श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
एकविंशोऽध्यायः


शङ्‌खचूडकृते प्रबोधवाक्यवर्णनम्

श्रीनारायण उवाच
श्रीकृष्णं मनसा ध्यात्वा रक्षः कृष्णपरायणः ।
ब्राह्मे मुहूर्ते चोत्थाय पुष्पतल्पान्मनोहरात् ॥ १ ॥
रात्रिवासः परित्यज्य स्नात्वा मङ्‌गलवारिणा ।
धौते च वाससी धृत्वा कृत्वा तिलकमुज्ज्वलम् ॥ २ ॥
चकाराह्निकमावश्यमभीष्टदेववन्दनम् ।
दध्याज्यमधुलाजांश्च ददर्श वस्तु मङ्‌गलम् ॥ ३ ॥
रत्‍नश्रेष्ठं मणिश्रेष्ठं वस्त्रश्रेष्ठं च काञ्चनम् ।
ब्राह्मणेभ्यो ददौ भक्त्या यथा नित्यं च नारद ॥ ४ ॥
अमूल्यरत्‍नं यत्किञ्चिन्मुक्तामाणिक्यहीरकम् ।
ददौ विप्राय गुरवे यात्रामङ्‌गलहेतवे ॥ ५ ॥
गजरत्‍नमश्वरत्‍नं धनरत्‍नं मनोहरम् ।
ददौ सर्वं दरिद्राय विप्राय मङ्‌गलाय च ॥ ६ ॥
भाण्डाराणां सहस्राणि नगराणां द्विलक्षकम् ।
ग्रामाणां शतकोटिं च ब्राह्मणाय ददौ मुदा ॥ ७ ॥
पुत्रं कृत्वा तु राजेन्द्रं सर्वेषु दानवेषु च ।
पुत्रं समर्प्य भार्यां तां राज्यं च सर्वसम्पदम् ॥ ८ ॥
प्रजानुचरसङ्‌घं च भाण्डारं वाहनादिकम् ।
स्वयं सन्नाहयुक्तश्च धनुष्पाणिर्बभूव ह ॥ ९ ॥
भृत्यद्वारा क्रमेणैव चकार सैन्यसञ्चयम् ।
अश्वानां च त्रिलक्षेण लक्षेण वरहस्तिनाम् ॥ १० ॥
रथानामयुतेनैव धानुष्काणां त्रिकोटिभिः ।
त्रिकोटिभिर्वर्मिणां च शूलिनां च त्रिकोटिभिः ॥ ११ ॥
कृता सेनापरिमिता दानवेन्द्रेण नारद ।
तस्यां सेनापतिश्चैव युद्धशास्त्रविशारदः ॥ १२ ॥
महारथः स विज्ञेयो रथिनां प्रवरो रणे ।
त्रिलक्षाक्षौहिणीसेनापतिं कृत्वा नराधिपः ॥ १३ ॥
त्रिंशदक्षौहिणीबाधं भाण्डौघं च चकार ह ।
बहिर्बभूव शिविरान्मनसा श्रीहरिं स्मरन् ॥ १४ ॥
रत्‍नेन्द्रसारनिर्माणविमानमारुरोह सः ।
गुरुवर्गान्पुरस्कृत्य प्रययौ शङ्‌करान्तिकम् ॥ १५ ॥
पुष्पभद्रानदीतीरे यत्राक्षयवटः शुभः ।
सिद्धाश्रमं च सिद्धानां सिद्धिक्षेत्रं च नारद ॥ १६ ॥
कपिलस्य तपःस्थानं पुण्यक्षेत्रे च भारते ।
पश्चिमोदधिपूर्वे च मलयस्य च पश्चिमे ॥ १७ ॥
श्रीशैलोत्तरभागे च गन्धमादनदक्षिणे ।
पञ्चयोजनविस्तीर्णा दैर्घ्ये शतगुणा तथा ॥ १८ ॥
शुद्धस्फटिकसङ्‌काशा भारते च सुपुण्यदा ।
शाश्वती जलपूर्णा च पुष्पभद्रा नदी शुभा ॥ १९ ॥
लवणाब्धिप्रिया भार्या शश्वत्सौभाग्यसंयुता ।
शरावतीमिश्रिता च निर्गता सा हिमालयात् ॥ २० ॥
गोमतीं वामतः कृत्वा प्रविष्टा पश्चिमोदधौ ।
