श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
द्वितीयः स्कन्धः
एकादशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


सर्पसत्रवर्णनम्

सूत उवाच
गतप्राणं तु राजानं बालं पुत्रं समीक्ष्य च ।
चक्रुश्च मन्त्रिणः सर्वे परलोकस्य सत्क्रियाः ॥ १ ॥
गङ्गातीरे दग्धदेहं भस्मप्रायं महीपतिम् ।
अगुरुभिश्चाभियुक्तायां चितायामध्यरोपयन् ॥ २ ॥
दुर्मरणे मृतस्यास्य चकुश्चैवौर्ध्वदैहिकीम् ।
क्रियां पुरोहितास्तस्य वेदमन्त्रैर्विधानतः ॥ ३ ॥
ददुर्दानानि विप्रेभ्यो गाः सुवर्णं यथोचितम् ।
अन्नं बहुविधं तत्र वस्त्राणि विविधानि च ॥ ४ ॥
सुमुहूर्ते सुतं बालं प्रजानां प्रीतिवर्धनम् ।
सिंहासने शुभे तत्र मन्त्रिणः संन्यवेशयन् ॥ ५ ॥
पौरा जानपदा लोकाश्चक्रुस्तं नृपतिं शिशुम् ।
जनमेजयनामानं राजलक्षणसंयुतम् ॥ ६ ॥
धात्रेयी शिक्षयामास राजचिह्नानि सर्वशः ।
दिने दिने वर्धमानः स बभूव महामतिः ॥ ७ ॥
प्राप्ते चैकादशे वर्षे तस्मै कुलपुरोहितः ।
यथोचितां ददौ विद्यां जग्राह स यथोचिताम् ॥ ८ ॥
धनुर्वेदं कृपः पूर्णं ददावस्मै सुसंस्कृतम् ।
अर्जुनाय यथा द्रोणः कर्णाय भार्गवो यथा ॥ ९ ॥
सम्प्राप्तविद्यो बलवान्वभूव दुरतिक्रमः ।
धनुर्वेदे तथा वेदे पारगः परमार्थवित् ॥ १० ॥
धर्मशास्त्रार्थकुशलः सत्यवादी जितेन्द्रियः ।
चकार राज्यं धर्मात्मा पुरा धर्मसुतो यथा ॥ ११ ॥
ततः सुवर्णवर्माख्यो राजा काशिपतिः किल ।
वपुष्टमां शुभा कन्यां ददौ पारीक्षिताय च ॥ १२ ॥
स तां प्राप्यासितापाङ्गीं मुमुदे जनमेजयः ।
काशिराजसुतां कान्तां प्राप्य राजा यथा पुरा ॥ १३ ॥
विचित्रवीर्यो मुमुदे सुभद्रां च यथार्जुनः ।
विजहार महीपालो वनेषूपवनेषु च ॥ १४ ॥
तया कमलपत्राक्ष्या शच्या शतक्रतुर्यथा ।
प्रजास्तस्य सुसन्तुष्टा बभूवुः सुखलालिताः ॥ १५ ॥
मन्त्रिणः कर्मकुशलाश्चक्रुः कार्याणि सर्वशः ।
एतस्मिन्नेव काले तु मुनिरुत्तङ्कनामकः ॥ १६ ॥
तक्षकेण परिक्लिष्टो हस्तिनापुरमभ्यगात् ।
वैरस्यापचितिं कोऽस्य प्रकुर्यादिति चिन्तयन् ॥ १७ ॥
परीक्षितसुतं मत्वा तं नृपं समुपागतः ।
कार्याकार्यं न जानासि समये नृपसत्तम ॥ १८ ॥
अकर्तव्यं करोष्यद्य कर्तव्यं न करोषि वै ।
किं त्वां सम्प्रार्थयाम्यद्य गतामर्षं निरुद्यमम् ॥ १९ ॥
अवैरज्ञमतन्त्रज्ञं बालचेष्टासमन्वितम् ।
जनमेजय उवाच
किं वैरं न मया ज्ञातं न किं प्रतिकृतं मया ॥ २० ॥
तद्वद त्वं महाभाग करोमि यदनन्तरम् ।
उत्तङ्क उवाच
पिता ते निहतो भूप तक्षकेण दुरात्मना ॥ २१ ॥
मन्त्रिणस्त्वं समाहूय पृच्छ स्वपितृनाशनम् ।
सूत उवाच
