श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व द्वाविंशोऽध्यायः
पितृकल्पः
मार्कण्डेय उवाच ॥
ततस्तं चक्रवाकौ द्वावूचतुः सहचारिणौ ।
आवां ते सचिवौ स्यावस्तव प्रियहितैषिणौ ॥ १ ॥
तथेत्युक्त्वा च तस्यासीत् तदा योगात्मिका मतिः ।
एवं ते समयं चक्रुः शुचिवाक् तमुवाच ह ॥ २ ॥
यस्मात् कामप्रधानस्त्वं योगधर्ममपास्य वै ।
एवं वरं प्रार्थयसे तस्माद् वाक्यं निबोध मे ॥ ३ ॥
राजा त्वं भविता तात काम्पिल्ये नात्र संशयः ।
भविष्यतः सखायौ च द्वाविमौ सचिवौ तव ॥ ४ ॥
शप्त्वा चानभिभाष्यांस्ताञ्चत्वारश्चक्रुरण्डजाः ।
तांस्त्रीनभीप्सतो राज्यं व्यभिचारप्रदर्शितान् ॥ ५ ॥
शप्ताः खगास्त्रयस्ते तु योगभ्रष्टा विचेतसः ।
तानयाचन्त चतुरस्त्रयस्ते सहचारिणः ॥ ६ ॥
तेषां प्रसादं ते चक्रुरथैतान् सुमनाब्रवीत् ।
सर्वेषामेव वचनात्प्रसादानुगतं वचः ॥ ७ ॥
अन्तवान् भविता शापो युष्माकं नात्र संशयः ।
इतश्च्युताश्च मानुष्यं प्राप्य योगमवाप्स्यथ ॥ ८ ॥
सर्वसत्त्वरुतज्ञश्च स्वतन्त्रोऽयं भविष्यति ।
पितृप्रसादो ह्यस्माभिरस्य प्राप्तः कृतेन वै ॥ ९ ॥
गां प्रोक्षयित्वा धर्मेण पितृभ्य उपकल्प्यताम् ।
अस्माकं ज्ञानसंयोगः सर्वेषां योगसाधनः ॥ १० ॥
इमं च वाक्यसंदर्भश्लोकमेकमुदाहृतम् ।
पुरुषान्तरितं श्रुत्वा ततो योगमवाप्स्यथ ॥ ११ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि ॥
पितृवाक्ये द्वाविंशोऽध्यायः
चक्रवाकवर्णन -
मार्कंडेय सांगतात - भीष्मा, एकानें आपली राजा होण्याची इच्छा प्रदर्शित करितांच त्याच्या जोडीनें फिरणारांपैकी दुसरे दोन म्हणाले कीं, फार ठीक आहे. तूं राजा होशील तर आम्ही तुझे हितचिंतक सचिव होऊं. त्यानें "बहुत बरे" असें म्हणून आपली वृत्ति योगपर केली, व तिघांनीही पुढील संकेताविषयीं परस्पर ठराव केले. तें पाहून शुचिवाक नांवाचा त्यांचा बंधु स्वतंत्राला म्हणाला, "तूं ज्याअर्थी योगाभ्यास सोडून विशेषतः कामवासनेनें प्रेरित होऊन राजा होण्याची इच्छा करितोस, त्या अर्थीं मी काय बोलतो तें ऐकून घे. तुझ्या इच्छेप्रमाणें तूं कांपिल्य नगरीचा खुशाल राजा हो आणि होशीलही, यांत संशय नाहीं. आणि हे दोघे तुझे बंधु तुझे सचिव होतीलच. पण ज्या अर्थी तुम्ही राज्यलोभानें योगाचरणांत व्यभिचार केलात त्या अर्थी तुम्हां तिघांना आमचा शाप आहे व तुमच्याशीं आम्हीं भाषण करणें सोडून दिलें आहे."
भावांनी याप्रमाणे शाप देतांच ते तिघेही तत्काल योगभ्रष्ट होऊन गडबडून गेले; व पुन्हा आपल्या भावांची विनवणी करून त्यांनीं त्यांचा प्रसाद संपादन केला. तेव्हां त्या चौघांचेही संमतीने सुमना नांवाचा बंधु त्यांना प्रसादयुक्त वचन बोलला की, आमचा शाप निरवधि नाहीं, तो लवकरच संपेल, हा विश्वास ठेवा. या जन्मांतून दूर झालां म्हणजे तुम्हांला पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त होऊन योगाभ्यासाकडे तुमचें लक्ष लागेल. पैकीं या स्वतंत्राला प्राणीमात्राच्या भाषेचें ज्ञान होईल. आपण सर्वजण त्याचे फार आभारी आहो. कारण, याच्या कृतीमुळेच आपण पितरांच्या उद्देशानें प्रथम गाईचा वध करून मग तिचा स्वीकार केला. या कृतीनें आपले पितर तृप्त होऊन त्यांच्या प्रसादाने आपणाला योगाच्या साधनानें प्राप्त होणारें ज्ञान मिळाले. यासाठीं तुम्हां सर्वांचा शाप कांहीं काळानें पुरा होईल; व "सप्तव्याधा इत्यादि" जन्मांतरचे वृत्तांताचा ज्यांत उल्लेख आहे असलीं वाक्यें तुमच्या कानीं पडून तुम्हांस पूर्ववत योगसिद्धि प्राप्त होईल."
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि पितृकल्पे द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥
अध्याय बाविसावा समाप्त
GO TOP
|