तत्र गत्वा शङ्‌खचूडो ददर्श चन्द्रशेखरम् ॥ २१ ॥
वटमूले समासीनं सूर्यकोटिसमप्रभम् ।
कृत्वा योगासनं दृष्ट्वा मुद्रायुक्तं च सस्मितम् ॥ २२ ॥
शुद्धस्फटिकसङ्‌काशं ज्वलन्तं ब्रह्मतेजसा ।
त्रिशलपट्टिशधरं व्याघ्रचर्माम्बरं वरम् ॥ २३ ॥
भक्तमृत्युहरं शान्तं गौरीकान्तं मनोहरम् ।
तपसां फलदातारं दातारं सर्वसम्पदाम् ॥ २४ ॥
आशुतोषं प्रसन्नास्यं भक्तानुग्रहकातरम् ।
विश्वनाथं विश्वबीजं विश्वरूपं च विश्वजम् ॥ २५ ॥
विश्वम्भरं विश्ववरं विश्वसंहारकारकम् ।
कारणं कारणानां च नरकार्णवतारणम् ॥ २६ ॥
ज्ञानप्रदं ज्ञानबीजं ज्ञानानन्दं सनातनम् ।
अवरुह्य विमानाच्च तं दृष्ट्वा दानवेश्वरः ॥ २७ ॥
सर्वैः सार्धं भक्तियुक्तः शिरसा प्रणनाम सः ।
वामतो भद्रकालीं च स्कन्दं च तत्पुरः स्थितम् ॥ २८ ॥
आशिषं च ददौ तस्मै काली स्कन्दश्च शङ्‌करः ।
उत्तस्थुरागतं दृष्ट्वा सर्वे नन्दीश्वरादयः ॥ २९ ॥
परस्परं च भाषन्ते चक्रुस्तत्र च साम्प्रतम् ।
राजा कृत्वा च सम्भाषामुवास शिवसन्निधौ ॥ ३० ॥
प्रसन्नात्मा महादेवो भगवांस्तमुवाच ह ।
महादेव उवाच
विधाता जगतां ब्रह्मा पिता धर्मस्य धर्मवित् ॥ ३१ ॥
मरीचिस्तस्य पुत्रश्च वैष्णवाश्चापि धार्मिकः ।
कश्यपश्चापि तत्पुत्रो धर्मिष्ठश्च प्रजापतिः ॥ ३२ ॥
दक्षः प्रीत्या ददौ तस्मै भक्त्या कन्यास्त्रयोदश ।
तास्वेका च दनुः साध्वी तत्सौभाग्यविवर्धिता ॥ ३३ ॥
चत्वारिंशद्दनोः पुत्रा दानवास्तेजसोल्बणाः ।
तेष्वेको विप्रचित्तिश्च महाबलपराक्रमः ॥ ३४ ॥
तत्पुत्रो धार्मिको दम्भो विष्णुभक्तो जितेन्द्रियः ।
जजाप परमं मन्त्रं पुष्करे लक्षवत्सरम् ॥ ३५ ॥
शुक्राचार्यं गुरुं कृत्वा कृष्णस्य परमात्मनः ।
तदा त्वां तनयं प्राप परं कृष्णपरायणम् ॥ ३६ ॥
पुरा त्वं पार्षदो गोपो गोपेष्वपि सुधार्मिकः ।
अधुना राधिकाशापाद्‍भारते दानवेश्वरः ॥ ३७ ॥
आब्रह्मस्तम्बपर्यन्तं तुच्छं मेने च वैष्णवः ।
सालोक्यसार्ष्टिसायुज्यसामीप्यं च हरेरपि ॥ ३८ ॥
दीयमानं न गृह्णन्ति वैष्णवाः सेवनं विना ।
ब्रह्मत्वममरत्वं वा तुच्छं मेने च वैष्णवः ॥ ३९ ॥
इन्द्रत्वं वा मनुत्वं वा न मेने गणनासु च ।
कृष्णभक्तस्य ते किं वा देवानां विषये भ्रमे ॥ ४० ॥
देहि राज्यं च देवानां मत्प्रीतिं रक्ष भूमिप ।
सुखं स्वराज्ये त्वं तिष्ठ देवास्तिष्ठन्तु वै पदे ॥ ४१ ॥
अलं भूतविरोधेन सर्वे कश्यपवंशजाः ।
