिंशत्तथाष्टौ च रक्षणार्थं महात्मना ।
अन्यौ द्वौ संस्थितौ पार्श्वे सेवार्थं तस्य भूपतेः ॥ ५६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
सप्तमस्कन्धे इक्ष्वाकुवंशवर्णनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥


रेवतीचा बलदेवाशी विवाह - इश्वाकु कुलाची निर्मिती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जनमेजय म्हणाला, "हे ब्रह्मन्, मी असे ऐकले महे की ब्रह्मवेत्त्या व शांत ब्राह्मणालाच फक्त ब्रह्मलोक प्राप्त होतो. दुसरा कुणी ब्रह्मलोकी गेल्याचे ऐकिवात नाही. अशी वस्तुस्थिती असताना रेवतराज आपली शुभ कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी कसा गेला ? हे महामुने, माझ्या मनात फारच संशय दाटून राहिला आहे. कारण ब्रह्मलोक प्राप्त होणे मनुष्यास केवळ अशक्यच असताना द्युलोकापासून त्या सत्यलोकापर्यंत राजा आपल्या कन्येसह येऊन पोहोचला हे आश्चर्य नव्हे काय ? वास्तविक पहाता ब्रह्मवेत्त्यालाच स्वर्ग प्राप्त होतो हे खरे असून सर्व शास्त्रेही तसेच सांगतात. तेव्हा स्वतः तेथपर्यंत गेलेल्या राजाचे व त्याच्या कन्येचे पुन्हा भूलोकावर आगमन कसे संभवनीय आहे ? तेव्हा मृत नसताही जिवंतपणी शरीरधारी ते उभयता "ब्रह्मदेवाला विचारण्यासाठी तेथपर्यंत गेले कसे व तेथून परत आले कसे ? खरोखरच हे महर्षे, मी गोंधळून गेलो आहे. आपण माझ्या संशयाचे निवारण करा."

व्यासांनी सांगितले, "हे राजन् देवलोक मेरु पर्वताच्या शिखरावर वसलेले आहेत. इंद्रलोक, अग्नीलोक, संयमनी नगरी तसेच सत्यलोक, वैकुंठ लोक ही सर्व देवांची वसतीस्थाने मेरु पर्वताच्या उंच शिखरावर आहेत. अरे, प्रत्यक्ष अर्जुनही इंद्रलोकी जाऊन पाच वर्षेपर्यंत इंद्रलोकी राहिला होता व तेथे स्वर्गलोकी राहूनही तो परत या लोकी प्राप्त झाला. तो मनुष्ययदेहानेच इंद्राचे सान्निध्यात राहिला होता हे विदीतच आहे. त्यानंतर ककुस्थ व इतर कित्येक राजे स्वर्गामध्ये जाऊन तेथे काही कालपर्यंत वास्तव्य करून परत आले होते. इतकेच काय, पण प्रत्यक्ष दैत्यही इंद्रलोक जिंकून तेथे जाऊन राज्य करीत होते हे मी तुला सांगितलेच आहे. तात्पर्य, देवांप्रमाणे तुल्यबल असलेले मानवही योग्यता असल्याने देवलोकी जाऊन राहू शकतो व दैत्यही आपल्या बलाने देवलोक प्राप्त करून घेतात. हे राजेंद्रा, आता पूर्वीचीच घटना तुला सांगतो.

महाभिष नावाचा पराक्रमी राजा स्वसामर्थ्याने ब्रह्मलोकी गेला होता. त्यावेळी तेथे आलेल्या सुंदर गंगेला त्याने पाहिले. एवढ्यात दुर्देवाने वार्‍यामुळे तिच्या शरीरावरचे वस्त्र उडून गेले. ती सुंदरवदना नग्न झाली. राजा महाभिषाने अनिमिष नेत्राने तिचे अवलोकन केले. तिनेही राजाकडे प्रेमपूर्ण नजरेने पाहिले. राजाची कामवासना जागृत झाली व तो गंगेकडे पाहून हसला. गंगेनेही कामातुर होऊन हसून प्रतिसाद दिला. ते अवलोकन करताच कुद्ध होऊन ब्रह्मदेवाने त्या उभयतांना शाप दिला व त्या शापामुळे उभयतांना भूमीवर परत यावे लागले. ते दोघही काही काळपर्यंत स्वर्गापासून च्युत झाले.

तसेच देवांना दैत्यांनी अनेक वेळा त्रस्त केल्यामुळे देव वेळोवेळी विष्णूलोकावर गेले होते. ह्या घटनाही हे जनमेजया, मी तुला सांगितल्या आहेत.

थोडक्यात सांगायचे तर हे राजा, जे पुण्यवान असतात तेच स्वर्गलोकी जाऊ शकतात. तसेच स्वतःच्या तपःसामर्थ्यावर ऋषीमुनी स्वर्गलोकी जातात व परत येतात. केवळ पुण्याच्याच जोरावर मानवांना स्वर्ग प्राप्त होत असतो. शिवाय यज्ञयाग केल्याने ज्यांची अंतःकरणे शुद्ध झाली आहेत अशांनाही स्वर्गलोकी जाता येते. तेव्हा रेवतराज रेवतीला घेऊन ब्रह्मलोकात गेला याविषयी संशय निर्माण होण्याचे कारण नाही."

जनमेजयाचे व्यासांच्या भाषणाने समाधान झाले व आनंदी मनाने तो म्हणाला, "हे महर्षे, आता मला सर्व काही समजले. पुण्य हेच स्वर्गात जाण्याचे कारण होय. आता हे मुने, मला पुढील कथाभाग सांगा. रेवतराजा ब्रह्मलोकी कन्येसह जाऊन पोहचल्यावर तेथे त्याने काय केले ? ब्रह्मदेवाला राजाने काय विचारले ? ब्रह्मदेवाने राजाचे कोणत्या उत्तराने समाधान केले ? अखेरीस रेवतीचा कोणाबरोबर विवाह झाला ? हे सर्व ऐकण्याची माझी इच्छा, हे भगवान महर्षे, आपण पूर्ण करा."

व्यास सांगू लागले, "राजा, आता ऐक तर मग. जेव्हा तो तेथे प्राप्त झाला त्यावेळी ब्रह्मलोकी गायन चालले होते. त्यामुळे ब्रह्मदेवापुढे त्याला प्रश्न उपस्थित करण्यास वेळच मिळाला नाही. तेव्हा राजाही आपल्या कन्या रेवतीसह गायन ऐकू लागला. सुरलोकीच्या त्या गायनाने रेवतराजा व रेवती दोघेही तल्लीन झाली. अशाप्रकारे बराच कालपर्यंत गायन चालले होते. गायन संपल्यावर राजा रेवताने पुढे जाऊन आदराने ब्रह्मदेवाला साष्टांग प्रणाम केला. आपली कन्या रेवती त्याने ब्रह्मदेवास दाखविली तिच्या विवाहाविषय मार्ग दाखविण्याची ब्रह्मदेवास विनंती केली."

राजा रेवत म्हणाला, "हे सुरेश्वरा, ही माझी कन्या रेवती सर्वलक्षणसंपत्र असून सांप्रत ती उपवर झाली आहे तेव्हा तिच्यासाठी योग्य असा वर आपण सुचवा. ही सुंदर कन्या कोणाला अर्पण करू हे आपणास विचारण्यासाठी मी येथे आलो आहे. तेव्हा माझी काळज दूर करा.

हे ब्रह्मन्, मी पुष्कळ कुलीन राजपुत्रांचे बाबतील हिच्यासाठी विचार केला व प्रत्यक्ष पाहिलेही. पण माझा मनाला हिच्या योग्य असा एकही वर आढळेना. तेव्ह हे देवाधिपते, आता मी आपणालाच शरण येऊन विचारीत आहे. आपण सर्वज्ञ आहात. म्हणून एखादा सुयोग्य राजपुत्र कोण आहे ते मला सांगा. तो कुलीन, प्रतापी, सर्व गुणलक्षणांनी युक्त, धर्मशील, महान दातृत्व अंगी असलेला असा हवा आहे. हे भगवान माझी ही कन्या अवलोकन करून आता योग्य वर दाखवा."

राजाचे भाषण ब्रह्मदेवाने शांत चित्ताने ऐकून घेतले कालगतीचा विचार करून ब्रह्मदेव हसत म्हणाला, "हे राजा, तू ज्या राजपुत्राचा योग्य वर म्हणून विचार केल होतास ते सर्वजण यावेळी आपल्या पित्यासह, बांधवांसह सर्व स्वजनांसह कालाधीन झाले आहेत. आजच या नव्या मन्वंतरातील सत्ताविसावे द्वापारयुग सुरू झाले आहे. शिवाय हे राजा, तुझे वंशजही मृत झाले आहेत. तुझी राजधानीची व राज्याची दैत्यांनी दाणादाण उडवून टाकली आहे. सोमवंशातील उग्रेसन नावाचा बलाढ्य व सुप्रसिद्ध असा मथुरेचा राजा राज्य करीत होता. तो बंदिस्त असून त्यावेळी तेथे ययातिवंशात जन्म पावलेला उग्रसेनाचा पुत्र महाबलाढ्य कंस राजा राज्य करू लागला आहे तो अत्यंत देवद्वेष्टा आहे.

कंसाच्या अंतः करणात दैत्याचा अंश असल्याने त्या पापात्म्याने प्रत्यक्ष आपल्या पित्याला कारागृहात डांबून ठेवून राज्य बळकावले आहे. अत्यंत मदोन्मत्त व गर्विष्ठ होऊन तो राज्य करीत आहे. त्या माजलेल्या कंसाच्या त्रासाने पृथ्वी दुःखी झाली असून ती यावेळी ब्रह्मदेवालाच शरण गेली आहे. कारण त्या दुष्ट राजाच्या सैन्याचा भार तिला सहन होईनासा झाला आहे. त्यामुळे ती व्याकुळ झाली आहे.

म्हणून पृथ्वीवर अंशरूपाने परमेश्वराचा अवतार होईल असे सुरश्रेष्ठांनी सांगितले होते. कमलाप्रमाणे नेत्र असलेला वासुदेवाचा पुत्र कृष्ण देवस्वरूप देवकीचे पोटी जन्मास आला आहे. नराचा सखा सनातन धर्मपुत्र जो नारायण तो गंगातीरावरील बद्रिकाश्रमात दुर्घट तपश्चर्या करीत होता. तोच यदुकुलात जन्म घेऊन वासुदेव या नावाने सुप्रसिद्ध झाला आहे.

हे रेवत राजा, त्या महात्म्या कृष्णाने पापात्म्या कंसाचा वध करून पुन्हा उग्रसेनाला राज्य मिळवून दिले. त्यामुळे कंसाचा सासरा महाबलाढ्य दैत्य जरासंध अत्यंत क्रोधायमान होऊन कृष्णाशी त्याने मथुरेत येऊन युद्ध केले. पण महापराक्रमी जरासंधाचा कृष्णाने युद्धात पराभव केला. त्यामुळे चिडून जाऊन प्रचंड सैन्य घेऊन जरासंधाने एक यवन कृष्णाशी युद्ध करण्यासाठी पाठविला. पण कृष्णाने आपले सर्व यादव सैन्य बंदोबस्तासाठी मथुरेत ठेवले व स्वतः त्या यवनाला सामोरा गेला. युद्ध करून त्याने यवनाला सैन्यासह पिटाळून लावले.

आज आपल्या बंधूसह तो पराक्रमी कृष्ण मथुरेत वास्तव्य करीत आहे. कृष्णाचा हलायुध बलदेव नावाचा श्रेष्ठ बंधू आहे. तो मुसलधारी असून प्रत्यक्ष शेषाचा अंश असून अत्यंत बलशाली आहे. म्हणून मला वाटते, तोच एकमेव वीरश्रेष्ठ तुझ्या रेवती नावाच्या कन्येस सुयोग्य वर आहे. म्हणून त्या संकर्षणाला तू आपली कन्या सत्वर निश्चयी मनाने अर्पण कर. आपली कन्या त्या महाप्रतापी बलदेवाला अर्पण केल्यावर हे राजा तू मनोरथ पूर्ण करणार्‍या व देवांचे विश्रांतीस्थान असलेल्या बद्रिकाश्रमात वास्तव्य करून अखेरपर्यंत तपश्चर्या कर."

अशाप्रकारे पद्ययोनी ब्रह्मदेवाने राजाला योग्य मार्ग दाखविला. राजा रेवत आपली कन्या रेवती हिला बरोबर घेऊन सत्वर द्वारकेस आला. आपली सुलक्षणी कन्या आनंदाने रेवतराजाने बलदेवास अर्पण केली आणि तीव्र तपश्चर्या करण्यासाठी तो बद्रिकाश्रमात गेला. अखेर कालगतीमुळे नदीकिनारी त्याने देहत्याग केला व स्वर्गाला गेला."

जनमेजय अधिकच विस्मयचकित झाला. तो म्हणाला, "हे महर्षे, आपण काय आश्चर्य सांगत आहात. अहो, आपल्या कन्येला इष्ट वर मिळावा म्हणून गेला असता त्याची तेथे एकशे आठ युगे गेली. तरीही त्याची कन्या वृद्ध न होता उपवर अशी यौवनसंपन्नच कशी राहिली ? राजाही जरेने दुर्बल कसा झाला नाही ? शिवाय एवढा मोठा काल जाईपर्यंत त्याला आपले आयुष्य पुरले कसे ?"

राजाच्या शंका ऐकून व्यासांना हसू आले. ते कौतुकमिश्रित स्वराने राजाला म्हणाले, "हे निष्पापा, ब्रह्मलोकी वृद्धत्व, क्षुधा, तृषा, मृत्यु, भय, ग्लानी हे सर्व कधीही प्राप्त होत नाहीत. यांची तेथे भीति नसते. त्यामुळे रेवतराजा आपल्या कन्येसह होता तसाच राहिला. दोघांनाही वार्धक्य अथवा मृत्यू यापासून भय निर्माण झाले नाही. आता मी तुला शर्यातीच्या वंशातील राजाची कथा सांगतो ऐक.

शर्याति राजा तपश्चर्येसाठी मेरू पर्वतावर गेला. इकडे राक्षसांनी त्याची संतती मारण्यास सुरुवात केली. तेव्हा भयभीत झालेले शर्यातीचे वंशज कुशस्थली सोडून इतस्ततः भटकू लागले. त्याच वेळी वैवस्वत मनूला शिंक येऊ लागली आणि त्यातूनच घाणेंद्रियापासून त्याला एक अत्यंत बलशाली असा महापराक्रमी पुत्र झाला. तो पुढे ईक्ष्वाकु म्हणून विख्यात झाला. त्यानेच सूर्यवंश पुढे चालवला. नारदाने उपदेश देऊन त्याला शक्तिदीक्षा दिली.

आपल्या वंश रक्षणासाठी त्याने देवीचे निरंतर ध्यान केले. त्यानंतर इक्ष्वाकुला शंभर पुत्र झाले. त्यापैकी विकुक्षी हा ज्येष्ठ पुत्र अति पराक्रमी झाला. इक्ष्वाकु राजाने अयोध्येत जाऊन वास्तव्य केले. त्याने आपले पन्नास बलाढ्य पुत्र उत्तरेकडील देशांचे रक्षण करण्यास नेमले.

तसेच आपल्या अठ्ठेचाळीस पुत्रांना त्याने दक्षिण देशांचे रक्षण करण्यासाठी रवाना केले. व त्याने उरलेल्या दोन पुत्रांना स्वतःच्या सेवेसाठी जवळ ठेवले. इक्ष्वाकु राजाने धर्मतत्पर राहून पुष्कळ कालपर्यंत राज्य केले.



अध्याय आठवा समाप्त

GO TOP