तच्छ्रुत्वा वचनं राजा पप्रच्छ मन्त्रिसत्तमान् ॥ २२ ॥
ऊचुस्ते द्विजशापेन दष्टः सर्पेण वै मृतः ।
जनमेजय उवाच
शापोऽत्र कारणं राज्ञः शप्तस्य मुनिना किल ॥ २३ ॥
तक्षकस्य तु को दोषो ब्रूहि मे मुनिसत्तम ।
उत्तङ्क उवाच
तक्षकेण धनं दत्त्वा कश्यपः सन्निवारितः ॥ २४ ॥
न स किं तक्षको वैरी पितृहा तव भूपते ।
भार्या रुरोः पुरा भूप दष्टा सर्पेण सा मृता ॥ २५ ॥
अविवाहिता तु मुनिना जीविता च पुनः प्रिया ।
रुरुणापि कृता तत्र प्रतिज्ञा चातिदारुणा ॥ २६ ॥
यं यं सर्पं प्रपश्यामि तं तं हन्म्यायुधेन वै ।
एवं कृत्वा प्रतिज्ञां स शस्त्रपाणी रुरुस्तदा ॥ २७ ॥
व्यचरत्पृथिवीं राजन्निघ्नन्सर्पान्यतस्ततः ।
एकदा स वने घोरं डुण्डुभं जरसान्वितम् ॥ २८ ॥
अपश्यद्दण्डमुद्यम्य हन्तुं तं समुपाययौ ।
अभ्यहन्‍रुषितो विप्रस्तमुवाचाथ डुण्डुभः ॥ २९ ॥
नापराध्नोमि ते विप्र कस्मान्मामभिहंसि वै ।
रुरुरुवाच
प्राणप्रिया मे दयिता दष्टा सर्पेण सा मृता ॥ ३० ॥
प्रतिज्ञेयं तदा सर्प दुःखितेन मया कृता ।
डुण्डुभ उवाच
नाहं दशामि तेऽन्ये वै ये दशन्ति भुजङ्गमाः ॥ ३१ ॥
शरीरसमयोगेन न मां हिंसितुमर्हसि ।
उत्तङ्क उवाच
श्रुत्वा तां मानुषीं वाणीं सर्पेणोक्तां मनोहराम् ॥ ३२ ॥
रुरुः पप्रच्छ कोऽसि त्वं कस्माद्‌डुण्डुभतां गतः ।
सर्प उवाच
ब्राह्मणोऽहं पुरा विप्र सखा मे खगमाभिधः ॥ ३३ ॥
विप्रो धर्मभृतां श्रेष्ठः सत्यवादी जितेन्द्रियः ।
स मया वञ्जितो मौर्ख्यात्सर्पं कृत्वा च तार्णकम् ॥ ३४ ॥
भयं च प्रापितोऽत्यर्थमग्निहोत्रगृहे स्थितः ।
तेन भीतेन शप्तोऽहं विह्वलेनातिवेपिना ॥ ३५ ॥
भव सर्पो मन्दबुद्धे येनाहं धर्षितस्त्वया ।
मया प्रसादितोऽत्यर्थं सर्पेणासौ द्विजोत्तमः ॥ ३६ ॥
मामुवाचाथ तत्क्रोधात्किञ्चिच्छान्तिमवाप्य च ।
रुरुस्ते मोचिता शापस्यास्य सर्प भविष्यति ॥ ३७ ॥
प्रमतेस्तु सुतो नूनमिति मां सोऽब्रवीद्वचः ।
सोऽहं सर्पो रुरुस्त्वं च शृणु मे परमं वचः ॥ ३८ ॥
अहिंसा परमो धर्मो विप्राणां नात्र संशयः ।
दया सर्वत्र कर्तव्या ब्राह्मणेन विजानता ॥ ३९ ॥
यज्ञादन्यत्र विप्रेन्द्र न हिंसा याज्ञिको मता ।
सूत उवाच
सर्पयोनेर्विनिर्मुक्तो बाह्मणोऽसौ रुरुस्ततः ॥ ४० ॥
कृत्वा तस्य च शापान्तं परित्यक्तं च हिंसनम् ।
विवाहिता तेन बाला मृता सज्जीविता पुनः ॥ ४१ ॥
कदनं सर्वसर्पाणां कृतं वैरमनुस्मरन् ।
त्वं तु वैरं समुत्सृज्य वर्तसे पन्नगेष्वथ ॥ ४२ ॥
विमन्युर्भरतश्रेष्ठ पितृघातकरेषु वै ।
अन्तरिक्षे मृतस्तातः स्नानदानविवर्जितः ॥ ४३ ॥
तस्योद्धारं च राजेन्द्र कुरु हत्वाथ पन्नगान् ।
पितुर्वैरं न जानाति जीवन्नेव मृतो हि सः ॥ ४४ ॥
दुर्गतिस्ते पितुस्तावद्यावत्तान्न हनिष्यसि ।
अम्बामखमिषं कृत्वा कुरु यज्ञं नृपोत्तम ॥ ४५ ॥
सर्पसत्रं महाराज पितुर्वैरमनुस्मरन् ।
सूत उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा राजा जन्मेजयस्तदा ॥ ४६ ॥
नेत्राभ्यामश्रुपातं च चकारातीव दुःखितः ।
धिङ्‌मामस्तु सुदुर्बुद्धेर्वृथा मानकरस्य वै ॥ ४७ ॥
पिता यस्य गतिं घोरां प्राप्तः पन्नगपीडितः ।
अद्याहं मखमारभ्य करोम्यपचितिं पितुः ॥ ४८ ॥
हत्वा सर्पानसन्दिग्धो दीप्यमाने विभावसौ ।
आहूय मन्त्रिणः सर्वान् राजा वचनमब्रवीत् ॥ ४९ ॥
कुर्वन्तु यज्ञसम्भारं यथार्हं मन्त्रिसत्तमाः ।
गङ्गातीरे शुभां भूमिं मापयित्वा द्विजोत्तमैः ॥ ५० ॥
कुर्वन्तु मण्डपं स्वस्थाः शतस्तम्भं मनोहरम् ।
वेदी यज्ञस्य कर्तव्या ममाद्य सचिवाः खलु ॥ ५१ ॥
तदङ्गत्वे विधेयो वै सर्पसत्रः सुविस्तरः ।
तक्षकस्तु पशुस्तत्र होतोत्तङ्को महामुनिः ॥ ५२ ॥
शीघ्रमाहूयतां विप्राः सर्वज्ञा वेदपारगाः ।
सूत उवाच
मन्त्रिणस्तु तदा चक्रुर्भूपवाक्यैर्विचक्षणाः ॥ ५३ ॥
यज्ञस्य सर्वसम्भारं वेदीं यज्ञस्य विस्तृताम् ।
हवने वर्तमाने तु सर्पाणां तक्षको गतः ॥ ५४ ॥
इन्द्रं प्रति भयार्तोऽहं त्राहि मामिति चाब्रवीत् ।
भयभीतं समाश्वास्य स्वासने सन्निवेश्य च ॥ ५५ ॥
ददावभयमत्यर्थं निर्भयो भव पन्नग ।
तमिन्द्रशरणं ज्ञात्वा मुनिर्दत्ताभयं तथा ॥ ५६ ॥
उत्तङ्कोऽह्वयदुद्विग्नः सेन्द्रं कृत्वा निमन्त्रणम् ।
स्मृतस्तदा तक्षकेण यायावरकुलोद्‌भवः ॥ ५७ ॥
आस्तीको नाम धर्मात्मा जरत्कारुसुतो मुनिः ।
तत्रागत्य मुनेर्बालस्तुष्टाव जनमेजयम् ॥ ५८ ॥
राजा तमर्चयामास दृष्ट्वा बालं सुपण्डितम् ।
अर्चयित्वा नृपस्तं तु छन्दयामास वाञ्छितैः ॥ ५९ ॥
स तु वव्रे महाभाग यज्ञोऽयं विरमत्विति ।
सत्यबद्धो नृपस्तेन प्रार्थितश्च पुनस्तथा ॥ ६० ॥
होमं निवर्तयामास सर्पाणां मुनिवाक्यतः ।
भारतं श्रावयामास वैशम्पायन विस्तरात् ॥ ६१ ॥
श्रुत्वापि नृपतिः कामं न शान्तिमभिजग्मिवान् ।
व्यासं पप्रच्छ भूपालो मम शान्तिः कथं भवेत् ॥ ६२ ॥
मनोऽतिदह्यते कामं किं करोमि वदस्व मे ।
पिता मे दुर्भगस्यैव मृतः पार्थसुतात्मजः ॥ ६३ ॥
क्षत्रियाणां महाभाग सङ्ग्रामे मरणं वरम् ।
रणे वा मरणं व्यास गृहे वा विधिपूर्वकम् ॥ ६४ ॥
मरणं न पितुर्मेऽभूदन्तरिक्षे मृतोऽवशः ।
शान्त्युपायं वदस्वात्र त्वं च सत्यवतीसुत ॥ ६५ ॥
यथा स्वर्गं व्रजेदाशु पिता मे दुर्गतिं गतः ॥ ६६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
द्वितीयस्कन्धे सर्पसत्रवर्णनं नामैकादशोऽध्यायः ॥ ११ ॥


जनमेजयाचे सर्प-सत्र -

राजा तर मृत्यू पावला. राजकुमार जनमेजय अत्यंत लहान म्हणून मंत्रीगणांनी राजाला परलोक प्राप्त व्हावा म्हणून राजाचे और्ध्वदेहिक कर्मे यथाविधी केली. तक्षकाने दंश केल्यामुळे भस्म झालेल्या परीक्षितीला गंगातीरावर अगुरु काष्ठांनी युक्त असलेल्या चितेवर ठेवून वेदमंत्रासमवेत, राजाच्या सर्व उत्तरक्रीया पूर्ण केल्या. उत्तमप्रकारची दाने दिली. सुग्रास अन्नदान केले. नानाप्रकारची वस्त्रे वाटली आणि एका सुमुहूर्तावर हस्तिनापूरच्या शुभसिंहासनावर बाल जनमेजयाची स्थापना करुन त्याला राज्याभिषेक केला. दाई राजाचे पालनपोषण करीत असे. तिने राजपुत्राला दरबारचे रीतिरिवाज समजावून सांगितले. हळूहळू राजा मोठा होऊ लागला.

राजा अकरा वर्षाचा झाल्यावर कुलपुरोहितांनी त्याला यथायोग्य विद्या शिकवण्यास सुरवात केली. कृपाचार्यांनी त्याला धनुर्वेद शिकविला. राजा जनमेजयाला विद्या प्राप्त होऊन तो राजशास्त्र जाणू लागला. तो वेद व धनुर्विद्या यात पारंगत झाला. तो धर्मशास्त्र निपुण असल्याने त्याने धर्माप्रमाणे राज्य केले. त्याची कीर्ती ऐकून सुवर्णवमक्षि नावाच्या काशिपती राजाने आपली सुंदर कन्या वपुष्टमा जनमेजयाला दिली. सुंदर पत्‍नीचा लाभ झाल्याने राजालाही आनंद झाला व सुनेत्रा वपुष्टमेसह जनमेजय राजा वनात व उपवनात येथेच्छ क्रीडा करु लागला. तो प्रजाहितदक्ष असल्याने प्रजा राजावर संतुष्ट होती मंत्रीही स्वकार्यदक्ष होते. आपापली कामे ते प्रामाणिकपणे करीत होते.

याचवेळी पूर्वी तक्षकाने त्रस्त केलेला उत्तंक मुनी तक्षकाच्या सूडाचा विचार करीत हस्तिनापूरला आला. तेथील राजा परीक्षितीचा पुत्रच आहे. हे ऐकून मुनी राजाकडे गेला आणि त्याला म्हणाला,"हे राजा, योग्य वेळी कोणते कार्य करावे, हे तुला समजत नसल्याने नको ते कर्तव्य तू पार पाडीत आहेस. खरोखर उद्योगरहित, अभिमानशून्य व्यवहारशून्य, पोरचेष्टेत मग्न होऊन, वैर न जाणणार्‍या तुला, मी कशी प्रार्थना करावी."

हे ऐकून विस्मित झालेला जनमेजय, नम्रतेने म्हणाला,"कोणते वैर न समजल्यामुळे मी त्याचा प्रतिकार केला नाही, ते आपण मला सांगा, मी योग्य ते करीन."

उत्तंक म्हणाला,"राजा, दुष्ट तक्षकाने तुझ्या पित्याचा वध केला. हवे तर तुझ्या मंत्रीगणांना ही घटना विचार की पित्याचा वध कोणी केला ?

हे ऐकून जनमेजयाने आपल्या मंत्र्यांना बोलावून आपल्या पित्याच्या वधाची माहिती विचारली. तेव्हा विप्राचा शाप व पुढे झालेला सर्पदंश यामुळे राजाला कसा मृत्यू आला ते त्यांनी विस्ताराने राजाला सांगितले.

तेव्हा राजाने उत्तंक मुनीला सांगितले, "महाराज, विप्राच्या शापामुळे मला वाटते पित्याचा वध तक्षकाने केला. यात तक्षक दोषी कसा !"

तेव्हा उत्तंकाने कश्यपाला विपुल धन देऊन तक्षकाने कसे परत पाठवले ते सांगितले व तक्षक दोषी असल्याचे पटवून दिले. उत्तंक पुढे म्हणाला, "पूर्वी रुरुची पत्‍नी सर्पदंश होऊन अविवाहित मृत्यू पावली. रुरुने स्वसामर्थ्याने तिला जिवंत केले. पण दिसेल त्या सर्पाचा मी नाश करीन, अशी भयंकर प्रतिज्ञा करुन, हातात शस्त्र घेऊन तो सर्प मारीत सुटला. पुढे एका वनात भयंकर पण जर्जर झालेला अजगर त्याला दिसला. त्याच्यावरही रुरुने प्रहार केला.

तेव्हा अजगर म्हणाला, "हे विप्रा मी तुझा कोणताही अपराध केला नसता, तू माझा का वध करीत आहेस ?"

रुरु म्हणाला, "माझ्या प्रियेला सर्पदंशाने मृत्यू आल्याने संतप्त होऊन मी सर्पांचा संहार करीत आहे."

अजगर म्हणाले, "मी दंश करीत नाही, दंश करणारे भुजंग वेगळे आहेत. माझे शरीर त्यांच्या सारखे आहे. म्हणून तू माझी हिंसा करणे न्याय्य नाही."

सर्प मनुष्यवाणीने बोलला, हे ऐकून रुरु म्हणाला, "तू कोण आहेस ? तुला अजगर योनी कशी प्राप्त झाली ?"

सर्प म्हणाला, "मी पूर्वजन्मी ब्राह्मण होतो. पण खमग नावाच्या धर्मनिष्ठ, सत्यवादी, जितेंद्रिय अशा माझ्या विप्रमित्राला मी मुर्खपणामुळे तृणाचा सर्प करुन फसविले. तेव्हा भीतीने थराथरा कापत असलेल्या त्याने शाप दिला व मी सर्प झालो. शापामुळे घाबरुन मी त्याची क्षमा मागितली. तेव्हा त्याने उ:शाप दिला. प्रमतीचा पुत्र रुरु तुझी यातून सुटका करील. तू रुरु आहेस मी तो सर्प आहे. पण अहिंसा हा विप्रांचा धर्म आहे. यज्ञाव्यतिरिक्त हिंसा करणे हा दोष आहे. यज्ञातील हिंसा, ही हिंसा होत नाही."

नंतर रुरुने त्या ब्राह्मणाला शापातून मुक्त केले. सर्पवधाचा त्याग केला व मृत झालेली बाला जिवंत करुन, त्याने तिच्याशी विवाह केला.

उतांकाने ही कथा सांगून पुढे म्हटले,"हे भरतश्रेष्ठा, तू मात्र वैर विसरुन भुजंगाशी वागत आहेस तू वैराचा त्याग करुन, क्रोध सोडून दिला आहेस. हे राजा, स्नानादि कर्माशिवाय तुझा पिता अंतरिक्षात मृत झाला. म्हणून भुजंगाचा वध करुन तू त्याचा उद्धार कर. पित्याच्या वैराचा जो सूड घेत नाही, तो पुत्र जिवंत असून मृतच होय. जोवर तू पितृवधाचा सूड घेत नाहीस, तोवर तुझ्या पित्याला उत्तम गति प्राप्त होणार नाही. तेव्हा वैराचे स्मरण ठेवून अंबा यज्ञाच्या निमित्ताने तू सर्प सत्र नावाचा यज्ञ कर."

हे ऐकून जनमेजयाला दु:ख झाले तो रोदन करु लागला. तो स्वत:ला म्हणाला, "धिक्कार असो माझा. भुजंग दंशामुळे मृत्यू येऊन माझ्या पित्याला भयंकर गति प्राप्त झाली., मी व्यर्थ अभिमान बाळगतो आहे. आजच मी यज्ञाला आरंभ करुन निश्चित मनाने यज्ञातील अग्नीत सर्पाचा वध करीन. आणि पितृऋणांतून मुक्त होईन." असा विचार करुन त्याने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावले व सांगितले,

"यज्ञाची उत्कृष्ट समग्री जमा करा. द्विजश्रेष्ठांकडून गंगा तीरावर भूमी मोजून घ्या. तेथे शंभर स्तंभांचा सुंदर मंडप उभारा. आजच माझी यज्ञवेदी तयार झाली पाहिजे, कारण विस्तृत अनुष्ठनांनी युक्त असे सर्पसत्र मला करावयाचे आहे. तक्षक हा त्या सत्रातील मुख्य पशू आहे व मुख्य हवन उत्तंक महर्षी करणार आहेत. तेव्हा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांना त्वरित निमंत्रणे द्या.

राजाच्या आज्ञेप्रमाणे मंत्र्यांनी सर्व सिद्धता केली. यज्ञ सुरु होऊन सर्पाचे हवन सुरु झाले. तेव्हा तक्षक भयभीत झाला व संरक्षणासाठी इंद्राकडे गेला. इंद्राने त्याला धीर देऊन आपल्या आसनावर बसवून निर्धास्त राहण्यास सांगितले. अशा प्रकारे तक्षकाला इंद्राने संरक्षण दिलेले जेव्हा उत्तंग मुनींना समजले तेव्हा इंद्रासह ऊह करुन त्या उद्विग्न झालेल्या उत्तंकाने तक्षकासह अवाहन केले. त्यावेळी भयभीत होऊन तक्षकाने जरतकारुचा पुत्र अस्तिकाचे स्मरण केले. तेव्हा अस्तिक मुनी यज्ञ मंडपात आले. त्यांनी जनमेजयाची व उत्तंकाची स्तुती केली. महापंडित अस्तिकाला पाहून, जनमेजयाने त्याचे पूजन केले. आणि इच्छा असेल ते मागण्यास सांगितले.

तेव्हा त्या मुनींनी हा यज्ञ येथेच थांबव असेच सांगितले. सत्यवचनी राजाची पुन्हा अस्तिकाने सर्प सत्र थांबवण्याबद्दल प्रार्थना केली. मुनीवचनाचा मान राखून जनमेजयाने सर्पाचे हवन पूर्ण केले.

त्यावेळी वैशंपायन मुनींनी जनमेजयाला संपूर्ण भारत कथन केले. पण तरीही राजाच्या मनाची शांती होईना. तो पुनरपि व्यासांना म्हणाला, "हे मुनीवर्य, माझ्या मनाची तळमळ थांबत नाही. काय करावे ? अर्जुनाचा नातू माझा पिता क्षत्रिय असूनही रणात किंवा गृहात यथावकाश मरण न येता अंतरिक्षात मृत्यू पावला. तेव्हा त्याला ज्यायोगे स्वर्गप्राप्ती होईल असा उपाय सांगा."



अध्याय अकरावा समाप्त

GO TOP