श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
षोडशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


युधाजिद्‌भारद्वाजयोः संवादवर्णनम्

व्यास उवाच
युधाजित्त्वथ सङ्ग्रामाद्‌गत्वाऽयोध्यां महाबलः ।
मनोरमां च पप्रच्छ सुदर्शनजिघांसया ॥ १ ॥
सेवकान् प्रेषयामास क्व गतेति मुहुर्वदन् ।
शुभे दिनेऽथ दौहित्रं स्थापयामास चासने ॥ २ ॥
मन्त्रिभिश्‍च वसिष्ठेन मन्त्रैराथर्वणैः शुभैः ।
अभिषिक्तश्‍च सम्पूर्णैः कलशैर्जलपूरितैः ॥ ३ ॥
भेरीशङ्खनिनादैश्‍च तूर्याणां चाथ निःस्वनैः ।
उत्सवस्तु नगर्या वै सम्बभूव कुरूद्वह ॥ ४ ॥
विप्राणां वेदपाठैश्‍च बन्दिनां स्तुतिभिस्तथा ।
अयोध्या मुदितेवासीज्जयशब्दैः सुमङ्गलैः ॥ ५ ॥
हृष्टपुष्टजनाकीर्णा स्तुतिवादित्रनिःस्वना ।
नवे तस्मिन्महीपाले पूर्बभौ नूतनेव सा ॥ ६ ॥
केचित्साधुजना ये वै चक्रुः शोकं गृहे स्थिताः ।
सुदर्शनं विचिन्त्याद्य क्व गतोऽसौ नृपात्मजः ॥ ७ ॥
मनोरमातिसाध्वी सा क्व गता सुतसंयुता ।
पिताऽस्या निहतः संख्ये राज्यलोभेन वैरिणा ॥ ८ ॥
इत्येवं चिन्त्यमानास्ते साधवः समबुद्धयः ।
अतिष्ठन्दुःखितास्तत्र शत्रुजिद्वशवर्तिनः ॥ ९ ॥
युधाजिदपि दौहित्रं स्थापयित्वा विधानतः ।
राज्यञ्च मन्त्रिसात्कृत्वा चलितः स्वां पुरीं प्रति ॥ १० ॥
श्रुत्वा सुदर्शनं तत्र मुनीनामाश्रमे स्थितम् ।
हन्तुकामो जगामाशु चित्रकूटं स पर्वतम् ॥ ११ ॥
निषादाधिपतिं शूरं पुरस्कृत्य बलाभिधम् ।
दुर्दर्शाख्यमगादाशु शृङ्गवेरपुराधिपम् ॥ १२ ॥
श्रुत्वा मनोरमा तत्र बभूवातिसुदुःखिता ।
आगच्छन्तं बालपुत्रा भयार्ता सैन्यसंयुतम् ॥ १३ ॥
तमुवाचातिशोकार्ता मुनिं साश्रुविलोचना ।
किं करोमि क्व गच्छामि युधाजित्समुपस्थितः ॥ १४ ॥
पिता मे निहतोऽनेन दौहित्रो भूपतिः कृतः ।
सुतं मे हन्तुकामोऽत्र समायाति बलान्वितः ॥ १५ ॥
पुरा श्रुतं मया स्वामिन्पाण्डवा वै वने स्थिताः ।
मुनीनामाश्रमे पुण्ये पाञ्चाल्या सहितास्तदा ॥ १६ ॥
गतास्ते मृगयां पार्था भ्रातरः पञ्च एव ते ।
द्रौपदी संस्थिता तत्र मुनीनामाश्रमे शुभे ॥ १७ ॥
धौ‍म्योऽत्रिर्गालवः पैलो जावालिर्गौतमो भृगुः ।
च्यवनश्‍चात्रिगोत्रश्‍च कण्वश्‍चैव जतुः क्रतुः ॥ १८ ॥
वीतिहोत्रः सुमन्तुश्‍च यज्ञदत्तोऽथ वत्सलः ।
राशासनः कहोडश्‍च यवक्रीर्यज्ञकृत्क्रतुः ॥ १९ ॥
एते चान्ये च मुनयो भारद्वाजादयः शुभाः ।
वेदपाठयुताः सर्वे संस्थिताश्‍चाश्रमे स्थिताः ॥ २० ॥
दासीभिः सहिता तत्र याज्ञसेनी स्थिता मुने ।
आश्रमे चारुसर्वाङ्‌गी निर्भया मुनिसंवृते ॥ २१ ॥
पार्था मृगानुगास्तावत्प्रयाताश्‍च वनाद्वनम् ।
धनुर्बाणधरा वीराः पञ्च वै शत्रुतापनाः ॥ २२ ॥
तावत्सिन्धुपतिः श्रीमान्मार्गस्थो बलसंयुतः ।
आगतश्‍चाश्रमाभ्याशे श्रुत्वा तु निगमन्ध्वनिम् ॥ २३ ॥
श्रुत्वा वेदध्वनिं राजा मुनीनां भावितात्मनाम् ।
उत्ततार रथात्तूर्णं दर्शनाकाङ्क्षया नृपः ॥ २४ ॥
यदा निरगमत्तत्र भृत्यद्वयसमन्वितः ।
वेदपाठयुतान्वीक्ष्य मुनीनुद्यमसंस्थितः ॥ २५ ॥
कृताञ्जलिपुटः स्वामिन्संस्थितोऽथ जयद्रथः ।
आश्रमे मुनिभिर्जुष्टे भूपतिः संविवेश ह ॥ २६ ॥
तत्रोपविष्टं राजानं द्रष्टुकामाः स्त्रियस्तदा ।
आययुर्मुनिभार्याश्‍च कोऽयमित्यब्रुवन्नृपम् ॥ २७ ॥
तासां मध्ये वरारोहा याज्ञसेनी समागता ।
जयद्रथेन दृष्टा सा रूपेण श्रीरिवापरा ॥ २८ ॥
तां विलोक्यासितापाङ्गीं देवकन्यामिवापराम् ।
पप्रच्छ नृपतिर्धौम्यं केयं श्यामा वरानना ॥ २९ ॥
भार्या कस्य सुता कस्य नाम्ना का वरवर्णिनी ।
रूपलावण्यसंयुक्ता शचीव वसुधाङ्गता ॥ ३० ॥
बर्बूलवनमध्यस्था लवङ्गलतिका यथा ।
राक्षसीवृन्दगा नूनं रम्भेवाभाति भामिनी ॥ ३१ ॥
सत्यं वद महाभाग कस्येयं वल्लभाबला ।
राजपत्‍नीव चाभाति नैषा मुनिवधूर्द्विज ॥ ३२ ॥
धौ‍म्य उवाच
पाण्डवानां प्रिया भार्या द्रौपदी शुभलक्षणा ।
पाञ्चाली सिन्धुराजेन्द्र वसत्यत्र वराश्रमे ॥ ३३ ॥
जयद्रथ उवाच
क्व गताः पाण्डवाः पञ्च शूराः सम्प्रति विश्रुताः ।
वसन्त्यत्र वने वीरा वीतशोका महाबलाः ॥ ३४ ॥
धौ‍म्य उवाच
मृगयार्थं गताः पञ्च पाण्डवा रथसंस्थिताः ।
आगमिष्यन्ति मध्यान्हे मृगानादाय पार्थिवाः ॥ ३५ ॥
तच्छ्रुत्वा वचनं तस्य उदतिष्ठदसौ नृपः ।
द्रौपदीसन्निधौ गत्वा प्रगम्येदमुवाच ह ॥ ३६ ॥
कुशलं ते वरारोहे क्व गताः पतयश्‍च ते ।
एकादश गतान्यद्य वर्षाणि च वने किल ॥ ३७ ॥
द्रौपदी तु तदोवाच स्वस्ति तेऽस्तु नृपात्मज ।
विश्रमस्वाश्रमाभ्याशे क्षणादायान्ति पाण्डवाः ॥ ३८ ॥
एवं ब्रुवन्त्यां तस्यां तु लोभाविष्टः स भूपतिः ।
जहार द्रौपदीं वीरोऽनादृत्य मुनिसत्तमान् ॥ ३९ ॥
कस्यचिन्नैव विश्वासः कर्तव्यः सर्वथा बुधैः ।
कुर्वन्दुःखमवाप्नोति दृष्टान्तस्त्वत्र वै बलिः ॥ ४० ॥
वैरोचनसुतः श्रीमान्धर्मिष्ठः सत्यसङ्गरः ।
