श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
एकविंशोऽध्यायः


शुम्भनिशुम्भद्वारा स्वर्गविजयवर्णनम्

व्यास उवाच
शृणु राजन् प्रवक्ष्यामि देव्याश्चरितमुत्तमम् ।
सुखदं सर्वजन्तूनां सर्वपापप्रणाशनम् ॥ १ ॥
यथा शुम्भो निशुम्भश्च भ्रातरौ बलवत्तरौ ।
बभूवतुर्महावीरौ अवध्यौ पुरुषैः किल ॥ २ ॥
बहुसेनावृतौ शूरौ देवानां दुःखदौ सदा
दुराचारौ मदोत्सिक्तौ बहुदानवसंयुतौ ॥ ३ ॥
हतावम्बिकया तौ तु संग्रामेऽतीव दारुणे ।
देवानाञ्ज हितार्थाय सर्वैः परिचरैः सह ॥ ४ ॥
चण्डमुण्डौ महाबाहू रक्तबीजोऽतिदारुणः ।
धूम्रलोचननामा च निहतास्ते रणाङ्गणे ॥ ५ ॥
तान्निहत्य सुराणां सा जहार भयमुत्तमम् ।
स्तुता सम्पूजिता देवैर्गिरौ हेमाचले शुभे ॥ ६ ॥
राजोवाच
कावेतावसुरावादौ कथं तौ बलिनां वरौ ।
केन संस्थापितौ चेह स्त्रीवध्यत्वं कुतो गतौ ॥ ७ ॥
तपसा वरदानेन कस्य जातौ महाबलौ ।
कथञ्च निहतौ सर्वं कथयस्व सविस्तरम् ॥ ८ ॥
व्यास उवाच
शृणु राजन्कथां दिव्यां सर्वपापप्रणाशिनीम् ।
देव्याश्चरितसंयुक्तां सर्वार्थफलदां शुभाम् ॥ ९ ॥
पुरा शुम्भनिशुम्भौ द्वावसुरौ भूमिमण्डले ।
पातालतश्च सम्प्राप्तौ भ्रातरौ शुभदर्शनौ ॥ १० ॥
तौ प्राप्तयौवनौ चैव चेरतुस्तप उत्तमम् ।
अन्नोदकं परित्यज्य पुष्करे लोकपावने ॥ ११ ॥
वर्षाणामयुतं यावद्योगविद्यापरायणौ ।
एकत्रैवासनं कृत्वा तेपाते परमं तपः ॥ १२ ॥
तयोस्तुष्टोऽभवद्‌ ब्रह्मा सर्वलोकपितामहः ।
तत्रागतश्च भगवानारुह्य वरटापतिम् ॥ १३ ॥
तावुभौ च जगत्स्रष्टा दृष्ट्वा ध्यानपरौ स्थितौ ।
उत्तिष्ठत महाभागौ तुष्टोऽहं तपसा किल ॥ १४ ॥
वाञ्छितं वां वरं कामं ददामि ब्रुवतामिह ।
कामदोऽहं समायातो दृष्ट्वा वां तपसो बलम् ॥ १५ ॥
व्यास उवाच
इति श्रुत्वा वचस्तस्य प्रबुद्धौ तौ समाहितौ ।
प्रदक्षिणक्रियां कृत्वा प्रणामं चक्रतुस्तदा ॥ १६ ॥
दण्डवत्प्रणिपातञ्च कृत्वा तौ दुर्बलाकृती ।
ऊचतुर्मधुरां वाचं दीनौ गद्‌गदया गिरा ॥ १७ ॥
देवदेव दयासिन्धो भक्तानामभयप्रद ।
अमरत्वञ्च नौ ब्रह्मन्देहि तुष्टोऽसि चेद्विभो ॥ १८ ॥
मरणादपरं किञ्चिद्‌भयं नास्ति धरातले ।
तस्माद्‌भयाच्च सन्त्रस्तौ युष्माकं शरणं गतौ ॥ १९ ॥
त्राहि त्वं देवदेवेश जगत्कर्तः क्षमानिधे ।
परिस्फोटय विश्वात्मन् सद्यो मरणजं भयम् ॥ २० ॥

ब्रह्मोवाच
किमिदं प्रार्थनीयं वो विपरीतं तु सर्वथा ।
अदेयं सर्वथा सर्वैः सर्वेभ्यो भुवनत्रये ॥ २१ ॥
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
मर्यादा विहिता लोके पूर्वं विश्वकृता किल ॥ २२ ॥
मर्तव्यं सर्वथा सर्वैः प्राणिभिर्नात्र संशयः ।
अन्यं प्रार्थयतं कामं ददामि यच्च वाञ्छितम् ॥ २३ ॥
व्यास उवाच
तदाकर्ण्य वचस्तस्य सुविमृश्य च दानवौ ।
ऊचतुः प्रणिपत्याथ ब्रह्माणं पुरतः स्थितम् ॥ २४ ॥
पुरुषैरमराद्यैश्च मानवैर्मृगपक्षिभिः ।
अवध्यत्वं कृपासिन्धो देहि नौ वाञ्छितं वरम् ॥ २५ ॥
नारी बलवती कास्ति या नौ नाशं करिष्यति ।
न बिभीवः स्त्रियः कामं त्रैलोक्ये सचराचरे ॥ २६ ॥
अवध्यौ भ्रातरौ स्यातां नरेभ्यः पङ्कजोद्‌भव ।
भयं न स्त्रीजनेभ्यश्च स्वभावादबला हि सा ॥ २७ ॥
व्यास उवाच
इति श्रुत्वा तयोर्वाक्यं प्रददौ वाञ्छितं वरम् ।
ब्रह्मा प्रसन्नमनसा जगामाथ स्वमालयम् ॥ २८ ॥
गतेऽथ भवने तस्मिन्दानवौ स्वगृहं गतौ ।
भृगुं पुरोहितं कृत्वा चक्रतुः पूजनं तदा ॥ २९ ॥
शुभे दिने सुनक्षत्रे जातरूपमयं शुभम् ।
कृत्वा सिंहासनं दिव्यं राज्यार्थं प्रददौ मुनिः ॥ ३० ॥
शुम्भाय ज्येष्ठभूताय ददौ राज्यासनं शुभम् ।
सेवनार्थं तदैवाशु सम्प्राप्ता दानवोत्तमाः ॥ ३१ ॥
चण्डमुण्डौ महावीरौ भ्रातरौ बलदर्पितौ ।
सम्प्राप्तौ सैन्यसंयुक्तौ रथवाजिगजान्वितौ ॥ ३२ ॥
धूम्रलोचननामा च तद्‌रूपश्चण्डविक्रमः ।
शुम्भञ्च भूपतिं श्रुत्वा तदागाद्‌बलसंयुतः ॥ ३३ ॥
रक्तबीजस्तथा शूरो वरदानबलाधिकः ।
अक्षौहिणीभ्यां संयुक्तस्तत्रैवागत्य सङ्गतः ॥ ३४ ॥
तस्यैकं कारणं राजन् संग्रामे युध्यतः सदा ।
देहाद्रुधिरसम्पातस्तस्य शस्त्राहतस्य च ॥ ३५ ॥
जायते च यदा भूमावुत्पद्यन्ते ह्यनेकशः ।
तादृशाः पुरुषाः क्रूरा बहवः शस्त्रपाणयः ॥ ३६ ॥
सम्भवन्ति तदाकारास्तद्‌रूपास्तत्पराक्रमाः ।
युद्धं पुनस्ते कुर्वन्ति पुरुषा रक्तसम्भवाः ॥ ३७ ॥
अतः सोऽपि महावीर्यः संग्रामेऽतीव दुर्जयः ।
अवध्यः सर्वभूतानां रक्तबीजो महासुरः ॥ ३८ ॥
अन्ये च बहवः शूराश्चतुरङ्गसमन्विताः ।
शुम्भञ्च नृपतिं मत्वा बभूवुस्तस्य सेवकाः ॥ ३९ ॥
असंख्याता तदा जाता सेना शुम्भनिशुम्भयोः ।
पृथिव्याः सकलं राज्यं गृहीतं बलवत्तया ॥ ४० ॥
सेनायोगं तदा कृत्वा निशुम्भः परवीरहा ।
जगाम तरसा स्वर्गे शचीपतिजयाय च ॥ ४१ ॥
चकारासौ महायुद्धं लोकपालैः समन्ततः ।
वृत्रहा वज्रपातेन ताडयामास वक्षसि ॥ ४२ ॥
स वज्राभिहतो भूमौ पपात दानवानुजः ।
भग्नं बलं तदा तस्य निशुम्भस्य महात्मनः ॥ ४३ ॥
भ्रातरं मूर्च्छितं श्रुत्वा शुम्भः परबलार्दनः ।
तत्रागत्य सुरान्मर्वांस्ताडयामास सायकैः ॥ ४४ ॥
कृतं युद्धं महत्तेन शुम्भेनाक्लिष्टकर्मणा ।
निर्जितास्तु सुराः सर्वे सेन्द्राः पालाश्च सर्वशः ॥ ४५ ॥
ऐन्द्रं पदं तदा तेन गृहीतं बलवत्तया ।
कल्पपादपसंयुक्तं कामधेनुसमन्वितम् ॥ ४६ ॥
त्रैलोक्यं यज्ञभागाश्च हृतास्तेन महात्मना ।
नन्दनं च वनं प्राप्य मुदितोऽभून्महासुरः ॥ ४७ ॥
सुधायाश्चैव पानेन सुखमाप महासुरः ।
कुबेरं स च निर्जित्य तस्य राज्यं चकार ह ॥ ४८ ॥
अधिकारं तथा भानोः शशिनश्च चकार ह ।
यमञ्चैव विनिर्जित्य जग्राह तत्पदं तथा ॥ ४९ ॥
वरुणस्य तथा राज्यं चकार वह्निकर्म च ।
वायोः कार्यं निशुम्भश्च चकार स्वबलान्वितः ॥ ५० ॥
ततो देवा विनिर्धूता हृतराज्या हृतश्रियः ।
सन्त्यज्य नन्दनं सर्वे निर्ययुर्गिरिगह्वरे ॥ ५१ ॥
हृताधिकारास्ते सर्वे बभ्रमुर्विजने वने ।
निरालम्बा निराधारा निस्तेजस्का निरायुधाः ॥ ५२ ॥
विचेरुरमराः सर्वे पर्वतानां गुहासु च ।
उद्यानेषु च शून्येषु नदीनां गह्वरेषु च ॥ ५३ ॥
न प्रापुस्ते सुखं वापि स्थानभ्रष्टा विचेतसः ।
लोकपाला महाराज दैवाधीनं सुखं किल ॥ ५४ ॥
बलवन्तो महाभागा बहुज्ञा धनसंयुताः ।
काले दुःखं तथा दैन्यमाप्नुवन्ति नराधिप ॥ ५५ ॥
चित्रमेतन्महाराज कालस्यैव विचेष्टितम् ।
यः करोति नरं तावद्‌राजानं भिक्षुकं ततः ॥ ५६ ॥
दातारं याचकं चैव बलवन्तं तथाबलम् ।
पण्डितं विकलं कामं शूरं चातीव कातरम् ॥ ५७ ॥
मखानाञ्च शतं कृत्वा प्राप्येन्द्रासनमुत्तमम् ।
पुनर्दुःखं परं प्राप्तं कालस्य गतिरीदृशी ॥ ५८ ॥
कालः करोति धर्मिष्ठं पुरुषं ज्ञानसंयुतम् ।
तमेवातीव पापिष्ठं ज्ञानलेशविवर्जितम् ॥ ५९ ॥
न विस्मयोऽत्र कर्तव्यः सर्वथा कालचेष्टिते ।
ब्रह्मविष्णुहरादीनामपीदृक्कष्टचेष्टितम् ॥ ६० ॥
विष्णुर्जननमाप्नोति सूकरादिषु योनिषु ।
हरः कपाली सञ्जातः कालेनैव बलीयसा ॥ ६१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे शुम्भनिशुम्भद्वारा
स्वर्गविजयवर्णनं नामकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥


शुंभनिशुंभाची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास म्हणाले, "राजा जनमेजया, आता सर्वपापनाशक व प्राण्यांना सुख देणारे दुसरे एक देवीचे चरित्र मी तुला कथन करतो."

पूर्वी शुंभ व निशुंभ हे महाबलाढ्य राक्षसवीर सर्वांना अजिंक्य असे होऊन गेले. ते शूर, दुराचारी व उन्मत्त असे भाऊ होते. ते सर्वांना पीडा करीत. परंतु देवहित तत्पर अंबिकेने त्यांचाही वध केला. त्याचप्रमाणे महापराक्रमी चंड मुंड, रक्तबीज, धूम्रलोचन ह्यांचाही तिने रणांगणात वध केला व देवांचे संकट दूर केले. तेव्हा देवांनी हिमालय पर्वतावर तिचे पूजन केले."

राजा म्हणाला, "हे असूर कोण, कुठले ? हे राज्यावर कसे आले ? ते स्त्रीवध्य कसे झाले ? त्यांना कोणी वर दिला ? ते सर्व विस्ताराने मला सांगा."

व्यास म्हणाले, "राजा, आता तू ती दिव्य कथा श्रवण कर. शुंभ निशुंभ हे दिसायला सुंदर होते. ते पाताळात रहात. पण एकदा हे दोघे भाऊ भूतलावर प्राप्त झाले. तारुण्यात त्यांनी अन्नपाणी वर्ज्य करून पुष्करतीर्थावर घोर तपश्चर्या केली. योगविद्येत तत्पर राहून त्यांनी दहा हजार वर्षे तपश्चर्या केली.

शेवटी भगवान ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न होऊन तेथे आले आणि म्हणाले, "हे भाग्यवान दैत्यांनो, उठा, ध्यान सोडा, तुमच्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. म्हणून तुम्ही इष्ट वर मागा. तुमची अद्‌भुत तपश्चर्या पाहून मी आलो आहे."

हे विधात्याचे भाषण ऐकताच दोघेही भाऊ भानावर आले. प्रदक्षिणापूर्वक ब्रह्मदेवाला प्रणिपात करून ते कृश झालेले भ्राते म्हणाले, "हे दयासागरा, आपण खरेच संतुष्ट झाला असाल तर आम्हाला अमरत्व द्या. मृत्यूसारखे भय नाही. म्हणून आम्ही तुला शरण आलो आहोत. तेव्हा हे सुरेश्वरा, आमचे रक्षण कर व आमचे मरणाचे भय नाहीसे कर." ब्रह्मदेव म्हणाले, "हे मागणे विपरीत आहे. जन्मास आलेल्यास मृत्यु ठरलेलाच आहे. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जन्म प्राप्त होतोच. ही पूर्वपरंपरा विधात्यानेच ठरवून दिलेली आहे. म्हणून तुमची दुसरी इच्छा सांगा, मी पूर्ण करीन."

हे देवाचे भाषण ऐकून पूर्ण विचार करून ते दानव ब्रह्मदेवाला प्रणाम करून म्हणाले, "हे कृपानिधी, मानव, मृग, पक्षी, देव वगैरे योनीतील पुरुषांपासून आम्हाला मृत्यू न येईल एवढा वर द्या. हे देवा, स्त्रियांची आम्हाला भीती नाही. हे ब्रह्मदेवा, आम्ही अवध्य व्हावे."