यानि कानि च पापानि ब्रह्महत्यादिकानि च ॥ ४२ ॥
ज्ञातिद्रोहस्य पापानि कलां नार्हन्ति षोडशीम् ।
स्वसम्पदां च हानिं च यदि राजेन्द्र मन्यसे ॥ ४३ ॥
सर्वावस्था च समतां केषां याति च सर्वदा ।
ब्रह्मणश्च तिरोभावो लये प्राकृतिके सदा ॥ ४४ ॥
आविर्भावः पुनस्तस्य प्रभावादीश्वरेच्छया ।
ज्ञानवृद्धिश्च तपसा स्मृतिलोपश्च निश्चितम् ॥ ४५ ॥
करोति सृष्टिं ज्ञानेन स्रष्टा सोऽपि क्रमेण च ।
परिपूर्णतमो धर्मः सत्ये सत्याश्रये सदा ॥ ४६ ॥
त्रिभागः सोऽपि त्रेतायां द्विभागो द्वापरे स्मृतः ।
एकभागः कलौ पूर्वं तदंशश्च कमेण च ॥ ४७ ॥
कलामात्रं कलेः शेषे कुह्वां चन्द्रकला यथा ।
यादृक् तेजो रवेर्ग्नीष्मे न तादृक् शिशिरे पुनः ॥ ४८ ॥
दिनेषु यादृङ्‌मध्याह्ने सायं प्रातर्न तत्समम् ।
उदयं याति कालेन बालतां च क्रमेण च ॥ ४९ ॥
प्रकाण्डतां च तत्पश्चात्कालेऽस्तं पुनरेति सः ।
दिने प्रच्छन्नतां याति कालेन दुर्दिने घने ॥ ५० ॥
राहुग्रस्ते कम्पितश्च पुनरेव प्रसन्नताम् ।
परिपूर्णतमश्चन्द्रः पूर्णिमायां च जायते ॥ ५१ ॥
तादृशो न भवेन्नित्यं क्षयं याति दिने दिने ।
पुनश्च पुष्टिमायाति परं कुह्वा दिने दिने ॥ ५२ ॥
सम्पद्युक्तः शुक्लपक्षे कृष्णे म्लानश्च यक्ष्मणा ।
राहुग्रस्ते दिने म्लानो दुर्दिने न विरोचते ॥ ५३ ॥
काले चन्द्रो भवेच्छुक्लो भ्रष्टश्रीः कालभेदतः ।
भविष्यति बलिश्चेन्द्रो भ्रष्टश्रीः सुतलेऽधुना ॥ ५४ ॥
कालेन पृथ्वी सस्याढ्या सर्वाधारा वसुन्धरा ।
काले जले निमग्ना सा तिरोभूताम्बुविप्लुता ॥ ५५ ॥
काले नश्यन्ति विश्वानि प्रभवन्त्येव कालतः ।
चराचराश्च कालेन नश्यन्ति प्रभवन्ति च ॥ ५६ ॥
ईश्वरस्यैव समता ब्रह्मणः परमात्मनः ।
अहं मृत्युञ्जयो यस्मादसंख्यं प्राकृतं लयम् ॥ ५७ ॥
आदर्शं चापि द्रक्ष्यामि वारं वारं पुनः पुनः ।
स च प्रकृतिरूपश्च स एव पुरुषः स्मृतः ॥ ५८ ॥
स चात्मा स च जीवश्च नानारूपधरः परः ।
करोति सततं यो हि तनामगुणकीर्तनम् ॥ ५९ ॥
काले मृत्युं स जयति जन्मरोगभयं जराम् ।
स्रष्टा कृतो विधिस्तेन पाता विष्णुः कृतो भवेत् ॥ ६० ॥
अहं कृतश्च संहर्ता वयं विषयिणः कृताः ।
कालाग्निरुद्रं संहारे नियोज्य विषये नृप ॥ ६१ ॥
अहं करोमि सततं तन्नामगुणकीर्तनम् ।
तेन मृत्युञ्जयोऽहं च ज्ञानेनानेन निर्भयः ॥ ६२ ॥
मृत्युर्मृत्युभयाद्याति वैनतेयादिवोरगाः ।
इत्युक्त्वा स च सर्वेशः सर्वभावेन तत्परः ॥ ६३ ॥