यज्ञकर्ता च दाता च शरण्यः साधुसंमतः ॥ ४१ ॥
नाधर्मे निरतः क्वापि प्रल्हादस्य च पौत्रकः ।
एकोनशतयज्ञान्वै स चकार सदक्षिणान् ॥ ४२ ॥
सत्त्वमूर्त्तिः सदा विष्णुः सेव्यः स योगिनामपि ।
निर्विकारोऽपि भगवान्देवकार्यार्थसिद्धये ॥ ४३ ॥
कश्यपाच्च समुद्‌भूतो विष्णुः कपटवामनः ।
राज्यं छलेन हृतवान्महीं चैव ससागराम् ॥ ४४ ॥
सोऽभवत्सत्यवाग्‌राजा बलिर्वैरोचनिस्तदा ।
कपटं कृतवान्विष्णुरिन्द्रार्थे तु मया श्रुतम् ॥ ४५ ॥
अन्यः किं न करोत्येवं कृतं वै सत्त्वमूर्तिना ।
वामनं रूपमास्थाय यज्ञपातं चिकीर्षता ॥ ४६ ॥
न च विश्‍वसितव्यं वै कदाचित्केनचित्तथा ।
लोभश्‍चेतसि चेत्स्वामिन्कीदृक्पापकृतं भयम् ॥ ४७ ॥
लोभाहताः प्रकुर्वन्ति पापानि प्राणिनः किल ।
परलोकाद्‌भयं नास्ति कस्यचित्कर्हिचिन्मुने ॥ ४८ ॥
मनसा कर्मणा वाचा परस्वादानहेतुतः ।
प्रपतन्ति नराः सम्यग्लोभोपहतचेतसः ॥ ४९ ॥
देवानाराध्य सततं वाञ्छन्ति च धनं नराः ।
न देवास्तत्करे कृत्वा समर्था दातुमञ्जसा ॥ ५० ॥
अन्यस्यानीयते वित्तं प्रयच्छन्ति मनीषितम् ।
वाणिज्येनाथ दानेन चौर्येणापि बलेन वा ॥ ५१ ॥
विक्रयार्थं गृहीत्वा च धान्यवस्त्रादिकं बहु ।
देवानर्चयते वैश्यो महर्द्धिर्मे भवेदिति ॥ ५२ ॥
नात्र किं परवित्तेच्छा वाणिज्येन परन्तप ।
ग्रहणकाले तु सम्प्राप्ते महर्घञ्चापि काङ्क्षति ॥ ५३ ॥
एवं हि प्राणिनः सर्वे परस्वादानतत्पराः ।
वर्तन्ते सततं ब्रह्मन् विश्‍वासः कीदृशः पुनः ॥ ५४ ॥
वृथा तीर्थं वृथा दानं वृथाऽध्ययनमेव च ।
लोभमोहावृतानां वै कृतं तदकृतं भवेत् ॥ ५५ ॥
तस्मादेनं महाभाग विसर्जय गृहं प्रति ।
सपुत्राऽहं वसिष्यामि जानकीवद्‌द्विजोत्तम ॥ ५६ ॥
इत्युक्तोऽसौ मुनिस्तावद्‌गत्वा युधाजितं नृपम् ।
उवाच वचनं राज्ञे भारद्वाजः प्रतापवान् ॥ ५७ ॥
गच्छ राजन् यथाकामं स्वपुरं नृपसत्तम ।
नेयं मनोरमाभ्येति बालपुत्रा सुदुःखिता ॥ ५८ ॥
युधाजिदुवाच
मुने मुञ्च हठं सौ‌म्य विसर्जय मनोरमाम् ।
न च यास्याम्यहं मुक्त्वा नेष्याम्यद्य बलात्पुनः ॥ ५९ ॥
ऋषिरुवाच
नयस्व यदि शक्तिस्ते बलेनाद्य ममाश्रमात् ।
विश्‍वामित्रो यथा धेनुं वसिष्ठस्य मुनेः पुरा ॥ ६० ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां तृतीयस्कन्धे
युधाजिद्‌भारद्वाजयोः संवादवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥


युधाजित भरद्वाजमुनींच्या आश्रमात येतो

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास म्हणाले, "इकडे वीरसेनाचा वध झाल्यानंतर महाबलाढ्य युधाजित समरांगणातून अयोध्येमध्ये गेला आणि सुदर्शनाचा वध करण्याच्या उद्देशाने मनोरमेची चौकशी करू लागला. "ती कोठे गेली ?" असे वारंवार विचारीत विचारीत त्याने तिच्या शोधाकरिता दूत बाहेर पाठविले. त्याने शुभ दिवशी आपल्या नातवाला सिंहासनावर बसविले. मंत्री व वसिष्ठ मुनी ह्यांनी आथर्वणवेदोक्त शुभ मंत्र म्हणून जलपूरित संपूर्ण कलशांनी, त्याला अभिषेक केला. नौबती, शंख आणि तूर्य वाद्ये वाजू लागली.

हे कुरुवंशश्रेष्ठ जनमेजया, अशा रीतीने त्या नगरीमध्ये राज्यारोहणाचा उत्सव सुरू झाला. विप्रांचे वेदपाठ, बंदिजनांच्या स्तुती व मंगलकारक विजयध्वनि ह्यांच्या योगाने अयोध्यानगरी आनंदीत झाली. धष्ट व पुष्ट जनांनी व्याप्त झालेल्या त्या नगरीमध्ये जिकडे तिकडे स्तुती व वाद्ये ह्यांचा घोष सुरू झाला. इतकेच नव्हे तर तो नूतन भूपाल सिंहासनारूढ झाला असता, ती नगरीही जशी काही नूतनच भासू लागली.

राजधानीमध्ये जे काही साधुजन होते, ते मात्र घरातच राहिले आणि सुदर्शना संबंधाने चिंतन करून शोक करू लागले.

"आज हा राजपुत्र कोठे गेला आहे ? ती महासाध्वी मनोरमा पुत्रासह कोठे बरे गेली ? राज्याचा लोभ धरून वैर्‍याने संग्रामामध्ये हिच्या पित्याचाही वध केला." ह्याप्रमाणे सर्वत्र समदृष्टी ठेवणारे ते साधुजन चिंतन करू लागले. शत्रुजिताच्या आधीन झाल्यामुळे ते तेथे दुःखाने राहू लागले.

नातवाला यथाविधी गादीवर बसविल्यानंतर युधाजितही मंत्र्याच्या स्वाधीन राज्य करून स्वतःच्या राजधानीकडे निघून गेला.

इकडे मुनींच्या आश्रमामध्ये सुदर्शन राहिला आहे, अशी बातमी लागताक्षणीच तो युधाजित त्याचा वध करण्याच्या उद्देशाने चित्रकूटपर्वताकडे जाण्यास निघाला. एका बल नावाच्या शूर निषादराजाला पुढे रवाना करून, तो सत्वर शृंगवेरपुराधिपतीकडे गेला.

इकडे सैन्यासह युधाजित येत आहे अशी मनोरमेला बातमी लागली. बालपुत्राने युक्त असलेली ती मनोरमा भयभीत होऊन अतिशय दुःखित झाली. नंतर शोकाने अतिशय व्याकूल झालेली ती मनोरमा नेत्रात अश्रू आणून त्या मुनींना म्हणाली, "युधाजित येत आहे. आता मी काय करू ? कोणीकडे जाऊ ? ह्याने माझ्या पित्याचा वध करून आपला नातू राजा केला आहे. आता माझ्या पुत्राचा वध करण्याकरिता सैन्यासह हा इकडे येत आहे. हे प्रभो, पूर्वी पांडव वनवासामध्ये असताना मुनींच्याच पुण्य आश्रमामध्ये द्रौपदीसह रहात होते. असे माझ्या ऐकण्यात आहे.

एकदा ते पाचही भ्राते पांडव मृगयेला गेले असता, द्रौपदी एकटीच मुनींच्या शुभ आश्रमामध्ये राहिली होती. धौम्य, अत्रि, गालव, जाबाली, गौतम, भृगू, च्यवन, अत्रिगोत्र, कण्व, वीतिहोत्र, सुमंत, यज्ञदत्त, वत्सल, राशासन, कहोड, यवक्री, यज्ञकृत व ऋतु हे व इतरही वेदपठण करणारे भरद्वाजप्रभृति सर्व शुभ मुनी, त्यावेळी, त्या आश्रमामध्ये होते. हे मुने, याप्रमाणे मुनींना भरलेल्या त्या आश्रमामध्ये सर्व मनोहर अवयवांनी युक्त असलेली ती द्रौपदी दासीसह निर्भयपणे राहिली होती.

इकडे शत्रूंना ताप देणारे ते पाचही पांडव वीर धनुर्बाण धारण करून मृगांच्या मागोमाग हिंडता हिंडता एका वनातून दुसर्‍या वनात गेले. इकडे सैन्याने युक्त असलेला तो श्रीमान सिंधुराजही मार्गाने जाता जाता, त्या आश्रमाजवळ आला असता, वेदघोष त्याचे कानी पडताक्षणीच मुनींचे दर्शन घेण्याकरिता तो राजा रथातून सत्वर खाली उतरला. दोन सेवकांसह तो आश्रमात आला. वेदपठन करणार्‍या मुनींना अवलोकन करून तो उद्योगशील जयद्रथराजा हात जोडून उभा राहिला. नंतर तो नृप मुनींनी वास्तव्य केलेल्या आश्रमामध्ये काही वेळ थांबला.

तेव्हा त्या राजाला अवलोकन करण्याकरिता मुनिभार्या व इतर स्त्रियाही तेथे जमल्या, "हा कोण ?" म्हणून त्या नृपाविषयी चौकशी करू लागल्या. त्यामध्ये सुंदरी द्रौपदीही आली होती. रूपाने दुसरी लक्ष्मीच की काय ? अशी ती द्रौपदी जयद्रथाच्या दृष्टीस पडली, कृष्णवर्ण नेत्रांनी युक्त व दुसरी देवकन्याच, अशा त्या द्रौपदीला अवलोकन करून जयद्रथ राजा धौम्यमुनींना म्हणाला, "उत्कृष्ट मुद्रेने युक्त अशी ही तरुणी कोण आहे ? ही कोणाची भार्या ? कोणाची कन्या ? ह्या श्रेष्ठ स्त्रीचे नाव काय ? सौंदर्य, कांती ह्यांनी संपन्न असलेली ही स्त्री पृथ्वीवर आलेली जणू इंद्राणी, बाभूळ वनामध्ये असलेली लवंगालात. राक्षसांच्या समुदायामध्ये असलेली खरोखर रंभाच की काय अशी भासत

आहे. हिने आपल्या सौंदर्याने सर्व स्त्रिया मागे टाकल्या आहेत. हे महाभाग्यशाली द्विजश्रेष्ठा, ही अबला कोणाची प्रिया आहे, हे आपण मला सत्य सांगा. ही राजपत्‍नीप्रमाणे दिसत आहे. ही ऋषिपत्‍नी आहे."

धौम्य म्हणतात, "हे सिंधुराजेंद्रा, ही शुभ लक्षणांनी युक्त असलेली पांडवांची प्रिय भार्या द्रौपदी आहे. ही ह्या श्रेष्ठ आश्रमामध्ये वास्तव्य करीत आहे."

जयद्रथ म्हणतो, "ते शूर व प्रख्यात पाच पांडव सांप्रत कोणीकडे गेले ? ते महाबलाढ्य वीर ह्या वनामध्ये सुखाने राहात आहेत ना ?"

धौम्य म्हणाले, "पाचही पांडव रथारूढ होऊन मृगयेकरिता गेले आहेत. ते भूपती मृग घेऊन मध्यान्हसमयी येतील.

हे त्यांचे भाषण श्रवण केल्यावर तो जयद्रथराजा उठला. द्रौपदीचे सन्निध गेला आणि प्रणाम करून तिला म्हणाला, "हे सुंदरी, तू खुशाल आहेस ना ? तुझे पती कोणीकडे गेले आहेत ? तुम्ही वनामध्ये वास्तव्य करू लागल्यापासून आज खरोखर अकरा वर्षे झाली. "

ह्यानंतर द्रौपदी त्याला म्हणाली, "हे राजपुत्रा, तुझे कल्याण असो. आश्रमासमीप तू विश्रांती घे. पांडव एका क्षणामध्ये येतील. "

ह्याप्रमाणे ती बोलू लागली असता लोभाविष्ट झालेल्या त्या वीर भूपतीने मुनिश्रेष्ठांची पर्वा न करिता, द्रौपदीला हरण करून नेले. सूज्ञ जनांनी कसाही प्रसंग आला तरी कोणावरही विश्वास ठेवू नये. विश्वास ठेवणार्‍याला दुःख प्राप्त होते. असे बली म्हणतो.

विरोचनाचा पुत्र बली श्रीमान, धर्मनिष्ठ, सत्यवचनी, यज्ञकर्ता, दाता, शरण जाण्यास योग्य व साधुजनांना संमत असा होता. तो प्रल्हादाचा पौत्र अधर्माविषयी कधीही तत्पर नसे. दक्षिणेने युक्त असे नव्व्याणव यज्ञ त्याने केले. तथापि सत्वमूर्ति महायोगिजनांना सर्वदा सेव्य, आणि निर्विकार असा जो भगवान विष्णू, त्याने देवकार्य शेवटास नेण्याकरिता त्याच्याशी कपट केले ? कपटाने वामनरूप धारण करून तो विष्णू कश्यपापासून उत्पन्न झाला. बलीचे राज्य व सागरासह पृथ्वी ही त्याने कपटाने हरण केली. तो विरोचनपुत्र बलिराजा सत्यवचनी होता. परंतु इंद्राकरिता विष्णूने त्याच्याशी कपट केले. असे माझ्या ऐकण्यात आहे. यज्ञघात करण्याच्या उद्देशाने सत्वमूर्ति विष्णूनेही वामनरूप धारण करून जर असे कपट केले तर दुसरा कोण बरे करणार नाही ? हे प्रभो, कसाही प्रसंग आला तरी कोणीही कोणावर विश्वास ठेवू नये. अंतःकरणामध्ये जर लोभ असेल तर पापाचे भय कोठून जाणार ? हे मुने, लोभग्रस्त प्राणी खरोखर पातके करीत असतात व त्यापैकी कोणालाही परलोकभीती कधीसुद्धा वाटत नाही. ज्यांचे अंतःकरण लोभाने ग्रस्त झाले आहे, असे लोक मनाने, कायेने व वाचेने परद्रव्य हवन करीत असल्यामुळे, नरकात व वाचेने परद्रव्य हवन करीत असल्यामुळे, नरकात पडतात. देवांचे आराधन करून लोक धन प्राप्तीची सतत इच्छा करीत असतात. परंतु ते धन घेऊन एखाद्याला देण्यास संमत नसतात. व्यापार, दान, चौर्य आणि सामर्थ्य ह्यांपैकी कोणत्या तरी एका साधनाने, इष्ट द्रव्ये आणून दुसर्‍याला देत असतात. विकण्यासाठी वैश्य धान्य, वस्त्र वगैरे पुष्कळ माल खरेदी करतो आणि मला मोठा लाभ व्हावा म्हणून देवांचे पूजन करीत असतो. कारण व्यापाराने वैश्याला परवित्त हरण करण्याची इच्छा नसते काय ?

द्रव्य घेण्याचा प्रसंग आला म्हणजे मूळ किंमतीपेक्षा आपल्या मालाची किंमत जास्त यावी, अशी तो इच्छा करीतच असतो. हे ब्रह्मनिष्ठ मुने ह्याप्रमाणे सर्वही प्राणी सर्वदा परधन-हरणाविषयी तत्पर असतात. तस्मात विश्वास तरी कशा प्रकारचा कोणी, कोणावर ठेवावा ? लोभ व मोह ह्यांनी ग्रस्त झालेल्या पुरुषांनी केलेली तीर्थयात्रा, दिलेले दान व अभ्यासलेला वेद, हे सर्व व्यर्थ होते. म्हणजे करून न केल्यासारखे होते. म्हणून हे महाभाग्यशाली द्विजश्रेष्ठा, ह्या युधाजिताला आपण घरी पाठवा. म्हणजे जानकीप्रमाणे मी पुत्रासह ह्या आपल्या आश्रमात सुखाने वास्तव्य करीन."

ह्याप्रमाणे तिने त्या प्रतापी भारद्वाज मुनींना सांगितले. युधाजित राजा जेव्हा त्यांच्याकडे गेला. तेव्हा ते त्याला म्हणाले, "हे राजा तू खुशाल आपल्या राजधानीला परत जा. जिचा पुत्र बालक आहे अशी ही अत्यंत दुःखित झालेली मनोरमा, हे नृपश्रेष्ठा, तुजकडे येत नाही. तिचा पुत्रही तुला मिळत नाही.

युधाजित म्हणाला, "हे सौम्य मुने, आपण हट्ट सोडा आणि मनोरमेला मजकडे पाठवा. मी तिच्यावाचून जाणार नाही. मी आज तिला बलात्कारानेही घेऊन जाईन."



अध्याय सोळावा समाप्त

GO TOP