ते ऐकून ब्रह्मदेवाने इच्छित वर दिला. तो स्वस्थानी परत गेला. दानवही स्वगृही जाऊन भृगू ऋषींना पुरोहित करून त्यांचे त्यांनी पूजन केले. एक शुभ नक्षत्रावर एक सुवर्णमय, दिव्य, शुभ सिंहासन तयार करून राजासनाकरता दिले. ज्येष्ठ भाऊ शुंभ सुमुहूर्तावर राज्यावर बसला. निशुंभ त्याची सेवा करू लागला. तेव्हा त्याच वेळी उन्मत्त झालेले दानवभ्राते चंड व मुंड हे सैन्य, रथ गज यांसह तेथे प्राप्त झाले. शरीराने धूम्रवर्णाचा असलेला धूम्रलोचनही तेथे आला. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या वराने गर्विष्ठ झालेला रक्तबीजही दोन अक्षौहिणी दानवसैन्य बरोबर घेऊन त्यांना येऊन मिळाला.

हे राजा, रक्तबीजाचे पूर्वचरित्र श्रवण कर. एकदा संग्रामामध्ये युद्ध चालू असता शस्त्रप्रहाराने त्याच्या देहातून भूमीवर रक्त वाहू लागले. त्यातून त्याच्यासारखे तूर शस्त्रनिपुण असंख्य पुरुष उत्पन्न होत असत. तेही उत्तम युद्ध करीत. त्यामुळे तो महावीर दैत्य सर्वांना अवध्य झाला.

अशाप्रकारचे अनेक दानववीर आपले सैन्य घेऊन शुंभ राजाचे सेवक झाले. त्यामुळे असंख्य सेनेसह त्यांनी सर्व पृथ्वीचे राज्य जिंकले.

नंतर निशुंभ शुंभाची आज्ञा घेऊन इंद्राचा पराभव करण्यासाठी सैन्य घेऊन गेला. तेथील सर्व ठिकाणी युद्धे करून जय संपादित करता झाला. पण इंद्राच्या वज्रप्रहाराने त्याच्या वक्षस्थलावर जखम होऊन निशुंभ भूमीवर पडला. तेव्हा त्याच्या सैन्याची दाणादाण झाली. ही वार्ता ऐकून शुंभ सैन्यासह तेथे आला. त्याने देवांना बाणांने जर्जर केले. इंद्रासह दिक्पालांचा त्याने पराभव केला व स्वसामर्थ्याने त्याने इंद्रपद जिंकले. सर्व त्रैलोक्य जिंकून त्याने यज्ञातील हविर्भागही घेतले. नंदनवनादि सर्व स्वर्ग त्यांनी जिंकून घेतला. कुबेर व यम यांची राज्ये जिंकली. सूर्य व चंद्र यांचे अधिकार तो चालवू लागला. अग्निचे कार्य स्वत: कडे घेऊन निशुंभास वायूचे कार्य दिले.

सर्व देव पराजित होऊन पर्वताच्या गुहांत रहाण्यास गेले. निराधार, निराश्रित देव रानावनातून हिंडू लागले. ते सुखासाठी प्रयत्‍न करू लागले. पण स्वस्थाने भ्रष्ट झाल्याने त्यांना कुठेही सुख लागेना. कारण सुख हे दैवाधीन असते.

यावरून महाभाग्यवान, बहुश्रुत, धनसंपन्न व बलाढ्य लोकांनाही कालगतीने दु:खदैन्य प्राप्त होते. राजाला भिकारी करणे ही कालाची घटना आहे. दात्याला याचक, बलवानाला निर्बल, पंडिताला मूर्ख, शूराला अत्यंत भीरू कालच बनवीत असतो.

कालाच्या योगाने पुरुष धर्मनिष्ठ व ज्ञानी होत असून कालाच्याच योगाने तो अत्यंत पापी व अज्ञानी होतो. ब्रह्मा, विष्णु, महेश यांनाही दु:स्थिती प्राप्त होते. त्या कालाचा विस्मय वाटण्याचे कारण नाही. कालाच्याच योगाने विष्णु सूकरादि योनीमध्ये जन्म घेतो. शिवही कालयोगानेच कापालीक झालेला आहे.


अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP