श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
तृतीयः स्कन्धः
प्रथमोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


भुवनेश्वरीवर्णनम्

जनमेजय उवाच -
भगवन् भवता प्रोक्तं यज्ञमम्बाभिधं महत् ।
सा का कथं समुत्पन्ना कुत्र कस्माच्च किंगुणा ॥ १ ॥
कीदृशश्च मखस्तस्याः स्वरूपं कीदृशं तथा ।
विधानं विधिवद्‌‌ब्रूहि सर्वज्ञोऽसि दयानिधे ॥ २ ॥
ब्रह्माण्डस्य तथोत्पत्तिं वद विस्तरतस्तथा ।
यथोक्तं यादृशं ब्रह्मन्नखिलं वेत्सि भूसुर ॥ ३ ॥
ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च त्रयो देवा मया श्रुताः ।
सृष्टिपालनसंहारकारकाः सगुणास्त्वमी ॥ ४ ॥
स्वतन्त्रास्ते महात्मानः पाराशर्य वदस्व मे ।
आहोस्वित्परतन्त्रास्ते श्रोतुमिच्छामि साम्प्रतम् ॥ ५ ॥
मृत्युधर्माश्च ते नो वा सच्चिदानन्दरूपिणः ।
अधिभूतादिभिर्युक्ता न वा दुःखैस्त्रिधात्मकैः ॥ ६ ॥
कालस्य वशगा नो वा ते सुरेंद्रा महाबलाः ।
कथं ते वै समुत्पन्ना कस्मादिति च संशयः ॥ ७ ॥
हर्षशोकयुतास्ते वै निद्रालस्यसमन्विताः ।
सप्तधातुमयास्तेषां देहाः किं वान्यथा मुने ॥ ८ ॥
कैर्द्रव्यैर्निर्मितास्ते वै कैर्गुणैरिन्द्रियैस्तथा ।
भोगश्च कीदृशस्तेषां प्रमाणमायुषस्तथा ॥ ९ ॥
निवासस्थानमप्येषां विभूतिं च वदस्व मे ।
श्रोतुमिच्छाम्यहं ब्रह्मन् विस्तरेण कथामिमाम् ॥ १० ॥

व्यास उवाच -
दुर्गमः प्रश्नभारोऽयं कृतो राजंस्त्वयाऽधुना ।
ब्रह्मादीनां समुत्पत्तिः कस्मादिति महामते ॥ ११ ॥
एतदेव मया पूर्वं पृष्टोऽसौ नारदो मुनिः ।
विस्मितः प्रत्युवाचेदमुत्थितः शृणु भूपते ॥ १२ ॥
कस्मिंश्च समये चाहं गङ्गातीरे स्थितं मुनिम् ।
अपश्यं नारदं शान्तं सर्वज्ञं वेदवित्तमम् ॥ १३ ॥
दृष्ट्वाहं मुदितो भूत्वा पादयोरपतं मुनेः ।
तेजाज्ञप्तः समीपेऽस्य संविष्टश्च वरासने ॥ १४ ॥
श्रुत्वा कुशलवार्तां वै तमपृच्छं विधेः सुतम् ।
निर्विष्टं जाह्नवीतीरे निर्जने सूक्ष्मवालुके ॥ १५ ॥
मुनेऽतिविततस्यास्य ब्रह्माण्डस्य महामते ।
कः कर्ता परमः प्रोक्तस्तन्मे ब्रूहि विधानतः ॥ १६ ॥
कस्मादेतत्समुत्पन्नं ब्रह्माण्डं मुनिसत्तम ।
अनित्यं वा तथा नित्यं तदाचक्ष्व द्विजोत्तम ॥ १७ ॥
एककर्तृकमेतद्वा बहुकर्तृकमन्यथा ।
अकर्तृकं न कार्यं स्याद्विरोधोऽयं विभाति मे ॥ १८ ॥
इति सन्देहसन्दोहे मग्नं मां तारयाधुना ।
विकल्पकोटीः कृर्वाणं संसारेऽस्मिन् प्रविस्तरे ॥ १९ ॥
ब्रुवन्ति शंकरं केचिन्मत्वा कारणकारणम् ।
सदाशिवं महादेवं प्रलयोत्पत्तिवर्जितम् ॥ २० ॥
आत्मारामं सुरेशं च त्रिगुणं निर्मलं हरम् ।
संसारतारकं नित्यं सृष्टिस्थित्यन्तकारणम् ॥ २१ ॥
अन्ये विष्णुं स्तुवन्त्येनं सर्वेषां प्रभुमीश्वरम् ।
परमात्मानमव्यक्तं सर्वशक्तिसमन्वितम् ॥ २२ ॥
भुक्तिदं मुक्तिदं शान्तं सर्वादिं सर्वतोमुखम् ।
व्यापकं विश्वशरणमनादिनिधनं हरिम् ॥ २३ ॥
धातारं च तथा चान्ये ब्रुवन्ति सृष्टिकारणम् ।
तमेव सर्ववेत्तारं सर्वभूतप्रवर्तकम् ॥ २४ ॥
चतुर्मुखं सुरेशानं नाभिपद्मभवं विभुम् ।
स्रष्टारं सर्वलोकानां सत्यलोकनिवासिनम् ॥ २५ ॥
दिनेशं प्रवदन्त्यन्ये सर्वेशं वेदवादिनः ।
स्तुवन्ति चैव गायन्ति सायं प्रातरतन्द्रिताः ॥ २६ ॥
यजन्ति च तथा यज्ञे वासवं च शतक्रतुम् ।
सहस्राक्षं देवदेवं सर्वेषां प्रभुमुल्बणम् ॥ २७ ॥
यज्ञाधीशं सुराधीशं त्रिलोकेशं शचीपतिम् ।
यज्ञानां चैव भोक्तारं सोमपं सोमपप्रियम् ॥ २८ ॥
वरुणं च तथा सोमं पावकं पवनं तथा ।
यमं कुबेरं धनदं गणाधीशं तथापरे ॥ २९ ॥
हेरम्बं गजवक्त्रं च सर्वकार्यप्रसाधकम् ।
स्मरणात्सिद्धिदं कामं कामदं कामगं परम् ॥ ३० ॥
भवानीं केचनाचार्याः प्रवदन्त्यखिलार्थदाम् ।
आदिमायां महाशक्तिं प्रकृतिं पुरुषानुगाम् ॥ ३१ ॥
ब्रह्मैकतासमापन्नां सृष्टिस्थित्यन्तकारिणीम् ।
मातरं सर्वभूतानां देवतानां तथैव च ॥ ३२ ॥
अनादिनिधनां पूर्णां व्यापिकां सर्वजन्तुषु ।
ईश्वरीं सर्वलोकानां निर्गुणां सगुणां शिवाम् ॥ ३३ ॥
वैष्णवीं शाङ्करीं ब्राह्मीं वासवीं वारुणीं तथा ।
वाराहीं नारसिंहीं च महालक्ष्मीं तथाद्‌भुताम् ॥ ३४ ॥
वेदमातरमेकां च विद्यां भवतरोः स्थिराम् ।
सर्वदुःखनिहन्त्रीं च स्मरणात्सर्वकामदाम् ॥ ३५ ॥
मोक्षदां च मुमुक्षूणां कामदां च फलार्थिनाम् ।
त्रिगुणातीतरूपां च गुणविस्तारकारकाम् ॥ ३६ ॥
निर्गुणां सगुणां तस्मात्तां ध्यायन्ति फलार्थिनः ।
निरंजनं निराकारं निर्लेपं निर्गुणं किल ॥ ३७ ॥
अरूपं व्यापकं ब्रह्म प्रवदन्ति मुनीश्वराः ।
वेदोपनिषदि प्रोक्तस्तेजोमय इति क्वचित् ॥ ३८ ॥
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्रनयनस्तथा ।
सहस्रकरकर्णश्च सहस्रास्यः सहस्रपात् ॥ ३९ ॥
विष्णोः पादमथाकाशं परमं समुदाहृतम् ।
विराजं विरजं शान्तं प्रवदन्ति मनीषिणः ॥ ४० ॥
पुरुषोत्तमं तथा चान्ये प्रवदन्ति पुराविदः ।
नैकोऽपीति वदन्त्यन्ये प्रभुरीशः कदाचन ॥ ४१ ॥
अनीश्वरमिदं सर्वं ब्रह्माण्डमिति केचन ।
न कदापीशजन्यं यज्जगदेतदचिन्तितम् ॥ ४२ ॥
सदैवेदमनीशं च स्वभावोत्थं सदेदृशम् ।
अकर्तासौ पुमान्प्रोक्तः प्रकृतिस्तु तथा च सा ॥ ४३ ॥
एवं वदन्ति साङ्ख्याश्च मुनयः कपिलादयः ।
एते सन्देहसन्दोहाः प्रभवन्ति तथाऽपरे ॥ ४४ ॥
विकल्पोपहतं चेतः किं करोमि मुनीश्वर ।
धर्माधर्मविवक्षायां न मनो मे स्थिरं भवेत् ॥ ४५ ॥
को धर्मः कीदृशोऽधर्मश्चिह्नं नैवोपलभ्यते ।
देवाः सत्त्वगुणोत्पन्नाः सत्यधर्मव्यवस्थिताः ॥ ४६ ॥
पीड्यन्ते दानवैः पापैः कुत्र धर्मव्यवस्थितिः ।
धर्मस्थिताः सदाचाराः पाण्डवा मम वंशजाः ॥ ४७ ॥
दुःखं बहुविधं प्राप्तास्तत्र धर्मस्य का स्थितिः ।
अतो मे हृदयं तात वेपतेऽतीव संशये ॥ ४८ ॥
कुरु मेऽसंशयं चेतः समर्थोऽसि महामुने ।
त्राहि संसारवार्धेस्त्वं ज्ञानपोतेन मां मुने ॥ ४९ ॥
मज्जन्तं चोत्पतन्तं च मग्नं मोहजलाविले ॥ ५० ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
तृतीयस्कन्धे भुवनेश्वरीवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥


अस्तिक मुनींची जन्मकथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजाचे भाषण ऐकून व्यास म्हणाले, "हे राजा, गुह्य, अदभूत, पवित्र, कल्याणकारक आणि अनेक आख्यानांनी युक्त असे भागवत पुराण मी तुला कथन करतो. तू ऐक. हे मी पूर्वी माझा पुत्र शुक याला पढविले. ते परम रहस्य, मी तुला सांगतो सर्व वेदांचे सार काढून तयार केलेले हे भागवत, सुखावह व शुभफल देणारे आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ त्यामुळे साध्य होतात.

जनमेजय म्हणाला," हे प्रभो, अस्तिक कोणाचा पुत्र ? यज्ञात विघ्न आणायला कसा आला ? हे आपण विस्ताराने सांगा व सर्व पुराणेही सविस्तर कथन करा."

व्यास सांगू लागले, "नित्य शांतचित्त असलेला जगतकारु मुनी अविवाहितच राहिला असता. पण एकदा वनात एका खड्ड्यात लोंबत असलेले त्यांचे पूर्वज त्याला म्हणाले," हे पुत्रा, तू विवाह केला नाहीस तर वंश वाढणार नाही. त्याशिवाय आम्हाला स्वर्ग मिळणार नाही. यास्तव तू विवाह कर."

माझ्याच नावाची कन्या, याचना न करता मला मिळाली तरच मी विवाह करीन." असे म्हणून जरतकारु तीर्थयात्रा करु लागला. इकडे त्याचवेळी मातेने भुजंगांना ‘तुम्ही अग्नीत पडाल’ असा शाप दिला तो इतिहास असा.

कश्यप मुनीला कदू व विनता नावाच्या भार्या होत्या. एक दिवस सूर्याच्या रथाचा अश्व पाहू कद्रू विनतेला म्हणाली,"हा अश्व कोणत्या रंगाचा आहे ते सांग.

विनता म्हणाली "हा अश्व श्वेतवर्णी आहे. तुझे काय मत आहे? यावर आपण पण लावू."

कद्रू म्हणाली, "हे सुहास्यवदने, हा अश्व कृष्णवर्णाचा आहे. ज्याचे म्हणणे खोटे होईल त्याने दासी व्हावे. असा पण लावू."

इतके सांगून कद्रू आपल्या सर्परुपी पुत्रांना म्हणाली, "हे पुत्रांनो, त्या अश्वाच्या शरीरावरील सर्व केस तुम्ही कृष्णवर्णाचे करा." तिच्या या म्हणण्याला ज्यांनी नकार दिला, त्यांना मातेने शाप दिला,"तुम्ही जनमेजयाच्या सर्पयज्ञात अग्नीत पडाल." तेव्हा इतर सर्व अनेकवर्णी पुत्रांनी अश्वाचे पुच्छ वेढून टाकले व त्याचा वर्ण काळा केला. नंतर दोघी बहिणी पुन: अश्व पाहण्यास गेल्या, पण अश्वाचा वर्ण बराचसा कृष्ण असल्याचे पाहताच विनितेला दु:ख झाले. तेव्हा भुजंग भक्षण करणारा गरुड तेथे आला व तिची दयनीय अवस्था पाहून म्हणाला, "हे माते, तू का रोदन करीत आहेस? मी आणि तुझा दुसरा सूर्याचा सारथी असलेला पुत्र अरुण जिवंत असताना, ज्याअर्थी माते तुला दु:ख होत आहे त्या अर्थी आमचा धिक्कार असो. मातेला दु:ख असेल तर आमच्या जन्माचा काय उपयोग? म्हणून तू चिंतेचे कारण सत्वर सांग. मी तुझी काळजी दूर करतो."

विनता म्हणाली, "मी पराजित झाल्याने सक्तीची दासी झाले आहे. त्यामुळे मला दु:ख होत आहे. ती मला म्हणती आहे, "मला घेऊन जा." गरुड म्हणाला, "तर मग तिला जिकडे जाण्याची इच्छा असेल, तिकडे मी घेऊन जाईन. तू शोक करु नकोस." असे सांगताच विनिता कद्रूकडे गेली. गरुडाने कद्रूच्या इच्छेप्रमाणे तिच्या सर्व पुत्रांसह उड्डाण करुन समुद्रापलीकडे नेले व तो कद्रूला म्हणाला, "हे माते, तुला नमस्कार असो. माझी माता दास्यमुक्त कशी होईल ते सत्वर सांग." कद्रू म्हणाली, "हे पुत्रा, तू देवलोकातून अमृत आणून माझ्या पुत्रांना दे म्हणजे आजच तुझी माता दास्यमुक्त होईल.

कद्रूचे बोलणे ऐकून महाप्रतापी गरुड इंद्रलोकी गेला व युद्ध करुन तेथून अमृतकुंभ घेऊन आला. आपल्या सावत्र आईला ते अर्पण केले व विनता मातेला दास्यमुक्त केले. इकडे सर्व सर्प स्नानाला गेले असता इंद्राने ते हरण केले. पण गरुडाच्या सामर्थ्यामुळे विनता दास्यातून मुक्त झाली. अमृत कुंभातील दर्भावर सांडलेले काही थेंब सर्पानी चाटले. त्यामुळे त्यांच्या जिव्हा फाटून ते द्विजिव्ह झाले. इकडे वासुकी प्रभृति नागांना मातेने शाप दिल्यामुळे ते ब्रह्मदेवाला शरण गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले, "जरत्कारु नावाच्या ऋषीला त्याच नावाची असलेली वासुकीची बहिण अर्पण करा. तिच्या पोटी अस्तिक मुनी जन्माला येईल व तुमचे संरक्षण करील."

हे ऐकून सर्व नाग स्वस्थानी गेले. वासुकीने आपली बहिण जरत्कारुला दिली. पण दोघांचीही एकच नावे असल्याने मुनी म्हणाला,"जेव्हा हिच्या हातून मला अप्रिय असलेले कृत्य घडेल तेव्हा मी हिचा त्याग करीन." असे स्पष्ट सांगितल्यावर, दोघांचा विवाह झाला. वासुकी निघून गेला. तो नंतर एका विशाल वनात जरत्कारुने आपली पर्णकुटी बांधली आणि पत्‍नीसह तो क्रीडा करीत सुखाने राहू लागला. एकदा मुनीश्रेष्ठ आपल्या पत्‍नीस म्हणाला, "कुठल्याही परिस्थितीत मला तू जागृत करु नकोस." असे सांगून तो निद्राधीन झाला.

त्याच वेळी संध्यासमय झाला. जरत्कारुने विचार केला, "आता यांना उठवावे तर ते आपला त्याग करणार, न उठवावे तर धर्मकृत्ये केल्याविना संध्याकाळ व्यर्थ जाणार ! पण धर्मलोप होण्यापेक्षा त्यागच काय, पण मरणही चालेल. कारण धर्महानिमुळे नरक प्राप्त होणार. असा त्या साध्वीने विचार करुन ती म्हणाली, "हे सुव्रत उठा, संध्याकाळ झाली." त्याबरोबर मुनी क्रोधायमान होऊन उठला व त्वेषाने म्हणाला, "तू माझ्या निद्रेचा भंग केलास. मी निघून जातो. तू भावाच्या घरी जा." ती म्हणाली की, "महाराज ज्या शुभकार्यासाठी भावाने मला आपणास अर्पण केली ते कार्य कसे होणार ? तेव्हा मुनीश्वर विचारपूर्वक म्हणाला, "ते कार्य घडले आहे."

तो तिचा त्याग करुन निघून गेला. ती वासुकीच्या घरी परत गेली. कार्याविषयी भावाने विचारले, तेव्हा मुनीने, "आहे" म्हणून सांगितले आहे, असे तिने उत्तर दिले. तेव्हा मुनी सत्यवचनी आहे म्हणून वासुकीने विश्वास ठेवून भगिनीला आधार दिला.

पुढे योग्य समय प्राप्त होताच तिच्यापोटी एक सुंदर मुनिपुत्र जन्माला आला. तोच प्रसिद्ध अस्तिक होय.

"जनमेजया, त्या जितेंद्रिय मुनीनेच मातृवंशाच्या रक्षणासाठी तुझा यज्ञ थांबविला आहे. त्या यथावार कुलातील मुनीला तू मान दिलास, हे फार उत्तम झाले. मूनींचे पूजन केलेस, पण तरीही तुझ्या पित्याला स्वर्गप्राप्ती झाली व तुझ्या हातून सर्व कुल पवित्र झाले नाही. म्हणून भूपेंद्रा, श्रद्धापूर्वक देवीचे मोठे मंदिर बांध म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सदासर्वदा त्या कल्याणीचे स्तवन केले की कुलवृद्धी होईल. राज्यही स्थिर होईल. म्हणून तू विधीपूर्वक देवीयज्ञ कर. तू श्रीमदभागवत नावाचे सर्वोत्तम पुराण श्रवण कर. ते अत्यंत पवित्र, भवसागर तरुन नेणारे, सर्व रस युक्त, अशा कथा मी तुला सांगतो.

ह्या कथेपेक्षा दुसरे श्रवणास योग्य असे काही नाही. देवीशिवाय काहीही श्रेष्ठ नाही. ज्याच्या चित्तात सदा देवीचे वास्तव्य असते तेच खरे भाग्यवान, ज्ञानी व धन्य होत. जे महामाया अंबिकेचे पूजन करीत नाहीत, ते सदा दु:खी असतात. भगवती देवीने विष्णूला कथन केलेले भागवत जो श्रवण करतो, त्याची इच्छा पूर्ण होते. म्हणून त्याच्या श्रवणाने तुझ्या पूर्वजांना चिरंतन स्वर्गप्राप्ती होईल.



अध्याय पहिला समाप्त

GO TOP