श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
तृतीयोऽध्यायः


भगवतीमाहाम्ये दैत्यसैन्याद्योगः

व्यास उवाच
एवं स महिषो नाम दानवो वरदर्पितः ।
प्राप्य राज्यं जगत्सर्वं वशे चक्रे महाबलः ॥ १ ॥
पृथिवीं पालयामास सागरान्तां भुजार्जिताम् ।
एकच्छत्रां निरातङ्कां वैरिवर्गविवर्जिताम् ॥ २ ॥
सेनानीश्चिक्षुरस्तस्य महावीर्यो मदोत्कटः ।
धनाध्यक्षस्तथा ताम्रः सेनायुतसमावृतः ॥ ३ ॥
असिलोमा तथोदर्को बिडालाख्यश्च बाष्कलः ।
त्रिनेत्रोऽथ तथा कालबन्धको बलदर्पितः ॥ ४ ॥
एते सैन्ययुताः सर्वे दानवा मेदिनीं तदा ।
आवृत्य संस्थिताः काममृद्धां सागरमेखलाम् ॥ ५ ॥
करदाश्च कृताः सर्वे भूमिपालाः पुरातनाः ।
निहता ये बलोदग्राः क्षात्रधर्मव्यवस्थिताः ॥ ६ ॥
ब्राह्मणा वशगा जाता यज्ञभागसमर्पकाः ।
महिषस्य महाराज निखिले क्षितिमण्डले ॥ ७ ॥
एकातपत्रं तद्‌राज्यं कृत्वा स महिषासुरः ।
स्वर्गं जेतुं मनश्चक्रे वरदानेन गर्वितः ॥ ८ ॥
प्रणिधिं प्रेषयामास हयारिस्तु शचीपतिम् ।
स सन्देशहरं शीघ्रमाहूयोवाच दैत्यराट् ॥ ९ ॥
गच्छ वीर महाबाहो दूतत्वं कुरु मेऽनघ ।
ब्रूहि शक्रं दिवं गत्वा निःशङ्कः सुरसन्निधौ ॥ १० ॥
मुञ्च स्वर्गं सहस्राक्ष यथेष्टं गच्छ मा चिरम् ।
सेवां वा कुरु देवेश महिषस्य महात्मनः ॥ ११ ॥
स त्वां संरक्षयेन्नूनं राजा शरणमागतम् ।
तस्मात्त्वं शरणं याहि महिषस्य शचीपते ॥ १२ ॥
नोचेद्वज्रं गहाणाशु युद्धाय बलसूदन ।
पूर्वैर्जितोऽसि चास्माकं जानामि तव पौरुषम् ॥ १३ ॥
अहल्याजार विज्ञातं बलं ते सुरसङ्घप ।
युध्यस्व व्रज वा कामं यत्र ते रमते मनः ॥ १४ ॥
व्यास उवाच
तच्छुत्वा वचनं तस्य शक्रः क्रोधसमन्वितः ।
उवाच तं नृपश्रेष्ठ स्मितपूर्वं वचस्तदा ॥ १५ ॥
न जानेऽहं सुमन्दात्मन् यतस्त्वं मददर्पितः ।
चिकित्सां संकरिष्यामि रोगस्यास्य प्रभोस्तव ॥ १६ ॥
अतः परं करिष्यामि मूलस्यास्य निमूलनम् ।
गच्छ दूत तथा ब्रूहि तस्याग्रे मम भाषितम् ॥ १७ ॥
शिष्टैर्दूता न हन्तव्यास्तस्मात्त्वां विसृजाम्यहम् ।
युद्धेच्छा चेत्समागच्छ त्वरितो महिषीसुत ॥ १८ ॥
हयारे त्वद्‌बलं ज्ञातं तृणादस्त्वं जडाकृतिः ।
शृङ्गयोस्ते करिष्यामि सुदृढं च शरासनम् ॥ १९ ॥
दर्पः शृङ्गबलात्तेऽस्ति विदितं कारणं मया ।
विषाणे ते परिच्छिद्य संहरिष्यामि तद्‌ बलम् ॥ २० ॥
यद्‌ बलेनातिपूर्णस्त्वं जातोऽसि बलदर्पितः ।
कुशलस्त्वं तदाघाते न युद्धे महिषाधम ॥ २१ ॥
व्यास उवाच
इत्युक्तोऽसौ सुरेन्द्रेण स दूतस्त्वरितो गतः ।
जगाम महिषं मत्तं प्रणम्य प्रत्युवाच ह ॥ २२ ॥
दूत उवाच
राजन्देवाधिपः कामं न त्वां विगणयत्यसौ ।
मन्यते स्वबलं पूर्णं देवसैन्यसमावृतः ॥ २३ ॥
यदुक्तं तेन मूर्खेण कथमन्यद्‌ ब्रवीम्यहम् ।
प्रियं सत्यं च वक्तव्यं भृत्येन पुरतः प्रभोः ॥ २४ ॥
प्रियं सत्यं च वक्तव्यं प्रभोरग्रे शुभेच्छुना ।
इति नीतिर्महाराज जागर्ति शुभकारिणी ॥ २५ ॥
केवलं चेत्प्रियं ब्रूयान्न ते कार्यं भविष्यति ।
परुषं च न वक्तव्यं कदाचिच्छुभमिच्छता ॥ २६
यथा रिपुमुखाद्वाचः प्रसरन्ति विषोपमाः ।
तथा भृत्यमुखान्नाथ निःसरन्ति कथं गिरः ॥ २७ ॥
यादृशानीह वाक्यानि तेनोक्तानि महीपते ।
तादृशानि न मे जिह्वा वक्तुमर्हति कर्हिचित् ॥ २८ ॥
व्यास उवाच
तच्छ्रुत्वा वचनं तस्य हेतुगर्भं तृणाशनः ।
भृशं कोपपरीतात्मा बभूव महिषासुरः ॥ २९ ॥
समाहूयाब्रवीद्दैत्यान्क्रोधसंरक्तलोचनः ।
लाङ्गूलं पृष्ठदेशे च कृत्वा मूत्रं परित्यजन् ॥ ३० ॥
भो भो दैत्याः सुरेन्द्रोऽसौ युद्धकामोऽस्ति सर्वथा ।
बलोद्योगं कुरुध्वं वै जेतव्योऽसौ सुराधमः ॥ ३१ ॥
मदग्रे को भवेच्छूरः कोटिशश्चेत्तथाविधाः ।
न बिभेम्येकतः कामं हनिष्याम्यद्य सर्वथा ॥ ३२ ॥
शरः शान्तेष्वसौ नूनं तपस्विषु बलाधिकः ।
बलकर्ता हि कुहको लम्पटः परदारहृत् ॥ ३३ ॥
अप्सरोबलसम्मत्तस्तपोविघ्नकरः खलः ।
छिद्रप्रहरणः पापो नित्यं विश्वासघातकः ॥ ३४ ॥
नमुचिर्निहतो येन कृत्वा सन्धिं दुरात्मना ।
शपथान्विविधानादौ कृत्वा भीतेन छद्मना ॥ ३५ ॥
विष्णुस्तु कपटाचार्यः कुहकः शपथाकरः ।
नानारूपधरः कामं बलकृद्दम्भपण्डितः ॥ ३६ ॥
कृत्वा कोलाकृतिं येन हिरण्याक्षो निपातितः ।
हिरण्यकशिपुर्येन नृसिंहेन च घातितः ॥ ३७ ॥
नाहं तद्वशगो नूनं भवेयं दनुनन्दनाः ।
विश्वासं नैव गच्छामि देवानां कुत्र कर्हिचित् ॥ ३८ ॥
किं करिष्यति मे विष्णुरिन्द्रो वा बलवत्तरः ।
रुद्रो वापि न मे शक्तः प्रतिकर्तुं रणाङ्गणे ॥ ३९ ॥
त्रिविष्टपं ग्रहीष्यामि जित्वेन्द्रं वरुणं यमम् ।
धनदं पावकं चैव चन्द्रसूर्यौ विजित्य च ॥ ४० ॥
यज्ञभागभुजः सर्वे भविष्यामोऽद्य सोमपाः ।
जित्वा देवसमूहञ्च विहरिष्यामि दानवैः ॥ ४१ ॥
न मे भयं सुरेभ्यश्च वरदानेन दानवाः ।
मरणं न नरेभ्यश्च नारी किं मे करिष्यति ॥ ४२ ॥
पातालपर्वतेभ्यश्च समाहूय वरान्वरान् ।
दानवान्मम सैन्येशान्कुर्वन्तु त्वरिताश्चराः ॥ ४३ ॥
एकोऽहं सर्वदेवेशान्विजेतुं दानवाः क्षमः ।
शोभार्थं वः समाहूय नयामि सुरसङ्गमे ॥ ४४ ॥
शृङ्गाभ्यां च खुराभ्यां च हनिष्येऽहं सुरान्किल ।
न मे भयं सुरेभ्यश्च वरदानप्रभावतः ॥ ४५ ॥
अवध्योऽहं सुरगणैरसुरैर्मानवैस्तथा ।
तस्मात्सज्जा भवन्त्वद्य देवलोकजयाय वै ॥ ४६ ॥
जित्वा सुरालयं दैत्या विहरिष्यामि नन्दने ।
मन्दारकुसुमापीडा देवयोषित्समन्विताः ॥ ४७ ॥
कामधेनुपयोत्सिक्ताः सुधापानप्रमोदिताः ।
देवगन्धर्वगीतादिनृत्यलास्यसमन्विताः ॥ ४८ ॥
उर्वशी मेनका रम्भा घृताची च तिलोत्तमा ।
प्रमद्वरा महासेना मिश्रकेशी मदोत्कटा ॥ ४९ ॥
विप्रचित्तिप्रभृतयो नृत्यगीतविशारदाः ।
रञ्जयिष्यन्ति वः सर्वान्नानासवनिषेवणैः ॥ ५० ॥
सर्वे सज्जा भवन्त्वद्य रोचतां गमनं दिवि ।
संग्रामार्थं सुरैः सार्धं कृत्वा मङ्गलमुत्तमम् ॥ ५१ ॥
रक्षणार्थं च सर्वेषां भार्गवं मुनिसत्तमम् ।
समाहूय च संपूज्य स्थाप्य यज्ञे गुरुं परम् ॥ ५२ ॥
व्यास उवाच
इति सन्दिश्य दैत्येन्द्रान्महिषः पापधीस्तदा ।
जगाम त्वरितो राजन्भवनं स्वं मुदान्वितः ॥ ५३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
पञ्चमस्कन्धे भगवतीमाहाम्ये दैत्यसैन्योद्योगो नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥


इंद्रास युद्धाचे आव्हान -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अशा तर्‍हेने तो अति बलाढ्य महिषासूर वरप्राप्तीमुळे गर्विष्ठ झाला. राज्याभिषेकानंतर त्याने सर्व जग जिंकून घेतले. सर्व पृथ्वीचे तो पालन करीत असल्याने त्याच्या शत्रूंचा पृथ्वीवर अभाव होता. ताम्र नावाचा दैत्य त्याचा खजिनदार होता. चिक्षुर नावाच्या मदमत्त महाबली अशा सेनापतीजवळ दहा हजार सेना सज्ज होती. असिलोमा, उदक, बिडाल, बाष्कल, त्रिनेत्र व शक्तिसामर्थ्यामुळे गर्व झालेला कालबंधक हे सर्व महिषासुराचे आणखी सेनापती होते. हे सर्व दानव सेनापती समुद्राने वेढलेली पृथ्वी व्यापून स्वेच्छेने राहिले होते. पूर्वीच्या सर्व राजांना त्यांनी कारभार देणारे मांडलीक बनविले होते. जे क्षात्रधर्माचा अवलंब करून रहात होते त्यांचा या दानवश्रेष्ठांनी वध केला होता, संपूर्ण पृथ्वीवरील ब्राह्मणही महिषासुराच्या आधीन झाल्याने त्यालाच यज्ञभाग समर्पण करीत होते. अशा तर्‍हेने एकछत्री राज्य निर्माण झाल्यावर गर्वोन्मत्त होऊन महिषासूराने स्वर्गही जिंकण्याचे ठरवले. एका दूताला त्वरित इंद्राकडे पाठविण्याचा विचार करून तो त्या दूताला म्हणाला, "हे पराक्रमी वीरा, स्वर्गामध्ये जाऊन निःशंकपणे इंद्राला सांग, ' हे सहस्राक्षा, विलंब न करता स्वर्ग सोडून तू कोठेही चालता हो. हे देवांच्या राजा, तू महात्म्या महिषासुराची सेवा कर. हे इंद्रा, तू महिषासुराला शरण गेलास तर तुझे रक्षण होईल नाही तर तू युद्धाकरता सज्ज हो. पूर्वी आम्ही तुझा पराजय केला होता. तू अहिल्येशी जारकर्म करणारा आहेस. तुझे सामर्थ्य आम्हाला कळून आले आहे. हे सुरराज, युद्धास सज्ज हो अथवा कोठेही निघून जा."

अशाप्रकारचा महिषासुराच्या दूताचा निरोप ऐकून देवेंद्राला क्रोध आला. तो उपहासाने त्या दूताला म्हणाला, "अरे मूर्खा, तू माजला आहेस हे यावरून समजले. तुझ्या दैत्यराजाला अहंकाराचा रोग झाला आहे. लवकरच त्यावर मी इलाज करीन व त्या रोगाला समूळ उपटून टाकीन. हे दैत्यदूता, शिष्टाईस असलेल्यांचा वध करू नये म्हणून तुला जिवदान देतो. तू तुझ्या राजाला सांग, इच्छा असेल तर सत्वर युद्धास तयार हो. हे महिषपुत्रा, तू तृणावर जगणारा आहेस. तुझे सामर्थ्य कळले आहे. तू जड शरीराचा आहेस. लवकरच तुझ्या शिंगाचे मी बळकट धनुष्य बनवीन. तुझ्या गर्वाचे कारण मी जाणतो. शिंगांच्या सामर्थ्यामुळे तुला गर्व चढला आहे. म्हणून तुझी शिंगेच मी मोडून टाकणार आहे. तू बलशाली शिंगांचा प्रहार करण्यास कुशल असलास तरी युद्धकला तुला अवगत नाही हे मी जाणून आहे."

याप्रमाणे देवेंद्राने दूताबरोबर पाठवलेला निरोप घेऊन दूत महिषासुरापुढे उभा राहिला व प्रणाम करून म्हणाला, "हे महाराजा, देवेंद्र आपणाला अजिबात जुमानीत नाही. सर्व देवसैन्याचा बलावर तो म्हणतो, मला स्वतःचे सामर्थ्य माहीत आहे. त्या मूर्ख देवराजाचा जसाच्या तसा निरोप सांगणेच योग्य ठरेल. कारण स्वामीपुढे सेवकाने प्रिय भाषण केले पाहिजे हे खरे असले तरी सत्य सांगितलेच पाहिजे. कल्याणेच्छू सेवकाने सत्य व हितकारक सांगावे अशी नीती आहे. मी फक्त प्रिय भाषणच केले तर तुझे कार्य होणार नाही, पण शुभ चिंतणार्‍या सेवकाने कठोर बोलावे. तेव्हा हे महाराज, आपला शत्रु जो इंद्र त्याने उच्चारलेले विषतुल्य शब्द माझ्या मुखातून निघणार नाहीत. त्याने ज्या प्रकारचे शब्द उच्चारले ते मी कसे बोलू ?" दूताचे हे हेतूगर्भ भाषण ऐकल्यावर महिषासुर अतिशय क्रुध्द झाला. त्याचे डोळे लाल झाले. त्याने दैत्यांना आवाहन केले. पाठीवर शेपूट टाकून तो थोडा थोडा मूत्रस्त्राव करीत म्हणाला, "हे दैत्यांनो, देवेंद्र युद्धाचीच इच्छा करीत आहे. म्हणून तुम्ही सर्व सैन्य सज्ज करा. या अधमाला जिंकले पाहिजे. मित्रांनो, युद्धात माझ्यासमोर कोणता वीर उभा राहिल ? इंद्रासारखे कोट्यावधी वीरांनाही मी भीत नाही. मी एकटाच त्या इंद्राचा निश्चितपणे वध करीन. हा केवळ दुर्बल व शांत मनुष्यालाच आपले बळ दाखवीत असतो. तो केवळ गरिबांचे ठिकाणी बलाढ्य आहे. तो विषयलंपट, कपटी, परस्त्री हरण करणारा आहे. त्याच्याजवळ अप्सरांचे बल असल्याने तो कुणाच्याही तपश्चर्येला विघ्न उत्पन्न करीत असतो. तो पापी आहे. वैगुण्यावर प्रहार करणारा आहे. तो विश्वासघातकी आहे.

ह्या दुष्टबुद्धीने इंद्राने पूर्वी भीतीमुळे प्रथम अनेक प्रकारच्या शपथा वाहिल्या आणि कपटाने नमुचीचा वध केला. शिवाय त्याला सहाय्य देणारा विष्णु तर कपटाचार्यच आहे. मायावी, खोट्या शपथा वाहणारा, वेगवेगळी रूपे धारण करणारा, अकारण आपले सामर्थ्य दाखविणारा तो असून दंभाविषयी पंडित आहे. त्यानेच वराहरूप धारण करून हिरण्याक्षाचा व नृसिंहरूपाने हिरण्यकशिपूचा नि:पात केला. पण आता हे दानवांनो, मी त्याचेपुढे कधीही नमणार नाही. ह्मा देवांवर कधीही कोठेही मी विश्वास ठेवणार नाही. विष्णु महापराक्रमी असला तरी मला कशाची भीती ? समरांगणी माझा पराभव करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष रुद्रातही नाही. तेव्हा ह्मा सर्वांना जिंकून मी स्वर्ग जिंकून घेणार. आपणही यज्ञभाग स्वीकारून सोमरस प्राशन करून नंदनवनात क्रीडा करू.

हे दैत्यांनो, तुम्ही जाणताच की वरप्राप्तीमुळे मला देव, मानव यांच्यापासून मृत्यू नाही. परंतु स्त्रीपासून आहे. बिचारी अबला काय करणार ? तेव्हा आता वेळ न घालवता सर्वत्र गुप्तहेर पाठवून सर्व दैत्यराजांना आवाहने करा. त्यांना माझ्या सैन्याचे नायक करा. वास्तविक मी एकटाच सर्व देवांना जिंकण्यास समर्थ आहे. परंतु केवळ देखावा म्हणून तुम्हाला देवांबरोबर युद्धासाठी मी हाकारत आहे. माझी शिंगे व खूर यांच्या सामर्थ्यावर मी देवांचा नाश करीन. वरप्राप्तीमुळे मला देवापासून बिलकूल भीती नाही. देवगण, असुर व मानव यांना मी अवध्य आहे. म्हणून स्वर्ग जिंकण्यासाठी सर्व दानवांनी सज्ज व्हावे.

हे दानवांनी, मी एकटाच सर्वांना जिंकेन. लवकरच उर्वशी, मेनका, रंभा, घृताची, तिलोत्तमा, प्रमद्वरा, महासेना, मदमत्त मिश्रकेशी, विप्रचिती वगैरे नृत्यगायनात निपुण, कामधेनूच्या दुधामुळे गर्विष्ठ, अमृतपानाने आनंदित अन् मंदारपुष्पांच्या माळा घातलेल्या अशा सर्व अप्सरा तुमचे चित्तरंजन करतील. तुम्ही सर्व तयार राहा. सर्वांच्या रक्षणासाठी मुनिश्रेष्ठ भार्गवाला आवाहन करा. रणयज्ञात परमगुरूच्या ठिकाणी त्यांची स्थापना करा आणि देवांशी युद्ध करण्यासाठी आजच स्वर्गाकडे जाण्याची तयारी करा. अशा प्रकारे सर्व दानवराजांना आज्ञा करून तो दुष्टबुद्धी महिषासुर आनंदाने आपल्या घरी गेला.


अध्याय तिसरा समाप्त

GO TOP