विरराम च शम्भुश्च सभामध्ये च नारद ।
राजा तद्वचनं श्रुत्वा प्रशशंस पुनः पुनः ॥ ६४ ॥
उवाच मधुरं देवं परं विनयपूर्वकम् ।
शङ्खचूड उवाच
त्वया यत्कथितं देव नान्यथा वचनं स्मृतम् ॥ ६५ ॥
तथापि किञ्चिद्यथार्थं श्रूयतां मन्निवेदनम् ।
ज्ञातिद्रोहे महत्पापं त्वयोक्तमधुना च यत् ॥ ६६ ॥
गृहीत्वा तस्य सर्वस्वं कुतः प्रस्थापितो बलिः ।
मया समुद्धृतं सर्वमूर्ध्वमैश्वर्यमीश्वर ॥ ६७ ॥
सुतलाच्च समुद्धर्तुं नालं तत्र गदाधरः ।
सभ्रातृको हिरण्याक्षः कथं देवैश्च हिंसितः ॥ ६८ ॥
शुम्भादयश्चासुराश्च कथं देवैर्निपातिताः ।
पुरा समुद्रमथने पीयूषं भक्षितं सुरैः ॥ ६९ ॥
क्लेशभाजो वयं तत्र ते सर्वे फलभोगिनः ।
क्रीडाभाण्डमिदं विश्वं प्रकृतेः परमात्मनः ॥ ७० ॥
यस्मै यत्र स ददाति तस्यैश्वर्यं भवेत्तदा ।
देवदानवयोर्वादः शश्वन्नैमित्तिकः सदा ॥ ७१ ॥
पराजयो जयस्तेषां कालेऽस्माकं क्रमेण च ।
तदावयोर्विरोधे वाऽऽगमनं निष्कलं परम् ॥ ७२ ॥
समसम्बन्धिनो बन्धोरीश्वरस्य महात्मनः ।
इयं ते महती लज्जा युद्धेऽस्माभिः सहाधुना ॥ ७३ ॥
जये ततोऽधिका कीर्तिर्हानिश्चैव पराजये ।
इत्येतद्वचनं श्रुत्वा प्रहस्य च त्रिलोचनः ॥ ७४ ॥
यथोचितमुत्तरं तमुवाच दानवेश्वरम् ।
महादेव उवाच
युष्माभिः सह युद्धे मे ब्रह्मवंशसमुद्‍भवैः ॥ ७५ ॥
का लज्जा महती राजन्नकीर्तिर्वा पराजये ।
युद्धमादौ हरेरेव मधुना कैटभेन च ॥ ७६ ॥
हिरण्यकशिपोश्चैव सह तेनात्मना नृप ।
हिरण्याक्षस्य युद्धं च पुनस्तेन गदाभृता ॥ ७७ ॥
त्रिपुरैः सह युद्धं च मयापि च पुरा कृतम् ।
सर्वेश्वर्याः सर्वमातुः प्रकृत्याश्च बभूव ह ॥ ७८ ॥
सह शुम्भादिभिः पूर्वं समरः परमाद्‍भुतः ।
पार्षदप्रवरस्त्वं च कृष्णस्य परमात्मनः ॥ ७९ ॥
ये ये हताश्च दैतेया नहि केऽपि त्वया समाः ।
का लज्जा महती राजन् मम युद्धे त्वया सह ॥ ८० ॥
सुराणां शरणस्यैव प्रेषितश्च हरेरहो ।
देहि राज्यं च देवानामिति मे निश्चितं वचः ॥ ८१ ॥
युद्धं वा कुरु मत्सार्धं वाग्व्यये किं प्रयोजनम् ।
इत्युक्त्वा शङ्‌करस्तत्र विरराम च नारद ।
उत्तस्थौ शङ्‌खचूडश्च ह्यमात्यैः सह सत्वरम् ॥ ८२ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादलसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे नारायणनारदसंवादे शङ्‌खचूडकृते
प्रबोधवाक्यवर्णनं नामेकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥


शंखचूड व भगवान शिव यांचा संवाद -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

दुसरे दिवशी तो शंखचूड ब्राह्ममुहूर्तावर सुखशय्येवरून उठला. सर्व मंगल वस्तू अवलोकन करून त्याने नित्यकर्मे उरकली. त्यांनी देवांना नमस्कार करून ब्राह्मणांना उत्तमोत्तम दाने दिली. आपल्या पुत्राला राज्याभिषेक केला. नंतर सर्व राजपुत्राच्या हवाली करून त्याने युद्धाचा पोषाख अंगावर परिधान केला. त्याने सर्व सैन्य जमा केले. तीन लक्ष घोडे, एक लक्ष हत्ती, दहा हजार उत्तमोत्तम रथ, तीन कोटी धनुष्ये व तेवढेच वीर दानव, त्यांनी कवचे धारण केली होती. तीन कोटी योद्ध्यांच्या हातात शूल होते. या सर्व अपरिमित सेनेवर युद्धकुशल सेनापती नेमला.

तीन लक्ष अक्षौहिणी सैन्य सेनापतीच्या हवाली करून राजा तीस लक्ष अक्षौहिणी सैन्यासह राज्याच्या द्रव्याचे रक्षण करू लागला. श्रीहरीचे स्मरण करून तो शिबिरातून बाहेर पडला. उत्तम दिव्य विमानात आरूढ होऊन तो पुष्पभद्रा नदीकाठी शुभ वटवृक्षाकडे गेला. तेथे तो शंकराकडे गेला.

तेथे सिद्धांचा आश्रम असून, ते सिद्धीक्षेत्र आहे. ते कपिलाचे तपस्थान असून भारतातील पुण्यक्षेत्र आहे. पश्चिम समुद्राच्या पूर्वेस व मलयागिरीच्या पश्चिमेस ते स्थान आहे. गंधमादनाच्या दक्षिणेस ते पाच योजने विस्तीर्ण आहे. ती सर्वात पुण्यप्रद अशी पुष्पभद्रा नदी तेथून वाहते. ती क्षारसमुद्राची भार्या असून शरावती तिला येऊन मिळते. त्या शुभ नदीच्या तीरावर वटवृक्षाखाली भगवान शिव बसला होता. त्या सर्वज्ञ भगवानाला शंखचूडाने प्रणाम केला. त्याच्या वामबाजूला भद्रकाली व समोर स्कंद उभा होता. त्यांनाही राजाने वंदन केले. तेव्हा सर्वांनी त्याला आशीर्वाद दिला. राजा शंखचूडाला भगवान महादेव म्हणाला, "राजा, जगाचा कर्ता ब्रह्मदेव, हाच धर्माचा जनक असून धर्मवेत्ता आहे. त्याचा पुत्र मारिची हाही धार्मिक व विष्णूभक्त आहे. त्याचा पुत्र कश्यप हासुद्धा धार्मिक आहे. त्याला दक्षाने तेरा कन्या अर्पण केल्या. त्यांपैकी दितीला चाळीस पुत्र झाले. तेच दानव होत. त्यांपैकी विप्रचिती या पराक्रमी पुत्राचा दंभ नावाचा पुत्र जितेंद्रिय होता. त्याने एक लक्ष वर्षे पुष्करात तप केले. त्याला तुझ्यासारखा कृष्णभक्त पुत्र म्हणून लाभला. तूही वैष्णव आहेस पण तुझा भ्रम झाला असून तू सांप्रत तुच्छ मानतोस. तू इंद्र व देव यांच्या प्रदेशाविषयी कसलीच दखल घेत नाहीस. मग तुझ्याजवळ त्यांच्याविषयी आदरबुद्धी कशी असणार ?

तेव्हा हे भूपते, तू आता देवांचे राज्य देऊन टाक. माझे प्रेम मिळव आणि स्वतःच्या राज्यात सुखाने रहा. देवांना स्वस्थानी राहू दे. कुणालाही विरोध करू नकोस. कारण त्या कश्यपाचे तुम्ही वंशज आहात. तू सर्वांना सारखेच मान. या विश्वात नित्य काही नाही. ब्रह्मदेवाचाही लय होत असतो.
सत्य युगात धर्म परिपूर्ण व सत्याच्या आश्रयाने रहातो. त्रेतायुगात त्याचे तीन भाग होतात. द्वापारात तो अर्ध्याने कमी होतो. असा कमी होत होत तो कालौघाने नष्ट होतो. नंतर सूर्याप्रमाणे उदय पावतो. असे हे कालचक्र नित्य चालू असते.

पृथ्वी कालाने धनसंपन्न व सर्व प्राण्यांना आश्रय देणारी होते, तर पुढे ती जलात निमग्न होऊन जाते. त्या परब्रह्माने असंख्य प्रकृतीलय पाहिले आहेत. तोच श्रेष्ठ आत्मा असून विविध रूपे धारण करतो. तो जरा-मरण इत्यादींना जिंकून उरतो. त्यानेच ब्रह्मदेवाला उत्पत्तीकर्ता, विष्णूला पालनकर्ता व मला संहारकर्ता केले आहे. म्हणून त्याचा प्रभाव पाहून मीही त्याचेच चिंतन करतो. म्हणूनच मी मृत्युंजय व निर्भय झालो आहे."

असे म्हणून तो शंभू स्थिर झाला. हे ऐकून राजाने शंकराची स्तुती केली. तो मधुर वाणीने म्हणाला, "हे देवेश्वरा, आपले म्हणणे सत्य आहे. आता माझे ऐकावे. देवांनी बलीला हाकून का लावले ? ते गेलेले ऐश्वर्य मी पुनः वर काढले आहे. तेव्हा मी हे ऐश्वर्य का परत द्यावे ? मी बलीलाही वर आणले असते, पण त्याचा उद्धार करण्यास मी असमर्थ आहे.

हे देवा, देवांनी हिरण्याक्षाचा वध केला. शुंभ इत्यादी असुरांचा नाश केला. समुद्रमंथनाचे वेळी दानवांची दिशाभूल केली. त्यावेळी त्रास आम्ही सोसला, अमृत देवांनी पळवले. यावरून हे विश्व म्हणजे प्रकृती व परमात्मा यांचे क्रीडास्थान आहे. तो ज्याला ऐश्वर्य देतो तोच त्याचा अधिकारी होतो. देव-दानवांमध्ये नित्य काही कारणावरून वाद चालू असतो. दोघांनाही जयपराजय भोगावा लागतो. अशा परिस्थितीत देव व दानव याबाबत तुमचे भाव समतेचे असल्यामुळे तुमचे आजचे येथे येणे हे निष्फळ होय. म्हणून तुम्ही आमच्याबरोबर युद्धप्रवृत्त होणे म्हणजे लज्जास्पद होय. आमचा जय झाल्यास तुमची मानहानी अधिक होईल."

शंखचूडाचे भाषण ऐकून शंकर म्हणाले, "तुम्ही ब्रह्मकुलोत्पन्न असल्याने जय अथवा पराजय यामुळे कीर्ती अथवा अपकीर्ती याबद्दल मी निश्चिंत आहे. हरीचे मधुकैटभाशी तसेच त्या हिरण्याक्षाशी युद्ध झाले. मी पूर्वी त्रिपुरासुराशी युद्ध केले. सर्वेश्वरी प्रकृती व शुंभ यांचे अद्‌भुत युद्ध झाले.

पण तू त्या परमात्म्या कृष्णाचा पार्षद आहेस. आजवर मृत झालेल्या दैत्यात तुझ्यासारखा कोणी उत्पन्न झाला नाही. तुझ्याबरोबर युद्ध करण्यात लज्जा मानण्याचे कारण काय ? त्या देवेश्वर हरीने मला पाठविले आहे. म्हणून तू देवांचे राज्य परत दे. असे सांगून बोलण्याचे थांबले. हे ऐकताच शंखचूड आपल्या अमात्यासह तेथून वेगाने परत जाण्यास निघाला.


अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP